Friday, July 3, 2015

"शिक्षणाचे भारतीयीकरण : भ्रम आणि तथ्य"

काल अभाविपने मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या "शिक्षणाचे भारतीयीकरण : भ्रम आणि तथ्य" या परिसंवादात मी मांडलेले ठळक मुद्दे:

१) मला या कार्यक्रमाला वक्त्यांत एक बहुजन असावा म्हणूण बोलावले गेल्याचे दिसते आहे. आपल्याकडची बहुजन-अभिजन ही वाटणी जातीय आहे, वास्तवाधारित नाही. संस्कृत्यांचे निर्माण सातत्याने करणारे लोक अभिजन तर संस्कृतीचे अनुगामी बहुजन असतात. पण येथे मतीमंद, निर्बुद्ध किंवा अतिसामान्य मानसे केवळ जातीमुळे अभिजन म्हणून मिरवतात.

२) संस्कृती निर्माणकर्ते घडवत असतात. संस्कृती त्यांचीच असते. भारताचे पुरातन संस्कृती त्या त्या काळच्या वडार, गवंडी, कुंभार, चर्मकार आदि लोकांनी घडवली आहे. आज आम्हाला आमचा गेल्या ४०-५० हजार वर्षांचा इतिहस समजतो तो त्यांच्याच रचनांतून. आपल्याकडे मात्र वैदिक सम्स्कृतीपासुनच भारताचा इतिहास सुरु होतो असा मानण्याचा प्रघात आहे. वैदिक संस्कृते ही अल्पसंख्यांकांची संस्कृती असून तिला भारतीय संस्कृती चा आरंभ मानता येत नाही. ही आयात झालेली धर्म-संस्कृती आहे, ती मुळचे भारतीय नाही. संस्कृत ही सर्व भषांची जननी हाही एक भ्रम आहे. प्राकृत भाषा संस्कृतची आई आहेत...कन्या नव्हेत.

३) पण स्मृती इराणी यांनी वेद, उपनिषदे व त्यातील गणित-विज्ञान वगैरेंवर भर देत शिक्षण पद्धतीत बदल घडवायचे सुतोवाच केले आहे. हे शिक्षणाचे भारतीयीकरण नव्हे तर वैदिकीकरण आहे आणि त्यामुळेच ते निंदेस व विरोधास पात्र आहे. भारतीयीकरण हा तुमचा भ्रम आहे, तथ्य आम्हाला माहित आहे.

४) भारतीयांचा विज्ञान व तत्वज्ञानात मोठा गोंधळ झाला आहे. तत्वज्ञानातील संकल्पनांबद्दल वैदिक-अवैदिक तत्ववेत्यांच्या प्रतिभेला सलाम जरी केला तरी त्या संकल्पना जोवर गणिताने व प्रयोगाने सिद्ध केल्या जात नाहीत तोवर त्यांना विज्ञान म्हणता येत नाही. वेदांतील विमानांनी अलीकडेच आपले जगभर हसू झाले. बिग ब्यंग थियरी पासून ते अणूबोंबचे शोध आमच्या पुर्वजांनी लावले होते हे दावे छाती फुगवून करणे निरर्थक व मुर्खपणाचे आहे. एक तर तुम्ही वर्तमानात तरी प्रयोग करून ते दावे सत्य आहेत हे सिद्ध करुन दाखवा किंवा त्यांना कविकल्पना म्हणून सोडून द्या. आर्यभटाने पृथ्वी परिवलन सिद्धांत पहिल्यांदा मांडला हे खरे आहे पण त्या सिद्धांताचा उपयोग आदि शंकराचार्य ते ज्ञानेश्वरांनी तत्वज्ञानातील दृष्टांतासाठी वापर केला. विज्ञानासाठी नाही. वैदिक गणित हे यज्ञवेद्या बांधण्यापुरते मर्यादित होते...विशाल वास्तुरचना करण्यासाठी शुल्बसुत्रांचा उपयोग नाही हे गणिती जाणतात. ज्याला आज वैदिक गणित म्हटले जाते ते तर विसाव्या शतकातील आहे.

५) भारत ही पुरातन काळापासून जागतिक संस्कृत्यांमधील एक पुल आहे. पोलिनिशियन, अरब, मध्य आशिया, अफगाणिस्तान, चीन-मंगोलिया इत्यादि संस्कृत्यांचे भारतावर व भारताचे त्यांच्यावर ऋण आहे. सर्वस्वी भारतीय असे शोधत बसणे वेडेपणाचे आहे. भारतातील पहिले चर्च सन ५२ म्धे बनले. ख्रिस्ती धर्मप्रचारक सातवाहनांच्या दरबारी आल्याचे पुरावे आहेत. पहिली मशीद भारतात सन ६२९ मद्ध्ये बनली. असंख्य नीतिकथा, मिथककथा यांचे आदानप्रदानही झाले. आपले शिक्षण विद्यार्थ्याला वैश्विक नागरिक करु इच्छि्त असेल तर या बाबींकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?

६) शिक्षण हे विद्यार्थ्याला विगतातील आभासी, खोट्या वैभवात रमवायचे माध्यम नाही. ते ज्ञानार्थी बनवत अनावर जिज्ञासेने शोध घेत नव्या ज्ञानाची विश्वे खुली करण्यासाठी आहे. आजचे शिक्षण हे विद्यार्थ्याला ज्ञानवंत नव्हे तर पोटवंत बनवते आणि म्हणून सध्याची शिक्षणपद्धती नाकारलीच पाहिजे व ज्ञानाधारित, विद्यार्थ्याचा नैसर्गिक कल, आवड ज्यात आहे त्यातच शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य देणारी शिक्षणव्यवस्था आपल्याला हवी आहे. पण भारतीयीकरण हे विद्यार्थ्याला संकुचित करत नेत विज्ञानातील झेप अधिकच मारत त्याला मध्ययुगात घेऊन जाईल. गतकाळाच्या वैभवाचे गुणगान म्हणजे भारतीयीकरण नव्हे. युरोपियनांनी बायबल फेकले व विज्ञान हाती घेतले म्हणून आज आपण आधुनिक विज्ञानाची फळे चाखत आहोत. वेद मात्र झुगारायची तुमची इच्छा नसेल तर ज्ञानवंतांचा देश या स्तरावर आम्ही जावू शकणार नाही. तसेही जगातील पहिल्या २०० विद्यापीठांत एकही भारतीय विद्यापीठ नाही हे वास्तव आहे.

७) भारतात मुळात शिक्षणव्यवस्थाच नव्हती, जी होती ती एका धर्मसमुहापुरती मर्यादित होती. म्हणजेच भारतीय म्हणावी अशी जर शिक्षणव्यवस्थाच अस्तित्वात नसेल तर आज आम्हाला भारतीयीकरण करणारी शिक्षणव्यवस्था म्हणजे काय हा प्रश्न पडणारच! शिक्षणाचे फक्त वैश्विकीकरण होऊ शकते कारण आज आपण इच्छा असो कि नसो वैश्विक नागरिक बनलो आहोत. तुमच्याशी संवाद साधतांना हा माईक...स्पीकर्स, आकोस्टिक्स...सारे पाश्चात्य आहे. भारतीय म्हणावे असे आधुनिक आमच्याकडे काही नाही. मग पाश्चात्यांनी शोध लावले त्यापेक्षा प्रबळ शोध आम्ही लावण्यासाठी आमची बुद्धीमत्ता का खर्चत नाही? उदा. बिट सिस्टमवर आजही कंप्युटर चालतात. क्वंटम मेक्यनिक्स वापरुन आम्ही नवीच प्रणाली का शोधू नये? माइक-स्पीकरशिवायही आवाज सर्वांपर्यंत पोहोचेल असे अगदी नवे तंत्रज्ञान आम्हाला का शोधता येवू नये? शिवकाळात म्हणे असे तंत्रज्ञान होते. होते कि...असेल....पण आज ते उपयुक्ततावादी पद्धतीने पुन्हा विकसीत करत त्याला जनोपयोगी का बनवता येत नाही? केवळ होते आमच्याकडे असल्या भुलथापा विज्ञानात चालत नाहीत. पुरावे द्यावे लागतात. ज्यांचे पुरावे आजही जितेजागते आहेत त्यांना मात्र समाजव्यवस्थेत तळागाळात दाबले गेले आहे. सन्मान ना भुतकाळात दिला ना आज देत आहेत. वांझ वर्चस्वतावाद हा विघातक आहे....अकारण निर्माण केला गेलेला हीनगंडही तेवढाच विनाशकारी सिद्ध झाला आहे.

८) भारतीयीकरण म्हणजे वैदिकीकरण नाही. तसे करायचा प्रयत्न होतो आणि जोवर होत राहील तोवर मी त्याला खंदा विरोध करणारा एक पाईक असेल. फेकाफेकीतून विकृती निर्माण होते...ज्ञान नव्हे याचे भान असले पाहिजे.

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...