मानवी भावविश्व आणि बुद्धीनिष्ठ विचारांचे विश्व या दोनही स्वतंत्र बाबी आहेत. एकाच माणसात नेहमीच या दोन्ही बाबी संयुक्त निवास करत असतात. करु शकणे हेच त्यांचा सह-अस्तित्वाचे कारण आहे.
कविवर्य श्रीधर तिळवे यांनी माझ्या एका कवितेवरील प्रतिक्रियेत लिहिले होते कि तर्काधिष्ठता आणि रुमानीपणा, ज्या विरोधी बाबी आहेत त्या तुमच्या लेखनात कशा येतात? उत्तर असे आहे कि माणसाने आईवर प्रेम करणे हा भावविश्वाचा भाग आहे तर आईचे तर्कबद्ध विश्लेशन करणे हा बुद्धीवादाचा भाग आहे. मला असे वाटते कि फुले आणि बाबासाहेबांना हे चांगलेच माहित होते.
मी तर्कभावनेने राम आणि कृष्ण यांची विविधांगाने चरित्रमिमांसा करू शकतो. केलेली आहे आणि करत राहील. ती बरोबरच असेल असा दावा नाही. परंतू केवळ हिंदुच नव्हेत तर वैदिक ते जैन, बौद्ध, मुस्लिम आणि अगदी ख्रिस्त्यांनाही ज्यांच्या जनमानसातील स्थानाचा प्राचीन काळापासून आधार घ्यावाच लागला ते भावविश्व हे असेच टाकुन देण्यासारखे नसते.
जात्यावरील आयाबहिणींच्या ओव्यांपासून ते कथित अभिजनांनाही मोह घालते ते व्यक्तित्व ही समाजमानसाची उपज आहे असे मी मानतो. ती चूक कि बरोबर याची चाचपणी केलीच पाहिजे.
परंतू ती तशी करतांना ही अशी व्यक्तिमत्वे फक्त भारतात नव्हे तर जवळपास अर्धे जग कशी मानस व्यापून बसली यावरही विचार व्हायला हवा.
यात भ्रष्ट मानसिकतेच्या लोकांनी फायदे-उकळावू धोरण कसे राबवले याचाही विचार व्हायला हवा. राम-कृष्ण नाकारायचे हे समजा घटकाभर ठीक आहे...मग चिकित्सेचीही गरज रहात नाही...पण मुळात स्वीकारच कसा झाला याचाही तेवढ्याच चिंतनियतेने विचार व्हायला हवा. माझ्या भावविश्वात काही मिथकतेला स्थान आहे. तर्काधिष्टित ते तपासायचे निर्दय कार्यही मी करतो..केलेच पाहिजे...पण रुपकात्मकता...त्याचे काय करायचे?
उदा. कृष्ण म्हटले कि बासरी आली...राम म्हटला कि धनुष्य आले...क्रुष्णाने गीता सांगितली कि नाही, तो पराक्रमी होता कि भेकड या व्यर्थ गोष्टी भावविश्वासाठी होतात. रामाने कआय न्याय केले आणि काय अन्याय केले या मित्थकथांत जात विश्लेशन करतांना रामाचे भावविश्वातील स्थान कसे नाकारणार?
जे भगवान बुद्धाला जमले नाही, जैनांना जमले नाही...ते का जमले नाही यावरही चिंतन करत विश्लेशन करायलाच लागनार आहे.
मी इंग्रजीतील पहिली नर्सरी -हाइम लिहून संगीतबद्ध करुन रेकोर्ड केली तीच मुळात...I pray to you...I bow before you, O Lord Rama या शब्दांनी सुरू होते. आणि मी कथित अर्थाने रामभक्त नाही.
पण काही बाबी सांस्कृतीक परिप्रेक्षात समाजमनाची आणि म्हणुन व्यक्तिमनाची एक अपरिहार्य भाग बनून जाते. रामाच्या जागी बौद्ध आणा ही नव्या कालाची एक मानसिक गरज असेल तर तसेही होईल. शेवटी प्रागितिहासातील कोनाला मोठे म्हनायचे आणि कोणाला नाही...
हे शेवटी समाज-मानस-शास्त्र ठरवते.
हे नाकारता कसे येईल?
Pls visit following links:
http://ssonawani.blogspot.in/2013/04/lord-krishna-was-he-real.html
http://ssonawani.blogspot.in/2013/04/ramayana-story-behind-story.html
कविवर्य श्रीधर तिळवे यांनी माझ्या एका कवितेवरील प्रतिक्रियेत लिहिले होते कि तर्काधिष्ठता आणि रुमानीपणा, ज्या विरोधी बाबी आहेत त्या तुमच्या लेखनात कशा येतात? उत्तर असे आहे कि माणसाने आईवर प्रेम करणे हा भावविश्वाचा भाग आहे तर आईचे तर्कबद्ध विश्लेशन करणे हा बुद्धीवादाचा भाग आहे. मला असे वाटते कि फुले आणि बाबासाहेबांना हे चांगलेच माहित होते.
मी तर्कभावनेने राम आणि कृष्ण यांची विविधांगाने चरित्रमिमांसा करू शकतो. केलेली आहे आणि करत राहील. ती बरोबरच असेल असा दावा नाही. परंतू केवळ हिंदुच नव्हेत तर वैदिक ते जैन, बौद्ध, मुस्लिम आणि अगदी ख्रिस्त्यांनाही ज्यांच्या जनमानसातील स्थानाचा प्राचीन काळापासून आधार घ्यावाच लागला ते भावविश्व हे असेच टाकुन देण्यासारखे नसते.
जात्यावरील आयाबहिणींच्या ओव्यांपासून ते कथित अभिजनांनाही मोह घालते ते व्यक्तित्व ही समाजमानसाची उपज आहे असे मी मानतो. ती चूक कि बरोबर याची चाचपणी केलीच पाहिजे.
परंतू ती तशी करतांना ही अशी व्यक्तिमत्वे फक्त भारतात नव्हे तर जवळपास अर्धे जग कशी मानस व्यापून बसली यावरही विचार व्हायला हवा.
यात भ्रष्ट मानसिकतेच्या लोकांनी फायदे-उकळावू धोरण कसे राबवले याचाही विचार व्हायला हवा. राम-कृष्ण नाकारायचे हे समजा घटकाभर ठीक आहे...मग चिकित्सेचीही गरज रहात नाही...पण मुळात स्वीकारच कसा झाला याचाही तेवढ्याच चिंतनियतेने विचार व्हायला हवा. माझ्या भावविश्वात काही मिथकतेला स्थान आहे. तर्काधिष्टित ते तपासायचे निर्दय कार्यही मी करतो..केलेच पाहिजे...पण रुपकात्मकता...त्याचे काय करायचे?
उदा. कृष्ण म्हटले कि बासरी आली...राम म्हटला कि धनुष्य आले...क्रुष्णाने गीता सांगितली कि नाही, तो पराक्रमी होता कि भेकड या व्यर्थ गोष्टी भावविश्वासाठी होतात. रामाने कआय न्याय केले आणि काय अन्याय केले या मित्थकथांत जात विश्लेशन करतांना रामाचे भावविश्वातील स्थान कसे नाकारणार?
जे भगवान बुद्धाला जमले नाही, जैनांना जमले नाही...ते का जमले नाही यावरही चिंतन करत विश्लेशन करायलाच लागनार आहे.
मी इंग्रजीतील पहिली नर्सरी -हाइम लिहून संगीतबद्ध करुन रेकोर्ड केली तीच मुळात...I pray to you...I bow before you, O Lord Rama या शब्दांनी सुरू होते. आणि मी कथित अर्थाने रामभक्त नाही.
पण काही बाबी सांस्कृतीक परिप्रेक्षात समाजमनाची आणि म्हणुन व्यक्तिमनाची एक अपरिहार्य भाग बनून जाते. रामाच्या जागी बौद्ध आणा ही नव्या कालाची एक मानसिक गरज असेल तर तसेही होईल. शेवटी प्रागितिहासातील कोनाला मोठे म्हनायचे आणि कोणाला नाही...
हे शेवटी समाज-मानस-शास्त्र ठरवते.
हे नाकारता कसे येईल?
Pls visit following links:
http://ssonawani.blogspot.in/2013/04/lord-krishna-was-he-real.html
http://ssonawani.blogspot.in/2013/04/ramayana-story-behind-story.html