प्रत्येक विचारव्युहासाठी एक दुसरा विरोधी विचारव्यूह असतोच. कोणताही विचारव्यूह हा अंतिम नसतो हे जरी खरे मानले तरी विविध विचारव्युहांचे अस्तित्व असणे हेच मानवाला पुढे नेत आले आहे. भावनिक लाटांवर जे वाहवत जातात त्यांचे नाते कोणत्याही विचाराशी नसते हेही एक वास्तव आहे. काल ज्यांचे जयजयकार केले त्यांना पायतळी तुडवनारे उद्या आज ज्यांचा जयजयकार करते त्यांनाही पायतळी तुडवणार नाही असे नाही. जयजयकार करनारे कालही मुर्ख असतात...
आजही आणि उद्याही.
जगाचे अधिकाधिक नुकसान या भावनांच्या लाटांवर हिंदोळणा-या लोकांनी केले आहे. चोराला सोदा पण येशुला सुळावर चढवा असे म्हणनारे असेच भावनिक मुर्ख होते. गांधींना ठार मारा...देश वाचवा असे म्हणनारेही हेच मुर्खांचे नंदनवन होते. त्यांनी येशुला मारले, त्यांनी गांधीजींना मारले.
हरकत नाही. नवीन विचारव्यूह समजावून घेण्यातील सामान्य माणसांची ती मुलभूत अडचण असते. ते मेले, काही फरक पडत नाही. ज्यांना विरोधी विचारव्युहांचे अस्तित्वच मान्य करायचे नसते, विरोधी विचारांना ज्यांना हिंसेनेच संपवायचेच असते ते घडीभर जिंकतात....
पण त्यांचे विचार धर्म बनत नाहीत हाही एक इतिहास आहे.
एका कट्टर संघ कार्यकर्त्याला देशाच्या नेतृत्वाची धुरा डोक्यावर घ्यायची असतांना राजघाटावर जावेच लागते हा विजय गांधीजींचा आहे...रा. स्व. संघाचा अथवा सावरकरवाद्यांचा नाही. कट्टर हिंदुत्ववाद्यांना फाट्यावर मारत शरीफला बोलवावे लागते आणि त्याचे केविलवाने समर्थन संघवाद्यांनाही करावे लागते यात पराजित विचारव्युहाची दिशा दिसते.
प्रेयसीच्या आंधळ्या का होईना प्रेमात पडणे हे माणसासाठी नैसर्गिक आहे. नेत्यांच्या प्रेमात अंधपणे पडणे याला मात्र मुर्खपणा म्हनतात. विचारांच्या प्रेमात पडणे अथवा विचारविरोधक असणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. पण विचारांचाच थांगपत्ता नसतांना व्यक्तीच्या प्रेमात पडने यात प्रेमभंगाचीच अधिक शक्यता असते हे आम्ही लक्षात घेणार नाही हेही मला माहित आहे.
काही महिन्यांपुर्वी केजरीवालांच्या प्रेमात पडनारे अगणित मी पाहिले होते...ते आज कोठे आहेत हे शोधावे लागते, हे केजरीवालांचे नव्हे आमचे दुर्दैव आहे. आमच्याच कर्तुत्वहीण भावनांतून निर्माण झालेल्या, अस्तित्वात नसलेल्या कर्तुत्ववान नेत्यांच्या शोधातील आमच्याच हाती आलेले हे एक शून्य आहे. हे आम्हाला कधी कळेल?
हा देश घटनेमुळे एक नसून आमच्या राष्ट्रहीन भावनेने आम्ही विखुरलेले असल्याने एक आहे....हा विरोधाभास आहे खरा. पण विचार करा....आम्ही बळे हरवलेले वांझ लोक आहोत. आम्हाला लोकशाही पाहिजे पण लोकशाहीची मुलतत्वे आम्हाला पाळायची नाहीत. आम्हाला हुकुमशहाही हवा आहे पण मग हुकुमशाहीची नैसर्गिक अव्यवस्था झेलायचीही आमची तयारी नाही.
आम्ही वास्तवात नव्हे तर स्वप्नील जगात जगणे निवडतो. आम्हाला वास्तव हवेच कोठे आहे?
असो. माझे असंख्य वाचक मला शिव्या देतात, टीका करतात...ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. मी मोदींवर टीका करतो हे माझ्या निकटतम प्रत्यक्ष ओळखीतील मित्रांनाही आवडत नाही...मी रा. स्व. संघावर तुटुन पडतो तेही खुपजणांना आवडत नाही. कोणालाही आपल्यावर टीका करुन घ्यायची हौस नसते.
प्रश्न विचारव्युहांचा असतो. आणि मला समजा एक विचारव्यूह कोणत्याही आधारावर पसंत नाही तो मला पसंत पडावाच हा अट्ट्टाग्रह कशासाठी?
मला माझा विचार आहे आणि त्याशी मी प्रामाणिक आहे. तुमच्या विचारांशी तुमच्या प्रामाणिकतेवर जर मी संशय घेत नाही, तर माझ्या अथवा माझ्या समविचारींच्या विचारांशी फालतू शंका का घेता?
एकच लक्षात घ्या...
राजकीय लोकशाहीत संख्येचे फार महत्व असते....
वैचारिक लोकशाहीत संख्याबलाने कसलेही विजय प्राप्त होत नसतात!
आजही आणि उद्याही.
जगाचे अधिकाधिक नुकसान या भावनांच्या लाटांवर हिंदोळणा-या लोकांनी केले आहे. चोराला सोदा पण येशुला सुळावर चढवा असे म्हणनारे असेच भावनिक मुर्ख होते. गांधींना ठार मारा...देश वाचवा असे म्हणनारेही हेच मुर्खांचे नंदनवन होते. त्यांनी येशुला मारले, त्यांनी गांधीजींना मारले.
हरकत नाही. नवीन विचारव्यूह समजावून घेण्यातील सामान्य माणसांची ती मुलभूत अडचण असते. ते मेले, काही फरक पडत नाही. ज्यांना विरोधी विचारव्युहांचे अस्तित्वच मान्य करायचे नसते, विरोधी विचारांना ज्यांना हिंसेनेच संपवायचेच असते ते घडीभर जिंकतात....
पण त्यांचे विचार धर्म बनत नाहीत हाही एक इतिहास आहे.
एका कट्टर संघ कार्यकर्त्याला देशाच्या नेतृत्वाची धुरा डोक्यावर घ्यायची असतांना राजघाटावर जावेच लागते हा विजय गांधीजींचा आहे...रा. स्व. संघाचा अथवा सावरकरवाद्यांचा नाही. कट्टर हिंदुत्ववाद्यांना फाट्यावर मारत शरीफला बोलवावे लागते आणि त्याचे केविलवाने समर्थन संघवाद्यांनाही करावे लागते यात पराजित विचारव्युहाची दिशा दिसते.
प्रेयसीच्या आंधळ्या का होईना प्रेमात पडणे हे माणसासाठी नैसर्गिक आहे. नेत्यांच्या प्रेमात अंधपणे पडणे याला मात्र मुर्खपणा म्हनतात. विचारांच्या प्रेमात पडणे अथवा विचारविरोधक असणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. पण विचारांचाच थांगपत्ता नसतांना व्यक्तीच्या प्रेमात पडने यात प्रेमभंगाचीच अधिक शक्यता असते हे आम्ही लक्षात घेणार नाही हेही मला माहित आहे.
काही महिन्यांपुर्वी केजरीवालांच्या प्रेमात पडनारे अगणित मी पाहिले होते...ते आज कोठे आहेत हे शोधावे लागते, हे केजरीवालांचे नव्हे आमचे दुर्दैव आहे. आमच्याच कर्तुत्वहीण भावनांतून निर्माण झालेल्या, अस्तित्वात नसलेल्या कर्तुत्ववान नेत्यांच्या शोधातील आमच्याच हाती आलेले हे एक शून्य आहे. हे आम्हाला कधी कळेल?
हा देश घटनेमुळे एक नसून आमच्या राष्ट्रहीन भावनेने आम्ही विखुरलेले असल्याने एक आहे....हा विरोधाभास आहे खरा. पण विचार करा....आम्ही बळे हरवलेले वांझ लोक आहोत. आम्हाला लोकशाही पाहिजे पण लोकशाहीची मुलतत्वे आम्हाला पाळायची नाहीत. आम्हाला हुकुमशहाही हवा आहे पण मग हुकुमशाहीची नैसर्गिक अव्यवस्था झेलायचीही आमची तयारी नाही.
आम्ही वास्तवात नव्हे तर स्वप्नील जगात जगणे निवडतो. आम्हाला वास्तव हवेच कोठे आहे?
असो. माझे असंख्य वाचक मला शिव्या देतात, टीका करतात...ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. मी मोदींवर टीका करतो हे माझ्या निकटतम प्रत्यक्ष ओळखीतील मित्रांनाही आवडत नाही...मी रा. स्व. संघावर तुटुन पडतो तेही खुपजणांना आवडत नाही. कोणालाही आपल्यावर टीका करुन घ्यायची हौस नसते.
प्रश्न विचारव्युहांचा असतो. आणि मला समजा एक विचारव्यूह कोणत्याही आधारावर पसंत नाही तो मला पसंत पडावाच हा अट्ट्टाग्रह कशासाठी?
मला माझा विचार आहे आणि त्याशी मी प्रामाणिक आहे. तुमच्या विचारांशी तुमच्या प्रामाणिकतेवर जर मी संशय घेत नाही, तर माझ्या अथवा माझ्या समविचारींच्या विचारांशी फालतू शंका का घेता?
एकच लक्षात घ्या...
राजकीय लोकशाहीत संख्येचे फार महत्व असते....
वैचारिक लोकशाहीत संख्याबलाने कसलेही विजय प्राप्त होत नसतात!