Sunday, September 13, 2015

गांधीहत्येचा घटनाक्रम असा आहे....


१५ जानेवारी १९४८...गोडसे, आपटे, बडगे, करकरे आणि मदनलाल यांनी हिंदू महासभेच्या मुंबई कार्यालयात बैठक घेतली. नंतर दिक्षितजी महाराजांकडे त्यांनी ठेवलेली स्फोटके/शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. करकरे, आणि मदनलाल यांना दिल्लीला जाण्याचे सांगण्यात आले. गोडसे मात्र पुण्याला आला.
१७ जानेवारी १९४८....गोडसे, आपटे, बडगे आणि शंकर हे सावरकरांना त्यांच्या घरी भेटले. नंतर त्याच दिवशी गोडसे आणि आपटे दुपारी दोनच्या विमानाने दिल्लीला निघाले व साडेसात वाजता पोहोचले.
१९ जानेवारी १९४८...हिंदू महासभा भवनात गोडसे व आपटे बडगेला भेटले.
२० जानेवारी १९४८...सायंकाळच्या प्रार्थना सभेत गोडसेसहित सर्व आरोपींच्या समक्ष मदनलालने स्फोट केला. लगोलग सारे कानपुरला रेल्वेने पळाले.
२२ जानेवारीला सारे मुंबईला पंजाब मेलने निघाले. दुसर्या दिवशी ते मुंबईला पोहोचले. तेथे प्रथम ते आर्य पथिक आश्रमात राहिले, नंतर एका होटेलात.
२७ जानेवारीला बोगस नांवांनी त्यांनी एयर इंडियाचे बुकिंग केले. त्याच दिवशी दिल्लीला पोचल्यावर ते ग्वाल्हेरला गेले, डा. परचुरेला भेटले. तेथेच दंडवते याने त्यांना रिव्हाल्वर दिले.
२९ जानेवारीला वेगवान हालचाली झाल्या. दिल्लीत परत आल्यावर. गोडसेने रेल्वे स्टेशनवरील विश्रामगृहात एन. विनायक राव या नांवाने खोली बुक केली. आपटे, गोडसे आणि करकरेने त्या सायंकाळच्या बिर्ला भवनमधेल सायंप्रार्थनेला हजेरी लावली.
३० जानेवारी १९४८ ला सायंकाळी गोडसेने ३ गोळ्या झाडून सायंप्रार्थनेच्या वेळीसच बिर्ला भवनात गांधीजींची हत्या केली.
१५ ते ३० जानेवारीचा एकंदरीत घटनाक्रम न्या. कपूर यांनी दिल्याप्रमाणे आहे. संपुर्ण अहवाल वाचायचे कष्ट घेतले तर अनेक धक्कादायक बाबी दिसतील. सावरकर या खुनाचे मुख्य सुत्रधार होते तर बाकी प्यादी हेही सरळ दिसते. कितीही सारवासारव करायचा प्रयत्न केला तरी उपयोग नाही. सावरकर सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटले याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना गोवता येईल असा प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळाला नाही आणि भारतीय दंडविधानाप्रमाणे असा पुरावा नसेल तर दोषी ठरवता येत नाही. मानवत खूनखटल्यातही केवळ प्रत्यक्ष सहभाग व अन्य प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्याने सुत्रधार मुक्त सुटले होते.
कपूर आयोगाचा अहवाल खालील लिंकवर संपुर्ण उपलब्ध आहे. अवश्य वाचा.

http://www.sacw.net/article2611.html

आता...या लोकांच्या बैठका मुख्यत्वेकरून हिंदू महासभेच्या मुंबई व दिल्ली कार्यालयात झाल्या. हिंदू महासभेचे सर्वेसर्वा कोण होते हे सारे जाणतात.
सावरकरांना १७ जानेवारीला प्रत्यक्ष हत्याकांडात सामील झालेले भेटले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे लोक मुंबईलाच आले व किमान चार दिवस तेथे राहिले. ते पुन्हा सावरकरांनाच भेटायला आले होते असे म्हणायला पुरेपूर वाव आहे. अन्यथा पळून जायला त्यांना अनेक जागा होत्या. त्यांना सक्षम शस्त्र हवे होते. ते त्यांना मुंबईतून गेल्यानंतर ग्वाल्हेरला मिळाले. ही व्यवस्था क्रांतीकारकांना शस्त्रे पुरवण्याचा आधीपासून उद्योग करणा-या सावरकरांशिवाय कोण करणार?

हे प्रश्न आहेत व यांची दखलपात्र उत्तरे सावरकरवादी देऊ शकत नाही हे उघड आहे. 

107 comments:

  1. Replies
    1. bakawas??????????????

      Paise????????????????

      Kahitarich tuze!

      Delete
  2. गांधी सर्वांनाच नकोसे झालेले होते . हे सत्य आपण मान्य करत नाही . जसे इंदिरा गांधीना हुतात्मा बनण्याचा हव्यास होता तसेच महात्मा गांधींचे आहे . त्यांनी खरेतर स्वातंत्र्या नंतर स्वतः पुढाकार घेवून कोन्ग्रेसचे विसर्जन करायला हवे होते . सुभाषचंद्र यांच्या बाबतीत इतके हट्टी वागणारे गांधी या बाबतीत का मूग गिळून गप्प राहिले ?
    अहिंसा चळवळ ही इंग्रजांनी पोसलेली चळवळ होती .हे अलिखित सत्य आपण का लपवतो गांधीना एकदाही लाठी खावी लागली नाही किंवा ते एकदाही जखमी झाले नाहीत - हे कसे ? त्याना उत्तम व्यवस्थेत नजरकैदेत ठेवले जात होते , त्यांचे सर्व चोचले पुरवले जात होते - हे कसे ?त्यापूर्वी लो . तिलाकाना कसे वागवले गेले आणि कुठे तुरुंगात ठेवले गेले ? त्यांचाही क्रांतीकाराकाना पाठिंबा होताच - लो . टिळक अशा वातावरणात कसे वागले असते ?ते गांधींच्या बाजूने असते का सावरकरांच्या ?
    म . गांधीना महात्मा करण्यात इथल्या गुज्जर - मारवाडी समाजाचा हात होता , आणि इंग्रजांचे त्याना वरदान होते !
    गांधीना इंग्रजांनी मोठ्ठे केले होते . हा इतिहास कोणत्याही कागदपत्रांनी सिद्ध करता येत नसला तरी तो सत्य आहे . इंग्रजाना रक्तरंजित लढा नको होता . कारण त्यांना जनतेला अशा लढ्यात काबूत ठेवता आले नसते . त्या मानाने हे अहिंसा प्रकरण बरे होते .
    गांधीना हुतात्मा केले गेले . हे गोडसेचे थोर उपकार आहेत , नाहीतर काही वर्षांनी ते कोन्ग्रेसलाच नको झाले असते - तशी सुरवात झालीच होती .ज्याना इतिहास समजतो , ते हा मुद्दा लगेच मान्य करतील चर्चिल ला ब्रीतीशनी युद्धात डोक्यावर घेतले , पण युद्धानंतर त्याला सत्तेतून बाजूला केले -कारण ?
    शत्रूशी लढणे आणि देश बांधणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असे ब्रिटीश जनतेने ठरवून , त्यांचा आदर कायम राखत , चर्चिल ला खाली बसवले - पण ! आपण आशियायी लोक एकदा एखाद्याला भगवान केले की ते अगदी कायमचे असते !
    गोडसे यांचे समर्थन होऊ शकत नाही , परंतु गांधींचेही शेवटच्या काळातले वागणे हट्टी पणाचे आणि एककल्ली होते , हुकूमशाहीचे होते .

    ReplyDelete
  3. संजय सर , आपण एकदम नव्याने काहीतरी शोधून काढल्या सारखे लिहित आहात !हे काही संशोधन म्हणता येणार नाही . असंख्य वेळा हि चर्चा झाली आहे . स्वतः गांधीनाही सावरकराना शिक्षा झालेली आवडली नसती , कारण सावरकर हे कोनो ऐरेगैरे नव्हते . उत्तम कायदे पंडित होते जिना आणि गांधी यांच्या तोडीचे भाषण कौशल्य त्यांच्याकडे होते . त्यांचे विचार खुद्द त्यांच्या पक्षालाही झेपणारे नव्हते हे आजही दिसते . तो मुद्दा नाहीच आहे ! मुद्दा आहे सावरकर या हत्येमागे होते का ?
    त्यांचे विचार स्पष्ट होते , त्यामुळे तसे ठाम म्हणता येईल की सावरकर याना गांधी असह्य होत असतील , त्यामुळे त्यांच्याकडून या विचारला विरोध झाला नसेल .
    गांधींचा अंतिम काल पाहिला तर , काय दिसते ?
    लो . टिळक आणि गांधी हे लोकांच्या भावनाना हात घालणारे होते . आजकाल सत्तांतर झाल्यावर विरोधी पक्षाची जी फजिती होते तसेच हे थोडेसे आहे . समाजाला भडकावणे सोपे आहे , पण नंतर निस्तरणे तितकेच अवघड आहे !
    गांधीनी जे विचार दिले ते असहकाराचे होते त्याचा स्वातंत्र्यानंतर उपयोग नव्हता . खाडी , ग्राम्राज्य हे काही प्रचंड भारताचे धोरण असू शकत नाही . भक्कम अवजड उद्योग आणि प्रचंड गुंतवणूक यासाठी त्यांच्याकडे उत्तर नव्हते . पुढे नेहरूंनी रशियाच्या प्रगतीवर भाळून जो आडमुठेपणा केला तसाच , किंबहुना त्यापेक्षा जास्त गांधीनी केला असता
    गांधींचे हुतात्मा होणे हे पक्षाला सुद्धा सोयीचे होते , हा विचार कुणी करतच नाही . या वातावरणात डॉ बाबासाहेबांनी आपल्याला उत्तम घटना दिली . वल्लभ भाई यांनी हैद्राबाद देशाला जोडले . गोवा भारतात आले ह्याचे काय ?
    गांधी आणि नेहरूंनी हे असे घडू दिले असते का ? चीन च्या युद्धात म.गांधीनी काय भूमिका घेतली असती याचा विचारच करवत नाही . तत्वांची किंमत कोण राखणार ?देशांतर्गत बाबतीत एकवेळ त्याचा मान राखला गेला असता , पण गांधींच्या अहिंसेचा चीनने काय विल्हेवाट लावली असती ?
    अशा परिस्थितीत गांधी गेले ते योग्यच होते . त्यांचे विचार हे एका महासत्तेने खपवून घेतले , त्याची कारणे मानसी पाटसकर यांनी उत्तम प्रकारे दिली आहेत . ब्रिटीश जनता किंवा राज्यकर्ते इतके दुधखुळे नव्हते . त्यांना काढता पाय घ्यायचा होता . त्यासाठी गांधींची अहिंसा आदर्श होती
    संघ हे सावरकरांचे अपत्य नाही . त्यामुळे सावरकर हेही महत्वाचे असणार नाहीत . त्यांचे विचार समाजात रुजले नाहीत . एकप्रकारे सावरकर पराभूत नेते होते . त्यांच्याकडून गांधीहात्येस विरोध झाला नसेल असे वाटते .

    ReplyDelete
  4. आप्पा - अरे बाप्पा , या लोकाना झाले आहे तरी काय ? मुद्दा काय आहे , संजय सर काय म्हणत आहेत ? आणि हे लोक चक्क गांधीवध आवश्यकच होता असेच सांगायला सुरवात करत आहेत .
    बाप्पा - लोकशाहीची पण कमाल आहे ! कोणीही कधीही कुठलाही मुद्दा उकरावा , आणि वाद सुरु करावेत ! आत्ताचेच बघा -सावरकर वाद हा त्यांच्या देखत नेस्तनाबूत झाला आणि गांधीवाद या देशात पूर्ण पराभूत झाला आहे गांधींच्या डोळ्यादेखत , काँग्रेसनेच गांधीवादाचा खून केला आहे .अगदी गांधी जिवंत असतानाच . पण हि थोर माणसे इमेजच्या भोवऱ्यात अडकतात आणि प्रवाहाच्या विरुद्ध जायची भाषा करत प्रवाह पतीतासारखे वागू लागतात .त्यामुळे कोणी कुणाला मारले हे सारखे चिवडत बसण्यात हाय हशील आहे ?
    आप्पा - ज्यांची हकनाक घरे जळाली तेही दुप्पट जोमाने परत उभे राहिले .
    बाप्पा - हल्ली पं. नरेंद्र मोदी खुबीदारपणे महात्मा गांधी हे जणू आपली मालमत्ता असल्या सारखे वागत आणि बोलत आहेत , त्यांचेच विचार संथपणे आपल्या बोलीत मांडत आहेत एखाद्याला वाटेल की हा खरा सच्चा गांधीवादी - ज्याचे आयुष्य संघाचे कार्य करण्यात गेले तोच ,गांधींचे तत्वज्ञान जगासमोर नव्या दमाने ठेवत आहे . हे संजयदादा -गोडसे पेक्षा भयानक का नाही वाटत तुम्हाला ?
    बाप्पा - विचारात दम असेल तर विचार टिकतात . पण गांधींच्या विचारात सहज सुलभता आणि सौंदर्य होते पण व्यवहार नव्हता . राष्ट्राचे नशीब लिहिण्याची टाकत नव्हती . भोळेपणा होता पण देशाच्या नागरिकाला स्वप्न दाखवण्याचे कुवत नव्हती .
    आप्पा - गांधींकडे स्वातंत्र्या नंतरच्या भारताच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती लोकशाहीच्या स्वप्नाना दिशा दिली ती डॉ आंबेडकरांनी , घटना लिहिण्याची जबाबदारी , किंवा सुतोवाच खरेतर गांधीनी करायला हवे होते . पण त्याना वेगळाच भारत दिसत होता आणि डॉ आंबेडकर याना वेगळाच भारत खुणावत होता .
    बाप्पा - आज ६७ वर्षांनी टिकाऊ काय ठरले गांधीवाद का घटना ?

    ReplyDelete
  5. गांधींचा खून करून गोडसेने गांधींना अमर केले आहे . आणि कोन्ग्रेस ने गांधीवादाचा पराभव केला आहे च. गोडसेने ब्राह्मण वर्गाला कायमचे बदनाम केले आहे . सावरकर नक्कीच याला सामील असावेतसे दिसते , असे पुरावे कधीच सिद्ध करता येत नाहीत . त्यामुळे सावरकर सुखरूप राहिले -
    कोन्ग्रेस सरकार सावरकराना आणि त्यानिमित्ताने ब्राह्मणाना दुखवू शकत नव्हते . खुद्द कोन्ग्रेस मध्ये सावरकर विचारांचे अनेक चाहते होते ,

    ReplyDelete
  6. आर आर एस ला या कटात गोवण्याचा काय उद्देश्य असेल. आपले सर्व विरोधी संपविणे जेणे करून निर्बंध राज्य करता येईल. ... आपण या वर हि प्रकाश टाकावा

    ReplyDelete
  7. Dear Sanjayji, if u respect the constitution then when an accused is set free on any what so ever ground , he is said to be not guilty. if the govt or the complainant failed to produce proper evidence then who are you? in your day dreaming and savarkar hatred mentality from ur writing is clearly showing the lunatic and mental imbalance of mind. the govt can allege and involve any body on any grounds, but you have to prove it. if today any congressman shoot any bjp leader or any marxist in kerala or west bengal kill any bjap leader( actually they did, killed lot of rss and bjp persons) , then are you going to hang the top leaders of that party> simply not....so veer savarkar not found guilty on any counts, he was purposefully dragged into the whole drama and arrested only to tarnish the image of hindu mahasabha and like minded persons. gandhi failed on every count, his non-violence killed lacs of hindus during partition( it is more serious and heinous crime that he and whole congress party did to us) and for that act of breach of trust , these partition criminals must be given punishment. at least now.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. पोलिसांनी नीट तपास न केल्यामुळे सावरकर हे महात्मा गांधी खून खटल्यातून सुटले
    जीवनलाल कपूर आयोगाने सावरकरांवर ठेवला होता कटाचा ठपका

    महात्मा गांधी यांची हत्या करण्याच्या कटात विनायक दामोदर सावरकर हेही एक आरोपी होते. तथापि, न्यायालयाने त्यांची पुराव्यांअभावी मुक्तता केली. न्यायालयाने सावरकरांना सोडले तरी ते खरोखरच निर्दोष होते का? सावरकर सुटण्यास दोन प्रमुख कारणे होती.
    १. हल्लेखोर अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधी हत्येच्या कटाची आखणी आणि अंमलबजावणी याची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली.
    २. योग्य रितीने झाला नाही. पोलिस केवळ माफीच्या साक्षीदारावर अवलंबून राहिले.
    वरीलपैकी दुसरया कारणांचा या लेखात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. माफीचा साक्षीदार बनलेला दिगंबर बडगे याच्या निवेदनावरच गांधी हत्येचा संपूर्ण खटला उभा होता. बडगेने पोलिसांना सांगितले की, "महात्मा गांधी यांना मारण्यापूर्वी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईत जाऊन भेटला होता. सावरकरांनी गोडसेला 'यशस्वी होऊन या' असा आशीर्वादही दिला होता." बडगेने दिलेल्या या जबाबातील तथ्ये तपासण्यासाठी कोणताही प्रयत्न पोलिसांनी केला नाही; त्यामुळेच सावरकर या खटल्यातून मुक्त होऊ शकले, असे कपूर कमिशनच्या अहवालातून समोर आलेल्या पुराव्यांवरून दिसते.

    महात्मा गांधी यांची हत्या होऊन जवळपास १७ वर्षे उलटल्यानंतर १९६५ साली केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने या प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालातील तथ्ये खळबळजनक आहेत.

    गांधी खून खटल्यातील माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईतील त्यांच्या घरी भेटायला गेला. त्याच्या सोबत दिगंबर बडगे, नारायण आपटे आणि शंकर किस्तैया हेही होते. बडगे आणि किस्तैया हे सावरकरांच्या घराबाहेरच थांबले. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे आत गेले. सावरकरांना भेटून बाहेर आल्यानंतर नारायण आपटे याने बडगेला सांगितले की, सावरकरांनी आम्हाला ‘यशस्वी होऊन या' असा आशीर्वाद दिला आहे.

    बडगेने दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती. तथापि, न्यायालयाने ती पूर्णतः ग्राह्य धरण्यास नकार दिला. पोलिसांनी अन्य कोणत्याही पुराव्यांच्या अथवा साक्षींच्या माध्यमांतून बडगेच्या या साक्षीची खातरजमा केली नाही, असा ठपका न्यायालयाने ठेवला. त्यामुळे सावरकर खटल्यातून सुटले.

    या खटल्यातील सावरकरांची सुटका तांत्रिक होती. तसेच बडगेने दिलेली माहिती खोटी नसून पूर्णतः खरी होती, हे नंतर कपूर आयोगाच्या चौैकशीतून स्पष्ट झाले.

    जीवनलाल कपूर आयोगाने या प्रकरणाची चौैकशी करताना दिगंबर बडगे याने सावरकरांच्या विरोधात दिलेल्या साक्षीला विशेष महत्त्व दिले. बडगेच्या साक्षीतील तथ्यांश शोधण्यासाठी आयोगाने इतर स्रोत तपासले. सावरकरांचा अंगरक्षक अप्पा रामचंद्र कासार आणि सचिव गजानन विष्णू दामले यांच्या साक्षी आयोगाने नोंदविल्या. या दोघांनीही बडगेची माहिती खरी असल्याचे आयोगाला सांगितले. कासार याने सांगितले की, ‘‘नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे दोघे २३-२४ जानेवारीच्या दरम्यान सावरकरांना भेटले." दामलेने सांगितले की, "जानेवारीच्या मध्यात केव्हा तरी गोडसे आणि आपटे सावरकरांना येऊन भेटले. सावरकरांच्या घराच्या आवारात असलेल्या बागेत ते दोघे त्यांच्यासोबत बसले होते."

    रामचंद्र कासार आणि गजानन विष्णू दामले यांच्या साक्षीला कपूर आयोगाने महत्त्व दिले. आयोगाने आपला निष्कर्ष नोंदविताना म्हटले की, ‘‘सावरकर आणि त्यांच्या गटाने कट रचल्याचे या तथ्यांमधून स्पष्टपणे समोर येथे."

    यातून एकच वास्तव समोर येते. ते असे की, विनायक दामोदर सावरकर हे भारतीय पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गांधी हत्येच्या खटल्यातून मुक्त होऊ शकले. पोलिसांनी योग्य रितीने तपास केला असता, तर कटात सहभागी असल्याबद्दल सावरकरांना हमखास शिक्षा झाली असती.

    कपूर आयोगाच्या तपासावर भारतीय प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणात विचार मंथन झाले आहे. अलिकडेच "द हिंदू" या आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने या संबंधीचा एक लेख प्रसिद्ध केला होता. जिज्ञासू वाचकांना हा लेख खालील लिंकवर वाचता येईल. How Savarkar escaped the gallows शीर्षकाचा हा लेख प्रसिद्ध अभ्यासक ए. जी. नुरानी यांनी लिहिला आहे.

    ReplyDelete
  10. माफीवीर सावरकर

    भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो लोकांनी ब्रिटीशांच्या गोळ्या खावून देशासाठी आपला जीव दिला. हजारो तरूण फासावर चढले. या फासावर चढणार्‍या वा जन्मठेप भोगणार्‍या तरूणांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर तर त्यांची फासी /जन्मठेप टळली असती. पण तसे कोणी केल्याचे ऐकिवात नाही. अपवाद फक्त एकच - वि.दा. सावरकर हे लेखक. त्यांनी आपल्या लेखकीय भाषेत इंग्रजांकडे दयेची भीक मागीतली. त्यांच्या त्या ऐतिहासिक माफीनाम्याचा मुख्य भाग वाचा त्यांच्याच शब्दात:

    "मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी असणार्‍या ब्रिटिश सरकारने माझी सुटक केली तर इंग्रज सरकारच्या घटनात्मक प्रगतीचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरीकच) तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलीत आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणार्‍या सरकारचा जयजयकार करील."


    "एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील."


    "माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्याविशी वाटेल त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटीश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?"


    १४ नोव्हेंबर १९१३


    सावरकरांचा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काईव्हज मध्ये सुरक्षित असून तो सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशितही करण्यात आला आहे. सावरकरांनी असे एकूण सहा माफीनामे लिहिले होते! असा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? त्यापेक्षा त्याला माफीवीर ही पदवीच शोभून दिसते!

    ReplyDelete
  11. द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे झाली देशाची फाळणी

    आत्मा, शांती, मुक्ती या गोष्टी ख-या आहेत की, खोट्या याची शहानिशा कोण आणि कशी करणार? प्लँचेटवाले जे सांगतात ते कदाचित खरे असेल, कदाचित खोटेही असेल. पण फाळणीचे गुन्हेगार सावरकर हेच आहेत, हे त्रिवार सत्य आहे. सावरकरांच्या मुर्खपणामुळेच या देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारतात हिंदू आणि मुसलमान असे दोन समाज राहत नसून हे दोन स्वतंत्र देशच आहेत, असा सावरकरांच्या सिद्धांताचा थोडक्यात सारांश. सावरकरांनी हा सिद्धांत मांडला. त्याचा फायदा मोहंमद आली जीना आणि त्यांच्या मुस्लिम लीगला झाला. याच सिद्धांतानुसार भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. भारताच्या फाळणीला सर्वांत प्रथम जर कोणी जबाबदार असेल, तर ते सावरकर होत. जीनांचा नंबर सावरकरांच्या नंतर येतो.

    महात्मा गांधी आणि काँग्रेसचा
    फाळणीला विरोधच होता
    महात्मा गांधी आणि काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. महात्मा गांधींनी तर +आधी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, मगच या देशाचे दोन तुकडे होतील+ अशी टोकाची भूमिका मांडली होती. मात्र सावरकर आणि त्यांचे इतर ब्राह्मणवादी अतिरेकी सहकारी तसेच बॅ। मोहंमद अली जीनांसारखे कट्टरवादी यांनी देशातील वातावरण एवढे खराब करून टाकले की, फाळणी स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. देशात दंगलींचा आगडोंब उसळला होता. फाळणी स्वीकारली नसती, तर हा देश कित्येक वर्षे जळत राहिला असता, इतके वातावरण या लोकांनी तापविले होते. शेवटी देशाचे भले लक्षात घेऊन काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. दिली म्हणण्यापेक्षा द्यावी लागली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.

    सावरकरांच्या डोक्यावर
    कोट्यवधी लोकांचे तळतळाट
    फाळणी झाल्यानंतरही सावरकर आणि ब्राह्मणवाद्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वातावरण तापविणे सुरूच ठेवले. देशात दंगलींचा वणवा आणखी भडकला. ब्राह्मणवादी दंगली भडकावित होते, तेव्हा महात्मा गांधी आणि काँग्रेस दंगली शांत करण्यासाठी झटत होते. महात्मा गांधींनी उपोषण केले. पंडीत नेहरू रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे दंगली शांत झाल्या. मात्र तोपर्यंत या दंगलीत काही लाख लोक मारले गेले होते. पाकिस्तान आणि भारत अशा दोन्ही देशांत दंगली झाल्या. त्यात हिंदू, शीख, मुसलमान आणि इतर सर्वच जाती धर्मांचे लोक मारले गेले. केवळ हिंदू मारले गेले किंवा मुसलमान मारले गेले असे नव्हे. काही कोटी लोक बेघर झाले, निर्वासित झाले. हा सर्व रक्तपात केवळ फाळणीमुळे झाला. आणि फाळणी सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे झाली. अशा प्रकारे कोट्यवधी लोकांना देशोधडीला लावण्याचे महाभयंकर पाप सावरकर नावाच्या माणसाने केले आहे.

    ReplyDelete
  12. शिवाजी महाराजांनी असेच धोरण आग्र्याच्या कैदेत असताना अवलंबले होते . शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कौतुके करणारी अनेक पत्रे त्यास पाठवून कैदेत असताना अनेक सवलती मिळवल्या हे आपण विसरता आहात . त्यात आणि सावरकरांच्या वागण्यात विलक्षण साम्य आहे . सावरकरांचे मतपरिवर्तन अजिबात झालेले नव्हते . त्यांचा हा गनिमी कावा होता हे समजले पाहिजे .

    केनेडींची हत्या आणि पुढचे रामायण किती गुंतागुंतीचे ठरले , तसे गांधींच्या बाबतीत अजिबात दिसत नाही . कृती स्पष्ट आणि विचारही स्पष्ट , ते कुणाला पटतील तर कुणाला नाही - व्यक्ती तितक्या प्रकृती . पण गांधी हत्येनंतर ब्राह्मणांची घरे जाळण्याचे जे राजकारण झाले त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही !ती वृत्ती म्हणजे अहिंसेचा आणि गांधी तत्व ज्ञानाचा पराभवच आहे
    इंग्रजांनी राज्य स्थिरस्थावर झाल्यावर सुसंस्कृत पणाचा जो आव आणला त्याचेच गांधी हे अपत्य आहे .गांधींकडे कोणताही पुढचा भरीव प्लान भारतीय जनतेसाठी नव्हता . त्यांनी घटना कशी असावी हा विचारही केला नव्हता . हैद्राबाद आणि गोवा कारवाईला त्यांनी संमती दिली असती का हा मांडला गेलेला विचार अगदी योग्य आहे .
    आज विचार करता , महात्मा गांधी यांनी स्वराज्य मिळवून दिले हे कितपत खरे आहे असा प्रश्न पडतो . कारण इंग्रज गेले ते त्यांना देश चालवणे झेपेना म्हणून गेले . त्यांचा देश त्यांना वसवायचा होता , त्यांनी अनेक देशाना लागोपाठ स्वातंत्र्य दिले मुळातच म गांधी ह्यांना स्वातंत्र्य लढ्यात कधीही लाठीमार झाला नाही , नेहमी कैदही अत्यंत आरामशीर पद्धतीने झाली , त्यांना मोठ्ठे केले ते इंग्रजानीच . त्यांना नेतेपद दिले तेही जणू इंग्रजानीच , फक्त फाळणी करून त्यांनी गांधीजीना दगा फटका दिला .फार मोठ्ठा धक्का दिला .
    गांधींची शेवटी इंग्रज गेल्यावर पद्धतशीरपणे शोकांतिका झाली होती , भ्रम निरास झाला होता आणि ते जास्त जास्त हहट्टी होत चालले होते . जीनांची कुरघोडी त्यांना सहन होत नव्हती .
    डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी अफाट अभ्यास करून देशाला कणखर घटना दिली . वल्लभभाईंनी हैद्राबाद दिले , सोमनाथ दिले अशी नवी दृष्टी गांधींकडे नव्हती , ते खादी आणि
    ग्रामराज्य यातून बाहेर यायला तयार नव्हते . नेहरूंच्या फाळणीच्या पापावर पांघरूण घालता घालता हा नेता हुतात्मा झाला , अशा लोकाना तोच मार्ग राहतो ! इंदिरा गांधींची कथा हेच सांगते !
    सावरकर यांनी गांधीना संपवावे असे स्पष्ट आदेश कधीही दिले नसतील असे वाटते , गोडसे यांनी तो मार्ग निवडला असेल , आणि सावरकर यांनी त्याला विरोध किंवा अटकाव केला नसेल .

    ReplyDelete
  13. आज शिवसेनेने केलेली मागणी अगदी रास्त आहे .
    संजय सोनवणी यांनी आधीच त्याबद्दल अप प्रचार सुरु केला आहे . हे या लेखावरून सिद्ध होते !
    सावरकर याना भारतरत्न दिले पाहिजे हि शिवसेनेची मागणी अगदी योग्य आहे .

    महात्मा गांधी हे इंग्रजांनी पुढे आणलेले पुढारी होते हे सत्य आहे आणि आपण ते समजून घेताना काहीच अवघड वाटणार नाही . अहिंसेने मत परिवर्तनहोऊन आपल्या देशाला म गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हे धादांत खोटे आहे .इंग्रजांनी म गांधीना मुसलमानांचेही नेतृत्व करण्याचे जंगी स्वप्न दाखवून त्यांच्याकडून मुसलमान धार्जिणे राजकारण करून घेतले हे कौशल्य इंग्रजांचे आहे , त्यामुळे देशात सावरकर आणि संघ विचार फोफावला . इथे जो एक विचार मांडला आहे त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे . समजा ,
    गांधी असताना हैदराबादच्या विलिनिकरणाचा प्रश्न निर्माण झाला असता तर ? कारण गांधी गेले जानेवारी ३० ला आणि हैद्राबाद विरुद्ध "ऑपरेशन पोलो "झाले १९४८ च्या १७ सप्टेंबर ला त्यातही पाकिस्तानने युनोत हा प्रश्न नेला होता , निजामाही ब्रिटीशांकडे धावला , म गांधी असते तर ?

    नेहरूंनी जो चोथा काश्मीर प्रश्नाचा करून ठेवला तसेच काहीतरी म गांधीनी केले असते , आणिउपोषण केले असते . सर्व बाजूनी विचार करता असे दिसते की अहिंसा आणि उपोषण हे प्रश्न सोडवायचे हत्यार गांधीनी अशा प्रश्नात वापरले असते तर ? जुनागढही गेला असता ,
    चीन प्रश्नात गांधीजी कसे वागले असते ?गांधीजी लार्जर द्यान लाइफ़ झाले होते . अशा व्यक्ती नोटेवर शोभून दिसतात . प्रत्यक्षात त्या तापदायक ठरतात . !
    सावरकर याना " भारत रत्न" देणे ही त्याना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल !

    ReplyDelete
    Replies
    1. भारतरत्न ???
      आणि ते हि सावरकरांना ???
      का ???

      म. गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला नाहि (आणि म्हणे स्वातंत्र्यवीर?). त्यांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन उभे केले नाहि. माफीनामे लिहून लाचारी पत्करली. उलट इंग्रजांना मदतच केली. त्यांच्या कुठल्याही कार्यात बहुजनांचा समावेश नव्हता. अनेक तथाकथित राजकारणी व वक्ते सावरकरांचे 'खरे रूप' उघडे करण्याची हिम्मत करीत नाहीत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सावरकर मुठभर लोकांसाठी स्वातंत्र्यवीर असू शकतील, सर्व भारतीयांसाठी नव्हे. कायद्याचा अभ्यास असल्याने स्वतः कुठल्याही गुन्ह्यात अडकणार नाही , अशा पद्दतीने ते कारस्थाने करीत होते. द्या अशा माणसाला भारतरत्न?

      Delete
    2. सावरकरांच्या विषयी संदर्भांसहित संपूर्ण सत्य जाणून घ्यावयाचे असल्यास अवश्य वाचा " SAWARKAR AND HINDUTVA THE GODASE CONNECTION" WRITER : A. G. NURANI. PUBLISHER : LEFT WORLD BOOK, 12 RAJENDRA PRASAD ROAD, NEW DELHI-110001.

      Delete
  14. काही लोक सावरकरांच्या माफीनाम्याच्या समर्थनार्थ शिवाजी महाराजांचे उदाहरण पुढे करतात.
    एकतर शिवाजी महाराजांना औरंगजेबाने सोडले नाही, तर त्यांनी हुशारीने सुटका करून घेतली. दुसरे असे की सुटका झाल्यावर पंच-हजारी, दस-हजारी मनसबदार होऊन, खंडण्या उकळवीत आणि त्याचा काही वाटा "मायबाप सरकारला" पाठवून ते स्वस्थ बसले नाहीत, स्वराज्य स्थापण्याचे कार्य पुढे चालूच ठेवले. त्यासाठी युद्धे केली....

    इंग्लंडमध्ये असताना सावरकरांनी सशस्त्र क्रांती-कार्याला मदत केली, यात संशय नाही....ते कार्य हिंसक असले तरी देशप्रेमाचे होते, याबद्दल कोणी संशय घेऊ नये......

    खरा प्रश्न आहे -
    सावरकरांनी सुटका झाल्यावर काय केले? किती वेळा ब्रिटीशाविरुद्ध आंदोलने केली?
    किती वेळा तुरुंगवास (१९३७ नंतर) झाला?
    त्यांची आंदोलने ब्रिटीशाविरुद्ध होती की फक्त मुस्लिम लीगच्या विरुद्ध शक्ती खर्च करत होते?
    जे काही "कार्य" केले ते स्वातंत्र्य लढ्यातील मुख्य धारेला पूरक होते की मारक होते?
    आधुनिक, विज्ञानवादी म्हणवून घेणा-या सावरकरांनी राष्ट्र उभारणी साठी आधुनिक मुल्ये पाया म्हणून वापरली का?
    धार्मिक पाया टाकून दिला का?

    वरील सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत....

    आणि म्हणूनच आधुनिक भारतात सावरकरवादी विचारसरणीला स्थान नाही आणि नसावे.
    याची साधी चाचणी आहे - ज्यावेळी मोदी परदेशात जातात, त्यावेळी ते गांधीजींचे विचार शिरोधार्य मानतात की सावरकरांचे (किमान दाखवण्यासाठी की होईना?)

    याचाच अर्थ काळाच्या कसोटीवर जो काही उरला आहे, तो गांधीवाद, सावरकरवाद नव्हे.
    यात ही गांधीवादाची काही सूत्रे वगळावी लागली आहेत, हे खरे. जसे की औद्योगीकरण वगैरे.
    सावरकरवादाची प्रतिमा जर कोठे दिसत असेल, तर सिरीया, इराक मध्ये IS ने जे चालवले आहे ते पाहणे योग्य होईल....

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच सुंदर लेखन! धन्यवाद!

      Delete
  15. मधुकर दुबे सर ,
    आपण दोघेही कुठलीही बाजू घेतली कि थोडे खरे आणि थोडे खोटे बोलत रहातो कारण इतिहास आपल्याला तसे भाग पाडत असतो .
    आज मोदी गांधीजींचे मानसपुत्र असल्या प्रमाणे बोलतात , मुळात ते संघाचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत , पण त्यांनी स्वतःच्या गुज्जू पणाचा धागा पकडत एक सुंदर खेळी चालवली आहे .कॉंग्रेसची म गांधींवरची मक्तेदारी मोडण्याचा हा प्रयत्न आहे .
    सावरकर वाद हा फार पूर्वीच पराभूत झाला होता , गांधीवाद हासुद्धा काँग्रेसनेच पराभूत केला होता . इतिहासाची हीच तर गम्मत असते - नाही का ?
    संजय सोनावणी एकदम झटका आल्यासारखे सावरकर यांच्या बद्दल का लिहू लागले ? कारण त्याना भारत रत्न द्यावे अशी मागणी पुढे येत आहे म्हणून ?
    सावरकर हे भारतरत्न देण्याच्या योग्यतेचे आहेत का ? हा खरा प्रश्न आहे . असा सरळ सरळ विषय मांडता येईल .
    गांधी वध झाल्यावर पुन्हा सहाच महिन्यात हैद्राबाद प्रकरणात पाकिस्तानने आपले दात दाखवायला सुरवात केली , निजामाने युनोला साद घातली , अशा परिस्थितीत गांधीनी समजा ते जिवंत असते तर , उपोषण करून काय साधले असते ? म्हणजेच देशाच्या समस्या सोडवायला त्यांचे अहिंसेचे तत्व ज्ञान अपुरे होते , किंवा आत्मघातकी होते . काही तत्वज्ञाने किंवा व्यक्ती यांचा तात्पुरता वापर करून घ्यायचा असतो , गांधींचा खून झाल्यावर तिथे लॉर्ड माउंट ब्याटन पोचले त्याना कुणीतरी सांगितले की खुनी मुसलमान आहे - त्यावेळेस ते जोरात ओरडले - खुनी मुसलमान असूच शकत नाही , तो हिंदूच असला पाहिजे - आणि जर तो मुसलमान असेल तर आपण संपलो आहोत !
    गांधीजींचे पोस्ट मार्टेम झाले नव्हते त्यामुळे नथुरामच्याच पिस्तुलाने हा खून झाला हे कशावरून असा युक्तिवाद त्याचे वकील करणार होते , पण नाठूरामानेच त्याना मनाई केली . नथुराम यांच्या देशप्रेमाविषयी शंका कुणालाच नाही , पण त्यांनी हत्येचा मार्ग निवडला ते अयोग्य होते

    ReplyDelete
    Replies
    1. देशप्रेम म्हणजे काय हा महत्वाचा प्रश्न आहे. एका ठराविक, वर्चस्व-वादी विचारधारेसाठी केलेले खून म्हणजे देशप्रेम नाही, असे मला वाटते.

      आधुनिक मुल्य पायाभूत मानून राष्ट्र उभारणीसाठी प्रयत्न करणे म्हणजे देशप्रेम अथवा देशभक्ती म्हणता येईल. नथुराम वा सावरकरांनी असे केल्याचे मला वाटत नाही.

      गांधीजींवरची मक्तेदारी मोडून काढणे हे चांगलेच आहे, पण त्यांच्या चांगल्या गोष्टी घेऊन कराव्यात. लोकशाही मुल्ये रुजविणे, अल्प-संख्य सुरक्षा, इतर धर्माविषयी आदर ह्या गोष्टी मोदी घेतात असे मला वाटत नाही.

      Delete
  16. भारतातील कट्टर धर्मवादी, सनातनी, इसिस व तालिबानी हिंदुत्ववादी यांचा आवडता महापुरुष? म्हणजे वी. दा. सावरकर. तालिबानी हिंदुत्ववाद्यासाठी सावरकर म्हणजे महान देशभक्त, स्वातंत्र्यसेनांनी, क्रांतीवीर, कृतिशूर विचारवंत, उपयुक्ततावादी समाजसुधारक, महाकवी, इतिहासकार, साहित्यिक, अमोघ वक्ता इत्यादी. हिंदुत्ववाद्यासाठी सावरकरांचे उभे आयुष्य म्हणजे तत्वज्ञानाचा, युगप्रवर्तक घोषणांचा, धाडसी हालचालींचा, शूर कृत्यांचा, त्यागाचा आणि हालअपेष्टांचा विस्मयकारक चित्रपटच होय! जो व्यक्ती ब्राम्हण समाजासाठी व जातीचा उच्च दर्जा कायम ठेवण्यासाठी भांडतो त्या व्यक्तीला ब्राम्हण इतिहासकार व साहित्यकार देवपन प्राप्त करून देशाचा हीरो घोषित करीत असतात. विविध अलंकाराच्या शब्दसुमनांनी त्यांचे जीवन अदभूत व विस्मयकारी बनवून टाकीत असतात. परंतु सावरकरांच्या प्रतीमेवरून या ओवाळलेल्या शब्दसुमनाच्या फुलांची पुटे काढून टाकली तर दिसतो केवळ ओबडधोबडपणा, कट्टर जातीयवादीपणा, ब्राम्हणी धर्माभिमानीपणा, स्वजातीचा गर्विष्ठपणा व खोटेपणाचा अस्सल प्रमाद. हिंदुत्ववादाच्या बुरख्याआडून भारतावर ब्राम्हणांचे सामाजिक, धार्मिक व राजकीय वर्चस्व स्थापित करने हा त्यांचा मुख्य उद्देश होता. नाटकी गद्य व पद्यानी सामान्य माणसाला धर्मबंधनात गुरफुटून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न सावरकरांनी आपल्या ‘सहा सोनेरी पान’ या ग्रंथातून केलेला दिसतो.
    सावरकरांची “सहा सोनेरी पाने” म्हणजे “ज्यांनी ज्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेच्या निर्मितीसाठी व वैदिक वा ब्राम्हण्यपुरक समाज, आर्य ब्राम्हणांच्या कल्याणासाठी सहकार्य केले, त्या त्या राजांना शुभेच्छ्या देण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सहा सोनेरी पाने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली. सावरकरांनी पहिले सोनेरी पान “चंद्रगुप्त व चाणक्य यांना, दुसरे पुष्यमित्र शुंगाला, तिसरे विक्रमादित्य, चौथे यशोधर्म वर्मन, पाचवे महाराष्ट्रीय पराक्रमाचा उच्चांक (पेशवेशाहीला) तर शेवटचे सहावे पान इंग्रज गेले व हिंदुराष्ट्र स्वतंत्र झाले” या घटनांना अर्पण केले आहे.
    सावरकरांची सहा सोनेरी पाने वाचल्यावर ते कट्टर वैदिक धर्माभिमानी, जातीयवादी व ब्राम्हण या स्वजातीचा गर्वाभिमान बाळगणारे वाटतात. आपल्या मनातील कट्टर सनातनी प्रवृत्तीला बहुजन समाजापासून लपवून ठेवण्यासाठी त्यांनी हिंदुत्ववादाचा बुरखा घेतला हे प्रकर्षाने जाणवते. हिंदुत्वासी सावरकरांचे काहीही देणे घेणे नसून त्या आडून मनुस्मृती बहुजनांच्या डोक्यावर त्यांना लादायची होती. या देशातील कोणताही पुरुष हा ब्राम्हनापेक्षा वरचढ दिसता कामा नये याची ते ग्रंथात पुरेपूर काळजी घेतात. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे त्यांच्या सहा सोनेरी पानामध्ये गौतम बुद्ध, महाविर, सम्राट अशोक व शिवाजी महाराजाला स्थान न देणे हा होय. संपूर्ण महाराष्ट्र ज्याला आपले स्फुर्तीस्थान मानते त्या शिवाजी महाराजांना त्यांच्या पुस्तकात केवळ दहा ते पंधरा ओळी लिहिल्या आहेत. तर शिवाजी महाराजाने मोठ्या कष्टाने कमावलेल्या राज्यावर ज्यांनी उड्या व मौजमजा मारल्या त्या पेशव्यावर ते भरभरून लिहितात. सावरकर हे शिवाजी महाराजांची एकेरी शब्दात बोळवण करतात तर बाजीराव व रघुनाथराव पेशव्यांना ते स्वामी नावाने संबोधतात.

    ReplyDelete
  17. सावरकरांचे “सहा सोनेरी पाने” हे पुस्तक म्हणजे कट्टर हिंदू धर्मवादी कॅडर बेस कार्यकर्ते घडविणारी मार्गदर्शक पुस्तिका आहे असेही म्हणता येईल. एवढेच नव्हे तर हिंदुना जैन–बौध्द व मुसलमानाविरुध्द भडकाविण्याचा जाहीरनामाच आहे. आज देशातील सर्व ब्राम्हणी संघटना ह्या सावरकराच्या विचारावर चालताना दिसतात. मुस्लिम विरोध करून ब्राम्हणी वर्चस्व असलेले हिंदू संघटन मजबूत करून राजकीय सत्ता हस्तगत करीत गतवैदिक वैभव प्राप्त करणे ह्या सावरकरी गुप्त डाव होता. आर.एस.एस सावरकराच्या विचारानेच मार्गक्रमण करीत आहे.
    सावरकर हे धृर्त चतुर प्राणी होते. हिंदुत्वाच्या बुरख्याआडून ब्राम्हणी सत्तेसाठी धडपडणारा जातिवंत कार्यकर्ता होता. ब्राम्हणाशिवाय या देशात कोणीही पराक्रमी व विद्वान असू शकत नाही याचा नकळत दावा ते आपल्या सोनेरी पानात करतात. केवळ ब्राम्हण म्हणून आपल्याला किंचितही महत्व मिळणार नाही हे जाणून असणारे सावरकर हिंदुत्ववादाचा बुरखा पाघरून बहुजन समाजाला फसवितात याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे त्यांचे सहा सोनेरी पान हे पुस्तक होय. सर्वधर्मसमभाव हा शब्द सावरकरांच्या शब्दकोषात शोधुनही सापडणार नाही. धर्मवेड्या सावरकरांचे जातिवेडे सहा सोनेरी पाने बहुजन समाजाला सावरकरादी लोकांच्या बामणी काव्यापासून दूर राहण्याचा इशारा देवून जाते.

    ReplyDelete
  18. आप्पा - अरेरे ,या लोकांच्या लक्षात येत नाही की सावरकर आणि संघ यांचा काहीही संबंध नाही . कारण हिंदू महासभा असताना संघाची गरजच काय होती ?
    मोरलो मिन्तो सुधारणा आणि मुसलमानाना वेगळे मतदारसंघ मिळणार असे ठरत असताना ,आणि १९०६ ला मुस्लिम लीग ची स्थापना झाली , त्यावेळेस हिंदू महासभा २७ फेब्रुवारी १९१५ ला हरिद्वारला कुंभ मेळ्यात स्थापन झाली , हिंदू महासभेच्या अधिवेशनास स्वतः गांधी आणि मदन मोहन मालवीय ,लाला लजपत राय यांनी उपस्थित राहून त्यांनी संघटनेचे कौतुक केले होते .
    बाप्पा -आणि संघ स्थापन झाला १९२५ ला !तो सुद्धा पूर्वाश्रमीच्या हिंदू महासभेच्या केशव बळीराम हेडगेवार यांनी त्याची स्थापना केली , हिंदू महासभेशी फारकत घेऊन ! म्हणजे संघाचे आणि महासभेचे उद्दिष्ट वेगळे आहे हेच दिसत नाही का ?

    आप्पा - चाणक्य आणि चंद्रगुप्त हे ब्राह्मण होते का हे स्वतः संजय सोनवणी हेच जास्त चांगले सांगतील !विक्रमादित्य हा परमार घराण्यातील होता . मुळात मंगेश कऱ्हाडे हे जातीयवादाने बरबटलेले दिसतात म्हणूनच त्याना पेशव्यांचे शौर्य दिसत नाही . एकुणात ब्राह्मणी सत्ताधीशांच्या बाबत आजही गोंधळ दिसतो आहे . शाहू महाराजांनी पेशव्यांची निवड केली हे आपण का विसरत ?
    शिवाजीच्या काळी सुद्धा पेशवेपद कोणी सांभाळले होते ?शिवाजी संभाजीच्या काळात मोरोपंत पिंगळे , राजारामाच्या काळात रामचंद्र अमात्य ,तरबैच्या काळात बहिरोजी पिंगळे त्यानंतर शाहू महाराजांच्या काळात सुरवातीला परशुराम कुलकर्णी असे पेशवे होऊन गेले . त्यानंतर बालाजी विश्वनाथाची चमक शाहू महाराजांना जाणवली आणि पेशवेपद बालाजी विश्वनाथ कडे आले . बाजीरावाने आणि त्यानंतर नाना साहेबांनी ही निवड सार्थ ठरवली . त्यात पेशव्याना मौजमजा केली अशी दुषणे देणे योग्य नाही . त्यातून लिहिणारे कऱ्हाडे यांचा अप्रगल्भ पणा दिसतो .

    ReplyDelete
  19. छत्रपति शिवाजी महाराजांनी पेशवेपद १६७४ साली निर्माण केले . मूळ शब्द पर्शियन असून त्याचा अर्थ नेता असा होतो . रामचंद्रपंत अमात्य हा पेशवा सर्वार्थाने श्रेष्ठ होता , त्याने संताजी आणि धनाजी यांच्या मदतीने शत्रूला सळो की पळो केले होते . छत्रपति राजाराआमानी आणि ताराबाई यांनी त्यांना यथोचित मान सन्मान दिला आणि ते शेवटी सन्मानाने निवृत्त झाले , त्यांची आद्न्यापत्रे प्रसिद्ध आहेत .
    कदाचित छावा किंवा संभाजी ब्रिगेड यावरही काही आचरत निवेदने करतील , शाहुच्या आगमनानंतर बालाजी विश्वनाथला पेशवेपद मिळाले हे तर प्रसिद्धच आहे आणि त्याने आणि नानासाहेब पेशव्यांनी त्या संधीचे सोने करून दाखवले .
    प्रत्येक घराण्यात कमीजास्त प्रमाणात कर्तृत्ववान आणि कर्तृत्वशून्य माणसे निपजतातच . छत्रपतीही याला अपवाद नव्हते आणि पेशवेही ! पण म्हणून ब्राह्मणशाही वगैरे नावे देऊन जातीयवाद दाखवण्याचे काय कारण ? इतकेच होते तर शाहू महाराजांनी पेशव्याना इतके अधिकार का दिले ? स्वतःच त्यांनी मैदान का गाजवले नाही ?

    ReplyDelete
  20. अहो मंगेश कऱ्हाडे ,
    तुम्ही चांगलेच जातपात करून ब्राह्मणांच्या नावे ओरडा करणारे दिसता आहात , आणि त्यातही पेशव्यांनी मौज मजा केली असले अकलेचे तारे तोडत आहात .
    पेशवेपद कोणी निर्माण केले ? स्वतः छत्रपति शिवाजी महाराज यांनी पेशवेपद स्वतः स्वराज्याची गरज म्हणून निर्माण केले १६७४ साली आणि पहिला पेशवा मोरोपंत पिंगळे हा होता . त्याच्यातील गुण बघूनच महाराजांनी त्यांना जवळ केले असणार .
    त्यानंतरचे पेशवे हे वंश परंपरा नव्हते , रामचंद्रपंत अमात्य - त्यांचा दरारा तर विचारूच नका , संताजी आणि धनाजी बरोबर त्यांनी मोहिमेत स्वतः भाग घेतला , शिवाजी महाराजांनी सोडलेले अनेक किल्ले घेतले , आणि मनाने निवृत्त झाले .
    शाहू महाराज यांनी पेशवे बदलले ते का ? हा सातारच्या गादीचा दोष मानला पाहिजे ! त्यांनी बाळाजी विश्वनाथावर भरोसा ठेवला आणि तो त्याने आपल्या कर्तृत्वाने सार्थ ठरवला बाजीराव , नानासाहेब आणि थोरले माधवराव असे हिरे या वंशाने दिला . वंश परंपरागत पेशवेपद ही भूमिका शाहू महाराजांची होती त्याला काय करणार ?
    प्रत्येक घराण्यात अत्यंत हलक्या वृत्तीचे लोक निपजता आणि अतिशय धोरणी लोकही निपजतात . शाहू महाराज हे धोरणी होते . आपल्यात कर्तृत्व नाही हे ओळखून त्यांनी स्वतःच्या जातीवर भरोसा न ठेवता ब्राह्मणांवर ठेवला !
    आज सातारच्या गादी चे राजे काय दिवे लावत आहेत ? धाकट्या बारामतीकरांनी त्यांना खिंडीत गाठून त्यांचे थोबाड फोडले हे सर्व जग जाणते ! सदासर्वदा बाई आणि बाटलीमध्ये रमणारे आणि खूनखराबा करणारे हे कसले छत्रपतींचे वंशज ?
    दुसर्याच्या जातीवर शिंतोडे उडवण्या आधी स्वतःचे बघावे !
    एका माणसा वरून - नथुराम गोडसे वरून सर्व कोकणस्थ ब्राह्मण जातीला बदनाम करणे योग्य नाही हेच मला सांगायचे आहे . इतके शिकलात तरी ९६ कुळींचे भले होईल ! आमचे भले आम्ही करतोच , सर्वस्वाची राख रांगोळी केली तुम्ही तरी आम्ही पुन्हा उभे राहिलो !

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही चांगलेच जातपात करून ब्राह्मणांच्या नावे ओरडा करणारे दिसता आहात.----------------------->
      जातपात वगैरे कहीही नाही, ब्राह्मणाच्या नावे आरडाओरडा तर मुळीच नाही. मी ब्राह्मणच आहे परतू ब्राह्मणवादी, ब्राम्हण्यग्रस्त तसेच उच्चवर्णीय वर्चस्ववादी टेंभा मिरविणारे अजिबात नाही!

      Delete
  21. आप्पा - एकुणात जर पाहिले तर असे दिसते की एक जुना विषय अजूनही चाघालायाला एका ठराविक वर्गाला आवडतो . गांधीना गोडसेने मारले आणि इथला मुसलमान निर्भय झाला असे म्हणतात ते अगदी खरे आहे . कारण बोट दाखवायला आता गोडसे होता !द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आता मोडला होता , आम्ही मुसलमान असून इथलेच आहोत असे आम्ही मानतो आणि आम्ही गांधीना मारले नाही . हा त्यांचा दावा आता कधीच खोडता येणार नाही .
    बाप्पा - गांधींच्या तत्वज्ञानाचा पराभव अटळ होता , कारण ते व्यावहारिक नव्हते . आज ना उद्या गांधी नकोसे होणारच होते . ते दंगलींच्या काळात कुठेकुठे ठिगळे लावणार होते ? कलकत्ता , मग दिल्ली , आणि मग पंजाब , पाकिस्तान - असा त्यांचा विचार होता . फाळणी कोणी ओढवून घेतली ?तसे पाहिले तर दोष नेहरुंचा आहे , गांधींचा फाळणीला विरोध होता . " माझ्या शरीराचे दोन तुकडे होतील पण - " असे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे . मग फाळणी कोणामुळे झाली ?
    सावरकर काय किंवा नथुराम काय , ते देशद्रोही नक्कीच नव्हते , पण आपण नथुरामला हुतात्मा म्हणू शकतो का ? नाही - नक्कीच नाही . कारण काहीही झाले तरी सदोष मनुष्यवध करणारा हुतात्मा कसा होईल ?
    आप्पा - मुसलमान आणि हिंदू यांच्यातील तेढ नुसती धार्मिक नाही तर ही जखम
    अजून खोलवरची आहे . इंग्रज येण्यापूर्वी मुस्लिमांनी १००० वर्षाच्या वर इथे हवेतसे राज्य केले होते . ते इथले सर्वेसर्वा होते . हिंदू दुय्यम नागरिक होते जगण्यासाठी जिझीया कर देत होते . आज त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून लोकसभेत बसायचे ? त्यापेक्षा वेगळे राष्ट्र बरे - आमचे कायदे आमचे राज्य - असा पाकिस्तानचा जन्म आहे !
    बाप्पा - पण त्याच बरोबर हिंदुना हा भ्रम नव्हता , १८५७ सालीही त्यांनी बंडाचा झेंडा उभारून
    ( कोणी त्याला स्वातंत्र्यसमर म्हणतात ) मुघल सम्राटाला राजा घोषित केले होते हे अभ्यासण्यासारखे आहे . गांधीनी धार्मिक एकतेच्या नावाखाली जे भजने आणि निधार्मिय्तेचे युग सुरु केले त्याला मुस्लिमांचा विरोध होताच !मौलाना आझाद हे वन्दे मातरम ला विरोधाच करते झाले याचे कौतुक करायचे का ती आपल्या निधर्मी पणाची आपली शोकांतिका म्हणायची ?
    आप्पा - गांधी आणि मदन मोहन मालवीय यांनी हिंदू महासभा पहिल्या अधिवेशनात हजार राहून शुभेच्छा दिल्या होत्या . गांधी हे सर्वसमावेशक होते .
    बाप्पा - पण प्रश्न असा आहे की काळाने त्यांच्यावर मात केली असती का ? माउंटब्याटन त्यांना अलौकिक वन म्यान आर्मी म्हणत ते कुठवर चालले असते . गांधीनी गळ घातली म्हणून कलकत्यात हिंदुनी ताब्यात घेतलेल्या मशिदी परत मोकळ्या केल्या . दिल्लीतही तेच घडले . हे कुठवर चालले असते ?
    बाप्पा - ज्या भावनेने स्वराज्य मिळाले त्या प्रमाणे हैद्राबादचा निजाम वागला का ? पाकिस्तानने तर हा प्रश्न युनोत नेला ,
    आप्पा - गांधीना डावलून काश्मिरात सेना पाठविण्यास भारत सरकारने मान्यता दिली गांधींच्या नामाविरुद्ध काही निर्णय घेण्यास सुरवात झाली होती - हे अटळ होते आणि हीच कॉंग्रेसची अडचण होती . देशात हळूहळू असंतोष सुरु झाला होता . गोडसेने गांधीना अमर केले !

    बाप्पा - गांधींचा हट्टीपणा किती दिवस चालला असता . उपोषण हे कायम वापरायचे हत्यार असू शकत नाही . परकीय सत्तेविरुद्ध ठीक आहे पण आपल्याच लोकाना वेठीस धरणे किती समर्थनीय होते ?- पुढच्या प्रश्नांची उत्तरे जशी सावरकर यांच्या कडे नव्हती तशीच गांधींकडेही नव्हती . आपला देश फक्त खादी आणि ग्रामोद्योगाने लोकशाही राबवू शकत नाही हे सामान्य लोकानाही कळत होते .
    आप्पा - गांधी आले की लोक अहत्यारे खाली टाकत , नेहरू आले की लोक लाखोनी गर्दी करत . हा करिश्मा ओसरू लागला होता . सोमनाथाची निर्मिती आणि हैद्राबाद चे ऑपरेशन पोलो हि कृती वल्लभ भाई यांची होती . गांधींची किंवा नेहरूंची नाही .

    ReplyDelete
  22. aappaa bappaa उर्फ manasi pataskar उर्फ bapusaheb gore उर्फ Snehprabha Bedekar उर्फ Sumati Valhekar उर्फ bhupal उर्फ dattatrey agashe..............

    तुला झाले आहे तरी काय? मी फक्त "तर शिवाजी महाराजाने मोठ्या कष्टाने कमावलेल्या राज्यावर ज्यांनी उड्या व मौजमजा मारल्या त्या पेशव्यावर ते भरभरून लिहितात." असे सत्य लिहिले म्हणून तुझ्या तळपायाची आग मस्तकात जाण्याचे कारणच काय? कोकणस्थ अर्थात चित्पावन आहेस काय? तुम्हा कोकणस्थांची काय लायकी आहे? हे न सांगितलेलेच बरे! इथे ते लिहिणे उचित ठरणार नाहि. एखाद्याला जातीवादाने बरबटलेले आहात असे म्हणताना लाज पूर्णतः सोडली होतीस काय? सत्य लिहिले की "जातीयवादी","अकलेचे तारे तोडले" असे लिहिल्याने सत्य लपून राहत नाही किंवा खर्याचे खोटे होत नाहि. पेशव्यांनी काय दिवे लावले होते हे सर्वजन जाणतातच. इथे तुला पेशव्यांची बाजू घेऊन सारवासारव करण्याची मुळीच आवश्यकता नाहि. गोडसेचे आणि सावरकराच्या धर्मांध, हिंसक विचारांचे तसेच कृतीचे तसेच नालायक पेशव्यांचे कधीही समर्थन होऊ शकत नाही!

    ReplyDelete
  23. सर आर ऑयझॉक्स(उर्फ़ लॉर्ड रीडींग) यानं सावरकरांची प्रत्यार्पणाची केस लढवली होती. तो या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल होता. सेल्युलर जेलचा तुरुंगाधिकारी जे.एच.मुरे हा या वेळी येरवड्याला तुरुंगाधिकारी होता आणि गव्हर्नर सर जॉर्ज लॉर्ड हा तर सावरकरांना भेटण्यासाठी तुरुंगात आला होता. त्यांच्या सोबत ग्रुहमंत्री मॉंटगोमरी हा देखील होता. सावरकर आणि त्या दोघांनी मिळून सुटकेच्या अटी ठरवल्या. त्यानुसार, सावरकर एक कबुलीजबाब लिहुन देणार होते.
    .....आणि २७ डिसेंबर १९२३ रोजी सावरकरांनी दिलेला कबुलीनामा असा होता.-
    "माझेवर योग्य तर्हेने खटला भरला गेला(म्हणजे जॅक्सन खटला) आणि मला दिलेली (सेल्युलर जेलमधील) शिक्षाही न्याय होती हे मला मान्य आहे. पुर्वायुष्यात अवलंबिलेल्या हिंसक मार्गाचा मी मनापासून निषेद करतो. माझ्या शक्तिनुसार प्रचलित कायदा आणि राज्यघटना उचलून धरणे माझं कर्तव्य आहे, असे मला वाटते. भविष्यकाळात मला कार्य करण्याची मुभा देण्यात आली तर नव्या सुधारणा यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सारे करण्यास मी तयार आहे."
    सावरकरांनी हा स्वेच्छा कबुलीजबाब इंग्रजांना का लिहुन दिला? आणि यात त्यांच्या देशभक्तीचं स्फ़ुल्लिंग कुठं दिसतं ????

    ReplyDelete
  24. अय्या , कुऱ्हाडे सर - हे कसे असू शकते ? हे सर्व जण एकच वेगवेगळे नाव वापरून लिहित असतात पण का ?काय कारण असावे ?
    आप्पा बाप्पा हे मुंबईत राहतात हे त्यांनी सांगितले आहे , मुगभाट लेन हर्कुंवर बाईची चाल गिरगाव असा त्यांचा पत्ता पण आहे .
    म्हणजे हे सर्व लोक बाजूला काढले तर , संजय सरांच्या ब्लोगवर उरते कोण ?
    संजय सरांनी याना भाडोत्री ठेवले असेल .
    कमाल आहे या कोकणस्थांची . आम्ही असे करत नाही तरीही आमचे नाव त्यात गोवले आहे , ठीक आहे कऱ्हाडे , आम्हीपण कऱ्हाडे आहोत , कोकणस्थ नाही .
    कऱ्हाडे साहेब आपण जिल्हा परिषदेत होतात , पण अशी जादू तुम्हाला जमली नाही . एकाच माणसाने ४ -४ नावे घेणे ?
    आणि काय हो मी जे काही विचारले ते दुबे सराना , तुम्हाला तर मी काहीच म्हटले नाही , तरी तुम्ही मला त्यांच्या पंक्तीला बसवत आहात ?
    गणपतीच्या दिवशी तरी असे भांडू नका !
    सर्वाना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. खोटारडा माणूस !

      स्त्रियांच्या नावाने सुद्धा लिहितो, जळो याचे जिने लाजिरवाणे !

      aappaa bappaa उर्फ manasi pataskar उर्फ bapusaheb gore उर्फ Snehprabha Bedekar उर्फ Sumati Valhekar उर्फ bhupal उर्फ dattatrey agashe..............

      वरील नावांच्या टिपण्या वरती एक नजर जरी टाकली तरी शेंबडे पोर सुद्धा सांगेल की ही एकच व्यक्ती आहे, त्यासाठी लेखन तज्ञाची अजिबात गरज नाही.

      Delete
  25. नमस्कार , मंगेश कुऱ्हाडे सर , आम्हाला काही तुमच्या सारखे धरबंध सोडून लिहिता येत नाही तुमच्या झेडपीमध्ये असले जावी शोध शेंबडी पोरे लावत असतील , याला संशोधन म्हणत नाहीत .
    " सबका मालिक एक " असा सिद्धांत तुम्ही असा सिद्ध कराल असे वाटले नव्हते . - शेवटी झेड पी ते झेड पीच !. आम्हाला इतर पिलावळी बरोबर समान लेखण्याचे काय कारण ? नुसत्या भाषेवरून ? अरेरे ? काय हे , झेड पी चा कारभार असा चालवला की काय कुऱ्हाडे साहेब ?ऑफिसात असायाचात का चौफुल्यावर ?असली भारी मेंदूची धाव हेच सिद्ध करते !
    शेंबडे पोर सुद्धा तुमच्यापेक्षा विचार पूर्वक लिहील . तुमच्या बुद्धीची झेप अशी आणि इतकीच कशी काय ? झेड पीत काय करायचात ?
    आता तुमचा मुद्दा दुसरा , बायकांनी बायकांच्या नावाने लिहावे हे बरे , आता आम्ही काय आप्पा बाप्पा आणि आगाशे या नावाने लिहावे म्हणता काय तुम्ही ? कमाल आहे तुमची कुऱ्हाडे . भाषा एक सारखी असणे काय गुन्हा आहे काय हो ?पुणेकर आणि गिरगाव यातला फरक काळात नाही त्याला काय म्हणावे ?
    आप्पा बाप्पा आम्हाला वंदनीय आहेत , त्यांची भ्शा वाचूनच आम्ही आमची भाषा घडवली . आम्ही आनिपानी वाले नाही , प्युअर तुम्ही ज्यांची हेटाई करता ते "ब्राह्मण " आहोत ."ब्रह्म" जाणतो तो ब्राह्मण ! - त्याला इतर जात नसते .तुम्ही वाचन वाढवा , म्हणजे तुमच्या वृत्तीत फरक पडेल .,तुमचा जन्म झेड्पित बाहेरच्या बाकादावर कानातला मळ काढत बसण्यात गेला , आता निवृत्ती नंतर तरी वाचन करा - समज वाढवा -
    अय्या , किती भडक लिहिले मी नाही का ? अगदी पुरुषी थाटाचे , आता म्हणू नका हं प्लीज , की मीपण पुरुष आहे आणि वेगळे नाव घेऊन लिहित आहे - चावट कुठले , इश्श्य !
    संजय सराना काय वाटेल ?

    ReplyDelete
    Replies
    1. काय झेडपी? कोण झेडपी? आणि कसला झेडपी?

      कोणाची निवृत्ती? आणि कसली निवृत्ती?

      वेडगळपणा नुसता! काहीही काल्पनिक लिहित बसतो. जरा काल्पनिक दुनियेतून बाहेर ये!

      Delete
    2. uttam pratikriya.. beduk baaila ZP chya chaukat koni ubhe karat nahit !!!

      Delete
  26. aho kurhade, tumhi kanaatalaa mal kaadhat basataa te aadhi sodun dya
    jaraa bhramisht panaa kami karaa aani itake sundar lok lihit aahet tithe ghaan karu nakaa , purvi ek patakasar hote , aata tumhi , kaay bolataa kaay lihitaa ? arere , besik abhyaas naahi , tumachi ghaai kiti brahmanaanaa badnaam kraayachi ? jaraa damaan ghyaa .

    ReplyDelete
  27. ज्ञान कन्त स्वप्नतील निंगल उन्दायुरुन्णु
    आता भाषा जुळते का ? आम्ही एकाच आईची लेकरे असे म्हणायचे आहे का रे तुला ? अरे जरा जिभेला हाड आहे का ? मास्सो उगी ऱ्हाव !

    ReplyDelete
  28. बाप्पा - काहीही म्हण आप्पा , हे लय भारी आहे , तुझ्या लक्षात येतंय का रे ?
    आप्पा - हि काहीतरी अडचण आहे या कुऱ्हाडे सारख्या लोकांची . त्याना नेमके काय सिद्ध करायचे असते तेच काळात नाही , एकसारखा ब्राह्मण द्वेष . अरेरे , किती कमनशिबी आहेत रे हे . हा द्वेष कधी सुरु झाला ? पार शिवाजीने पेशवेपद ब्राह्मणाना दिले त्या वेळेपासून ! महाराजांनी असे का केले असेल ? काय विचार केला असेल ? इतका थोर राजा आणि असे कसे वागेल ? ब्राह्मणांच्या निष्ठे बद्दल काही संशय आला नाही ?
    बाप्पा - आधी अनेक पेशवे होऊन गेले , तेपण दरबारच्या कामात उत्कृष्ट होते म्हणूनच निवडले गेले , अनेक मोहिमाही त्यांनी केल्या , मोरोपंत पिंगळे आणि त्यानंतरचे सर्व नेमणूक झालेले एकापेक्षा एक थोर होते . आता शिवाजीच्याच वंशात भाउब्न्दकि आली , राज्य करण्याची कुवत संपली , म्हणून राज घराण्यानेच निर्णय घेऊन राज्य रक्षणाचे कार्य बालाजी विश्व नाथावर सोपवले , त्या वेळचा नकाशा आणि नंतरच आनकशा पाहिला की मराठी साम्राज्य कसे पसरत गेले ते समजते .पन जाऊ दे . पालथ्या घड्यावर पाणी ,ह्यांची अवलाद हि अशीच द्वेषावर जगणारी .
    आप्पा - अरे हे झेड पीत साहेबांनी बोलावल्यावर होय साहेब करत , धावणारे , आणि फावल्या वेळात बाकड्यावर कानातला मळ काढत बसणारे - हेच यांचे दुखणे आहे ,
    आप्पा - ब्राह्मणांची घरे जाळून यांचे समाधान होत नाही , ब्राह्मण फिनिक्स पक्षा प्रमाणे उभा राहिला , पण हे आहे तिथेच - अभागी - ! अरे रे !
    बाप्पा - ९६ कुळी झोपडपट्टी - फारच भारी आहे . सातारला तर आत्ताचे राजे फार भारी - कायम टाईट !तिथल्या सार्वजनिक संडासावर चित्र कोणाचे आहे - पुरुषांसाठी - माहित आहे - खुद्द महाराज आणि स्त्रियांसाठी - खुद्द थोरल्या आईसाहेब - इतके जनसेवेचे व्रत घेतलेले हे लोक असे जातीयवादी का लिहितात ? त्यांचेच लाडके ब्राह्मण लोक - त्यांच्या जिवावर का उठतात ?
    आप्पा - हा कुऱ्हाडे कोण रे? धेडगुजरी वाटतो !

    ReplyDelete
  29. मंगेश कऱ्हाडे सर,

    खरेच तुम्ही ग्रेट आहात!

    तुमच्या म्हणण्यानुसार मी या कॉमेंट्स वरती नजर टाकली, मला आढळलेल्या बाबी खालील प्रमाणे :
    १) हा माणूस वाक्य पूर्ण झाल्यानंतर लगेच पूर्णविराम देत नाही, तर हा एक किंवा एकापेक्षा जास्त स्पेस देवून नंतर पूर्णविराम देतो.
    २) तशीच स्थिती स्वल्पविराम, उद्गारवाचक आणि प्रश्नार्थक चिन्हाची.
    ३) कधी कधी पूर्णविराम चिन्हा ऐवजी हा (-) अशी वजाबाकीच्या चिन्हाचा वापर करतो. काहीवेळा नको तिथे (-) मारून रिकामा होतो. पूर्णविरामा नंतरही हा (-) टाकायला थोडाही कचरत नाही.
    ४) साधारण पाने हा एकापेक्षा जास्त कॉमेंट्स हा लिहित असतो आणि त्या कॉमेंट्स मधील वेळ सुद्धा जास्त नसते, एकापाठोपाट एक कॉमेंट. कॉमेंट्स च्या वेळेवर एक नजर टाकली की हे आपसूक जाणवते.

    आता वरील कॉमेंट्स वरती एक नजर टाकून बघा. "दुधका दुध और पानी का पानी"
    हा मुळीच योगायोग नाही, हे मात्र ध्यानात ठेवायला हवे!

    कऱ्हाडे सर लिहूद्यात त्याला, तुम्ही स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नका. कादाचीच माणूस वयस्क असेल, वेळ जात नसेल म्हणून लिहित असेल! आता पुरे झाला वाद, कृपया आपण सावरकर यांच्या संबंधीचे लिखाण वरील लेखाच्या अनुषंगाने पुन्हा जोमाने चालू करूयात!

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. लिहा वाचा,
      धन्यवाद!
      तुमच्या वरील टिप्पणी बद्दल तुमचे खूप खूप आभार.

      Delete
  30. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  31. आटली बाटली कचकन फुटली, माझे नाव (अविनाश पाटसकर) घ्यायला लाज नाही वाटली.... रे भूपाळ्या....

    ReplyDelete
  32. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  33. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  34. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  35. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  36. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  37. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  38. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  39. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  40. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  41. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  42. अप्पा बप्पने अप्लाय ढुंगानावरचे काले पंढारे दाग बघवेत अणि नंतर फीनिक्स पक्षाच्या गप्पा कराव्यात फीनिक्स टार आम्हीही आहोत आम्ही तर 2000 वर्षे तुमची घनच् काढत बसलो अणि नेमके ज़ेपावलो तुम्ही काय मोठा तीर मारला? उगाच अवघड उदाहरणे देऊन लोकांना एड बनावु नका साले फीनिक्स पक्षी तुम्हाला यूरोपियन लोकन कडून कलाल पैन ते यूरोपियन अणि अमेरिकन तुम्हाला जोड्याची किम्मत डेट नाहीत तरी तुम्ही त्यांचे वंशज बनायल जीवचा अतपिता करता वा वा ते मोठे पांढरे गब्दुल कुतरे आहे तुम्ही त्याचेच वंशज हो की नहीं आप्पा बाप्पा मानसी बेडकट बाई

    ReplyDelete
  43. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  44. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  45. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  46. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  47. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  48. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  49. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  50. सावरकरांचे संडास पलायन :

    हे संडास पलायन पराक्रमासारखे खूप रंगवून सांगण्यात येते. सावरकर समुद्र पोहून गेले असे लिहिण्यात येते. जसे काही ते ५० किलोमीटर समुद्र पोहून गेले असा आभास निर्माण करण्यात येतो. सावरकरांनी बोटीच्या संडासातून उडी घेतली तिथून समुद्र किनारा फक्त १५० फूट होता, असे सावरकर भक्त लेखकाच्या पुस्तकात आहे, तो दीडशे फूट ही नसावा, अशी शंका येते. यांना मोठे बनविण्यासाठी "कणाचा मण" करण्याची लेखकांची प्रवृत्ती अतिप्राचीन आहे. 'बळ' नसताना बढाया मारण्याचे 'बळ' मात्र मोठे आहे. सावरकरांनी बोटीवरील संडासातून समुद्रात उडी घेतल्या बरोबर बोटीवरील दोन अधिकाऱ्यांनी सुद्धा समुद्रात उडी टाकून सावरकरांना पकडले. सावरकरांच्या राजद्रोहाच्या मूळाशी राष्ट्रनिष्ठा नसून धर्मनिष्ठा होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. धर्मनिष्ठा म्हणजे राष्ट्रनिष्ठा नव्हे.

    ReplyDelete
  51. सावरकरांच्या विषयी संदर्भांसहित संपूर्ण सत्य जाणून घ्यावयाचे असल्यास अवश्य वाचा "

    SAWARKAR AND HINDUTVA - THE GODASE CONNECTION"

    WRITER : A. G. NURANI.

    PUBLISHER : LEFT WORLD BOOK,

    12, RAJENDRA PRASAD ROAD,

    NEW DELHI-110001.

    ReplyDelete
  52. http://serveveda.org/?p=87
    http://serveveda.org/?p=141

    ReplyDelete
  53. सावरकराचे हिंदुत्व | आत्मपरीक्षण

    सावरकराचे हिंदुत्व......

    नितीन सावंत, परभणी
    9970744142.

    समग्र सावरकर वाचला आणि समजून घेतला तर सावरकराचे हिंदुत्व हे केवळ ब्राम्हणत्व आसल्याचे सिद्ध होते. त्याने कधीच मराठा किंवा बहुजन महापुराषांचे गुणगाण केले नाही. परंतू ब्राम्हण जातितले विक्रुत लोक महापुरुष बनवण्याचा प्रयत्न केला. सावरकर आपल्या सहा सोनेरी पानांत सम्राट आशोक आणि त्यांचा नातू सम्राट ब्रहदरथ यांची अत्यंत खालच्या शब्दात निंदा करतो. तो सम्राट आशोकाचे घराणे संपवणार्या पुष्यश्रुंग ब्राम्हणाला महासम्राट उपाधी लावून "यवनांतक " म्हनतो. म्हनजे सम्राट आशोक व त्यांचे घराणे यवनांचे घराणे आसे त्याचे म्हनने आहे. बोद्ध धर्मावर अत्यंत द्वेषजनक व किळसवाने लिखान भारतात एकमेव सावरकराने याच सहा सोनेरी पाने या पुस्तकात केले आहे. सहा सोनेरी पाने या पुस्तकात एकही पान शिवरायांस नाही.किंवा बहुजन महापुरुषांस नाही. संपुर्ण इस्लामची बदनामी करणारी आनेक धडेच्या धडे सहा सोनेरी पाने या पुस्तकात सापडतात. तो शहिद टिपू सुलतान यांच्या बद्दल लिहीताना म्हंतो की हजारो हिंदूंस टिपू सुलतानाने 24 तासाच्या आत मुसलमान बनवले. आम्ही तर्क करत नाहीत. 24 तासाच्या आत मुसलमान बनवायला सावरकराचा बाप काय कात्री घेवून उभा होता का हजारोंची सुंता करायला. रांग लावून जरी मुसलमान बनवायचे म्हटले तरी 24 तासाच्या आत हे शक्य नाही. मग सर्व लोक विखुरलेले दुर्गम भागात रहाणारे..

    हिंदुपद पातशाही हे पुस्तक वाचा. त्यात सावरकर ने लिहिले आहे. तो ' छत्रपती संभाजी राजान्ना अयोग्य मराठा, दारुच्या आनी बाईच्या नादाला लागलेला राजा आस वर्णन करतो ....
    ही समस्त मराठा बहुजण समाजाच्या महापुरुषाची बदनामी नव्हे का ? .....

    पुढे त्याने आसेच सहा सोनेरी पाने या पुस्तकात शेवटच्या काही प्रकरणात छत्रपती शिवरायांचीही बदनामी केली आहे. तो म्हनतो 'योगायोने किंवा दैवी योगाने किंवा कावळा बसावा आणि फांदी मोडावी या काकतालीय न्यायाने शिवाजीचे राज्य आले.' तो शिवरायांचे कार्यकत्रत्व हिरावून घेतो. आणि आरती लिहून शिवरायांस देव करु पहातो. देव म्हटले की भटजी आलाच हे सावरकराचे ब्राम्हणी समीकरण. छत्रपती शिवराय, छञपती संभाजी महाराजांवर खोटे आरोप करनारा ब्राम्हण ज्याला इतिहासाचार्य मा.म.देशमुख माफीवीर आथवा संडासवीर सावरकर म्हंतात तो ईग्रजांकडून ६० रुपये पगार घेत व ईंग्रजांचा प्रामाणिक नोकर म्हनून मेला....

    शिवाय नथुराम गोडसे व सावरकर यांच्या संबंधांवर न बोलने बरे...

    ............................................................................................................

    सौजन्य : http://aatmaparikshan.blogspot.in/

    ReplyDelete
  54. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  55. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  56. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  57. आपल्याला स्मार्ट सिटी करायची आहे , आपल्याकडे भिकारी भरपूर आहेत त्याना डेक्कनवर रात्री झोपायची व्यवस्था असते , अशा लोकाना कचरा हटवण्याच्या कामात सामावून घ्यायला पाहिजे . पुण्यात भिकारी असा ठेवायचाच नाही . सर्वाना रोजगार देत आपण कचऱ्याची समस्या सोडवू शकतो
    म्हणजे असे की ,पूर्वीसारख्या कचऱ्याच्या ठराविक जागी ठेवून त्यातील ओला सुका कचरा वेगळा करण्यासाठी भिकारी लोकांची पथके करायची आणि त्याना कचरा विभाजनाचे काम देऊन रोज कचऱ्याचे विघटन होईल असे बघायचे .
    आत्महत्या करणाऱ्या शेतकरी वर्गाला आपण पूर्वी रोजगार हमी योजना देत होतो त्या धर्तीवर शहरात त्याना रोजगार देऊन त्यांची पथके करून अतिक्रमण हटवण्यासाठी त्या लोकांचा वापर करता येईल
    पोलिसबळ कमी पडते तेथे अशा लोकांची नेमणूक योग्य प्राथमिक शिक्षण देऊन करता येईल .शहरात अनियमित झोपडपट्टी हटवायला अशा मनुष्य बलाचा वापर करता येईल .
    नको असलेली कुलुंगडी कुत्री पकडणे वगैरे कामे त्याना सांगता येतील
    आणि या लोकांबरोबर ब्लोगवर असभ्य वार्ता करणाऱ्या मंडळीना त्यांच्या बरोबर कामास लावावे . म्हणजे संजय च्या ब्लॉगची इज्जत वाचेल आणि त्याना कामही मिळेल कारण रिकामेघर म्हणजे सैतानाला आमंत्रण हे आपण अनुभवत आहोत .

    ReplyDelete
  58. आपण म्हणता तशी भिकारी वर्गाची डेक्कन वर झोपायची व्यवस्था केली आहे . इतके जर आपण करू शकतो तर आपण या भिकारी वर्गाला कचरा विभाजन करायचे काम खरोखरच देऊ शकतो . एक क्रांती करू शकतो ,अशी असंख्य कामे करता येतील , अशा पथकाकडून आपण रस्ते झाडणे कुलंगडी कुत्री उचलणे,आणि अतिक्रमणे हलवणे अशी कामे करू शकतो. आज शेतकरी वर्ग आत्महत्या करत आहे , शहरात त्याना आपण रोजगार देऊन अनेक नवे रस्ते करू शकतो , ज्यांनी नवा मांझी पिक्चर पाहिला असेल त्याना हे पटेल .
    आपण गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव यावर प्रचंड पैसा खर्च करतो , त्याऐवजी आपण शेतकरी वर्गाला आणि भिकार्याना असे पोसले तर आपण वैदिक लोकाना सुद्धा देशाबाहेर हाकलू शकू आणि सर्व देश वैदिक मुक्त करू शकू
    आत्ताच दगडूशेठ गणपतीपाशी पाहिले तेथे वैदिकाञ्चा जोरात धंदा चालू होता हे तिथे पूर्वी नव्हते , अशा प्रथा बंद झाल्या पाहिजेत,म्हणून दुष्काळी शेतकऱ्याकडून गणेशाची पूजा करावयाची नवीन प्रथा पाडली पाहिजे म्हणजे शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि वैदिकाही देशोधडीला लागतील . संजय सर या बाबतीत पुढाकार घेतील असे वाटते , नाहीतर इतर जण , म्हणजे लिहा वाचा आहेतच आमचे शुद्धलेखन तपासायला ,

    ReplyDelete
  59. ‘सनातन’वर बंदी घालण्यावरून काँग्रेसमध्येच बेबनाव

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक झाल्यानंतर काँग्रेसकडून सातत्याने सनातन संस्थेवर

    ‘सनातन’वर बंदी घालण्यावरून काँग्रेसमध्येच बेबनाव
    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक झाल्यानंतर काँग्रेसकडून सातत्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. मात्र, यानिमित्ताने पक्षातील नेत्यांनीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी पुणे येथील पत्रकारपरिषदेत सनातनवर तत्काळ बंदी घाला अशी मागणी केली. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या यासंदर्भातील वक्तव्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत दुफळी समोर आली आहे. मी मुख्यमंत्री असताना २०११ मध्ये केंद्राकडे सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, तेव्हाच्या गृहमंत्रालयाकडून त्याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, असे सांगत पृथ्वीराज यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनीही चव्हाणांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. सनातनवर बंदी घालण्याबाबत चव्हाण इतकेच गंभीर होते तर त्यांनी फक्त प्रस्ताव पाठवण्यापेक्षा मला एखादा फोन करायला पाहिजे होता. मी २०१३ मध्ये गृहमंत्रालयाची सूत्रे हाती घेतली. मात्र, दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांना या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात आलेल्या अपयशातून त्यांचा निष्काळजीपणा सिद्ध होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले.

    ReplyDelete
  60. गोवा बॉम्बस्फोटातील फरारी संशयित पानसरे हत्येमागील मुख्य सूत्रधार?

    बॉम्बस्फोटाचे फरारी संशयित पानसरेंच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे.

    गोवा बॉम्बस्फोटातील फरारी संशयित पानसरे हत्येमागील मुख्य सूत्रधार?
    विवेकवादी विचारवंत व डाव्या पक्षांचे नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करण्यात यंत्रणांना यश येत असून गोव्यात २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचे फरारी संशयित पानसरेंच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे.
    गोव्यातील मडगाव येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याबाबत सनातन संस्थेशी संबंधित दोघे फरारी आहेत. पानसरे हत्या प्रकरणात यापैकी एक मुख्य सूत्रधार असल्याचा संशय विषेश तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रुद्र पाटील आणि सारंग अकोलकर अशी या संशयितांची नावे आहेत. यापैकी रुद्र हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. रुद्रला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध सुरू केला असून त्याची माहिती एसआयटीने प्रसिद्ध केली असल्याचे कोल्हापूरच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
    यापूर्वी अटक करण्यात आलेला संशयित समीर गायकवाड हा रुद्र आणि मुंबईतून ताब्यात घेतलेल्या मैत्रिणीच्या सतत संपर्कात असल्याचे त्याच्या भ्रमणध्वनीच्या संभाषणावरून पुढे आले आहे. गोव्यातील बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या गोंडा पाटीलचा रुद्र हा चुलत भाऊ आहे. तसेच तो कट्टर उजव्या विचारसणीचा पुरस्कर्ता असून २००९ पासून फरार आहे. रुद्रची पत्नी प्रीती पाटील ही वकील आहे व ती गायकवाडचा खटला लढणार आहे. तिला कोल्हापूर बार असोसिएशनने काढून टाकले असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
    एनआयएने फरार घोषित केलेल्या रुद्र पाटीलला सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी निदरेष असल्याचे म्हणत आपले कार्यकर्ते रुद्रच्या पाठी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले आहे. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे व पोलीस जाबजबाब घेत आहेत. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे यांची मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी कोल्हापूर येथे हत्या केली होती. त्या हल्ल्यात ते जखमी झाले होते व नंतर त्यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. त्यांच्या पत्नी मात्र या हल्ल्यातून बचावल्या पण त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
    आरोपींवर कठोर कारवाई -किरन रिजीजू
    विवेकवादी विचारवंत व डाव्या पक्षांचे नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात सामील असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरन रिजीजू यांनी सोमवारी सांगितले. या हत्या प्रकरणात उजव्या गटाशी संबंधित लोकांची नावे पुढे आली आहेत. जर विवेकवादी कार्यकर्त्यांना छळले जात असेल, त्यांना ठार केले जात असेल तर ती गंभीर बाब आहे. यात एखादा गट सामील असल्याचे पुरावे असतील तर कठोर कारवाई केली जाईल यात शंका नाही, असे एका कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.

    ReplyDelete
  61. ..हे तर हिंदुत्ववादी संघटनांच्या मानहानीचे षडयंत्र

    हिंदू जनजागृती समितीचा आरोप कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी सनातन संस्थेचे साधक समीर

    हिंदू जनजागृती समितीचा आरोप
    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड यांना करण्यात आलेली अटक म्हणजे सनातन संस्थेला लक्ष्य करत केलेली अन्याय्य कारवाई आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांची मानहानी करण्याचे पुरोगाम्यांचे षडयंत्र असल्याचेही समितीने म्हटले आहे.
    समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ चारूदत्त पिंगळे यांनी येथे भूमिका मांडताना हिंदुत्ववादी संघटना सनातनच्या पाठीशी असल्याचे नमूद केले. यावेळी समितीचे राज्य संघटनक सुनील घनवट, सनातन संस्थेचे सेवक नंदकुमार जाधव, श्रीराम सेनेचे मारूती सुतार, आदी उपस्थित होते. जाधव यांनी गायकवाड यांच्यावर अद्याप आरोपपत्र दाखल झाले नसतांना पुरोगाम्यांनी राईचा पर्वत उभा करून संस्थेवर बंदी घालण्याची केलेली मागणी अन्यायकारक असल्याचे सांगितले.
    काही पुरोगामी संघटनांच्या अपप्रकारांचा सनातनने भांडाफोड केल्याने त्या एकत्रितपणे सनातनला लक्ष्य करू पाहत आहेत. संस्थेचे कार्य समजून न घेता त्यावर टीका करणे म्हणजे हिंदुत्वाचे खच्चीकरण करण्याचा पुरोगाम्यांचा प्रयत्न असून आम्ही तो सफल होऊ देणार नाही, असे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, सनातनवर बंदीची मागणी करणाऱ्यांचा संत आणि हिंदुत्वत्वादी संघटनांनी संत संमेलनात पत्राद्वारे निषेध केला आहे. जगद्गुरू रामानुजाचार्य, महामंडलेश्वर, महंत, वारकरी, संत यांचा सनातनला जाहीर पािठबा असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

    ReplyDelete
  62. पत्रकार निखिल वागळे यांना ‘सनातन’कडून धमकी

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे हिंदूत्त्ववादी संघटनांच्या रडारवर असल्याची माहिती

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे हिंदूत्त्ववादी संघटनांच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, पानसरे यांच्या हत्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित समीर गायकवाड याच्या फोनवरील संभाषणातून ही माहिती उघड झाली आहे. यापूर्वीही निखिल वागळे यांना ‘सनातन’कडून धमकी देण्याचे प्रकार घडले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वागळे यांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वागळे यांनी ही सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. गेल्या आठवड्यात सरकारने सर्वसाधारण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मला सुरक्षा पुरविण्यात येत असल्याचे सांगितले होते. मात्र, ही सुरक्षा ‘सनातन’ संस्थेच्या धमकीमुळेच पुरविण्यात येत आहे का, याबाबत सरकारकडून काहीही सांगण्यात आले नसल्याचे वागळे यांनी म्हटले. मला ‘सनातन’ संस्थेकडून धमक्या मिळाल्या आहेत. चार वर्षांपूर्वी मी सूत्रसंचालन करत असलेल्या कार्यक्रमादरम्यान ‘सनातन’चे अभय वर्तक नाराज होऊन अचानकपणे उठून गेले होते. याशिवाय, गेल्याच आठवड्यात ‘सनातन’चे मुखपत्र असलेल्या ‘सनातन प्रभात’मध्ये माझ्याविरूद्ध लेख छापून आला होता. या लेखातून मला इशारा देण्यात आल्याची माहितीही वागळे यांनी दिली.

    ReplyDelete
  63. निखिल वागळेंचे आरोप म्हणजे केवळ ‘स्टंट’ – सनातन संस्था

    सहानुभूती मिळवण्यासाठीच ते असे आरोप करताहेत, असे 'सनानत'चे वीरेंद्र मराठे यांनी म्हटले आहे.

    सनातन संस्थेकडून धमकी दिली जात असल्याचा पत्रकार निखिल वागळे यांनी केलेला आरोप म्हणजे केवळ ‘स्टंट’ असून, सहानुभूती मिळवण्यासाठीच ते असे आरोप करताहेत, असे सनानत संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. सनातन संस्थेने कधीही निखिल वागळे यांना कोणतीही धमकी दिली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
    दरम्यान, पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी रुद्र पाटील हा २००९ पासून संस्थेच्या कोणाच्याही संपर्कात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर पोलीसांनी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला सांगलीमधून अटक केली आहे. वीरेंद्र मराठे म्हणाले, निखिल वागळे कायम आमच्या संस्थेविरोधात लिहित असतात. कोणी जर त्यांचे ट्विटर अकाऊंट बघितले, तर दिसून येईल की ते आम्हाला दहशतवादीच समजतात. आम्ही त्याकडे कायम दुर्लक्ष करीत आलो आहोत. आम्ही त्यांना कोणतीही धमकी दिलेली नाही.

    ReplyDelete
  64. "पानसरेंना मुंबईला हलवण्यामागे षड्‌यंत्र"
    "ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना त्यांना मुंबईला हलविण्यात आले. त्यामागे मोठे षड्‌यंत्र होते. त्याचे सूत्रधार मुख्यमंत्रीच होते. त्यामुळे पानसरे हत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही स्वतंत्र गुन्हा नोंद करावा. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, सनातन संस्था, आरएसएसवर त्वरित बंदी घालावी, पुढील तपास सीबीआय किंवा एनआयए सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे व्हावा,‘‘ अशी मागणी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील व निवृत्त पोलिस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

    सध्याचे तपास अधिकारी संजयकुमार यांचा योग्य दिशेने तपास सुरू असल्याचेही मुश्रीफ यांनी या वेळी स्पष्ट केले.
    श्री. पाटील म्हणाले, "ऍड. पानसरे यांना मुंबईला हलवण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने व शासकीय रुग्णालयाचे डीन डॉ. रघुराज थोरात हे पानसरे कुटुंबीयांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. लवकर निर्णय घेण्याबाबत डॉ. थोरात यांच्यावर जे. जे. हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्यासाहेब लहाणे दबाव आणत होते. डॉ. लहाणे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला असे आदेश दिल्याचे सांगितले. राजाराम माने यांनीही नंतर शासनाकडून दबाव असल्याचे मान्य केले होते. असा दबाव आणून पानसरे यांना कारण नसतानाही मुंबईला हलवण्यात आले व त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. पानसरे हे शासनाच्या लेखी महत्त्वाची व्यक्‍ती होते तर त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात झाले असते. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस तासगावला आले होते; पण ते पानसरेंची विचारपूस करण्यासाठीही आले नाहीत. असे असताना पानसरेंना हलविण्याबाबत शासनाने एवढी तत्परता का दाखविली? हेच समजत नाही. एकंदर घटनाक्रम पाहता पानसरेंना हलवण्यामागे मोठे षड्‌यंत्र होते आणि त्याचे सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा देणे आवश्‍यक आहे.‘‘

    ते म्हणाले, "समीर गायकवाडला जुलैमध्ये एटीएसने अटक करुन चौकशी केली असती तर कदाचित डॉ. कलबुर्गी यांची हत्या टळली असती. ऑक्‍टोबर 2009 मध्ये गोवा येथील बॉंबस्फोट प्रकरणी फरारी असलेले सारंग कुलकर्णी, रुद्र पाटील, जयप्रकाश ऊर्फ आण्णा, प्रवीण लिमकर यांना पकडले असते, तर तेव्हाच सनातनचा पर्दाफाश झाला असता व डॉ. नरेंद्र दाभोलकर, ऍड. पानसरे यांच्या हत्या झाल्या नसत्या. कर्नाटक पोलिस समीर गायकवाड व सनातन संस्थेपर्यंत पोचतील व आपले पितळ उघडे पडेल या भीतीने महाराष्ट्र शासनाने गायकवाडला अटक करण्याची परवनागी दिली असावी, असे वाटते. सनातनच्या ठाणे व वाशी येथील स्फोटप्रकरणात विक्रम भावे व रमेश गडकरी या सनातनच्या दोघांना दहा वर्षे शिक्षा झाली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशभरात तेरा ठिकाणी बॉंबस्फोटाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या दोन्ही संघटनांवर बंदी घालावी.‘‘
    या वेळी नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, सतिश्‍चंद्र कांबळे, प्रा. सुनीता अमृतसागर आदी उपस्थित होते.

    नार्को चाचणी करा
    समीर गायकवाडला तीन महिन्यांपूर्वी ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याला जुजबी चौकशी करून सोडून दिले होते. आता त्याची नार्को चाचणी करणे आवश्‍यक आहे.
    समीरला पहिल्याच महिन्यात एटीएसने पकडले होते. त्याचवेळी एटीएसला या तपासापासून बाजूला ठेवा असे आपण सांगितले होते. सनातनचे नाव आल्यानंतर एटीएसचे प्रमुख हिमांशू रॉय यांची तातडीने तेथून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नवीन विवेक फणसाळकर यांची नियुक्ती झाली. त्यामुळे तपास दबला गेला. नंतर एसआयटीची स्थापना झाली. त्यांचा तपासही समीरपर्यंत गेला. तीन महिन्यांपूर्वी समीरचे नाव उघड झाले तरीही त्याला अटक झाली नाही. मंत्रालयातील वरिष्ठांनी अटक करण्यास विरोध केला. अन्य पैलू तपासण्याचे आदेश दिले. यावरून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, केल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

    ReplyDelete
  65. गोविंद पानसरेंच्या हत्येत रुद्र पाटील मुख्य आरोपी

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्थेप्रकरणी साधक रुद्र पाटील याला प्रमुख आरोपी घोषित करण्यात आले आहे. 2009 मध्ये मडगाव येथे झालेल्या स्फोटातील आरोपी असलेला पाटील या स्फोटानंतर फरारी आहे.

    सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या अटकेनंतर कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या तपासाला वेग आला आहे. पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समीर आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या चौकशीला सुरवात केली आहे. यात त्याच्या एका मैत्रिणीचासुद्धा समावेश आहे. समीरचे मोबाईल कॉल्स सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ इंटरसेप्शनला ठेवल्यानंतर त्यात अनेक महत्त्वाचे दुवे तपास यंत्रणांना मिळाल्याचे सांगण्यात येते. समीरच्या चौकशीसाठी मुंबईतून केंद्रीय तपास पथक (एनआयए) कोल्हापूरला गेले होते. या पथकाने समीरची चौकशीसुद्धा केली. यानंतर या तपासाला नव्याने वेग आला. आज तपास यंत्रणांनी समीरचा मित्र असलेल्या रुद्र पाटीलला या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून घोषित केले आहे. सांगलीचा रहिवासी असलेला रुद्र पाटील आणि समीर या दोघांनी काही काळ एकत्र व्यवसायसुद्धा केला होता. मडगाव येथे 2006 मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयएच्या वॉन्टेड लिस्टवर असलेल्या रुद्रविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीससुद्धा जारी केली आहे. स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा वापर करून केलेल्या गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे एनआयएने म्हटले आहे. या स्फोटात रुद्रसोबत असलेला त्याचा आणखी एक साथीदार सारंग अकोलकर ऊर्फ कुलकर्णी याचाही शोध तपास यंत्रणा घेत आहे.

    रुद्रचा चेहरा स्केचसोबत मिळता जुळता
    पानसरे यांच्या हत्येनंतर एसआयटीने दोघा संशयितांचे स्केचेस जारी केले होते. या दोन स्केचेसपैकी एक स्केच फरारी रुद्र पाटील याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेला आहे. यावरूनच रुद्रचा या गुन्ह्यातील सहभाग अधिक गडद होत असल्याचे पोलिस दलातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

    प्रेस क्‍लबने व्यक्त केली चिंता
    पोलिसांनी टॅप केलेल्या समीरच्या संभाषणानुसार सनातन संस्थेसह हिंदुत्ववादी संघटनांविरुद्ध वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे त्यांचे पुढचे टार्गेट होते, असे निष्पन्न झाले आहे. याशिवाय पत्रकार श्‍यामसुंदर सोन्नर यांनी त्यांच्या भाषणात कर्मकांडांवर टीका केल्यामुळे सनातन प्रभातमध्ये त्यांच्यावर "धर्मद्रोही‘ अशी टीका करण्यात आली. या दोघांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता प्रेस क्‍लब ऑफ मुंबईने चिंता व्यक्त केली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Just to be legally correct, these arrested people are not yet declared "AROPI". They are suspects. Once chargesheet is filed in the court then only they can be declared AROPI.

      Delete
    2. Amit, Rudra Patil is already "AROPI" in Goa blast! It is true that arrested peoples are suspects yet but according to police enquiry and prediction within few days they should be legally "AROPI".

      Delete
  66. 'मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्ववाद्यांच्या दबावाखाली येऊ नये'

    "पुरोगामी ढोंगी बाबांना खूष करण्यासाठी कुत्र्याचे माकड करू नका. खऱ्या गुन्हेगारांना सोडू नका; पण हिंदुत्वाला बदनाम करणाऱ्या सुपाऱ्या वाजवू नका...‘ अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या "सामना‘तील अग्रलेखामध्ये "सनातन‘ संस्थेची भलावण करण्यात आल्याचा निषेध पुरोगामी कार्यकर्त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणाचा दबाव होता का, हेही त्यांनी स्पष्ट करावे, तसेच यापुढे हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाखाली येऊ नये, असे आवाहन कॉम्रेड गोविंद पानसरे अभिवादन समितीने केले आहे.

    "सामना‘च्या अग्रलेखामध्ये पुरोगाम्यांच्या दबावाखाली "सनातन‘च्या साधकाला पकडण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला असून, "सनातन‘वरील बंदीची मागणी हास्यास्पद ठरवली आहे. चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मात्र या अग्रलेखाचा समाचार घेतला आहे. कॉ. प्रकाश रेड्‌डी यांनी याविषयी मत व्यक्‍त करताना सांगितले, " कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अनिष्ट रूढी, प्रथा आणि अंधश्रद्धेच्या विरोधात लेखन केले होते; मात्र, धर्मविरोधी असल्याचा चुकीचा प्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे. मुक्‍ता दाभोलकर यांनीदेखील या अग्रलेखावर प्रतिक्रिया व्यक्‍त केली असून, इतक्‍या महिन्यांनंतर पोलिस गुन्हेगारांपर्यंत पोचले आहेत. पोलिस आणि न्याययंत्रणा यामध्ये सर्व कार्यवाही करते आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार सत्तेवर आहे. खरा सूत्रधार सापडणे हा या तपासाचा गाभा असायला हवा, अशीच मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

    ReplyDelete
  67. समीर गायकवाडच्या जीवितास धोका?

    ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित समीर गायकवाडची सुरक्षाव्यवस्था आज वाढवली. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराशिवाय इतर सर्व दरवाजे बॅरिकेड्‌स लावून बंद करण्यात आले. महत्त्वाचे काम असल्याशिवाय कोणालाही जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होणार असून, त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण होणार आहे.
    संशयित आरोपी समीर गायकवाडच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी पोलिसांनी पहिल्यापासून प्रयत्न केले आहेत. सध्या पोलिस अधीक्षक कार्यालयात अनेकांची ये-जा असते. कोण कोणत्या कामासाठी आले, याची नोंद होतेच अशी नाही; तसेच अनेक जण पार्किंगमध्ये वाहन उभे करून अंतर्गत दरवाजातूनच कार्यालयात प्रवेश करतात. त्यामुळे कोण येऊन गेले, याची माहिती पोलिसांना मिळतेच असे नाही. त्यामुळेच आज दुपारनंतर पोलिसांनी कार्यालयातील पार्किंगजवळील प्रवेशद्वाराजवळ बॅरिकेड्‌स लावून बंद केले; तसेच मागील बाजूने असलेली दोन्ही प्रवेशद्वारेही पोलिसांनी बंद केली. संशयितांना कार्यालयात आणणे, सोडणे यासाठी हे दरवाजे केवळ पोलिसांसाठी उपयुक्त असल्यामुळे ही दक्षता घेतली आहे.
    दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस कोठडीतच समीर गायकवाडची चौकशी होत आहे. त्यामुळे या खोली क्रमांक दहासमोर साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त आहे. दुपारनंतर तोही वाढविण्यात आला. सध्या समीर गायकवाड पोलिस कोठडीत असल्यामुळे त्याची सुरक्षा ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळेच त्याच्या जीवितास कोणताही "सनातन" धोका होऊ नये, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे.

    ReplyDelete
  68. समीर गायकवाड निष्पाप असल्याचा दावा

    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला समीर गायकवाड हा सनातनचा पूर्णवेळ साधक असून, तो निष्पाप आणि निर्दोष असल्याचे रामनाथी - फोंडा येथील सनातन आश्रमाचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त वीरेंद्र मराठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

    सनातनद्वेष्ट्यांच्या दबावाखाली पोलिसांनी दोन कोटी कॉल नोंदीवरून सनातनच्या साधकाचा क्रमांक काढून, त्याला हेतूपूर्वक अटक केली असल्याचा दावा वीरेंद्र मराठे यांनी केला आहे. यापूर्वीही डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अनेक सनातन साधकांची चौकशी करण्यात आली होती, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे मराठे यांनी म्हटले आहे.

    पोलिसही समीर गायकवाड याला संशयित असल्याचे मानत आहे, त्यामुळे सत्य काय ते लवकरच बाहेर येईल, असे या पत्रकात म्हटले आहे. याप्रकरणी कायदेशीर बाजू हिंदू विधिज्ञ परिषद किंवा अन्य हितचिंतक वकिलांमार्फत मांडली जाईल, असे मराठे यांनी म्हटले आहे.

    ‘पोलिसांनी समीर गायकवाड याला थेट अटक करणे म्हणजे बनाव असून, एखाद्याला अटक केल्यानंतर चोवीस तास चौकशी केल्यानंतर पुढील चोवीस तासांत न्यायालयात हजर करावे लागते. त्यासाठी पोलिसांना काही तास बसून रिमांड घेण्यासाठी कागदोपत्री सोपस्कार करावे लागतात. मात्र समीर गायकवाड याला पहाटे अटक करून लगेच न्यायालयात हजर केले, म्हणजे कागदपत्रे आधीच तयार होती,‘‘ असा आरोप वीरेंद्र मराठे यांनी केला आहे.

    गायकवाड पती - पत्नीत गेली तीन वर्षे बेबनाव
    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेला समीर गायकवाड व त्याचे सर्व कुटुंब सनातनशी संबंधित असून, पूर्णवेळ साधक आहेत. समीर गायकवाड याचे रामनाथी - फोंडा येथील आश्रमात येणे जाणे होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

    समीर गायकवाड याची पत्नी गोव्याची असून, सासूरवाडीचे लोकही पूर्णवेळ साधक आहेत. साधारण 1998 पासून हे कुटुंब सनातनच्या कामाशी निगडित आहेत. समीर गायकवाड व त्याच्या पत्नीत गेल्या तीन वर्षांपासून बेबनाव असून पती - पत्नी विभक्त आहेत. हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोचले आहे. घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया सध्या सुरू असून, अंतिम टप्प्यात पोचली आहे. सध्या या दोन्ही कुटुंबांत संवाद होत नाही, अशीही माहिती मिळाली आहे.

    ReplyDelete
  69. Maza 7 varshacha mulgahi aata likhan karayache mhantoy....

    ReplyDelete
  70. संजय सर ,
    बरेच दिवसात आपल्या कविता वाचायला मिळाल्या नाहीत.
    आपल्या कविता काळजाचा ठाव घेणार्या असतात आत्ता एक कविता पहायला मिळाली .
    वाचून आनंद वाटला ,इतके उत्कट लिखाण कोणी केले असेल ?
    बलसागर भारत होवो
    विश्वात शोभुनी राहो॥

    हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
    राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥

    वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
    हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥

    हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
    ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥

    करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
    विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥

    या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
    हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥

    ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
    जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥

    कोण असेल हा अनामिक ?
    हा जर महात्मा गांधींचा खुनी असेल तर मग कवी आणि कवितेवरचा विश्वासच उडून जाईल

    ReplyDelete
    Replies
    1. Balsagar Bharat Hovo.........

      This poem was written by Sane guruji, not by Savarkar!

      Delete
    2. माहितीबद्दल अत्यंत आभार , साने गुरुजींची ही पण एक कविता छान आहे

      खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

      जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
      तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

      जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
      तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

      समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
      अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

      सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
      तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

      कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
      समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

      प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
      कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

      असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
      सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

      भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
      सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

      असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
      परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

      जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
      त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

      Delete
  71. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

    भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
    मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
    तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
    मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
    विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
    तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
    सागरा प्राण तळमळला

    शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
    भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
    गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
    जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
    ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
    तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
    सागरा प्राण तळमळला

    नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
    प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
    तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
    भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
    तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
    सागरा प्राण तळमळला

    या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
    त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
    मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
    तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
    कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
    सागरा प्राण तळमळला

    भारतरत्न लता मंगेशकर यांनी हे गीत का गायले असेल ? कोणाचे आहे हे गीत ?

    लता आशा उषा हृदयनाथ असे सर्व कुटुंबाने कुणाला श्रद्धांजली म्हणून हे गीत गायले असेल का ? का फक्त पैशासाठी तर नक्कीच गायले नसेल ?

    मला अशी एक ओळ जरी लिहिता आली असती तर ?

    परम पूज्य महात्मा गांधींच्या खुन्याने इतके सुंदर काव्य केले असेल ?

    ReplyDelete
  72. महात्मा गांधी आणि सावरकर एकमेकाना एकदाच भेटले सावरकर अस्पृश्य भोजने ब्राह्मणांबरोबर घालत होते त्यांचे विचार हे अजिबात मनुवादी नव्हते त्यानी तर गायींची पैदास करून त्यांचा उपयोग आहार म्हणून करावा असे प्रतिपादले होते . ते गायीला गोमाता मानत नसत , सर्वोदयवादी लोकांचे याउलट होते . स्वतः महात्मा गांधी शेळीचे दूध आणि खजूर असे प्रस्थ करत आश्रम व्यवस्था प्रस्थापित करत होते . दोघांचेही ध्येय एकच होते , मार्ग वेगळे होते . एकाला अनंत यातना भोगाव्या लागल्या आणिदुसऱ्याला इंग्रजांचा पाहुणचार मिळत गेला आणि ते जणूकाही राजेशाही स्वातंत्र्यवीर ठरले एकदाही लाठी खावी लागली नाही
    चरखा आणि उपवास हे त्या काळात एक विनोदाचा भाग होऊन बसले होते .तुझे आहे तुजपाशी नाटक प्रसिद्धच आहे . गांधी आणि नेहरूंनी समाजावर अफाट मोहिनी घातली हे सत्य आहे. निःशस्त्र माणसाला निर्भयपणे परकीय सत्ते विरुद्ध उभे करणे फार फार अवघड असते , ते महात्मा गांधीनी शक्य करून दाखवले.
    भारतरत्न देण्या इतके सावरकर महान होते का हा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा आहे पण महात्मा गांधी हे भारतरत्न पदवीपेक्षा थोर होते हे नक्की !

    ReplyDelete
  73. माननीय लिहा वाचा ,
    लिहा वाचा यांनी नितीन सावंत यांचे जे लिखाण प्रसिद्ध केले आहे
    त्यात शेवटी जे म्हटले आहे त्याबद्दल फ्रीडम एट मिड नाईट या पुस्तकात अगदी स्पष्ट सावरकर आणि गोडसे हे समलिंगी संभोग करणारे होते अशा साधारणपणे अर्थाचा उल्लेख लेखकाने केला आहे आता याबाबत कोणाची साक्ष काढणार ?त्यातच लेडी माउंट ब्याटन आणि नेहरू यांचे काहीतरी प्रकरण असावे असाही उल्लेख आहे .
    असे लिखाण एकंदरीत किती विश्वासार्ह मानावे ? Dominique Lapierre and Larry Collins या लेखकांनी हे लिहिले आहे असे स्मरते .हे लेखक मुख्यत्वे फिक्शन लिहिणारे आहेत , ते इतिहासकार असे स्वतःला म्हणवून घेत नाहीत , त्यामुळे त्यांचे लिखाण किती महत्वाचे मानायचे ?लिहा वाचा हे अत्यंत जबाबदार लिहित असतात , त्यांनी जर असे दाखले दिले तर मग आम्ही कोणाला विश्वासार्ह मानायचे ? लिहावाचा हे अतिशय अभ्यासपूर्ण लिहित असतात . ते याचे उत्तर देतील असे वाटते .

    ReplyDelete
  74. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  75. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  76. माहितीबद्दल अत्यंत आभार , साने गुरुजींची ही पण एक कविता छान आहे

    खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

    जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
    तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

    जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
    तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

    समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
    अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

    सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
    तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

    कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
    समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

    प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
    कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

    असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
    सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

    भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
    सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

    असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
    परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

    जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
    त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

    ReplyDelete
  77. आप्पा - आपल्याकडे कुंभ मेळ्याचे शेवटचे शाही स्नान झाले ,
    बाप्पा - मला वाटत होते कुणीतरी यावर लिहील पण कुणीच काहीही लिहिले नाही
    आप्पा- इथे शैव वैष्णव असे सर्व हजर असतात , देवेंद्र साहेबांनी कैलास मानस सरोवराचे पाणी थेट त्र्यंबकेश्वर ला आणून अर्पण केले
    बाप्पा - हे बरे केले कारण जोशी सरांसारखे गणपतीला दुध पाजत बसले नाहीत हे आपले नशीब !
    आप्पा - पण काय रे , यावेळेस संजयने लिहायला हवे होते की नाही , कुंभमेळा हा कसा मोजेन्जो दारो पासून सुरु झाला ,मग त्यात अनादि काळापासून शैव पंथ कसा मुख्य होता आणि वैदिकांनी त्यात कसा घोळ घालत हा प्रकार अवैदिक असून तो वैदिक करून टाकला वगैरे वगैरे
    बाप्पा - नाही रे , त्र्यंबकेश्वरी कोण काय आहे ते समजतच नाही , आपण गेलो होतो आठवतंय ?, पण कोण शैव कोण वैष्णव काहीच समजत नाही , सर्वच नंगे आणि दाढीवाले , नुसतीच दाढी आत ऋषीच नाही , अशी अवस्था आणि सगळ्यात जास्ती गांजा खपला म्हणे या सिझनला ,
    आप्पा - नक्कीच सनातन्यांनी पळवला असणार हा गांजा फुकटात ! मला एक दिसला चष्मेवाला तिथे ! त्याला विचारले की तुम्ही कुठले ? म्हणे वरुडचे आम्ही !- मग तुम्ही आमच्या संजय सोनावणीना ओळखता का ? तर म्हणाला , म्हणजे काय ? त्याना कोण ओळखत नाही ? ते तर यातले माहीर आहेत . तिकडे साधुग्रामात आहे बघा मुक्काम त्यांचा ,इतिहास संशोधन करताहेत सध्या ,भेटायचे असेल तर सकाळीच भेटा !मणजे नीट बोलणे होईल .
    बाप्पा - त्याना ओळखू कसे आम्ही ? तर म्हणे - अगदी सोपे आहे . गळ्यात मोबाईल अडकवलेला असतो आणि दुसऱ्या दोरीत चिलीम असते , पण रिकामी , समजा , नक्की तेच तुमचे संजय सर ओ के ?
    आप्पा - ते इथे काय करत असतात ?
    बाप्पा - ते एक फॉर्म भरून घेतात , चिलीम आणि शैव पंथ यावर संशोधन करत आहेत , त्यांच्या मते हा वारसा आर्यांचा आधीपासून इथे आहे , अवेस्तात त्याचे वर्णन आढळते आणि वैदिकांनी हा वारसा हड्डप्पन लोकांकडून घेतला
    आप्पा - संजयला म्हणे हरप्पण चित्र भाषासुद्धा समजू लागली आहे - म्हणे त्याकाळात एका पुडीचा गांजाचा भाव एक गुंज इतका होता - एकाचे पाच पुड्यांचे बिलही संजयला उत्खननात सापडले आहे त्र्यम्बकेश्वरात राहुटीपाशी !
    बाप्पा - पेड असा शिक्का पण आहे म्हणे त्यावर . कमाल आहे संजयची , किती गुणी आहे हा थोर इतिहास संशोधक ! त्याचे चीज झाले पाहिजे इथे आपल्या महाराष्ट्र देशात !
    आप्पा - अरे ते बिल इ स २०१५ असे होते , त्यात इस आणि २०१५ च्या मध्ये पू घुसवून ते इसपु कोणी केले ? संजयने का वैदिकांनी ?
    बाप्पा - संजयला तिथे एक इसपू ५५०० चे पेंटिंग पण सापडले आहे , त्याचे म्हणणे की त्या चित्राप्रमाणे त्याकाळी जशी चिलीम भरली जात असे तशीच आजही कुंभमेळ्यात चिलीम भरली जाते , कमाल आहे आपल्या परंपरा प्रीयतेची !
    आप्पा - धन्य ते नागा साधू आणि धन्य ती ती चिलीम .
    बाप्पा - संजय सर , आपले ते संशोधन सर्वांसमोर ठेवा लवकर .

    ReplyDelete
    Replies
    1. हा अप्पा बाप्पा नेहमीच तालिबानी गांज्याचे कौतुक करत असतो, हा काय अफगाण- पाकिस्तानातून सोमरस घेऊन इथे कुंभमेळ्यात शेन खायला येतो का? ह्याने मला आधी अग्रसेन भवनवर पाचशे रुपयात गांजा ओढायचे आमंत्रण दिले होते. आणि आत्ता परत त्याचे तालिबानचे गांजा कौतुक काढून लोकांच्या डोक्याचा संडास करतोय. तुझा नाव पत्ता दे तुला आधी आंटी नार्कोटिक्स दिपार्त्मेंतला सांगून गांजा काय असतो ते समजावून सांगतो. ह्याने तर कुंभमेळ्यात किती गांजा खपला होता हे सांगून देशाची लाखो करोड रुपयाची एक्सैज ड्युटी बुडवली. त्यापेक्षा साखर सम्राट तरी लोकांना दारू पाजून सरकारला उत्पन्न मिळवून देतात, पण हा अप्पा बाप्पा नुसता गांजा गांजा करून गाजावाजा करत असतो म्हणजे ह्याचे मोठे गन्जाविक्रीचे तालिबान पुरस्कृत नेटवर्क आहे त्याची तो इथे फुकट जाहिरात करत असतो. अप्पा बाप्पा तुला मी गेल्या वेळीच तुख्या थोबाडावर उर्फ धुन्गानावर सांगितले होते कि मी अग्रसेन वर येतो तू तिथे तुझा ५०० रु चा माल घेऊन ये. पण हा गन्डीने खाणारा तिथे आला नाही, आणि आता परत तेच तेच गन्ज्याचे सांगून देशाची वाट लावतोय. ह्याला आधी अंदमान निकोबारच्या हद्दीतून सुद्धा बाहेर काढून टाका कारण असल्या घाणीची आपल्या देशातून बाहेर काढून फेकून द्यायची वेळ आली आहे.. हा उघड उघड गांज्याची भाषा करतो, एच रे तू आणि पत्ता दे.. तुझ्या सगळ्या पुड्या तुझ्याच **** मध्ये घन्ळून तुला तालिबानला हाकलतो आम्ही...

      Delete
  78. सनातनवादी म्हणजे काय?

    देवा-धर्माच्या नावाने सामान्य जणांना फसवून लुबाडणारे, जुनाट खुळचट चालीरीतींना चिटकून बसलेले, वेदांना प्रिय मानणारे, भ्रष्ट मनुस्मृतीचा गौरव करणारे, समाज सुधारणेला बाधा आणणारे, हिंसेला प्रवृत्त करणारे, परधर्मीयांबद्दल आकस निर्माण करणारे, जातीवर्चस्वाचा टेंभा मिरविणारे, प्रसंगी बॉम्ब स्फोट करणारे, तथाकथित धर्मांध लोक!

    ReplyDelete
  79. गोडसेवादी म्हणजे काय?

    कशाचीही पर्वा न करणारे, धर्मांध विचाराने प्रेरित होऊन, अहिंसक महामानवांना जीवनातून उठविणारे हिंसक, भ्रष्ट बुद्धीचे माथेफिरू लोक!

    ReplyDelete
  80. पुरोगामी म्हणजे काय?

    विवेकी, बुद्धिवादी विचार करणारे, वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारलेले, देवा-धर्माच्या पलीकडे गेलेले, समतावादी सहजीवन जगणारे, समाजात नैतिकतेने वागणारे, समाजातील अंधश्रद्धांना मुठ-माती देण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे, प्रामाणिक लोक!

    ReplyDelete
  81. सनातन या संस्थेवरील बंदीसंदर्भात पूर्वीच्या सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी त्याचा निर्णय झाला नाही म्हणून आताच्या सरकारने गप्प बसू नये. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जनतेची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.
    ते म्हणाले, यापूर्वीच्या आघाडी सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता; पण त्यावळी त्यास मंजूरी मिळाली नव्हती. अर्थात त्यामुळे आताच्या सरकारने याबाबत गप्प बसू नये. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. सनातनवर बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा. अशा संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील नसला तरी जनतेच्या मागणीचा रेटा आहे. जनतेच्या भावना त्यांनी केंद्र शासनापर्यंत पोहोचवाव्यात.
    कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणी पोलीस तपासाचे काम करत आहेत. ते जनतेचे आणि सरकारचे सेवक आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर आमचा विश्‍वास आहे. मात्र, त्यांच्यावर येणारा कोणताही दबाव आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
    बंदीसाठी सह्यांची मोहीम
    सनातन संस्थेवर बंदी घालावी या मागणीसाठी शहीद कॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्यावतीने आजपासून एक लाख सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. शिवाजी पुतळा येथे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरवात करण्यात आली.
    दबाव आणू नये म्हणून मॉर्निंग वॉक
    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येस रविवारी सात महिने पूर्ण झाले. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव येता कामा नये आणि सनातन संस्थेवर बंदी घालावी या मागासाठी शहीद कॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्यावतीने पानसरेअण्णांच्या घरापासून शिवाजी विद्यापीठ या मार्गावर ‘मॉर्निंग वॉक’ करण्यात आला. पानसरे यांचा दररोजच्या ‘मॉर्निंग वॉक’चा हा मार्ग होता. यामध्ये पानसरे कुटुंबातील सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    ReplyDelete
  82. सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव आघाडी सरकारकडून केंद्राकडे आला नव्हता. माझ्या नजरेला प्रस्ताव पडला असता आणि तो योग्य वाटला असता तर संबंधित संस्थेवर बंदी आणण्यात कोणतीही अडचण नव्हती. मात्र प्रस्तावच आला नाही, त्याला मी काय करू? अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन वरील प्रस्तावासंबंधी केलेल्या विधानाचे खंडन सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. शिंदे खासगी दौऱ्याच्या निमित्ताने कोल्हापुरात आले होते. पत्रकारांनी बोलताना ते म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी आयुष्यभर कामगार, गोरगरिबांच्या प्रश्‍नांवर लढा दिला. त्यांच्या रूपाने कामगार नेता गमावला. जाती-धर्माच्या नावाखाली अशा हत्या होणे अयोग्य आहे. केंद्र सरकारने या विरोधात कडक धोरण स्वीकारायला हवे. 2011 मध्ये मी केंद्रीय गृहमंत्री नव्हतो. 2013 ला मला हे पद मिळाले. गृहमंत्रालयाकडे राज्यातून अनेक कागद येत असतात. सगळ्याची कागदांची माहिती घेणे शक्‍य नाही. महाराष्ट्र शासनाने सनातन वरील बंदीचा प्रस्ताव पाठविला असता तर तो माझ्या नजरेस निश्‍चितपणे आला असता. प्रस्ताव योग्य असता तर बंदी घालायलाही काही हरकत नव्हती. मात्र असा प्रस्ताव आला नाही तर करायचे काय?‘

    ‘दहशतवाद हा दहशतवाद असतो. तो हिंदूही नसतो आणि मुस्लीमही नसतो, त्यामुळे कुणाचे समर्थन आणि विरोध करण्याचा प्रश्‍नच येत नाही. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाड यास अटक केल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनवरील बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्याचे म्हटले होते,‘ असा प्रस्ताव नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

    ReplyDelete
  83. आप्पा - संजय सरांचा विचार वन वल्ड वन नेशन आणि आजचे मोदींचे युएन मधले भाषण यात संजय सरांबद्दल आदर वाढविणारे अनेक मुद्दे होते
    बाप्पा - वसुधैव कुटुंबकम हा विचार मांडून त्यांनी वैदिक ग्रंथांतील वचने उधृत करून लोकांची मने जिंकली . मोदी खरेतर ओबीसी गटातील असूनही संघाचा परिस स्पर्श झाल्य्याने त्यांचे बोलणे फार वागणे वेगळे वाटते मोदिनी हिंदीत भाषण केले हेपण विशेष कौतुकास्पद आहे.
    आप्पा - काँग्रेस सरकारने कोणाच्या शिफारशीमुळे सनातन वर बंदी घातली नाही ते कुऱ्हाडे सर सांगतील का ? परमपूज्य दाभोलकर आणि वंदनीय पानसरे यांच्या हत्येस जे जबाबदार असतील ते अजून समाजात वावरत आहेत ते कसे ?आत्ता पर्यंत पोलिसांनी केलेल्या कामाचा अभ्यास करून तो जनतेसमोर ठेवला तर जनता निराश होणार नाही
    बाप्पा - सध्या समाजात अशा हत्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे , त्यासाठी देवेन्द्रजीनी निवेदन करणे अपेक्षित आहे आता हजारो दाभोलकर आणि पानसे तयार होऊन आपले समाज उन्नतीचे काम नेटाने जागते ठेवतील हे नक्की , आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे

    ReplyDelete
  84. ह्यांचे हिडीस आदिम विचार किती महान आहेत आणि त्याचे आपल्या आजच्या सुसंकृत जीवनाला किती त्रास होतात ते बघा!!
    दैनिक सकाळ अति सोवळ्यात राहणारे वृत्तपत्र काय म्हणते ते बघा, http://festivals.esakal.com/moraya/pauranik_utpatti.aspx
    गणपती ही मूळची आर्येतर देवता असल्याबद्दल बहुतेक संशोधकांचे एकमत आहे. काही आर्येतर, गण किंवा समूह हत्तीची पूजा करीत आणि त्या पूजेतूनच गणेशपूजा विकास पावली असा एक मतप्रवाह आहे.या मतप्रवाहानुसार गणेश ही प्रथम आर्येतरांची एक ग्रामदेवता होती.
    तशा प्रकारच्या इतर देवतांबरोबर ती खेड्यात एखाद्या झाडाखाली असे. तिचे पूजक तिच्यापुढे नरबळी देऊन त्या रक्ताचा तिच्यावर अभिषेकही करीत असावेत अशीही एक शक्‍यता आहे. आजही गणेशाला सिंदूरचर्चन केले जाते.
    https://www.facebook.com/sanjay.sonawani.5?ref=ts&fref=ts
    http://sanjaysonawani.blogspot.in/2013/09/blog-post_7.html
    गणपती ही मूळची वैदिकेतर देवता आहे याबाबत पाश्चात्य व भारतीय विद्वानांत जवळपास एकमत आहे व ते सिंधू संस्कृतीत गणेशाचे भौतिक अस्तित्व सापडले असल्याने यथायोग्यही आहे. काही वैदिकेतर गण (मानवसमूह) हत्ती हे आपले देवक मानत असत. टोळी नृत्य व धार्मिक कार्यक्रमांच्या प्रसंगी गजमुख असलेले मुखवटे घालण्याची चाल त्यांच्यात होती. गजमुखाची शिल्पेही देवकप्रथेतून निर्माण झाली. या गजमुखाला पुरातन काळी नरबळी दिला जात असे.
    आता ह्या आदिम लोकांचा जंगलीपणा आणि बुद्धीच्या दिवाळखोरपणा व ह्या वरील लोकांनी त्याचे मांडलेले कौतुक वाचून हसावे कि रडावे हेच काळात नाही. बहुतेक मला तर असे वाटायला लागले आहे कि भाद्रपद महिन्यात जसे श्वानांचे ऋतू चक्र आणि यौव्वन काळ असतो तसा ह्या आदिमपशुसम लोकांचा हाच समागम काळ होता आणि तारुण्य उन्मेदानाने हे लोक एकमेकांची डोकी फोडून नरबळी देऊन व श्वानासम माडीवर हक्क मिळाला कि साजरा करत असेत कि काय हे ह्याचा आजचा धुमाकूळ बघून वाटते आहे. फारच घाण. असलीच कामे करायची असतील तर ह्यांना राखीव जंगले द्यावीत तिथे जावून ह्यांनी येठेच्च घुमाकुल घालावा आणि नरबळी द्यावेत. इथे मुंबई पुणे शहरात हे १० दिवस कोणी वृद्ध आजारी उपचाराविना घरात मरेल. बाहेर जाऊन मारण्यापेक्षा इतकी गर्दी आणि घाण, शिवाय पोलिस लोकांना फुकात ह्या संस्कृती रक्षणाची जबाबदारी, आणि गल्ली गुंडांची अरेरावी सहन करावी लागले. गल्लीतले गर्दुले, घाबडे व्यापारी ह्यांची नुसती पैसे उधळायची आणि गोळा करायची स्पर्धाच लागते ह्या भादव्यात. अरे हा देश आहे का तालिबान का जंगल?
    ह्या अनार्य सांस्कृतिक दहशद्वादाचे अनुमोदन हे लेख लिहिणारे लोक करतात हे किती दहशतवाडी विचाराने बरबटले आहेत..
    ह्यांना त्रास होतो कि चराऊ राने कमी झाली म्हणून शेळ्या मेंढ्या कमी झाल्या, पण हे आधीपासून शेळ्या मेंढ्यांना आपल्या अपत्याप्रमाणे मोठे करून ठेवत होते, शेवटी त्याच्या गळ्यावर सुरी चालवल्या विकतच होते.. आत्ता कशाला ह्यांना पशुपालनाचा कळवला येतोय? तुम्ही जे केले तेच निसर्ग तुमच्या बरोबर करतो, तुमच्या पेक्षा सव्वाशेर आला तो तुम्हालाच जगायला अवघड करतोय. धनगर हा कृतज्ञ नव्हता तर तो एक जंगली माणूस स्वार्थी भावनेने पशूंना आपल्या फायद्यासाठी वापरात होता ह्या जंगली माणसाने उगाच आता पशुपती बनायचा आव आणून मेंढीचे कातडे पांघरून शेळ्यांच्या कळपात घुसायचा प्रयत्न करू नये. नाहीतर गायराने अजिबात शिल्लक राहणार नाहीत, तिथे मोठ्ठे टोवर उभे राहतील.

    ReplyDelete
  85. पानसरे आणि दाभोलकर यांच्या विचारांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आकार घेत होती या चळवळीचे अमाप नुकसान झाले आहे आपण सर्व ब्लोग वाचक या चळवळीच्या मागे उभे राहिले पाहिजे कुरहाडे सर अप्पाबप्पा आणि सौस्नेह्प्रभाकाकू यांच्या विचार मांडणीच्या शैलीने मनात विचारांचे वादळ सुरु होते , आणि मिस पाटसकरताई यांच्या टवटवीत लेखनाने उत्साह वाढतो पाटसकर सर तडाखेबंद लिहून त्यांचे मन मोकळे करतात वाचा लिहा हे सर्व समावेशक विचार मांडत नेमके गुणदोष दाखवतात , आपण सार्वजन ईश्वराकडे प्रार्थना करुया की समाजातील अंधश्रद्धा नाश होऊन आपला समाज समतेच्या वाटेने सनी अहिंसेच्या वाटेने प्रगती करो

    ReplyDelete
  86. गणेश उत्सव हा एक सामाजिक एकता वाढवणारा सामाजिक उत्सव आहे . तिथे वैदिक सोवळे ओवळ्याचे अवडंबर नसते हा एक आनंद उत्सव असतो सर्वाना त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
    आपण डॉ दाभोलकर आणि कॉ.पानसरे यांचे या निमित्ताने पुण्य स्मरण करून अंधश्रद्धेचे निर्मुलन करण्याचे व्रत घेऊया ! हिंसेवर अहिंसेने विजय मिळवू या !

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...