Thursday, October 15, 2015

माझ्या विरोधक अमुकभक्त मित्रांनो...!

माझ्या विरोधक अमुकभक्त मित्रांनो, माझे म्हणने सत्य आहे कि नाही ते सोडा. माझ्या सध्यस्थितीवरील पोस्टमधील निरिक्षणे चुकीची आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. ते अधिक चांगले राहील.
विरोधी विचारांना "गद्दार,, मोदी द्वेषी" म्हणून झिडकारता येणार नाहीत. मोदी भारतीय आहेत आणि प्रत्येक भारतियाचा आम्ही आदर करतो. ओबामांनी त्यांना पार मागच्या रांगेत उभे केले हा त्यांचा नव्हे, देशाचा अपमान होता. याचा सल भक्तांना वाटला नाही कारण ते महानिर्लज्ज आणि अविचारी आहेत हेच वरील भक्तांच्या प्रतिक्रियांवरून सिद्ध होते. "इतने बडे शहर में ऐसी छोटी-मोटी घटनाऎं होती रहती है!" असे नामुराद उद्गार काढणा-यांचा आम्ही जेवढा तीव्रतेने निषेध केला त्यापेक्षा जास्त तीव्रतेने निरपराध राष्ट्रभक्त मुसलमानाच्या धर्मांध हत्येचा करणार!
बरे ही एक घटना नाही. धर्मांध सत्तेत नव्हते तेंव्हाही ते तसेच होते पण आता तर जास्त चेकाळले आहेत. विरोध या चेकाळना-या मुर्खांना आहे आणि या चेकाळना-यांची बोलती बंद न करु शकणा-या कृतीहीन पंतप्रधानांना व त्यांच्या बेसुमार मुर्ख विद्वेशी वक्तव्ये व कृत्या करण-या मंत्र्यांना व साधू-सध्वी या अधर्मी लोकांना आहे.
राष्ट्राचे प्रश्न तसेच आहेत आणि वर निर्लज्जपणे गेल्या साठ वर्षात काय केले हा प्रश्न विचारण्याची वारंवार बेमुर्वतखोरी आहे. हे संगणक, तुमचे मोबाईल आणि मंगळावरची स्वारी काय आभाळातून पडली कि काय? पहिला अणूस्फोट घडवून आक्ख्या जगाला चकीत करना-या आणि निर्बंध लादुन घेणा-या इंदिराजी गेल्या साठ वर्षातच झाल्या ना? आण्विक तंत्रज्ञानाचा पाया नेहरुंनी घातला हे तुम्ही विसरलात की काय? आधुनिकीकरणाला सतत विरोध करत ती प्रक्रिया लांबवणारे झारीतील शुक्राचार्य कोण हे देश विसरला आहे या भ्रमात काय बरळत सुटलाय हे तुम्हाला कळते काय?
याचा अर्थ ते नेहमीच बरोबर होते असाही नाही. जेथे ते चूक होते तेंव्हा त्यांनाही झोडपले गेले आहे. माझी "सव्यसाची", "गुडबाय प्राईम मिनिस्टर", "आभाळात गेलेली माणसं", "काळोख" इत्यादि कादंब-या आणि गेल्या चार वर्षातील अर्थव्यवस्थेवरील लेख हे कोणावर टीकेची झोड उठवत होते? तुमचे सरकारच नव्हते त्यामुळे तुमच्यावर नक्कीच नाही.
पण एक फरक स्पष्ट दिसतो. कोंग्रेसवाले कधी अंगावर येत उपटसुंभांसारखे तुमच्यासारख्या येडपट, विषय सोडून प्रतिक्रिया देत नव्हते. ते समजावून घेण्याचा प्रयत्न करत. भले ते करायचे तेच करायचे किंवा अल्प-स्वल्प स्वत:त्य बदल करायचे. तुम्ही मात्र झुंडशहा आहात आणि याच झुंडशाहीला विरोध आहे हे समजायची अक्कल तुम्हाला नाही. उन्मादाची नशा ही सर्वात भयानक विनाशक असते हे तुम्हाला अजून कळालेले नाही. आणि आम्हाला भारतीय समाजव्यवस्थेच्या पायाला धक्का लावनारे असांस्कृतिक जंत तर आजीबात नकोत. त्यांना वैचारिक विरोध होतच राहणार आणि तो विरोध समजावून घेण्याची पात्रता अंगी बानवा एवढे मी नक्कीच म्हणेल.
"तुम्ही लिहू शकता, मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आलाय असे विधान कसे करता?" असा एकाने बेमुर्वत प्रश्न विचारलाय. दादरी करुन टाकु, मारुन टाकु वगैरे धमक्या मला मिळाल्यात...तुम्हा भेकडांना नाही. धमक्या देवुनच आवाज बंद करायचे, अभिव्यक्तीचा संकोच करता येईल अशी बिले पास करण्याचा (अयशस्वी) प्रयत्न करायचा...राईट टू प्रायव्हसीवर गदा आण्न्यासाठी झटायचे....हे काय आहे? तुम्ही आंधळे असाल, भारतीय नाहीत हे मला तुम्हाला ठासून सांगायचे आहे.
मला कोणी घाबरवू शकत नाही कि घाबरवून अथवा पैशांनी/पदांनी कोणाच्या विचारसरणीचा गुलाम करु शकत नाही. सर्वच प्रकारच्या सांस्कृतिक/राजकीय बाजारुंना मी विरोध केला आहे आणि करेन. असे आजही असंख्य लोक आहेत. त्यांच्या नादाला झुंडशाही करत लागु नका. भले याला इशारा समजा.
जोवर आताचे सरकार फालतू टुक्कार संदर्भहीन संघीय लाड पुरवत विकासाभिमुख कृती करत नाही तोवर हा विरोध राहणारच. पंतप्रधानांना याची जाणीव करुन देणे हे तुमचेही काम आहे. भविष्यात लिहिल्या जाणा-या इतिहासाचे विकृत खलनायक बनू नका. इतिहस तुम्हा नामर्दांना क्षमा करणार नाही!
माझ्यावर बिन्धास्त टीका करा, शिव्या द्या....कारण मी म्हणजे देश नाही. मला काहीएक फरक पडत नाही. मी माझ्याशी ठाम होतो आणि आहे. पण स्वत:ला तपासून पहा. भांग पिलेल्या उन्मादी अवस्थेत जाऊ नका...
ते आज तुम्हाला तुमच्या भल्याचे अथवा मनासारख्या हिंसक गोष्टी साध्य करण्याचे वातावरण वाटत असेल....
तर मला एकच म्हणावे लागेल...
तुमच्याएवढे देशद्रोही आणि मानवताद्रोही कधीच झाले नव्हते!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...