Sunday, May 5, 2013

संकट आलंय म्हणून....


संकट आलंय म्हणून
घाबरुन जावू नकोस
बावरून जावू नकोस
जीवनात संकटे येतच असतात
नव्हे, 
त्यांना यावंच लागतं
नियमीत येणा-या
जीव जाळणा-या
ग्रीष्माप्रमाणे
त्यांशिवाय 
थोडीच कळणार आहे
जीवनाची किंमत?

संकटांच्या राशी 
कोसळुन गेल्यानंतर
लाभणारे एक साधे 
 ओलावेदार
स्नेहमय 
पर्जन्य-स्मितही
जगण्याचे नवे निमित्त देते
पुन्हा जगण्याची 
अपार उर्मी देते
म्हणून गड्या
जरा धीर धर...
जरा धीर धर.........

ग्रीष्मानंतर
 पावसाळा नियतच आहे!

3 comments:

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मर्यादा

     चीनच्या डीपसीकने अलीकडेच जगभर कसा हादरा दिला याचे वृत्त सर्वांनीच वाचले असेल. त्यावर चर्चाही केल्या असतील. भारतही आपने स्वत:चे ए....