हेही हवे...तेही नको
जात हवी...जात नको...
याला झोडु... त्याला तोडू
पण स्वजातीचा?... अरे नको नको...
त्या जातीचा...त्या धर्माचा
त्या वस्तीतील...त्या वेशाचा
त्या गटातील...त्या पक्षाचा
शत्रू बरा तो...ठोक ठोक तो...
विचार जेवढे जुळती तोवर
माथा असतो झुकला त्यांवर
क्षणी विपरीत होता पळभर
लाथा घालत त्या मुर्खावर...(?)
उठती गर्जना...उठती शस्त्रे
मारा काटा....आवाज गगनभर...
याला मारा...त्याला काटा...
विकत घ्या कोणी विकत द्या...
गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या
रावण घ्या कोणी रामही घ्या...
नाहीतर जरा उचल मुंडके
शेवटचे "...हे राम!" म्हणुन घ्या!
"जात जात जात" हा मंत्र असा जो
श्रेष्ठ असे सर्व मंत्रांहुन
एक अनाहत ध्वनी निघतो ...जो
जळत्या ज्वालांच्या चितेंतून...
"म्रुत्यु हा बरवा...जातही बरवी
प्रजा ही भडवी...ना जानें तू..."
Subscribe to:
Post Comments (Atom)
वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम
एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...
-
पानिपत ही मराठ्यांची एक घोर शोकांतिका मानली जाते. पानिपत युद्धात महाराष्ट्रात घरटी बांगडी फुटली असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ह्या शोकांतिके...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
सुंदर संजयजी
ReplyDeletekya bat hai yar.sahi.
ReplyDelete