Friday, July 22, 2011

असूर परशुरामाचे रहस्य!

















33 comments:

  1. तुम्ही म्हणता कि अथर्ववेद हा असुरांचा आणि ऋग्वेद हा यज्ञ धर्मीयांचा आहे......पण हा अथर्ववेद रुग्वेदानंतर रचलेला आहे...कारण अथर्ववेदाच्या परिशिष्ठ ४६ मध्ये ऋग्वेदाच्या विविध शाखांचा उल्लेख आहे....

    आणि जर अथर्ववेद हा ऋग्वेद नंतर रचला गेला, तर मग यज्ञ धर्मीयांनीच पुढे जाऊन मूर्तीपूजा आणि शिव-शक्ती पूजा निर्माण केली असा तर्क केला जाऊ शकतो का????
    बाकी भृगु हे असुरांचे पुरोहित होते हे मी पण मान्य करतो.....पण लगेच वेगळे धर्म होतात असं नाही..

    ReplyDelete
  2. तुम्ही म्हणता कि च्यवन भार्गव यांनी आयुर्वेदाची रचना केली...पण मद्भागवत (९.१७.४) म्हणते कि सोमवंश मधला धन्वंतरी याने आयुर्वेदाची रचना केली....

    ReplyDelete
  3. तुम्ही म्हणता कि कठ,श्वेताश्वर,केन,छांदोग्य उपनिषदात अथर्वन तत्त्वज्ञान दिसते......
    अहो पण, छांदोग्य आणि केन या सामवेदाच्या उपनिषद आहेत
    श्वेताश्वर आणि कठ या कृष्ण यजुर्वेदाच्या उपनिषद आहेत....
    तुम्ही दिलेल्या कुठल्याही उपनिषद अथर्ववेदाच्या नाहीत..

    ReplyDelete
  4. तुम्ही म्हणता कि विश्वामित्र हा भृगुकुलीन आहे....विश्वामित्र हा पुरुकुलीन आहे....गाधी राजा हा कुशिकाचा मुलगा होता...आणि कुशिक हा पुरुवंशी होता...विश्वामित्राची बहिण सत्यवती हि रुचिक राजाची बायको...त्यामुळे सत्यवती हि भृगुकुलात दिली गेली...विश्वामित्र हा पुरूच राहिला..

    ReplyDelete
  5. @ash- प्रथम विष्णुबद्दल. विष्णुची स्तुती करणारी अशी ऋग्वेदात पुर्ण तीनच सुक्ते आहेत व अन्य ३ सुक्तांत काही ऋचा असल्याने मी साडेतीन सुक्ते हा शब्द वापरला आहे आणि ते योग्यच आहे. अन्य सुक्ते विष्णुस नव्हे तर सुपर्ण व गरुत्मान यांना वाहिल्या आहेत. ही संबोधने मुलत: स्वतंत्र सुर्य देवतेशी संबंधीत होती, पण तीच नावे पुढे विष्णुलाही लागली त्यामुळे हा संभ्रम निर्माण होतो. मी उल्लेखिलेला विश्वामित्र हा भ्रुगुला झालेला गाधी या पत्नीपासुनचा मुलगा आहे. कुशिककुलीन विश्वामित्राशी याचा संबंध नाही. भ्रुगु हे असुर कुलीनच होते व त्यांनीच अथर्ववेद रचला हेही बरोबर आहे. अथर्ववेद जेंव्हा चवथा वेद म्हणुन यद्न्यधर्मियांनी मान्य केला तेंव्हा तेंव्हा त्यात काही यद्न्यविषयक ऋचा टाकण्यात आल्या. आपण म्हनता ती सर्वानुक्रमणी व प्रत्येक वेदांची उपनिषदे ठरवली गेली हा काळ इसपु तिसरे शतक हा आहे. कात्यायनाचाही हाच काळ आहे. अथर्ववेद ऋग्वेदानंतर रचला गेलेला नाही तर उलट अथर्ववेदातील काही भाग ऋग्वेदापेक्श्गा प्राचीन आहे. दोहोंची रचन समांतर पण वेगवेगळ्या प्रदेशात, म्हणजे ऋग्वेदाची सरस्वतीकाठी तर अथर्ववेदाची गंगेच्या खो-यात. ऋग्वेदात या प्रांताला आर्यावर्ताबहेरील व अयद्न्य लोकांचा मानलेला आहे. मी उल्लेखलेल्या उपनिषदांची रचना याच भागात झालेली आहे आणि ही उपनिषदे अथर्वन तत्वद्न्यान (शिव-शक्ती, पुजा, तप, मोक्ष, आत्म्याचे अमरत्व ई. पुढे नेतात....म्हणुन या परंपरा पुर्णतया यद्न्यधर्मविरोधी आहेत. शिवपुज ही सिंधु काळापासुन आस्तित्वात असुन यद्न्य धर्म नंतर सुदासाच्या कुळात निर्माण झालेला आहे. यद्न्य धर्म व प्रतिमापुजक शैवप्रधान धर्म व त्यांची तत्वद्न्याने सर्ग्वस्वी वेगळी आहेत. श्रीमद्भागवताचा पुरावा घेता येत नाही कारण ते तर फारच उत्तरकाळात रचले गेले आहे.

    ReplyDelete
  6. प्रथम विष्णुबद्दल. विष्णुची स्तुती करणारी अशी ऋग्वेदात पुर्ण तीनच सुक्ते आहेत व अन्य ३ सुक्तांत काही ऋचा असल्याने मी साडेतीन सुक्ते हा शब्द वापरला आहे
    ================================================

    जरा गोंधळ उडाला आहे....तुमच्या ब्लोग मध्ये तुम्ही 'साडेतीन रुचा' म्हणता.....आणि उत्तरामध्ये 'साडेतीन सूक्ते' म्हणता.....नक्की काय म्हणायचे आहे सर तुम्हाला??

    ReplyDelete
  7. मी उल्लेखिलेला विश्वामित्र हा भ्रुगुला झालेला गाधी या पत्नीपासुनचा मुलगा आहे.
    ==================================================
    जरा reference देऊ शकाल क सर??

    ReplyDelete
  8. मी उल्लेखलेल्या उपनिषदांची रचना याच भागात झालेली आहे आणि ही उपनिषदे अथर्वन तत्वद्न्यान (शिव-शक्ती, पुजा, तप, मोक्ष, आत्म्याचे अमरत्व ई. पुढे नेतात...
    =================================================

    http://en.wikipedia.org/wiki/Upanishads

    तुम्ही लिहिलेल्या उपनिषद या कुठल्याच अथर्ववेदाच्या नाहीत.....वरील विकिपीडिया ची लिंक पहा...

    ReplyDelete
  9. अथर्वन तत्वद्न्यान (शिव-शक्ती, पुजा, तप, मोक्ष, आत्म्याचे अमरत्व ई. पुढे नेतात....म्हणुन या परंपरा पुर्णतया यद्न्यधर्मविरोधी आहेत.
    ================================================
    अहो मग ज्या लोकांनी यज्ञ धर्म काढला त्याच लोकांनी शैव-शक्ती पुजानेची पद्धत नाही काढलेली असू शकत?? ती पद्धत वेगळ्या लोकांनीच का काढायला हवी आहे???? बृहस्पती ( जो अंगिरस कुळातील होता), चार्वाक ( जो बार्हस्पत्य सूत्रांचा रचेता आहे) यांनी सुद्धा यज्ञ आणि ऋग्वेदातील कर्मकांडावर टीका केली आहे...स्वतः यज्ञ धर्मी असूनही...त्यासाठी वेगळे लोकच पाहिजे असे काही नाही...आणि असे नाही असू शकत का कि ज्या लोकांनी ऋग्वेद रचला त्यांनीच पुढे जाऊन यज्ञ विरोध करून पुजा, तप, मोक्ष, आत्म्याचे अमरत्व,ई संकल्पना आणल्या असाव्यात???

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. तुम्ही म्हणत एकी भृगु लोकांनी यज्ञाचा विरोध केला.....
    पण ऋग्वेदात अशा कितीतरी रुचा आहेत ज्या सांगतात कि भृगुंनी यज्ञवेदीत अग्नी स्थापन केला, ३ प्रकारचे अग्नी निर्माण केले,ई...
    संदर्भ- ऋ ( १.५८.६/ १.६०.१/ १.१२७.७/ १.१४३.४/ २.४.२/ ३.२.४/ ३.५.१०/ ४.७.१ व ४/ ४.१६.२०/ ६.१५.२ )


    अंगिरस,वसिष्ठ,ई लोक यज्ञ धर्मी होते....आणि यज्ञात सोम रस पान होयचे...पण आश्चर्य म्हणजे भृगंनी सोमाच्या प्रशंसेत जास्त रुचा रचल्या आहेत
    अंगिरस- ३६१९ पैकी २७२ सोमाच्या रुचा आहेत
    वसिष्ठ- १२७६ पैकी ७४ सोमाच्या आहेत
    पण भृगु मध्ये ४७३ पैकी चक्क १५२ रुचा सोमाच्या आहेत....मग खरच भृगु यज्ञ विरोधी म्हणायचे?

    ReplyDelete
  12. श्रीमद्भागवताचा पुरावा घेता येत नाही कारण ते तर फारच उत्तरकाळात रचले गेले आहे.
    ==================================================
    Admittedly, the Vedas are a defective source of history. As religious books, they only deal with historical data in passing. But that that does not mean we treat the Vedas as the only source of ancient Indian history, and neglect the legitimate history books, the ItihAsa-PuraNa literature, i.e. the Epics and the Puranas. It is like ignoring the historical Bible books (Exodus, Joshua, Chronicles, Kings) to draw ancient Israelite history exclusively from the Psalms, or like ignoring the historians Livius, Tacitus and Suetonius to do Roman history on the basis of the poet Virgil. What would be dismissed as “utterly ridiculous” in Western history is standard practice in Indian history.
    Essentially the same remark was already made by Puranic scholar F.E. Pargiter.41 It was dismissed by some, with the remark that the Puranas are even more religious and unhistorical than the Vedas.42 However, that does injustice to the strictly historical parts of the Puranas, mixed though they are with religious lore. No serious historian would ignore the Exodus narrative simply because it also contains unhistorical episodes like the Parting of the Sea and the voice from the Burning Bush.
    The Bible provides another important parallel with the Epics and Puranas: most historians now accept the basic historicity of the Biblical account of Israelite political history from at least king David until the Exile, yet it is almost completely unattested in non-Biblical documents, just as ancient Indian history as narrated in the Epics and Puranas (and glimpsed in the Vedas) is practically unattested in non-Indic literature. The non-attestation of Israel’s history in the writings of its highly literate neighbours is more anomalous than the non-attestation of early Indian history in the writings of other literate cultures, which were more distant from India geographically and linguistically than Babylon was from Jerusalem. So, if Biblical history can be accepted as more than fantasy, the same credit should be given to the historiographical parts of the Epics and Puranas.

    ReplyDelete
  13. @Ash, I meant to say 3 1/2 Sukta's and Not Richa's. (about Vishnu). First, about your above comment, by nature we the Indian's are too backward in recording the events in realistic mannars the way Greek and Romans did. So most of the ancient history is based on logiv and tracing contemporary events in then world, if references are found at all. Also most of the ancient scripts has been badly polluted in the course of the time. This makes the things worse. For example Rigveda mentions harathrost...if Vedic period cannot be brough bellow 1500 BC, how mention of Zorothrost who happened to be in 6th century BC can be found in Rigveda? So, Rigvedaa too is polluted in the course of time. For example Purush sukta is clearly an addition in later ages when varn systemwas shaping up./...actually Rigveda doesnt support Varna system on the basis of birth. We have to lookl very carefully in these matters to reach any conclusion. Thanks.

    ReplyDelete
  14. @Ash, I meant to say 3 1/2 Sukta's and Not Richa's. (about Vishnu). First, about your above comment, by nature we the Indian's are too backward in recording the events in realistic mannars the way Greek and Romans did. So most of the ancient history is based on logiv and tracing contemporary events in then world, if references are found at all. Also most of the ancient scripts has been badly polluted in the course of the time. This makes the things worse. For example Rigveda mentions harathrost...if Vedic period cannot be brough bellow 1500 BC, how mention of Zorothrost who happened to be in 6th century BC can be found in Rigveda? So, Rigvedaa too is polluted in the course of time. For example Purush sukta is clearly an addition in later ages when varn systemwas shaping up./...actually Rigveda doesnt support Varna system on the basis of birth. We have to lookl very carefully in these matters to reach any conclusion. Thanks.
    ===============================================

    thats like generalizing that all the scriptures are corrupt.......if that is the case, then pls don't consider atharva ved and it's upanishads for proving ur point......bcoz even it can also be corrupt....
    lets not use biblical books like exodus and joshua for proving the exodus of moses
    it is very easy to dismiss texts if they speak against ur proposition....and just bcoz certain parts are added, that does not mean u discard the whole scripture......

    ReplyDelete
  15. @Ash, I dont know what gives you weired ideas. You talk about Ramayana...and I tell balkand and uttarkand is later on addition...do you agree or not? if not, then if approved we have to accept rama's biological father was Rushyashrung rushi. Is it not? Then I can go further to prove that this is the reason why Brahmins (especially RSS) loves Rama over Krishna. But I have not domne it. I know balkand is later on addition. Same way, you forget that why Rama is being hated by Bahujaniy thinkers? Even babasaheb? Because Utrakand mentions Shambuka vadha. This too is later on addition and not part of original Ramayana./...Why you dont understand this? Everything, including 16th-17th century bakhars are poluted...even Dnyaneshvari is polluted...Polluting history for the reasons is habit of mankind. Cant we try to see it through plain minds? And see clearely our good or bad deeds of the past to improvise our present to build future? See, our all religious, political and social history is polluted...and I am trying without any personal casteist pride to trace its original seeds. If you are really so studious help me without arguing unnecessarily. Try to see what is behind that veil...it will help...not superioritive arguments...Thanks that you have some viewpoint, may it be today against me or my point against you...but only arguments wont help to look into ral history...we know there is no real history...then we have to abandone some history or find out what could be alternate history...those are our forefathers and even we those have no respect avbout keeping true history...what else?

    ReplyDelete
  16. Thank you Sanjay ji. This is something that I had no knowledge of. Very interesting perspective. Today I got to learn something about the possible origin of my family .
    I would be glad if this is the fact. Would be proud to be a peasant than being someone with false pride about the caste.

    ReplyDelete
  17. संजयजी आणि अश जी ,
    अगदी खडाखडी आणि झटापटीची झाली तुमची भेट.
    पण
    मिलिंद ची नोंद पण विचारात घेण्यासारखी आहे.
    आणि अश तुमच्या मागे हात धुवून लागला त्याचे कारण पण समजण्यासारखे आहे.
    मला वेदांबद्दल थोडेसेच कळते.- त्यावर लिहिण्यैताकी मी मोठ्ठी नाही.ते एकाने लिहिले का दहा जणानी , आधी कोणता - ते मला महत्वाचे वाटत नाही !

    दुसरा महत्वाचा मुद्दा - अजून किती जणानी यात सहभाग घेतला ? त्यातूनपण आपण काही शिकण्यासारखे आहे - नाही का ?
    हा सर्व साधारण माणसाच्या आवडीचा मुद्दा नाहीच आहे ! नाहीतर खचा खच १५-२० वेगवेगळे लोक उतरले असते -
    हे बी ए -एम ए -पी एच डी वाल्यांना ठीक आहे ! सामान्य मनुवाद्याला झोड पणारेसुद्धा विसरले या वेळेस !
    त्यांना तर कळलेच नसेल - च्यायला - राव सांगायचं नाही होय ! आम्हाला मनु बिनु काय दिसला नाय -
    म्हटलं असेलहे दाढीवाल म्हतार पाप्याच पितर - कुणीतरी वाढपी बिडपी - तसच तर दिसतंय हे पात्र !

    मनुष्याच्या या विश्वाविषयी- ज्या समजुतीबद्दल आपण बोलतो त्याबद्दल आपण एक मुलभूत धारणा लक्षात ठेऊ या !
    वेद !
    त्याने अबोधपणे पण उत्स्फुर्तपणे त्या रचना केल्या आहेत ! त्या मानवाला असे लिहावेसे वाटणे हेच मुळात प्रचंड क्रांतिकारक मानले पाहिजे .
    त्यालापण इतिहास मानायचे का ? हा मुलभूत विचार आपण करू या !भेसळ तर सगळीकडेच आहे !तुम्हीच म्हणता तसे !
    " हे असे असे घडले " असे जर त्या रचनाकाराने म्हटले तर त्यातील सत्य कुठल्या फूटपट्टीने मोजायचे ? तसे मोजणे हे पण योग्य आहे कि नाही हे कुणी ठरवायचे .?
    संजय जी आपण पण शेवटच्या काही वाक्यात असेच थोडेसे म्हणत आहात - खरे काय ?
    आपण लिहिले आहे की - खरा इतिहास असा काही नसतोच - बराचसा भाग हा प्रदुषीतच असतो , आणि आपण मागेतरी कुठपर्यंत जायचे ? जिथवर आपल्याला परवडते ?मानवते ?
    लहान मुले जसे " झाप्प्यो " टाईम प्लीज - असे म्हणत खेळ रिवाइंड करतात तसे का हे असते ? आपल्याला जे लोकांवर थापायचे आहे तिथपर्यंत जाऊन परत आपल्याला हवे तसे मांडून मग खेळ सुरु - परत वर म्हणायचे -
    बर का - मी म्हणतो ते फायनल - ते दुसरे काका सांगत होते न ते तसलं काही नाही बर का !

    मुळात ज्या रचना माणसाच्या पहिल्या भावना,पहिली मांडणी म्हणून कौतुकास पात्र असतात त्यांच्या विषयी असे वाद का घालायचे.?
    तसे पहिले तर ,
    ख्रिश्चन,हिंदू वा मुसलमान धर्मात अनेक अशा मुलभूत कल्पना आहेत ज्या आज कालबाह्य झाल्या आहेत.
    नवीन जगातील विज्ञानाच्या उंबरठ्याला ओलांडून येताना त्यांची अवस्था मृतवत होते.सर्व जे जे विज्ञानाने सोडवता येते ते ते आपण घेऊया
    बरत्रोंड रसेल म्हणतो की आजची फिलोसोफी- तत्वज्ञान - जर उद्याचे विज्ञान बनणार असेल तर अशा तत्वज्ञानाला माझे प्रणाम -अशा तत्त्वज्ञाला माझे वंदन !
    बाकी पुराणातील वांगी पुराणातच राहू द्या.
    नाहीतर खूप वेळेचा अपव्यय होईल.

    हा लेख आपण खूप पूर्वी लिहिलेला आहे पण तो आत्ता माझ्या वाचनात आला.
    कोण कुणापासून जन्माला आला , त्यापेक्षा त्याचे म्हणणे काय आणि तेसुद्धा त्या काळातले ज्या वेळेस माणसाचा काही म्हणजे काहीही वैज्ञानिक अभ्यास नव्हता !
    प्रत्येक धार्मिक ग्रंथ ही एक फ्यान्टसी मानली तर सर्व प्रश्नच संपतात ! निदान हलके तरी होतात !
    आपण आजच्या चष्म्यातून त्या भूतकाळाला बघतो आणि भांडत बसतो ! हे तर फारच चुकीचे आहे. त्यापुढे जाऊन रूपके आणि त्याचे अर्थ असे कोडी सोडवाल्यासारखे खेळ खेळत बसतो.!

    मिलिंदाने किती थोडक्यात !सांगितलय ! नको रे बाप्पा ! मी आपला शेतकरी म्हणून ओळखला जातोय तितके बेस असा ! बाकी हा फापटपसारा माझ्या काय कामाचा ?आणि हो-
    मला पण जाणून घ्यायचं आहे की एका माणसाचे आयुष्य ६०-७० वर्षाचे त्यात शालेय १५ ते २५ वर्षे कॉलेज धरून - पुढे नातीगोती , संसार , नोकरी ,आणि मित्र परिवार यात या सर्व वेद वगैरेचा संबंध कुठे येतो ? आणि किती ? मग हे वाद फक्त डेक्कन कॉलेज किंवा पी.एच.डी.साठीच सीमित राहिलेले बरे - नाही का ?त्याच्यावरच ज्यांचे करियर आहे - पोट आहे त्यांना हे खेळ खेळूद्यात ! आपण माणूस म्हणून जगूया !

    ReplyDelete
    Replies
    1. फारच छान स्वरदा. असेच विचार सर्वांनी करावे आणि नवसृजन घडवत भविष्याकडे वाटचाल करावी. काही परिस्थित्या टालण्यासाठी गतकाळाचे निरपेक्ष अन्वेषन करावे लागतेच. उदा. आता चिपळुनला होणार असलेल्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेवर परशु आणि परशुरामाचे चित्र छापल्याने वाद निर्माण झालाय. हे चित्र छापले गेलेय ते परशुरामाची चुकीची (क्षत्रीय नष्ट करणरा, मातृघातकी वगैरे) प्रतिमाच समोर आनत विशिष्ट जातीचा अहंगंड सुखावण्यासाठी. मग विरोधकही आहेतच. ब्रिगेडने लगेच हे संमेलन उधळुन टाकायची धमकी दिलीय. या सा-यात खरा परशुराम बाजुलाच रहातो आणि सामाजिक तेढ माजवणारा परशुरामच नि:ष्कारण गाजवला जातो. हा परशुरामावरही अन्याय नव्हे काय? म्हणुन संमेलनाचे आयोजक निषेधाचे धनी होणे अपरिहार्य ठरते. To avoid this some times historical research helps.असो. आपल्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार.

      Delete
  18. संजयजी,

    Giving Up Doesnot Always Mean You Are Weak.
    Sometimes It Just Means You Are Strong Enough To Let It Go.

    असे मी कुठेतरी वाचले होते.
    सध्या पराशुरामाबद्दल जे तुफान उठले आहे ते म्हणजे
    चहाच्या पेल्यातील वादळ मानायचे का खरेच तो कोकणच्या अस्मितेचा प्रश्न आहे ते तपासून पाहू या !
    अशा छान आनंदी वातावरणाचा चोथा करण्यात काहीजण वाकबगार असतात.
    तो सर्व पूर्व नियोजित प्रकार असावा असे वाटावे इतपत या घटनांचा क्रम पाहिले की वाटत जाते.

    संपूर्ण कोकणाचा परशुराम हा प्रतीक होऊ शकत नाही.

    परशुरामाने कधी काही भव्य ,उदात्त लेखन केल्याचे ऐकिवात नाही.ज्यामुळे त्याची साहित्य संमेलनात अग्रक्रमाने आठवण व्हावी !
    त्यामुळे केवळ कोकण संमेलन आणि कोकणस्थ असा जोड देऊन त्याला यात ओढणे म्हणजे पोरकट पणाच नव्हे तर मूर्खपणाचेच वाटते.
    बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत तर काय बोलावे .?
    शिळ्या कढीला किती दिवस ऊत आणायचा ?इथे तेच , शिवाजी पार्कवर तेच -
    त्यामुळे मुखभंग होण्यापेक्षा आणि सर्वांच्या आनंदावर विरजण पडण्यापेक्षा हे वाद इथेच
    बरे.कारण संभाजी ब्रिगेड सारख्या अत्यंत हिणकस लोकांना यात जागा देण्यापेक्षा आणि वाव मिळण्यापेक्षा त्या परशुरामाला
    मलपृष्ठावर टाकलेले बरे किंवा ती रद्दी कोकणातल्या कोब्रा दुकानात वजनावर टाकून त्या पैशातून मंत्री संत्री लोकांचे हार विकत आणावेत - चहापाणी करावे -

    ReplyDelete
  19. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  20. संजयजी,
    एक कल्पना करूया की
    या साहित्य संमेलनाला सोनिया गांधी येणार आहेत .प्रास्ताविक सुषमा स्वराज करणार आहेत .
    किंवा अडवानी उद्घाटन करणार आहेत , तर काय चित्र दिसले असते ?
    नारायण राणे तत्परतेने आले असते आणि म्हणाले असते की - पोरानो , गप्प ,एकदम गप्प,
    अजिबात मला आरडा ओरडा नकोय.
    आजकाल सरकारच्या अनुदानाने अशी संमेलने होतात हे उघड सत्य आहे.
    त्यामुळे मंत्री आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड सारखे पित्ते यांची सद्दी चालणार हे उघड आहे.

    हा आपली एक ताकद दाखवायचा कार्यक्रम आहे. मिडिया आणि असे लोक मिळून आजकाल काहीही करू शकतात.
    ब्राह्मणाना त्यांच्याच भागात जाऊन ठेचण्याचा हा सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे
    त्यातच परशुराम,दादोजी,असले मुद्दे अमर आहेत.परशुराम अमर आहे हे विनोदाने तरी मान्य करावे लागते.
    मराठवाडा विद्यापीठाला डॉ .आंबेडकरांचे नाव देताना असा विचार केला जात नाही की आंबेडकर म्हणजे मराठवाड्याचा लढा नाही ,
    स्वामी रामतीर्थाना त्यावेळेस बाजूला टाकले जाते.

    ReplyDelete
  21. पराशुरामाबद्दल वृथा टीकेची झोड उठवली जात आहे.
    परशुराम हा पश्चिम किनारपट्टीचा देव मनाला जातो.
    कोकण पासून केरळ पर्यंत !
    त्याला असल्या ठिकाणी बदनाम करू नये.
    त्याचा आम्ही निषेध करतो.
    बाळा साहेबांसारख्या माणसाला यातून बाजूलाच ठेवावे.
    सरकारी मेवा हवा असेल तर आम्ही म्हणतो ते ऐकावेच लागेल नाहीतर संभाजी ब्रिगेड नावाची पिसाळलेली कुत्री
    तुमच्या अंगावर सोडू असापण यातून संदेश मिळतो.

    ReplyDelete
  22. मला आपला लेख खूप आवडला. त्याची pdf असल्यास upadhye.rajeev@gmail.com वर अवश्य पाठवावी. तसेच या लेखावर भावनारहित अभ्यासपूर्ण चर्चा झाली असल्यास त्याचे संदर्भ द्यावेत, ही विनंति...

    ReplyDelete
  23. संजय जी
    परसशुराम या विषयाचे आपले लेखन पुस्तक रूपाने वाचायला मिळेल का ?
    मी यापूर्वीपण राजवाडे यांचे असेच लिखाण वाचले आहे.स्वा..सावरकरांचे पण याबाबत विचार वाचले आहेत
    आपली मांडणी जर एकसंध पणे वाचायला मिळाली तर फार बरे होईल अशी ती संग्राह्य वाटते.
    त्यामुळे आपण लवकरात लवकर हा लेख कुठे वाचायला मिळेल ते सांगावे .
    दिवाळी अंक ? पुस्तक ? का वर्तमानपत्र ?
    अशी सकस पुस्तके आजकाल वाचायला मिळणे मुश्किल होत चालले आहे.
    आणि असा काही एक वर्ग आहे ज्यांना असेच लिखाण ज्यात अभ्यास आहे,नवा विचार आहे,आणि त्याला शास्त्रशुद्ध बैठक आहे असे लेखन मिळणे दुर्मिळ आहे.
    उत्तराची वाट पाहणे फक्त हातात आहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  24. सर
    आपण श्री विठ्ठलाच्या बाबत असे सारांशाने लिहिले आहे की विठ्ठल हा विष्णुरूप नसून,
    शिवरूप आहे.साधारणपणे अशा प्रकारचा आपला आशय आहे.
    आता समजा कुणीतरी ब्रिटीश लेखकाने जर सुरुवात केली -
    शिव छत्रपतींचे खरे वडील अमुक तमुक आहेत आणि सर्व मराठे रास्तपणे पेटून उठले ,
    त्या प्रकाराशी आपण हे आपले वागणे जुळवून बघा.

    वारकरी संप्रदायाने पांडुरंगाला ज्या रुपात पूजले आहे त्या रूपातच त्यांना तो आनंद घेऊ दे !
    जर दादोजीला शिवाजीचा बाप ठरवणे हे पाप असेल तर,
    आपणही पाप करत आहात .वारकरी तुमच्या कडे दुर्लक्ष तरी करतील किंवा
    तुम्हाला क्षमा तरी करतील तरीही तुमचे पाप दुर्लक्षिले जाऊ शकत नाही.
    हा विकृत आनंद मिळवून आपण काय साधता तेच काळात नाही !
    आपण सर्व वाचकांची क्षमा मागितली पाहिजे.

    ReplyDelete
  25. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
    वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
    पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा
    चरणी वाहे भीमा उद्धरी जागा

    ReplyDelete
  26. तुम्हाला खरेच वाटते का की परशुराम नावाचा कुणी माणूस झाला होता
    आणि त्याने आईचे डोके उडवले होते
    तसेच त्याच्या इतर गोष्टी की त्याने क्षत्रियांना २१ वेळा मारले ?
    तसे जर असेल तर तुमची इतिहासाची व्याख्या काय आहे ?
    तुम्हाला बकासुर पण ऐतिहासिक वाटतो का ?
    कुंभकर्ण ६ महिने झोपायचा का ?
    त्याच्यावर एक प्रकरण लिहिण्या इतका तो - परशुराम - महत्वाचा वाटतो का ?
    आणि हो ,
    शिवाजी आणि दादोजींचे काय मग ?

    ReplyDelete
  27. संजयजी,
    तुमच्या लेखनाला कुणीच दाद देत नाहीत.
    ash हे तुम्हीच निर्माण केलेले पात्र वाटते.
    काल्पनिक.
    तुम्हाला मानसोपचाराची गरज आहे .

    ReplyDelete
  28. संजय सोनवणी,
    आपल्या लेखनाला कुणाची दृष्ट लागू नये हि सदिच्छा !
    आपण खूप कष्ट घेऊन लेख लिहिता त्याचे कौतुक करावे तितके थोडेच !
    आपण आपल्या लेखन कक्षेत तद्न्य लोकांची साखळी तयार करावी आणि त्यांचा सल्ला आपण लेख लिहिण्यापूर्वी घ्यावा असे सुचवावेसे वाटते !
    आपणास समाजाच्या सर्व थरातून मान्यता लाभावी असे वाटत असते.
    ज्याला इलाईट क्लास म्हणतात त्यांच्या कडून आपले कौतुक होणे महत्वाचे आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. काही लोकांना प्रत्येक ठिकाणी जळी स्थळी बाबा साहेब आंबेडकर दिसतात ..... बाबा साहेबांनी मारलेली पाचार इतकी जबरदस्त आहे कि अवघड जागी दुखणे होणारच ....... मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करताना ..बाबा साहेबांनी मिलिंद कॉलेज च्या माध्यमातून शिक्षण जे विदर्भ मराठवाडा इथल्या लोकांना अतिशय दुरापास्त होते मुंबई पुणे किंवा नागपूर कडे जावे लागत होते त्याच्यावर उपकार केले .. अनेक पुरोगामी पिढ्या तयार झ्हाल्या ... लोक शिक्षित झ्हाले नी काही लोकांची मक्तेदारी मोडून निघाली ..कदाचित त्याच्यामुळेच ... ण सांगता येणारे दुखणे निर्माण झ्हाले असावे ... बाकी न मागताही रामानंद तीर्थ विद्यापीठ निर्माण केलच गेले आहे त्याची हि माहिती ठेवट जा जरा ...!!बाकी वर कोणी तरी मनू वाड्याची आठवण काढली आहेच ...!! सुज्ञास सांगणे न लगे

      Delete
  29. परशुरामाचा खरा अस्सलीत इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचा "परशुराम : जोडण्याचे प्रतिक, की तोडण्याचे" लेखक: डॉ. आ. ह. साळुंखे.

    ReplyDelete
  30. क्षत्रिय परशुरामाला पुरून उरले !
    ...........................................
    ब्राह्मणी धर्मात १० अवतार मानले जातात. अलिकडे मात्र ब्राह्मणांनी ९ अवतारांना घटस्फोट देऊन केवळ सहावा अवतार मानल्या जाणाèया परशुरामालाच आपला देव मानले आहे. ‘जय परशुराम' हा ब्राह्मणांचा परवलीचा शब्द झाला आहे. परशुराम क्षत्रियांचा द्वेष्टा होता. तसेच ब्राह्मण सोडून इतर जातींबद्दल त्याच्या मनात द्वेष भरलेला होता, म्हणून ब्राह्मणांना परशुरामाच्या प्रेमाचे भरते आले आहे. महाभारत, हरीवंश, भागवत पुराण आणि रामायण आदी अनेक पौराणिक ग्रंथांत परशुरामाची कथा आली आहे. ही कथा इतक्या विसंगतींनी आणि थोतांडांनी भरलेली आहे की, कोणाही सूज्ञ माणसाला हसू येईल. या कथेतील हा पाहा काही बोगसपणा :
    १. परशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली, असे पुराणे सांगतात. नि:क्षत्रिय करणे म्हणजे क्षत्रियांचा पूर्ण निर्वंश करणे. सर्व क्षत्रियांना ठार मारणे. आता कोणत्याही व्यक्तीला qकवा व्यक्ती समूहाला एकदाच ठार मारता येईल. २१ वेळा कसे काय मारता येईल?
    २. पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केल्यानंतरही पृथ्वीवर क्षत्रिय शिल्लक होतेच. परशुमानंतरचे दोन अवतार राम आणि श्रीकृष्ण हेही क्षत्रियच होते. महाभारतातील युद्धात १८ आक्षौहिणी क्षत्रिय लढले. परशुरामाने क्षत्रिय शिल्लकच ठेवले नव्हते, तर हे सासरे क्षत्रिय आले कोठून?
    २. अलीकडच्या काळात राजपूतांत क्षत्रियांचा इतिहास सापडतो. आजही स्वत:ला क्षत्रिय म्हणविणारे अनेक जातीसमूह भारतात आहेत.
    ३. याचा साधा अर्थ असा की, परशुरामाच्या पराक्रमाच्या कथा खोट्या आहेत. २१ वेळाचे राहू द्या, परशुरामाला एका वेळीही पृथ्वी नि:क्षत्रिय करता आली नाही. अतएव, ही कथा म्हणजे थोतांड ठरते. त्याचे पराक्रमही बोगस ठरतात.
    ३. परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार समजला जातो. त्या नतंरच्या राम आणि कृष्ण या दोन्ही अवतारांत तो पुन्हा उगवतो. तीन-तीन अवतारांत प्रकटणारा हा परशुराम जगला तरी किती वर्षे? फारच कमी धरले, तरी त्याचे आयुष्य हजार-दोन हजार वर्षे भरेल. एवढे आयुष्य डायनासोरांनाच लाभू शकते. ‘जीवेत शरद: शतम' या श्लोकार्धात मानवाचे आयुष्य १०० वर्षे सांगितले आहे.
    ४. परशुरामाच्या बोगस पराक्रमाच्या कथांचा पर्दाफाश रामायणातही होतो. सीता स्वयंवरात राम त्याचे शिवधनुष्य मोडतो. म्हणून संतप्त परशुराम आपली कुरहाड घेऊन रामावर हल्ला करतो. क्षत्रिय राम त्याचा पराभव करतो. अपमानित झालेला परशुराम मग महेंद्र पर्वतावर जाऊन तपश्चर्या करीत बसतो.
    ३. श्रीकृष्ण अवतारात परशुराम पुन्हा अवतरतो. ब्राह्मण वेशातील कर्णाला तो ब्रह्मास्त्र वगैरे देतो. पण कर्ण ब्राह्मण नाही, हे समजल्यावर त्याला शाप देतो. यातून परशुराम द्वेषाचा मूर्तीमंत पुतळा होता हेच सिद्ध होते.

    4,. असे व्यक्तिमत्व कोणत्याही सुसंस्कृत समाजाने आपले प्र्रतिक म्हणून स्वीकारावे का?
    ......................................................................................................................
    विशेष सूचना
    महात्मा फुले यांनी परशुरामावर अत्यंत घणाघाती टीका केलेली आहे. परशुराम हा इराणी होता. असे संशोधन फुल्यांनी केले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य वाचावे. समग्र फुले वाङ्मयात हे लिखाण आहे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...