Saturday, August 4, 2012

असला शिवरायांचा अपमान....कोणी केला नसेल!


आज दै. पुण्यनगरीने वाघ्या पुतळ्याला हटवण्याबाबत संभाजी ब्रिगेडची भुमिका आपल्या अग्रलेखातुन उचलुन धरली आहे तर ब्रिगेडच्या एका पदाधिका-याने आपल्या ब्लोगवर ( http://bhaiyapatil.blogspot.in/) "किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी का काढले ??" या शिर्षकाखाली एक लेख लिहिला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरं आधी तिरक्या अक्षरांत त्यांचा जसाचा तसा मुद्दा आणि खाली माझे उत्तर देत आहे. यामुळे तरी किमान जनतेत अकारण जो भ्रम पसरवला जात आहे तो दुर व्हायला मदर होईल.


"१.शिवरायांच्या समाधी शेजारी बसवण्यात आलेला वाघ्या कुत्रा हा पूर्णपणे काल्पनिक होता.त्याचा कोणताच उल्लेख समकालीन किंवा उत्तरकालीन साधनात नाही.असे शिल्प बसवण्यामागे व होळकरांची कथा प्रसिद्ध करण्यामागे शिवप्रेमी होळकर आणि शिवाजी महाराज यांची बदनामी एवढाच कट होता."

---हे महोदय येथे हे विसरतात कि मग सईबाई, सोयराबाई वा पुतळाबाईच्या स्मारकाचा/समाधीचाही उल्लेख समकालीन किंवा उत्तरकालीन साधनांत नाही. But this is a solid proof of existance of Vaghya in Shivaji Maharaj' life...http://sanjaysonawani.blogspot.in/2011/05/blog-post_9325.html

२. शिवकालीन समकालीन साधने, बखरी,मोघल,इंग्रज,प्रोतुगीज, इत्यादी दस्तावेजामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही..

---या साधनांत वर उत्तर दिल्याप्रमाणेच वाघ्याच्या स्मारकाच्या जागी कोणीही शिवघराण्यातील व्यक्तीचे स्मारक/समाधी असल्याचे उल्लेख नाहीत.

३. हि दंतकथा ,पहिल्यांदा ची.ग.गोगटे यांच्या १९०५ साली प्रसिद्ध केलेल्या "महाराष्ट्र देशातील किल्ले"या पुस्तकात आहे.

------आपण चिं. ग. गोगटेंना ही दंतकथा लिहित असतांना स्वप्न पदले होते असे म्हणत आहात काय? रायगड व परिसरात ही दंतकथा त्याहीपुर्वी अस्तित्वात होतीच. गोगटेंनी ती ऐकली व आपल्या पुस्तकात नमूद केली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. दंतकथा आपोआप बनत नसतात. शिवाजी महाराजांना भवानीने तलवार भेट दिली ही झाली दंतकथा...पण तलवार अस्तित्वात होती हे कसे नाकारता? शिवाय गोटियेने बांधलेल्या शिवमंदिरात हीच भवानी तलवारीची दंतकथा शिल्परुपात साकारलेली आहे. ती तुम्हाला चालते. वाघ्या मात्र निव्वळ दंतकथा हे तुम्हाला ठरवायचा अधिकार कोणी दिला? भवानी देवीने तलवार दिली ही दंतकथा पण तलवार होती हे वास्तव..तसेच वाघ्याने चितेत उडी घेतली ही दंतकथा...पण वाघ्या अस्तित्वात होता हे वास्तव हे समजावून घ्यावे लागते.

४."राजधानी रायगड" (१९२९) या महत्वाच्या अभ्यासपूर्ण पुस्तकात वाघ्याच्या कुत्र्याचा उल्लेख नाही.

---------याच पुस्तकात सईबाई, सोयराबाई वा पुतळाबाईंच्या स्मारक/समाधीचाही उल्लेख येत नाही...त्याचे काय करायचे?

५.शिवसमाधीचा जीर्णोद्धार १९२६ते १९२७ या कालावधी मध्ये पूर्ण झाल्यानंतर ..त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे १९३६ साली वाघ्या कुत्र्याचा पुतळा महाराणी पुतळाबाई यांच्या समाधीवर बसविण्यात आला.

-----बरोबर आहे. याचाच अर्थ असा कि रायगड स्मारक समितीच्या लोकांनी तुकोजीराजांची इच्छा पुर्ण केली. शिवस्मारक पुर्ण झाल्यानंतरच उर्वरित पैशांत वाघ्याचे स्मारक उभारावे अशी त्यांची इच्छा होती. शिल्पकार करमरकर यांना वाघ्याचा पुतळा बनवायला वेळ लागला याचे कारण म्हणजे वाघ्या हा मुळचा मुघोळ ब्रीडचा हाउंड होता. प्रजातीचे साम्य असल्याने करमरकरांनी तसाच दिसणा-या कुत्र्याला  एका गृहस्थांकडे हुडकले व अनेक रेखाटने करुन शेवटी जीवंत वाटेल असा वाघ्या साकारला. वाघ्याला बसवण्यात एवढा वेळ का गेला याचे उत्तर यात आहे.  "वाघ्याला उध्वस्त करणे ही शिल्पकाराची हत्या आहे" अशी प्रतिक्रिया मुंबईतील अनेक शिल्पकारांनी दिली.

६. शिवसमाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर हि रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष न.चि. केळकर(शाहू महाराज यांना स्वराज्यद्रोही म्हणणारे आणि ब्राम्हण ब्राम्हणेतर वादामध्ये ब्राम्हणाचे नेतृत्व करत होते .ज्या वेळेस शाहू महाराज बहुजन समाजाचे नेतृत्व करत होते ) व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मारकासाठी पैसे जमा करण्याचे काम सुरूच ठेवले होते .याच वेळी महाराष्ट्रात ब्राम्हण-ब्राह्मणेतर वाद हि जोरात सुरु होता. शिवरायांच्या विषयी च्या पवित्र कार्यामाध्येही हा वाद डोकावला आणि शिवरायांच्या समाधी शेजारी महाराणी पुतळाबाई यांची समाधी असण्याऱ्या चौथऱ्यावर एका काल्पनिक कुत्राची समाधी उभी राहिली...

----------अशी खुळचट विधाने करणे अयोग्य आहे. खुद्द शिवाजी महाराजांनाच ब्राह्मण-ब्रह्मणेतर वादात गोवण्याचा हा प्रयत्न आहे. काल्पनिक कुत्रा उभा करायला त्या काळात वेळ आणि पैसा वाया घालवायला व शिवाजी महाराजांबद्दल अनास्था व्यक्त करण्याची कोणालाही काहीएक गरज पडलेली नव्हती. जर शाहु महाराजांनाच ब्राह्मनांनी शिवस्मारक उभारायला विरोध असता तर तसा त्यांनी नक्कीच तो नोंदवला असता
, नव्हे ते काम बंद पाडुन स्वत: स्मारकाचे काम पुर्ण केले असते. ते तसे झालेले नाही. याचाच अर्थ असा कि शाहू महाराजांचा ब्राह्मणांनी पुढाकार घेउन, प्रसंगी भीक मागुन, शिवस्मारक उभारायला विरोध नव्हता.

शिवाय वाघ्याच्या स्मारकाजागी पुतळाबाईंची...(तुमचेच इतिहासकार कधी तेथे महाराणी सईबाईंची तर कधी सोयराबाईंची समाधी होती असेही सांगत असतात...नेमके एक तरी नांव घ्या कि...इतिहास अंदाजावर चालवायला कोणा एकाची मालमत्ता नाही याचे भान ठेवावे.) समाधी होती (सतीचे वृंदावन असते...समाधी नव्हे हेही यांना माहित नाही हा भाग अलाहिदा) याबाबत एक अत्री पुरावा यांनी आजतागायत दिला आहे काय?

मी मागेच याच ब्लोगवर लिहिले होते कि या स्मारकाचे तिरका छेद पद्धतीने स्मारकाखालील अवशेष बाहेर काढुन खाली नेमके काय आहे हे शोधुन मग निर्णय घेवूयात. पण त्याबाबत यांचा प्रतिसाद शुण्य होता.

७."वाघ्या"असे नामकरण राम गणेश गडकरी यांच्या "राजसंन्यास"या नाटकातून झाले.याच नाटकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेना बदनाम केले.
त्याच नाटकातील मजकूर त्या पुतळ्याखाली लिहिला,हा तर मोठ्या बदनामीचा कळस झाला ..

----------या गृहस्थांनी मुलात राजसंन्यास वाचलेलेच नाही. यावरही मी लिहिलेले आहे. ते  माझ्या ब्लोगवर
उपलब्ध आहे. http://sanjaysonawani.blogspot.in/2011/06/blog-post_03.html

राहिले संभाजी महाराजांचे, खुद्द केळुस्कर गुरुजींनी लिहिलेल्या आद्य शिवचरित्रातही संभाजी महाराजांबद्दल तेच आक्षेप नोंदवले गेलेले आहेत जे कमल गोखलेंचे साधार चरित्र येईपर्यंत सर्वच कलाकृतींत आलेले आहेत. तत्पुर्वीच्या लेखकांचा द्रुष्टीकोन हा संभाजीराजांना बदनाम करण्याचा होता असे म्हनायचे तर मग केळुस्कर गुरुजींना तोच न्याय लावणार का? गडकरी इतिहासकार नव्हते. ते नाटककार होते. वाघ्याच्या पुतळ्याखालील मजकुरात कोणाचीही कसलीही बदनामी नसून इमानी प्राण्याची स्तुती केलेली आहे.

८. रायगड स्मारक समितीतील मंडळी शिवस्मारकासाठी निधी जमवायला इंदूर येथे होळकर संस्थानिकांकडे गेली होती. शिवरायांच्या स्मारकासाठी पैसे देणे इंग्रजांना आवडणार नाही असे तुकोजीराव होळकर यांची खात्री होती म्हणून त्यांनी समितीच्या सभासदाची गाठ घेण्यास टाळाटाळ केली.कारण सांगितले कि होळकर राणीसाहेबांचे लाडके कुत्रे वारले होते त्यामुळे त्याचे सुतक असल्यामुळे भेट होऊ शकणार नाही.स्मारक समितीची माणसे चिकाटीची आणि चाणाक्ष होती..त्यांनी आपली गरज आणि महाराजांची व्यावहारिक अडचण लक्षात घेऊन त्यांनी अफलातून तोडगा सुचवला. महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा. कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही. इंग्रज अवकृपेची भीती नाही. तोडगा उपयोगी पडला होळकरांनी देणगी दिली. आणि समितीने काल्पनिक कुत्र्याचा पुतळा रायगडवर उभारला अशी आख्यायिका आहे..हि आख्यायिका शिवप्रेमी तुकोजीराव होळकर यांची बदनामी करणारी आहे ..ज्यांनी शिवचरित्र जगभर पोहचवले ,शाहू महाराज यांचे नातेवाईक होते त्यांनी आणि शाहू महाराज यांनी ठरवून २५ धनगर मराठा विवाह घडवून आणले ..

------ही वरील भाकडकथा नक्कीच तुकोजीराजेंची बदनामी करनारी आहे. ही कथा ज्यानेही कोणी लिहिली ती कोणत्या अंमलाखाली ती त्यांची त्यांना ठावूक...पण मग दोष द्यायचा तो ही भाकडकथा निर्माण करना-याला.

तुकोजीराजांनी ५००० हजार रुपयांची आर्थिक मदत शिवस्मारक व वाघ्याच्या स्मारकासाठी दिली हे वास्तव कसे नाकारता येते? मदत केलीच नाही असे म्हणायचे आहे काय?

९. शिवरायांच्या समाधी शेजारी शिवरायांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या महाराणी पुतळाबाई यांची समाधी होती त्यावर काल्पनिक नाटकातील कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला आहे त्यामुळे महाराणी पुतळाबाई यांचा अवमान होत आहे तसेच शिवरायांचाही अवमान होत आहे ..त्यामुळे समस्त शिवप्रेमीचां राग अनावर होत आहे ..

------------पुन्हा सतीची स्मारकशिळा वा वृंदावन असते. समाधी नाही. राणी पुतळाबाई निपुत्रिक असल्याने व शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर काही काळाने सती गेल्या. सती गेलेल्या पुतळाबाईंचे स्मारक कोणाच्याही स्मरणातून जाणे असंभाव्य आहे. सतीस्थान हे अंधश्रद्धाळु लोकांना जास्त प्रिय असते हे वेगळे सांगायची गरज नाही. तेथे नुसते स्मारक नव्हे लोकांनी मंदिर उभारले असते. त्यामुळे १८१८ ला ब्रिटिशांनी रायगड तोफांचा भडिमार करून उद्ध्वस्त केला असला तरी जनमानसातुन सतीचे स्मारक गेले नसते. बरे पुतळाबाईंचा अवमान करायला त्या काही सोयराबाईंसारख्या ख्यातसिद्ध व्यक्ति नव्हत्या. सतीस्मारकाचा अवमान ब्राह्मण सोडा एकही बहुजन करु धजला नसता. त्यामुळे महाराणी (येथे सांगणे भाग आहे कि महाराणीचा सन्मान आधी सईबाई आणि नंतर फक्त सोयराबाईंना मिळाला. अन्य शिवपत्नींना फक्त राण्यांचा दर्जा होता.)

१०. स्वराज्य स्थापन करीत असताना शिवरायांच्या सोबत स्वराज्यासाठी लढलेल्या असंख्य सेनापती,शूरवीर मावळे,स्वराज्याची संकल्पना शिवरायांच्या मनात बिंबवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊआऊसाहेब या पैकी कुणाचीही समाधी तत्कालीन राजधानी रायगडावर नाही परंतु काल्पनिक नाटकावर आधारित वाघ्या कुत्र्याची समाधी कशी काय ??

- जिजाऊसाहेबांची समाधी पाचाड येथे आहे कारण त्यांचे निधन व त्यांच्यावरील अंत्यसंस्कार तेथेच झाले. आपणच धन्य म्हनायचे कि शहाजीराजांचीही समाधी रायगडावर का नाही असा हे प्रश्न विचारत नाहीत.

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते हे शिवप्रेमी आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी पुतळाबाई यांचा होत असलेला अवमान कदापी सहन करू शकत नाही ..याच भावनेतून १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेड चे शिवक्रांतीवीर शिवश्री महेश चव्हाण(सोलापूर) व शिवश्री नितीन रोठे पाटील(नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली असंख्य संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी अनऐतिहासिक वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून टाकले होते. परंतु शासनाने पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी वाघ्या कुत्राचे शिल्प बसविले. त्यामुळे हे सरकार शिवप्रेमी आहे कि श्वानप्रेमी आहे ? असा प्रश्न पडतो...

-----सरकार शिवप्रेमीच आहे जसे आम्हीही आहोत. तुमचेच शिवप्रेम तपासुन पहायला हवे.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी महाराणी पुतळाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होत असलेल्या अवमानाच्या विरोधात, आपल्या अस्मितेसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तमाम शिवप्रेमींना करण्यात येत आहे . समस्त बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामगिरीतून मानसिकदृष्ट्या मुक्त करण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. बहुजन समाजात जाणीवपूर्वक फुट पाडणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत ...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे  —

---------बहुजन समाजात फुट पाडण्याची काम तुम्हीच केले आहे. पश्चाताप करा...बहुजन उदार आहेत. नक्कीच माफ करतील. ब्राह्मणी गुलामगिरीत ब्रिगेड आहे, बहुजन नाहीत. तेंव्हा उगाच कोणाला मुक्त करण्याची भाषा करु नका. आधी आपण मुक्त व्हा. प्रतीकात्मक आंदोलने तोडफोड करत नसतात हे तुम्हाला कोणी शिकवलेले दिसत नाही.

असो. ही झाली वर त्यांचे स्पष्टीकरण आणि त्यावरची माझी थोडक्यात प्रतिक्रिया. इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या नांवाखाली धादांत असत्ये कशी रेटुन सांगितली जातात याचा अंदाज वाचकांना यावा अशी अपेक्षा आहे.

आता वाचकांने कृपया १८८३ साली प्रसिद्ध झालेल्या कोलाबा ग्यझेटीयरला http://raigad.nic.in/DG/1883/appendix_r.html#1 या लिंकवर भेट द्या. यात रायगडाची व त्यावरील बांधकामांची इंग्रजांना उपलब्ध असलेली सर्व माहिती बारकाईने दिली आहे. अगदी सोयराबाईंचा मृत्यु हा आत्महत्येने कसा झाला ते शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्युबाबतही माहिती आहे.

यात कोठेही शिवाजी महाराजांच्या एकाही पत्नीच्या समाधीबाबत उल्लेख नाही. त्यांचाच नाही तर मग बिचा-या एका इमानी कुत्र्याचा कसा असनार? केवळ कोणत्याही ऐतिहासिक लिखित पुराव्याअभावी वाघ्याचे अस्तित्व नाकारायचे तर मग अन्य कोनाच्याही स्मारकाचे कोणते लिखित वा भौतिक पुरावे आहेत?

हे उत्तर देण्याची जबाबदारी कसलेही पुरावे न देता तोडफोड करणा-यांची आहे. उगा शिवप्रेमाचे गळे काढुन कोणी शिवप्रेमी होत नसते.

दुसरे, तसे अवांतर वाटेल, पण महत्वाचे असे, भारतीय घटनेनुसार १९४७ पुर्वीच्या प्रत्येक स्मारकाला घटनात्मक संरक्षण आहे. घटनाकार बाबासाहेबांबद्दल हे लोक खुप जवळीक दाखवायचा प्रयत्न करतात. वाघ्याचे स्मारक हे मुळात १९४७ पुर्वीचे असल्याने त्याला धक्का पोहोचवणे म्हनजेच या सार्वभौम राष्ट्राच्या बाबासाहेबांनी नेतृत्व करत लिहुन घेतलेल्या घटनेचा अवमान...एवतेव बाबासाहेबांचाच अपमान आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. हे काय...सोयीने सर्वांनाच वापरतात आणि भावनिक गळे काढत आपला डाव साधुन घेतात. त्याला कोणी बळी पडु नये.

यांचा तसा आग्रहच असेल तर खालील दोन गोष्टी कराव्यात...

१. वाघ्याच्या स्मारकाखाली छेद-उत्खनन करावे व तेथे मिळणा-या अवशेषांची डीएनए टेस्त करुन घ्यावी व निकाल लावावा. मग जोही काही पुरातत्वीय नि:ष्कर्ष निघेल तो सारे मान्य करतील.

२. ब्राह्मणांनी शिवस्मारक ते वाघ्याचे स्मारक बनवले हाच जर आक्षेप असेल तर शिवस्मारकाची ब्राह्मणांनी बांधलेली मेघडंबरीही हटवावी व त्यांना हवे तसे स्मारक बनवावे. खरी सुरुवात येथुनच होवु शकते.

म्हणजे ब्राह्मणांनी विकृतपणे बांधलेल्या वाघ्याला विरोध आणि मग त्याच, यांच्या मते विकृत असलेल्या, ब्राह्मणांनी पुढाकार घेवून बांधलेल्या शिवस्मारकाला मात्र वेगळा न्याय कसा लावता येईल?

काहीएक संयुक्तिक कारण नसतांना बालिशपणे फालतु उथळ मुद्दे उपस्थित करायचे, सा-या समाजाला वेठीला धरत विद्वेश पसरवायचा आणि वर "आम्ही शिवप्रेमी" असे उद्धटपणे म्हणायचे, असला शिवरायांचा अपमान आजतागायत कोणत्याही धडावर ज्याचे डोके आहे अशा लोकांनी केला नसेल.

84 comments:

  1. एक नंबर...आता बी-ग्रेडींचे थोबाड फुटेल. उद्या त्यांना हवा तसा रायगड उभा करा म्हणावा. तिथे अफजलखान, औरंगाजेब या साऱ्यांची स्मारके उभा करुन शिवाजी महाराजांचे आणि त्यांचे किती सख्य होते, हे त्या स्मारकावर कोरा. शिवप्रभूंची ही भूमी धन्य धन्य होऊन जाईल. याकामासाठी त्यांना टोलवसुलीतील काळा पैसा, बामसेफींना समाजात असंतोष पसरण्यासाठी चीन व पाकिस्तानकडून मिळणारा पैसा कामी येईल. उगाच बामणांनी भिका मागून उभे केलेल्या पैशातून तयार झालेले शिवस्मारक, मेघडंबरी आणि स्वामीनिष्ठेचे प्रतीक असलेला वाघ्याचे स्मारक इत्यादींमुळे महाराजांची नाहीतरी बदनामी चाललेलीच आहे. शिवाजींच्या झेंड्याच्याही रंग हिरवा होता, असे उद्या त्यांचे बिनडोक विचारवंत सांगतील, तेव्हा तोदेखील आताच बदलून टाका म्हणावं. दुसरे असे की, यांचा इतिहास शिवाजी महाराजांपासून सुरु होतो आणि संभाजी महाराजांपाशी येऊन संपतो. आधी व नंतर मराठा सरदारांचे काय कर्तृत्व होते, यावर कोणी बोलायचे नाही. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीमध्ये स्वजातीय सरदारांचेच अधिक अडथळे होते, हे ऐतिहासिक सत्य यांना परवडत नाही म्हणून तेदेखील बोलायचे नाही. एकूणच, तोडायला गेले वाघ्या आणि फुटले स्वतःचे थोबाड अशा केविलवाण्या अवस्थेत सध्या ब्रीगेडी आहेत. शिवधर्म सांगतात आणि शिव्या देणे हाच धर्म असल्यागत वागतात, अशा या पिळावलीचे डीएनए टेस्टींग केले तर सूर्याजी पिसाळांचा वारसा जिवंत असल्याचे सिद्ध होईल, हे नक्की.

    ReplyDelete
    Replies
    1. इथून पुढे कोणीही शिवाजी महाराज,इतर महापुरूष,मराठ्यांसहित इतर बहुजन यांविषयी द्वेष भावनेने गुप्त बैठकीत ठरवून पण जाहीरपणे मात्र संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ,बामसेफ यांना विरोधाचा आव आणून,सत्ताधारी उच्च जातींना विरोध असल्याचे दर्शवत स्वतःचे वैयक्तिक चारित्र्य व लायकी न पाहता समाज परिवर्तन करत असल्याचे भासवत सामाजिक दरी निर्माण करू नये.इतिहास तुमची नोंद अस्तनीतले निखारे म्हणून घेईल.खरे जातीयवादी तुम्ही...

      Delete
  2. म्हणजेच ब्राह्मनांनी शिवस्मारक उभे केले म्हणुन हे उद्या तेही उध्वस्त करायला मागेपुढे पाहणार नाहीत....नाही का?

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. कारण ते ब्राह्मणांनी उभे केले आहे ना! बहुजनांनी उभे केले असते तर गोष्ट वेगळी.

      Delete
    2. ब्राह्मणांनी कुत्र्याचे स्मारक शिवरायाचा अपमान करण्यासाठी उभे केले म्हणून शिव भक्तांचा विरोध आहे. हेच स्मारक जर एखाद्या संजय सोनवणीने उभे केले असते तर ब्रिगेडचे माहित नाही पण आम्ही मात्र त्याला कडाडून विरोधच केला असता.जी अपमानाची प्रतीक ब्राह्मण समाजाने बहुजन समाजावर लादली ती नाकारलीच पाहिजेत. नाहीतर गर्भादान विधी मध्ये ब्राह्मण बहुजन स्त्रीला गर्भ दान करतो याचा अर्थ समजत असूनही विरोध न करणारे बाम्नांच्या औलादी ठरतात. सोनवणी स्वताला अभ्यासक समजतोस ना मुद्देशीर उत्तर दे. फार शिव प्रेमाचा आव अनु नको. खाजगी बैठकीत तुझ्या सोबत बसलो असताना शिवरायां विषयी तुम्ही लोकांनी काय चर्चा केली हे मला पक्के ठाऊक आहे. म्हणजे खाजगीत शिव रायांना नाकारणारे धोरण ठरवायचे आणि वरून ब्रिगेडच्या शिवप्रेमावर संशय घ्यायचा म्हणजे धंदे वाल्या स्त्रीने पतिव्रतेला चारित्र्य शिकविणे होय. गाढवा इतिहास संशोधन हे अंदाजावर चालत नसून ते तर्कावर चालते. अंदाज आणि तर्क यात "दारू पिऊन लिखाण करणे आणि दारू न पिता तटस्थ लिखाण करण्या एवढा फरक आहे." समजल का?

      Delete
    3. संजय सोनवणी फारच धूर्त बुवा तुम्ही.....शिवस्मारकाला नाही,विरोध कुत्र्याच्या वा इतर कोणत्याही अपमानास्पद बाबीला...ब्राम्हण उभारोत की तुमच्यासारखे पाताळयंत्री तथाकथीत बहुजन.....मराठा फोबीया झाला आहे तुम्हाला.....पुण्यात कोठे उपचार होतो माहीत असेलच..येरवडा की काय म्हणतात....

      Delete
  3. kya baat hai sir.

    great.

    ---------
    M.D. Ramteke

    ReplyDelete
    Replies
    1. रामटेके सर संजय सोनावानीच्या मुद्द्याचे खंडण करणारी माझी प्रतिक्रिया वाचा आणि अशाच आनंदाच्या उकळ्या फुटतात का बघा?

      Delete
  4. Yekdum barobar
    pan mi mhanto hyana bhakad kathetil sinh chalto, mag itihasat hoyun gelela vaghya navacha kutra ka chalat nahi?

    Kadachit hi brigedi kutri vaghya navachya kutryavar jalat astil.

    ReplyDelete
  5. आणखी एक गमतीची गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, चरित्र हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात ब्राम्हण लेखकांचे खूप मोठे योगदान होते. अर्थात, त्यांनी लिहिलेल्या सर्वच बाबी सत्य अथवा असत्य असतील असे नव्हे. कारण इतिहासाची कायम चिकित्सा होत असते. मनाला न पटला तरी इतिहास हा स्वीकारावाच लागतो. हिटलरविरोधी इतिहास एकेकाळी त्याचे कट्टर चाहते राहिलेले जर्मन लोक स्वीकारतातच. आपल्या जातीच्या लोकांचा इतिहास इतरांनी लिहिता कामा नये, असा विचित्र पावित्रा घेणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. जर तुम्हाला इतिहास कशाशी खातात हे माहित होते, तर तुम्ही आजवर कोणते भव्य व सर्वमान्य असे लेखनकार्य केले आहे, गड-किल्ले परंपरेचे जतन केले आहे? असा प्रश्न विचारला की ब्रिगेडींची दातखिळ बसते. द्वेष हाच ज्यांच्या विचारांचा पाया असो, त्यांच्या दृष्टीने कर्तृत्वाचे शिखर मूर्त्यांची, पुतळ्यांची तोडफोड हेच असते. त्यामुळे, अशा लोकांना पुरोगामी वगैरे म्हणणे म्हणजे गांडुळांना शेषनागाची उपमा दिल्यासारखे होईल. संभाजी ब्रिगेड व त्यांच्या मायबाप संस्थांनी मराठा व्यतिरिक्त अन्य कोणत्या समाजातील विचारवंतांना खऱ्या अर्थाने आदर दिला आहे, हे त्यांनाच ठाऊक. भगिनीवर्गाविषयी यांच्या मनात कोणती विकृती सदैव वळवळते, ते त्यांनी अगदी पुस्तक लिहून जगाला दाखवून दिले आहे. अशा लोकांची लायकी अगदी राजमाता जिजाउंचे नाव घ्यायची देखील नाही. अशांना अहिल्यादेवींचे महानपण समजण्यासाठी किती जन्म घ्यावे लागतील, कुणास ठाऊक? सरकारी बंगला बळकावून बसलेल्या यांच्या नेत्याविरुद्ध कुणी चकार शब्द काढलेला यांना पटत नाही. याउलट, दिवंगत निळू फुले यांच्याविरुद्ध शक्य तितकी गरळ ओकून यांनी आपले रंग दाखवले होते, हे विसरता येणार नाही. फुले व आंबेडकरांचे नाव घेऊन, बाम्हणांना टारगेट केल्याचा आव आणून प्रत्यक्षात इतरांना निष्प्रभ करायचे व बहुजनांचा कैवार घेऊन सारी समाजसूत्रे हाती घ्यायची, ही यांची अत्यंत नियोजित अशी चाल आहे...कावा आहे. बामणी कावा देखील थक्क होईल, असा हा ब्रिगेडी कावा जनतेच्या लक्षात आला आहे.

    ReplyDelete
  6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठ्यांनी (विशेषतः शिवधर्मी) स्वतःला बहुजन समजणे सोडून द्यावे. त्यांना कुणबी बनून आरक्षण मिळवण्याचे डोहाळे लागल्यानेच ते स्वतःचा समावेश बहुजनांत असल्याचे सांगतात. यांना ओबीसी मध्ये प्रवेश द्यायचा, तर खऱ्या ओबीसींनी काय माशा मारायच्या?
    हा सारा प्रकार, बामसेफी लोकांच्या आराखड्यानुसार सुरु आहे. तू मला सजव, मी तुला सजवतो अशा रीतीने यांच्यात संगनमत असून कुठले ना कुठले कारण सांगत अन्य जातींवर, त्यांच्या प्रतीकांवर टांग वर करीत भुंकण्यात यांना धन्यता वाटते.

    ReplyDelete
  7. वाघ्याच्या स्मारकाच्या ठिकाणी नेमक्या कुण्या राणीची समाधी होती, यावर एकवाक्यता असावी, यासाठी ब्रिगेडने काहीतरी ठरवावी. कधी सांगतात, सईबाई, कधी सोयराबाई तर कधी पुतळाबाई (एका ठिकाणी तर शिवाजी महाराजांची पत्नी किंवा अन्य कुणी जवळच्या व्यक्तीचे स्मारक असण्याची शक्यता असा उल्लेख आहे- http://bramhanettar.blogspot.in/2012/08/blog-post.html काही स्वंयघोषित इतिहासकारांचे असे मत आहे कि ती समाधी शिवरायांच्या महाराणीची नाही वादासाठी हे मान्य करूयात कि ती समाधी शिवरायांच्या महाराणीची नाही पण ती समाधी दुसर्या कुणीतरी शिवरायांच्या जवळील व्यक्तीचीच आहे एवढ तर स्पष्ट आहे) आता या लोकांचा वैचारिक गोंधळच जर इतका असेल तर त्यात वाघ्याचा काय दोष? आता बिचाऱ्याची स्वामीनिष्ठा व पुण्य इतके ती त्याला तोडून दरीत टाकला तरी तो अखंडीत राहिला व पुन्हा दिमाखात धन्याच्या बाजूला बसला. तितकी पुण्याई या तालिबांन्याकडे नसल्याने त्यांचे पुरते हसे झाले आणि आजवर खऱ्या बहुजनांमध्ये कमावलेली थोडीबहुत आब्रूही गेली.

    ReplyDelete
  8. संजय़ सर, एकदम चांगले उत्तर दिले आहे. कधी काळी मी सुद्धा भैय्या पाटलाच्या विचारांचे समर्थन करायचो. पण नंतर नंतर त्याचे विचार पटेनासे झाले. ब्राहमण लोकं तर कधिच रसत्यावर उतरुन आंदोलन करत नाहित व त्यामुळे बहुजन समाज ब्रिगेडींच्याच सोबत राहिला.पण आता असे लक्षात येत आहे की सोयिस्कर रित्या जातीनुसार इतिहास लिहिला जातोय. हे मुळीच पटण्या सारखे नाही.उगाच ब्राहमण विरोध म्हणुन विरोध करायचा ह्याला काही अर्थ नाही.बहुजनांनी ह्या असल्या जाळ्यातुन बाहेर यायलाच पाहिजे.

    ReplyDelete
  9. +आसा ढोंगी मणुस 10 हज़ार वर्षांत झाला नाही +

    संजय सोनवनी यांचा पर्दाफाश करणारा
    लेख लवकरच वाचा माझ्या ब्लॉगवर

    ReplyDelete
    Replies
    1. ...10 हज़ार वर्षांत झाला नाही ?

      kaay bolta raao, aata yacha purava tari aapnaas kade aahe ka ?

      Delete
    2. 10 hajar varshat zala nahi ji Achyarya Atryanchi shaili ahe.. eka bramhanachi shaili vaparal tar tumache nete tumhala valit takatil..

      Delete
  10. बीग्रेडी मराठ्यांच्या मुळे इतर मराठे बदनाम होत आहेत. या बीग्रेडी मराठ्यांच्या मुळे संपूर्ण मराठा समाजाबद्दल ब्राम्हण, खरे ओबीसी आणि आता धनगर समाजात कटू भावना तयार झाली आहे. मराठा समाज आणि महाराष्ट्राच्या भविश्याच्या दृष्टीने हे चांगले नाही. आता मराठा समाजानेच बीग्रेडच्या विरोधात पुढाकार घेवून आंदोलन करायला पाहिजे.

    ReplyDelete
  11. "------आपण चिं. ग. गोगटेंना ही दंतकथा लिहित असतांना स्वप्न पडले होते असे म्हणत आहात काय? रायगड व परिसरात ही दंतकथा त्याहीपुर्वी अस्तित्वात होतीच.गोगटेंनी ती ऐकली व आपल्या पुस्तकात नमूद केली,असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे.दंतकथा आपोआप बनत नसतात.शिवाजी महाराजांना भवानीने तलवार भेट दिली ही झाली दंतकथा...पण तलवार अस्तित्वात होती हे कसे नाकारता? शिवाय गोटियेने बांधलेल्या शिवमंदिरात हीच भवानी तलवारीची दंतकथा शिल्परुपात साकारलेली आहे. ती तुम्हाला चालते.वाघ्या मात्र निव्वळ दंतकथा हे तुम्हाला ठरवायचा अधिकार कोणी दिला? भवानी देवीने तलवार दिली ही दंतकथा पण तलवार होती हे वास्तव..तसेच वाघ्याने चितेत उडी घेतली ही दंतकथा...पण वाघ्या अस्तित्वात होता हे वास्तव हे समजावून घ्यावे लागते."


    अछ्या म्हणजे सोनवणी महाशय तुमच्या म्हणण्यानुसार वाघ्याने शिवरायांच्या चितेत उडी घेतली नाही कारण ती फक्त दंतकथा आहे,पण वाघ्या अस्तित्वात होता हे मात्र खरे आहे. मग सांगा वाघ्या जर अस्तित्वात होता तर त्या वाघ्या संबंधी फक्त चितेत उडी घेतली एवढी एकच दंतकथा कशी काय प्रसूत झाली? शेकडो दंतकथा तयार व्हायला पाहिजे होत्या?भवानी दंतकथा होती आणि तलवार वास्तव होती म्हणून तर ज्या तलवारीच्या जोरावर शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले त्या तलवारीचा समकालीन साधनात जागोजागी उल्लेख सापडतो आणि शिल्पही सापडतात.मग असा एकाही उल्लेख वाघ्याच्या संदर्भात का सापडत नाही(चितेत उडी मारल्याची दंतकथा सोडली तर). मग या वाघ्याला घेऊन महाराज कधी लढाईला गेल्याचे किंवा त्याच्यासाठी स्मारक निधी बाजूला काढून ठेवल्याचे आठवत नाही आणि इतिहासातील एक ओळही वाघ्याबद्दल असे बोलत नाही हो? जो वाघ्या केवळ दंतकथा होता त्याला पुस्तकात यायला "ची.ग.गोगटे आणि राम गणेश गडकरींची" वाट पहावी लागली.त्या पुर्वीचा एकाही कागदोपत्री पुरावा का आढळत नाही.वाघ्याचे मोठेपण ज्या दंत कथेवर अवलंबून आहे तीच कथा तुमाला मान्य नाही मग पुतळा उभा करण्याएवढे वाघ्याचे दुसरे कर्तृत्व तरी कोणते? की शिवाजी महाराज स्वताच्या गड किल्ल्यांची राखण या कुत्र्यावर सोपवून निर्धास्त होते? ऐतिहासीक सत्य नाही तरी किमान एखादी दुसरी दंतकथा तरी सांगा. सोनवणी साहेब तुम्हाला ब्रिगेडला विरोध करायचा तर खुशाल करा पण त्यासाठी शिवरायांचा अपमान कशासाठी?

    ReplyDelete
    Replies
    1. http://sanjaysonawani.blogspot.in/2011/05/blog-post_9325.html


      jara he neet vacha....uga gale phadu naka. Thanks.

      Delete
    2. काय संजय सोनवणी महाशय ब्रिगेड वाल्यांनी पुतळा काढल्याची बातमी ऐकून घाबरगुंडी उडाली होती आणि ब्रिगेड वाल्यांच्या ध्यानीमनी नसताना यांचे पुढचे टार्गेट मीच आहे असे समजून तुम्ही पार अंत्य यात्रेची तयारी केली होती. पण ऐतिहासिक सत्य मांडले की गळे फाडू नका? सोनवणी ही असली भाषा ब्रिगेडवाल्यान्सोबत मी ऐतिहासिक सत्य मांडलेय, पुरावे दे.

      (संजय सोनवणीने ब्रिगेड वाल्यांचा किती धसका घेतला होता हे समजून घेण्य साठी वाचा संजय सोनवनीचे *** फाटलेले मनोगत त्याच्याच शब्दात खालील प्रमाणे.


      ही वेळ आपण सर्वांना गुडबाय करण्याची आहे.

      मित्रांनो....बहुदा ही वेळ आपण सर्वांना गुडबाय करण्याची आहे. मी गेली दोन वर्ष वाघ्याच्या स्मारकाबाबत लिहिले...तो एवढा काळ तरी सुरक्षीत राहिला. आताच ज्या बातम्या मी पाहिल्या त्यानुसार तो उध्वस्त केला गेला आहे. आता पुढचे टार्गेट मीच असणार याबाबत शंका असण्याचे मला काही एक कारण दिसत नाही. मी भयभीत नाही. मला जीवाची पर्वा नाही. असती तर असले पंगे मी घेतलेच नसते. या देशात कायदे हे सत्ताधारी जातींच्याच हातात होते व आहेत. ते म्न्हनतील ते कायदे. अशा स्थितीत मी आहे तरी कोण? वाघ्या हटवला...पोलीस बंदोबस्त असुन हटवला...मग त्या हटवण्याला सातत्याने विरोध करणारा हा यश्किश्चित सोनवणी कोण? मलाही हे हटवनार याबद्दल मला कसलीही शंका उरलेली नाही. जे एका स्मारकाचे रक्षण करु शकले नाही ते माझे करतील यावर तर विश्वास नाहीच, आणि मला ती अपेक्षाही नाही. पण मला एक सांगायचे आहे...वाघ्याचे स्मारक हटवुन जी झुंडशाहीची प्रवृत्ती दृष्ठीअल्याड आली आहे ती महाराष्ट्राचाच बळी घेवून थांबनार यात शंका नाही. यात माझा बळी गेला तर त्यात काय आश्चर्य?

      मी कोठे जाणार? याच मतीत जन्माला आलो त्याच मातीत मिळनार...पंण ही माती द्वेषाने ओतप्रोत ओथंबलेली आहे. मेहरबानी करा...मला या मातीत गाडु नका...कि येथे जआळुही नका...समुद्रात फेकुन द्या...

      किमान जलचरांचे पोट तरी भरेल...)

      Delete
    3. "मी भयभीत नाही. मला जीवाची पर्वा नाही. असती तर असले पंगे मी घेतलेच नसते. या देशात कायदे हे सत्ताधारी जातींच्याच हातात होते व आहेत. ते म्न्हनतील ते कायदे. अशा स्थितीत मी आहे तरी कोण? वाघ्या हटवला...पोलीस बंदोबस्त असुन हटवला..."

      Are khote nav ghevun vavaranarya PavaTyaa tulaa he neet vaachataa aale naahee kaay? Pan amhee kon ahot he ata taree tula samajale kaay?

      Delete
    4. लहानपणी एक प्रकार मी बघितला होता.बस स्थानकावरून एस.टी.निघाली किंवा स्थानकावर येत असेल तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डुकरांच्या झुंडी अशा काही जोरात पळायच्या की विचारूच नका. ही जिवाच्या आकांताने पळायची. पण म्हणून याचा अर्थ कुणी शासनाने डुकरांना पळवून लावण्यासाठी एस.टी.महामंडळ काढले असे म्हणावे काय? हा त्या घाबरत डुकरांना असे वाटत असेल तर मात्र आमचा नाईलाज आहे.

      भाऊ तुमच्या तारणहाराला सांगा ना माझ्या मुद्द्याचे खंडण करायला?
      नावात काय आहे? अस कुणी म्हटले होते रे?

      Delete
  12. ".....यांचा तसा आग्रहच असेल तर खालील दोन गोष्टी कराव्यात...

    १. वाघ्याच्या स्मारकाखाली छेद-उत्खनन करावे व तेथे मिळणा-या अवशेषांची डीएनए टेस्त करुन घ्यावी व निकाल लावावा.मग जोही काही पुरातत्वीय नि:ष्कर्ष निघेल तो सारे मान्य करतील.

    २. ब्राह्मणांनी शिवस्मारक ते वाघ्याचे स्मारक बनवले हाच जर आक्षेप असेल तर शिवस्मारकाची ब्राह्मणांनी बांधलेली मेघडंबरीही हटवावी व त्यांना हवे तसे स्मारक बनवावे. खरी सुरुवात येथुनच होवु शकते."


    संभाजी ब्रिगेडने आत्मपरीक्षण करावे असा लेख मी ब्रिगेडला कानपिचक्या देण्यासाठी लिहीत असतना मधेच संजय सोनवनीवर का घसरलो हे समजून घेण्यासाठी सोनवनीचे वाघ्या संदर्भातील दोन तोडगे लक्षपूर्वक वाचावेत म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला विचारवंत किती घातक असतो हे लक्षात येईल. हरी नरके यांच्या बुद्धीमत्तेबद्दल संशय घेण्याचे कारण नाही.मधुकर रामटेके स्वताला बाबासाहेबांचा प्रामाणिक, कट्टर कार्यकर्ता मानतो.विचारवंताचा आव आणत नाही. पण हे सोनवणी महाशय असा काही आव आणतात की त्याचे नक्कीच "ओल्ड मोन्क्च्या" नशेत झाले असावे याची खात्री पटते. आता या तताकथीत विचारवन्ताच्या त्याने सांगितलेल्या दोन मुद्द्यांचा परामर्श घेऊया.

    १)"वाघ्याच्या स्मारकाखाली छेद-उत्खनन करावे व तेथे मिळणा-या अवशेषांची डीएनए टेस्त करुन घ्यावी व निकाल लावावा.मग जोही काही पुरातत्वीय नि:ष्कर्ष निघेल तो सारे मान्य करतील." समजा ती समाधी वाघ्याची आहे असे गृहीत धरले आणि तिथे वाघ्याचे अवशेष सापडले सुधा. मग त्याची डीएनए काय सोनवणीच्या डीएनए शी तपासून पहावी काय? बर तसे करायलाही हरकत नाही पण संजय सोनवणींनी अजून आपण वाघ्याचे वंशज आहोत असे काही जाहीरही केलेले नाही.मग ही टेस्ट कशी करायची हो साहेब?

    अत्यंत महत्वाचा मुद्दा हीच मागणी या नालायका माणसाने "दादोजीचा पुतळा काढताना केली नाही.अन्यथा जेम्स लेन पेक्षा भयंकर अनर्थ या महामुर्खाने केला असता आणि शिवरायांच्या अवशेषांच्या डीएनए टेस्ट ची मागणी केली असती."


    २."ब्राह्मणांनी शिवस्मारक ते वाघ्याचे स्मारक बनवले हाच जर आक्षेप असेल तर शिवस्मारकाची ब्राह्मणांनी बांधलेली मेघडंबरीही हटवावी व त्यांना हवे तसे स्मारक बनवावे. खरी सुरुवात येथुनच होवु शकते." या त्याच्या विधानावरून तर हा सोनवणी पक्का नालायक आहे हे सिद्ध होते.अरे गाढवा ब्रीगेडवाल्यांचा कुत्र्याला विरोध का आहे याचे कारण म्हणजे "कुत्र्याचे स्मारक ब्राह्मणांनी उभारले म्हणून नाही तर त्या स्मारकामुळे शिवरायांची बदनामी होते कारण शिवरायांच्या समाधीपेक्षा हे स्मारक उंचावर आहे. हे विरोधाचे खरे कारण आहे. परंतु तिथे होळकरांचा संबंध जोडून सोनवणी धनगर समाजाची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत आहे.सोनवणी मेघडबरीमुळे शिवरायांची बदनामी होत नाही.पण कुत्र्यामुळे शिवरायांसारख्या युगपुरुषाची मात्र बदनामी होते. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट गणपतीचे वाहन उंदीर आहे परंतु ते गणपतीच्या पायाशी असते गणपतीपेक्षा उंचावर नसते. ज्या महादेवाशी या सोनावानीच्या निष्ठा वाहिलेल्या आहेत तो महादेवाचा नंदीही मंदिराच्या बाहेर असतो. मग एका दंतकथेतील कुत्र्याचे स्मारक शिव्समाधीपेक्षा उंच कसे काय?"

    ReplyDelete
  13. आपण ब्रीगेडवाल्यांना विरोध करण्याच्या नादात ब्राह्मण समाजाचे समर्थन करत आहात. मराठ्यांनाच भटांची गुलामगिरी करावी लागत असेल तर त्यांनी स्वतः ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा सल्ला देत आहात.मग तुम्ही जर ब्राह्मणांचे गुलाम नाही तर मग "गोपाल चांदोरकर याने त्याच्या पुस्तकात सांगितलेली होळकर आणि ५००० रुपयांच्या मदतीची कथा स्वीकार करा ना? वाघ्या दंतकथा आहे पण चांदोरकरने मात्र स्मारक समितीच्या लोकांचा अभ्यास करूनच होळकरांच्या वाघ्याच्या मदती संबंधी लिहिले.दंतकथेतील वाघ्या जर तुम्ही स्वीकारता मग ऐतिहासिक संदर्भानुसार होळकर इंग्रजांना घाबरत होते म्हणून त्यांनी शिवस्मारकाला मदत न करता एका कुत्र्याच्या स्मारकाला मदत केली हे वास्तव पण स्वीकाराना सोनवणी?" होळकरांचा अपमान झाला की -----ही वरील भाकडकथा नक्कीच तुकोजीराजेंची बदनामी करनारी आहे. ही कथा ज्यानेही कोणी लिहिली ती कोणत्या अंमलाखाली ती त्यांची त्यांना ठावूक...पण मग दोष द्यायचा तो ही भाकडकथा निर्माण करना-याला." असे लिहायचे आणि शिवरायांचा अपमान करण्यासाठी वाघ्याची दंतकथाही चालते? असा दुटप्पी पना का सोनवणी साहेब? होळकरांची बदनामी करणाऱ्या ऐतिहासिक सत्याला तुम्ही भाकडकथा म्हणून ती निर्माण करणाऱ्याला दोष देता मग शिवरायांचा अपमान करण्यासाठी वाघ्याची भाकडकथा निर्माण करनार्याला संभाजी ब्रिगेडने दोष दिला की ब्रिगेड जातीयवादी?

    धनगरांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नका सोनावणे साहेब कारण बहुजन समाज ब्रिगेड वाल्यांना माफ करण्याएवढे उदार जरूर आहेत पण तुमच्या सारख्या समाज कंटकांना धनगरांसाहित येणारा बहुजन समाज कधीच माफ करणार नाही.

    ReplyDelete
  14. ---हे महोदय येथे हे विसरतात कि मग सईबाई, सोयराबाई वा पुतळाबाईच्या स्मारकाचा/समाधीचाही उल्लेख समकालीन किंवा उत्तरकालीन साधनांत नाही.
    ---या साधनांत वर उत्तर दिल्याप्रमाणेच वाघ्याच्या स्मारकाच्या जागी कोणीही शिवघराण्यातील व्यक्तीचे स्मारक/समाधी असल्याचे उल्लेख नाहीत.
    ४."राजधानी रायगड" (१९२९) या महत्वाच्या अभ्यासपूर्ण पुस्तकात वाघ्याच्या कुत्र्याचा उल्लेख नाही.
    ---------याच पुस्तकात सईबाई,सोयराबाई वा पुतळाबाईंच्या स्मारक/समाधीचाही उल्लेख येत नाही...त्याचे काय करायचे?


    आता वाचकांने कृपया १८८३ साली प्रसिद्ध झालेल्या कोलाबा ग्यझेटीयरला http://raigad.nic.in/DG/1883/appendix_r.html#1 या लिंकवर भेट द्या. यात रायगडाची व त्यावरील बांधकामांची इंग्रजांना उपलब्ध असलेली सर्व माहिती बारकाईने दिली आहे.अगदी सोयराबाईंचा मृत्यु हा आत्महत्येने कसा झाला ते शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्युबाबतही माहिती आहे.

    यात कोठेही शिवाजी महाराजांच्या एकाही पत्नीच्या समाधीबाबत उल्लेख नाही. त्यांचाच नाही तर मग बिचा-या एका इमानी कुत्र्याचा कसा असनार? केवळ कोणत्याही ऐतिहासिक लिखित पुराव्याअभावी वाघ्याचे अस्तित्व नाकारायचे तर मग अन्य कोनाच्याही स्मारकाचे कोणते लिखित वा भौतिक पुरावे आहेत?


    एक टुकार ब्लॉग वाचून संजय सोनवणीने परस्पर विरोधी वक्त्यव्य केलेली आहेत हे माझ्या सर्व प्रतिक्रिया वाचून लक्षात आलेच असेल. त्याच प्रमाणे येथे सुधा सोनवणी परस्पर विरोधी वक्त्यव्य करत आहे कसे ते पहा. सोनवणी म्हणतो ब्रीगेडवाले ज्या पुस्तकात वाघ्याचा उल्लेख नाही म्हणून सांगत आहेत त्याच पुस्तकात सईबाई, सोयराबाई किंवा पुतळाबाई यांचाही उल्लेख नाही. म्हणून वाघ्याच्या जागी शिवाजी राजांच्या बायकोची किंवा बायकांची समाधी सोनावणी नाकारतो. वादासाठी मान्य करू की ब्रीगेदडनेच दिलेल्या संदर्भांवरून सईबाई, सोयराबाई किंवा पुतळाबाई यांची समाधी तिथे नाही कारण त्या संदर्भ साधनात त्यांचा उल्लेखच नाही. आता केवळ वरील संदर्भ साधनात शिवरायांच्या महाराण्यंचा उल्लेख नाही म्हणून तिथे त्यांची समाधी असू शकत नाही तर याच संदर्भ साधनात आणि स्वतः सोनवणीने मान्य केलेल्या "१८८३ साली प्रसिद्ध झालेल्या कोलाबा ग्यझेटीयर" मध्ये सुधा वाघ्याचाही नामनिर्देश नाही.मग त्याचे शिल्प रायगडावर कसे? याचे उतर हा सोनवणी देईल काय? इतिहास हा अंदाजावर लिहीत नसतात तर तो उपलब्ध पुरावे समोर ठेऊन तर्कावर लिहीत असतात.

    मग जगातल्या ज्या ज्या लोकांना असे वाटते की आपल्याला मेंदू नावाचा अवयव आहे आणि आपण थोडा तरी तर्क लाऊ शकतो त्या त्या लोकांना माझा सवाल आहे की "रायगडावर शिवरांयाच्या बायकोची /बायकांची समाधी असणे जास्त संयुक्तिक आहे की कुत्र्याची? उपरोक्त संदर्भ साधनात शिवरांयाच्या बायकोच्या समाधीचा जरी उल्लेख नसला तरी त्या शिवरायांच्या बायका होत्या हे तरी साऱ्या जगाला मान्य आहे ना? बर त्यांचे बरेचसे आयुष्यही रायगडावरच व्यतीत झालेले आहे.मग संदर्भ हीन वाघ्या काढून त्यांची समाधी उभी केली तर बिघडले कुठे?"

    सोनवनिनेच पुरावा म्हणून सदर केलेल्या कुलाबा ग्याझेटियरमध्ये "अगदी सोयराबाईंचा मृत्यु हा आत्महत्येने कसा झाला" याचा उल्लेख असेल आणि वाघ्याचा उल्लेखही नसेल तर समाधी कुणाची असावी?
    हे आहे यांचे शिवप्रेम. आपणच पुढे केलेल्या संदर्भ ग्रंथात वाघ्याचा उल्लेख नसतानाही वाघ्यासाठी अट्टहास धरणे यामागे "धनगरांना हाताशी धरून मराठ्यांना टार्गेट कण्याचा हेतू आहे.हे आता लपून राहिलेले नाही."

    ReplyDelete
    Replies
    1. डीएनए टेस्ट करा तुमच्या नेत्यांची आणि औरंगाजेब....औरंगाजेबाचे सारे हिंसक गुण ब्रिगेडच्या बापाशी शंभर टक्के जुळली तर आश्चर्य वाटायला नको. म्हणून तर तुम्हाला संभाजीनगर नाव झेपत नाही, उच्चारायलाही परवडत नाही.

      Delete
    2. खरच खेत्रेकर , कोकाटे , गायकवाड , भागू पाटील , याची व अफजल,श्स्य्ता खान , ओरन्ग्या , याची डीनए टेस्ट करावी,कोकाटे तर शास्ता खानच्या वेळेचा कोणतरी कोकात्या नावाचा सरदार होता त्याचा वान्साज आहे हे जनतेला पक्के माहित आहे.बाकी वर्मा पुराव्या पेक्षा सोनिवणी सर वर गरळ ओकतो आहे,

      Delete
  15. संजय सर, सरंजामी मानसिकतेच्या जडणघडणीतून व बहुसंक्यांक असल्याचा राजसत्तेतील फायद्याचा माज.... यामुळे हम करेसो कायदा ही हिटलरी वृत्ती... पराकोटीचा जातीवाद - अगदी नाझीवादाच्या जवळ जाणारा... ब्राह्मणी संघाची ही मराठा आवृत्ती... आणि सगळ्या बाबतीतला ह्यांचा सांस्कृतिक दहशतवाद... या विरोधात आपण उघड भूमिका घेण्याचे धारिष्ट्य दाखवलेत... खऱ्या बहुजन जनतेकडून सलाम... आपल्या लढ्यात आमचा सक्रीय सहभाग असेल.....

    ReplyDelete
    Replies
    1. संजय सोनवणी जर "सरंजामी मानसिकतेच्या जडणघडणीतून व बहुसंक्यांक असल्याचा राजसत्तेतील फायद्याचा माज.... यामुळे हम करेसो कायदा ही हिटलरी वृत्ती... पराकोटीचा जातीवाद - अगदी नाझीवादाच्या जवळ जाणारा... ब्राह्मणी संघाची ही मराठा आवृत्ती... आणि सगळ्या बाबतीतला ह्यांचा सांस्कृतिक दहशतवाद... या विरोधात उघड भूमिका घेणारा असेल" तर आमचाही त्यांना सलाम सांगा.परंतु ब्राह्मणी संघाची ही मराठा आवृत्तीच्या नावाखाली शिवरायांना अपमानित करण्यात येत असेल तर मात्र आमचा सोनावानिलाच काय मराठ्यांनाही विरोधच असेल.

      Delete
    2. राजन दांडेकर,हाच तुम्ही म्हणत असलेला------ हम करेसो कायदा ही हिटलरी वृत्ती... पराकोटीचा जातीवाद - अगदी नाझीवादाच्या जवळ जाणारा... ब्राह्मणी संघाची ही मराठा आवृत्ती... आणि सगळ्या बाबतीतला ह्यांचा सांस्कृतिक दहशतवाद...इ.इत्यादी इतर जातीय आवृत्ती बनविण्याचे परिवर्तनवादी कार्य संजय सोनवणी महाशय करत आहेत,हे आपल्या ध्यानात येत नाही,माहीत नाही की सोयीस्कर दुर्लक्ष ?

      Delete
    3. नांवाने लिही की रे .घाबरतोस का ?

      Delete
  16. भाग -1

    ब्रिगेड मधील एक हुशार असलेले यांसी,

    आपण सतत पुरोगामी, विज्ञानवादी, खरापना, सत्य इतिहास असे सतत घोकत असता, पण तुम्हीं ( मराठा रियासत फोटो ठेवणारे यांस... ) मात्र सिहांचे चित्र ठेवून, संभाजी महाराजांची बदनामी केली आहे, आपणास हे कसे समजले नाही ? आणि कळस म्हणजे त्या चित्रात खाली लिहले आहे ‘’वाघाच्या जबड्यात हात घालुनी..... ( सिंह व वाघ फरक आपणास कळतो का ? ज्याला आपण वाघ म्हणतात, मुळात तो सिंह आहे, पण असे जबड्यात कोणी हात घालतो का ? संभाजी महाराज व सिंहाचे शिल्प Google Image Search करा दिसेल. बेडया तोडताना महाराज यांचे चित्र , सिंहासोबत झुंज करताना महाराज या चित्रा’बद्दल आपले मत काय आहे ?

    तसेच भवानी माता प्रकटली आणि छत्रपति शिवाजी महाराज यांस तलवार भेट दिली. आम्हीं व आपण असे ऐकत आलेले आहे, याबद्दल आपले मत काय आहे ?

    ‘छावा’ हा शब्द आपणास कसा वाटतो ?

    ReplyDelete
    Replies
    1. "ब्रिगेड मधील एक हुशार असलेले यांसी," हा हा हा मी ब्रिगेडचा आहे हा भ्रम असला तरी मला हुशार समजलात या बद्दल आपले आभार. ही हुशारीच तर सोनावणे ला बाहेर येऊ देत नसेल काय?

      Delete
  17. भाग - 2

    कुत्रा एक पाळीव पशु म्हणून, एक इमानी म्हणून, पहारा देणारा व सरंक्षन करणारा म्हणून जगभरात ओळखले जाते. हजारो वर्षापासून पाळीव कुत्रा व मनुष्याचे संबंध आहे. फार पूर्वीपासून, पुर्विचे राजे – महाराजे ते आताचे नामधारी ( संपूर्ण जगभरातील ) राजे महाराजे, बड़े व्यक्ति कुत्रा’च पाळत आले आहे. Google Search करावे.

    छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इमानी कुत्रा Google Search ( मुधोल हौंड ) पहावे . जगभरातील व भारत भरातिल राजे महाराजे व त्यांचा पाळीव, इमानी कुत्रा’बाबत Google Search करावे. खुप काही कळेल.

    आता प्रश्न रहिला आहे की ज्याला आपण ‘विदेशी’ व श्यागी कुत्रा बोलतात त्याबद्दल असे आहे की, पुतळा हा पुतळा असतो, तो जसाच्या तसा कधीच नसतो, राजे महाराजे व बढे व्यक्ति हे असेच विदेशी कुत्रा व अरबी घोड़े पाळत आले आहे ( Google Search करावे.). आता तो विदेशी आहे वा अरबी आहे, म्हणून त्यावर एवढी मोठा चर्चा करने गरजेचे नाही. कारण ज्यावेळी हा वाघ्या कुत्रा पुतळा बांधण्यात आले, त्या काळात भारतात असे विदेशी कुत्रे बड़े लोक पाळत असत. याचा प्रभाव वाघ्या कुत्रा पुतळा उभारता वेळी पडला असेल, हे नाकरता येत नाही. जगभरातिल कबरीवर असे कुत्रा व मांजर पाळीव पशु’चे शिल्प आहेत. Google Search करावे. एक पहारा देणारा , इमानी , मानव सोबती म्हणून असे जगभरातिल कबरीवर पूतळे बांधले आहेत, आणि ते ही अभिमानाने. Google Search करावे.

    वाघ्या हा कुत्रा आहे, आणि आपण तो कुत्रा एका दुसर्या ‘अपमान अर्थाने’ घेतला आहे. चुकी तुमची आहे. वाघ्या कुत्रा जागी जर घोडा , सिंह वा वाघ’चे शिल्प असते तर कदाचित आपणास काय वाटले नसते ( भले तो काल्पनिक असो ). जगात सर्वात जास्त पाळीव पशु भारतात आहे, हे आपणास माहिती तरी आहे का ? Google Search करावे.

    आज जगभर राजे महाराजे व सर्व महापुरशांचे जे पुतळे बांधले आहेत. त्यांचा चेहरा खरोखर राजे महाराजे व महापुरशांच्या चेहरा प्रमाने होते व आहेत का ? खरा चेहरा कोणी पहिला आहे का ? पुरावा आहे का ? अगदी खरा. ( कारण आपणास सर्व काही खरा व सत्य चालते, तसे आपण सतत घोकुन दाखवता म्हणून.) आणि जर तसे खरे नसल्यास असे आजवर असलेले पूतळे असल्याबादल आपले मत काय ?

    ReplyDelete
    Replies
    1. गुगल सर्च करून पाळीव प्राण्या विषयी माहिती मिळते भावा शिवरायांच्या इतिहासा विषयी नाही. गुगल सर्च तुम्ही करा आम्ही इतिहासाची साधने धुंडाळतो. तुमच्या तारणहार संजय सोनवणी कोणत्या बिळात लपून बसलाय रे भावा?

      Delete
    2. shivalik verma

      " गुगल सर्च करून पाळीव प्राण्या विषयी माहिती मिळते भावा शिवरायांच्या इतिहासा विषयी नाही. "

      आपण काय बोलत आहात, याचे भान तरी आपणास आहे का ?

      Delete
  18. भाग - 3

    मुळात ताटाखालचे मांजर तुम्हांस हवे आहे.

    का नाही तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला ? शिवधर्म’च का ? सार्वजनिक सत्यधर्म’बद्दल का बोलत नाही आपण ?

    कसले बहूजन आहात आपण ? पवार’बद्दल , राष्ट्रवादी’बद्दल काही नाही बोलायाचे. ‘मनी’वादबद्दल काही नाही बोलायाचे. उलट आरक्षणाला विरोध करणारे शालिनीताई पाटील यांना पुरस्कार द्यायचे. BJP मधील रेखाताई खेडेकर आमदार झाले होते, त्याबद्दल काही नाही बोलायाचे. ज्या लोकांस आरक्षणास आहे, त्या लोकांना व आरक्षनास विरोध एकीकडे करायाचे व दूसरीकडे आम्हांस आरक्षण असले पाहिजे, असे बोलायाचे. डबल ढोलकी आहात आपण.

    बाळ ठाकरे’कडे स्वताहून पवार जातात, त्याबद्दल काही नाही बोलायाचे. पण जानकर - भुजबळ – मुंडे जवळ आले की मात्र आपले पोट दुःखते. आठवले, जानकर, भुजबळ, मुंडे यांना बदनाम करण्यासाठी खुप काही खोटे व काल्पनिक ही बोलायाचे पण घरानेशाही राबविनारे , मराठा सकट संपूर्ण बहूजन समाजाला फसविनारे, कालपर्यंत शाहू महाराज यांचे नाव ही घेण्यास लाज वाटत होते, अशा पवार बद्दल व राष्ट्रवादी बद्दल मात्र आपण चुपचाप.

    @ shivalik verma, आपले शिवप्रेमी होळकर विषयी आपले मत काय आहे ? हे समजून आले. काही एक अभ्यास नाही. कालच अंड्यातुन बाहेर पडले असे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. मला ब्रिगेडवाल्यांशी काही घेणे देणे नाही. सत्य शोधक धर्म किंवा बौद्ध धम्म किती धन्गरांनी किंवा सोनवनीच्या बापजाद्यांनी स्वीकारलाय याची माहिती दे. की आता नरके-देवरे-सोनवणी माळी, धनगरांना घेऊन बौद्ध दीक्षा घेणार आहेत.

      दुसरी गोष्ट जर मी कालच जरी अंड्यातून बाहेर पडलो असलो तरी माझे लिखाण पाहून तुमचा मानलेला बाप सोनवनी कोणत्या बिळात लपून बसला वाघ्याला ठाऊक?

      Delete
  19. भाग - 4

    महादेवजी जानकर कोण आहेत असे विचारले आहेत ? त्यांच्यासाठी......

    महादेवजी जानकर व R.S.P कार्यकर्ते आक्रमक झाले आणि जानकर यांनी शासनाला इशारा दिले, लगेच कमी वेळातच वाघ्या पुतळा शासनाने पुन्हा उभारले ( भरपूर पाउस , धुके असताना संपूर्ण शासन, पोलिस यंत्रणा कामाला लागले ). आता जानकर काय आहे, हे समजलेच असेल. ( सरकार मध्ये आपले / राष्ट्रवादी लोक आहेत, आता हा पुतळा पुन्हा बसविल्याबद्दल सरकारबद्दल अर्थात राष्ट्रवादीबद्दल एक शब्द ही आपण बोलत नाही. खरेच कमाल आहे. )

    R.S.P’चा पहिला निवडून आलेला उमेदवार बीडमधून ( येल्डा ) आलेला हा मराठा होता. त्यानंतर R.S.P’चा नीवडून आलेला आमदार ही मराठा ( लातूर ) आहे. आमदारांस विचारावे की, जानकर साहेब चीज क्या है ? ( मराठा रियासत आपण खोटे, काल्पनिक कथा सांगू नये. फोड़ा फोडी’चे राजकारण पवार कडून आपण खुप चांगले शिकलेले आहात. पण आम्हांस असे काल्पनिक कथा सांगू नये ).

    आज R.S.P मध्ये अनेक समाजाची , प्रातांची , धर्माची लोक आहेत आणि तुमचे हेच दुखने आहे.

    O.B.C आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला लोकसंख्येप्रमाने आरक्षण असले पाहिजे, असे प्रथम भुमिका महादेव जानकर यांनी घेतली होती. ( दै. लोकनायक, मुंबई मध्ये तसे लेख ही आले होते, पुरषोत्तम खेडेकर यांचे ही लेख त्यात आले होते . याबद्दल मात्र कोणी ही काही ही बोलत नाही. यास काय म्हणावे ?)

    पवार ही बारामतीहुन माढा येथे आले, कारण त्यांना जानकर कळले होते / समजले होते. पण आपणास समजनार नाही ( मुळात समजले आहे , पण आपण वळणार नाही. कारण एका काल्पनिक व छोट्या जगात राहण्याची आपल्यालाच सवय झाली आहे. )

    स्व. कांशीराम ते स्व. वि.पी सिंग सोबत जानकर यांचे चळवळी’चे सबंध होते. आपलेच अनेक जेष्ठ नेत्यांना विचारवा की जानकर चीझ क्या है ? मागे मा. मा . देशमुख कटगुण येथे म्हणाले होते की, RSP ‘स व महादेवजी जानकर विचारल्याशिवाय / मदतिशिवय भविष्यात महाराष्ट्रात राजकारण करता येणार नाही. ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांस विचारावे की जानकर चीझ क्या है ? आपल्या जवळचे , अनेक ज्येष्ठ, बढे लोक जानकर यांना मानतात. (उलट आपण राष्ट्रवादी’ला साथ देत आपलेच लोक शिवराज्य पक्षास मारत आहे. याला काय बोलावे ? ) एक पाय तिथे व एक पाय इथे असे तुमचेच वागने आहे.

    शेवटी आपण,

    मराठा समाजाला, बहूजन समाजाला , महापुरुषांना आपण बदनाम करने सोडून द्या.

    आणि स्वताचे हसे करू नका.

    जय शिवमल्हार !

    ReplyDelete
    Replies
    1. महादेव जानकर यांनी सत्याला पाठींबा द्यावा मी त्यांच्या पक्षाचा प्रचारक म्हणून काम पाहायला तयार आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदही स्वीकारले तर मला याचा आनंदच आहे. अट फक्त एकच शिवरायांच्या आमच्या अस्मितेविषयी तडजोड नको.माझा जय मल्हार सांगा जानकर साहेबांना

      Delete
    2. वा..वा...म्हणजेच यांनाच फक्त अस्मिता आणि इतिहास आहे. तुम्हाला शिवरायांच्या अस्मितेची इतकीच काळजी होती, तर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल्याच्या थडग्यापाशी जाऊन का केकटत नाहीत. तिथे शेपटी का घालता?
      दुसरे, जानकर साहेबांना आता तुमचा छुपा अजेंडा कधीच समजलेला आहे. वाघ्या हे फक्त निमित्त आहे. तुम्हाला वाघ्या जिथे सहन होत नाही, तिथे जानकर साहेब मुख्यमंत्रीपदी येणं कसे सहन होणार. प्रत्यक्षात तुम्हाला मराठाच सर्वश्रेष्ठ हे खऱ्या बहुजनांच्या तोंडून वदवून घ्यायचे आहे. त्यासाठी काही दिवस त्यांच्यात मिसळण्यासारखे करणे, हाच तुमचा खरा कावा आहे, हे त्रिवार सत्य आहे. तुमच्या ताटाखालचं मांजर होण्यास आता बहुजन तयार नाहीत, हीच तुमची मळमळ आहे व अगतिकताही आहे.

      Delete
    3. तुम्हाला अफझलखानाचे थडगे सहन होत नसेल तर तुम्ही का केकाटत नाही? तुम्ही तरी शेपटी कशाला घातली आहे? प्रत्येक वेळी स्वत: पडद्याआड लपून दुसऱ्यांना लढवण्याचे धंदे बंद करा.

      Delete
  20. धन्यवाद शिवालिक वर्मा साहेब, संजय सोनवणी या व्यक्ती ची पोल खोल केल्याबद्दल .. संजय सोनवणी यांचे वाघ्या चे समर्थन छत्रपती शिवराय बदनाम करणारे आणि मराठा समाज आणि धनगर समाज यांच्यात तेढ निर्माण करणारे आहे, हे समजायला कोणत्याही शहाण्या माणसाला वेळ लागणार नाही ....

    ReplyDelete
    Replies
    1. Mhanaje Maratha ani dhanagar vegale aahet he manya kelet yabaddal aabhaar.

      Delete
  21. खरं तर जातीचा विषय नाही. पण हे लोक वारंवार आपण मराठा असल्याचे बोलतात, बिनधास्त वावरतात इतरांनी मात्र स्वजातीचा उल्लेख केला तरी यांना तो मराठाद्वेष वाटतो. याची मात्र गंमत वाटते.उद्या यांच्या म्हणण्यानुसार, इतिहासात फक्त शिवाजी महाराज, संभाजी महाराज हेच होऊन गेले होते. इतरांचे नाव काढणेदेखील यांना मराठाद्वेष वाटू शकतो. पण काही असो, या सिंह असल्याचा दावा करीत फिरणाऱ्यांचा बुरखा वाघ्याने एका झ़डपेत फेकून दिला व लांडगे उघडे पडले. बुंद से गयी, वो अब हौद से भी नही आयेगी...

    ReplyDelete
    Replies
    1. कुत्र्याच्या चरणी निष्ठा अर्पण करून शिवप्रभुंची विटम्बना करणाऱ्यांनी कोण वाघ आणि कोण लांडगा याचा फैसला करू नये. वाघ्याचा पुतळा काढला हे ऐकूनच ज्याची हातभार फाटते ते कधीही लढाईची आणि त्यातही जिंकण्याची भाषा करू शकत नाहीत. आणि हो लांडगे उघडे पडले नाहीत तर "शेळी बनून मेंढराच्या कळपात शिरलेत." वाईट याचे वाटते भावा की ज्या दिवशी हे लांडगे उघडे पडतील त्या दिवशी तुमचे सगळे संपलेले असेल रे. वेळीच डोळे उघडा.

      Delete
  22. संजय सोनवणी सध्या जगातील मी मांडलेले सगळेच निष्कष्र अंतिम आहेत. असा आव आणून बोलत असतात. कुठून त्यांना साक्षात्कार झाला हे कळत नाही. एका कुत्र्याच्या स्मारकासाठी एवढे जीव तोडून कोकटणे सुरू आङे की ते वाचून हसू येते. स्वताला विदवान म्हणारी माणसेही कशी म्हातारपणी बालकासारखी वागतात...वाघ्याचे स्पष्टीकरण देवून वाघ्याच कसा बसविला ते पटवून देतात. अहो वाघ्या नाही त्यांचे सगळे नातेवाईकाचे स्मारके करा पण ईतर ठिकाणी करा छत्रपतीच्या समोर कुत्रयाचे स्मारक मोठी छाती फूगून येते. कुत्र्यासाठी गळा काढणारे स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या इतर मावळ्याच्या स्मारकासाठी का भांडत नाहीत...बहुजन समाजाचा मोठा ईतिहास सांगून आपले ज्ञान पाजळणारे पंडित समाजात काय आज आले नाहीत...प्रत्येकाला आपण कीती पाण्यात आहोत याची जाणीव असते....संजय हे मन दुषित करून लिहित आहेत...हे स्पष्ठ जाणवू लागले आहे...काही लोकांचा राग आला म्हण जे तुमच्या विचारानुसार विचार बदलतो हे भ्रम काढून टाकण्याची गरज आङे...सत्य हे सत्य असते. हे सांगण्याची गरज आहे....कशाला महापुरुषांची नावे घेता...तुम्ही काय समाजासाठी दिवे लावलेत ते सांगा....चार पुस्तके चाळून गप्पा मारण्यापेक्षा त्याचे विचाराचे अनुकरण करणारे चार कायक्रम हाती घ्या....वाघ्याचे केकाटणे सोडा...आपण काय करणार ते समाजाला सांगा.....

    संजयजी सुतावरून स्वगर्ग शोधताना वास्तव स्वीकारा...आपण करीत असलेली चिकित्सा ही एखाद्या बाईला मिशा दिसतात...म्हणून तिला पुरुष ठरविण्याचा उद्योग शहाणी माणसे करताना पाहून हसू येते.....

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ किती कमी शब्दात संजय सोनवनीच्या मनस्थितीचे समर्पक वर्णन केलात हो. सलाम तुम्हाला. कुणालातरी सोनवनीचा "एखाद्या बाईला मिशा दिसतात...म्हणून तिला पुरुष ठरविण्याचा उद्योग" कळाला आणि शहाणी माणसे अजूनही अस्तित्वात आहे हे सिद्ध झाले. पुन्हा एकदा सलाम तुम्हाला.

      Delete
    2. शाब्बास..सुतावरुन स्वर्ग कोण गाठतोय, हे सर्वांना चांगले समजते. वाघ्या हा विषय कोण उकरुन काढला, तो कशासाठी काढला हे जनतेला समजते आहे. अगदी अलीकडेपर्यंत जे रायगडाकडे ढुंकूनही पाहात नव्हते, त्यांना अचानक वाघ्या दुष्मन कसा वाटू लागला. तुमच्या अस्मिता फक्त अन्य जातींच्या विरुद्धच का जागृत होतात? एकीकडे शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापले म्हणायचे व दुसरीकडे ब्राम्हण, धनगर, माळी, वंजारी अशा एक एक जातींना तोडायचे धंदे कुणाच्या सांगण्यावरुन करत आहात, हे ही जाहीर करुन टाकाच. संजयजींना कलुषित भावनेने लिहिता असे सांगता आणि तुमच्या ब्रिगेडी साहित्यात कोणाकोणाबद्दल कायकाय बोलले गेले आहे, महिलावर्गाविषय किती हीन पातळीवर शेरे ओढले आहेत, याची चिकित्सा करण्याची धमक तुमच्यात कधी येणार? आपल्याला जे सांगण्यात येते, तेच ओढूनताणून कोकलणे म्हणजे सत्य सांगणे नव्हे. शिवाजी महाराज ही संबंध महाराष्ट्राची अस्मिता आहे व वाघ्या हे स्वामीनिष्ठेचे प्रतीक आहे, इतकीही उमज तुमच्यात नसेल तर वाघ्याला टारगेट करण्यामागचे तुमचे मनसुबे जगाला कळणारच. संजय सोनवणींनी आवाज नसता उठवला तर कोणीतरी बोललेच असते. त्यामुळे, त्यांना टारगेट करण्याचे धंदेही बंद करुन टाका. अन्यथा, असे शंभर संजय सोनवणी तुमच्या अर्धवट इतिहासाचे व धंद्यांचे ऑडीट करायला पुढे यायला वेळ लागणार नाही.

      Delete
    3. DADU KONDEV HA CH.SHIVAJI MAHARAJANCHA BAAP DHAKHVNARE BHAT LOK CHALTAT KA TUMHALA..?

      Delete
    4. याला म्हणतात, अंगलट य़ेणाऱ्या प्रश्नांना बगल देऊन दुसरेच काहीतरी बरळत बसायचे. वरील वाक्य उच्चारणे ही देखील शिवरायांची बदनामीच आहे, हेसुद्धा यांना कळत नाही.

      Delete
    5. "शिवाजी महाराज ही संबंध महाराष्ट्राची अस्मिता आहे व वाघ्या हे स्वामीनिष्ठेचे प्रतीक आहे,इतकीही उमज तुमच्यात नसेल तर वाघ्याला टारगेट करण्यामागचे तुमचे मनसुबे जगाला कळणारच.संजय सोनवणींनी आवाज नसता उठवला तर कोणीतरी बोललेच असते.त्यामुळे,त्यांना टारगेट करण्याचे धंदेही बंद करुन टाका.अन्यथा,असे शंभर संजय सोनवणी तुमच्या अर्धवट इतिहासाचे व धंद्यांचे ऑडीट करायला पुढे यायला वेळ लागणार नाही."

      म्हणे शिवराय साऱ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत.शिवरायांचा अपमान करणाऱ्या वाघ्यासाठी आकांड तांडव करणाऱ्याणी आम्हाला अस्मित शिकवू नये. एवढीच अस्मिता जर होती तर जेम्स लेन प्रकरणात तुम्ही वाघ्याच्या शेपटाखाली लपू बसले होते काय? तिथे सुधा ब्रिगेड वाल्यांनाच पुढाकार घ्यावा लागला.

      "अन्यथा,असे शंभर संजय सोनवणी तुमच्या अर्धवट इतिहासाचे व धंद्यांचे ऑडीट करायला पुढे यायला वेळ लागणार नाही." तुझ्या या विनोदावर मात्र मला हसावे की रडावे काळात नाहीये? माझ्या सारख्या कालच अंड्यातून बाहेर पडलेल्या पाहूनच तुमचा बाप संजय सोनावानीची दात खीळी बसली मग असले शंभरच काय हजार फटके विचारवंत जरी निर्माण केले तरी मी एकटाच त्यांना पुरेसा आहे.

      ब्रिगेड वाल्यांची तर बातच सोडा. त्यांच्याकढे एकाहून चढ एक असे विचारवंत आहेत. त्यांच्या समोर तुमच्या सोनावनीची वाघ्या एवढीही लायकी नाही. अरे संग ना तुझ्या बापाला माझ्या मुद्द्याचे उत्तर द्यायला?

      Delete
    6. "अन्यथा,असे शंभर संजय सोनवणी तुमच्या अर्धवट इतिहासाचे व धंद्यांचे ऑडीट करायला पुढे यायला वेळ लागणार नाही." अशांचे स्वागत.फुले-शाहू-आंबेडकरवादास फुले-आंबेडकरवादाच्या भुलभुलैय्यात नेवून सोडणारे समाजद्रोही समरसतावादी लांडगे समाडज्यासंमोर उघडे करा एकदाचे....

      Delete
  23. सोनवणी यांनी केलेली दिशाभूल भाग-१ & भाग-२

    हा लेख लिहिताना संजय सोनवणी यांनी मुद्देसूद लिखाणाचा देखावा उभा केला. पण हे करताना अनेक गोंधळ त्यांनी करून ठेवले आहेत. स्वत:च उभ्या केलेल्या बनावात सोनवणी अडकत गेले आहेत.त्यांचे पितळ उघडे करण्याचा प्रयत्न मी केला आहे. Read on my blog. at following link:

    http://sarvsamaj.blogspot.in/

    ReplyDelete
  24. http://www.uppercrustindia.com/ver2/showpage.php?pagetitle=A%20Peak%20Behind%20The%20Royal%20Curtain&postid=122

    ReplyDelete
    Replies
    1. nice. i liked the photo of Maharaja Chhatrapati Shahu is the 15th descendant of the great Maratha warrior king Chhatrapati Shivaji. specially the loyal dog of Maharaja Chhatrapati Shahu...

      Delete
  25. http://www.uppercrustindia.com/showarchive.php?page=/oldsite/13crust/index.html

    ReplyDelete
  26. http://www.uppercrustindia.com/oldsite/13crust/thirteen/season4.htm

    ReplyDelete
  27. संजय सोनवनीचे बिंग फुटले. मानव भोसले नावाने फेस बुकवर फेक अकाऊंट बनवून केली अहिल्या देवींची बदनामी. पण आरोप मात्र "संभाजी ब्रिगेडवर." याचे कारण मी धनगर बांधवांना वारंवार सांगत आहे की सोनवणी तुमचा मराठ्यांच्या विरोधात वापर करून घेत आहे.त्याचा हा घ्या पुरावा. दैनिक पुढारीतिल ही बातमी वाचा.
    http://www.facebook.com/photo.php?fbid=506736752673942&set=a.157601777587443.38770.157137297633891&type=1&theater

    ReplyDelete
  28. अरे व्वा...बिंग फुटले म्हणे. आक्रमकताच सर्वोत्तम बचाव असतो, या उक्तीनुसार संभाजी ब्रिगेडनेच आता सोनवणींच्या विरोधात आघाडी उघडलेली दिसते. बिंग फुटले म्हणजे काय..तर यांच्याच माणसाने सोनवणींविरुद्ध फेसबुकवर पोस्ट टाकली. आज महाराष्ट्रात धनगर बांधवांचे ठिकठिकाणी आंदोलन आहे, त्याची धार कमी करण्यासाठी ब्री-गेडने चालवलेली ही धडपड आहे. पण तिचा काही उपयोग होणार नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. याला म्हणतात, अंगलट य़ेणाऱ्या प्रश्नांना बगल देऊन दुसरेच काहीतरी बरळत बसायचे.
      सोनवणीने शाहू महाराजांना वगळलेले चालते, वाट्टेल ते रेटून लिहिले तरीही चालते. पण त्याला उघडे पाडले की लगेच तो धनगरांचा नेता होतो काय? महाराणी अहिल्याबाईंची बदनामी त्याने केल्याचे उघड झाले तरी त्याच्याच शेपटाला चिकटून राहणाऱ्यांना धनगर आणि एकूणच बहुजानंविषयी किती प्रेम आहे ते समजलेच आहे.

      Delete
    2. महाराणी अहिल्याबाईंची बदनामी त्याने केल्याचे उघड झाले तरी....

      अरे शाहाण्यांनो, आम्ही तेच तर विचारत आहो. उघड झाले म्हणजे ते कसे झाले, कुणी केले, त्याचा पुरावा आहे का? हा मुद्दा पूर्णपणे बाजूला सारुन संजय सोनवणीवर घसरण्यातून काहीच साध्य होत नाही. हा तुमचा त्यांच्याविषयीचा द्वेष मात्र उघड होतो.

      Delete
    3. "आज दि. ६ आगस्टच्या दै. पुढारी (सांगली आवृती) पष्ठ क्र. ३ वर "अहिल्यामाईंच्या बदनामीचा जातीयवाद्यांचाच कट" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले असून फ़ेसबुकवर मानव भोसले असे बनावट नांव वापरुन संजय सोनवणीनेच धनगर समाजाची बदनामी केली आहे असा संभाजी ब्रिगेडने (सांगली) केलेला संतापजनक, अत्यंत खालच्या पातळीचा आरोप प्रसिद्ध केला आहे. असे आरोप प्रसिद्ध करत असतांना किमान पुराव्यांची आवश्यकता असते हे पुढारीसारख्या जबाबदार वृत्तपत्राने विसरावे व बदनामीकारक मजकुर सरळ प्रसिद्ध करुन मोकळे व्हावे हे या वृत्तपत्राला शोभादायक नाही. याबद्दल मी आपला व संभाजी ब्रिगेड (सांगली) पदाधिका-यांचा निषेध करत आहे."

      चार दोन धनगर समाज बांधव तुझ्या पाठीशी काय राहिले तू तर सगळा भारत आपला झाल्याच्या अविर्भावात वावरत होतास. मानव भोसले हे अकाऊंट कुणाचे आहे याच्या साठी पुराव्याची आवशकता लागते हे जर तुला कळले आहे तर मग गाढवा हाच आरोप तुम्ही लोकांनी त्या संभाजी ब्रिगेडच्या कुण्या भैया पटलावर ठेवला तेव्हा तुमच्याकडे कोणता पुरावा होता रे हरामखोरा? बर हा आरोप तू केवळ भैया पाटलावर ठेऊन मोकळा झाला नाहीस तर त्याच्या "संभाजी ब्रिगेड सारख्या एका जबाबदार आणि प्रतिष्ठीत संघटनेच्या नावावर ह्या आरोपाची काळीमा फसली." तेव्हा तुला लाज नाही वाटली. संजय सोनवणी मी पूर्वी पासून सांगतोय की तू उन्मादाचा बळी झाला आहेस. केवळ वाघ्याचे शिल्प पुन्हा बसविले म्हणून संभाजी ब्रिगेड ला संपवण्याच्या वल्गना तुम्ही लोकांनी केल्या. आता तुम्हीच लावलेल्या बीजाची कडू जहर फळे खाण्याची वेळ आली की निषेधाचे पत्रक? माझ्या मुद्द्याचे खंडण करू न शकणाऱ्या बाजार बुनग्या तुझ्या सारखे दीड दमडीचे विचारवंत "शिवरायांना आणि मराठ्यांना " संपवू शकत नाहीत.


      हाच आरोप तुम्ही लोकांनी भैया पाटील आणि संभाजी ब्रिगेड वर केला तेव्हा तुमच्या कडे कोणते पुरावे होते? वाघ्याने आणि सोनावाणीने याचा शोध केला होता का?की हा आरोप युम्ही लाकांनी केवळ आणि केवळ मराठा द्वेष म्हणून केला?

      Delete
    4. हा कोण शिवालिक वर्मा नामक गनिम आहे, तो नक्कीच ब्रिगेड्यांची आणखी एक अनौरस औलाद आहे, हे त्यानेच सिद्ध केले आहे. भय्या पाटील हेच नाव जर बोगस असेल तर मानव भोसले किंवा शिवालिक वर्मा ही नावे धारण करणेदेखील यांना अवघड नाही. शिवाय, दरवेळी अशी नवनवीन नावे घेऊन घाण करुन ठेवली तर आधी कापलेले नाक समाजापुढे येत नाही, असा यांचा समज असावा.

      Delete
    5. होय मी गनीम आहे असत्याचा गनीम आहे.तुमच्या सारख्या नालायक लोकांचा गनीम आहे. अरे गाढवा माझे नाव काही का असेना पण मला एक ओळख तरी आहे. तू तर बापाचा पत्ता नसल्या सारखा नावही लिहीत नाहीस. तुझा बाप सोनवणी मला घाबरतो म्हणून त्याने तुला पाठवले माझ्यावर भुंकायला पण तुही नालायक सला माझ्या एकाही मुद्द्याचे खंडण "सोनवणी-रामेटेके-नरके-देवरे " यांना करता आलेले नाही. आणि म्हणे ही चांडाळ चौकडी त्या ब्रिगेडचे ऑडीट करणार आहे म्हणे. जाणीव पूर्वक विषय बदलू नकोस मी उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढ.


      आणि हो कुत्र्याच्या औलादीच्या तुम्हा लोकांना "एका भाकड दंतकथेतील कुत्रा खरा वाटतो तर मग मी शिवालिक वर्मा जिवंत हाडा मांसाचा माणूस आहे,तुझ्या बापाच्या प्रत्येक मुद्द्याला रीतसर मुद्देशीर उत्तर देतोय तो का नाही चालत?"

      तुला नावच नाही कारण कुत्र्याच्या पैदाशीचे नाव ठेवावे तरी काय?मी अनुयायी आहे शिवरायांचा म्हणून माझ्या बापाने नाव ठेवलेय शिवालिक....शिवालिक वर्मा.

      Delete
    6. - माझे नाव काही का असेना पण मला एक ओळख तरी आहे.

      अरे तोतया...भुंकण्याच्या भरात का असेना कबुल झालास की तुझे खरे भलतेच आहे. दुसरे असे की भुंकण्याच्या पहिल्या टप्प्यात तू चक्क सं.ब्रिगेडने आत्मपरीक्षण करावे अशा शीर्शकाखाली सुरवात केली होतीस. पण तो मुद्दा सोयीस्कररित्या टाऴून आम्हावरच तंगडी वर करु लागलास. आणि हा...ऑडीटचा मुद्दा भलताच जिव्हारी लागलेला दिसतोय तुझ्या बोलवत्या धन्यांच्या. आता पुन्हा त्यांच्याकडे जाशील व नासलेले वैचारिक तुकडे चघळत इथे येशील भुंकायला. पण काऴजी घे...आम्हाला इमानी कुत्रा आणि हरामी लांडगा यातील फरक लगेच कळतो. तुझ्या केकटण्याच्या आवाजावरुन ते समजलेच आहे.

      Delete
    7. अरे मुर्खा शिवालिका, त्या शिवाजीला कांही लोक खालच्या थराला जाऊन बदनाम करत आहेत, पण त्यांच्या विरोधात तू कांहीच बोलत नाहीस. एवढा कसा गांडू तू? तुम्ही लोक भित्रट असता हे यावरून सिद्ध होते. बामनानी शिवाजी म्हंटले तर त्यांच्या मागे लागणार तू, आणि तुमच्या त्या नवबापांनी शिवाजीला शिवी दिली तरी तोंडात goooooooooooo धरून बसणार ही तुमची औकात.

      Delete
    8. भैय्या पाटील हे नाव टोपण नाव आहे.बोगस किंवा फेक नव्हे.आता टोपण नावाने वावरणारी पण सर्वांना परिचयाची असणारी व्यक्ती व फेक अकाऊंट यातला फरक कळत नसेल तर वेड पांघरूण पेडगावला जाणार्याना काय शिकवायचे.

      Delete
  29. छत्रपती शिवरायांच्या काळापासून ते आजपर्यंत या शेंडीवाल्या लोकांना कोणत्यातरी कारणावरून महाराजांच्या किंवा त्यांच्या राजघराण्यातील इतर कोण्याच्या नावाने काहीतरी वाद घालायचा आणि त्यानंतर सर्व महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया काय उमटतात याचा असुरी आनंद घ्यायचा हि तर त्यांची जुनीच प्रवृत्ती आहे.या शेंडीवाल्यांना महाराजांबद्दल किती निष्ठा,आदर आहे हे संजय सोनवणी सारख्या वाघ्यानिष्ठ लोकांनी उगाच दाखवू नये.

    ReplyDelete
  30. एखाद्या उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या जातीची हेटाळणी जे शेंडीवाले म्हणून करु शकतात,त्यांच्या जातीयवादी मनात आपल्यापेक्षा कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीसमुहाबद्दल काय भावना असतील,हे स्पष्टच आहे. अजूनही गावोगावी जाऊन शोषितांना विचारा त्यांच्यावर अत्याचार करणारे खरंच शेंडीवाले होते की अॅट्रोसिटीचा त्रास होतोय असे सांगणारे वर्चस्ववादी?

    ReplyDelete
  31. blog varil sarvani lakshat ghyave ki sambhaji briged mhanje maratha samaj navhe. aani tyanchya kontyahi karyala marathayanche samarthan nahi.

    ReplyDelete
  32. आधीच एक गोष्ट स्पष्ट करतो, की मला वादविवादात पडायची हौस अजिबात नाही. मी उत्तम वाचक आहे तसाच चिकित्सक वा चोखंदळ वाचक आहे. त्यामुळे सर्वच समोर येईल ते वाचत असतो. केवळ योगायोगाने संभाजी ब्रिगेड किंवा त्यांच्या भूमिका व आंदोलनाशी संबधित काही वाचनात आले. तशा बातम्या अधुनमधून वाचल्या होत्या. पण तिकडे फ़ारसे गांभिर्याने बघितले नव्हते. पण अलिकडे रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची घटना घडली आणि काहुर माजले; तेव्हा कुतूहल म्हणुन थोडा तपास केला. त्यातून संजय सोनवणी, हरी नरके, प्रविण पाटिल, भय्या पाटिल, शिवालिक वर्मा अशा अनेकांचे वाद प्रतिवाद वाचनात आले. मनोरंजनही खुप झाले. त्यात प्रत्येक लेख वा युक्तीवादात इतिहास संशोधनाचे दावे आहेत. त्यातील संशोधन एवढ्या शब्दामुळे मला ही प्रतिक्रिया द्यावीशी वाटली. अन्यथा शिवाजी वा इतिहास यावरचा मालकी हक्क गाजवण्य़ाच्या या हमरातुमरीमध्ये मला अजिबात रस नाही. कारण कर्तत्वहीन लोकच वारश्याच्या पुण्याईवर जगतात. आणि कर्तृत्ववान माणसे शिवरायांकडून कर्तृत्व गाजवण्याचा वारसा घेतात, अशी माझी समजूत आहे. कारण मी संशोधक किंवा विद्वान वगैरे नाही. म्हणूनच त्या थोर राष्ट्रपुरूषाला मालमत्ता समजून एकमेकांच्या उरावर बसणार्‍यांच्या नादाला लागण्याची माझी अजिबात इच्छा नाही. फ़क्त या विवादातील "संशोधन" या शब्दाच्या वापरासंबंधी मतप्रदर्शन, हाच एक मुद्दा इथे मांडायचा आहे. छान

    पहिली गोष्ट म्हणजे संशोधन आणि तपास यात टोकाचा फ़रक असतो. ज्याला संशोधन करायचे असते त्याचा निष्कर्ष आधीपासून तयार नसतो, तर संशोधनातून शोधक वृत्तीने जे सापडते ते जगासमोर मांडण्याची त्याची प्रवृत्ती असते. मग ते त्याला आवडणारे असो किंवा नसो. याच्याउलट तपास करणार्‍याची भूमिका असते. त्याचे निष्कर्ष तयार असतात. तेच सिद्ध करण्यासाठी त्याला जे पुरावे हवे असतात, त्यासाठी तो जो शोध घेतो, त्याला संशोधन म्हणत नाहीत तर तपासकाम म्हणतात. इथे एकूणच वादाचे स्वरूप बघितले तर कुणालाच संशोधनाची गरज वाटलेली दिसत नाही. प्रामुख्याने ब्रिगेड म्हणून जो कोणी कार्यरत आहेत, त्यांच्याकडे आधीच सिद्धांत तयार आहेत. त्यांच्या सिद्धांतामध्ये बसू शकतील, अशा गोष्टींच्या ते कायम शोधात असावेत, असेच त्यांच्या लिखाणावरून वाटते. किंबहुना आपले शिवप्रेम सिद्ध करण्यापेक्षा किंवा आपल्या जाती अस्मितेपेक्षाही त्यांना ब्राह्मणांवर आरोप करण्यात अधिक उत्साह आहे. मग त्यात जे उपयोगी असेल, त्यावर त्यांचा कटाक्ष दिसतो. आणि त्यांनी तो हेतू अजिबात लपवलेला नाही. त्यांच्या शिवप्रेमापेक्षा त्यांचा ब्राह्मणद्वेष अस्सल आहे यात शंकाच नाही. आणि त्यासाठी जर ते इतिहासाचे दाखले शोधत असतील तर त्यांनी संशोधनाचा दावा करू नये, त्याला तपास म्हणावे एव्ढीच माझी त्यांना विनंती आहे.

    सोनवणी यांचे जातीपातीच्या वादापेक्षा इतिहासावर अधिक प्रेम दिसते. त्यामुळे त्यांनी अशा तपास करणार्‍यांशी इतिहास संशोधकाच्या आवेशात वाद घालण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. तो त्यांच्या शक्तीचा अपव्यय आहे. शिवालिक म्हणून जे कोणी यातले लेखक आहेत, त्यांचा राजकीय धुर्त बाणा अजिबात लपलेला नाही. त्यांचा लेख वाचल्यावर तर मला हेनरिक हाय नामक जर्मन कवि विचारवंताचीच आठवण झाली. तो म्हणतो, "समजुतीच्या आहारी गेलेल्या माणसांना आपले मतच सत्य असल्याची खात्री पटली असेल तर ते सत्याचा गळा घोटायलाही मागेपुढे बघत नाहीत. आणि जेव्हा अशी अवस्था होते तेव्हा ती माणसे सत्याचा विजय होण्यासाठी असत्याचाही आधार घेऊ लागतात." भय्या पाटिल किंवा शिवालिक त्याच पठडीतले दिसतात. त्यांना इतिहासाचे उपयुक्त आधार हवे आहेत, इतिहास किंवा त्यातल्या सत्याशी त्यांना अजिबात कर्तव्य नाही. मग इतिहासाशी प्रामाणिक रहाण्याचा त्यांना आग्रह धरण्यात सोनवणी यांनी आपली शक्ती खर्च करणे योग्य आहे काय? जगात आजवर अनेकांनी आपापल्या राजकीय वा अन्य हेतूसाठी इतिहासाचे विकृतीकरण केले आहे. म्हणुन तर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन अफ़जल खानाची तरफ़दारी करण्यापर्यंत मजल मारली जाऊ शकते. त्यात सोनवणी सारख्यांनी आपला बहुमोल वेळ वाया घालवू नये एवढीच विनंती.

    ReplyDelete
  33. पुतळे खरंच प्रेरणा देतात का विद्वेष पसरवतात, हाच प्रश्न आता सर्वसामान्यांपुढे आहे. जातीजातींमध्ये फूट पाडण्यासाठी जर पुतळे कारणीभूत असतील, तर यापुढे महाराष्ट्रात एकही नव्या पुतळ्याला परवानगी नको. पुतळ्यांची विटंबना म्हणजे महापुरुषांची विटंबना होते असा तर्क असेल तर महापुरुषांच्या विचारांची विटंबना सर्रास चालत असेल तर त्यापुढे पुतळ्याची विटंबना काहीच नाही. विशेष म्हणजे विटंबना करणारेच जेव्हा खुद्द महाराजांचे किंवा इतर महापुरुषांची नावे घेत असतील, तर त्यांच्यासारखे पापी तेच. डॉ.आंबेडकरांच्या विचारांनी भारावून जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिका व संघटित व्हा, हे ज्यांनी ऐकले त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याणच झाले. मात्र, त्यांच्या पुतळ्याची विटंबना सहन न झाल्याने रस्त्यावर उतरलेल्यांवर पोलिस केसेस झाल्या. तीच गत शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्वांची. समाजधुरिणींनी खरोखरच, या विषयावर एक होऊन, इतिहासाचा वापर परस्परांवर दुगाण्या झाडण्यासाठी करण्याऐवजी समाजविकासासाठी करण्याचा ठोस कार्यक्रम हाती घ्यावा. गडकिल्ल्यांची सुरक्षितता, पावित्र्य टिकवण्यासाठी कोणीच काही बोलताना दिसत नाही. अल्पकालीन स्वार्थ साधण्याऐवजी पुढच्या पिढीला आपला अभिमान वाटेल असे महान कार्य आपणास करावे लागणार आहे. जातीभेद हे वास्तव सर्वांना मान्य आहे, तरीही त्याचा द्वेषभावनेतून काथ्याकूट न करता, आपल्या नव्या पिढीला बदलत्या जगापुढे समर्थपणे उभे राहता येईल, असे काही करण्यात खरे कर्तृत्व आहे व ती काळाची अत्यंत तातडीची गरज देखील आहे. अन्यथा, भंगलेल्या पुतळ्यांचा, विस्कटलेल्या इतिहासाचा वारसा पाहून आपली पुढची पिढी जे प्रश्न विचारेल त्यांची उत्तर देण्याइतकीही हिंमत आपणाकडे राहिलेली नसेल. मी मराठा, मी धनगर, मी बौद्ध, मी ब्राम्हण किंवा मी अमूक, मी तमूक याच भिंतीत आपण स्वतःला बांधून घेत आहोत व भाषा मात्र झपाट्याने बदलणाऱ्या जगाची करतो आहोत.असे करुन आपण स्वतःलाच फसवत आहोत व भावी पिढ्यांचे भवितव्य अंधःकारापुढे नेतो आहोत, असे मला प्रकर्षाने वाटते. मी माझे नाव दिले तर त्यावरुनही माझ्या जातीचा अंदाज बांधून शेरे मारले जातील व मी उपस्थित केलेले मत गौण ठरेल, म्हणून नाव देणे टाळतो आहे. मात्र, कतृर्त्ववान महापुरुषांनी घडवलेल्या, कसलेल्या या मराठी मातीतील एक सामान्य माणूस हीच माझी खरी ओळख आहे, तिला मला अभिमानही आहे. मात्र, हा अभिमान सार्थ असावा यासाठी प्रयत्न करण्याची माझी इच्छा आहे. मित्रहो, अजूनही वेळ गेलेली नाही. इतिहासाच्या डबक्यात साठलेल्या पाण्यात कुजण्यापेक्षा, भविष्यातील गगनात विहार करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही वेळ आहे. आपली स्वप्नं हीच आपले आयुष्य घडवतात आणि आपले आयुष्य घडले तरच भावी पिढीचे व समाजाचेही भवितव्य उज्ज्वल असू शकते. माझ्यासारखा सामान्य माणूस यापलीकडे काय सांगणार?

    ReplyDelete
  34. सुरुवात वाघ्याने झाली असली तरी हे वाघ्यावरच थांबणार नाही. एक दिवस यांची मजल आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत जाईल. खरे वाटत नसेल तर उत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या पुतळ्यांची काय अवस्था झाली आहे ते बघा.

    ( http://mahavichar.blogspot.in/2012/07/blog-post_24.html )

    अखिलेश यादव यांचे धाडसी पाऊल
    नुकताच त्यांनी मायावती यांनी उत्तर प्रदेशातील ज्या जिल्ह्यांची नावे बदलून बौद्ध धर्माशी किंवा दलित नेत्यांशी संबंधीत नावे ठेवली होती, ती रद्द करून पूर्वी जी नावे होती तीच ठेवण्याचा ठराव मंत्रिमंडळात मंजूर करून घेतला.
    आणि हा सोनवणी आणि सांगलीकर यांनी ह्या गोष्टीचे उघड समर्थन केले आहे. थोडक्यात म्हणजे बहुजनांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे.

    First they came for the communists,
    and I didn't speak out because I wasn't a communist.

    Then they came for the trade unionists,
    and I didn't speak out because I wasn't a trade unionist.

    Then they came for the Jews,
    and I didn't speak out because I wasn't a Jew.

    Then they came for me
    and there was no one left to speak out for me.

    ReplyDelete
  35. वाघ्या कुत्र्यावर संशोधन केल्याचा आव आणून कोकलत बसणारे संशोधक काय मिळवले व काय हरवले याची गोळा बेरीज करतात. हेच दिसून येते. संजय सोनवणी, हरि नरके व इतर विद्वान मंडळी अलीकडे अशी का वागू लागली आहेत. याचा शोध घेण्याची गरज आहे..ज्या पुरोगामी विचाराचा पाया मानून अभ्यास करत होती. त्यांना आता हा पुळका नेमका कसा आला... पुरोगामी विचार ही आमची मक्तेदारी आहे. ही भावना मनात रुढ करून हे बहुजन ब्राम्हण आता शब्द्च्छल करीत मनोरंजन करीत आहेत...वाघ्यासाठी उपोषण हा तर मोठा विनोद आहे...वाघ्या पुन्हा बसविला म्हणून जणू दिग्विजय मिळाल्याची भावना होऊन स्वताला मोठे समजाणारे कीती छोटे असतात हेच जगासमोर आले...जागतिक कीतीचे विचारवंत डा. आ.ह.सांळुखे, प्रा.मा.म.देशमुख, वाचून परिवतर्तनाची लाट निमार्ण होते व आपण लिहितो..ते फार काही गवसल्याचे समजून घेतो....सोनवणी व नरकेसाहेब हे अभ्यासक आहेत..हे सत्य आहे पण त्यांचे संशोधन तकर्कविसंगत व अहंमभावाने प्रेरित झाल्याने ते स्वता भोवती वादळ निमार्ण करुन घेतात असे दिसते...काळानुरुप बदल स्वाकारला नाही तर सनातनी व तुमच्या त काय फरक दिसतोय...तुमचा वैचारिक शत्रु कोण हे विसरून गेलेली माणसे कधीच पुढे जात नाहीत...मुख्य आजार कोणता बहुजन समाजाला त्यावर उपाय करण्याचे सोडून ही मंडळी फरपटत दुसरेच उपचार करून आजार वाढवून घेत आहेत...खरे तर त्यांनी आत्मपरीक्षण केल्यावर त्यांना कळून येईल....दुस-याने सांगण्याची गरज नाही पण ही मंडळी आत्मपरीक्षण का करीत नाहीत...समाजात लोक शिकलेत त्यांना चांगले वाईट कळते..आता मक्तेदारी कुणाची नाही...आपले संशोधन अंतिम हा ही गैरसमज आहे...पुरोगामी विचारांचे वादळ आता जोराने घोंघावत आहे...सत्याचा बुरखा पांघरून केवळ चिवचिव आता खपणार नाही....खरे स्वरुप लोकाना कळते.....सनातनींना दोष देत पुरोगामीत्वाचा आव आणताना आपण तेच करीत असल्याचे सोयीस्कर विसरतो....

    ReplyDelete
    Replies
    1. आजकाल फेसबुकवर नीरनिराळ्या जातींच्या लोकांची दुसर्या जातींवर गरळ ओकणाऱ्या पोस्ट पाहत आहे . काय तर ब्राह्म्हण असे मूर्ख बनवता तसे मूर्ख बनवितात . माझे म्हणणे आहे कि काय कायद्यात लिहिले आहे का कि ब्राह्मणाचे ऐकलेच पाहिजे ? तुम्ही त्यांचे ऐकता कशाला ? तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे श्राध्द करायचे आहे कि नाही हे तुम्ही ठरवा ना ? ब्राह्म्हणा नी जबरदस्ती केली का ? गंगा स्नान करा अथवा नका करू तुमची मर्जी अहे.वास्तु पूजा करा अथवा नका करू तुमची मर्जी आहे . ब्राह्मणाला तुम्ही बोलावून पूजा केली पाहिजे असे कुठेही कायद्याने बंधन नाही . मग तुम्ही कशाला बोलावता ? मुळात आपली न्यूनगंडता लपवायसाठी दुसर्या जातीला शिव्या देण्याची हि गम्मत आहे. तुम्ही तुमच्या श्रेष्टत्वाने जर उत्त्च पातळीवर पोहोचले तर जात आपोआप गौण होईल . मग त्यासाठी मेहनत घ्या सर्व जातींच्या चांगल्या सवई घ्या. आपली पातळी वाढवा . बरोबरी करा . हे सर्व उपाय आहे . नुसते शिव्या देऊन काही होणार नाही . आपण हुशार व्हा आपल्या बंधू भावांना शिक्षित करा . जातीभेद पाळून आपण हिंदू धर्माचे नुकसान करीत आहोत . ब्राह्मणांनी आधी जी चूक करीत होते तीच चूक आपण करून काय साध्य होणार ? हिंदुस्थान जर टिकवायचा असेल तर पहिले हिंदूंनी एकसंध होणे जरुरी आहे अश्या एकमेकांना पाण्यात पहिल्याने ज्या भेगा पडतील त्या भरून येणाऱ्या नसतील. तुम्ही मोठे व्हा व सर्व समाजाला मोठे करा .
      तुम्ही हे कराल हि ईश्वरचरणी प्रार्थना .
      apli dufhali china ani pakisthan sati anandachi bab ahe . vichar kara sarvjan ovesisarakhe HIJADE pan atta garal okhu laglet . HINDU DHARMASATI YA GOSTI Khup marak ahet. koni bregedi , bahujan , kinva bramhan ahe mhanun tumhala te daya dhakhavtil as nahi .

      Delete
  36. साध कुत्त्र पण ज्यांना विचारात नव्हत , अशे नरके ,सोनवणी वाघ्या कुत्र्याची अस्मिता करून प्रसिद्ध झाले .... धन्यवाद संभाजी ब्रिगेड ....!

    ReplyDelete
  37. मोगलांना पाणी पिताना घोडी बुजली तरी संताजी धनाजीचा भास व्हायचा...तशी अवस्था बहुजन समाजातील तथाकथित ब्राम्हणी संशोधकांना जळी तळी काष्ठी संभाजी ब्रिगेड दिसू लागली आहे....मला वाटते मनाचा आजार जडलेल्यांच्या मनात संभाजी ब्रिगेडची भीती का....संभाजी ब्रिगेडही शिवविचाराची संघटना आहे...ही संघटना जगाच्या कानाकोप-यात पोचली आहे ती...कतृत्वाने....सत्याचा विचार स्वीकारून आभाळाला गवसणी घालणारी ही संघटना आहे.....

    ReplyDelete
  38. संभाजी ब्रिगेड हि काम धंदा नसलेल्या गुंडाची संघटना आहे ..यांच्या भैया पाटील उर्फ मानव भोसले उर्फ दिगंबर काळे ....या हरामखोर बिन्बापाच्या गुंडाने ....
    धनगर समजाच्या मुली व अहिल्यादेवी होळकर यांचेविषयी अतिशय हीन पातळीचे लिखाण करून बदनामी केली आहे ..
    हाच संभाजी ब्रिगेड चा खरा चेहरा आहे ....
    धर्मवीर संभाजी व छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याची पण यांची लायकी नाही .....
    वाघ्या तर सोडाच आता ...अहिल्यादेवी व धनगर समाजच्या मुलींची बदनामी करणाऱ्या भैया पाटलाला /मानव भोसल्याला व संभाजी ब्रिगेड ला ..धनगर समाज ...मातीत गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही ...
    .
    आम्ही आमचे आंदोलन अतिशय तीव्र करणार आहोत ........

    ReplyDelete
  39. कोणीही कितीही सारावा सराव केली तरी आता उपयोग नाही .....
    अहिल्यादेवी यांची बदनामी करणारे कोण आहेत हे सापडले आहेत त्याच दिवशीच .......सर्व तांत्रिक पुरावे मिळाले आहेत .....आमचे जे बांधव अमेरिका स्थित यांनी देखील तांत्रिक दृष्ट्या आम्हाला याचे मागे कोण आहे ते शोधून दिले आहे ..........
    संभाजी ब्रिगेड च आहे यामागे ....दुर्दैव आहे ...
    सोनवणी यांचे नाव घेऊन आरोप करू नका ...आम्हाला कळले आहे ...आता आमची लढाई कायदेशीर राहील ....आणि आम्ही आता या ब्रिगेड ला मातीत गाडू च व त्या भैया पाटील /मानव भोसले ला पण ...
    संभाजी ब्रिगेड या नीच थराला जाईल असा वाटला नवता ..........
    मल्हारी मार्तंड व आई भवानी यांची शपथ घेऊन सांगतो ......आम्ही संभाजी ब्रिगेड ला मातीत घालू .......................
    जय मल्हार ..............

    ReplyDelete
  40. राजकारण आहे हे निवळ राजकारण याचा मागे व या बी-गर्दीचा मागे ते बारामतीचे मेद्याचे पोते आहे.बाकी अनेक वर्षी उन-वारा पाउस खात उघड्यावरती असणास्या महाराजाचा स्मारकाची आठवण फक्त्य शिव जयंतीलाच येते याना,बी-ग्रेड हि इक आतिशय गुंड/हरामखोर/ व्स्सनी , निबुद्ध लोकांनी भरलेले एक टोळके आहे.जसे पूर्वीचा काळी इस्लामी टोळधड आसे त्या पेकी हे एक,या देशात बाबा साहेब्नी लोकशाही आणली कायदे आणले , जर महाराजाचा
    स्मरका बद्दलचा वाद होता तर तो पुराव्यानिशी यांनी न्यायालातून आदेश आणून तो वाघ्या चा पुतळा काढला असता.याना फक्त या महाराष्ट्रात वाद विवाद निर्माण करावयाचे आहेत.व गुंड गिरी करून आपली फडतूस प्रसिद्धी करावयाची आहे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...