सोक्रेटिस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता मानला जातो. त्याने स्वत: एकही पुस्तक लिहिले नाही. त्याचा शिष्य प्लेटोच्या "डयलोग" या ग्रंथामुळे व काही नाटकांमुळे आपल्याला सोक्रेटिस माहित आहे. तरुणांना प्रश्न विचारायला प्रेरीत करून अराजक घडवतो या आरोपाखाली त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावली गेली. त्याला पळून जायची संधी उपलब्ध असतांनाही आपल्या राज्यव्यवस्थेची घटना पायतळी तुडविली जावू नये म्हणुन तो हेमलाक या जहरी वनस्पतीचा रस पिऊन मृत्यूदंड स्वीकारतो. वीष घ्यायला सुरुवात केल्यापासून तो मरेपर्यंत जे उदात्त विचार ऐकवतो ते आजही मानवी जीवनेतिहासाला थक्क करनारे आहेत. "सूर्य पाहिलेला माणुस" या नाटकाने आणि त्यातील डा. श्रीराम लागू यांच्या चिरंतन अभिनयाने गाजलेली ही कलाकृती बव्हंशी विचारी मराठी माणसानी पाहिलेली आहे.... असेल.... त्यातून आम्ही काय शिकलो हा खरा प्रश्न आहे.
सोक्रेटिस जन्माला आला तो काळ ग्रीसमधील सांस्कृतीक आणि राजकीय संक्रमणाचा काळ होता. सोक्रेटिस वंशपरंपरेने खरे तर दगडफोड्या. आपल्याकडे वडार समाज जे काम करतो तेच काम तो करत असे. ग्रीसमद्धे आपल्यासारखी जातीय व्यवस्था नसल्याने एका दगडफोड्यालाही आपली अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य जसे होते तसेच प्लेटोला त्याचा शिष्य बनायला कमीपना वाटला नाही...त्याचेही स्वातंत्र्य असेल...उलट त्याने या आपल्या या लोकोत्तर गुरुला, ज्याने एक शब्दही लिहिला नाही, अजरामर करून सोडले.
प्रश्न विचारायला प्रेरित करना-या सोक्रेटीसने राजकीय कारणांमुळे देहदंड सोसला. प्रश्न विचारणारे तरुण नसतात तो समाज मृतवत असतो. प्रश्नांची दखल घेतली नाही तर सत्ता, मग त्या कोणत्याही असोत, धार्मिक...सांस्कृतीक असोत की राजकीय...उलथल्या जातात हे इतिहासात घडले आहे. भारतही त्याला अपवाद नव्हता. महावीर-बुद्धाने जी सांस्कृतीक क्रांती घडवली ती प्रश्न विचारुनच. उत्तरे मिळाली नाहीत तेंव्हा त्यांनी ती स्वतंत्रपणे शोधली आणि प्रस्थापित सत्ता उध्वस्त झाल्या. कपिलमुनी, कणाद, मंस्खली घोशाल, अजित केशकंबल यांनीही व्यवस्थेवर प्रश्नचिन्हे उभी केली. पुढेही शेकडो आव्हानकारी उभे ठाकले...मग ते चक्रधर असोत की नाथपंथीय...संतपरंपरा असो कि आधुनिक काळातील आगरकर, म. फुले, बाबासाहेब. या सर्वांचे एकमेवद्वितीय वैशिष्ट्य हे होते कि त्यांनी प्रश्न विचारले. व्यवस्थेला उत्तरे देता आली नाहीत म्हणुन त्यांनी स्वत: उत्तरे शोधली आणि सामाजिक क्रांती घडवली. परंतू आपण या विविध समाजसांस्कृतीक क्रांत्यांतून अथवा अभिसरणांतून एक संमिश्र आणि म्हणुनच एक परस्परविरुद्ध कलहांकित संस्कृती घडवली आहे. त्याची फळे आपण आजही भोगत आहोत.
हे सारे खरे आहे. पण आपण आज तरी बदललो आहोत काय हा खरा प्रश्न आहे. आज या लेखाला कारण घडलेत माझे तरून मित्र श्रीरंजन आवटे. आवटेंनी "डहाके सर, नेमकं काय निवडून घ्यायचं?" असा एक लेख लोकप्रभात (http://epaper.lokprabha.com/137059/Lokprabha/26-07-2013#dual/28/1 ) प्रसिद्ध केला. या लेखात त्यांनी "नेमके निवडून घ्या ज्ञान" या दहावीच्या नव्या मराठी पुस्तकातील लहू कानडे यांच्या कवितेबाबत ती कशी निवडली गेली याबाबत विनम्रपणे प्रश्न उपस्थित केले होते. संपुर्ण कविता वर दिलेल्या दुव्यात आहे. या लेखाला माझ्यासकट अनेक वाचकांची पत्रे गेली होती. पण अर्थातच ती प्रसिद्ध झाली नाहीत. असो. पण वसंत डहाके सरांनी आवटेंच्या लेखाला प्रत्युत्तर दिले आणि "नेमके निवडून घ्या ज्ञान ही कविताच" असे ठामपणे सांगितले. ( http://epaper.lokprabha.com/142462/Lokprabha/09-08-2013#dual/12/2 ) परंतू हे लिहितांना त्यांनी आवटेंच्या मुळ प्रश्नांना बगल देत जे उत्तर दिले त्यातील हे विधान महत्वाचे आहे. डहाके सर म्हणतात, "...या निकषांनुसार कविता ठरलेली कोणतीही रचना दहावीच्या अभ्यासक्रमात सामील करता येईल असे मला वाटत नाही." थोडक्यात डहाके सरांचे म्हणने आहे कि कवितेचे कोणतेही निकष नसतात तर मग त्या निवडायला निवडसमितीची गरजच काय हा प्रश्न उपस्थित होत नाही काय? वृत्तप्त्रीय बातम्यांतील ओळीही तोडून छापल्या तर तीही एक मूक्त कविता बनेलच कि!
असो. डहाके सरांनी आपल्या कवितांच्या आकलनाला सांभाळत उत्तर तरी दिले याबाबत त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. या निमित्ताने बालाजी सुतार, छाया थोरात, संतोष देशपांडे, भैरवी प्रेडिक्ट्स अशा असंख्य फेसबुकवरील व पुस्तकरुपांनी प्रसिद्ध कवींना आपल्याच कविता लेखनाबद्दल पुन्हा एकदा आपण लिहितो त्या कविताच आहेत कि काय असा प्रश्न स्वत:लाच विचारायला भाग पाडले गेले हेही अभिनंदनीयच आहे. पण गोष्ट येथे संपत नाही.
"thorat sir awte yanni mala patra lihile, ithech te thamble naheet, tyani mandala mahitichya adhikarat mahiti vicharli. kevdha ha udyog !" अशी डहाके सरांची पोस्ट हरिश्चंद्र थोरात या समिक्षकांच्या वालवर २ आगष्ट रोजी प्रसिद्ध झाली. त्यावर प्रतिक्रिया म्हणुन कविता महाजन, ज्यांच्याबद्दल मला पुरेपूर आदर आहे, त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली..."मरो... असल्यांकडे दुर्लक्ष करणे उत्तम. मी तर त्याला पूर्वीच ब्लॉक करून टाकले आहे. व्यक्तिगत पातळीवर येऊन असभ्य लिहू लागला म्हणून." आणि त्याखालीच त्यांनी अधिकची प्रतिक्रिया दिली ..."होय सर. पण आता त्याला ब्लॉक करा.
स्वतः काही न करता निव्वळ खाजवून खरूज काढण्यात आनंद घेणार्या या पोरांना आपण खतपाणी घालून वाढवण्याची गरज नाही.
मध्यंतरीही असे काही लोक होते जे निव्वळ भडकाऊ पद्धतीने स्वतःचं नाव करू पाहत होते. काळाच्या ओघात ते गायब झाले. उदा. विंदांना ज्ञानपीठ मिळालं तेव्हा त्यांच्यावर चिल्लर टवाळी करणारा लेख एकाने लिहिला होता.
नव्या पिढीचा विद्रोह आपण समजू शकतो, पण तो अस्सल हवा. ही चमकोगिरी म्हणजे फेसाचे फुगे."
खरे तर दहावीच्या अभ्यासक्रमात कानडेंची कविता कशी आली आणि तिचे प्रयोजन काय हा आवटेंचा मुख्य प्रश्न होता. ती कविताच आहे असे डहाके सरांचे म्हणने पडल्यावर ती कविता कशी ठरली...कवितेचे निकष काय हा प्रश्न माहितीच्या अधिकारात विचारल्यानंतर त्याचे उत्तर त्याच प्रक्रियेतून देण्याऐवजी फेसबुकवरुन आणि तेही थोरातांच्या वालवरुन (किंवा डहाकेंच्या वालवरून थोरातांनी शेयर केली असेल) आवटेंच्या प्रश्नांना "उद्योग" म्हणणे डहाके सरांना शोभते काय? तरुणांनी प्रश्न विचारणे हा "पोरांचा खाजवून खरूज काढण्यात आनंद" असे विधान करणे कविताताईंना शोभते काय? खाजवून खरुज वाढते...ती वाढणे हा खरुजेचा मुलभूत गुणधर्म आहे कारण खरूज आधीच अस्तित्वात असते. ती खाज मागते आणि खाजवली तर वाढते...हे चक्र आहे. मुळात खाजच का निर्माण झाली या प्रश्नाचे उत्तर काय आहे?
माझा मुद्दा अत्यंत साधा आहे. तरुणांनी प्रश्न विचारणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे आणि व्यवस्थेकडून उत्तरे मागणे त्यांचे कर्तव्यही आहे. प्रश्नांचे समाधान करता येत नाही तेंव्हा त्यांना ब्लोक करा अथवा निंदित करा हा धंदा पुरातन आहे. त्याला अपवाद कोणताही समाजघटक नसतो. नाही.
मुख्य मुद्दा डहाके सर आणि कविताताई विसरल्या तो हा कि दहावीच्या, म्हणजे १५-१६ वर्षांच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवू इच्छिता? बालकाव्य अथवा बडबडगीत म्हणुनही जे शोभणार नाही त्याला कविता म्हणायचे असेल तर त्याबाबत चिकित्सक ग्रंथ लिहा...हवे त्या लिखानाला कविता ठरवा...पण शिकणा-या पिढ्यांना अशिक्षित बनवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
मी जी पर्तिक्रिया आधी लोकप्रभाला पाठवली होती ती अशी...
"आपल्या ताज्या अंकात श्रीरंजन आवटे यांचा "डहाके सर, नेमकं काय निवडून घ्यायचं" हा लेख वाचला. आवटे यांनी पाठ्यपुस्तक संपादन मंडळाच्या एकुणातीलच साहित्यजाणीवांवर प्रश्नचिन्ह उभे केले याबद्दल त्यांचे अभिनंदन. श्री. लहू कानडे यांची "नेमके निवडुन घ्या ज्ञान" ही कविता अगदी "न-कविता" म्हनण्याच्याही दर्जाची नाही हे उघड आहे. अन्य निवडीही पारख्याच्या नजरेने झाल्या असत्या तर अधिक योग्य झाले असते. विद्यार्थ्यांच्या नुसत्या जाणीवा प्रगल्भ करणा-याच नव्हेत तर काव्यविषयक आवडही निर्माण होईल अशा कविता निवडणे आवश्यक आहे. आम्हाला लहानपणी अभ्यासक्रमात असलेल्या अनेक कविता आजही तोंडपाठ आहेत आणि मनोसंस्कृतीचा एक भाग बनून बसल्या आहेत. ज्यातून शोधुनही हाती काही लागत नाही अशा कविता पाठ्यपुस्तकात टाकून संपादक मंडळ एकार्थाने विद्यार्थ्यांचेच नुकसान करत आहेत आणि शिक्षकांचीही पंचाईत करत आहेत याचे भान असावे एवढीच माफक अपेक्षा."
असो. हेही ठीक. मुख्य प्रश्न उरतो तो हा कि नवपिढीच्या तरुणांनी प्रश्न विचारायचे कि मौन होत आहे ते उत्तम असे म्हणत त्या कथित उत्तमतेत अध:पतीत व्हायचे? प्रश्न विचारले तर वर दिलेली उत्तरे असतील तर ती उत्तरेच अधिक गंभीर प्रश्न उपस्थित करतात. ती या तरुणांना वरकरणी नामोहरम करनारी अथवा त्यांची "अक्कल" काढणारी असली म्हणुन प्रश्नचिन्हे थांबत नसतात याचे भान असायला हवे. श्रीरंजन आवटे यांचे हे एक उदाहरण आहे. असे प्रश्न विचारणारे हजारो तरुण आज पुढे येत आहेत. ते अजुनही यावेत. द्यायची तर समाधानकारक उत्तरे द्या. चूक झाली असेल तर मान्य करा...किंवा तुम्ही बरोबर आहात हे तेवढ्याच प्रामाणिकपणे सिद्ध करा...त्यातून तुमचा मोठेपणाच सिद्ध होईल...उत्तरे टाळाल...प्रश्न विचारणा-यालाच आरोपी बनवाल तर तुम्ही किती क्षूद्र आहात हेच सिद्ध होत राहील.
आपल्याला प्रश्न विचारणा-यांची संस्कृती हवी आहे
उत्तरे टाळणा-यांची नाही!
सोक्रेटिस जन्माला आला तो काळ ग्रीसमधील सांस्कृतीक आणि राजकीय संक्रमणाचा काळ होता. सोक्रेटिस वंशपरंपरेने खरे तर दगडफोड्या. आपल्याकडे वडार समाज जे काम करतो तेच काम तो करत असे. ग्रीसमद्धे आपल्यासारखी जातीय व्यवस्था नसल्याने एका दगडफोड्यालाही आपली अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य जसे होते तसेच प्लेटोला त्याचा शिष्य बनायला कमीपना वाटला नाही...त्याचेही स्वातंत्र्य असेल...उलट त्याने या आपल्या या लोकोत्तर गुरुला, ज्याने एक शब्दही लिहिला नाही, अजरामर करून सोडले.
प्रश्न विचारायला प्रेरित करना-या सोक्रेटीसने राजकीय कारणांमुळे देहदंड सोसला. प्रश्न विचारणारे तरुण नसतात तो समाज मृतवत असतो. प्रश्नांची दखल घेतली नाही तर सत्ता, मग त्या कोणत्याही असोत, धार्मिक...सांस्कृतीक असोत की राजकीय...उलथल्या जातात हे इतिहासात घडले आहे. भारतही त्याला अपवाद नव्हता. महावीर-बुद्धाने जी सांस्कृतीक क्रांती घडवली ती प्रश्न विचारुनच. उत्तरे मिळाली नाहीत तेंव्हा त्यांनी ती स्वतंत्रपणे शोधली आणि प्रस्थापित सत्ता उध्वस्त झाल्या. कपिलमुनी, कणाद, मंस्खली घोशाल, अजित केशकंबल यांनीही व्यवस्थेवर प्रश्नचिन्हे उभी केली. पुढेही शेकडो आव्हानकारी उभे ठाकले...मग ते चक्रधर असोत की नाथपंथीय...संतपरंपरा असो कि आधुनिक काळातील आगरकर, म. फुले, बाबासाहेब. या सर्वांचे एकमेवद्वितीय वैशिष्ट्य हे होते कि त्यांनी प्रश्न विचारले. व्यवस्थेला उत्तरे देता आली नाहीत म्हणुन त्यांनी स्वत: उत्तरे शोधली आणि सामाजिक क्रांती घडवली. परंतू आपण या विविध समाजसांस्कृतीक क्रांत्यांतून अथवा अभिसरणांतून एक संमिश्र आणि म्हणुनच एक परस्परविरुद्ध कलहांकित संस्कृती घडवली आहे. त्याची फळे आपण आजही भोगत आहोत.
हे सारे खरे आहे. पण आपण आज तरी बदललो आहोत काय हा खरा प्रश्न आहे. आज या लेखाला कारण घडलेत माझे तरून मित्र श्रीरंजन आवटे. आवटेंनी "डहाके सर, नेमकं काय निवडून घ्यायचं?" असा एक लेख लोकप्रभात (http://epaper.lokprabha.com/137059/Lokprabha/26-07-2013#dual/28/1 ) प्रसिद्ध केला. या लेखात त्यांनी "नेमके निवडून घ्या ज्ञान" या दहावीच्या नव्या मराठी पुस्तकातील लहू कानडे यांच्या कवितेबाबत ती कशी निवडली गेली याबाबत विनम्रपणे प्रश्न उपस्थित केले होते. संपुर्ण कविता वर दिलेल्या दुव्यात आहे. या लेखाला माझ्यासकट अनेक वाचकांची पत्रे गेली होती. पण अर्थातच ती प्रसिद्ध झाली नाहीत. असो. पण वसंत डहाके सरांनी आवटेंच्या लेखाला प्रत्युत्तर दिले आणि "नेमके निवडून घ्या ज्ञान ही कविताच" असे ठामपणे सांगितले. ( http://epaper.lokprabha.com/142462/Lokprabha/09-08-2013#dual/12/2 ) परंतू हे लिहितांना त्यांनी आवटेंच्या मुळ प्रश्नांना बगल देत जे उत्तर दिले त्यातील हे विधान महत्वाचे आहे. डहाके सर म्हणतात, "...या निकषांनुसार कविता ठरलेली कोणतीही रचना दहावीच्या अभ्यासक्रमात सामील करता येईल असे मला वाटत नाही." थोडक्यात डहाके सरांचे म्हणने आहे कि कवितेचे कोणतेही निकष नसतात तर मग त्या निवडायला निवडसमितीची गरजच काय हा प्रश्न उपस्थित होत नाही काय? वृत्तप्त्रीय बातम्यांतील ओळीही तोडून छापल्या तर तीही एक मूक्त कविता बनेलच कि!
असो. डहाके सरांनी आपल्या कवितांच्या आकलनाला सांभाळत उत्तर तरी दिले याबाबत त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. या निमित्ताने बालाजी सुतार, छाया थोरात, संतोष देशपांडे, भैरवी प्रेडिक्ट्स अशा असंख्य फेसबुकवरील व पुस्तकरुपांनी प्रसिद्ध कवींना आपल्याच कविता लेखनाबद्दल पुन्हा एकदा आपण लिहितो त्या कविताच आहेत कि काय असा प्रश्न स्वत:लाच विचारायला भाग पाडले गेले हेही अभिनंदनीयच आहे. पण गोष्ट येथे संपत नाही.
"thorat sir awte yanni mala patra lihile, ithech te thamble naheet, tyani mandala mahitichya adhikarat mahiti vicharli. kevdha ha udyog !" अशी डहाके सरांची पोस्ट हरिश्चंद्र थोरात या समिक्षकांच्या वालवर २ आगष्ट रोजी प्रसिद्ध झाली. त्यावर प्रतिक्रिया म्हणुन कविता महाजन, ज्यांच्याबद्दल मला पुरेपूर आदर आहे, त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली..."मरो... असल्यांकडे दुर्लक्ष करणे उत्तम. मी तर त्याला पूर्वीच ब्लॉक करून टाकले आहे. व्यक्तिगत पातळीवर येऊन असभ्य लिहू लागला म्हणून." आणि त्याखालीच त्यांनी अधिकची प्रतिक्रिया दिली ..."होय सर. पण आता त्याला ब्लॉक करा.
स्वतः काही न करता निव्वळ खाजवून खरूज काढण्यात आनंद घेणार्या या पोरांना आपण खतपाणी घालून वाढवण्याची गरज नाही.
मध्यंतरीही असे काही लोक होते जे निव्वळ भडकाऊ पद्धतीने स्वतःचं नाव करू पाहत होते. काळाच्या ओघात ते गायब झाले. उदा. विंदांना ज्ञानपीठ मिळालं तेव्हा त्यांच्यावर चिल्लर टवाळी करणारा लेख एकाने लिहिला होता.
नव्या पिढीचा विद्रोह आपण समजू शकतो, पण तो अस्सल हवा. ही चमकोगिरी म्हणजे फेसाचे फुगे."
खरे तर दहावीच्या अभ्यासक्रमात कानडेंची कविता कशी आली आणि तिचे प्रयोजन काय हा आवटेंचा मुख्य प्रश्न होता. ती कविताच आहे असे डहाके सरांचे म्हणने पडल्यावर ती कविता कशी ठरली...कवितेचे निकष काय हा प्रश्न माहितीच्या अधिकारात विचारल्यानंतर त्याचे उत्तर त्याच प्रक्रियेतून देण्याऐवजी फेसबुकवरुन आणि तेही थोरातांच्या वालवरुन (किंवा डहाकेंच्या वालवरून थोरातांनी शेयर केली असेल) आवटेंच्या प्रश्नांना "उद्योग" म्हणणे डहाके सरांना शोभते काय? तरुणांनी प्रश्न विचारणे हा "पोरांचा खाजवून खरूज काढण्यात आनंद" असे विधान करणे कविताताईंना शोभते काय? खाजवून खरुज वाढते...ती वाढणे हा खरुजेचा मुलभूत गुणधर्म आहे कारण खरूज आधीच अस्तित्वात असते. ती खाज मागते आणि खाजवली तर वाढते...हे चक्र आहे. मुळात खाजच का निर्माण झाली या प्रश्नाचे उत्तर काय आहे?
माझा मुद्दा अत्यंत साधा आहे. तरुणांनी प्रश्न विचारणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे आणि व्यवस्थेकडून उत्तरे मागणे त्यांचे कर्तव्यही आहे. प्रश्नांचे समाधान करता येत नाही तेंव्हा त्यांना ब्लोक करा अथवा निंदित करा हा धंदा पुरातन आहे. त्याला अपवाद कोणताही समाजघटक नसतो. नाही.
मुख्य मुद्दा डहाके सर आणि कविताताई विसरल्या तो हा कि दहावीच्या, म्हणजे १५-१६ वर्षांच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवू इच्छिता? बालकाव्य अथवा बडबडगीत म्हणुनही जे शोभणार नाही त्याला कविता म्हणायचे असेल तर त्याबाबत चिकित्सक ग्रंथ लिहा...हवे त्या लिखानाला कविता ठरवा...पण शिकणा-या पिढ्यांना अशिक्षित बनवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
मी जी पर्तिक्रिया आधी लोकप्रभाला पाठवली होती ती अशी...
"आपल्या ताज्या अंकात श्रीरंजन आवटे यांचा "डहाके सर, नेमकं काय निवडून घ्यायचं" हा लेख वाचला. आवटे यांनी पाठ्यपुस्तक संपादन मंडळाच्या एकुणातीलच साहित्यजाणीवांवर प्रश्नचिन्ह उभे केले याबद्दल त्यांचे अभिनंदन. श्री. लहू कानडे यांची "नेमके निवडुन घ्या ज्ञान" ही कविता अगदी "न-कविता" म्हनण्याच्याही दर्जाची नाही हे उघड आहे. अन्य निवडीही पारख्याच्या नजरेने झाल्या असत्या तर अधिक योग्य झाले असते. विद्यार्थ्यांच्या नुसत्या जाणीवा प्रगल्भ करणा-याच नव्हेत तर काव्यविषयक आवडही निर्माण होईल अशा कविता निवडणे आवश्यक आहे. आम्हाला लहानपणी अभ्यासक्रमात असलेल्या अनेक कविता आजही तोंडपाठ आहेत आणि मनोसंस्कृतीचा एक भाग बनून बसल्या आहेत. ज्यातून शोधुनही हाती काही लागत नाही अशा कविता पाठ्यपुस्तकात टाकून संपादक मंडळ एकार्थाने विद्यार्थ्यांचेच नुकसान करत आहेत आणि शिक्षकांचीही पंचाईत करत आहेत याचे भान असावे एवढीच माफक अपेक्षा."
असो. हेही ठीक. मुख्य प्रश्न उरतो तो हा कि नवपिढीच्या तरुणांनी प्रश्न विचारायचे कि मौन होत आहे ते उत्तम असे म्हणत त्या कथित उत्तमतेत अध:पतीत व्हायचे? प्रश्न विचारले तर वर दिलेली उत्तरे असतील तर ती उत्तरेच अधिक गंभीर प्रश्न उपस्थित करतात. ती या तरुणांना वरकरणी नामोहरम करनारी अथवा त्यांची "अक्कल" काढणारी असली म्हणुन प्रश्नचिन्हे थांबत नसतात याचे भान असायला हवे. श्रीरंजन आवटे यांचे हे एक उदाहरण आहे. असे प्रश्न विचारणारे हजारो तरुण आज पुढे येत आहेत. ते अजुनही यावेत. द्यायची तर समाधानकारक उत्तरे द्या. चूक झाली असेल तर मान्य करा...किंवा तुम्ही बरोबर आहात हे तेवढ्याच प्रामाणिकपणे सिद्ध करा...त्यातून तुमचा मोठेपणाच सिद्ध होईल...उत्तरे टाळाल...प्रश्न विचारणा-यालाच आरोपी बनवाल तर तुम्ही किती क्षूद्र आहात हेच सिद्ध होत राहील.
आपल्याला प्रश्न विचारणा-यांची संस्कृती हवी आहे
उत्तरे टाळणा-यांची नाही!