Wednesday, May 14, 2014

हेही!

वेदनांच्या चक्रीवादळांत
कोणतीही गोष्ट स्थिर
सापडणे कठीण
अगदी वेदनाही...!

मनाच्या मनाला वाटलेल्या
सुखद संवेदना शोधत जावे
पण मनच दगाबाज....
हेही....!

शेवटी कोठुनही निघालो
आणि कोठेही पोहोचलो
पण पोहोचलोच नाही कोठेही
हेही!

1 comment:

आज वेळच तशी आली आहे म्हणुन....

आज वेळच तशी आली आहे म्हणुन बोलणे भाग आहे. मी मोहन भागवत अथवा आसारामबापुच्या विधानांवर प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न मला काही मित्रांनी...