सदाशिवराव भाऊवरचा सर्वच इतिहासकारांनी (संजय क्षीरसागर वगळता) नि कादंबरीकारांनी केलेला गंभीर आरोप म्हणजे बाजार-बुणगे आणि यात्रेकरुंचे अंगावर लादुन घेतलेले ओझे. केवळ यामुळे मंदावलेली सैन्याची वाटचाल. पानिपती त्यांच्या सुरक्षेसाठी अडकुन पडण्याची नामुष्की व त्यातुनच ओढवलेली उपासमारी. म्हणून पानिपतच्या पराजयाचे हेही एक कारण.
दीर्घकालीन व लांब अंतराची युद्धे बाजार-बुणग्यांशिवाय मुळात होऊच शकत नाही. त्यासाठी आधी बाजार-बुणगे म्हणजे नेमके काय हे समजावून घ्यायला पाहिजे.
बाजार म्हणजे: सैन्याला लागणारे खाद्यपदार्थ, कपडे, वस्तू, धान्य वगैरे विकणारा वर्ग.
बुणगे म्हणजे: बिगरलढवैय्ये पण सैन्यास सेवा पुरवण्यासाठे आवश्यक असलेला वर्ग.
सैन्याला अनेक सेवा लागतात. १) सैनिकांचे हिशोब ठेवणारे कारकुन. २) तंबू, तोफा, दारुगोळा, अन्न-धान्य वाहून नेणारे गाडीवान. ३) तलवारी-ढाली यांची मरम्मत व अन्य कामांसाठी लागणारे लोहार/सुतार/पाणके-पखालवाले/शिंपी वगैरे. ४) तंबु उभारणारे/खंदक खोदणारे. ५) घोड्यांचा खरारा करणे, पाणी दाखवणे इ. सेवा करणारे. ६) वैदू, ७) करमणुकीसाठी शाहीर, तमासगीर वगैरे. ८) जखमी/मृत सैनिकांना युद्धभुमीवरुन हलवणारे. ९) दळण दळणारे-दळणा-या. १०) या व्यतिरिक्त जोतिषि आलेच! यात अजुनही अनेक सेवा आहेत.
इंग्रजी कवायती सैन्यात अठराव्या शतकात एका सैनिकामागे ३ बुणगे असे प्रमाण असे, त्यात बाजार धरलेला नाही. पानिपत युद्धात, हेच प्रमाण गृहित धरले तरी ८०,००० सैन्यामागे ३ बुणगे गृहित धरले तर ते होतात २,४०,०००. म्हणजे सारे मिळुन झाले ३ लाख वीस हजार. भाऊच्या तळावरही दोन-अडीच लाख बुणगे होते असे इतिहासकार म्हणतात. या प्रमाणाला अचाट कसे म्हणता येईल? बुणग्यांखेरीज युद्धे अशक्यप्राय आहेत हे वरील बुणग्यांची कामे पाहत सहज लक्षात येईल.
मग भाऊला फुकाचा दोष देणा-या इतिहासकारांची मती कोठे गेली होती? इतिहासकार आणि कादंबरीकार काय फक्त भाऊलाच (आणि होळकरांना) झोडपायलाच जन्माला आले होते कि काय?
बाजार-बुणगे हा शब्द आपण उपहासाने वापरतो...पण ते सैन्याचेच अपरिहार्य भाग होते. भाऊबरोबर ५-६ हजार यात्रेकरु होते आणि पानिपतपर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील निम्म्याहुन अधिक आपापल्या तीर्थयात्रा करत विखुरले होते. त्यामुळे यात्रेकरुंवर विशेष दोष टाकता येत नाही.
दीर्घकालीन व लांब अंतराची युद्धे बाजार-बुणग्यांशिवाय मुळात होऊच शकत नाही. त्यासाठी आधी बाजार-बुणगे म्हणजे नेमके काय हे समजावून घ्यायला पाहिजे.
बाजार म्हणजे: सैन्याला लागणारे खाद्यपदार्थ, कपडे, वस्तू, धान्य वगैरे विकणारा वर्ग.
बुणगे म्हणजे: बिगरलढवैय्ये पण सैन्यास सेवा पुरवण्यासाठे आवश्यक असलेला वर्ग.
सैन्याला अनेक सेवा लागतात. १) सैनिकांचे हिशोब ठेवणारे कारकुन. २) तंबू, तोफा, दारुगोळा, अन्न-धान्य वाहून नेणारे गाडीवान. ३) तलवारी-ढाली यांची मरम्मत व अन्य कामांसाठी लागणारे लोहार/सुतार/पाणके-पखालवाले/शिंपी वगैरे. ४) तंबु उभारणारे/खंदक खोदणारे. ५) घोड्यांचा खरारा करणे, पाणी दाखवणे इ. सेवा करणारे. ६) वैदू, ७) करमणुकीसाठी शाहीर, तमासगीर वगैरे. ८) जखमी/मृत सैनिकांना युद्धभुमीवरुन हलवणारे. ९) दळण दळणारे-दळणा-या. १०) या व्यतिरिक्त जोतिषि आलेच! यात अजुनही अनेक सेवा आहेत.
इंग्रजी कवायती सैन्यात अठराव्या शतकात एका सैनिकामागे ३ बुणगे असे प्रमाण असे, त्यात बाजार धरलेला नाही. पानिपत युद्धात, हेच प्रमाण गृहित धरले तरी ८०,००० सैन्यामागे ३ बुणगे गृहित धरले तर ते होतात २,४०,०००. म्हणजे सारे मिळुन झाले ३ लाख वीस हजार. भाऊच्या तळावरही दोन-अडीच लाख बुणगे होते असे इतिहासकार म्हणतात. या प्रमाणाला अचाट कसे म्हणता येईल? बुणग्यांखेरीज युद्धे अशक्यप्राय आहेत हे वरील बुणग्यांची कामे पाहत सहज लक्षात येईल.
मग भाऊला फुकाचा दोष देणा-या इतिहासकारांची मती कोठे गेली होती? इतिहासकार आणि कादंबरीकार काय फक्त भाऊलाच (आणि होळकरांना) झोडपायलाच जन्माला आले होते कि काय?
बाजार-बुणगे हा शब्द आपण उपहासाने वापरतो...पण ते सैन्याचेच अपरिहार्य भाग होते. भाऊबरोबर ५-६ हजार यात्रेकरु होते आणि पानिपतपर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील निम्म्याहुन अधिक आपापल्या तीर्थयात्रा करत विखुरले होते. त्यामुळे यात्रेकरुंवर विशेष दोष टाकता येत नाही.