संकट आलंय म्हणून
घाबरुन जावू नकोस
बावरून जावू नकोस
जीवनात संकटे येतच असतात
नव्हे,
त्यांना यावंच लागतं
नियमीत येणा-या
जीव जाळणा-या
ग्रीष्माप्रमाणे
त्यांशिवाय
थोडीच कळणार आहे
जीवनाची किंमत?
संकटांच्या राशी
कोसळुन गेल्यानंतर
लाभणारे एक साधे
ओलावेदार
स्नेहमय
पर्जन्य-स्मितही
जगण्याचे नवे निमित्त देते
पुन्हा जगण्याची
अपार उर्मी देते
म्हणून गड्या
जरा धीर धर...
जरा धीर धर.........
ग्रीष्मानंतर
पावसाळा नियतच आहे!
घाबरुन जावू नकोस
बावरून जावू नकोस
जीवनात संकटे येतच असतात
नव्हे,
त्यांना यावंच लागतं
नियमीत येणा-या
जीव जाळणा-या
ग्रीष्माप्रमाणे
त्यांशिवाय
थोडीच कळणार आहे
जीवनाची किंमत?
संकटांच्या राशी
कोसळुन गेल्यानंतर
लाभणारे एक साधे
ओलावेदार
स्नेहमय
पर्जन्य-स्मितही
जगण्याचे नवे निमित्त देते
पुन्हा जगण्याची
अपार उर्मी देते
म्हणून गड्या
जरा धीर धर...
जरा धीर धर.........
ग्रीष्मानंतर
पावसाळा नियतच आहे!
