Saturday, October 17, 2015

संघर्ष शेवटी स्वत:शीच असतो!

प्रत्येकजण आपापल्या स्थितीचे अपत्य असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा धनी असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा गुलामही असतो
प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा अनिवार्य बळी असतो...
संघर्ष कोणाचा कोणाशीही वाटत असला
तरी प्रत्येकाचा संघर्ष शेवटी स्वत:शीच असतो!

. . .

दांभिकांचा, सोयधरू लोकांचा सुळसुळाट जेंव्हा कोणत्याही समाजात होतो तेंव्हा हे निश्चित समजून चालावे कि त्या समाजाचा विनाश अटळ आहे.
बाकी सारे अरण्यरुदन आहे.

. . .

बामसेफ अथवा तत्सम संघटनानी पसरवलेल्या अविचारी, अनभ्यासी, सांस्कृतिक अज्ञानातून, आमचे लोक सोडा, विचारवंतही जोवर बाहेर पडत नाहीत, निरपेक्षपणे आपली भुमिका निश्चित करत नाहीत तोवर ते ज्यांच्यासाठी काम करतो असा आव आणतात त्यांचेच वैचारिक वाटोळे करत राहतील यात शंका नाही.
असे पुरोगामी म्हणवणारे समाजाला प्रतिगाम्यांएवढेच विघातक आहेत. कारण यांना ना धड आगा ना धड पीछा ...काही माहितच नाही....किंवा जे मानायचे ते केवळ सोयीचे ...म्हणून हे वारंवार पराजित होतात.
आज भारतात जर प्रतिगाम्यांचा, तात्पुरता का होईना, विजय होत असेल तर त्याला तेवढेच जबाबदार हे तथाकथित निर्बुद्ध पुरोगामी आहेत...
कारण प्रतिगाम्यांएवढीच निर्बुद्धपणची बीजे त्यांनीही रुजवून ठेवलेली आहेत...
आणि म्हणुनच आज "पुरोगामी" हा शब्द शिवीसारखा बनला आहे...याचे भान यांना येत नाही हे अधिकचे दुर्दैव आहे!

. . .

मुळात माणसाला देवा-धर्माची मानसिक गरज का भासते या प्रश्नाच्या मुळाशी भिडल्याखेरीज देव-धर्माविरुद्धचा पुरोगामीपणा हे अवघे थोतांड आहे हे समजुन चालावे.

. . .
वातावरणातील दाटून आलेला उन्माद सामान्य जनतेलाही भयभित करून सोडत आहे.
उन्माद्यांच्या झुंडी सावजांच्या शोधात आहेत.
विवेकी लोकांची जबाबदारी कधी नव्हे एवढी वाढली आहे.

. . .

आपल्याला आजचे आहे ते ज्ञान आत्मसात करत भविष्यकालीन ज्ञानाकडे जायचे कि भुतकालीन गहन अज्ञानाकडे जायचे याचा निर्णय आम्ही घेणार आहोत काय?
घेणार नसू तर आम्हाला कसलेही भविष्य नाही!

. . .

मागे अनंत काळ, विश्वाच्या जन्मापासून, पृथ्वीवर सूर्य उगवला...नितनियमाने मावळला आहे. जेंव्हा पृथ्वीवर पहिल्यांदा सूर्य उगवला असेल तेंव्हा तो पहायला मानवजात अस्तित्वातच नव्हती...
सूर्य पुढेही नितनेमाने उगवत राहील...सृष्टीच्या अंतापर्यंत...
पण तो पहायला पृथ्वीतलावर माणुस असेल कि नाही हा खरा प्रश्न आहे....!

. . .

1 comment:

  1. http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_22.html
    सर इथे आपण लिहिले आहे कि, "" शैव धर्माचा पुरातन काळ आपण सिंधू संस्कृतीपासून प्रत्यक्ष पुराव्यांनिशी पाहू शकतो. उत्खननांत असंख्य लिंगरुप प्रस्तरखंड आणि योनीनिदर्शक शाळुंखा सापडलेल्या आहेत""
    "" कालिबंगन (राजस्थान) येथे सापडलेले इसपू २६०० मधील हे शिवलिंग. हडप्पा येथेही शिवलिंग मिळालेले आहे. शिव-शक्ती यांची संयुक्त स्वरुपात पुजा सुरु झाल्याचा हा पुरातन पुरावा.""
    सर आता आपण दोघे मिळून ह्या सगळ्या शिवलिंगांची (म्हणजे हरप्पा येथे सापडलेले एक, कालीबंगा येथे सापडलेले १ व असंख्य शिवलिंगे आणि शाळुंका उर्फ योनिदर्शक प्रस्तरखंड) हे कुठे ठेवले आहेत ते जगाला दाखवून देऊ, त्यांची रेदिओ कार्बन -१४ हि त्यांचा काळ ठरवणारी चाचणी करून घेऊ. ते अधिकृत हडप्पा वाले साले काहीच फोटो देत नाहीत ह्या तुमच्या गोष्टींचे. त्यांचे आधी बुचं मारून ठेऊ. आणि मग आपल्या देशातील संघोट्या आणि त्यांच्या उठवळ पिल्लावालीची कशी वाजवायची ते तुम्ही माझ्यावर सोडा.. आणा-आणा लवकर ते सगळे पुरावे इकडे. पण साहेब, ते मर वत्स आणि ढवळीकर ह्यांच्या पुस्तकातील पाने अजिबात नको हो. अशाने हे संघोटे आपल्याच तोंडाला पाने पुसतील. कागदावर किती दिवस काढायचे आता आम्ही सुद्धा मोठे झालोय, आम्हाला नको का आता खरेखुरे! आणा-आणा लवकर. मी आहेच तुमच्याबरोबर. म्हणजे आले ना लक्षात. तुम्ही नका घेऊ मी आहे ना घायला.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...