Saturday, March 9, 2013

भाषा हे वर्चस्ववादाचे एक साधन!


भाषा हे वर्चस्ववादाचे नेहमीच जगभरचे एक साधन राहिलेले आहे. संस्कृत ही भाषा अर्वाचीन व कृत्रीम रित्या बनवली गेली असुनही तिला साक्षात "देववाणी" चा अनादि दर्जा दिला गेला. वेद तर ईश्वराचे नि:श्वास बनले. जे जे संस्कृतात पारंगत तेच काय ते विद्वान व प्राकृतात पुरातन काळापासून जनव्यवहार करणारे ते हलके, दुय्यम अशी विभागणी केली गेली. स्त्री-पुरुष भेदाचाही जन्म संस्कृत साहित्याने घातला. उदा. सर्व संस्कृत म्हणवणा-या नाटकांतील स्त्रीपात्रे प्राकृतातुनच बोलतात...मग ती स्वर्गीची उर्वशी असो कि एखादी महाराणी का असेना! संस्कृत संवाद फक्त कथित उच्चभ्रु पुरुषांना! खरे तर याचा मुलार्थ वेगळा होता पण संस्कृत भाषेचा वापर समाज विभागण्यासाठी निरलसपणे केला गेला. स्त्री-पुरुष भेदभावासाठीही तिचा वापर केला गेला. वैदिक धर्मियांना त्यांच्याच धर्माच्या स्त्रीयांबद्दलचा इतका आकस पुर्वी का होता हे कळत नाही.

संस्कृत भाषेने प्राकृत भाषकांच्या मनात अखंडित न्युनगंड निर्माण करायचे अखंड कार्य केले. "संस्कृत देवांनी केली मग प्राकृत काय चोरांपासून झाली?" असे एकनाथांनी दरडावून विचारले असले तरी त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. वैदिक धर्मियांनी संस्कृतचाही उपयोग एका हत्याराप्रमाणे केला. संस्कृत ही प्राकृतोद्भव उत्तरकालीन भाषा असुनही उलट प्राकृत भाषाच संस्कृतोद्भवच आहेत असे एवढे बिंबवले गेले आहे कि त्या भ्रमातून बाहेर निघणे आजही अनेकांना अवघड जाते.

दहाव्या शतकानंतर वैदिक धर्मीय पुनरुज्जीवनाच्या चळवळीच्या काळात (निबंध काळात) संस्कृत भाषा शिकण्याची हिंदुंवर बंदी आली आणि धार्मिकही गोंधळ घालणे सुरु झाले हे तर सर्वांना माहितच आहे...संस्कृत ही चक्क देववाणी बनली. तीही मग अपरिवर्तनीय अणि व्याकरणनिष्ठ बनल्याने लवकरच मृतप्राय भाषेत जमा झाली. मनुस्मृतीचे उलटपालट अर्थ लावत हिंदुंना शुद्र लेखत त्या भाषेच्या आसपासही फिरकू देणे बंद झाले. खरे तर या भाषेची निर्मिती हिंदु, बौद्ध, जैन व वैदिकांनीही संयुक्तपणे केलेली! पाणिनी वैदिक धर्मीय नव्हता पंण त्याने संस्कृतला व्याकरण दिले. संस्कृतचे स्वामित्वाधिकार मात्र नंतर बळकावल्यावर भाषेचे मातेरे होणे अपरिहार्य होते. कालिदास, शूद्रकासारखे हिंदू कवी-नाटककार नंतर संस्कृतात यामुळेच झाले नाहीत.

संस्कृत भाषा कृत्रीम असली, उत्तरकालीन असली तरी त्या भाषेचे निर्मिती अत्यंत शास्त्रशुद्धपणे केली गेलेली आहे यात शंका नाही. ते श्रेय अर्थात पाणिनीचे. त्याचे नादमाधुर्य अप्रतीमच आहे. परंतू कठोर व्याकरणाच्या नियमांत जखडली गेल्याने तिची प्रगती थांबत थांबत शेवटी ती जवळपास मृत भाषेच्या जवळ पोहोचली हे वास्तव नाकारता येत नाही.

पण आक्षेप असा आहे कि कोणत्याही भाषेने वर्गीय वर्चस्वाची भुमिका घ्यावी काय? वैदिक-अवैदिक या विभाजनात संस्कृत भाषा एक हत्यार म्हणुन वापरली गेली. इंडो-युरोपियन भाषा गट या नांवाखाली युरोपियनांनी तोच उद्योग केला आहे. पण इंग्रजांनी इंग्रजी भाषेचा वर्चस्वतावाद माजवला पण ती भाषा गैर-इंग्रजांना शिकायची बंदी घातली नाही. आधुनिक काळात इंग्रजीने लवचिकता स्विकारल्याने इतकी विविध रुपे धारण केली आहेत व फोफावत आहे कि त्यापुढे उद्या आपल्या भाषाही टिकाव धरतील कि नाही ही शंका आहे.

मराठीलाही आता व्याकरणात जखडण्याचे चंग बांधले जात आहेत. सत्वशीला सामंतांसारख्या विदुषि त्यात मोठा पुढाकार घेत असत. मराठी संस्कृतोद्भव भाषा आहे असे मानून संस्कृताच्याच व्याकरण नियमांत मराठी जखडली तर मराठीचेही संस्कृत व्हायला वेळ लागणार नाही हे बहुदा या विद्वानांच्या लक्षात येत नसावे. आज पुणेरी मराठी अन्य मराठी बोलींवर प्रभुत्व गाजवायचा प्रयत्न करत प्रादेशिक बोलींत लिहिणा-यांना आपसूक दुय्यम स्थान देत चालली आहे.

भाषिक न्युनगंड निर्माण करणे मानवी अस्तित्वावर घाला घातल्यासारखेच नव्हे काय? संस्कृत भाषेने जे कार्य पुर्वी पार पाडले तसेच आता मराठीने करावे अशी अपेक्षा ठेवत कोणी काम करत असेल तर त्याचा विरोध करायलाच हवा.

संस्कृत भाषा ही सिंधी/शौरसेनी/मागधी/द्राविड/माहाराष्ट्री प्राकृत अशा अनेक भाषांचे ग्रांथिक कारणांसाठी केलेले कृत्रीम प्रस्फुटन होते. परंतु अन्य भाषा संस्कृतोद्भव आहेत हा भ्रम भाषिक न्युनगंडाला कारण झाला नाही काय? जसे युरोपात ल्यटीनमद्ध्ये लिहिणाराच तेवढा विद्वान असा एक भ्रम होताच कि! पण ल्यटीन मृत पावली. खुद्द उच्चभ्रु इंग्रजांना इंग्रजीत बोलायची शरम वाटे. ते फ्रेंच भाषेत बोलत. परंतु इंग्रजी समाजाने भाषिक वर्चस्वतावाद हाणुन पाडला. आज ती जगाची संपर्कभाषा बनली ती केवळ राज्यकर्त्यांची भाषा होती म्हणुन नव्हे तर भाषेला लवचिकता दिली म्हणुन. आम्ही मात्र भाषेला उलट्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत असू तर मग मराठीच्या भवितव्याबद्दल गळे काढण्यात अर्थ नाही.

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...