Saturday, May 24, 2014

विजयांमुळे काही......

विजयांमुळे काही गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातात.

उदा. अर्जुनाने पणात जिंकलेल्या द्रौपदीवर पाचही भाऊ कामांध होत अधिकार सांगतात आणि गैरसंबंधातून विवाहाआधी आणि विवाहानंतर नियोगातुन पुत्र प्रसवणारी कुंती त्याला अनुमोदन देते. द्रौपदीचा समावेश आम्ही नित्यस्मरणीय पंचकन्यांत करतो...

उदा. धर्मराज जुगारी असतो, तो कोणाचीही परवानगी न घेता भावांना, नंतर भावांच्या सामुहिक बायकोला पणावर लावतो...तरीही तो धर्मराजच असतो.

उदा. पांडव वनवासात जातात. तेथेही लबाड्या करतात. वात्सल्य भावनेने अमांत कि पौर्णिमांत असा वाद काढत अज्ञातवासाच्या काळाबद्दल भिष्म महाराज पांडवांचीच बाजु घेतात. तेच पांडव युद्धात भिष्माला शिखंडीच्या आडुन ठार मारतात.

उदा. द्रोणाचार्य आपल्या अर्जुनापेक्षा कोणी मोठा धनुर्धर होणार नाही या प्रतिज्ञेला जागत एकलव्याचा अंगठा कापून घेतात. त्याच द्रोणाचार्यांना धर्मराजाच्या असत्त्यामुळे अर्जुनाला ठार मारता येते.

उदा. कृष्ण स्वत:ला धर्माचा उद्गाता समजतो. तोच कर्णाला अधर्माने मारायला सांगतो. धर्म आणि अधर्म सोयीने ठरवायचे असतात हे चिरंतन सत्य नव्हे काय?

उदा. खूप आहेत.

आता दुर्योधन पाहुयात. तो हरलेला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल फार सहानुभूती बाळगायची गरज नाही. पण...

उदा. तो कधीच राजा नव्हता. अंध बापाला ठार मारुन राजा व्हावे अशी स्वाभाविक इच्छा त्याची कधीही नव्हती.

उदा. तो वाईट प्रशासक होता अथवा प्रजेवर अन्याय करत होता असे महाभारतही जितांचे असुनही कोठेही म्हणत नाही.

उदा. त्याला जुगाराचा नाद नव्हता. युधिष्ठिराल होता म्हणून जुगारात त्याने आपल्या मामाला बसवले. द्रौपदीच्या प्रत्येक आक्षेपाला त्याने आधी पांडवांचे त्यावर काय म्हणणे अहे हे विचारले. आणि त्याला कोणाचाही, धर्मराजाचाही आक्षेप नव्हता.

उदा. राज्यावर उत्तराधिकारी म्हणून  अभिषिक्त राजाचा मुलगा म्हणून त्याचा आणि त्याचाच अधिकार होता. राज्याचे विभाजनी नको म्हनून अविवाहित व ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करनारे भिष्म स्वत:च राज्याची कौरव-पांडवांत विभागणी करा हे कोणत्या तत्वाने म्हणाले?

उदा. अर्थस्य पुरुषो दास: हे भिष्मवचन कोणत्या वैफल्यातुन आले? राज्य जर पांडवांचेच आहे असा त्यांचा सिद्धांत होता तर अर्थ ते पांडवांचाच अप्रत्यक्षपणे खात नव्हते काय? जर पंडवांची बाजू न्याय्य होती असे त्यांना वाटले तर ते त्या बाजुला न जाता दहा हजार सैन्याला रोज ठार मारील पण पांडवांना नाही असे का म्हणाले? म्हणजे या न्याय्य महापुरुषाला दहा हजार सैनिकांचे प्राण तुच्छ वातले तर तो नेमका कोणता धर्म होता? आणि असे माहित असुनही केवळ आदरभावनेने ते पडेपर्यंत त्यांना सेनापतीपदावर ठेवणारा दुर्योधन अन्यायी कसा?

उदा. कौरवांपैकी एकही वीर पांडव समोरासमोरच्या पराक्रमात मारू शकले नाहीत. प्रत्येकाला कपटानेच मारावे लागले. अगदी दुर्योधनाला सुद्धा. दुर्योधनाने अखेर आली हे कळूनही धर्मयुद्धाचे नियम तोडले नाहीत. तरीही पांडव न्यायी/धर्मनिष्ठ कसे?

उदा. महाभारतही कौरव अन्यायी होते हे एखाददुसरे उदाहरण सोडले (तेही बालपणीचे) तर उदाहरणांनी सिद्ध करत नाही. केवळ दुष्ट - अन्यायी असे सतत म्हणत राहिल्याने कोणी कसा दुष्ट होतो?

उदा. पांडवांनी अनधिकाराने जेवढे कौरवांवर अन्याय केले तेवढे काही केल्या कौरवांनी पांडवांवर अन्याय  केल्याचे दिसत नाही. वनवास युधिष्ठिराच्या जुगारी प्रवृत्तींनी ओढवून घेतला होता. त्यासाठी दुर्योधनाला दोषी धरायचे काय कारण?

उदा. जो जिता वोही सिकंदर...

तात्पर्य: जिंकत जा...न्याय अन्यायाची पर्वा करू नका!

(यात कोठे "यदाकदाचित"ही वर्तमान आढळला तर व्यासांच्या प्रतिभेला अभिवादन करा आणि एकसुरात म्हणा.....अबकी बार....)

3 comments:

  1. जिंदगी में अपने विचारों से बड़ी कोई कैद, कोई गुलामी नहीं होती. एक बार आप उसमें कैद हो गए तो फिर सारी दुनिया के बदलते रूप आपको असत्य ही दिखते है. कांग्रेस के भ्रष्टाचार के दोषी भी मोदी है, राहुल की कामचोरी के भी दोषी वही है. सेकुलर ब्रिगेड के अपराधों में भी उनका हाथ है और उद्योगपतियों को समर्थन के लिए उन्होंने बंधक बना कर रखा है ही. वोटर अचानक २०१४ में मुर्ख हो गए तो इसके लिए मोदी भी ही दोषी है. सभी देशवासी अपनी जाति, भाषा और राज्य की सीमाएं लांघकर एक हुए है, कुछ मुसलमान भी उनके बहकावे में आ गए है. इन सभी के लिए जीतनेवाले दोषी है. जो हारे वे बेचारे महान चरित्रवान थे यही उनकी कमजोरी थी. वे खुद कुछ खाना नहीं चाहते थे, लोग जबरदस्ती उनके घर में पैसे ले जाकर रख रहे थे, इसमें में भी उनकी क्या गलती? वे देश से बातचीत करने को तैयार नहीं थे क्योंकि वे मौन की शक्ति पर विश्वास करते थे. सारी दुनिया में विश्व बंधुत्व फ़ैलाने के लिए चुनाव होते ही राहुल देश के बाहर गए, इन सभी बातों का संघ वाले गलत अर्थ निकाल रहे है तो इसमें हारनेवाले की क्या गलती?
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  2. संजय राव ,
    किती द्वेष कराल ? सुदैवाने भारतीय जनतेने तुमच्या सार्या आक्क्षेपाना सडेतोड उत्तर दिले आहे.
    मोठ्ठे व्हा , तुम्ही देवावर विश्वास ठेवत नसल्याने देव तुम्हाला सद्बुद्धी देवो असे ही म्हणता येत नाही ! 

    ReplyDelete
  3. कुणी लिहिले आहे हे ? अनानिमसाची टिपण्णी मार्मिक झाली आहे !
    संजय सरांचे बरेच काही चुकते त्यांची विचाराची बैठकच चुकीची आहे त्याला
    ते तरी काय करणार ?
    तसे पाहिले तर , अनेकांचे बरेच काही चुकते आहे ! सर्व समाजाला आपण ब्राह्मण द्वेषाचा कायमचा उत्तम डोस दिला आहे आणि ती बाजू आता भक्कम झाली आहे हा भ्रम आता दूर झाला आहे ! पवार काका पुतणे आणि इतर मराठा वर्ग यांची इतकी ससेहोलपट झाली की त्याना तोंड लपवायला जागाच नाही !फक्त पारंपारिक आदरामुळे त्यांची या भीषण भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटका होईल !अजित पवार यांचा उद्धट पणा तर किळस येण्याइतका घाण आहे हे अनेकांनी अनुभवले आहे !
    संजय सोनावणी यांची बैठक ब्राह्मण द्वेषाची आहे हे श्री ह मो मराठे प्रकरणा पासून सर्वाना माहिती झाले आहे ,फक्त त्यांची मांडणी एखाद्या वकीलासारखी तिरपागडी असते इतकेच -

    आपल्याकडे अतिशय महान विचारवंत ,इतिहासकार होऊन गेले ,थोर द्रष्टे आणि समाजसुधारक झाले ,त्यात बहुतांशी ब्राह्मण वर्ग असणे स्वाभाविक आहे कारण शिक्षणाची पारंपारिक पार्श्वभूमी लाभलेला हा वर्ग आहे त्यामुळे तसे होणे स्वाभाविकच आहे ,पण ब्राह्मणांवर हा जो आरोप होतो की त्यांनी इतर जातीना शिक्षणापासून वंचित ठेवले ते तितकेसे बरोबर नाही !कारण अगदी परवा परवा पर्यंत इतर जातीत शिक्षणाची प्रवृत्ती एकंदरीत कमीच होती -
    मराठा वर्गाला क्षात्रतेज दाखवणे जसे कर्तव्य वाटते तसेच शिक्षणाबाबत ब्राह्मणांचे आहे असे म्हणता येईल ,ब्राह्मणांनी कालपरत्वे आपले क्षात्र तेजही दाखवले हेही नजरेआड करता येत नाही !असो !
    पण कायमच इतर जातींच्या मागासलेपणाचा ठपका ब्राह्मणांवर ठेवत त्याना दोष देण्याची प्रवृत्ती हानिकारक आहे आणि त्यामुळे इतर जातींची आत्मघाताची कक्षा रुंदावत गेली हेही कटू सत्य आहे !
    अनेक वेळा थेट भ इ सं मं संशोधित महाभारताची साक्ष काढत संजय सर अनेक गोष्टी प्रक्षिप्त आहेत असे सांगतात पण आधार घेण्याची आणि उपमा आणि नाट्य निर्माण करण्याची वेळ आली की एकलव्य आणि इतर गोष्टींचा उपयोग करताना दिसतात हे हास्यास्पद आहे !
    महाभारताची आत्ताच्या राजकारणाच्या संदर्भात कल्पना करणे हास्यास्पद आहे !
    नरेंद्र मोदी यांनी विचार मांडला आणि सुंदर रीतीने तो लोकांपर्यंत पोचवला ( उत्तम मार्केटिंग केले असे म्हणा हवेतर )पण
    १२ वर्षात एकही जातीय दंगल न होऊ देणे , सरदार सरोवर सारखी भव्य योजना राबवणे आणि मेघा पाटकर सारख्या नावाजलेल्यांना बाजूला ठेवत ती पूर्ण करणे , आपल्या प्रांताच्या विकासाचा ध्यास घेणे या प्रकारच्या विचारा संदर्भात , महाराष्ट्रात काय दिसते , फक्त भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणा = मग ती काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस !
    एसेम आणि लोहिया या काळात समाजवादी पक्षात सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद ही महत्वाची बाब होती
    राष्ट्रसेवा दल आणि निळू फुले ,अण्णाभाऊ साठे राम नगरकर , अमरशेख असे कार्यकर्ते होऊन गेले
    तशीच परंपरा संघात दिसते ,विचारधारा वेगळ्या असल्या तरी निष्ठेबाबत कुणीही शंका घेणार नाही ,सर्व आपलेच ,
    पण कोन्ग्रेसने सत्तेमुळे जनसंपर्क तोडल्यामुळे यांना जी सुवर्णसंधी होती ती यांनी गमावली आणि महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष जवळ जवळ जमीनदोस्त झाला , शेकापच्या रूपाने काही अंशी कार्य चालू होते ,पण मूलतः रा स्व संघाने आपले विचार गढूळ न होऊ देता संघटना बांधली आणि अनेक रूपाने समाजकार्य साधले !आसाम मध्ये बघितले तरी त्याची प्रचीती येते ! असो !
    समाजाशी संपर्क तुटण्याची कॉंग्रेसने एक प्रकारे शिक्षा भोगली आहे असे म्हणता येईल !

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...