सध्याची निवडणुकीची जी रणधुमाळी चालू आहे त्यावरून खालील बाबी लक्षात येतात.
१) मोदी हे पक्षापेक्षा मोठे झालेले आहेत...किंवा तसे दाखवण्यात ते यशस्वी होत आहेत.लोकशाहीसाठी हा अनिष्ट संकेत आहे.
२) गुजरातच्या विकासाचा फुगा फुटू लागला असून लोकांना वास्तव समजू लागले आहे.
३) मोदींची हवा एवढी मोठी होती तर इतर पक्षांची मदत अथवा इंपोर्टेड नेत्यांची भाजपाला गरज भासली नसती...खरे तर मोदींनाच मत तर इतरत्र दगडही उभे केले तरी चालू शकले असते...पण तसे वास्तव दिसत नाही. म्हणजे मोदी हा गुब्बारा आहे हे भाजपाच्या अंतस्थ वर्तुळाला माहित आहे.
४) त्यामानाने कोंग्रेस धिमी पण एकदिश आगेकुच करत आहे हे दर वेळच्या कथित का होईना पण सर्वेक्षनांनी कबूल केले आहे.
५) भाजपाचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध झाल्यानंतर मी दोघांची तुलना करणारा स्वतंत्र लेख लिहिलच, पण कोंग्रेसचा जाहीरनामा हा विकेंद्रीकरण (सत्ता आणि उद्योग) यावर भर देणारा आहे. राजकीय व आर्थिक लोकशाहीशी अत्यंत सुसंगत अशी ती भूमिका आहे.
६) आप आणि राज हे कोंग्रेसलाच मदत करणारे सहाय्यक घटक ठरतील अशी चिन्हे दिसत आहेत. कोंग्रेसने राजकीय डावपेचात भाजपला मात दिलेली आहे.
७) भाजपच्या तुलनेत कोंग्रेस आणि त्याचे घटकपक्ष यांत अधिक समन्वय व एकोपा या वेळीस दिसतो आहे. त्याचा फायदा कोंग्रेसला होईल असे दिसते.
८) मोदींना आक्टोबर-नोव्हेंबरमद्धे (वर्षभर आधी नव्हे) पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले असते तर कदाचित भाजपला अपेक्षित यश मिळालेही असते. या देशात कोना
चीही हवा इतका प्रदिर्घ काळ, आणि पुन्हा तेच ते बोलून टिकवता येत नाही हे लक्षात न घेण्यात भाजपने धोरणात्मक चूक केलेली आहे.