Thursday, March 1, 2012

ओबीसींनो, हरामखोरांना हरामखोरीनेच उत्तर द्या! (लेख ८)

ओबीसींना कालजेयी व्हायचे असेल, जर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था आणि संस्क्रुतीचे नवनिर्माते बनायचे असेल, जर राज्य करायचे असेल तर त्यांना पुन्हा निर्माणकर्त्याच्याच भुमिकेत शिरावे लागणार आहे. त्यासाठी अत्यंत व्यापक स्वप्ने आणि पराकोटीच्या प्रयत्नांची गरज आहे. त्याही आधी सारे निर्मानकर्ते हे मुळचे एकच आहेत, धनगरापेक्षा वंजारी वा सोनारापेक्षा माळी वेगळा आहे या समजाला पुरेपुर तिलांजली द्यावी लागणार आहे.
हे कसे करायचे? मी यावर स्पष्ट विचार येथे मांडनार आहे. ते कदाचित धक्कादायक वाटतील, पण त्याला इलाज नाही. आपली मानसिकता त्याखेरीज बदलणार नाही.
ओबीसी सध्या किमान संख्येने ५२% आहेत. आताच्या जातवार जनगणनेनंतर अजुन चित्र स्पष्ट होईल. ते काहीही असले तरी जो समाजघटक संख्येने अर्ध्याहुन अधिक आहे तोच सत्तेचा चालक बनु शकतो. त्यात काहीएक अशक्य नाही. पण महाराष्ट्रात ओबीसींचा सध्या तरी एकच पक्ष आहे. त्याला बळ देता आले तर उत्तमच, नाही तर सर्वच पक्षांत शिरकाव करुन घ्या.
हा शिरकाव फुकटे कार्यकर्ते म्हणुन नव्हे तर पदाधिकारी म्हणुनच करा. पदे/तिकिटे मिळनार नसली तर लाथ मारा. संधी देईल अशाच पक्षात जा.
राजकारणात निर्लज्जता असावीच लागते. शब्द कठोर वाटला तर त्याला लवचिकता असा वाचा. सत्ता हातात येण्यासाठी कोणत्याही स्तरावर उतरायला कचरु नका. त्याचवेळीस ही सत्ता कोणासाठी आणि का मिळवायची आहे हेही विसरु नका. आजवरच्या सर्वच सत्ताधा-यांनी सत्तासंपादनासाठी अगदी हेच केले आहे. उगा शहाजोगपणा करण्यात अर्थ नाही.
दुस-यांना वापरायला शिका आणि आपल्याला कोणी वापरणार नाही याची काटेकोर काळजी घ्या.
सध्याच्या सत्ताधारी जमातींना सत्तेबाहेर हाकलण्यासाठी सर्व पिडीत समाजांची मदत घ्या आणि त्यांच्याशी न्यायाचे वर्तन करा.
स्वत:च्याच जातीचे धिंडोरे पिटवणे सर्वप्रथम बंद करा आणि शुद्रातीशुद्र मानले गेलेले सारेच एकमेव सत्ताकारणाचे ध्येय आहे आणि तेच निर्माणकर्त्यांची संपुर्ण सत्ता अस्तित्वात/वास्तवात आणु शकतात हे विसरु नका.
गांव पातळी ते राष्ट्र पातळीपर्यंत लहान-मोठ्या संघटना स्थापन करा, प्रबोधने करत रहा, सर्व ओबीसी संघटनांत संवाद ठेवा.
मतदान करतांना ओबीसी उमेदवार असेल किंवा ओबीसींनी ठरवलेला उमेदवार असेल तरच मतदान करा. मग तो कोणत्याही पक्षाचा असो वा अपक्ष असो. अन्यथा मतदानावर बहिष्कार टाका.
जो पक्ष ओबीसींना किमान ५०% उमेदवा-या देत नाही त्या पक्षांवर बहिष्कार घाला. राजकीय पक्ष म्हनजे जर समाजाचा चेहरा असेल आणि तोच बहुसंख्यांना डावलत आपल्या सत्तीय मदांधता वाढवण्यासाठी तुमचा वापर करुन घेत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवुन द्या. त्यांची कितीही उदात्त भुमिका असली तरी त्यांना खड्ड्यात घाला. राजकारणात उदात्तता हे नाटकच असते आणि ते ओबामापासुन गांधी घराण्यातले असोत कि बीजेपीवाले असोत, करतच असतात. नाटकांना बळी पडणे आणि फालतु नौटंकी भाषणांनी प्रभावित होत माकड बनण्याची बेवकुफी करणे प्रथम बंद करा.
राजकारणासाठी पैसा लागतो हा एक समज आहे. हरामखोर नेत्यांची ती गरज असते हेही खरे आहे. लोक सर्वांकडुन पैसे घेतात आणि मत ज्याला द्यायचे त्यालाच देतात हे अलीकडच्या निवडनुकींनीही सिद्ध करुन दाखवले आहे. निर्मानकर्त्यांचे प्रबोधन करा, त्यासाठी लागेल तो खर्च अवश्य करा, पण त्यात सातत्य ठेवा. फक्त निवडनुकीच्या तोंडावर ओबीसी कळवळ्याच्या नौटंक्या करु नका.
साहसी बना. तुमचे हेतु दडवायची काहीएक गरज नाही. कोणाच्या दडपनांना बळी पडायची गरज नाही. त्यासाठी लढावु ओबीसींना तयार ठेवा. गुद्द्याचे उतर गुद्द्याने तर मुद्द्याचे उत्तर मुद्द्याने द्यायची तयारी ठेवा. आमच्या पाठीशी आमची माणसे आहेत व प्रसंगी ते धावुन येतात हे खेड्यापाड्यातील एखाददुसरे घर असना-या ओबीसी कुटुंबाला समजु द्या. त्याच वेळीस वैचारिक कोणताही मुद्दा कोणी उपस्थित करत असेल तर त्याला उत्तर द्यायची बौद्धिक शक्ती वापरा, आपली नसेल तर आपल्याच स्वबांधवांना मदतीस घ्या.
राजकारणातुन पैसे कमवा! खुशाल कमवा. पैसा हा आधुनिक युगातील सर्व समस्या सोडवण्याचा राजमार्ग आहे. तो आतापर्यंतच्या सत्ताधा-यांनी जर निर्लज्ज होत वापरलाच आहे तर आपण त्यात नैतिकतेचे प्रश्न उपस्थित करत "मी नाही त्यातला" असे दाखवत पायावर कशाला कु-हाड मारुन घेता? मला स्वत:ला नैतिकतेने अपरंपार खड्ड्यात नेले आहे. आदर्शवाद हा बोलायला नेहमीच चांगला असतो पण आचरणात आणला कि कडेलोट पक्का असतो हे मी स्वानुभवाने सांगतो. त्यामुळे धनवान व्हाच आणि स्वबांधवांनाही धनवान होण्याचे मार्ग उपलब्ध करुन द्या.
तुम्ही जर बाजुला झाला तर एकही राजकीय पक्ष टिकुच शकत नाही. त्यांनी दिलेला/लादलेला एकही उमेदवार निवडुन येवुच शकत नाही. तुम्हाला डावलण्याची त्यांची शक्तीच नाही. ते डावलतात आणि तुम्ही मुर्खासारखे डावलुन घेता म्हणुन आणि म्हणुनच ते टिकुन आहेत, एवढेच.
हिंदुत्ववाद्यांच्या अपप्रचारांना तर मुळीच बळी पडु नका. त्यांचा फार तर वापर करुन घ्या. हे हिंदुत्ववादी तुम्हाला शुद्रच समजतात आणि उपकारकर्त्याचा आव आणतात. तुम्हाला कोनाच्याही उपकारांची गरजच मुळात नाही कारण या धर्माचे निर्माते तुम्हीच आहात तेंव्हा तुम्ही आचरता तोच हिंदु धर्म आहे. तुम्हालाच तुमचा धर्म सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही.
तेंव्हा हिंदुत्ववादी नव्हे तर ओबीसीवादी बना. निर्मानकर्तेवादी बना. खरे हिंदु तुम्हीच आहात. तुम्ही आहात म्हणुनच या वा-या काय किंवा भिक्षुकांचे काय ते चालते. अर्ध्या चड्ड्या घालायचा उद्योग करु नका. उद्या तुमची अर्धी मानगुटही राहणार नाही. मेंदु शाबुत ठेवा...बौद्धिक गुलामी ठोकरुन लावा.
सत्ताकारण साधायचे आणि ओबीसींचे राज्य आणायचे तर तुम्हाला वरील मार्ग अनुसरावा लागेल. नैतीकतेचे ढोल बडवनारे सत्तेत येवु शकत नाहीत कारण तशी आजची व्यवस्था नाही. व्यवस्था बदलेल तेंव्हा व्युवनीतिही बदलावी लागेल.
हिंस्त्र लांडग्यांच्या झुंडीशी जेंव्हा सामना असतो तेंव्हा त्यांचीच नीति वापरत संघर्ष करावा लागतो. आताची सत्ताधारी जमात या लांडग्यांपेक्षा क्रुर आणि कोल्ह्यांपेक्षा चतुर आहे. नैतीकतेचे बुरखे घेवुन तुम्ही कधीही सत्तेच्या पटलावर आपले नांव कोरू शकत नाही हे कटु वास्तव आहे. हे लोक मुंडे-भुजबळ स्वार्थी नाहीत काय? असा प्रश्न विचारतात. मी म्हणतो त्यांना इतर जाणते राजे आणि त्यांचे अनुयायी काय करतात हे का दिसत नाही? त्यांची सामाजिक क्रुतघ्नता का दिसत नाही? नैतीक असण्याचा ठेका फक्त मुंडे, भुजबळांनीच का घ्यावा?
काही गरज नाही. हरामखोरांना उत्तर तोडीस तोड हरामखोरीनेच द्यावे लागते आणि ते आता दिलेच पाहिजे.
आणि माझ्या मते त्यालाच राजकारण म्हणतात!
नाहीतर रहा गुलाम....

9 comments:

  1. very disappointing. Did not expect this from you.

    ReplyDelete
  2. लेखाचा उद्देश जरी चांगला असला तरी हे थोडेसे "गर्वसे कहो हम हिंदू है" या थाटातले लेखन वाटले. लेखात ओबिसी या शब्दाऐवजी हिंदू हा शब्द वापरला तर हाच लेख सनातन प्रभातमध्ये छापता येऊ शकेल.

    ReplyDelete
  3. हरामखोरांना उत्तर तोडीस तोड हरामखोरीनेच द्यावे लागते........पूर्णपणे सहमत

    ReplyDelete
  4. सहमत
    - अभय

    ReplyDelete
    Replies
    1. हा रिप्लाय वर द्यायचा होता . इथे चुकून दिला गेला
      - अभय

      Delete
  5. sir agree haramkhorana uttar haramkhorinech dyayla pahije . pan chaddi-valyanich el OBC manus PM candidate mhanun dilay. please do reply I m confused here

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...