Sunday, March 2, 2014

मंदिरांतील पुरूषसूक्ताचे पठण बंद करा!


भारतीय समाजात उच्च-नीचतेचे परिमाण रुजवणारी हिडिस व्यवस्था निर्माण या सूक्तापासून झाली. हे ऋग्वेदातील दहाव्या मंडलात येणारे सूक्त असून त्याचाच विस्तार पुढे ऐतरेय ब्राह्मण ते मनुस्म्रुतीत झाला आहे असे सर्वमान्य मत आहे. त्यामुळे मुळात पुरुषसुक्त काय आहे ते तपासणे योग्य ठरेल.

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येणा-या पुरुषसुक्ताच्या सर्वच मुळ ऋचा आणि त्यांचा खालील अनुवाद पहा.

सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्।स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम्॥ १०.०९०.०१
अर्थ: पुरुषाला १००० मस्तके आहेत, १००० नेत्र आहेत आणि १००० पाय आहेत.प्रुथ्वीला व्यापुनही तो दशांगुळे उरला आहे.


पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम्।उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति॥ १०.०९०.०२
अर्थ: पुरुष हाच विश्व आहे. जेही काही होते,आहे आणि होईल, ते अद्भुत त्याचे आहे, तो अमरतेचा नियंता आहे आणि अन्नाने तो विस्तारत रहातो.

एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः।पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥ १०.०९०.०३
अर्थ:ही पुरुषाची महानता आहे. सारी अस्तित्वे हा त्याचा एक चथुर्तांश भाग असुन उर्वरीत तीन चतुर्थांश अवकाशात अमरता घेउन आहेत.

त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः।ततो विष्वङ्व्यक्रामत्साशनानशने अभि॥ १०.०९०.०
४अर्थ:तीन चतुर्थांश भाग घेवुन पुरुष उर्ध्वगामी विस्तारीत झाला आणि त्याचा एक चतुर्थांश भाग येथे विभाजीत झाला ज्यातुन खाणारे आणि न खाणारे उत्पन्न झाले.

तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुषः।स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः॥ १०.०९०.०
५अर्थ:त्याच्यापासुन विराज निर्माण झाला आणि विराजापासुन पुरुष. जन्मताच पुरुष प्रुथ्वी व्यापुन मागे व पुढे गेला.

यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत।वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः॥ १०.०९०.०
६अर्थ:देवतांनी पुरुषाला यद्न्यात बळी दिले. त्यात (यद्न्यात) वसंत ऋतु हा तुप झाला तर ग्रीष्म अग्नी आणि शिशिर हवी झाला.

तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः।तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये॥ १०.०९०.०७अर्थ:पुरुष बळी झाला. त्याला हविद्रव्यावर जाळले आणि त्याच्यासह देवता, ऋषि आणि साध्यासही बळी दिले.

तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम्।पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये॥ १०.०९०.०८
अर्थ:या वैश्विक बळीतुन दही आणि तुप उत्पन्न झाले. त्यातुन पक्षी आणि पाळीव व वन्य पशू उत्पन्न झाले.

तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे।छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत॥ १०.०९०.०९
अर्थ:या वैश्विक बळीतुन ऋक, साम आणि यजस मंत्रांची आणि छंदांची निर्मिती झाली.

तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादतः।गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः॥ १०.०९०.
१०अर्थ:त्यातुनच अश्व, बोकड, शेळ्या असे सर्व प्राणी निर्माण झाले

यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन्।मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते॥ १०.०९०.११
अर्थ: देवांनी जेंव्हा पुरुषाचे असे विभाजन केले ते त्याचे तुकडे करुन काय? त्याचे मस्तक काय होते? त्याचे हात काय होते? त्याच्या मांड्यांचे आणि पायांचे काय झाले?

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः।ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥ १०.०९०.१२
अर्थ: तर ब्राह्मण हे त्याचे मुख होते. राजन्य हे त्याचे हस्त होते. मांड्या हे वैश्य तर शुद्र हे त्याच्या पायापसुन उत्पन्न झाले.

चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत।मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत॥ १०.०९०.१३अर्थ:चन्द्र हा त्याच्या मनापासुन उत्पन्न झाला तर नेत्रांपासुन सुर्य. इंद्र आणि अग्नी त्याच्या मुखापासुन तर वायु त्याच्या श्वासातुन निर्माण झाले.

नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत।पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन्॥ १०.०९०.१४
अर्थ:त्याच्या बेंबीपासुन हवा, मस्तकापासून आकाश, त्याच्या पावलांपासून प्रुथ्वी, त्याच्या कानांपासून चार दिशा आणि अशा रितीने देवांनी विश्व बनवले.

सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः।देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम्॥ १०.०९०.१५
अर्थ:देवांनी सात प्रज्वलीत समिधांनी त्याला (पुरुषाला) बांधुन (यद्न्यीय पशु मानुन) बळी दिला.

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः॥ १०.०९०.१६
अर्थ:हा आद्य यद्न्य व बळी होता. या देवतारुप शक्तींनी आकाश व्यापले...त्यांचे आम्ही महिमान गातो...कोठे आहेत पुर्वीचे साध्यस आणि देवता?

हे असे आहे पुरूषसूक्त. याचा शिव, विठ्ठल आणि अन्य सर्वच मुळात अवैदिक असलेल्या हिंदू देवतांच्या पुजेचा काय संबंध आहे? तरीही वैदिक धर्मिय हिंदू धर्मात घुसून देवदेवतांच्या पुजेच्या वेळीस हे सूक्त म्हनतात. एकापरीने हिंदू देवतांचा आणि हिंदुंचा अपमान करतात. हे सूक्त वैदिकांनी त्यांच्या यज्ञांत खुशाल म्हनावे...मुलात याची निर्मितीही यज्ञाशीच सम्बंधित आहे. हिंदुंच्या मुर्तीपुजेशी त्याचा दुरान्वयानेही काहीएक संबंध नाही. अशा स्थितीत या सूक्तावर व पुजा प्रसंगी म्हटल्या जाणा-या काही फुटकळ ऋचांवर बंदी घातली पाहिजे. हे वैदिक मंत्र हिंदुंच्या पुजेत म्हटले जाण्याला सर्वांनीच विरोध केला पाहिजे. 


158 comments:

  1. संजयजी,
    हे जरा जास्तच होते आहे तुमचे !हे सर्व प्रत्यक्ष आपल्या जीवनात कुठे अडथळा आणत आहे का ?खरेतर आपण सांगितल्यावरच अनेकाना ते समजले ,उद्या तुम्ही जाहीर केले की तिरुपती किंवा हिमाचल प्रदेशात ज्वालादेवी मंदिरात असाच प्रकार होतो तर तिथे तुम्ही जाणार का ?अनेक चालीरीती परंपरागत आहेत त्यांनी तुमचे काय बिघडते ?आपण स्त्रीमुक्तीचा कैवार घेऊन वट पौर्णिमेची पूजा बंद का करत नाही नाग पंचमी बंद झाली तसे दिवाळीत बळी प्रतिपदा हा दुःखाचा दिवस का मानत नाहीत ?असे पुरुषसुक्त बंद करण्यापेक्षा करण्यापेक्षा इतर खूप चांगले करता येईल (आता तुमच्या पाळीव वाघ्याची फौज माझ्या मागे लागेल )+ हा हा !
    तुमची वाटचाल अगदी राजकीय पद्धतीने चालली आहे
    मुळात कोणताही ब्राह्मण आज या पुरुश्सुक्ताचे कौतुक करत नाही , मेलेली मधी उकरत बसण्यात आपल्याला आनंदच वाटत असतो , आपण हि चाल मराठा लोबीचे लांगुलचालन करण्यासाठी उचलली आहे त्यापेक्षा जाताना आरक्षण दिल्यावर आता मराठ्याना आरक्षण मिळून तुमची काय अवस्था होणार आहे तिकडे लक्ष द्या !
    सध्या समाजात शहरी आणि ग्रामीण अशा दोन संस्कृत्या वसत आहेत त्यातील ग्रामीण लोकाना हे तुमचे उद्योग पटणार नाहीत आणि शहरी लोकाना या देवांशी काहीही घेणेदेणे नाही ,सर्व देव आणि संताना आणि जुन्या सर्व राष्ट्र दैवाताना हि मुले टांगतात कारण आपण ज्यांचे गोडवे गाता ते सर्व राष्ट्र पुरुष भंपक होते हे इतिहासानेच सिद्ध केले आहे मुघल आले त्यांनी राजपुताना नामोहरम केले ,महाराष्ट्रात मराठ्याना लपायला जागा राहिली नाही , कुठेतरी जंगलात लपायची पाळी आली आणि त्याला नाव स्वराज्य !ओसाद्गावाचे राजे , बर तिथल्या मूळ राजानीपण याना मानले नाही , म्हणुनतर जावळीच्या चन्द्ररावाला मरण आले दुसर्याच्या प्रदेशात जाउन प्रांत बलकावयचा हा हलकट पणा म्हणजे स्वयंभू स्वातंत्र्य नक्कीच नाही !
    आणि देवाचे म्हणाल तर ईश्वर मूर्तीरुपात पूजन करणे हाच मूर्खपणा आहे त्त्यात अमुक म्हणा आणि तमुक वर बंदी घाला + म्हणजे त्याहून आचरट !
    तुम्ही आत्ता पंढरपुरात जाउन बघा विचारून कोणालाही +काय उत्तर मिळेल ? कुणाचाही विरोध नसणार , कारण पांडुरंग मुळात सर्वांवर सारखे प्रेम करणारा आहे त्याच्याकडे भेद नाहीत !
    उदंड देखिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे
    पंढरीसारखे स्थळ नाही कोठे जरी तै वैकुंठ दाखविले
    ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे
    ऐसे हरिदास ऐसा प्रेमरस ऐसा नामघोष आहे कोठे
    बहिणी म्हणे आम्हा अनाथाकारणे पंढरी निर्माण केली देवा
    अशा ठिकाणी तुमच्या पुरुष सुक्ताची टिमकी कोण ऐकणार ?
    आणि त्या बडव्यांचे तरी कोण ऐकत असतो ? इथे प्रत्येक जन तल्लीन असतो !

    ReplyDelete
  2. संजय काका , संजय काका ,
    ऐकाना , इकडे बघा , हे बघा ,
    त्रिशुलावरी काशीपुरी चाक्रावारती पंढरी
    दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे
    एक विभूतीचा गोळा एका केशर कस्तुरीचा टिळा
    एका भूजंगाची माळ एका वैजयंती हार
    एका अर्धांगी पार्वती एक लक्ष्मीचा पती
    एक नंदीवरी असे एक गरुडावरी वसे
    तुका म्हणे हरिहर एका वेलांटीचा फेर

    आता काय करायचं ? सांगा नाहो संजय काका ?लोकाना तुमच पटतच नाहीये कि शैव आणि वैष्णव वेगळे आहेत हे , बघाना हो आपले तुकाराम महाराज काय म्हणून राहिले ते ,
    तैम प्लीज , झाप्प्यो , आता म्हणू नका संजय काका , की हा खरंतर संत तुकारामांचा अभंगाच नाही म्हणून , कारण ती तुमची सवय आहे + हो ना संजय काका ?

    आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना
    प्राकाराच्या संगे रवी बिघडला
    रवी बिघडला प्राकाराची झाला
    सागराच्या संगे नदी बिघडली
    नदी बिघडली सागराची झाली
    परिसाच्या संगे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णची झाले
    पांडूरंग संगे तुका बिघडला
    तुका बिघडला पांडुरंग झाला
    एका जनार्दनी गोपी बिघडल्या
    गोपी बिघडल्या श्रीकृष्णमय झाल्या

    या सर्वाना हे पुरुषसुक्त ऐकू येतच असेल , पण त्यांच काहीच बिघडलं नाही !
    किती साली हे सुरु केले त्या ब्राह्मणांनी याचा पुरावा आहे का काही ?
    संपूर्ण वारकरी चळवळ हे पुरुषसुक्त पांडुरंगा समोर चालू आहे म्हणून अडून नाही बसली
    मग तुम्हीच असे कसे ?
    राजकारण करायचे आहे का ? हा हा हा sss करा करा करा !!!
    तुमचा आत्मा शांत होऊ दे एकदा !किती दिवस असे स्वतःला फसवत राहाल ?
    वाघ्या धनगर

    ReplyDelete
  3. उद्या संस्कृतमधे मी बामणांची निंदा करुन सगळीकडे म्हणायला सुरुवात करतो. त्याला कोणी विरोध केला नाही तर ते कृत्य समर्थनीय ठरते का? नाही ना? मग चुका लक्षात आणून दिल्यात तर त्या दुरुस्त करायच्या का डोळ्यांवर झापड ओढून घ्यायची?
    जो समाज चुका दुरुस्त करायला तयार नसतो तो कधीच जागा होऊ शकत नसतो. अशा समाजाला स्वत:चा इतिहासही उरत नाही आणि पर्यायाने अस्तित्त्वही. पूर्वीही हेच होत होते. आता भविष्यकाळातही वर्णवर्चस्व गाजवणारेच खरे कर्तृत्त्ववान म्हणून ओळखले जातील. मला काय त्याचे म्हणा आणि गप्प बसा.
    तुम्ही कोणी अशा गोष्टींना आक्षेप घेऊ नका आणि जो लोकांचे डोळे उघडण्याचे काम करतो आहे त्यालाही ते करु देऊ नका. चालू द्यात तुमचे प्रयत्न. आम्ही डोळे उघडलेले आहेत व तुमच्या (ते ही खर्‍या नावाने लिहायचे धाडस न दाखवणार्‍यां) सारख्या लोकांकडे दुर्लक्ष करायची कला आता आम्हालाही अवगत होऊ लागलेली आहे.

    ReplyDelete
  4. प्रश्न असा आहे++ चूक काय आणि बरोबर काय हे सांगणे फार कठीण असते
    खरेतर अमुक बंद करा म्हणणे चूक आहे जो पर्यंत कुणी काही अश्लील वागत नाहीत तो पर्यंत उगीचच असे म्हणणे चूक आहे
    यातून प्रोटेक्शनीझमची वृत्ती बळावते
    आम्ही म्हणतो तेच आणि तितकेच खरे हि वृत्ती घातक आहे
    तुम्हाला हवे ते तुम्ही करा आणि काही जणाना वाटत असेल तर ते तसे करतील
    प्रत्येकाचा गणपती १० दिवसांचा कसा असणार ?

    देवाची भक्ती कशी करावी ते स्वातंत्र्य प्रत्येकाला हवेच आणि सक्ती मात्र निश्चित कशाचीच नसावी
    काहीजणाना देव आहे का नाही इथपासून सुरवात करावीशी वाटते पण हा लेख चार्वाकाचा नाही , आहे तो पुरुष सूक्ताचा ,
    ते कुणाला म्हटलेले आवडेल कुणाला नाही ,त्यात चुका आहेत असे सांगायची काय गरज आहे

    तुकाराम शैव आणि वैष्णव एकच असे सांगणारा अभंग आत्ताच वर येउन गेला आहे ,
    आता आपण त्याना सांगणार का कि शैव आणि वैदिक एक नाही हो तुकारामबुवा !
    पण संजय सोनवणी तर सारखा शंख करत असतात + आपला मूळ धर्म शैव आहे आणि नंतर वैष्णव , वैदिक आले इत्यादी .
    तुम्ही संजयचे सहकारी आहात , पण , आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ?पालथ्या घड्यावर पाणी अशी या संजयची अवस्था असते

    देवापुढे काय गावे काय म्हणावे हे सांगण्याचा आपल्याला काय अधिकार ?समाजात अनंत पंथ विचार असतात , ते बदलत बसणे शक्य आहे का ? आणि कशाला बदलायचे ?जोपर्यंत तिथे कुणी बोकड कापत नाही तो पर्यंत ठीक आहे ,कुणी म्हणतात हा बौद्ध आहे कुणी म्हणतात जैन परंपरा आहे ,हे असे चालणारच ,सारखे पिसाळल्यासारखे वागत अमुक बंद (पुरुषसुक्त )करा तमुक हलवा (दादोजी ), अमुक फेकून द्या (वाघ्याची समाधी )असे वागणे योग्य नाही असे आम्हाला वाटते

    मुसलमानी लाट आली आणि सगळे देव फोडत गेली तेंव्हा सुद्धा आपण भांडतच बसलो , आणि आज तेच चालू आहे ! आपला एकही देव खरा ओरिजनल नाही , सगळ्यांचे तुकडे जोडून परत उभे केलेले ,पण आपण मूर्तीपूजा निरर्थक आहे असे म्हणायला तयार नाही , पण आपण अमुक म्हणू नका असा ओरडा करायला मात्र लगेच तयार , ! हे समाज प्रबोधन म्हणायचे का राजकारण ?

    ReplyDelete
  5. ग्रेटच काम केले आहे
    आपण सगळ्या याद्या करायला घ्यायला काय हरकत आहे ?
    एम एस सुब्बालक्ष्मी , आणि इतर लोकांनी स्तोत्रे म्हटली आहेत , ती ऐकायला छान वाटतात ,पण एकदा संजय सोनवणी याना नेमून टाकूया ! त्यांचे शिक्का सहीने परवानगी शिवाय काहीही म्हणायचे नाही बोलायचे नाही सगळे तेच ठरवणार !पं भीमसेन लता आशा या थोर असतील पण उद्या समजा वाद निघाला कि त्याचे मूळ अर्थच समाज विरोधी आहेत किंवा रचणारा समाज द्रोही आहे तर ?सावरकरांनी म्हटले " ने मजसी ने सागरा प्राण तळमळला " , पण ते खोटे , कारण ते म्हणतोय कोण एक ब्राह्मण ,मग काढा बाजूला त्याला !लता असो नाहीतर भीमसेन असोत !

    हे सिद्धांतच अजब आहेत , हि झुंडशाहीची लक्षणे आहेत देवाच्या गाभाऱ्यात मी काय म्हणावे हे पण हेच ठरवणार , काही दिवसांनी मंगलाष्टके चुकीची आहेत , प्रेताला अग्नी देतानाचे मंत्र खोटे आहेत , बंद करा , हे भयानक आहे
    आजच्या समाजाला जागृत करण्याचे हे मार्ग नाहीत !
    आणीबाणी अजून वेगळी काय होती ?संजय सराना वाटले की मृतांचे दाफानच केले पाहिजे ,की लगेच फतवा + पारशी मुसलमान हिंदू ख्रिश्चन सर्वांनी खड्डे करत पुरापुरी सुरु करायची ,अजून अभ्यास वाढला त्यांचा आणि त्याना मोहोन्जोदारोला पुरावा मिळाला कि पुरावा नसून जाळावा असेच बरोबर आहे कि नवीन फतवा + सर्वांनी मृताला जाळावा !
    अशाने समाज घडत नाही , तुमचे संशोधन तुमच्यापाशी ,पूर्वी कुणीही ऐतिहासिक संशोधन आणि समाज प्रबोधन यांची सांगड घातली नाही आपण ज्याना मानता त्या डॉ रा चिं ढेरेनी सुद्धा असा हेका धरला नाही, एसेम नि नाही किंवा लोहियांनी नाही , जयप्रकाशांनी नाही किंवा डॉ दाभोलकर यांनी सुद्धा असा आक्रस्तळे पणा केला नाही
    अहो हे तुमचे भयानक वैगुण्य आहे
    तुम्ही कदाचित तुमच्या आजूबाजूच्या लोकात उठून दिसत असाल अशा भूमिकेमुळे , पण हे अगदीच विनाशाकडे नेणारे ठरेल नाही का ?अशाने कधीच आपले विचार तळागाळा पर्यंत पोहोचणार नाहीत
    मांढरदेवीच्या जत्रेत तुमचे कोण ऐकणार ? बहिरीच्या जत्रेत , काळूबाईच्या यात्रेत आणि शनि शिंगणापुरात तुमच्याकडे कुणी ढुंकूनही नाही बघणार ना ब्राह्मण भटाकडे !समाज हा धर्माच्या बाबतीत कुअनाचे ऐकतो असे नाही त्यामुळे त्या पुरुषसुक्त म्हणण्यालाही काही अर्थ नसतो
    त्यात आपण गुंतू नये फार तर !

    ReplyDelete
    Replies
    1. पुरुषसूक्त म्हणायला काही अर्थ नसतो तर मग त्याचे पठण थांबवण्यासाठी आक्षेप का?

      दोन्ही बाजूंनी ढोल बडवणे तुम्हाला योग्य वाटते का? भूमिका स्पष्ट घ्या.
      पुरुषसूक्त पठणाला अर्थ नसेल तर ते बंद झाले पाहिजे
      अर्थ असेल तर कारणासह सप्रमाण सिद्ध करुन सांगा हवे तर.

      मुळात पुरुषसूक्तच खोटेपणाने वेदांत घुसवण्यात आले आहे. इतर सगळा वेद पुरुषसूक्ताशी विसंगत आहे.
      मनुस्मृतीला प्रमाण मिळण्यासाठी वेदांत पुरुषसूक्ताची घालघुसड करण्यात आली आहे.

      अरे तुम्ही खुशाल म्हणा ना आम्ही वैदीक धर्मियच सर्वात बुद्धीमान आहोत. पण बुद्धी समाजाला एकत्र करण्यासाठी वापरा. तोडण्यासाठी नाही.

      Delete
    2. पुरुषसुक्तामध्ये असे कोठे म्हणाले आहे कि ब्राम्हण हे बाकी वर्णापेक्षा श्रेष्ठ आहेत किंवा असे कोठे म्हणाले आहे कि पुरुषाचे मुख हे मांडी किंवा पायापेक्षा श्रेष्ठ असते?
      हा लेख लिहिणारा किंवा त्याला समर्थन करणारे असे म्हणू शकतील काय कि एकाच शरीराचे मुख हे पायापेक्षा श्रेष्ठ असतात किंवा आहेत?
      पुरुषसुक्तामध्ये प्रत्येक वर्णाची अपेक्षित कामे किंवा वर्तन सांगितली आहेत. यात कोणी कोणाला हिणवण्याचा प्रश्न येतोच कोठे?
      कोठूनही कसलातरी संबध जोडून काय साध्य करू इच्छित आहात?

      Delete
    3. दुसर्‍याला उदाहरणांनी कमी लेखण्याची पद्धती बहुजनांना नवी नाहिये. तरीसुद्धा नेमकी ऋचा व अर्थ तुमच्या शंकेला उत्तर देण्यास सक्षम आहेत. शूद्र पायापासून का? ( पायाची वहाण हा शब्दप्रयोग किती खोचकपणे वापरला जातो हे येथे स्पष्ट करण्याची आवश्यकता नसावी)

      ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः।ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥ १०.०९०.१२
      अर्थ: तर ब्राह्मण हे त्याचे मुख होते. राजन्य हे त्याचे हस्त होते. मांड्या हे वैश्य तर शुद्र हे त्याच्या पायापसुन उत्पन्न झाले.

      Delete
    4. पायाची वहाण हा शब्दप्रयोग फार नंतर प्रचलित झाला आहे.त्याचा आणि पुरुषसूक्ताचा संबध जोडणे चुकीचे आहे.
      शुद्र पायापासून का? तर शुद्र हा समाजाचा आधार आहे म्हणून जसे पाय हा शरीराचा आधार आहे.
      अहो संपूर्ण शरीराचा विचार केल्यावर तुम्ही असे म्हणू शकाल काय कि एक भाग दुसर्या भागापेक्षा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ आहे म्हणून?
      संतानी सुधा कित्येक वेळा सांगितले आहे कि मुळात वेदामध्ये हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ असे काही नाही आहे.तुकाराम महाराज म्हणतात 'वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा येरांनी वहावा भर माथा'
      काहीतरी लोकांनी चुकीचे पायंडे पाडले म्हणून धर्माला दोष देण्यात काही अर्थ नाही.

      Delete
    5. @Sandeep Deshpande

      Koham aka who am I? - देहम नाहम कोहम सोहम!

      ह्या ब्लोग चा तू चाहता, तुला कितीही समजावून सांगितले तरी तू पाय वर करणारच!

      पाय आधार आहे तर व्हा ना तुम्ही पाय!

      असो, "वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा येरांनी वहावा भार माथा", हे तुकारामांनी कोणत्या अर्थाने सांगितले आहे हेच तुला माहित नाही! बामनांनो तुम्ही फक्त वेदांचे पाठांतर करून जणू गाढवा प्रमाणे भार वाहत आहात, वेदातील अर्थ फक्त आम्हीच जाणतो, असा त्याचा सरळ-सरळ अर्थ आहे.

      अंकुश सुळे

      Delete
    6. अरे अंकुश सुळे किती बोलतोस , जरा सभ्यपणे लिहायला वागायला शिक कि , अशाने तुझे भले होणार आहेका ते संजय सरांनाच विचार !
      सागर भंडारे म्हणतात आपल्या खुलाशात ते किती खरे आहे ते समजावून घे , येथे ब्राह्मण हे प्रतिकात्मक घ्यायचे आहे , सगळे ब्राह्मण कर्मठ नसतात , उलट आज अशी परिस्थिती आहे कि हि जातींची चौकात मोडून फेकून देण्यात ते सर्वात पुढे आहेत आज सर्वात जास्त आंतरजातीय विवाह त्यांच्यात होतात ,हे लक्षात घेतले पाहिजे
      अनेक ब्राह्मणाना आपल्या तथाकथित वेद पुराणांच्या चर्चेची शून्य माहिती असते कारण त्याना ते सर्व मान्यच नसते आणि त्यांच्या वाद वडिलाना सुद्धा म्हणून तर ते या नवीन पिढीला नवीन आधुनिक शिक्षण देतात आणि आपल्या कितीतरी पुढे ते प्रगती करतात आणि आपण शिळ्या कढीला उत आणत बसतो हि आपली शोकांतिका आहे संख्यात्मक पाहता आज भाटगिरी करणारे ब्राह्मण फारच थोडे आहेत आणि बाकी सर्व जगात नवनवे विक्रम करत आहेत
      आपल्या देशात आरक्षण लागू झाल्यावर हा देश सोडण्यात सर्वात वरचा क्रमांक ब्राह्मणांचा आहे , म्हणजेच आपल्या येथील हुशार माणसाना आपणच हा देश सोडायला भाग पाडत आहोत , आणि युरोपात त्यांचे आदराने स्वागत केले जाते
      माझ्या माहितीतील एक जन शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळवणारे शेवटी देश सोडून अमेरिकेत गेली ३० वर्षे आहेत अत्यंत उच्च पदावर ,तेथे ते संस्कृत चे महान प्रोफेसर आहेत आणि इंग्रजीतून संस्कृत शिकवतात आणि गलेलठ्ठ पगार घेतात आपल्या इथे त्याना काय मिळाले असते ? भातुरादा हा शिक्का , असेच बरेच जन आज अमेरिकेच्या नासा केंद्रात आहेत , इतके कि जर ते तो देश सोडून इकडे आले तर तिथे प्रचंड समस्या निर्माण होईल

      Delete
    7. This comment has been removed by the author.

      Delete
    8. @अंकुश सुळे: एकतर मी कोहम blog चा चाहता वैगैरे काही नाही.त्या ब्लोग वर जाऊन जर माझ्या comments निट वाच म्हणजे कळेल कित्येक वेळा मी विरोधी प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत.
      असो, तर तू म्हणतोस तसे तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या वचनांचा अर्थ बरोबर आहे.पण मग याचाच अर्थ असा होतो कि तुकाराम महाराज वेदांचे समर्थन करत आहेत आणि ते त्या तथाकथित पढतमूर्खाना सांगत आहेत कि वेदांचा चुकीचा अर्थ लावून समाजात कलह निर्माण करू नका ,किंवा समाजाचे शोषण करू नका.वेदांचा उपयोग समाजाच्या उन्नतीकारणासाठी करा.वेदांना उगीच बदनाम करू नका.
      मी पण येथे तेच सांगत आहे.कि चुकीचा अर्थ लाऊन समाजात संभ्रम निर्माण करू नका.

      राहिली गोष्ट ब्राम्हणांच्या शुद्रीकरणाची ,तर त्याची सुरवात केंव्हाच झालेली आहे.
      उदा:किर्लोस्कर लोहाराचा व्यापार करतात.
      चितळे दुधाचा व्यापार करतात.

      Delete
    9. "किर्लोस्कर लोहाराचा व्यापार करतात.
      चितळे दुधाचा व्यापार करतात."

      नाही. ब्राह्मणांच्या मनांवर शुद्रत्वाच्या जहरी आसुडाचे वळ उठल्याशिवाय शुद्रत्वाच्या वेदना काय असतात हे ब्राह्मणांना कधीही कळणार नाही. आज एखाद्या ब्लॉगवर ब्राह्मणांविषयी थोडेसे जरी वाकडे शब्द लिहिले तरी ब्राह्मणांना खटकते. मग हजारो वर्षे धर्माच्या नावावर इतरांच्या अस्तित्वाची बेमुर्वतपणे राखरांगोळी केली त्यांच्या जळणाऱ्या काळजातील जखमा किती भयानक असतील याची कल्पनाही ब्राह्मणांना येणे शक्य नाही.
      "याल तर तुमच्यासह, न याल तर तुम्हाला वगळून, आणि आडवे याल तर तुम्हाला तुडवून; आम्ही आमचा मार्ग आक्रमणारच!”

      Delete
    10. @ आप्पा बाप्पा व संदीप देशपांडे,

      मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि तुमचे ते बामणी तत्वज्ञान पुन्हा-पुन्हा उगाळत बसू नका.

      आप्पा बाप्पा तुम्ही कधी सुधारणार आहात कि नाही ते एकदा सांगून टाकाच. तुम्हाला बामन परदेशात जावून नोकरी करतो याचे चांगलेच कौतुक आहे म्हणायचे. आपल्या देशाच्या पैशाने शिकायचे आणि परदेशात जाऊन चाकरी करायची, वा रे वा ! तुमची राष्ट्रभक्ती? परदेशी लोकांची हमाली करायची आणि म्हणे आम्ही सुधारलो आहोत? तेथे वेठ- बिगारी लोकांना सुद्धा गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असतात पण आपल्या देशाला त्याचा फायदा काय? ज्यांना स्वतःच्या देशात नोकरी करायला लाज वाटते यांचा देश सोडण्यात क्रमांक एक आहे, बरोबर ना आप्पा बाप्पा !

      संदीप देशपांडे तू कोहम ब्लोगचा चाहताच नाही उद्धारकर्ता आहेस असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! काय रे बाता मारतोस बामणांची बाजू घेवून, फारच छान ! भोळ्या माणसा वेद म्हणजेच भेद, याच वेदांनी चातुर्वर्ण व्यवस्था चालू केली आणि भारतीयांच्या शेकडो पिढ्या बरबाद केलेल्या आहेत. ते जाळण्याच्याच लायकीचे आहेत, यात अजिबात संशय नाही. वार्चाक्य आणि व्यंगार्थ यातील फरक तुला कळतो कि नाही हे माहित नाही, मात्र तू संत तुकारामालाच वेदांच्या दावणीला बांधत आहेस. संत तुकारामाने वेद वाचले असल्याची शक्यता अजिबात नाही. वेद निंदा केल्या मुळेच मंबाजी आणि त्याच्या साथीदार शुद्र बामणांनी संत तुकारामाचा खून केला आणि सदेह वैकुंठाला गेल्याची कंडी पसरविली, अजूनही लोक असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवतात आहे, हे आपले दुर्दैव्य ! बामन शुद्धीकरणाचे म्हणाल तर भंग्याचा व्यवसाय का नाही करीत?

      अंकुश सुळे

      Delete
    11. @ अंकुश सुळे :संत तुकारामाने वेद वाचले असल्याची शक्यता अजिबात नाही. असे म्हणतोस म्हणजे जणू काही तुकाराम महाराजांनी जे काही अभंगात लिहिले ते उगाचच लिहिले आहे असे म्हणायचे आहे कि काय तुला.
      काय लिहितोस ते जरा विचार करून लिही. असे बोलून तू तुकाराम महाराजांचा अपमान करत आहेस.
      आता खरे चातुर्वर्ण्य म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो पटले तर बघ.
      वैदिक तत्वज्ञानामध्ये चातुर्वर्ण्य आहे म्हणून वैदिक धर्म नैसर्गिक गुणवत्ता नाकारतो असे काही लोकांचे म्हणणे आहे.
      खरे तर असे काही नाही आहे.वैदिक धर्मानुसार समाजाची विभागणी चार वर्णामध्ये होते.
      १) ब्राम्हण २)क्षत्रिय ३) वैश्य ४) शुद्र
      यामध्ये कोणताही वर्ण कोणत्याही वर्णापेक्षा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही आहे.नाही कि ते खरे आहे.
      आपल्या धर्मानुसार आत्म्याला ८४ लक्ष जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो.या मनुष्य देहाच्या आधारेच मनुष्य ईश्वरसाधना करून मोक्ष (salvation) प्राप्त करू शकतो.
      केवळ आपल्या धर्मातच नव्हे तर मुस्लिम,इसाई,शीख या सर्व धर्मात सुद्धा मोक्षप्राप्तीसाठी ईश्वर भक्तीची आवश्यकता आहे हे मान्य आहे.
      आता प्रश्न असा आहे कि मनुष्य ईश्वरभक्ती कधी करू शकतो? जर माणसाला पोटापाण्याची चिंता असेल ,त्याच्या उदरनिर्वाहाची काही शाश्वत व्यवस्था नसेल तर त्या माणसाला ईश भक्ती कर म्हणणे हे चूक आहे,नाही कि ते शक्य आहे.
      आपल्याकडे म्हणले जाते 'आधी पोटोबा आणि मग विठोबा' आणि ते खरे हि आहे.
      याउलट चातुर्वर्ण्य हि अशी व्यवस्था आहे कि ज्यामुळे मनुष्याच्या उदरनिर्वाहाची सोय हि अगदी त्याच्या जन्मापासून होते.आणि ईश्वराची साधना हि त्याला सहज शक्य होते.
      उदाहरणार्थ: सुताराच्या मुलाने सुताराचा व्यवसाय करावा अशी सूचना वैदिक धर्मामध्ये आहे.म्हणजे एकतर त्या व्यवसायाला लागणारे जे काही कौशल्य लागते त्याचे सर्व शिक्षण हे अगदी जन्मापासून त्याला घरातच मिळते.या व्यवसायात लागणारे जे काही संशोधन आहे(आजच्या काळातील masters degree ) ते अगदी सहजपणे त्याला शक्य आहे कारण जे काही मुलभूत शिक्षण आहे ते तर त्याचे झालेच आहे.अश्या व्यवस्थेत व्यवसाय विस्तार हा अगदी सहज शक्य आहे.पारंपारिक व्यवसाय टिकला पाहिजे हा आग्रह धरणारे चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध कसे करतात हे एक आश्चर्यच आहे.
      आता याला दुसरा आक्षेप कि सुताराच्या मुलाने केवळ सुतारकीच करावी,कविता करणे,धर्मशास्त्रावर भाष्य करणे अश्या गोष्टीना वैदिक धर्मामध्ये त्याला (शूद्राला) बंदी आहे.
      हे तर धादांत खोटे आहे.ईश्वरभक्तीचा तसेच धर्मशास्त्रावर भाष्य करण्याचा अधिकार हा सर्व वर्णांना अगदी सारखा आहे आणि तो आवश्यकच आहे.
      याचा पुरावा म्हणजे आपल्या ऋग्वेदातील काही रुचा ह्या जन्माने शुद्र असलेल्या ऋषींनी लिहिल्या आहेत.
      हा या परकीय आक्रमण काळामध्ये आपल्या धर्मात काही चुकीच्या चालीरीती (उच्च नीचता,अस्पृश्यता ) घुसल्या हे मान्य.पण त्याला काही धर्माचे ठेकेदार ज्यांना धर्म समजला नाही ते जवाबदार होते,धर्म नाही.
      शेवटी चातुर्वर्ण्याचा चुकीचा अर्थ लावून समाजातील काही वर्गाला हीन वागणूक देणारे तथाकथित धर्ममार्तंड आणि चातुर्वर्ण्याबद्दल चुकीची माहिती देवून वैदिक धर्माबद्दल समाजात गैरसमज पसरवणारे आजच्या काळातील तथाकथित समाजसुधारक हे एकाच मालेचे मणी
      आजकाल चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडकळीस आल्याने, आजच्या तरुणाला वयाच्या ३० वर्षापर्यंत पोटापाण्यासाठी काय करायचे आहे हेच माहित नसते, तो त्याच्या उदरनिर्वाहाच्या(career)च्या चिंतेत असतो मग व्यवसायामध्ये प्रावीण्याची तर लांबचीच गोष्ट.
      जर आयुष्याच्या निम्म्या टप्प्यापर्यंत आपल्याला काय करायचे हेच माहित नसल्यामुळे,ईश्वरभक्ती,आत्मविकास ह्या गोष्टींचा विचार सुद्धा होत नाही.
      अहो ज्यावेळी खरे चातुर्वर्ण्य अस्तित्वात होते त्यावेळी भारतात सर्वोत्कृष्ट
      कलाकृती निर्माण होत होत्या. जगात भारत हा देश सुवर्णभूमी म्हणून मानला जात
      होता. भारताच्या वैभवाच्या गोष्टी दूरदूरवर होत होत्या.देश वैभवाच्या शिखरावर
      होता.
      ज्यावेळी चातुर्वर्ण्य मोडकळीस आले त्यावेळी धर्मात वाईट चालीरीती
      घुसल्या.देशाची प्रगती थांबली आणि अधोगतीच्या दिशेने वाटचाल चालू झाली. जरा याचा विचार करा.धर्मातील वाईट चालीरीती नष्ट करूयात. उगीच धर्माच्या नावाने शंख करण्यात काय हशील.

      बघ जमले तर विचार करून.


      Delete
    12. @Sandeep Deshpande,

      "संत तुकारामाने वेद वाचले असल्याची शक्यता अजिबात नाही. असे म्हणतोस म्हणजे जणू काही तुकाराम महाराजांनी जे काही अभंगात लिहिले ते उगाचच लिहिले आहे असे म्हणायचे आहे कि काय तुला. काय लिहितोस ते जरा विचार करून लिही. असे बोलून तू तुकाराम महाराजांचा अपमान करत आहेस."-------------------->

      "तुकारामांचे वेदा विषयी विचार म्हणजे त्यांनी वैदिक पंडितांना दिलेले एक विलक्षण आव्हान होते. वेदांचा अर्थ आम्हालाच कळला आहे, हे त्यांचे म्हणणे वार्च्यार्थाने मुळीच खरे नाही, हे उघड आहे. कारण, त्यांना वेद ऐकायला, वाचायला वा शिकायला मिळालेलेच नव्हते, तर त्या वेदांच्या शब्दांचा वाच्यार्थ त्यांना त्यांना कळला वा ठाऊक असण्याचा प्रश्नच नाही. वेदांनी आपल्या शब्दाशब्दातून, वाक्यावाक्यातून नेमके कोणते तपशील दिले आहेत, हे तुकारामांना ठाऊक असण्याची शक्यताच नाही. त्यामुळे वेदांचा अर्थ ठाऊक असल्याविषयीचे विधान त्यांनी वार्च्यार्थाने केले आहे, असे मुळीच म्हणता येत नाही. त्यांचे विधान व्यंग्यार्थाच्या दृष्टीने मात्र शंभर टक्के खरे आहे, अस्सल आहे." (संदर्भ: विद्रोही तुकाराम, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ ६५)

      तू चातुर्वर्ण्य संदर्भात लिहिलेला फाफट पसारा बिलकुल पटणारा नाही.

      अंकुश सुळे

      Delete
    13. @अंकुश सुळे:तुकाराम महाराजांचे अभंग हे जर स्वतःच्या डोळ्याने जरा वाच(साळुंखे च्या चेष्म्यातून नाही) म्हणजे तुला कळेल कि तुकाराम महाराजांचे विधान वाच्यार्थाने का व्यंग्यार्थाने ?
      तुकाराम महाराजांनी पंडितांना आव्हान दिले हि गोष्ट खरी आहे. पण त्यांना वेद माहिती नव्हते हि गोष्ट मान्य करण्यासारखी नाही.
      दुसरे म्हणजे "वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा येरांनी वहावा भार माथा" असे एकाच ठिकाणी तुकाराम महाराज वेदांचा उल्लेख करीत नाहीत तर त्यांच्या अभंगांमध्ये ठायीठायी असे वेदांचे संधर्भ मिळतात.
      खालील काही उदाहरणे बघ
      १.यातायातीधर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ॥१०॥
      २.वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाचि शोधिला ॥१॥
      विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम गावे ॥धृ॥
      ३.चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥१०१
      ४.तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥९॥
      ६०७ पृ १०९
      मी वर सांगितल्याप्रमाणे कोणताही पूर्वग्रह न ठेवता डोळे उघडे ठेवून तुकारामांचे अभंग वाच म्हणजे महाराजांचे विचार समजतील.
      बाकी डॉ. आ. ह. साळुंखे हे काही संत नाहीत त्यामुळे त्यांचे संतांविषयी चे मत गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही.संताची वाणी समजायला एकतर संत असावे लागते नाहीतर किमान भक्त तरी.
      आणि शेवटी तू म्हणतोस कि मी सांगितला चातुर्वण्याचा अर्थ तुला काही पटला नाही तर तो तुला पटावा म्हणून मी सांगितलेला नाही तर जो खरा अर्थ आहे तो सांगितला आहे.
      कदाचित तुला तो अर्थ पटला हि असेल पण तो कबूल करण्याची तुझी इच्छा दिसत नाही कारण तुझ्यात ती साळुंखे ची पुस्तके वाचून द्वेष भरला आहे.
      असो,जसा वेळ जाईल तसा द्वेष कमी होईल आणि तुला तो अर्थ पटेल अशी मी आशा बाळगतो.

      Delete
    14. @Sandeep Deshpande,

      तू ज्या गाथांचा संदर्भ इथे दिला आहेस तो तुझा तुकारामांनी वेद वाचले किंवा ऐकले होते यापैकी काहीही सिद्ध करू शकत नाहीस. डॉ. आ. ह. साळुंखे या बहुजन विचारवंताच्या नखाचीही सर तुला येणार नाही. संत तुकारामाने ज्या गाथा लिहिल्या त्या संतांसाठी किंवा भक्तांसाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा घ्यास धरून आणि त्यांना समजतील अशा साध्या, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत, हे कोणीही अमान्य करणार नाही. तू दिलेल्या गाथा पुन्हा एकदा निष्कपट, निपक्षपाती वृत्तीने वाच आणि त्याचा अर्थ जाणं, वेदाबद्दल संदर्भ ज्या-ज्या गाथा मद्धे आला आहे तो वेदांची थोरवी गाण्यासाठी नव्हे तर विठ्ठला वरील प्रेमापोटी, तसेच त्यांचे महात्म्य वेदांपेक्षाही कितीतरी वरचढ आहे हे दर्शविण्यासाठी !

      तुला बहुजनद्वेषाची कावीळ झालेली आहे म्हणून तुला सर्वकाही पिवळेच दिसतं आहे.
      कोणाचीही पुस्तके वाचून मनामद्धे द्वेष भरत नसतो. तुला तसा अनुभव असेल तर तो तुझा दोष आहे, माझा नाही, हे तू लक्षात ठेव. तुझे ते वेद आणि चातुर्वर्नाचे तुणतुणे आता बंद कर, त्याने कोणाचाही फायदा होणार नाही.

      तुझे जातभाई ह.भ.प. स.के. नेऊरगावकर (श्रीतुकाराम महाराजांची सार्थ गाथा) तुकारामांच्या गाथांचा अर्थ किती विचित्र पणे लावतात त्याचे एक उत्तम उदाहरण तुला देतो. ती गाथा अशी

      महारासि सिवे । कोपे, ब्राह्मण तो नव्हे ॥ १ ॥
      त्या प्रायश्चित्त काही । देहत्याग करिता नाही ॥ २ ॥
      नातळे चांडाळ । त्यांच्या अंतरी विटाळ ॥ ३ ॥
      ज्यांचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याति ॥ ४ ॥ ५५

      नेऊरगावकर यांनी सांगितलेला (ब्राह्मणी) अर्थ : ज्याचे अंतःकरण क्रोधारूपी महाराला शिवले आहे तो ब्राह्मण, ब्राह्मण राहत नाही. त्याने देहत्याग जरी केला तरी (क्रोधरुपी) पापा पासून सुटका नाही, त्या प्रायश्चित्ताने तो शुद्ध होत नाही. त्या चांडाळाला शिवू नये. त्याचा विटाळ त्याने अंतरात बाळगला आहे तू. म. म्ह. चित्तांत ज्याची संगती असते, ती त्या पुरुषाची जाती आहे असे समजावे.

      खरा (निपक्षपाती) अर्थ: महार व्यक्तीला शिवाल्यानंतर जो संतापतो, तो ब्राह्मणाच नव्हे. त्याने केलेल्या रागावण्याच्या पापाला त्याने देहत्याग केले तरी प्रायश्चित्त नाही. हा ब्राह्मण चांडाळाला स्पर्श करीत नाही. कारण त्याच्या स्वतःच्याच अंतःकरणाला विटाळ असतो. तू. म. म्ह. मनामद्धे ज्याच्या विटाळ असतो, त्याचीच जात माणसाला प्राप्त होते.

      हे लोक कसा अर्थाचा अनर्थ करतात त्याचे एक साधे उदाहरण आहे. अशा अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांना संत तुकारामाच्याच भाषेत असे म्हणावेसे वाटते ...

      तुका म्हणे ऐशा नरा । मोजून माराव्या पैजारा ॥

      आता तुझ्यातील बहुजनद्वेष संपुष्टात येईल अशी आशा करतो.

      अंकुश सुळे

      Delete
    15. Ankush Sule Sir,

      Congratulations Sir !

      Thanks for your precious comment ! You are really great ! We are along with you ! Keep it up !

      Sanjay Sir, please, you also support him !

      Avinash, Thane.

      Delete
    16. This comment has been removed by the author.

      Delete
    17. This comment has been removed by the author.

      Delete
    18. @अंकुश सुळे :डॉ. साळुंखे हे विचारवंत आहेत याबद्दल दुमत नाही त्यामुळे त्यांच्या नाखाचीच काय कशाचीही सर मला येणार नाही.त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण आहे याची मला जाणीव आहे.परंतु ते संत नाहीत त्यामुळे त्यांचे याबाबबताचे मत ग्राह्य धरत येणार नाही इतकेच मला म्हणायचे आहे.
      असो माझे म्हणणे तुला कितपत समजले याबाबाबत शंका आहे.
      दुसरे म्हणजे विठ्ठलाचे महात्म्य तर आहेच रे आणि वेद तर त्याचेच महात्म्य समजावून सांगतात.शेवटी वेद हे देवाचे महात्म्य सांगण्यासाठीच आहेत.आणि वेद हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे मी काय कोणीच असे कुठेही म्हणाले नाही त्यामुळे तुझ्या त्या स्पष्टीकरणाला पण अर्थ नाही.
      तुकाराम महाराजांनी इतक्या ठिकाणी वेदांचा संधर्भ दिला आहे आणि तरी तू म्हणतोस त्यांनी वेद वाचले किंवा ऐकले असण्याची शक्यता नाही.मग काय यमक जुळवण्यासाठी वेद शब्द वापरला का काय?आणि तसे असेल तर 'वेद' च का 'नाद ,दाद ' असे शब्द पण वापरले असते.त्यामुळे तुझा दावा निरर्थक आहे.
      राहिला प्रश्न जातीयवादाचा तर तुझा जातभाई हा शब्द आणि डॉ. साळुंखे यांच्या नावामागे बहुजन विचारवंत हा शब्द बघून कुणाला जाती द्वेषाची कावीळ झाली आहे हे स्पष्टच आहे.
      आता जातीवर आलाच आहेस तर तुकाराम महाराजांचा पुढील अभंग पण वाच.
      पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचे ॥३॥
      ४६०० पृ ७७४ (शासकीय)
      यामध्ये महाराज वेद आज्ञा म्हणतात.नीट वाच.
      आणि हो इथे महाराजांना योग्य ब्राम्हण म्हणजे जो शास्त्राने सांगितलेला धर्म पाळतो तो धर्म अपेक्षित आहे.कोणीही नाही.
      मला वाटते तू सांगितलेला अभंग योग्य आहे
      तुका म्हणे ऐशा नरा । मोजून माराव्या पैजारा ॥
      जरा दोन घे मारून स्वतःला म्हणजे सूडबुद्धी कमी होईल.
      आणि बहुजन द्वेष काय आणि कोणताही द्वेष काय तो तर माझ्यात नाहीच त्यामुळे नष्ट होण्याचा प्रश्न नाही.

      Delete
    19. संदीप देशपांडे ह्या मुर्खाला हेही माहित नाही की ब्राह्मण सोडून कोणालाही (उर्वरित त्रीवर्नियांना) वेद वाचायला, एकायला बंदी होतो! वेद वाचल्यास जीभ छाटावी आणि ऐकल्यास कानात गरम शिसे किंवा गरम तेल ओतावे अशी स्मृतींमद्धे आज्ञा आहे.

      Delete
    20. अहो अतिमूर्ख अनामिक,
      अशी शिक्षा कोणत्या स्मृतींमध्ये आहे ,जर संदर्भ द्याल का?
      आणि अशी शिक्षा इतिहासात कोणाकोणाला झाली ? त्याची पण माहिती द्या.

      गिरीश पाटील.

      Delete
    21. अरे अति-अतिमूर्ख भटा,
      पाटील (?) ब्राह्मणा! तुला सगळे रेडीमेड पाहिजे काय? जा मनुस्मृती उघड आणि शोधत बस संदर्भ. तुझ्या आजोबांच्या चुलत भावाला आणि मावस भावाला या शिक्षा मिळाल्या होत्या? तू नावे विचारशील म्हणून अगोदरच त्यांची नावेही सांगून टाकतो पहिला कोंडीबा आणि दुसरा धोंडीबा?

      Delete
    22. अरे अनामिका,
      तुझ्या डोक्यात कोंडा झालेला दिसतो ,घे हाणून डोक्यात एक धोंडा म्हणजे येईल थोडी अक्कल . मनुस्मृती मध्ये असले काहीही नाही आहे.

      Delete
    23. @ Anonymous March 14, 2014 at 11:12 AM

      हरामखोरा तुला मनुस्मृती उघडायचीच नाही काय? मुर्खा तू जाणून-बुजून नाटक करत आहेस. वेड्या कदाचित तुझ्याकडे मनुस्मृतीच नसेल, ग्रंथालयात जाऊन संदर्भ का तपासत नाहीस? जरा डोक्याला खुराक दे म्हणजे झाले! शोध म्हणजे सापडेल!

      Delete
    24. संदीप देशपांडे,

      अंकुश सुळे यांनी लिहिलेल्या प्रतिक्रियेतील शेवटच्या भागावर तू सोयीस्कर पणे डोळेझाक केलेली आहेस!

      "वेद निंदा केल्या मुळेच मंबाजी आणि त्याच्या साथीदार शुद्र बामणांनी संत तुकारामाचा खून केला आणि सदेह वैकुंठाला गेल्याची कंडी पसरविली, अजूनही लोक असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवतात आहे, हे आपले दुर्दैव्य !"

      यावर काहीच का लिहिले नाहीस, याचा अर्थ हे तुला पूर्णतः मान्य आहे आणि माहीतही आहे, नाही काय?

      अविनाश, ठाणे

      Delete
    25. देशापांड्या, अरे ते शुद्धीकरणाचे काय झाले? भंगी झालास काय?, कि लोहार-गवळीच रहायला आवडेल, किर्लोस्कर-चितळे प्रमाणे?

      Delete
    26. @ Anonymous March 14, 2014 at 11:12 AM

      अहो, याला मनुस्मृतीतील संदर्भ कोणीही देत नाही, बिचारा न शोधताच दमला!

      हे घे संदर्भ :

      मनुस्मृती श्लोक क्र. ८.२७२, २.११६, ४.९९, ४.८० आणि ४.८१.

      Delete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. शिकण्याचे, शिकवण्याचे व धर्माविषयी बोलायचे अधिकार ब्राह्मणांकडे असल्यामुळे, तेव्हाच्या काही कपटी ब्राह्मणांनी इतरांच्या नकळत ऋग्वेदात पुरुषसुक्त मिसळलं. त्यामुळे लोकांना असं वाटू लागलं की हे देवानेच सांगितलेलं आहे आणि याला आपण अमान्य करूच शकत नाही; कारण आर्यांच्या टोळीने लोकांना भुरळ पडली होती की वेद - पुराण हे देवाने लिहिले. मग "धर्माने"(?) सांगितल्याप्रमाणे लोक वागू लागले.

    ReplyDelete
  8. आर्य या भूमीत आले. त्यांनी वेदावर आधारित 'वैदिक' संस्कृती उभी केली. या संस्कृतीच्या केंदस्थानी आलं, 'पुरुष सुक्त.' त्यातून उभी राहिली ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य, शूद अशी समाजरचना. एकानं फक्त ज्ञान मिळवावं, एकानं फक्त लढावं, एकानं फक्त व्यापार करावा, एकानं फक्त सेवा करावी. या एकाधिकारशाहीतून रुजली केवळ विषमतेची बीजं. माणूस विभाजित झाला. उभी राहिली विविध जातवार सांस्कृतिक बेटं. प्रत्येकाचा देव वेगळा! देऊळ वेगळं!

    ReplyDelete
  9. What a chaos? Why could the Brahmins not give a uniform, and consistent explanation of the origin of the four Varnas? On the issue of who created them, there is no uniformity. The Rig-Veda says the four Varnas were created by Prajapati. It does not mention which Prajapati. One would like to know which Prajapati it was who created the four Varnas. For there are so many Prajapatis. But even on the point of creation by Prajapati there is no agreement. One says they were created by Brahman. Another says they were created by Kassyapa. The third says they were created by Manu. On the issue how many Varnas, the creator—whoever he was— created, again there is no uniformity. The Rig-Veda says four Varnas were created. But other authorities say only two Varnas were created, some say Brahmans and Kshatriyas and some say Brahmana and Shudras. On the issue the relations intended by the creator for binding together the four Varnas the Rig-Veda lays down the rule of graded inequality based on the importance of the part of the creation from which the particular Varna was born. But the white Yajur-Veda denies this theory of the Rig-Veda. So also the Upanishad, Ramayana, Mahabharata, and Puranas. Indeed the Hari Vansha goes to the length of saying that the Shudras are twice born. This chaos seems to be the result of concoction of the theory of Chaturvarna which the Brahmins quietly singled into the Rig-Veda contrary to established traditions? What was the purpose, what was the motive of the Brahmins who concocted this theory?

    ReplyDelete
  10. संजय सरांनी खूप कष्ट करून हा लेख लिहिला आहे आणि त्यावर टिपण्णी करताना अनेकांनी सुंदर मते नोंदवली आहेत त्यामुळे एक गंभीर मुद्दा निर्माण झाला आहे तो म्हणजे " मुळात अशी बंदी घालावी का ? "एकदा का असे सत्र सुरु झाले की आपल्या धार्मिक नेत्यांना आपल्या समाजाला वेठीस धरायला वेळ लागणार नाही . तुम्ही ज्याला नाही म्हणता ते सोडा बाकीवर आमचाच अधिकार आहे असा सिद्धांत निर्माण होईल असे अनेक मुद्दे जाणवतात
    आजचा संपूर्ण हिंदू समाज अजिबात ब्राह्मण वर्गाच्या कह्यात नाही त्यांचे जातीनिहाय कप्पेअसुन त्यांचे जात पंचायती प्रमाणे निवाडे होतात
    एकाने छान शब्द वापरला आहे सगळ्यांचेच गणपती १० दिवसांचे कसे असतील ?भालचंद्र नेमाडे यांची हिंदू कादंबरी असेच कोडे घातल्या सारखे प्र्श्नचिन्ह उभे करत पुढे सरकते , ते फिक्शन म्हणून ठीक वाटते , पण ब्लोगवर एखादी गोष्ट बंद करा असे आवाहन करणे कितपत योग्य आहे ?आपण प्रथेशी निष्ठा राखतो हेच आपल्या समाजाचे सत्यरूप आहे कुणीतरी बाहेरच येऊनच कायदे करून आपल्यात बदल घडवतो ,सतीची चाल ,बाल विवाह अशी उदाहरणे देत येतील ज्या भारतीयांनी पुढाकार घेतला ते सर्व इंग्रजी शिक्षण घेतलेले होते
    आपण जर एखादी गोष्ट वाईट म्हणतो ती अन्यायकारक आहे का ते तपासले पाहिजे , कुणीतरी अगदी योग्य मुद्दा काढला आहे कि मुख आणि मांडी पाय त्यादि कल्पना या वाइतच का ? त्याकडे सिम्बोलिक नजरेने आपण का बघू शकत नाही ?खरेतर आपण या पुरुष सुक्ताशी काहीच संबंधित नसतो पण उगीचच असे रणांगण माजवले तर मग चर्चेला उधाण मात्र येते
    आजकाल डिग्री पोस्ट ग्रज्युएशन आणि स्पेशलायझेशन यामुळे शिक्षणात अत्यंत स्पर्धा असते ती बाजूला ठेवत असल्या पुरुषसुक्त सारख्या प्रकाराकडे कोण बघणार आणि किती ?
    आजच्या तरुणांना गरज आहे ती अशा विषयातील मार्ग दर्शनाची , अमुक जत्रेत आणि तमुक मंदिरात काय चालते आणि ते कसे धर्मात भेद वाढवणारे आहे ते अगदी टिपून टिपून सांगत बसण्याची गरज नाही आजकाल तरुण वर्ग जी म्याट टोफेल इत्यादीमध्ये जास्त रस घेत असतो त्याना या सुक्त इत्यादींचे काहीही कौतुक नाही त्यामुळे
    कुणीतरी तुकाराम बुवांचा अभंग दिला हे ते अगदी बरोबर आहे
    संजय सर शैव वैष्णव वाद करत बसतात पण ते कितपत ठीक आहे ?
    प्रत्येक जातीत जर आपापले धार्मिक कृत्य सांगणारे निर्माण झाले तर मग ब्राह्मणांचे महत्वच नष्ट होईल हा साधा मार्ग आहे

    ReplyDelete
  11. अहो सागरसाहेब भंडारे ,
    फारच रिजिड विचार आहेत की हो तुमचे ,असं नसाव ,
    तुम्हीतर इतके थोर , गहन विचारवंत ! पण विचारचक्र सतेज असत तर आपण महान कार्य करू शकाल हि खात्री आहे
    समजा वेदातून पुरुषसुक्त वगळले तर ? पण ते कसे वगळणार ?
    पण आमचे म्हणणेच असे आहे की स्वच्छ होऊन सगळेच मागचे विसरून जा एका अदृश्य कपाटात बंद केल्यासारखे , त्याचा आपला काहीही संबंध नाही ! आणि तुम्हीच आता सांगाहो , खरच आपला आणि या वेद पुराणे उपनिषदे यांचा काहीही रोजच्या जीवनात संबंध येतो का ? ,बसमध्ये रेल्वेत आणि सार्वजनिक ठिकाणी आपण सर्व भारतीय म्हणूनच वागत असतो हे प्रगतीचेच लक्षण मानले जाते + अदोगातीचे नाही , मग ही वृत्ती जोपासली जाते तिचे स्वागत करायचे सोडून आपण काहीतरी खुसपट काढल्यासारखे समाजातून शोधून काढत ओरडा करत असतो ते कशाला ?
    आज अनेक समस्या आहेत त्यावर सोडून हीच टिमकी का वाजवत बसतात संजय सोनावणी ?
    आम्हाला तर या पुराणांची आणि वेदांची नावेही माहित नाहीत आणि त्यात काय आहे हे जाजून घेण्याची इच्छाही नाही कारण झाले गेले गंगेला मिळाले
    सर्व ब्राह्मण वर्गाने एका भव्य पटांगणावर उभे राहून क्शमायाचनेचा कार्यक्रम करावा असा काहीतरी विचार का सुचवत नाही कोणी ?तशाच मनोवृत्तीचे हे संजय सरांचे लिखाण असते आणि त्यामुळे ते जास्त भंपक आणि विनोदी वाटू लागते अगदी ठरवलेच तर असे ब्राह्मणांचे अनेक लाखो दोष मांडणे अवघड नाही , पण त्यांनी आपले काय भले होणार आहे ?सर्व मंदिरे आणि समाधी मंदिरे यावर असे बरेच काही सांगता येईल ,
    मागे मी याच ब्लोगवर कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरा बाबत वाचले होते
    बायकाना विटाळ असतो म्हणून त्याना प्रसादाचे लाडू करायला बंदी असते ते काम फक्त पुरूषाच करतात ,आता हा विचार मागास आहे का पुढारलेला ?आपण त्यात लक्ष घालून त्याचा निषेध का करत नाही ?

    संजय सर किंवा त्यांचा पंथ मित्र परिवार यांचा एक दोष असा आहे +
    त्यांनी आधुनिक विचार असलेल्या वर्गाची नोंद घेतलेली नाही त्यामुळे त्यांचा असा समज होतो की सगळीकडे ब्राह्मण वर्गाने धुमाकूळ चालवला असून सर्व समाज त्यांच्या मुठीत आहे आणि त्यांची मनमानी आता समाजाला उसासारखे चरकातून पिळून काढत आहे पार चिपाडे झाली आहेत ,पण तसे काहीही नाही ,
    सत्य काय आहे ? फार वेगळेच आहे तळागाळातल्या लोकाना डॉ आंबेडकरांना अपेक्षित जागृती आली आहे का ?त्यांच्यावर पिढ्यान पिढ्या अन्याय झाला आहे तो कोणी केला ?हजारो लाखो खेड्यात पसरलेल्या समाजावर मुख्यत्वे जमीनदार आणि उच्च शेतकरी वर्गाचा अंमल असतो हे सत्य नाकारता येते का ?राजे क्षत्रिय , त्याना समाजावर अंकुश ठेवायची जबाबदारी सोपवलेली असते , मग इतक्या पिढ्या ते काय करत होते ?ब्राह्मण वर्गाला इतके मोकळे रान मिळण्याचा दोष खरेतर या क्षत्रिय वर्गाकडे जातो पण आजकाल अशी फ्याशन आहे की सवर्ण म्हणायचे आणि ब्राह्मणाना झोडपायचे
    संजय सरांनी ह मो मराठे यांच्या बरोबर जो वाद घातला होता तो असाच होता
    दुसरा मुद्दा
    कोणताही मुद्दा सिद्ध करताना आंदोलन केलेच पाहिजे हि विचारसरणी आता कालबाह्य झाली आहे .
    पूर्वी म गांधी यांनी जशी आंदोलने केली किंवा लेखन केले तसे लेखन आज बघायलाही मिळत नाही
    डॉ आंबेडकरांनी जसे लेखन पावित्र्य सांभाळले तसे आज कुणीही पाळत नाही
    आजकाल सर्व भडक आणि कर्णकर्कश्य! जितके भडक तितके अधिक परिणाम कारक असे अजिबात नसते उलट म गांधी यांचा सोप्या मांडणीमुळे विचारांचा ठामपणा जास्त अधोरेखित होत असे म्हणून अए सांगावेसे वाटते , आपण थोडेसे अंतर्मुख होणे आवश्यक आहे कारण आजकाल प्रत्येक मत मतान्तराच्या मागे अनेक विपर्यस्त भूमिका असू शकतात आणि मुल विचारच कुणाचेतरी बटिक बनतात
    आज आठवले आणि शिवसेना भाजप एक होतात हे त्याचे उत्तम उदाहरण आहे ,
    रामविलास पासवान यांचे राजनाथ सिंह यांच्या बरोबरचे उपकृत लाजिरवाणे हसणे सहन होत नाही ,म्हणून असे म्हणावेसे वाटते की विचारात सुद्धा भ्रष्टाचार आला तर काय करायचे ?

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. सर्व ब्राह्मण वर्गाने एका भव्य पटांगणावर उभे राहून क्शमायाचनेचा कार्यक्रम करावा असा काहीतरी विचार का सुचवत नाही कोणी ?

      अनामिक महोदय
      तुमचा बहुतेक प्रचंड गैरसमज होतो आहे. अर्थातच तुमच्या वरील विधानाशी पूर्ण असहमत आहे आणि आक्षेपही.
      येथे ब्राह्मण संबोधताना पुरुषसूक्ताबद्दलच मर्यादीत ठेवावे ही अपेक्षा आहे. पुरुषसूक्तात असे म्हटल्यामुळे ज्या ब्राह्मणांनी कावेबाजपणे बहुजनांना लुबाडले व हीन दर्जा देऊन स्वतःचे वर्चस्व निर्माण केले त्या प्रवृत्तीबद्दलचा हा लेख आहे. सरसकट सगळ्या बामणांना बडवा असे ना संजय सर म्हणत आहेत , ना मी म्हणत आहे वा ना कोणी बहुजनही म्हणत आहे. ही ब्रिगेडी विचारधारा आहे. त्याच्याशी किमान माझा तरी कोणत्याही प्रकारचा संबंध आलेला नाहिये. येण्याची शक्यता स्वतः मलाही वाटत नाहीये.
      प्रवृत्तींना विरोध आणि अमका या जातीचा आहे म्हणून केलेला विरोध या दोन्हींत दोन टोकांचे फरक आहेत.
      संजय सर असो वा मी , आम्ही प्रवृत्तींना विरोध करतोय. पूर्वीच्या चुका करणारे गेले. त्यासाठी आजच्या ब्राह्मणांना जबाबदार धरण्याचा मूर्खपणा कोणीही करणार नाही. पण दुर्दैवाने आजही समाजात असे अतिअभिमानी लोक आहेत. त्यांना आजही लक्ष्य केले जाईल व पुढेही केले जाईल.

      Delete
    3. दुसरे असे की समाजात होत असलेल्या चुकांवर सकारात्मक चर्चा केली नाही तर आपण कोणत्या अधोगतीच्या दिशेला जातोय ते कधीही कळू शकणार नाही. मी चुकतही असेन. पण सर्व बाजूंनी विचार केला नाही तर तुमचे बरोबर आहे का चूक हे कधी कळणार?

      Delete
  12. अजून नेहमीची भंकस ग्यांग कशी उतरली नाही मैदानात ?
    त्यांची विदिकाडीची सोय झालेलो दिसत्ये दुसरीकडे
    आता इलेक्शन आल्या की अजूनच विचारांचा दुष्काळ सुरु होईल
    ब्रिगेडी आणि अपावि ला तर वेळच नसेल
    पण त्या मराठा आरक्षणाचे काय झाले ?
    अरेरे
    जातानि बाजी मारली
    आपला कुठेच वट नाही अरेरे

    ReplyDelete
  13. SANJAY SONAWANI YANCHYAPRAMANE ANEK LEKHAK(TATHAKATHIT)

    ASE WAD PRASIDDHI SATHI UTHAWATAT.TYANA PRATIKRIYA NA DENE

    WA TYANCHYA KADE DURLAKSH KARANE.

    ReplyDelete
  14. जोपर्यंत देवळांत भटजी बसलेले आहेत तोपर्यंत पुरुषसूक्त असले काय आणि नसले काय त्याने काहीही फरक पडणार नाही हे कळण्याइतकी बुद्धी सोनवणी यांच्याकडे नक्कीच आहे. पण मूळ मुद्द्याला बगल द्यायची आणि साप साप म्हणून दोरालाच धोपटत राहायचे हे धोरण असल्यावर दुसरे काय होणार?

    वैदिक मंत्र हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये म्हटले जाऊ नयेत याचाच दुसरा अर्थ ब्राह्मणेतरांना वैदिक मंत्रांचा म्हणजेच वेदोक्ताचा अधिकार नाही असाच होतो. म्हणजे ब्राह्मण सोडून इतर सर्व (म्हणजे निव्वळ दलित नव्हे तर स्वत:ला क्षत्रिय समजणारे सर्वच बरे का! ) हे शूद्र आहेत असा होतो. म्हणजे फुले, शाहू यांचा समतेसाठीचा लढा व्यर्थ होतो.
    जर खरोखरच वैदिकांना (म्हणजे भटांना) शह द्यायचा असेल तर वेद आणि ब्राह्मण या दोन्हींचे वर्चस्व नाकारणे हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. तथागत बुद्धापासून महात्मा जोतीराव फुल्यांपर्यंत सर्वांनी तोच मार्ग स्वीकारला आहे.

    ब्राह्मणांचे येथे नाही प्रयोजन | द्यावे हाकलून जोती म्हणे ||
    ( संदर्भ - ब्राह्मणांचे कसब
    ब्राह्मण जोशी शूद्रांच्या लग्नात त्यास कसा लुबाडतो याविषयी - जोतीराव फुले)

    ReplyDelete
  15. एकुणात हा लेख म्हणजे एक उत्कृष्ट निबंध आहे त्या बद्दल आपल्या संजय सोनवणी आणि अनानिमास च्या दर्जेदार प्रतिक्रियांचे कौतुक करावे तितके कमीच !
    श्री सागर भंडारे आणि श्री संदीप देशपांडे यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ,
    आम्ही आमच्या शंका मोकळेपणे सांगत आहोत ,त्यात संजय वर थोडी टीका असणे अपरिहार्य आहे याची सखेद जाणीव आहे !
    आमच्या जागी तुम्ही आहात असे समजून आम्हाला सजून घ्या हि विनंती

    आप्पा = या बाप्पा ,बसा , हे लोक आपलीच वाट बघत असतील
    बाप्पा = ते तोतया आप्पा बाप्पा पण हिंडत असतात
    आप्पा = आपला सागर भंडारे किती मन लाऊन लिहितो
    बाप्पा = संजयने एकेक माणूस लाख मोलाचा जोडला आहे
    आप्पा = तू काय म्हणतो आहेस , मन मोकळ कर अरे आपलीच माणस आहेत सगळी ,
    बाप्पा = मला सगळ समजत नाहीरे , थोडफार समजत असं वाटे पर्यंत संजय सर दुसरा मुद्दा मांडतात , सगळाच गोंधळ उडतो आता हेच बघ ना शैव वैदिक , वेद ४ वर्ण +वर्ग सांगतात आणि सुरवातीला श्रम शक्ती प्रमाणे वर्गवारी झाली आणि पुढेपुढे जन्मावर ती आधारित होत गेली असे सर्व साधारणपणे संजयचे मत आहे आणि याला ब्राह्मण वर्ग जबाबदार आहे अशी या सर्वांची तक्रार आहे - कळल का ?आता माझी शंका अशी आहे की राज्य शकटात राज्य निर्माण करणारा भोगणारा आणि शासन करणारा शासक कोण होता ?ब्राह्मण का क्षत्रिय ?
    आप्पा = आल लक्षात , म्हणजे थोडक्यात म्हणजे तुला म्हणायचंय की राजाला सुपर पॉवर असताना त्याला ब्राह्मणाकडून (?) इतर प्रजेवर होणारा अन्याय दिसत नव्हता का ?असच ना ?
    बाप्पा = तेच ते , आजचे राज्यकर्ते तेच करत आहेत
    आप्पा = फेकून द्या त्या पोथ्या ,अहो आप्पा , इतकी चर्चा इतिहास संशोधक करत नाही शेजवलकर,य दि फडके किंवा सरदेसाई , रा चिं ढेरे उपाय सुचवत ओरडा करत नाहीत , ते इतिहास संशोधन करतात !अभ्यास हे एक व्रत आहे !
    बाप्पा = मग आपले संजय सर काय करतात ?
    आप्पा = ते संशोधन ,प्रतिक्रिया आणि साधक बाधक चर्चेला सामोरे न जाता संशोधनाचे भांडवल करून त्यातून एक चळवळ उभी करू बघतात आणि तिचे टार्गेट ब्राह्मण वर्ग असतो
    बाप्पा = म्हणजे यांचे तथाकथित संशोधन पूर्व ग्रह दुषित असते की काय ?
    आप्पा = तसा संशय तरी येतो आहे !
    बाप्पा = विषमतेच्या लढ्यात आर्थिक गोष्टी आणि धार्मिक गोष्टी यातील काय जबाबदार असते आणि आर्थिक विषमता दूर करताना कोण आड येतो हे तपासणे गरजेचे नाही का + का तिथेपण पळी पंचपात्र घेऊन याना ब्राह्मणाच आडवा येतो असे वाटते ?
    आप्पा = एकुणातच मागे वळून बघताना म फुले यांनासुद्धा असे वाटले नाही कि पाटीलकी + देशमुखी हीच खरेतर गरिबांच्या हाल अपेष्टांना जबाबदार आहे , ते सारखे ब्राह्मणा वरच घसरत असत !
    बाप्पा = आजच्या शासन कर्त्या मराठा वर्गाला हा प्याटर्न सोपा आणि सोयीचा आणि हमखास यश देणारा वाटतो म्हणूनच सगळ्याचे खापर ब्राह्मण वर्गावर फोडायचे सोयीचे संशोधन संजय सारखे तथाकथित इतिहासकार करत असतात
    आप्पा = बाकी कुणीही केले नसेल इतके नथुराम गोडसेने ब्राह्मणांचे अमाप नुकसान केले आहे आणि त्यांना समाजकारणातून बाहेर फेकण्यास तोच जबाबदार आहे !
    बाप्पा = एवढे होऊनही आज ब्राह्मण वर्ग नवनवीन वित्तीय आणि इतर क्षेत्रात रेकोर्ड बनवत जगात आपला ठसा उमटवत आहे
    आप्पा = ते अपरिहार्य आहे , इथे जर अन्याय होत असेल तर रडत बसण्याची त्याब्ची वृत्ती नाही ,ते बाहेर पडून नवी क्षितिजे , नव्या सीमा काबीज करतील
    बाप्पा = या देशाला त्यांची किंमत नसेल तर ते तरी दुसरे काय करणार ?

    ReplyDelete
  16. @All Supporters of Purushsokt:- वेदामधुनाच विषमता जन्माला आलेली स्पष्ट दिसते. संतांचा लढा याच विषमते विरुद्ध होता तरीही तुमचे रटने चालूच आहे! वेदंमधे मनुष्य कल्यानाच्या गोष्टी कोणत्या आहेत? अहो त्यात तर केवळ वैदिक पुरोहितान्ना आजन्म पुरतील असे ऋचा दिलेल्या आहेत ज्याच्या जिवावर पुरोहित शाहिचा ढाचा वसलेला आहे!
    पुरुषसूक्तात येणा-या कोनत्याही देवतेला एकही हिंदू पुजत नाही...मग हिंदुंच्या अवैदिक देवतांत या सुक्ताचे काय काम?

    ReplyDelete
  17. गव्हाच्या किती जाती आहेत ? आंब्याच्या किती जाती/ प्रकार आहेत तशी विषमता हि निसर्ग निर्मित आहे जे निसर्गाला ईश्वर मानतात ते विषमतेस ईश्वरप्रणीत मानतात. काळे पांढरे पिवळे गव्हाळ हे मानवी त्वचेचे वर्ण वेदांनी निर्माण केलेले नाहीत . सोनावानेना एड लागले आहे म्हणून ते काहीही विचार मांडतात आणि ते विचार ब्राह्मण विरोधी असले पाहिजेत याची काळजी घेतात कारण त्यावर पुस्तके लिहून समाजात द्वेष पसरवून त्यांना स्वतःचे पोट भरायचे आहे . ब्राह्मणान विरुद्ध भुकले नाही तर यांना कोणीच विचारणार नाही. राज्यघटनेने दिलेल्या धार्मिक अधिकारांवर बंधन घालण्याची भाषा करणारे सोनावणे भारतीय राज्याघातानेचा अपमान करीत आहेत त्यांच्या या निर्लज्ज पणाला सलाम त्यांनी राज्यघटना अशीच पायदळी तुडवत राहावी हि त्यांना नम्र विनंती आणि हो ....... हिंदू धर्म नष्ट करण्याची सुपारी घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

    ReplyDelete
  18. परिणामांचा विचार न करता , मंत्र-तंत्राचा अर्थ समजाउन न घेता आत्मघातकी विचार तोंडी येतातच कशा आपल्या ? आपण खरच सुशिक्षित झालेलो आहोत काय ?वेद यांच्यातील चातुर्वर्ण तत्वाने हिंदू धर्माचे अतोनात नुकसान झालेले झाले आहे आणि होत आहे ! वैदिक संस्कृती चा अभिमान वैदिक लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु हि हिंदू संस्कृती नव्हे ! वैदिकाभिमानी लोक खुशाल त्यांचा धर्म पाळोत परंतु त्यांच्यातील "वरचढ" वृत्ती मात्र आम्ही स्वीकारत नाही ! म्हणूनच पुरुषसोक्त सारखी ऋचा नष्ट करायला हवी ! त्यांचे पठण हिंदू मंदिरात चालणार नाहीत ! हिंदू देव देवतांना हिनावाणारी वैदिक संस्कृती या ऋचा मुळे भारतीय संस्कृतीला मारक आहे हे नक्की !

    ReplyDelete
  19. शंकर माने साहेब ,
    आपण मांडलेला मुद्दा अंतर्मुख करतो हे नक्की
    त्याबद्दल आभार !
    तुम्ही काय लिहित आहात ते समजावून सांगाल का ?
    मला सुचते आहे ते असे ,
    समाजाची घडी बसवताना प्रथम कर्माप्रमाणे जाती निर्माण झाल्या आजही आपण बघतोच
    आपण कोण आहात ?असे विचारल्यावर मी मेक्यानिकल इंजिनियर आहे , मी कॉमर्स शिकलो आहे मी वकील आहे मी डॉक्टर आहे मी टेलर आहे इंटिरियर डेकोरेटर ( सुतारकाम )असे आपण आपले कर्म प्रमाण मानून एकप्रकारे आपली जातच जाहीर करतोच ,जात याचा अर्थ आपले कार्य क्षेत्र !
    अगदी ब्राह्मण सुद्धा सुतार आचारी शिंपी वाणिज्य अशी अदलाबदली करतोच आहे आपल्या करियर मध्ये
    कोणताही ब्राह्मण आजकाल फक्त भटगिरी करत नाही ९९ . ० टक्के हे दुसरी उपजीविकेची साधने स्वीकारतात म्हणजे आपण हवेतर असे म्हणू शकतो ,की ब्राह्मणांनी जात बदलली आणि आपल्या पोटापाण्याची सोय केली , आमची उपजीविकेची साधने चोरून आणि वर शिरजोरी करत स्वतःला ते ब्राह्मणच म्हणवून घेत मिरवतात !

    संजय सर म्हणतात त्याप्रमाणे फार फार नंतर जन्मावर आधारित जाती झाल्या
    कृष्णाने सारथ्य केले विदुराने दासीपुत्र असून नीती अनीतीवर भाष्य सांगितले
    कर्णाने सूतपुत्र म्हणून आपली ओळख सांगत क्षत्रिय वर्ण पाळला

    वेदकाळात आपला वर्ण बदलता येत असे हे आपणास संजय सर सांगू शकतील
    वेद हे अगदी सुरवातीच्या समाज रचनेतील एक पान आहे- एक पायरी आहे + त्यात चुका होऊ शकतात + ती अखेर नाही सुरवातही नाही ती अखंड प्रक्रिया आहे
    संजय सर म्हणतात त्याप्रमाणे गणपती पूर्वी विघ्नकर्ता होता तो आता विघ्नहर्ता झाला आहे
    पूर्वी पुनरुत्पत्ती हे निसर्गाचे महान आश्चर्य माणसाला लक्षात आल्यावर योनिपुजा आणि लिंगपूजा प्रचलित झाली ,तुम्ही कदाचित एक चूक अशी करतअसाल + ब्राह्मण द्वेषाच्या चष्म्यातून बघत असलात तर आपणास सर्व चुकीचेच वाटत राहील आजपासून ४००० वर्षापुर्वीच्या गोष्टी काय होत्या ते आत्ता चघळत बसत राहायचे यात काहीच अर्थ नाही
    महालक्ष्मी कोल्हापुरात स्त्रीयांना प्रसादाचे लाडू वळायला बंदी आहे + विटाळ या कल्पनेमुळे + तिथे आपण जाउन आपला निषेध का व्यक्त करत नाही ? आपले मनही तितके स्त्री पुरुष सम भाव मानणारे आहे का हे आपण आपल्या मनास विचारा !
    आपण काळाच्या ,संपूर्ण आवाक्याचा विचार केला तर असे दिसते की भारत सोडून सर्व ठिकाणी एक सांस्कृतिक लाट पहिल्या स्थापित संस्कृतीला अक्षरशः गिळून टाकत , नष्ट करत आपली नवी संस्कृती लादत असे ,रोमन ज्यू ख्रिश्चन , हे युरोपात आणि अरेबियातील पागान संस्कृतीत
    (ज्याला कुणी दगडी देव पुजणारे म्हणतात आणि काबा मशिदीत शिवलिंग आहे असे म्हणतात) पैगंबर हे स्वतः तिथे पुजारी होते पण त्यांनीसुद्धा सर्व नामशेष करत नवीन धर्म स्थापन केला फक्त भारतात आपल्याला दिसते की प्रत्येक येणारी लाट हि हलके हलके इथे विलीन होत गेली आणि त्यांनी आपापली आणलेली शिदोरी इथल्या लोकात वाटून घेत एक नवी संस्कृती बनवली !
    मग त्याना हून म्हणा शक म्हणा अगदी मुसलमान म्हणा - रोटी बेटी व्यवहार झाल्यावर विचारांची धार बोथटच होत जाते आता इतकी ५००० वर्षांची परंपरा सांगणारी आपली संस्कृती नक्कीच एकजिनसी नाही ,पण त्यानंतर काय घडत गेले ?भारतात आपले अस्तित्व वेगळे राखण्यासाठी प्रत्येकाने आपली टोळी आपली वसाहत आणि आपली वस्ती पुरते नियम बनवले आणि इथेच जात पंचायत सुरु झाली असे म्हणता येईल आजही अनेक ठिकाणी त्यांचाच शब्द अखेरचा असतो , ब्राह्मण हे महत्वाचे नसतात !
    आपण आपला शोध घेणे अगदी नैसर्गिक आहे पण दर वेळेस कुणालातरी दोष देत आपले रडणे रडत बसने योग्य नाही
    धर्म सांगणारे ब्राह्मण होते तसेच राज्य करणारे राजे क्षत्रियच होते ना ?मग का त्यांनी स्वतःचे हित जपणाऱ्या ब्राह्मणांची डोकी छाटली नाहीत ?हि न संपणारी चर्चा आहे , कुठेतरी पूर्ण विराम देऊन आपल्याला आजच्या जगात आपण कुठे आहोत ते पाहिले पाहिजे नाहीतर या सर्वाला " शिळोप्याच्या गप्पा " असे रूप यायला वेळ लागणार नाही

    ReplyDelete
  20. @ आप्पा बाप्पा व संदीप देशपांडे,

    मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि तुमचे ते बामणी तत्वज्ञान पुन्हा-पुन्हा उगाळत बसू नका.

    आप्पा बाप्पा तुम्ही कधी सुधारणार आहात कि नाही ते एकदा सांगून टाकाच. तुम्हाला बामन परदेशात जावून नोकरी करतो याचे चांगलेच कौतुक आहे म्हणायचे. आपल्या देशाच्या पैशाने शिकायचे आणि परदेशात जाऊन चाकरी करायची, वा रे वा ! तुमची राष्ट्रभक्ती? परदेशी लोकांची हमाली करायची आणि म्हणे आम्ही सुधारलो आहोत? तेथे वेठ- बिगारी लोकांना सुद्धा गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असतात पण आपल्या देशाला त्याचा फायदा काय? ज्यांना स्वतःच्या देशात नोकरी करायला लाज वाटते यांचा देश सोडण्यात क्रमांक एक आहे, बरोबर ना आप्पा बाप्पा !

    संदीप देशपांडे तू कोहम ब्लोगचा चाहताच नाही उद्धारकर्ता आहेस असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! काय रे बाता मारतोस बामणांची बाजू घेवून, फारच छान ! भोळ्या माणसा वेद म्हणजेच भेद, याच वेदांनी चातुर्वर्ण व्यवस्था चालू केली आणि भारतीयांच्या शेकडो पिढ्या बरबाद केलेल्या आहेत. ते जाळण्याच्याच लायकीचे आहेत, यात अजिबात संशय नाही. वार्चाक्य आणि व्यंगार्थ यातील फरक तुला कळतो कि नाही हे माहित नाही, मात्र तू संत तुकारामालाच वेदांच्या दावणीला बांधत आहेस. संत तुकारामाने वेद वाचले असल्याची शक्यता अजिबात नाही. वेद निंदा केल्या मुळेच मंबाजी आणि त्याच्या साथीदार शुद्र बामणांनी संत तुकारामाचा खून केला आणि सदेह वैकुंठाला गेल्याची कंडी पसरविली, अजूनही लोक असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवतात आहे, हे आपले दुर्दैव्य ! बामन शुद्धीकरणाचे म्हणाल तर भंग्याचा व्यवसाय का नाही करीत?

    अंकुश सुळे

    ReplyDelete
  21. सर्व मित्रांनो, शिवीगाळीवर न जाता विविधांगी चर्चा केल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो कि हा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा विषय नसून वैदिक/वैदिकेतर वादाचा विषय आहे. वैदिक धर्म स्वतंत्र असून मुर्तीपुजकांचा धर्म स्वतंत्र आहे असे माझे प्रतिपादन असते आणि संदीप देशपांडेंसारखे अनेक ते कबुलही करत असतात, येथेही एका प्रतिक्रियेत तशी कबुली दिलीच आहे. त्यामुळे माझ्या प्रतिपादनाला बळच मिळते हे लक्षात घेतले पाहिजे. दुसरे महत्वाचे म्हणजे वेद काय किंवा त्यातील पुरुषसूक्त काय, त्यात ज्या देवता येतात त्यांना आम्ही हिंदू कधीही पुजत नाही. त्या यज्ञामर्फत यजित होतात...पुजेने नव्हे. पूजा अवैदिक आहे,. असे असतांन मुळात अवैदिक देवतांच्या पुजेत, सत्यनारायणात पुरुषसूक्तच का, अन्य (उदा. अस्यवामीय अथवा नासदीय) का नहीत या प्रश्नाचा विचार केला तर हे लक्षात येईल कि हे सूक्त जाणीवपुर्वक पुर्वीच्या वैदिकांनी निवडले आहे जे जन्माधारित विषमतेचे तत्वज्ञान सांगते. माणसाच्या विकासाला वर्णीय चौकट बांधते. म्हणजेच विकासच नाकारते. याचा फटका वैदिकांनाही बसला नाही का? नक्कीच बसला असेल पण त्यांनी त्याची पर्वा पुरातन काळातही केलेली दिसत नाही...त्यांच्या वर्णाला स्म्रुत्योक्त बंदी असलेले व्यवसाय बिनधास्त केले पण आपल्या वर्णीय चौकटीत इतरांना मात्र प्रवेश नाकारला, स्वातंत्र्य नाकारले हे वास्तव नाही काय? मला वाटते वैदिक लोक हे समजावून घेण्याच्या स्थितीत नाहीत कारण त्यांना वेदांचा व वैदिक धर्माचा प्रचंड दुराभिमान असतो व त्यावरील टिका (वेद माहित नसले तरी) त्यांना सहन होत नाही. पण वास्तवाकडे डोळेझाक कशी करता येईल?
    यज्ञ बंद पडल्याने वैदिक धर्मीय मुर्तीपुजेकडे वळाले, पण पुजाच अवैदिक असल्याने खोट्या मानसिक समाधानासाठी त्यांनी वैदिक सुक्तांचा वापर पुजेतही सुरु ठेवला. पोटार्थी पुरोहितांसाठी हे स्वाभाविक मानले तरी निवड करतांना त्यांनी लबाडी केली हे कसे नाकारता येईल? शैव स्थाने वैष्णव ठरवण्यातही किती आघाडी घेतली? कारण काहीही झाले तरी विष्णुचा उल्लेख वेदांत होता म्हणूनच ना!
    म्हणजेच वैदिक वर्चस्वतावाद कायम ठेवत पोटार्थासाट्य्ही अवैदिक पुजा त्यांनी स्विकारली. आजच्या किती पुरोहितांना पुरुषसुक्ताचा अर्थ माहित आहे? बहुतेकांना नाही हेही वास्तव असले तरी विषमतेचा मुलपाठ देनारे सुक्त समतेच्या देवतांसमोर म्हनणे हा सरळ सरळ आमच्या दैवतांचा आणि आमचा अपमान मी मानतो. माझा विरोध प्रवृत्तींना आहे, कोणा जात-धर्माला नाही. आप्पा-बाप्पांच्या म्हनण्याप्रमाणे ब्राह्मण प्रागतिक आहेत व देशा-विदेशात ते प्रगती करत आहेत याचा भारतीय म्हनून मला अभिमानच आहे. त्यांच्याबद्दल राग-असूया मनात येण्याइतका हलकट आणि विकृत मी नाही. माझी बाजू धर्मात सुधारना घदवत समतेचे तत्व अस्तित्वात येईल हे पाहण्याची आहे व ते काम मी प्रसंगी सर्वांचाच रोष पत्करत करत आलो आहे आणि करेल. हे माझे म्हणणे लक्षात घेऊन येथे व प[उढील लेखनातही चर्चा करावी, अधिक सकारात्मक होईल असे वातते. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याची गरज नव्हती पण तुम्ही माझा उल्लेख केला म्हणून हे उत्तर.
      वैदिक धर्म हा हिंदू धर्मापेक्षा स्वतंत्र आहे असे मी कुठेही म्हणले नाही आहे. कोणतेही वाक्ये माझ्या नावे खपवू नका.
      वैदिक साहित्य म्हणजे फक्त चार वेद एवढेच नव्हे तर त्या अनुशंघाने येणारे श्रुती स्मृती,मीमांसा,भाष्ये,गीता,उपनिषदे आणि बरेच काही हे सगळे येते आणि त्याचा पाया हा वेद आहे. तेंव्हा वेदांमध्ये मूर्तीपूजा नाही म्हणून वेदांना मूर्तीपूजा मान्य नाही हे म्हणणे हास्यास्पद आहे.
      बाकी वेद तत्वज्ञान पचवण्यासाठी बुद्धी आणि भाव दोन्ही असावे लागते हे आपल्या माहितीसाठी सांगतो.
      चातुर्वर्ण्य व्यवस्था हि फक्त व्यवस्था आहे आणि ती व्यवस्थित समजावून अवलंबल्यास ती योग्यच वाटते आणि त्यात कोठेही भेदभाव नाही हे मी वर स्पष्ट केले आहेच,ते आता परत सांगायची गरज वाटत नाही.मला वाटते आपण ते समजावून घ्यायच्या मनःस्थिती मध्ये नाही आहात.

      बाकी वैदिक मुर्तीपुजेकडे का वळले हा आपला खुलासा चुकीचा वाटतो.निर्गुण उपासनेकडे जाण्यासाठी सगुण उपासना हि एक पायरी आहे म्हणून मूर्तीपूजा चालू जाहली.

      शेवटी परत एकदा सांगतो योग्य धर्म समजावून घेवून चुकीच्या चालीरीती नष्ट करणे हे आपले काम आहे,धर्माच्या नावाने शंख करून काही हाती येणार नाही.
      आणि आप्पा बाप्पा च्या म्हणण्याप्रमाणे ब्राम्हण परदेशात गेले आणि पैसे कमावते झाले याचे मी समर्थन करत नाही.कारण ब्राम्हण परदेशात आपली सांस्कृतिक जवाबदारी सोडून गेले याचे समर्थन होणे नाही.

      धन्यवाद

      Delete
    2. म्हणजेच संतांना वेद माहित नव्हते...कारण वेदात विठ्ठल कोठेही उगवत नाही...एकही...शिवासहित हिंदुंची देवता येत नाही...येतात त्या फक्त वैदिकांच्या...त्यामुलेच वैदिक धर्म वेगळा आहे. सगून-निर्गुणाचा वेदांशी काडीइतकाही संबंध नाही...उगाच खोटे तारे तोडू नका...

      Delete
    3. माझ्या प्रतिक्रियेतून "संताना वेद माहित नव्हते" हे वाक्य कोठून शोधून काढलेत.
      मी परत सांगतो विठ्ठल चे नाव जरी वेदात नसले जरी वेदात जी तत्वे आहेत ती तत्वे सगुण रुपात विठ्ठल च्या मूर्ती मध्ये पहिली गेली म्हणून संतानी विठ्ठलला वेदरूपी मानले.
      चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥१०१

      आता आपले तारे तोडून ते खरे असल्याचे भासवू नका.

      Delete
    4. वेदात काय आहे हे आधी माहित करुन घ्या...वाचा...समजावून घ्या...संतांना खरेच वेद माहित असते तर खेटराने निंदा केली असती...

      Delete
    5. संतांचे साहित्य समजायला संत असावे नाहीतर किमान भक्त तरी ,त्यामुळे ते सुधा आपणास समजणे अवघड दिसते.नाहीतर असली भाषा वापरली नसती.

      Delete
    6. मी संतही नाही आणि भक्तही. तुम्ही वेद वाचले आहेत काय? वेदांत काय आहे हे माहित आहे काय? त्याबद्दल बोला. सगूण-निर्गुण कोठुन कसे आले हे माहित आहे काय? यज्ञ ही निर्गूण पुजा असते असे कोठे आणि कोणी सांगितले आहे? पुजा हा शब्द मुलात कोठुन आला हे माहित आहे काय? माहित करुन घ्या,. मुद्देसुद उत्तरे द्या...वैदिकांचा शब्दभ्रम मला नवा नाही आणि मी माझ्या बांधवांना त्या भ्रमात जावूही देणार नाही हे पक्के ध्यानात ठेवा. आणि राहिला भाषेचा प्रश्न...संतांची संतप्त भाषा मी वापरायला लागलो तर तुम्ही पळून जाल...

      Delete
    7. तुम्ही संत नाही आणि भक्तही नाही त्यामुळे संताचे साहित्य तुम्हाला समजणार नाही हे तुम्हीच कबूल करत आहात ते एक बरे आहे.
      आणि यज्ञ या शब्दाचा अर्थ नुसता होम हवन असा होत नसून युज हा मुल धातू आहे आणि त्याचा अर्थ जोडणे,मैत्री,समाजाचे संघटीकरण असा सुधा होतो.
      वेदांमध्ये जी विविध देवतांना केलेली जी आव्हाने आहेत ती एक प्रकारची पूजाच होय.
      अगदी चर्च मध्ये म्हणालेली प्रार्थना किंवा नमाज हि पण एक पूजाच होय.
      फक्त गंध,अक्षता,फुले मूर्तीला वाहणे म्हणजेच पूजा असे नाही.
      बाकी आपण माझ्या नावावावर वरील प्रतिक्रियेमध्ये २ वाक्ये खपवली आणि असे प्रकार बरेच ठिकाणी केले आहेत त्यामुळे शब्दभ्रम करणे तुम्हाला नवीन नाही हे स्पष्टच आहे.

      Delete
    8. संदीप देशपांडे ह्या मुर्खाला हेही माहित नाही की ब्राह्मण सोडून कोणालाही (उर्वरित त्रीवर्नियांना) वेद वाचायला, एकायला बंदी होतो! वेद वाचल्यास जीभ छाटावी आणि ऐकल्यास कानात गरम शिसे किंवा गरम तेल ओतावे अशी स्मृतींमद्धे आज्ञा आहे.

      Delete
    9. अहो अतिमूर्ख अनामिक,
      अशी शिक्षा कोणत्या स्मृतींमध्ये आहे ,जर संदर्भ द्याल का?
      आणि अशी शिक्षा इतिहासात कोणाकोणाला झाली ? त्याची पण माहिती द्या.

      गिरीश पाटील.

      Delete
    10. अरे अति-अतिमूर्ख भटा,
      पाटील (?) ब्राह्मणा! तुला सगळे रेडीमेड पाहिजे काय? जा मनुस्मृती उघड आणि शोधत बस संदर्भ. तुझ्या आजोबांच्या चुलत भावाला आणि मावस भावाला या शिक्षा मिळाल्या होत्या? तू नावे विचारशील म्हणून अगोदरच त्यांची नावेही सांगून टाकतो पहिला कोंडीबा आणि दुसरा धोंडीबा?

      Delete
    11. अय्या !
      अंकुश सुर्वे आणि अविनाश पण ३ दिवस बाजूला बसतात का ग ?
      आता कुठे मधेच गायब झाले म्हणून विचारते हो
      या वयात असा त्रास होतोच + पण यानापण ?
      तुझ आपल काहीतरीच अग ते मर्द मराठे आहेत , ते गेले असणार कोल्हापुरात !
      लाडू वळायला !तुला काय वाटलं तीन दिवस दिसले नाहीत तर ? अगदीच ग तू चावट बाई !
      अनिता + विनिता

      Delete
    12. @ Anonymous March 12, 2014 at 4:07 AM

      तुला शरम नावाची चीज आहे कि नाही, काय हा फालतूपणा?

      अविनाश,ठाणे

      Delete
    13. इश्य !
      किती बोलता तुम्ही !

      Delete
  22. @Sandeep Deshpande,

    "संत तुकारामाने वेद वाचले असल्याची शक्यता अजिबात नाही. असे म्हणतोस म्हणजे जणू काही तुकाराम महाराजांनी जे काही अभंगात लिहिले ते उगाचच लिहिले आहे असे म्हणायचे आहे कि काय तुला. काय लिहितोस ते जरा विचार करून लिही. असे बोलून तू तुकाराम महाराजांचा अपमान करत आहेस."-------------------->

    "तुकारामांचे वेदा विषयी विचार म्हणजे त्यांनी वैदिक पंडितांना दिलेले एक विलक्षण आव्हान होते. वेदांचा अर्थ आम्हालाच कळला आहे, हे त्यांचे म्हणणे वार्च्यार्थाने मुळीच खरे नाही, हे उघड आहे. कारण, त्यांना वेद ऐकायला, वाचायला वा शिकायला मिळालेलेच नव्हते, तर त्या वेदांच्या शब्दांचा वाच्यार्थ त्यांना त्यांना कळला वा ठाऊक असण्याचा प्रश्नच नाही. वेदांनी आपल्या शब्दाशब्दातून, वाक्यावाक्यातून नेमके कोणते तपशील दिले आहेत, हे तुकारामांना ठाऊक असण्याची शक्यताच नाही. त्यामुळे वेदांचा अर्थ ठाऊक असल्याविषयीचे विधान त्यांनी वार्च्यार्थाने केले आहे, असे मुळीच म्हणता येत नाही. त्यांचे विधान व्यंग्यार्थाच्या दृष्टीने मात्र शंभर टक्के खरे आहे, अस्सल आहे." (संदर्भ: विद्रोही तुकाराम, डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ ६५)

    तू चातुर्वर्ण्य संदर्भात लिहिलेला फाफट पसारा बिलकुल पटणारा नाही.

    अंकुश सुळे

    ReplyDelete
    Replies
    1. @अंकुश सुळे:

      तुकाराम महाराजांचे अभंग हे जर स्वतःच्या डोळ्याने जरा वाच(साळुंखे च्या चेष्म्यातून नाही) म्हणजे तुला कळेल कि तुकाराम महाराजांचे विधान वाच्यार्थाने का व्यंग्यार्थाने ?
      तुकाराम महाराजांनी पंडितांना आव्हान दिले हि गोष्ट खरी आहे. पण त्यांना वेद माहिती नव्हते हि गोष्ट मान्य करण्यासारखी नाही.
      दुसरे म्हणजे "वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा येरांनी वहावा भार माथा" असे एकाच ठिकाणी तुकाराम महाराज वेदांचा उल्लेख करीत नाहीत तर त्यांच्या अभंगांमध्ये ठायीठायी असे वेदांचे संधर्भ मिळतात.
      खालील काही उदाहरणे बघ
      १.यातायातीधर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ॥१०॥
      २.वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाचि शोधिला ॥१॥
      विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम गावे ॥धृ॥
      ३.चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥१०१
      ४.तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥९॥
      ६०७ पृ १०९
      मी वर सांगितल्याप्रमाणे कोणताही पूर्वग्रह न ठेवता डोळे उघडे ठेवून तुकारामांचे अभंग वाच म्हणजे महाराजांचे विचार समजतील.
      बाकी डॉ. आ. ह. साळुंखे हे काही संत नाहीत त्यामुळे त्यांचे संतांविषयी चे मत गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही.संताची वाणी समजायला एकतर संत असावे लागते नाहीतर किमान भक्त तरी.
      आणि शेवटी तू म्हणतोस कि मी सांगितला चातुर्वण्याचा अर्थ तुला काही पटला नाही तर तो तुला पटावा म्हणून मी सांगितलेला नाही तर जो खरा अर्थ आहे तो सांगितला आहे.
      कदाचित तुला तो अर्थ पटला हि असेल पण तो कबूल करण्याची तुझी इच्छा दिसत नाही कारण तुझ्यात ती साळुंखे ची पुस्तके वाचून द्वेष भरला आहे.
      असो,जसा वेळ जाईल तसा द्वेष कमी होईल आणि तुला तो अर्थ पटेल अशी मी आशा बाळगतो.

      Delete
    2. श्री संदीप देशपांडे
      मला आपला अभिमान आणि कौतुक वाटत आहे
      आपण श्री अंकुश सुळे याना जे ठाम उत्तर दिले आहे ते वाचून आपले जितके कौतुक करावे तेव्हढे कमीच !आपण दाखवलेली सभ्यता आणि विनय हल्ली फारच कमी होत जाताना दिसतो
      आपला अभ्यासूपणा आणि विचारांचा नेमकेपणा वाखाणण्या सारखा आहे !
      असे भाडोत्री विचारवंत पैशाला पासरी मिळतात त्यांची तमा बाळगायचे काहीच कारण नाही !

      संजय सर हे पण असाच विनय आणि सभ्यता दाखवतात , कोणीही कितीही वेडे वाकडे लिहिले तरी !
      बरेच जण ब्राह्मण द्वेषामुळे बुद्धीने अधू झाल्या सारखे वागतात त्याना एक प्रश्न विचारावासा वाटतो की आपण या ब्राह्मण द्वेषाच्या राज कारणाला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेत आहात हे त्याना कधी समजणार ?
      आपण असेच ठामपणे आपले विचार सर्वदूर पोचवत रहा !
      तितकेच आपल्या हातात आहे
      शुभेच्छा !

      Delete
    3. बहुजनद्वेष !!!!!!!!!

      Delete
    4. ब्राह्मणी आक्रोश !!!!!!!!!

      Delete
    5. वैदिक ब्राह्मणांचा आक्रस्ताळेपणा !!!!!!!!!

      Delete
    6. "कर्मठ ब्राह्मणांनो, याल तर तुमच्यासह, न याल तर तुम्हाला वगळून, आणि आडवे याल तर तुम्हाला तुडवून; आम्ही आमचा मार्ग आक्रमणारच!”

      Delete
    7. वा वा , आली रे आली ग्यांग आली ,
      एक वाडा पाव , एक गाय छाप , एक काठ्या ओला करून आणि एक पुडी , हिच्यावर ते दिवस काढतात !म्हणाल तसे म्हणाल ते बोलायचे !
      आज काय आंबेडकर , उद्या काय शाहू महाराज , परवा काय सावित्रीबाई किंवा अहिल्याबाई !
      ओरडा तोच ,तसाच !
      चालू दे - विदुषकी चाळे चालू देत , आतातर त्यांचा सिझन आला - इलेक्शन आली रे आली
      आता त्यांचा रेत वाढणार आणि संजयचा पण !

      Delete
    8. @ VIVEKANAND SERAO IS A THIRD CLASS HUMAN !

      Delete
  23. @Sandeep Deshpande,

    तू ज्या गाथांचा संदर्भ इथे दिला आहेस तो तुझा तुकारामांनी वेद वाचले किंवा ऐकले होते यापैकी काहीही सिद्ध करू शकत नाहीस. डॉ. आ. ह. साळुंखे या बहुजन विचारवंताच्या नखाचीही सर तुला येणार नाही. संत तुकारामाने ज्या गाथा लिहिल्या त्या संतांसाठी किंवा भक्तांसाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा घ्यास धरून आणि त्यांना समजतील अशा साध्या, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत, हे कोणीही अमान्य करणार नाही. तू दिलेल्या गाथा पुन्हा एकदा निष्कपट, निपक्षपाती वृत्तीने वाच आणि त्याचा अर्थ जाणं, वेदाबद्दल संदर्भ ज्या-ज्या गाथा मद्धे आला आहे तो वेदांची थोरवी गाण्यासाठी नव्हे तर विठ्ठला वरील प्रेमापोटी, तसेच त्यांचे महात्म्य वेदांपेक्षाही कितीतरी वरचढ आहे हे दर्शविण्यासाठी !

    तुला बहुजनद्वेषाची कावीळ झालेली आहे म्हणून तुला सर्वकाही पिवळेच दिसतं आहे.
    कोणाचीही पुस्तके वाचून मनामद्धे द्वेष भरत नसतो. तुला तसा अनुभव असेल तर तो तुझा दोष आहे, माझा नाही, हे तू लक्षात ठेव. तुझे ते वेद आणि चातुर्वर्नाचे तुणतुणे आता बंद कर, त्याने कोणाचाही फायदा होणार नाही.

    तुझे जातभाई ह.भ.प. स.के. नेऊरगावकर (श्रीतुकाराम महाराजांची सार्थ गाथा) तुकारामांच्या गाथांचा अर्थ किती विचित्र पणे लावतात त्याचे एक उत्तम उदाहरण तुला देतो. ती गाथा अशी

    महारासि सिवे । कोपे, ब्राह्मण तो नव्हे ॥ १ ॥
    त्या प्रायश्चित्त काही । देहत्याग करिता नाही ॥ २ ॥
    नातळे चांडाळ । त्यांच्या अंतरी विटाळ ॥ ३ ॥
    ज्यांचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याति ॥ ४ ॥ ५५

    नेऊरगावकर यांनी सांगितलेला (ब्राह्मणी) अर्थ : ज्याचे अंतःकरण क्रोधारूपी महाराला शिवले आहे तो ब्राह्मण, ब्राह्मण राहत नाही. त्याने देहत्याग जरी केला तरी (क्रोधरुपी) पापा पासून सुटका नाही, त्या प्रायश्चित्ताने तो शुद्ध होत नाही. त्या चांडाळाला शिवू नये. त्याचा विटाळ त्याने अंतरात बाळगला आहे तू. म. म्ह. चित्तांत ज्याची संगती असते, ती त्या पुरुषाची जाती आहे असे समजावे.

    खरा (निपक्षपाती) अर्थ: महार व्यक्तीला शिवाल्यानंतर जो संतापतो, तो ब्राह्मणाच नव्हे. त्याने केलेल्या रागावण्याच्या पापाला त्याने देहत्याग केले तरी प्रायश्चित्त नाही. हा ब्राह्मण चांडाळाला स्पर्श करीत नाही. कारण त्याच्या स्वतःच्याच अंतःकरणाला विटाळ असतो. तू. म. म्ह. मनामद्धे ज्याच्या विटाळ असतो, त्याचीच जात माणसाला प्राप्त होते.

    हे लोक कसा अर्थाचा अनर्थ करतात त्याचे एक साधे उदाहरण आहे. अशा अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांना संत तुकारामाच्याच भाषेत असे म्हणावेसे वाटते ...

    तुका म्हणे ऐशा नरा । मोजून माराव्या पैजारा ॥

    आता तुझ्यातील बहुजनद्वेष संपुष्टात येईल अशी आशा करतो.

    अंकुश सुळे

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. @अंकुश सुळे :डॉ. साळुंखे हे विचारवंत आहेत याबद्दल दुमत नाही त्यामुळे त्यांच्या नाखाचीच काय कशाचीही सर मला येणार नाही.त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण आहे याची मला जाणीव आहे.परंतु ते संत नाहीत त्यामुळे त्यांचे याबाबबताचे मत ग्राह्य धरत येणार नाही इतकेच मला म्हणायचे आहे.
      असो माझे म्हणणे तुला कितपत समजले याबाबाबत शंका आहे.
      दुसरे म्हणजे विठ्ठलाचे महात्म्य तर आहेच रे आणि वेद तर त्याचेच महात्म्य समजावून सांगतात.शेवटी वेद हे देवाचे महात्म्य सांगण्यासाठीच आहेत.आणि वेद हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे मी काय कोणीच असे कुठेही म्हणाले नाही त्यामुळे तुझ्या त्या स्पष्टीकरणाला पण अर्थ नाही.
      तुकाराम महाराजांनी इतक्या ठिकाणी वेदांचा संधर्भ दिला आहे आणि तरी तू म्हणतोस त्यांनी वेद वाचले किंवा ऐकले असण्याची शक्यता नाही.मग काय यमक जुळवण्यासाठी वेद शब्द वापरला का काय?आणि तसे असेल तर 'वेद' च का 'नाद ,दाद ' असे शब्द पण वापरले असते.त्यामुळे तुझा दावा निरर्थक आहे.
      राहिला प्रश्न जातीयवादाचा तर तुझा जातभाई हा शब्द आणि डॉ. साळुंखे यांच्या नावामागे बहुजन विचारवंत हा शब्द बघून कुणाला जाती द्वेषाची कावीळ झाली आहे हे स्पष्टच आहे.
      आता जातीवर आलाच आहेस तर तुकाराम महाराजांचा पुढील अभंग पण वाच.
      पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचे ॥३॥
      ४६०० पृ ७७४ (शासकीय)
      यामध्ये महाराज वेद आज्ञा म्हणतात.नीट वाच.
      आणि हो इथे महाराजांना योग्य ब्राम्हण म्हणजे जो शास्त्राने सांगितलेला धर्म पाळतो तो धर्म अपेक्षित आहे.कोणीही नाही.
      मला वाटते तू सांगितलेला अभंग योग्य आहे
      तुका म्हणे ऐशा नरा । मोजून माराव्या पैजारा ॥
      जरा दोन घे मारून स्वतःला म्हणजे सूडबुद्धी कमी होईल.
      आणि बहुजन द्वेष काय आणि कोणताही द्वेष काय तो तर माझ्यात नाहीच त्यामुळे नष्ट होण्याचा प्रश्न नाही.

      Delete
    4. चावट, वात्रट काहीही लिहितो मुर्खासारखे.

      Delete
    5. तुका म्हणे ऐशा नरा (संदीप देशपांडे) । मोजून माराव्या पैजारा ॥

      Delete
  24. @Sandeep Deshpande,

    तू ज्या गाथांचा संदर्भ इथे दिला आहेस तो संत तुकारामांनी वेद वाचले किंवा ऐकले होते यापैकी काहीही सिद्ध करू शकत नाहीस. डॉ. आ. ह. साळुंखे या बहुजन विचारवंताच्या नखाचीही सर तुला येणार नाही. संत तुकारामाने ज्या गाथा लिहिल्या त्या संतांसाठी किंवा भक्तांसाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा घ्यास धरून आणि त्यांना समजतील अशा साध्या, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत, हे कोणीही अमान्य करणार नाही. तू दिलेल्या गाथा पुन्हा एकदा निष्कपट, निपक्षपाती वृत्तीने वाच आणि त्याचा अर्थ जाणं, वेदाबद्दल संदर्भ ज्या-ज्या गाथा मद्धे आला आहे तो वेदांची थोरवी गाण्यासाठी नव्हे तर विठ्ठला वरील प्रेमापोटी, तसेच त्यांचे महात्म्य वेदांपेक्षाही कितीतरी वरचढ आहे हे दर्शविण्यासाठी !

    तुला बहुजनद्वेषाची कावीळ झालेली आहे म्हणून तुला सर्वकाही पिवळेच दिसतं आहे.
    कोणाचीही पुस्तके वाचून मनामद्धे द्वेष भरत नसतो. तुला तसा अनुभव असेल तर तो तुझा दोष आहे, माझा नाही, हे तू लक्षात ठेव. तुझे ते वेद आणि चातुर्वर्नाचे तुणतुणे आता बंद कर, त्याने कोणाचाही फायदा होणार नाही.

    तुझे जातभाई ह.भ.प. स.के. नेऊरगावकर (श्रीतुकाराम महाराजांची सार्थ गाथा) तुकारामांच्या गाथांचा अर्थ किती विचित्र पणे लावतात त्याचे एक उत्तम उदाहरण तुला देतो. ती गाथा अशी

    महारासि सिवे । कोपे, ब्राह्मण तो नव्हे ॥ १ ॥
    त्या प्रायश्चित्त काही । देहत्याग करिता नाही ॥ २ ॥
    नातळे चांडाळ । त्यांच्या अंतरी विटाळ ॥ ३ ॥
    ज्यांचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याति ॥ ४ ॥ ५५

    नेऊरगावकर यांनी सांगितलेला (ब्राह्मणी) अर्थ : ज्याचे अंतःकरण क्रोधारूपी महाराला शिवले आहे तो ब्राह्मण, ब्राह्मण राहत नाही. त्याने देहत्याग जरी केला तरी (क्रोधरुपी) पापा पासून सुटका नाही, त्या प्रायश्चित्ताने तो शुद्ध होत नाही. त्या चांडाळाला शिवू नये. त्याचा विटाळ त्याने अंतरात बाळगला आहे तु. म. म्ह. चित्तांत ज्याची संगती असते, ती त्या पुरुषाची जाती आहे असे समजावे.

    खरा (निपक्षपाती) अर्थ: महार व्यक्तीला शिवाल्यानंतर जो संतापतो, तो ब्राह्मणाच नव्हे. त्याने केलेल्या रागावण्याच्या पापाला त्याने देहत्याग केले तरी प्रायश्चित्त नाही. हा ब्राह्मण चांडाळाला स्पर्श करीत नाही. कारण त्याच्या स्वतःच्याच अंतःकरणाला विटाळ असतो. तु. म. म्ह. मनामद्धे ज्याच्या विटाळ असतो, त्याचीच जात माणसाला प्राप्त होते.

    हे लोक कसा अर्थाचा अनर्थ करतात त्याचे एक साधे उदाहरण आहे. अशा अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांना संत तुकारामाच्याच भाषेत असे म्हणावेसे वाटते ...

    तुका म्हणे ऐशा नरा । मोजून माराव्या पैजरा॥

    आता तुझ्यातील बहुजनद्वेष संपुष्टात येईल अशी आशा करतो.

    अंकुश सुळे

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. @अंकुश सुळे :डॉ. साळुंखे हे विचारवंत आहेत याबद्दल दुमत नाही त्यामुळे त्यांच्या नाखाचीच काय कशाचीही सर मला येणार नाही.त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण आहे याची मला जाणीव आहे.परंतु ते संत नाहीत त्यामुळे त्यांचे याबाबबताचे मत ग्राह्य धरत येणार नाही इतकेच मला म्हणायचे आहे.
      असो माझे म्हणणे तुला कितपत समजले याबाबाबत शंका आहे.
      दुसरे म्हणजे विठ्ठलाचे महात्म्य तर आहेच रे आणि वेद तर त्याचेच महात्म्य समजावून सांगतात.शेवटी वेद हे देवाचे महात्म्य सांगण्यासाठीच आहेत.आणि वेद हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे मी काय कोणीच असे कुठेही म्हणाले नाही त्यामुळे तुझ्या त्या स्पष्टीकरणाला पण अर्थ नाही.
      तुकाराम महाराजांनी इतक्या ठिकाणी वेदांचा संधर्भ दिला आहे आणि तरी तू म्हणतोस त्यांनी वेद वाचले किंवा ऐकले असण्याची शक्यता नाही.मग काय यमक जुळवण्यासाठी वेद शब्द वापरला का काय?आणि तसे असेल तर 'वेद' च का 'नाद ,दाद ' असे शब्द पण वापरले असते.त्यामुळे तुझा दावा निरर्थक आहे.
      राहिला प्रश्न जातीयवादाचा तर तुझा जातभाई हा शब्द आणि डॉ. साळुंखे यांच्या नावामागे बहुजन विचारवंत हा शब्द बघून कुणाला जाती द्वेषाची कावीळ झाली आहे हे स्पष्टच आहे.
      आता जातीवर आलाच आहेस तर तुकाराम महाराजांचा पुढील अभंग पण वाच.
      पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचे ॥३॥
      ४६०० पृ ७७४ (शासकीय)
      यामध्ये महाराज वेद आज्ञा म्हणतात.नीट वाच.
      आणि हो इथे महाराजांना योग्य ब्राम्हण म्हणजे जो शास्त्राने सांगितलेला धर्म पाळतो तो धर्म अपेक्षित आहे.कोणीही नाही लुंग्या सुन्ग्या नाही.
      मला वाटते तू सांगितलेला अभंग योग्य आहे
      तुका म्हणे ऐशा नरा । मोजून माराव्या पैजारा ॥
      जरा दोन घे मारून स्वतःला म्हणजे सूडबुद्धी कमी होईल.
      आणि बहुजन द्वेष काय आणि कोणताही द्वेष काय तो तर माझ्यात नाहीच त्यामुळे नष्ट होण्याचा प्रश्न नाही.

      Delete
    4. अंकुश सुळे, देशपांडे मूळ वाद भरकटवत आहेत. या गृहस्थांचे पुरुषसुक्ताला समर्थन आहे आणि प्रत्येक वैदिकाचे ते असतेच हा माझा अनुभव आहे. गरज आहे याविरुद्ध मोठी चळवळ उभारायची. काही म्हणतात वेद जुने झाले...आता काय त्याचे? तर मग फेकून द्या ना ते...पण तेही हे लोक करणार नाहीत, कारण विषमता हाच त्यांच्या धर्माचा पाया होता व आजही आहे.
      आपला लढा विषमतेविरुद्ध आणि ते तत्वज्ञान सांगना-या सर्वच गोष्टींच्या विरुद्ध आहे. संतांचा लढाही त्याविरुद्धच होता. "वेदप्रामाण्याचे" स्तोम त्या काळात एवढे होते कि वेदाविरुद्ध बोलण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती...आजही वेदविरोधी एक शब्द आला तर हे लोक कसे तुटून पडतात हे तुम्ही येथील वादंगावर नजर टाकले तरी लक्षात येईल. येथेच काय सर्वत्र हाच अनुभव येतो. पुरातन रानटी मानसिकतेतून बाहेर यायला ही मंडळी का तयार होत नाही हा प्रश्नच आहे. असो. त्यांनी त्यांचे वेद-स्मृती अवश्य जतन करावे...पण आमच्या दैवतांना त्यांनी "विठ्ठल वेदमान्य आहे" आणि "सगुण-निर्गुणत्वाच्या सोयिस्कर व्याख्या" सांगुन बाष्कळपणा बंद करावा. जेरेशास्त्री आजन्म वेदात विठ्ठल शोधून थकले पण मिळाला नाही हे डा. रा.चिं. ढेरे यांनी कधीच स्पष्ट केले आहे.

      Delete
    5. मुळात वैदिक धर्मात बेद्भाव नाही आहे हे मी आपल्याला बर्याच वेळेला उदाहरण देऊन सांगितले आहे.पण आपली ऐकण्याची किंवा समजावून घेण्याची मानसिकता नाही.
      संतानी कुठल्यातरी प्रभावाखाली तत्वज्ञान मांडले हे खूप हास्यास्पद आणि संताचा अपमान करणारे विधान आहे.संत हे निर्भीड होते.कोणत्याही प्रभावाखाली काम करणारा माणूस हा निर्भीड असू शकत नाही.संतानी सामाजिक विषमतेविरुद्ध वैदिक तत्वज्ञानाच्या माध्यमातून लढा दिला हे उघड आहे.
      विठ्ठलाला वेदांमध्ये शोधायला(लाक्षणिक अर्थाने शब्दशः नव्हे ) संतांची किंवा भक्ताचे काळीज असावे लागते ते संतांकडे होते तेंव्हा ते करू शकले येर्या गबाळ्याचे हे काम नाही.
      बाकी सामाजिक विषमतेविरुद्ध लढ्यासाठी मी आपल्या बरोबर आहे फक्त वैदिक तत्वज्ञानाचा चुकीचा अर्थ लाऊन तसे करण्यात अर्थ नाही इतकेच माझे म्हणणे आहे.कारण असे केल्याने लढा विषमतेविरुद्ध न राहता वैदिक संस्कृती बरोबर चालू होतो आणि समाजातील दरी वाढत राहते.

      Delete
    6. PAAGAL DESHAPANDE AND COMPANY

      Delete
    7. तुका म्हणे ऐशा नरा (संदीप देशपांडे) । मोजून माराव्या पैजारा ॥

      Delete
    8. अय्या !
      अंकुश सुर्वे आणि अविनाश पण ३ दिवस बाजूला बसतात का ग ?
      आता कुठे मधेच गायब झाले म्हणून विचारते हो
      या वयात असा त्रास होतोच + पण यानापण ?
      तुझ आपल काहीतरीच अग ते मर्द मराठे आहेत , ते गेले असणार कोल्हापुरात !
      लाडू वळायला !तुला काय वाटलं तीन दिवस दिसले नाहीत तर ? अगदीच ग तू चावट बाई !
      अनिता + विनिता

      Delete
  25. Ankush Sule Sir,

    Congratulations Sir !

    Thanks for your precious comment ! You are really great ! We are along with you ! Keep it up !

    Sanjay Sir, please, you also support him !

    Avinash, Thane.

    ReplyDelete
  26. पांडुरंग हिंदुंचा देव असेल तर त्यावर लिहिताना तसे लिहा ,
    मध्येच हिंदू हा धर्मच नाही , असे म्हणायचे
    पांडुरंग हा बौद्ध आहे किंवा जैन आहे अशा चर्चा करत बसायच्या , मध्येच पुंडलिक आणि शैव संबंध याबद्दल लिहायचे आणि परत म्हणायचे कि इथे पुरुषसुक्त म्हणू नका
    पुरुषसुक्त म्हटलेले चालत नसेल तर म्हणू नका ,
    शिव काय किंवा विष्णू काय इतके विनोदी आहेत + सदा सर्वदा भोळेपणा आणि आपले भक्तप्रेम यामुळे सगळ्या जगाला संकटात टाकत राक्षसाला नको ते वर देत असतात ! हे इतकेही यांना कळत नाही ?या कथाही ब्राह्मणानीच रचल्या असतील तर तशी बोंब मारा आणि सगळ्या कथांची होळी करा आणि या दोन्ही देवांची किंवा अशा फालतू आशीर्वाद देणाऱ्या सर्व देव + देवींची एकत्रित यादी करून एक सभा घेऊन हेटाळणी करा !
    अहो संजय सोनावणी - देव असतो का कधी ? उगीच कशावरून काहीतरी वाद पेटवत ठेवायचा बिनडोकपणा का करत असता आपण ?देव आणि हे अवतार सर्व थोतांड आहे !
    बोला बोला आता तोंड लपवू नका !
    ज्या श्रद्धेवर तुमचा विश्वासच नाही अशा श्रद्धांची काळजी कशाला करत बसताय ?
    तुम्ही जे लिहिता त्यावर तरी आपली शर्द्धा असते का नाही ?
    एक मिनिट !शर्द्धा - अंधश्रद्धा असली शब्दांची खेळी करत बसू नका !

    ReplyDelete
  27. वा वा , आली रे आली ग्यांग आली ,
    एक वडा पाव , एक गाय छाप , एक काथ्या ओला करून आणि एक पुडी , हिच्यावर ते दिवस काढतात !म्हणाल तसे म्हणाल ते बोलायचे !
    आज काय आंबेडकर , उद्या काय शाहू महाराज , परवा काय सावित्रीबाई किंवा अहिल्याबाई !
    ओरडा तोच ,तसाच !ग्यारंटी आहे बघा !
    चालू दे - विदुषकी चाळे चालू देत , आतातर त्यांचा सिझन आला - इलेक्शन आली रे आली
    आता त्यांचा रेट वाढणार आणि संजयचा पण !

    ReplyDelete
    Replies
    1. @ Anonymous March 7, 2014 at 10:38 AM
      i.e. VIVEKANAND SERAO IS A THIRD CLASS HUMAN !

      Delete
  28. लढ रे बाप्पू , आमचा अंकुश सुळे पुढच्या पिढीचा रामदास आठवले होनार
    पठ्ठ्या सॉलिड आहे !आवाज टाकतो पण मस्त !डोक कस काम करताय बागा तुमीच
    अंकुश दादाकी जय !
    पण एक सांग , एका बुडत्या बोटीत तू आणि संदीप देशपांडे आहात तर त्याला वाचवशील का मरुदे एक बामन कमी होतोय अनायासे अस म्हणून त्याला पाण्यात भकांदून देशील ?
    तू बुद्धाचा किंवा डॉ आंबेडकर यांचा भक्त दिसतो आहेस ,कुटल्या बुद्ध वाड्यातला रे तू ?
    त्यांनी अशा प्रसंगात काय केले असते ?
    मी तर नक्कीच या बामणाला लुडकावला असता ! आपल्याला कुणाच्या बापाची भीती नाय !
    लई बिल केलाय यांनी पोखरून टाकलय सगळ !

    ReplyDelete
    Replies
    1. BADAMAASH MURKHASARAKHA VINOD TUZA, VIVEKANAND SERAO

      Delete
    2. @ VIVEKANAND SERAO March 7, 2014 at 10:56 AM

      हा काय वेडगळपणा आहे?

      अंकुश सुळे

      Delete
  29. आप्पा -कोणताही सुजाण माणूस देव हि कालबाह्य कल्पना आहे असे सांगेल तसेच आमचे आहे
    बाप्पा - चिंता एकच आहे ,आपण सरळ सरळ एखादी चळवळ का नाही उभी करत नाही ?
    आपण महान आहातच आपणास सर्व मार्ग माहित आहेत काय कसे घडवून आणायचे त्याबाबत जान आहे त्याबद्दल आम्हास अभिमान पण वाटतो आपला ! आम्हास इतकेच म्हणायची इच्छा आहे !
    बाप्पा - कोणाचे समाधान होणार आहे पुरुषसुक्त बंद केल्याने ?आपण जे जितके सुक्त दाखवले त्याच्या वाचनात काहीच गैर जाणवले नाही एक समाजाचा भाग हा कल्पनेने पुरुषाचा पाय आहेएक हात आहे असे म्हणत गेले तर काय बिघडले ?पाय हा हातापेक्षा गौण आहे हा शोध म्हणजे अतीच होते आहे !
    आप्पा - आणि दुसरे म्हणजे सरळ सरळ पांडुरंगासमोर निदर्शने करावीत , नुसते लेख लिहून चुकीचे मार्ग दर्शन होते असे आम्हास वाटते कारण प्रत्यक्ष कृती करणे महत्वाचे !
    बाप्पा - आम्हास धर्म देव काहीच मान्य नाही , पण आम्ही तसे ओरडा करून जगास का सांगावे ? ते योग्य होणार नाही - या वैयक्तिक गोष्टी आहेत पहाटेच्या पूजेत समजा पुरुषसुक्त म्हणत असतील तर एखाद्या समाज घटकाचे समाधान होत असेल म्हणून तर ते चालू आहे आपणास दुसरे काही हवे असेल तर तसे योजन करता येईल ,त्यात काही गैर नाही वाटत , उलट हि जागृती स्वागतार्ह आहे ,परंतु एखादी गोष्ट बंदच पाडूया असा आग्रह हा योग्य आहे का ? कुणी काही चुका केल्या असतील तर त्याची उजळणी करत जायचे आणि दुरुस्ती करायचे ठरवले तर मग श्रीराम , श्रीकृष्ण ,शिवाजी महाराज ,
    म गांधी असे करत आपणास आयुष्य पुरणार नाही असा उद्योग करावा लागेल -
    आप्पा - शेवटी अशी अवस्था होईल - संजय सोनावणी काय करतात हल्ली ?
    बाप्पा - अहो ते जुने कागदपत्र धुंडाळत सारखे पुटपुटत असतात सत्यनारायण बंद करा ,गीतापठन बंद करा ,विष्णूला बेल वहा आणि शिवाला तुळस वहा ,पांडुरंग हा खरेतर देवच नाही खरा पंढरपूरचा देव आहे पुंडलिक !
    आप्पा - आम्हाला इतकेच आदरपूर्वक सांगायचे आहे की कधीकधी संशोधन एक सांगते आणि परंपरा दुसरीच असते ,शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेले किल्ले हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत पण आज श्रेय देताना आपण सर्व शिवाजीलाच देतो ,तानाजी पूर्वी कोंढाणा अनेक वर्षे आहेच ,म्हणून शिवाजीने कधी तो संपूर्ण भगव्या रंगाने रंगवला नाही किंवा गंगाजलाने धुतला नाही ,बाप्पा - म गांधी यांनी बेरजेचे राजकारण केले ,पण आजकाल चालले आहे ते सुडाचे राजकारण !
    आम्ही नेहमी सांगत असतो त्याचा अर्थ ब्राह्मणाना नोकऱ्या बंद झाल्यावर ते स्वखर्चाने कर्ज काढून शिकून परदेशात जाऊ लागले त्यात भारताचा फायदाच असतो !नोन रेसीदंट भारतीय म्हणजे ते भारतीयच असतात ,फक्त इथले वातावरण गढूळ असल्यामुळे ते इथून अधिक चांगल्या ठिकाणी जातात
    आप्पा - आणि घुसमटून जाणारे राजकारण आल्यावर इथून निघून विश्वभर जाणे आणि आपल्या कक्षा रुंदावणे हे नैसर्गिकच नाही का ?मेंदू आणि बाहू शाबित असेल तर पुरुषार्थ दाखवण्यात काहीच गैर नाही ! आणि एन आर आय असणे हे राष्ट्राला भार नसून अभिमानाची गोष्ट असते , सरकार त्याना जास्त सूत देत असते !त्यांचे नेहमी इथे स्वागत असते !ते का ?
    बाप्पा - आत्ताच्या काळाचे नियम पुर्वासुरीना लावत बसायचे ठरले तर शिवाजीने अनेक लग्ने केली हा टीकेचा विषय होईल , पांडव क्षत्रिय असताना आपली जबाबदारी न ओळखता आपले राज्य जुगारात हरले हा क्षत्रीयांवर ठपका येतो , म्हणूनच आजचे गुणदोष हे आजचे आहेत , त्याना मागे ढकलता येत नाही नाहीतर कुंतीला तुरुंगवासाच होईल !कर्णाला त्यगल्याबद्दल !

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा बाप्पा, काय रे दुतोंड्या ! अगोदर आग लावायची, नंतर त्यात तेल ओतून भडकवायचे आणि शेवटी शेंडी वरून पाणी गेलेकी स्वतःला नामानिराळे करायचे. मग काय, देवच कालबाह्य. मस्तच!

      Delete
  30. अंकुश सुळे साहेब ,
    वैदिक द्वेषाची प्रखरता किती आहे ? मानवतावादाच्या पेक्षा जास्त ?
    मुसलमान सोडून वैदिक ठेचावा असे वाटते का ?
    त्यापेक्षा " अवघे धरू सुपंथ " असे का वाटत नाही ?
    एखाद्या तत्व ज्ञानाच्या आहारी किती जायचे ? इतका तत्व ज्ञानाचा पगडा असणे ही एक मानसिक आजाराची स्थिती असावी असे नाही का वाटत ?
    पुस्तके वाचावीत पण त्यांचे गुलाम नसावे ! डॉक्टर असे वागतो का ? तुका म्हणे ऐशा नरा वगैरे ठीक आहे ,तसे तुकाराम महाराज बरेच काही म्हणतात , अनेक वेळा परस्पर विरोधीही बोलतात
    वैष्णव आणि शैव एकच असल्याचे पण सांगतात !तुकाराम हे ब्राह्मण नाहीत ही एकाच गोष्ट आपणास आकर्षक वाटते का ? सदानंद मोरे यांनी असेच सुरु केले आहे -एकनाथांची आठवण होत नाही त्याचे कारण तुमच्या तोंडातून येईल का ?
    याच विषयावर इथेच वाघ्या धनगर अशा नावाने कुणीतरी किती छान लिहिले आहे
    संत तुकाराम वैष्णव असे भेद मानत होते का त्याचा पण संदर्भ दिला आहे त्या ठिकाणी !
    त्रिशुलावरी काशीपुरी चाक्रावारती पंढरी
    दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे
    एक विभूतीचा गोळा एका केशर कस्तुरीचा टिळा
    एका भूजंगाची माळ एका वैजयंती हार
    एका अर्धांगी पार्वती एक लक्ष्मीचा पती
    एक नंदीवरी असे एक गरुडावरी वसे
    तुका म्हणे हरिहर एका वेलांटीचा फेर
    आणि
    आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना
    प्राकाराच्या संगे रवी बिघडला
    रवी बिघडला प्राकाराची झाला
    सागराच्या संगे नदी बिघडली
    नदी बिघडली सागराची झाली
    परिसाच्या संगे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णची झाले
    पांडूरंग संगे तुका बिघडला
    तुका बिघडला पांडुरंग झाला
    एका जनार्दनी गोपी बिघडल्या
    गोपी बिघडल्या श्रीकृष्णमय झाल्या

    या सर्वाना हे पुरुषसुक्त ऐकू येतच असेल , पण त्यांच काहीच बिघडलं नाही !
    किती साली हे सुरु केले त्या ब्राह्मणांनी याचा पुरावा आहे का काही ?
    संपूर्ण वारकरी चळवळ हे पुरुषसुक्त पांडुरंगा समोर चालू आहे म्हणून अडून नाही बसली
    मग तुम्हीच असे कसे ?
    राजकारण करायचे आहे का ? हा हा हा sss करा करा करा !!!
    तुमचा आत्मा शांत होऊ दे एकदा !किती दिवस असे स्वतःला फसवत राहाल ?
    माझी काही समजूत वेगळीच होती कारण म फुले असोत किंवा इतर कुणी सर्वांचे म्हणणे एकाच आहे की त्याना देवाकडे जाताना ब्रोकर नको आहेत ,ब्राह्मण नको आहेत कारण त्यांच्या हातात देवळाच्या चाव्या आहेत - इथपर्यंत समजू शकते पण हाच ब्राह्मण द्वेष ज्या वेळेस सामाजिक रूप धारण करतो त्यावेळेस ती विकृती होते ,मन्दिराबाहेर्चा ब्राह्मण द्वेष हि विकृती आहे !

    संजय सोनावणी ,
    आपण आदर्श समाज रचना आपल्या मनात काय आहे ते सांगाल का ?
    आदर्श धर्म कल्पना काय आहे ते सांगाल का ?आपण नुसते बडबडे आहात असे अनेकाना वाटते , अगदी भल्याभल्याना , म्हणुनतर आपण आहात तिथेच आहात असे ते समजतात हे आपल्या कानावर आले असेलच , पण त्यामुळे आमच्या सारख्याना फार फार वाईट वाटते कारण आपल्याकडे वाद घालायचे कौशल्य आहे , मांडणीची जाण आहे , आणि मला एक सांगा , अगदी मनापासून , असा एक दिवस उजाडला ,
    समजा ,
    असा दिवस उजाडला -सर्व वैदिक वाग्मय वैदिकांनी स्वतःच नष्ट केले
    सर्व समाज शैव झाला किंवा अवैदिक झाला तर सर्व समस्या संपतील का ?आपले जगणे एकदम सोपे होईल का ? आपण असे प्रश्न अनुत्तरीत ठेवू नका !उत्तर द्या !
    अनेकतेतच एकता आहे हा भारताचा आत्मा आहे

    ReplyDelete
  31. प्रिय अंकुश सुळे साहेब !
    एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे ,
    आपण म फुले यांचे लिखाण पाहिले आणि त्यांनी जिथे जिथे ब्राह्मणांचा संदर्भ किंवा त्यांच्यावर टीका केली आहे त्या त्या वेळेस त्यांनी आपणास मर्यादा पण घालून
    ब्राह्मणांचे येथे नाही प्रयोजन | द्यावे हाकलून जोती म्हणे ||
    ( संदर्भ - ब्राह्मणांचे कसब
    ब्राह्मण जोशी शूद्रांच्या लग्नात त्यास कसा लुबाडतो याविषयी - जोतीराव फुले)
    आता विषय काय - तर ब्राह्मणाना लग्नात कार्यात महत्व देऊ नये - शूद्रास तो लुबाडतो -
    हे म फुले यांचे मत आज कितीजण पाळतात महारवाड्यात ?मराठा समाज माली समाज ,
    सर्वाना आपली लागणे अजूनही पूर्वापार करावीशी वाटतात ,अजूनही तेच चालू आहे !
    का ? कारण सर्वांनाच ते पटत नाही !आपण सर्व लोक इतके ओरडा करत आहात , पण अजूनही सर्व जातीच्या बायका ब्राह्मणाला दक्षिणा देत वाकून नमस्कार करतात ! ते एक प्रतिक आहे !
    जसे पुरुश्सुक्तात हात मस्तक ,पाय अशी निरनिराळी वाटणी केली आहे तसेच हे ब्राह्मण वंदन प्रतिकात्मक आहे !सर्व सरकारी अधिकारी, मंत्री आणि जमीनदार यांच्याकडे सर्व विधी होत असतात ,आणि त्यात ब्राह्मणाला वंदन केले जाते मी स्वतः याचा सर्व्हे केला आहे आणि अजूनही ९०.९५ %घरात सर्व पद्धती पूर्वीसारख्या चालू आहेत -हि क्रांतीची भाषा बाहेरच चालते , घरात नाही ,
    म फुले काय म्हणतात ? येथून हाकलून द्यावे ! सर्वस्वी समाजातून हाकलून द्यावे असे नाही म्हणत !
    कारण ते भट वृत्तीवरती चिडून आहेत , ते एका वृत्तीचा निषेध करत आहेत -
    मला असे स्पष्ट वाटते ,ब्राह्मण द्वेष हे राजकारणातून जन्मलेले अपत्य आहे , त्याला सामाजिक न्यायाची बैठक नाही - अजूनही साखर कारखाने चालू होताना ब्राह्मण हा पूजेसाठी लागतोच , मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री पंढरीची पूजा करताना बडवे उभेच असतात आशीर्वाद द्यायला ! आणि सर्व सामान्य वारकऱ्यां तून निवडलेला वारकरी सुध्दा त्या बडव्याना डावलून दर्शन करत नाही त्यांच्या कडून मानाची प्रसाद म्हणून शाल श्रीफळ आणि तुळशीची माळ स्वीकारतो !
    पृथ्वीराज चव्हाण ,जयंत पाटील ,आबा ,काका पुतणे ,मुंडे , मनोहर जोशी सर ,झाडून सर्व जातीचे पुढारी असेच वागतात !त्यानाही बडवे हवेच असतात ! आता याला काय म्हणणार ?
    सांगा आता संजय सोनवणी !आणि बोलाहो अंकुश सुळे साहेब !
    तुम्हीच एकदा तरा तरा जा आणि त्या बडव्यांच्या समोर आपला राग बोलून दाखवा
    बघा तर जमते का ते ?

    ReplyDelete
    Replies
    1. @ pruthviraj vijayrajMarch 9, 2014 at 12:30 AM

      म. फुले यांच्या संदर्भातील प्रतिक्रिया मी लिहिलेली नाही, कृपया गैरसमज नसावा.

      अंकुश सुळे

      Delete
  32. प्रिय अंकुश सुळे साहेब,

    ह्या संदीप देशपांडेच्या नादाला लागून आपला किमती वेळ वाया घालवू नका, अशी विनंती.
    असले रिकाम टेकडे लोक विना काम-धंद्याचे असतात, त्याच प्रमाणे ते खूपच हेकेखोर असतात, इतरांचे ऐकून घेण्याची त्यांची मुळीच इच्छा नसते. मला खात्री आहे की तुमचा पुरुष सुक्तालाच काय संपूर्ण वेद वाड:मयालाच तीव्र विरोध आहे, आणि तो असायलाच हवा. माझाही आहे, परंतु देशपांडे सारख्या लापाट माणसाला सुधारावयाचे म्हणजे इतके सोपे काम नाही. हे अक्षरश: दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे. हा माणूस आपला हेका कधीच सोडणार नाही, अशी माझी खात्री पटली आहे. हा वेद-वेद करतच मरणार हे त्रिकाल बादि सत्य आहे. याला ब्राह्मण हितापलीकडे काहीही दिसत नाही. समतेच्या याने कितीही गप्पा मारल्या तरी आतून हा संपूर्णत: विषमतावादी आहे, हेच सत्य आहे!

    अविनाश, ठाणे

    ReplyDelete
    Replies
    1. गोड सुचना, धन्यवाद मित्रा !

      अंकुश सुळे

      Delete
    2. @अविनाश रा.ठाणे.,
      माझ्या मते काहीतरी गैरसमज करून घेऊन कुनाच्यानावाने बोटे मोडून झुरत मारण्यापेक्षा ,काहीतरी ध्यास घेऊन चांगल्या कामासाठी झिजून मरणे कधीही चांगले.
      तुम्ही विरोध करत आहात याला माझा आक्षेप नसून गैरसमजातून विरोध करू नये असे माझे म्हणे आहे.बाकी तुमची मर्जी.

      Delete
    3. भटूकल्या, तू झुरतच मरणार आहेस. खोट्या, दांभिक, बेगडी तत्वांना मरेपर्यंत कुरवाळत बस! हीच तुला शिक्षा आहे!

      Delete
    4. अय्या !
      अंकुश सुर्वे आणि अविनाश पण ३ दिवस बाजूला बसतात का ग ?
      आता कुठे मधेच गायब झाले म्हणून विचारते हो
      या वयात असा त्रास होतोच + पण यानापण ?
      तुझ आपल काहीतरीच अग ते मर्द मराठे आहेत , ते गेले असणार कोल्हापुरात !
      लाडू वळायला !तुला काय वाटलं तीन दिवस दिसले नाहीत तर ? अगदीच ग तू चावट बाई !
      अनिता + विनिता

      Delete
    5. @ Anonymous March 12, 2014 at 4:10 AM

      तुला शरम नावाची चीज आहे कि नाही, काय हा फालतूपणा?

      अविनाश,ठाणे

      Delete
    6. गावंढळ देशपांडया, अजून झोपला आहेस काय? उठ आता सकाळ झाली आहे !

      Delete
  33. तरीच म्हटलं अजून ठाण्याचे अविनाश साहेब आले कसे नाहीत ?
    अंकुश सुळे आणि अविनाश ,
    त्यांच्या वरच्या बाजूची प्रतिक्रिया किती छान आहे ! म फुले हे भट गिरी करत प्रजेला त्रास देणारी जी ब्राह्मण भट प्रवृत्ती होती तिच्या विरुद्ध बोलत आहेत , पण त्याचा हे राजकारणी लोक राजकारण करताना ब्राह्मण द्वेष करण्यासाठी उपयोग करत आहेत !आम्हा ख्रिश्चन लोकाना अनेक ब्राह्मण लोकांनी आधार दिला आहे ,पार खेड्यापासून आज शहरात सुद्धा आम्हाला त्यांचेच मार्ग दर्शन आणि प्रेम मिळते .
    पूर्वी ब्राह्मण वर्गाकडून टिळक आगरकर हि ब्रांड नेम असल्या सारखी नावे वापरली जात असत
    आता फुले आंबेडकर शाहू हि ब्रांड नेम झाली आहेत आणि कुठलाही प्रश्न आजकाल त्या नावानेच सांगड घालत सोडवण्याचा प्रघात असतो . पण आमच्या रेव्हरंड टिळकांची कोणालाच आठवण होत नाही
    अविनाश म्हणतच असणार मनात - हा जो अजून एक बाटगा ब्राह्मण आहे तो कोणतरी बडबड करतो आहे !वगैरे वगैरे !
    आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू - इतर जातीना सवर्ण मराठा लोक ब्राह्मण जातीविरुद्ध का पेटवत असतात ?
    हे राजकारणाचे नियम आहेत आणि त्याप्रमाणेच हे घडत आहे !
    मराठा वर्गाला खेड्यात आता कुणाचाही विरोध नको आहे आणि झालाच तर त्याचा विखार आपल्या पर्यंत पोहोचू नये म्हणून माकडाच्या हाती कोलीत देण्याची सोय त्यांनी करून ठेवली आहे खेड्यातून झपाट्याने शहरात येणारा सधन मराठा वर्ग शहरातील ब्राह्मण वर्गाची सद्दी संपवायला याचा पुरेपूर वापर करत असतो , आजकाल पुणे नाशिक औरंगाबाद सोलापूर इत्यादी ठिकाणी सधन मराठा वर्ग आपली गुंतवणूक वाढवत आहे शिक्षण क्षेत्रातून ब्राह्मणांची जागा साधन मराठा वर्ग घेतो आहे !

    त्याना तिथेपण आपला सर्वंकष दबदबा हवा आहे !त्याचाच ब्राह्मण द्वेष हा परिपाक आहे !
    दादोजीची हकालपट्टी हे त्याचेच प्रतिक आहे !
    पण =
    शेवटी आरक्षणाने एक प्रकारे ५० टक्के हिंदूंचेच हित जपले जात आहे नाही का ? त्यात मुसलमान आणि आम्हा ख्रिश्चनाना काय मिळते ?म्हणजेच "अहो रुपम अहो ध्वनिम " करत एकमेकाना कुरवाळत काँग्रेस आणि भाजप ५० % " हिंदू "लोकांचेच भले करत आहे असेच आम्ही म्हणणार !

    गरीब अशिक्षित खालचा वर्ग हा असहाय असतो त्याना असे लीडर भडकवतात , आपली पापे लपवण्यासाठी ते ब्राह्मणाना टार्गेट करत असतात !त्यांना शेतमजूरही हवे असतात आणि तेही त्यांच्या दावणीला बांधलेले , साखरेचा भाव मिळण्यासाठी आंदोलने का होतात ? जर सहकार हाच खेड्याच्या उद्धाराचा कणा आहे , तर मग हे आंदोलन उभेच कसे राहते ?सरकारही यांचेच आणि आंदोलन करणारेही यांचेच , मग समस्या काय आहे ? सहकार क्षेत्राची जुलमी बेबंद हुकुमशाही ! आणि लक्ष उडवण्यासाठी हा ब्राह्मण द्वेष !ब्राह्मण हा इतका बुजलेला आणि सपाट झालेला आहे कि त्याच्यात धन दांडग्या मराठा वर्गा बरोबर लढण्याची टाकद च नाही तरी या साधन वर्गाची भीती कमी होत नाही , त्याना पिळवणूक करायची असते इतर जातींची जमीन हडपायची असते ती आदिवासी आणि बीसिंची ,हे सर्व गाव पातळीवरचे धागेदोरे ब्राह्मण द्वेषाच्या राजकारणाने लपले जातात असे त्याना वाटते !
    आम्हा पर्धार्मियाना मात्र हाती काहीच लागत नाही
    पण आज तो वर्गही जागृत होत आहे !त्याना आता ब्राह्मण वर्ग आपला वाटू लागला आहे !
    अविनाश साहेब आम्हाला उत्तर द्या !
    जोसेफ डिसुझा , कणकवली

    ReplyDelete
  34. अंकुश ,
    अरे लबाडा !
    आता मला सांग आपण नियतीच्या साक्षीने १५ ऑगस्ट ला आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो , नंतर त्याच देशाची डॉ आंबेडकर यांनी इतर अनेक लोकांसह घटना लिहिली - त्यामध्ये बाबू राजेंद्र प्रसाद , कन्हैयालाल मुन्शी , चक्रवर्ती राजगोपालचारी ,वल्लभभाई पटेल ,गोविंद वल्लभ पंत , सरोजनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित असे लोक होते ती ती कृष्णाम्माचारी होते सर्वांनी डॉ आंबेडकर याना अध्यक्ष नेमले आता इतके सर्व झाल्यावर १९५० ला आपण सार्वभौम प्रजासत्ताक झालो आणि आपली घटना हा आपला कायदा बनला आणि जे काही करायचे ते त्या चौकटीतच करायचे असे ठरले
    अरे अंकुश बाळ , आता परत कसली मानवी स्वातंत्र्याची गोष्ट ? आपण बनवली ती काय जनावरांची घटना होती का ?
    बेटा , एक सांग मला ,तुझे वय किती आहे , तुला लिहिता वाचता नक्कीच येते ,मग तुला थोडे चिंतन करायला काय हरकत आहे , जमेल हळूहळू ,पहिल्या वेळेस कंटाळा येईल ,
    सगळ्याच बाबतीत पहिल्या वेळेस त्रास होतो , आईला विचार !
    नंतर कळेल तुला की आपण बोलतो तितके हे सोपे नाही बदल करणे वगैरे !
    एक सांगू का , अनेक वर्षे माझ्या मनात इच्छा आहे की कोल्हापुरात प्रसादाचे लाडू वळायचे काम स्त्री वर्गाने करावे , अनेक , हजारो स्त्रियांची तशी इच्छा असेल !
    पण हा विटाळाचा मुद्दा आड येतो + आता याबाबतीत तू पुढाकार का घेत नाहीस , म्हणजे तुझे पुरोगामी मुखवट्याचे सोंग सर्वाना कळेल आणि तुझा ढोंगीपणा पण जग जाहीर होईल
    बघू या आता कसा प्रतिसाद देतो ते , विषय टाळू नकोस !यात ब्राह्मण असतील तर त्यांचा विरोध कर , चळवळ कर , पुरोगामित्व सिद्ध करायचा इतका सुंदर मोका परत येणार नाही ,
    जे काही करायचं ते आईला विचारून कर आणि शाळा न बुडवता कर हं !
    कधी करणार हे काम ?

    ReplyDelete
  35. अविनाश आणि अंकुश
    सर्व तरुण पिढीचे नेतृत्व करत कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई च्या देवळातील हि अंध श्रध्दा निर्माण करणारी प्रतिगामी प्रथा बंद करा अशी आमची तुम्हाला विनवणी आहे !स्त्रियांच्या वितालाचा आणि लाडू वळण्यासाठी लागणाऱ्या पवित्रतेचा काहीही संबंध नाही
    मंदिरातील अशा प्रथा पाडणाऱ्या ब्राह्मण वर्गाचा निषेध असो !
    अंकुश आणि अविनाश आगे बढो !

    ReplyDelete
  36. संजय सर ,
    " एक सांगू का , अनेक वर्षे माझ्या मनात इच्छा आहे की कोल्हापुरात प्रसादाचे लाडू वळायचे काम स्त्री वर्गाने करावे , अनेक , हजारो स्त्रियांची तशी इच्छा असेल !
    पण हा विटाळाचा मुद्दा आड येतो + आता याबाबतीत तू पुढाकार का घेत नाहीस , म्हणजे तुझे पुरोगामी मुखवट्याचे सोंग सर्वाना कळेल आणि तुझा ढोंगीपणा पण जग जाहीर होईल "

    हे अंकुश सुळे ला केलेले आवाहन अतिशय आवडले
    अंकुश हा अतिशय पुरोगामी विचारांचा आहे आणि तो फक्त ब्राह्मण द्वेष्टा नाही
    समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तो कोणतेही धाडस करायला तयार असतो आणि मला तसेच अनेकाना खात्री आहे की अशा नेक कामात तो कच खाणार नाही
    आज तो या विटाळ विरोधी आंदोलनाची घोषणा करेल अशी मला खात्री वाटते !आम्हा स्त्रियांचे परम दैवत असलेल्या आणि अनेक हिंदू मराठी कुटुंबांची कुलस्वामिनी असलेल्या महालक्ष्मीला वैदिकांच्या शृंखलेतून आणि खोट्या श्र्द्धापासून सोडवणूक करण्याचे इतके मोठे कार्य अंकुश सुळेकरणार आहेत याचा आम्हाला परम अभिमान वाटतो !
    महालक्ष्मीला विटाळा सारख्या ब्राह्मणी विचारातून सोडविण्यासाठी असे बदल झालेच पाहिजेत !
    ब्राह्मणांचे वर्चस्व आता नष्ट होईल आणि सर्व स्त्रीयांचा , अगदी विधवांचा प्रसादाचे लाडू वळायला हातभार लागो हीच आमची विनवणी !
    तेजस्विनी भोईटे

    ReplyDelete
  37. आभार तेजस्विनी भोइटे ताई
    आणि धन्यवाद संजय सोनवणी सर +मोहिनी ताईनी सुंदर विचार मांडले आहेत
    अविनाश आणि अंकुश सुळे यांची दातखीळ बसली
    आता या विटाळाच्या भ्रामक समजुतीला दूर करण्याचे आवाहन केल्यावर दोघांनी शेपूट घालून पळ काढला !हे औट घटकेचे पुरोगामी असेच असतात ,यांना स्पेसिफिक कार्य क्रम दिला की हे बोलबच्चन
    धूम ठोकतात प्रासंगिक लिहून भडक मते मांडण्यापेक्षा ,विचारांची बैठक पक्की केली तर आपल्याला सत्याचा साक्षात्कार होईल

    श्री देशपांडे यांची कोंडी करून या भडक बटबटीत लोकांना काय साधायचे होते ?

    संत तुकारामांनी शैव आणि वैष्णव यांच्यावर केलेला अभंग थोरच आहे !

    ReplyDelete
  38. संदीप देशपांडे
    एक विचार करण्याचा मुद्दा असा आहे
    तेजस्विनी भोईटे वहिनींनी अंकुश सुळे आणि अविनाश या पुरोगामी विचार करणाऱ्या विचारवंताना अगदी साधा प्रश्न विचारून आत्म चिंतन करायला भाग पाडले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
    संदीप तूमहाला असे अनेक टाईम पास पोसलेले विचारवंत भेटतील पण त्यांच्यात दम नाही हे तेजस्विनी ताइनि त्यांनाच साद घातल्यावर दिसून आले
    तेजस्विनी या कोल्हापुरात प्रसिध्द असल्यामुळे त्या लगेच अंकुश आणि अविनाशला महालक्ष्मी बाबत निमंत्रणच देतील ,
    इथे अजून एक सांगावेसे की चेहरा नसलेली अशी अंकुश आणि अविनाश सारखी माणसे समोर कधीच येत नाही गाभारा हा स्त्रीयांना निषिद्ध असा नियम काढल्यावर मंदिरात आंदोलन झाले होते , आतातर स्त्री पुरुष सर्वांनाच पहाटेच पूजा बंद करून ब्राह्मण पुजारी लीकांची सरशी झाली आहे अशा वेळी अंकुश आणि अविनाश यांनी पुढे सरसावून अशा पुजारी लोकाना बाजूला सारून वितालाच्या ब्रामक कल्पना भिरकावून देत स्त्री पुरुष सर्वाना प्रसादाचे लाडू वळण्याचे काम दिले पाहिजे
    मंदिरात सरकार कडून दिले जाणारे सोवळे पितांबर वगैरे अस्वच्छ असते त्यासाठीही त्यात लक्ष घातले पाहिजे
    संदीप देशपांडे , बघा , या बोलाचाच भात आणि बोलाचीच कधी अशा वृत्तीच्या अंकुश आणि अविनाशला संजय सोनावणी यांचे पण पूर्ण संरक्षण आहे !
    या विशाआआयात इतक्या बोलक्या प्रतिक्रिया येत असून हे सर्व कोंडाळे गप्प बसले आहे यावरून त्यांचा ढोंगीपणा उघड होतो आहे

    ReplyDelete
  39. एका मंदिरात ( पंढरपूर )_पुरुषसुक्त म्हणतात त्यावर बंदी आणा असे म्हणणारे ,तितक्याच महत्वाच्या मंदिरात ( महालक्ष्मी कोल्हापूर ) प्रसादा बाबत आणि स्त्रियांच्या हक्का बाबत काहीजण आग्रही भूमिका घेत आहेत पण संजय सोनावणी , अविनाश आणि अंकुश सुळे पळ काढत आहेत
    जे कोण काही मागणी करत आहेत आणि मदत मागत आहेत त्यांचे म्हणणे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांचे म्हणणे विचारप्रवाह म्हणून एकच असणार !म्हणजे अविनाश आणि अंकुश यांनी तर हा विषय उचलून धरला पाहिजे
    निसर्ग नियमाने होणारे बदल हे काही पवित्र अपवित्र मानले जाणे आणि त्याला अविनाश ,आणि अंकुर सुळे यांनी मूक पाठींबा व्यक्त करावा यासारखे दुर्दैव नाही
    एकेकाळी साने गुरुजींनी मंदिर प्रवेशा साठी आंदोलन केले होते पण आता चक्रे फिरत आहेत
    आता अविनाश आणि सुळे याना जागाच उरली नाही तोंड लपवायला जागा नाही !
    बोला हो बोला अंकुश आणि अविनाश , तोंड लपवू नका

    ReplyDelete
  40. वैदिकांच्या तावडीतून मंदिरे सोदवल्याखेरीज अनेक वाईट अमानवी प्रथा बंद होणार नाहीत. कोल्हापुरच काय जेथेही महिलांना/पुर्वास्पृश्यांना मंदिरांत प्रवेशबंदी आहे तेथे तेथे वेगवेगळ्या मार्गांनी संघर्ष सुरु आहे. या सर्व भेदभावाचे मुलकारण पुरुषसूक्त असल्याने त्यावर बंदी आनने सर्वाधिक प्राधान्याचे आहे. देशपांडे किंवा अन्य पुरुषसूक्त समर्थक कितीही कोलांटौड्या मारत विषय भरकटवत असले तरी त्यामागील त्यांची सनातनी वैदिक मानसिकता आहे हेच या चर्चेतून स्पष्ट झालेले आहे. विटःठलापसून सर्व हिंदू देवता या सर्वांच्या आणि स्मतेचे मुर्तीमंत प्रतीक असतांना आई जगदंबेच्याच मंदिरांत स्त्रीयांबाबत असा भेदभाव करणे ही विक्रुत प्रवृत्ती मुलात मनुस्म्रुतीतून आलेली आहे. बंगालात पृथ्वीचे न्हान उत्सवाप्रमाने साजरा करणारा आमचा धर्म वैदिकांनी बाटवून स्त्रीयांची मासिक पाळी अभद्र ठरवावी हे त्यांच्या पुरुषप्रधान वैदिक तत्वज्ञानातून आलेली बाब आहे. ते सारेच तत्वज्ञान व ते पाळनारे वैदिक आपल्या धर्मकार्यात सर्वस्वी नाकारणे हाच पर्याय आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आणि काय ग ताई , त्या विकेकानंद नेकाय अश्लील लिहिले आहे ? काहीच नाही !
      संजय सर पण म्हणतात कि बंगालात "पृथ्वीचे न्हान " उत्सवाप्रमाने साजरा करणारा आमचा धर्म वैदिकांनी बाटवून स्त्रीयांची मासिक पाळी अभद्र ठरवावी हे त्यांच्या पुरुषप्रधान वैदिक तत्वज्ञानातून आलेली बाब आहे. ते सारेच तत्वज्ञान व ते पाळनारे वैदिक आपल्या धर्मकार्यात सर्वस्वी नाकारणे हाच पर्याय आहे.
      संजय सर एकदम वैदिकांवर सरकतात ,
      पंढरपूर देवस्थान कायदा १९७३ साली वसंत राव नाईक मुख्यमंत्री असताना झाला आहे , त्यात वैदिक कुठून आले ?शब्दांची आतिषबाजी करत ब्राह्मण द्वेष साजरा करायचा इतकेच सोनावणी सरांचे स्वप्न असते !अंकुर आणि अविनाश पण तसेच आहेत !
      सोनाली हिंगमिरे

      Delete
    2. ये हिंगमिरे ह्या नावाने लिखाण करणाऱ्या फडतूस बामन-भटा तुझ्या तोंडाचा तमाशा बंद कर, आतापर्यंत भरपूर थेरं केली आहेस, जा जाउन शांतपणे झोप!

      Delete
  41. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल||१||
    ऐका जी तुम्ही भक्त भागवत |कराल ते हित सत्य करा ||धृ||
    कोणा हि जीवाचा न घडो मत्सर|वर्म सर्वेश्वरपूजनाचे ||२||
    तुका म्हणे एका देहाचे अवयव | सुख दु:ख जीव भोग पावे ||३||

    सतीश मेढे

    ReplyDelete
  42. ज्यांना-ज्यांना आंबाबाईचे प्रसादाचे लाडू नको असतील त्यांनी-त्यांनी तिथून प्रसाद म्हणून फक्त चणे फुटाणेच घेऊन का जाऊ नये? ज्यास्तच खुमखुमी असेल तर दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच संघर्ष का करू नये? आणि हो ते सुद्धा काम-धंदे वगैरे सर्व काही सोडून देवून! त्या आंबाबाईला (महालक्ष्मीला) मासिक पाळी येत नव्हती काय? उगीच काहीतरी नाटक? इतरांना कामाला लाऊन हे मात्र नामानिराळे? जावा भवानी मंडपात तळ ठोकून रहा जोपर्यंत भट-ब्राह्मण लोक प्रसादाचे लाडू स्त्रियांना वळायला परवानगी देत नाहीत तो पर्यंत! समजा भटांनी परवानगी दिली नाही तर तुम्हीही गेलात खड्यात आणि तुमची देवीही! ह्या न्यायाने तुम्ही वागणार काय?

    श्रुती शर्मा

    ReplyDelete
    Replies
    1. @ VIVEKANAND SERAO March 11, 2014 at 2:11 AM
      @ AMRUTA VISHVARUP March 11, 2014 at 1:49 AM
      @ तेजस्विनी भोईटे
      @ Anonymous March 10, 2014 at 2:44 AM

      मी लिहिलेले वरची प्रतिक्रिया हि भूसनळ्यानो तुम्हाला उद्देशून आहे!

      श्रुती शर्मा

      Delete
  43. अहिंसा तुकारामा सारखी हवी !

    तुका म्हणे :

    भले तर देऊ कासेची लंगोटी !! नाठाळाचे माथी हाणु काठी !!

    सुभाष शिर्के

    ReplyDelete
    Replies
    1. अय्या !
      अंकुश सुर्वे आणि अविनाश पण ३ दिवस बाजूला बसतात का ग ?
      आता कुठे मधेच गायब झाले म्हणून विचारते हो
      या वयात असा त्रास होतोच + पण यानापण ?
      तुझ आपल काहीतरीच अग ते मर्द मराठे आहेत , ते गेले असणार कोल्हापुरात !
      लाडू वळायला !तुला काय वाटलं तीन दिवस दिसले नाहीत तर ? अगदीच ग तू चावट बाई !
      अनिता + विनिता

      Delete
    2. @ Anonymous March 12, 2014 at 1:23 AM

      तुला शरम नावाची चीज आहे कि नाही, काय हा फालतूपणा?

      अविनाश,ठाणे

      Delete
  44. अंकुश आणि अविनाश ,
    आता कुठे शेण खायला गेला आहात ?
    तेजस्विनी ताई तुम्हाला आवाहन करत आहेत
    आणि तुम्ही षंढ असल्या सारखे गप्प बसत आहात ?

    संजय साहेब ,आमचे अतिहुशार संजय सर !
    आड गावाहून पेडगावाला जाऊ नका !कसली मनुस्मृती ?कोणाला घेण देण आहे ?
    प्रत्येक गोष्ट मनुस्मृती आणि पुरुष सुक्त असल्या नावाशी जोडण्याची तुमची हौस फिटत नाही अजून ?जी गोष्ट नाकारायची आहे तिचा एकसारखा पंचनामा करत काथ्याकुट करत बसायचं हि त्या विषयाची चेष्टाच आहे आणि ते पाप तुम्ही करत आहात !
    हा गंभीर विषय आहे १९७३ चा मूळ पंढरपूर देवस्थान कायदा नीट वाचा !
    चा आहे त्या वेळेस मुख्यमंत्री कोण होते ते बघा राज्य कोणत्या पक्षच होत ते बघा . त्यांचे हे पाप आहे त्यासाठी जुने अडगळीतील धर्म ग्रंतहाचे दाखले देत साप साप म्हणून भुई धोपात्न्याची गरज नाही किंवा जातीय टीका करण्याची गरज नाही
    अगदी सोपे सत्य सर्वांसमोर ठेवा
    कायदा करताना कोण सत्तेत होते ?वसंतराव नाईक !
    विठ्ठल मंदिर कायदा १९७३ वाचताना बेणारी बडवे पुजारी परिचारक हरिदास असे उल्लेख आहेत आणि त्याचं कक्षा ठरवून दिलेली आहे , एक समिती जिल्हा न्यायमूर्ती नाडकर्णी यांच्या देखरेखीखाली हे ठरले आहे बेणारी वेदमंत्र म्हणून पूजा करतात !असे कायद्यात लिहिले आहे त्यात कुठेही ब्राह्मण हा शब्द एकदाही आलेला नाही ,
    आपण भट ब्राह्मण असे उल्लेख सरसकट करता त्या ऐवजी तो कायदा वाक्क्षुन असे नेमके शब्द वापरून त्या बेणारी बडवे हरिदास यांना बोल लावावेत !
    पण तरीही ते कायद्याचे काम , कोन्ग्रेस सरकारने बनवलेला १९७३ चा देवस्थान कायदा पाळत आहेत - एक वंजारी मुख्य मंत्री असताना हा कायदा झाला हे विशेष !
    बोला !
    दुर्वांचे मूळ आणि ऋषीचे कुळ शोधण्यात अर्थ नसतो !

    ReplyDelete
    Replies
    1. This writing is a madness of Vivekanand Serao.

      Delete
  45. @VIVEKANAND SERAO

    भूसनळ्या, त्या अंकुश आणि अविनाश या सभ्य लोकांबद्दल असभ्य लिखाण करताना तुला थोडीसीही लाज कशीकाय वाटत नाही? तू घरात बसून काय करीत आहेस, ..... खातो आहेस काय? मुर्खा तुला देवीं बद्दल व त्यांच्या प्रसादा बद्दल (पुरुषांनी वळलेले लाडू) जास्त पुळका आला असेल तर तू का कोल्हापुरात जाऊन संघर्ष करीत नाहीस? ते तरी सांग! उगीच बहिकल्या सारखे करू नकोस! तोंडावर पडशील, काळजी घे!

    श्रुती शर्मा

    ReplyDelete
  46. श्रुतीताई श्रुतीताई ,
    ऐक ना ग
    आपल्या बायकांच्या बाबत किती छान लिहिले सोनाली हिंगमिरे आहे तेजस्विनी मावशी नी !
    तुला समजल ना त्या काय म्हणत आहेत ते ?

    अग ताई , त्या पुरुषांची आणि सरकारी अधिकारी लोकांची दादागिरी मोडून सर्व बायकांना लाडू वळू देण्याचा हक्क मिळण्याचा आग्रह धरत आहेत
    आणि
    त्यात अंकुर आणि अविनाश यांनी काहीतरी कराव असं त्याना वाटतंय पण ते काहीच करत नाहीत , त्यांना फक्त शेंडीवाल्याना चिडवायला आवडतं ,
    आणि काय ग ताई , त्या विकेकानंद नेकाय अश्लील लिहिले आहे ? काहीच नाही ! संजय सर पण म्हणतात कि बंगालात "पृथ्वीचे न्हान " उत्सवाप्रमाने साजरा करणारा आमचा धर्म वैदिकांनी बाटवून स्त्रीयांची मासिक पाळी अभद्र ठरवावी हे त्यांच्या पुरुषप्रधान वैदिक तत्वज्ञानातून आलेली बाब आहे. ते सारेच तत्वज्ञान व ते पाळनारे वैदिक आपल्या धर्मकार्यात सर्वस्वी नाकारणे हाच पर्याय आहे.
    संजय सर एकदम वैदिकांवर सरकतात ,
    पंढरपूर देवस्थान कायदा १९७३ साली वसंत राव नाईक मुख्यमंत्री असताना झाला आहे , त्यात वैदिक कुठून आले ?शब्दांची आतिषबाजी करत ब्राह्मण द्वेष साजरा करायचा इतकेच सोनावणी सरांचे स्वप्न असते !अंकुर आणि अविनाश पण तसेच आहेत !
    सोनाली हिंगमिरे

    ReplyDelete
    Replies
    1. ये हिंगमिरे ह्या नावाने लिखाण करणाऱ्या फडतूस बामन-भटा तुझ्या तोंडाचा तमाशा बंद कर, आतापर्यंत भरपूर थेरं केली आहेस, जा जाउन शांतपणे झोप!

      Delete
    2. ही तुझी आज्ञा समजायची का? प्रेमाने सांगतो आहेस का हक्काने ??
      आम्हाला शीरसावंद्य आहे
      मातोश्रींची इच्छा जसे सांगेल तसे !
      तुझ्या आईला किंवा बायकोला वेळ असेल त्या प्रमाणे ! चांगल्या कामाला उशीर नको ,
      पण एक सांगतो मी ब्राह्मणही नाही आणि ब्राह्मणाना कितीही शिव्या दिल्यास तरी काहीही वाटणार नाही ,
      व्यवस्था कशी करायची ते सांग ,काहीना झोपून चालते तर काहीना उभ्याने !
      रडू नकोस असा , सगळ काही ठीक होईल , पहिल्यांदा त्रास होतोच !- विचार बर त्याना ++

      Delete
    3. ब्राह्मण आहेस की नाहीस हे तू सांगण्याची गरज नाही, ते तुझ्या लिखाणा वरूनच समजते!

      Delete
    4. @ Anonymous March 16, 2014 at 1:50 AM

      "ब्राह्मणाना कितीही शिव्या दिल्यास तरी काहीही वाटणार नाही"---------------------------------------------------------------------> ???????????????????

      अरे, आता त्यांना शिव्या खाण्याची सवय झाली आहे, लापाट झाले आहेत सगळे!

      Delete
    5. १०० टक्के बरोबर
      लोचट झाले आहेत ते !सरकारी नोकरी नंद
      राजकारणात स्थान नाही गावाकडे दाखवायला तोंड नाही ,म्हणून शहरात गर्दी करतात

      Delete
  47. Badrinath chief priest Kesavan Namboodiri arrested for sexual molestation

    Sent to judicial custody for 14 days by Saket court.
    [News Channal India TV’s Report || Updated 05 Feb 2014, 07:25:06 ]


    New Delhi: In a shocking incident of sexual molestation of a married woman, the chief priest of Badrinath temple, Keshavan Namboodiri, has been arrested and sent to 14 days judicial custody on Tuesday. The victim knew the priest and was invited over by him in a hotel where he attempted to sexually molest her.
    She was in touch with her husband over the phone as she was suspicious of him. Since, the victim was pregnant, he offered her to hold her arm and support her but she refused. He then took her to his room inside which a teenager was sitting whom he told to move out. Inside, the room, there were cigarette stubs and liquor all around. He then closed the door and asked the woman to bring a glass of water for him. When she brought water, he started molesting her. The victim screamed and ran out of the room.

    By that time, since the woman was in constant touch with her husband, he immediately rang up the driver and told him to take his wife home. The victim reached home and told everything about the incident to her husband.


    The victim’s father has been going to Badrinath shrine since 1993 as he wanted to build a hotel there in 2002. "Mehrauli police went to his room, took photographs, and took the priest to AIIMS for breathlyser test. Even at AIIMS at 4:30 in the morning, he was unable to stand properly", said the victim's father.
    Meanwhile, the Badrinath Kedarnath Temple Committee has suspended the chief priest Keshavan Namboodiri till the time he is cleared of the molestation charge in court. "He has been removed from the post of chief priest (mukhya rawal)", a Committee official said. The chief priest Keshavan Namboodiri and his associate Vishnu Pradhan have been sent to judicial custody for 14 days by Saket court.



    Keshavan Namboodiri has a state level licensed gun permit, and he had applied for national level permit, Uttarakhand police said.

    Visit orignal link here or copy following link into address bar to visit the page :
    http://www.indiatvnews.com/crime/news/latest-news-badrinath-chief-priest-kesavan-namboodiri-arrested--5233.html

    ReplyDelete
  48. Sanjay Sir ,
    I personally discussed this matter with the pujari class of the mahalkshmi temple of kolhapur on 14th of this month
    and i was astonished to learn that the brahmin class have no objection for the preparation of laddus by the women
    Actually they informed us that some very rich maratha class people are objecting for the same and pressuring the pujari people
    "we have nothing to earn from this " said the brahman shri joshi from the temple .
    Now I request the people not to blame the priest class of Mahalaksmi mandir for the policy decisions
    though the high class maratha caste is objecting I very strongly oppose their idea and request the women of Kolhapur State to participate in preparing the Mahaprasad . If any Brahmin or priest is indulging in the matter please point it out to the govt appointed body so that it will be clear + who is the culprit !and the suitable legal action will be taken instantly
    I am very thankful to the mandir team of pujaris for explaining the matter in length ,
    pruthviraj ghorpade

    ReplyDelete
    Replies
    1. Complete untruth,

      Prithviraj "Brahmin" changed his name and become a "Bahujan" to get support of "Bahujan" people.This is only for blame on "Maratha"
      people and indirectly support "Brahmin" priest.

      Pankaj Mane, Kolhapur.

      Delete
    2. श्री संजय सर आणि रा रा पंकज माने सर ,
      आता काय करावे ते समजताच नाही
      मला एक सांगा + आपण तारीख वेळ आणि जागा ठरवून कोल्हापुरात भेटूया म्हणजे तरी आपली खात्री होईल की आम्ही स्वतः खरोखरच पृथ्वीराज आहोत आणि घोरपडे आहोत
      माझे निवडणूक कार्ड आहेच सोबतीला पण मग त्यातून तुम्ही म्हणाल की ते खोटे आहे आणि तुम्ही पृथ्वीराज कुलकर्णी किंवा देशपांडे आहात तर मग काय करायचे ?
      सांगा मला वेळ आणि तारीख म्हणजे तुमचा गैर समाज दूर करता आला तर चांगलेच आहे
      आम्हीपण ब्राह्मण लोकांसारखे शुद्ध बोलू आणि लिहू शकतो याचा खरेतर आपणास आनंद होणे अपेक्षित आहे पण + + असे असते तर !
      दुसरी गोष्ट संजय सरांनी खुलासा करणे अपेक्षित आहे , पण त्यांच्या सोयीचे नसेल तर ते खुलासा करत नाही हा इतिहास आहे !
      मूळ विषया संदर्भात बातमी अशी आहे की , १९७३ चा कायदा हा बेकायदा आहे ! किती विनोदी आहे ना हे वाक्य ?आणि त्या वेळेस तो कायदा केला कुणी बहुजन मुख्यमंत्री वसंतराव नाईक !आणि राज्य काँग्रेस चे ! आता बोला , म्हणजे इथे भाजप किंवा ब्राह्मण यांचा काय संबंध आला ?
      आमचे अनेक मित्र ब्राह्मण आहेत , आज कोल्हापुरात अनेक नामवंत ब्राह्मण आहेत ,त्याना सगळ्याना एकदम एकाच फ़ॊत्पत्तिने मोजणे हा योग्य रस्ता नाही .
      आपण आत्ता मोडी किंवा गांधी घराण्याकडे अनुक्रमे मुसलमान आणि शिखांच्या हत्येबद्दल मागणी करतो , की त्यांनी देशाची क्षमा मागावी , तसे खरेतर बहुजनांनी विशेश्तहा मी मराठा असून म्हणतो की उच्च मराठा वर्गाने गांधी हत्ये नंतर जी पश्चिम महाराष्ट्रात ब्राह्मणांची अवस्था झाली , जाळपोळ आणि घरेदारे उध्वस्त झाली त्याबद्दल आम्ही खरेतर त्या जातीची बिनशर्त माफी मागितली पाहिजे
      मी माझ्या परीने सर्व समाजाला आपले मानतो ! आपण जन्माला येतो ते ठरवून नाही
      जन्म आणि आपली कूस आपल्या इच्छेने ठरवता येत नाही पण आपण कमीत कमी माणसाना माणसा सारखे वागवू शकतो !

      Delete
    3. Sunday (23.03.2014), at 10.00 am, Bindu Chauk, Kolhapur

      Delete
    4. Pruthviraj,

      What is this?
      Are you son of brahmin?
      Please check, whether your neighbours are brahmins?
      I have doubt about your religion! Vaidik or Hindu?

      Kindly confirm immediately and revert back.

      Delete
    5. ya ! ok why so late ?
      i am in kolhapur tomorrow can we meet tomorrow ?

      Delete
    6. Not possible except Sunday.

      Delete
    7. Do not forget to come...

      "Sunday (23.03.2014), at 10.00 am, Bindu Chauk, Kolhapur"

      Delete
    8. Pruthviraj is a cheater! Big cheater! Not meet at Kolhapur (Bindu chauk), this is a sign of his untruth!!!

      Delete
    9. अहो पृथ्वीराज ,
      असल्या लोकानी बोलावलं म्हणून जाल मिरवत कोल्हापुराला ,
      एक नम्बरचे चालू आहेत हे लोक !
      बिंदू चौकात बसाल जाउन आणि हे लोक बसतील हसत !मी तर असतोच घोटणे हॉस्पिटल जवळ ,किंवा महाराष्ट्र ब्यान्केजवळ किंवा माधुरी बेकरीत
      अहो असले अनेक लोक कानातला मळ काढत बसलेले असतात त्या चौकात फुटपाथवर किंवा बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी - ते तिथेच सापडणार !

      Delete
    10. पृथ्वीराज घोरपडे ,
      आपण अजिबात सिरीयसली घेऊ नका कोल्हापूरला येण्याचे काहीच काम नाही ,आम्ही ठाण मांडून आहोत ना मग तुम्ही कशाला चिंता करता आहात ?
      अविनाश आणि अंकुर हि पिलावळ अशीच टुकार बडबड करत बसणार , हि बाबासाहेबाची अवलाद दिसते आहे , त्याना आपला ९६ कुली तहात कसा माहित असणार ?एका फटक्याचे नाहीत हे !
      अहो याना अन्नाला आपण लावतो आणि हे आपली साथ सोडून ऐन वख्ताला पळून जातात आणि लांबून भुंकत बसतात , यापेक्षा इमानी आपले कुत्रे असतात
      कधी मदत लागली तर २६४०९५२ किंवा २६४२१९४ असा नंबर लक्षात ठेवा
      येसाजी कदमबांडे

      Delete
    11. @Anonymous March 27, 2014 at 8:55 AM (येसाजी कदमबांडे),

      पृथ्वीराज घोरपडे, आपण अजिबात सिरीयसली घेऊ नका कोल्हापूरला येण्याचे काहीच काम नाही ,आम्ही ठाण मांडून आहोत ना मग तुम्ही कशाला चिंता करता आहात ?------------------------> कानातला मळ काढायला ठाण मांडून बसला आहात वाटतं ?

      येसाजी कदमलांडे

      Delete
    12. पृथ्वीराज घोरपडे
      घाबरला! घाबरला! घाबरला!
      xxx मद्धे शेपूट घालून लपून बसला.
      खोटारडा कुठला !

      Delete
    13. Pruthviraj,

      What is this?
      Are you son of brahmin?
      Please check, whether your neighbours are brahmins?
      I have doubt about your religion! Vaidik or Hindu?

      Kindly confirm immediately and revert back.

      भरपूर दिवस झाले, आता सांग लवकर, खरं काय ते !

      Delete
    14. समीर घाटगे हा कानातला मळ काढण्याचे तसेच म्हशी भादरण्याचे काम करत असतो, कधी रंकाळ्या जवळ, तर कधी रेल्वे स्टेशन जवळ, तर कधी राजारामपुरीत सायकल वरून जोर-जोरात ओरडत फिरत असतो. मधेच हुकी आल्यासारखे कधी आंबेडकरांचा तर कधी शाहू महाराजांचा जय-जयकार करत असतो! एकदा चुकून विद्यापीठ कॉलनीत जाऊन ओरडू लागला, लोकांनी चांगलाच बदडून काढला! लोक म्हणाले "प्राद्यापक लोकांवर अजून म्हशी पाळण्याची वेळ अजून आलेली नाही, म्हशी भादरण्याचे तर
      राहिले, पळ नाहीतर तुझीत हजामपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही". अशा ह्या वल्लीला भेटायचे असल्यास अवश्य भेटा. सध्याचा पत्ता "भवानी मंडप".

      -संग्रामसिंह, कोल्हापूर

      Delete
  49. या होळीच्या मंगल दिवशी आपण आपले अभद्र विचार होळीत जाळून टाकू
    आणि
    सर्वांनी जातपात आणि उच्चनीच भेदाभेद नष्ट करत आजपासून समतेवर आधारित समाज रचना करायची प्रतिज्ञा करुया !
    आपण जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते आपलेसे करुया !
    आणि सर्व बीभत्स अमंगल विकृत अभद्र दूर फेकून देऊया !

    ReplyDelete
    Replies
    1. याच महामूर्ख बामणांनी धुलवडीच्या (धुलिवंदन) दिवशी जगदगुरु संतश्रेष्ठ तुकारामांचा खून केला होता!

      Delete
  50. अरे ब्राह्मण कुत्र्या - कुठे होते तुझे हे पवित्र विचार
    तुझे विचार *डी * घालून घे * * र चो *

    ReplyDelete
  51. देव मानणे हिच जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे हे संपूर्ण सत्य विचार या बिचाऱ्या लोकांच्या डोक्यात कधी शिरणार माहित नाही.

    अनघा.

    ReplyDelete
  52. याच महामूर्ख बामणांनी धुलवडीच्या (धुलिवंदन) दिवशी जगदगुरु संतश्रेष्ठ तुकारामांचा खून केला होता!
    आजच्याच दिवशीच नीच, कपटी, वैदिक विषमतावादी मानसिकतेच्या ब्राह्मणांनी जगदगुरु संतश्रेष्ठ तुकारामांचा खून त्यांच्या वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी केला होता!
    विषमतावादी खुनी ब्राह्मणांचा जाहीर धिक्कार करीत आहोत!

    ReplyDelete
  53. 'आप' आणि आपले आर्थिक धोरण
    प्रा. विजय दिवाण

    'आप'ने लोकसभेच्या ३०० जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. केंद्रातील भ्रष्टाचार आणि कठोर निर्णय घेण्यात केलेली कुचराई यामुळे देशाची अर्थव्यवस्था नाजुक बनली असून तिसरा पर्याय बनू पाहणाऱ्या 'आप'चे आर्थिक धोरण समग्र आणि परिणामकारक असण्याची गरज आहे. वित्तीय तूट, परकीय गंतवणूक, चलनवाढ, वाढती महागाई, चालू खात्यावरील तूट, रोजगार निर्मिती यासारख्या प्रश्नांवरील 'आप'चा दृष्टिकोन मतदारांना कळला पाहिजे..
    देशातील र्सवकष भ्रष्टाचाराच्या विरोधात गेल्या काही वर्षांत जे मोठे जनआंदोलन उभे राहिले, त्यातून आम आदमी पार्टीचा जन्म झाला. या नव्या पक्षाने दिल्लीच्या निवडणुकांत आश्चर्यजनक मुसंडी मारून दिल्लीत सत्ता काबीज केली. लोकांना काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांऐवजी तिसऱ्या एखाद्या समर्थ पर्यायाची गरज भासत आहे, हे दिल्लीच्या निवडणुकीत सिद्ध झाले. त्यामुळे आता तिसरा पर्याय म्हणून आम आदमी पार्टीचा विचार जनमानसात रुजला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी ३०० जागा लढविणार असल्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये एक नवे चतन्य निर्माण झाले आहे. वंचितांच्या प्रश्नांवर सातत्याने लढे देणाऱ्या जनआंदोलनांनीही आम आदमी पक्षाला पािठबा जाहीर केला आहे. आता साहजिकच देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आम आदमी पक्षाचा दृष्टिकोन काय आहे याबद्दल मतदारांमध्ये कुतूहल आहे.
    १९९० साली भारताने मुक्त अर्थव्यवस्था आणि व्यापाराचे जागतिकीकरण या गोष्टी स्वीकारल्या. व्यापार व उद्योग यांचे सुलभ परवाने, जास्तीतजास्त परकीय गुंतवणूक, परकीय तंत्रज्ञान आणि उद्योगांचे एकत्रीकरण ही मुक्त अर्थव्यवस्थेची वैशिष्टय़े होती. उद्योगांच्या खासगीकरणाला प्राधान्य देऊन पोलाद, ऊर्जा, हवाई वाहतूक, खाण व्यवसाय अशा १७ मोठय़ा उद्योग क्षेत्रांपकी ११ क्षेत्रांचे संपूर्ण खासगीकरण केले गेले. व्यापाराच्या जागतिकीकरणात आयात-निर्यातीवरील आंतरराष्ट्रीय र्निबध कमी करणे, थेट परदेशी गुंतवणूक शक्य करणे आणि तंत्रज्ञान व मनुष्यबळाची मुक्त देवघेव करणे या गोष्टी अंतर्भूत होत्या. सरकारने बाजाराशी संबंधित नसलेल्या गोष्टीच फक्त हाताळाव्यात हे त्यात अभिप्रेत होते. गुंतवणूक, उत्पादन, व्यापार आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत बाजारपेठेला पूर्ण स्वातंत्र्य द्यावे हे त्याचे सूत्र होते. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था सुधारेल, चलनवाढ होणार नाही, महागाई नियंत्रणात राहील आणि रोजगारात मोठी वाढ होईल असे वाटले होते.
    पुढे चालू...............

    ReplyDelete
  54. तथापि जागतिकीकरणाचा २२ वर्षांचा काळ लोटल्यानंतरही देशाच्या आíथक वाढीचा दर समाधानकारक राहिला नाही, रोजगारामध्ये वाढ झाली नाही आणि वाढती महागाई रोखता आली नाही. २००५ ते २००८ या तीन वर्षांत सरासरीने ९.५ टक्के राहिलेला आíथक वाढीचा दर २०१३ पर्यंत झपाटय़ाने घसरत जाऊन ४.५पर्यंत खाली आला. देशातील भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे, नोकरशाहीची अकार्यक्षमता आणि ठप्प झालेल्या सुधारणा या गोष्टी देशाच्या आíथक प्रगतीस मारक ठरल्या. देशी आणि विदेशी गुंतवणुकीवर त्यांचा अनिष्ट परिणाम झाला. २०११ पर्यंत देशात आलेली परदेशी गुंतवणूक २०१२ या वर्षांच्या सुरुवातीस ६७ टक्क्यांनी कमी झाली. त्याच काळात २०११च्या मे महिन्यात भारतीय रुपयाचे मूल्य ४.२ टक्क्यांनी घसरले. ही घसरण पुढे वाढत जाऊन २०१३ सालाच्या अखेपर्यंत ११ टक्के एवढी झाली. ही घसरण रोखण्यासाठी काँग्रेस आघाडीच्या सरकारने सोन्याची व कच्च्या तेलाची आयात कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात फारसे यश आले नाही. चलनवाढ मोठय़ा प्रमाणावर झाली आणि सरकारच्या चालू खात्यात मोठी तूट आली. ही तूट कमी करण्यासाठी सरकारने डिझेल आणि गॅसवरील सबसिडी कमी केली. सार्वजनिक उद्योगांची विक्री करून पसा उभा करण्याचा प्रयत्न केला आणि देशांतर्गत विमान सेवा, दूरसंचार, वीज वितरण आणि किरकोळ गृहोपयोगी बाजार यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांना प्रवेश दिला. परंतु या गोष्टींचाही फारसा उपयोग झाला नाही. देशात उद्योग वाढले, परंतु उत्पादनवाढ झाली नाही. रोजगारात केवळ ०.३ टक्के एवढीच वाढ झाली. जे रोजगार वाढले ते प्रामुख्याने अनुत्पादक आणि अस्थायी स्वरूपाचे होते. अत्यंत कमी वेतन, सेवासुरक्षेचा अभाव आणि सेवासंलग्न लाभांचा अभाव हे त्यांतील दोष होते. नियोजन आयोगाच्या 'राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेने' या रोजगारहीन वाढीबाबत सलग तीन वष्रे इशारे दिले होते. परंतु तरीही भारत सरकार आणि त्याचा नियोजन आयोग हेच आíथक धोरण पुढे रेटत राहिले. आज अर्थतज्ज्ञांनी असे इशारे दिले आहेत की २०२० सालापर्यंत भारतातील आजच्या रोजगारात १ कोटी ६० लाख एवढय़ा प्रचंड संख्येने घट होईल. वाढती लोकसंख्या ही उद्योगांना मनुष्यबळ देणारी इष्टापत्ती ठरेल अशी केंद्र शासनाची धारणा होती. परंतु उद्योग क्षेत्रात रोजगाराची निर्मिती अत्यल्प झाल्यामुळे लोकसंख्या वाढ हा आता शाप ठरू पाहत आहे.
    पुढे चालू...............

    ReplyDelete
  55. देशाच्या अर्थव्यवस्थेचे हे आजार पाहता तिसरा पर्याय बनू पाहणाऱ्या आम आदमी पक्षाचे आíथक धोरण समग्र आणि परिणामकारक असण्याची गरज आहे. आम आदमी पक्षाच्या वेबसाइटवर जे आíथक धोरणाचे मुद्दे नमूद केलेले आहेत ते अत्यंत वरवरचे वाटतात. उदाहरणार्थ, महागाई रोखण्यासाठी जी पावले उचलणार त्यात विजेचे दर अध्र्यावर आणणे आणि ७०० लिटर पाणी मोफत देणे हे नमूद आहे. दिल्लीत 'आप'ने या गोष्टी लागूही केल्या आहेत. परंतु त्यात वीज-पाणी निर्मिती व पुरवठा यांच्या लाभ-व्यय गुणोत्तराचा विचार केलेला दिसत नाही. अन्नधान्य, भाज्या इत्यादींची महागाई कमी करण्यासाठी काळाबाजारवाल्यांना तुरुंगात पाठवू, शिक्षणामध्ये डोनेशन बंद करू, इस्पितळांची संख्या वाढवू, कंत्राटी नोकऱ्यांऐवजी कायम नोकऱ्या देऊ, व्यापारात 'अनुकूल' (?) धोरण राबवू. उद्योग क्षेत्रात सर्व पायाभूत सुविधा पुरवू इत्यादी गोष्टी आíथक मुद्दे म्हणून 'आप'च्या जाहीरनाम्यात अंतर्भूत केल्या आहेत. परंतु या सर्व गोष्टींसाठी लागणारी भांडवली गुंतवणूक कुठून आणणार हे स्पष्ट होत नाही.
    पुढे चालू...............

    ReplyDelete
  56. देशाला भेडसावणारी वित्तीय तूट कमी कशी करणार, परकीय गुंतवणुकीबाबत काय धोरण असणार, परकीय गुंतवणुकीस विरोध असेल तर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि जागतिक व्यापार संघटना यांच्या दबावास तोंड कसे देणार, देशांतर्गत बाजारपेठ परकीय उत्पादनांना खुली ठेवणार की नाही, कच्चे तेल आणि सोने यांची आयात कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, भारतीय रुपयाची घसरण थांबवून तो स्थिर व्हावा म्हणून काय उपाय योजणार, चलनवाढ आणि महागाई यांवर नियंत्रण राखण्यासाठी कोणती पावले उचलणार, या साऱ्या गोष्टींबाबत 'आप'च्या जाहीरनाम्यात कोणतेही चिंतन दिसत नाही. आज भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ असे सांगतात की येत्या काळात भारतीय रुपयाचे मूल्य आणखी ढासळेल. त्यामुळे परकीय गुंतवणूक आणखी कमी होईल.देशात उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करायची असेल तर तेलाची आयात वाढवावी लागेल. त्यामुळे चालू खात्याची तूट ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढेल. पर्यायाने जीवनावश्यक वस्तूही जास्त महाग होत जातील. ही भाकिते लक्षात घेता तिसरा पर्याय बनू पाहणाऱ्या आम आदमी पक्षाने आíथक धोरणाविषयी मूलभूत चिंतन करून त्याचे मुद्दे तपशीलवारपणे जाहीर करणे आवश्यक आहे. देशाच्या डोक्यावर परकीय कर्ज खूप आहे. त्याच्या व्याजाचा भारही जास्त आहे. ते कर्ज कसे फेडणार आणि परकीय गुंतवणूक बंद करावयाची असेल तर पर्यायी भांडवल कसे उभे करणार याचा खुलासा केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे पक्षाच्या आíथक धोरणाशी सुसंगत शेतीविषयक, उद्योगविषयक आणि व्यापारविषयक धोरणे अधिक सुस्पष्टपणे मांडली जाण्याची गरज आहे. लोकसभेच्या निवडणुकीद्वारे देशाची सत्ता काबीज करण्याचे स्वप्न आम आदमी पक्ष बघत असेल तर या सर्व गोष्टींबाबत पक्षाचा दृष्टिकोन मतदारांना कळणे आवश्यक आहे.
    * लेखक समकालीन घडामोडींचे विश्लेषक आहेत. त्यांचा ई-मेल -vijdiw@gmail.com

    समाप्त.

    ReplyDelete
  57. I feel really very sad to read the threads above. The main article and the threads are just haywire. People are playing with their words & thoughts just like that. Nobody is serious. Everything is just so negative. Such a disappointment it is.....

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...