Friday, February 12, 2016

ही स्वप्नेच अशी टुक्कार आणि निरर्थक

जाऊद्या...
ही स्वप्नेच अशी टुक्कार आणि निरर्थक
साकार व्हायला लाजतात लेकाची
अन
मनावर स्वार राहत गुलाम करतात आपल्याला
आज ...उद्या करत
ही स्वप्नेच का असतात?
खड्ड्यात गेली ती स्वप्ने
खड्ड्य़ात गेली ती स्वप्नांची गुलामी
माणसं मरतात...
मरुद्यात
जगतात
जगुद्यात
स्वप्नांची काय गरज?
माणसांना दिशाहीन करायला?
स्वप्नांनो....
पाठलाग करु नका
या बेड्याच ब-या आहेत
मनुष्य नसण्यातलेच अहोभाग्य
आम्हाला उपभोगू द्या...
स्वप्नांनो....
आमच्या नादी लागू नका
तुम्हाला साकार करण्यातले धैर्य
आम्ही कधीच गमावले आहे!

काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!

महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...