Sunday, May 5, 2013

संकट आलंय म्हणून....


संकट आलंय म्हणून
घाबरुन जावू नकोस
बावरून जावू नकोस
जीवनात संकटे येतच असतात
नव्हे, 
त्यांना यावंच लागतं
नियमीत येणा-या
जीव जाळणा-या
ग्रीष्माप्रमाणे
त्यांशिवाय 
थोडीच कळणार आहे
जीवनाची किंमत?

संकटांच्या राशी 
कोसळुन गेल्यानंतर
लाभणारे एक साधे 
 ओलावेदार
स्नेहमय 
पर्जन्य-स्मितही
जगण्याचे नवे निमित्त देते
पुन्हा जगण्याची 
अपार उर्मी देते
म्हणून गड्या
जरा धीर धर...
जरा धीर धर.........

ग्रीष्मानंतर
 पावसाळा नियतच आहे!

3 comments:

कॉर्पोरेट क्षेत्र शेतीत उतरण्याचे धोके...

  मागील लेखात आपण भविष्यात सर्व शेती कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात गेली आणि त्यांनी शेतीचे पूर्ण नियंत्रण घेतले, तर त्याचे काय परिणाम होऊ श...