Monday, January 4, 2016

वैदिक ब्राह्मण कोण आहेत?

वैदिक धर्मव्यवस्थेत ब्राह्मण हा अग्रगण्य वर्ण म्हणून ओळखला जातो. भारतीय समाजव्यवस्थेत या वर्णाने जसा सन्मान मिळवला तसेच जन्माधिष्ठित श्रेष्ठत्ववादाचे वर्चस्वही गाजवल्याचे आपल्याला दिसते. बहुतेक वैदिक धर्मग्रंथांत ब्राह्मण अपरंपार ब्राह्मण माहात्म्य आपल्याला दिसते. अठराव्या शतकानंतर मात्र ब्राह्मणविरोधी लाटही उठल्याचे दिसते. आर्य वंश सिद्धांताच्या वर्चस्वाखाली आपण बाहेरचे, भारतावरील आद्य आक्रमक, एतद्देशिय असंस्कृतांना आपली संस्कृती व भाषा देणारे अशा समजापोटी वांशिक भेद करवून घेतल्याने एक सांस्कृतिक संघर्षही त्यांनी सुरु केला. त्यामागील कारणे वगैरेंचा येथे विचार करण्याऐवजी आपण भारतातील ब्राह्मणांचा इतिहास समजावून घेण्याचा प्रयत्न करुयात.

ऋग्वेदकाळात ब्राह्मण हा वर्ण नव्हता. ब्रह्म या शब्दाचा वैदिक संस्कृतातील अर्थ "मंत्र" अथवा "स्तोत्र" असा आहे. जो मंत्र अथवा स्तोत्र रचतो तो ब्राह्मण एवढाच ब्राह्मण या शब्दाचा अर्थ होता. थोडक्यात वैदिक मंत्र ज्यांनी रचले तेवढेच ब्राह्मण येथे अभिप्रेत होते. ऋग्वेदकाळात ब्राह्मण हा जन्माधिष्ठित वर्ण बनलेला नव्हता त्यामुळे मंत्रकर्त्या ब्राह्मणाची मुले मंत्रकर्ती नसतील तर ते ब्राह्मण नव्हेत. पुढे वेदरचना संपल्यानंतर वेदाधारित यज्ञकांडाला अधिक शिस्त आली. मंत्रांचा उपयोग यज्ञादी धार्मिक कर्मकांडात करणारा वर्ग पुढे विकसीत झाला. त्यासाठी वेदाध्ययन व पाठांतर आवश्यक होते. हे काम तसेच यज्ञांचे विधान समजावून घेणे किचकट होते. या गरजेपोटी जो वर्ग वेदाध्ययनाकडे वळाला तोही स्वत:ला ब्राह्मण म्हणवून घेऊ लागला. पुढे ब्राह्मण हा वर्ण जन्माधारित बनत गेला. यज्ञाभोवती गुढतेचे वलय निर्माण करण्यात यश आल्याने वैदिक धर्मसंस्थेत ब्राह्मणांना अननयसाधारण महत्व मिळाले. त्यांच्या उपजीविकेची सोय लावण्याचे कार्य अर्थात राजे व धनाढ्यांवर आले. अर्थात या वर्णावर उपजिविका कशी करावी यापासून ते जीवनआचार व्यवहारांवरही खूप बंधने आली. पण हे खूप नंतर घडले. तो प्रवास पाहणेही रोचक ठरेल.

उपनिषदांमधील ब्रह्म व वेदामधील ब्रह्म या शब्दांचे अर्थ एकच नव्हेत. वेदांतील ब्रह्म या शब्दाचा अर्थ मंत्र असा होतो हे आपण पाहिले. उपनिषदांत मात्र "ब्रह्म" हा शब्द मंत्र  म्हणून येत नसून आध्यात्मिक गुढार्थाने, चिद्शक्ती किंवा विश्वनिर्मितीमागील एक चैतन्य अशा अर्थाने येतो. "ब्रह्म" जाणतो, म्हणजे ब्रह्मविद्या जाणतो तो ब्राह्मण नव्हे तर उपनिषदकाली ब्रह्मविद्येला जन्म क्षत्रियांनी दिला असे छांदोग्य उपनिषदात प्रावाहण जैवालीने स्पष्टपणे म्हटलेले आहे. काही लोकांनी ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असा अर्थ लावला असला तरी ते खरे नाही.

उदा. महाभारतातील व्याख्येनुसार- " जातकर्मादी संस्कारांनी जो सुसंस्कृत झाला आहे, जो शुद्ध व वेदाध्ययन संपन्न आहे, जो षट्कर्मे करतो, आचरण शुद्ध ठेवतो, यज्ञ करून उरलेले अन्न जो भक्षण करतो, जो गुरुला प्रिय असतो ; नियमशील, सत्यनिष्ठ, दानशील, अद्रोही, दयाळू, सलज्ज, दुष्कृत्यांची घृणा करणारा व तपस्वी असतो, त्यालाच ब्राह्मण असे म्हणतात." (म.भा. शांतिपर्व १८९.२-४) ही व्याख्या उपनिषदांतील ब्रह्मशी सुसंगत नाही हे उघड आहे.

भारतात ब्राह्मण हा वर्ण कसा विकसित होत गेला हे आपण पाहुयात.

भारतात वैदिक धर्माचा प्रवेश विदेघ माथवाच्या व त्याच्या सहकारी-अनुयायांच्या माध्यमातून सरासरी इसपू १२०० ते इसपू हजार या काळात झाला. त्यांनी जरी पहिली वस्ती सिंध प्रांतात केली असली तरी त्यांना राजाश्रय मिळाला तो कुरु-पांचालांचा. शतपथ ब्राह्मणात ही प्राचीन दंतकथा जपून ठेवली असून त्यावरून यांची पहिली वस्ती सदानीरा नदीकाठी पानथळ परिसरात आधी झाली असे दिसते. शतपथ ब्राह्मणातील ही पुराकथा अशी : विदेघ माथव हा सरस्वती नदीच्या तीरावर राहत होता. आपला पुरोहित गौतम राहुगण आणि अग्नी सोबत घेऊन तो पर्वत (उत्तर गिरी) नद्या व अरण्ये ओलांडत सदानीरा नदीपर्यंत आला. आता कोठे वसायचे असे विचारल्यावर अग्नीने त्याला या नदीच्या पुर्वेकडे वसती कर असे सांगितले. (पहा शतपथ ब्राह्मण १.४.१, १४-१७) शतपथ ब्राह्मणाच्या या  पुराकथेवरून दक्षीण अफगाणिस्तानातील सरस्वती (हरक्स्वैती) नदीपासून कोणत्यातरी अज्ञात कारणाने (बहुदा राजकीय घडामोडींमुळे) वैदिक धर्मियांचा एक गट उत्तरगिरी (हिंदुकूश पर्वत) व अनेक नद्या जंगले ओलांडत एका नदीजवळ आले, तेथे वस्ती केली व त्या नदीला सदानीरा नदी हे नांव दिले. येथे काही काळ वसती केल्यानंतर त्यांना कुरुंनी राजाश्रय दिला.

येथे या वैदिक अनुयायांनी सर्वप्रथम मिळेल तेवढा वेद एकत्र केला व त्याची शिस्तबद्ध विभागणी केली. वेद पुर्वी एक लाख ऋचांची राशी होती असे विष्णू पुराणाने नोंदवलेले आहे. परंतु स्थलांतरामुळे सर्वच वेद या शिष्यांना सोबत आनता आला नाही. अनेक वेद शाखा (अथवा मंडले) राहुनच गेली. वेद व्यासांनी वेदांचे चार भाग केले व चार शिष्यांना (पैल, सुमंतू, वैशंपायन व व जैमेनी) हे करत असतांना त्यावर स्थानिक भाषांचे संस्कारही केले, यज्ञसंस्थेला काटेकोर रुप दिले. ब्राह्मण ग्रंथांचीही सुनियोजित मांडणी याच काळात केली गेली. पुढे धर्मप्रसारासाठी म्हणून वेदाच्या २७ पाठशाखा तयार करण्यात आल्या. यातील आता फक्त शाकल व बाष्कल शाखा उपलब्ध आहेत.

या काळाला आपण वैदिकांचा भारतातील आरंभ काळ म्हणू शकतो. या काळात वैदिक ब्राह्मणांत फक्त चार गोत्रे होती. हे आपण मुळचे वैदिक ब्राह्मण म्हणू शकतो. हे लोक कुरु-पांचाल प्रदेशात स्थायिक होते. कुरू राजांनी सर्वप्रथम वैदिक धर्माला आश्रय दिला असावा असे मत टी. एच. ग्रिफिथ (The Hymns of the Rig Veda, पहा प्रस्तावना) यांनीही व्यक्त केलेले आहे. मनुस्मृतीचे आद्य रुपही याच परिसरात उदयाला आले हे आपल्याला मनुस्मृतीत पहिल्याच अध्यायात दिलेल्या भुगोलावरून लक्षात येते.

कुरु राजांचे अथवा त्या परिसरातील काही राजांनी वैदिक धर्माला आश्रय दिल्याने स्वाभाविकपणे त्यांनी धर्मप्रचाराचे कार्यही हाती घेतले. या प्रचारात त्यांनी अनेक स्थानिक भारतीयांना वैदिक धर्मात घेत ब्राह्मण, काहींना क्षत्रीय व तर काहींना वैश्य करून घेतले. अगदी उत्तर भारतातील ब्राह्मणांमद्ध्येही भिन्न आनुवांशिकी दिसते ती या धर्मांतरामुळेच होय. ही प्रक्रिया आधी उत्तरेत सुरु झाली. द्रविड ब्राह्मण या प्रक्रियेत सर्वात शेवटी आले. त्यामुळे वैदिक धर्मावरही या धर्मांतरित स्थानिकांमुळे (वेदपुर्व शिवप्रधान मुर्तीपुजकांचा धर्म पाळणारे) खूप संस्कार झाले. विविध स्मृत्या निर्माण झाल्या त्या वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या प्रांतात. आचार-विचार बंधनांतील स्म्रुतींतील विधाने प्राय: विसंगत अथवा परस्परविरोधी येतात ती त्यामुळेच. पण ते पुढे.

या आरंभकाळात धर्मप्रसार व धर्मजतन हेच मुख्य हेतू वैदिक ब्राह्मणांसमोर असल्याने ब्राह्मण माहात्म्य वाढवत असतांना ब्राह्मणांवर असंख्य बंधनेही लादली गेली. "ब्राह्मण म्हणजे परम तेज व तप होय. ब्राह्मणांच्या नमस्कारामुळेच सूर्य दिव्य लोकात विराजतो..." (म. भा. वनपर्व, ३०.३.१६), "जे कृद्ध झाले असता अन्य स्वर्गादि लोक व लोकपाल निर्माण करू शकतात, जे देवांनाही शाप देवून मनुष्य योनीत जन्म घ्यायला लावतात, ज्याचा आश्रय धरून लोक व देव नेहमी आपल्या जागी स्थिर राहतात....." (मनुस्मृती, ९.३१५-१६), ब्राह्मण हा राजापेक्षा श्रेष्ठ असून राजाची त्याच्यावर सत्ता चालत नाही असे गौतमही (९.१) म्हणतो. असे ब्राह्मणांचे महत्व सिद्ध करत अन्य स्थानिक धर्मियांचे या धर्माबाबत व त्यातल्या त्यात ब्राह्मण वर्णाचे आकर्षण निर्माण केले. पण नवांगतूक वैदिक धर्म नियमांचे कटाक्षाने पालनही करतील यासाठी त्यांच्यावर  कठोर बंधनेही घातली. ती अशी:

ब्राह्मणाने सतत वेदाध्ययन करावे, एका दिवसाच्या गरजेपेक्षा जास्त धनसंचय करू नये, शस्त्रे हाते धरणे तर दुरच, त्याचे दर्शनही घेऊ नये, कसलाही व्यापार करू नये, राजद्रोक केला तर त्याला जलसमाधी द्यावी, गुरुपत्नीगमन-सुरापान असे गुन्हे केले तर मस्तकावर डाग देवून देशाबाहेर हाकलावे ई.

आरंभकालीन वैदिक स्वत:वर स्वत:हून बंधने घालतील ही शक्यता नव्हती. पण नवधर्मांतरीत लोक वैदिक धर्माशी अपरिचित असल्याने त्यांना धर्मात घेतांना, विशेषत: ब्राह्मण वर्णात घेतांना अशी कठोर बंधने घालणे त्यांना योग्य वाटले असल्यास नवल नाही. घुर्ये म्हणतात कि धर्मांतरीत वैदिक ब्राह्मण हे मुळच्या वैदिकांपेक्षा कडवे होते. कारण ही बंधने पाळण्यात त्यांना होणारे लाभही खूप होते. सर्वात मोठा लाभ म्हणजे प्रतिष्ठा.

 उपनयन

वैदिक धर्मात उपनयन हा अत्यंत महत्वाचा संस्कार मानला जातो. आरंभकाळात स्त्रीयांचेही उपनयन होत असे. पण याकडेही वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे. वैदिक धर्मात मुळात हा संस्कार नव्हता. उपनयन म्हणजे स्नातकाला आचार्याकडे शिक्षणासाठी पाठवणे अथवा आचार्याने त्याला पुन्हा गर्भात धारण करून नवीन जन्म देणे. दोनदा जन्म म्हनून वैदिक लोकांना द्विज म्हणतात. उपनयन संस्कारात जानवे (यज्ञोपवित)  घालणे व गायत्री मंत्राची दीक्षा घेणे हे महत्वाचे विधी आहेत. परंतू ऋग्वेदात कोठेही हा संस्कार येत  नाही. जानवे , तेही तृणांचे अथवा लोकरीचे बनवलेले यज्ञप्रसंगीच पुरोहित घालत म्हणूनच त्याला "यज्ञोपवित" म्हणतात. ते नेहमी घालणे आवश्यक नव्हते.

परंतू हा नंतर वैदिक धर्मातील महत्वाचा संस्कार बनला. याचे मुळ धर्मांतरितांसाठीच्या विधीत आहे. इतर धर्मियांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दर्शवण्यासाठी काही खुणांची गरज होती. जानवे ही महत्वाची खुण बनली. किंबहुना उपनयन संस्कार झाल्याखेरीज ब्राह्मण आजही ब्राह्मण बनत नाही. तो अन्यधर्मीय, म्हणजे शुद्रच, राहतो. ज्ञानेश्वर व त्यांचा भावंडांनी मुंजीसाठी संघर्ष का केला हे आपण यातून समजावून घेवू शकतो. याचाच अर्थ असा कि उपनयन हा मुळात धर्मांतराचा विधी होता. नंतर तो स्नातकाने गुरूगृही जाण्यापुर्वीचा विधी     बनवण्यात आला.

"उपनयन" या शब्दाचा अर्थच मुळात "जवळ घेणे, सन्निकट करणे" असा आहे आणि हा धर्मांतराचा पर्यायवाची शब्द आहे हे उघड आहे. ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य यांचे जानवे कसे वेगवेगळे असावे याचेही निर्देश वैदिक धर्मशास्त्रकारांनी दिले आहेत. थोडक्यात मुळात उपनयन विधी हा धर्मांतराचा विधी होता. आजही त्याचे स्वरूप, अर्थ वेगळा घेत जात असला तरी, बदललेले नाही. उपनयन न झालेल्या वैदिकांस "व्रात्य" अशीही संज्ञा एके काळी होती. व्रात्यांना वैदिक धर्मात स्थान नसे.
गोत्र
गोत्र म्हणजे या ऋषींच्या वंशातील माणसे. हा वंश जैविक असून अन्य गोत्र संस्थापकही यापैकीच कोणत्या ना कोणत्या ऋषीचे वंशज असून त्यांच्या नांवानेही गोत्रे निघाली आहेत. ही गोत्रे फक्त ब्राह्मण वर्णांना लागू असून क्षत्रीय व वैश्यांना ब्राह्मणांचीच गोत्रे दिली जातात. त्यांना स्वत:चे मुळ पुरुष नाहीत असा त्याचा एक अर्थ होतो. शुद्रांना गोत्र नसते कारण ते वेदबाह्य संस्कृतीचे लोक. पण आजकाल अनेक शुद्रांनाही आपली गोत्रे ब्राह्मण गोत्रांत शोधायची हौस असते असे दिसते.

बाराव्या शतकातील प्रवरमंजिरी या पुरुषोत्तम पंडिताच्या ग्रंथावरून दिसते कि ब्राह्मणांमद्ध्ये मुख्य फक्त सोळा गोत्रे होती. या जाती भारतात आलेल्या मुळ वैदिक आर्यांपैकी असाव्यात असे घुर्ये म्हणतात. (Gotra, पान २२८). पण महाभारतात मात्र प्रथम चारच गोत्रे (१-अंगिरा, २- कश्‍यप। ३- वशिष्‍ठ ४- भृगु ) होती असे सांगुन पुढे ती जमदग्नी, अत्री, विश्‍वामित्र आणि अगस्‍त्‍य यांची भर पडत आठ झाली असे उल्लेखले आहे. (महाभारत, शान्‍तिपर्व २९६ -१७ , १८ ) बौधायनही या आठच मुख्य गोत्रांचा स्पष्ट निर्देश करतो.

गोत्र संकल्पना मुळात ऋग्वेदात नाही. वेदकर्त्या ऋषीचे आनुवांशिकी जैविक वंश म्हणजे गोत्र हाही अर्थ बरोबर नाही. गोत्र म्हणजे खरे तर गायींचा गोठा. पाणिनी म्हणतो, ऋषीच्या पुत्रापासुन उत्पन्न होत गेलेल्या पुत्रांची शृंखला. (अष्टाध्यायी- ४.१.१७८). हा जैविक अर्थ नंतर आला असला तरी ज्या ऋषीच्या लोकांची सुक्ते पाठांतरीत ठेवीत, अध्यापन करीत अशा शिष्यांना त्या ऋषीचे गोत्र दिले जात होते असा अर्थ स्पष्टपणे काढता येतो. त्यामुळे सुरुवातीला बापाचे आणि मुलाचे गोत्र एक असण्याची शक्यता नाही. परंतू पुढे मात्र गोत्रेही वंशपरंपरागत (जन्माधारित) बनत गेल्याचे दिसते. यामुळेच क्षत्रीय व वैश्यांनाही ब्राह्मण गोत्रे (ऋषी मुळात ब्राह्मणही नव्हते कि कोणत्या अन्य वर्णाचे कारण वेद निर्माण होत असतांना जन्माधारित वर्णव्यवस्थाच अस्तित्वात आलेली नव्हती.) दिली जात होती हे उघड आहे. थोडक्यात गोत्र म्हणजे वंश नव्हे. ती एक भ्रामक समजूत आहे.

बाराव्य शतकापर्यंत केवळ १६ प्रमुख गोत्रे होती हे प्रवरमंजिरी सांगते. महाभारतात मुळात केवळ चार गोत्रे होती ती पुढे आठ बनली असे सांगितले आहे. पण पुढे गोत्रे ब्राह्मणांतही खूप वाढत गेली. आधीच्या धर्मांतरितांना एखाद्या वैदिक ऋषीचेच गोत्रनाम दिले जात असे. पण जसजसा धर्मांतरांचा विस्तार वाढला तसतसा ब्राह्मण वर्णातही गोंधळ सुरु झाला. आधी वैदिक धर्म कुरु-पांचाल व नंतर राजाश्रय मिळाल्याने गंगेच्या खो-यातही पसरला.

मुळात भारतात आलेले मुळचे वैदिक संख्येने अल्पसंख्य असल्याने त्यांनी आपल्यातीलच जवळपास २७ व्यक्तींना धर्मप्रसाराचे कार्य  दिले. हे प्रचारक इतरत्र पसरू लागले. परंतु उत्तर भारतात, कुरु-पांचाल व नंतर बिहार प्रांत वगळता त्यांना सहजासहजी बस्तान बसवता आले नाही. बालेय देश (महात्मा बळीच्या वंशजांची राज्ये, अंग, वंग, कलिंग ई.) वैदिक प्रचारकांना प्रवेशही करू देत नव्हते. दक्षीण भारत (विंध्याच्या पलिकडील प्रदेश) त्यांना माहितही नव्हता हे  शतपथ ब्राह्मण व मनुस्मृतीवरूनच दिसते.  अगस्ती (ऋग्वेदातील अगस्ती नव्हे) हा दक्खनेतील पहिला प्रचारक मानला जातो. सर्व पुराकथा या बाबीकडेच निर्देश करतात. वैदिक धर्माचा परिचय दाक्षिणात्यांना इसवी सनाच्या पहिल्या-दुस-या शतकाच्या दरम्यान झाला हे वि. का. राजवाडेंनी राधामाधवविलासचंपुच्या प्रस्तावनेत नोंदवलेले आहे.

एक येथे लक्षात घेतले पाहिजे, वैदिक आर्य आक्रमण वा निर्गमण सिद्धांत जरी गृहित धरला तरी तरी वरील विवेचनास काहीही बाधा येत नाही. कारण आक्रमक असले अथवा स्थलांतरीत तरी त्यांची मुळ संख्या ही कमीच होती. वैदिक आर्य भारतातीलच हा तलगेरींसारख्या पुनरज्जीवनवादी संशोधकाचा सिद्धांत खरा मानला तरी वरील मतांना बाध येत नाही. कारण वैदिक धर्म हरियाणात स्थापन झाचे ठाम प्रतिपादन आहे. त्या स्थापनेनंतर धर्म अन्यत्र पसरला असे त्यांचेच प्रतिपादन आहे. याचाच अर्थ असा कि धर्म प्रचारानेच पसरला हे कोणताही सिद्धांत गृहित धरला तरी अमान्य करता येत नाही.

घुर्ये म्हणतात कि वैदिक धर्मात अन्य विविध प्रदेशात राहणारे लोक घुसु लागले, त्यात ब्राह्मण वर्णात शिरणा-यांची संख्या अधिक होती. घुर्ये या लोकांना New recruits अशी संज्ञा देतात. ते म्हणतात कि अन्य प्रांतांतील ब्राह्मण आनुवांशिकी शरीररचना, चेहरेपट्टी व त्वचेचा रंग याबाबतीत एकमेकांशी कसलेही साम्य दर्शवत नाहीत, त्यामुळे ते मुळचे वैदिक आर्य होते असे म्हणता येत नाही. उलट एकाच प्रातातील ब्राह्मण मात्र त्याच प्रांतातील खालच्या जातीतील माणसांशी जास्त शारिरीक (आनुवांशिकी) साधर्म्ये दर्शवतात. म्हणजेच प्राचीन काळी त्या त्या भागातील लोक हे एकमेकांशे जैविक दृष्ट्या अधिकाधिक जवळचे असले पाहिजेत. आर्यपुर्व भारतियांचा वैदिक धर्मातील प्रवेश हेच यामागील कारण होय. (पहा- Caste and Race). एस. देवदास पिल्लै म्हणतात कि स्वत:ला ब्राह्मण म्हणवून घेणारे अनेक ब्राह्मण हे ना वैदिक कर्मकांडांचा गाभा जाणत ना त्यांना पुरोहितकार्याचे ज्ञान आहे, अनेक ब्राह्मण पोटजातींत ब्राह्मणांना एरवी निषिद्ध असलेल्या खाद्यप्रथाही आहेत. यावरून घुर्येंचे मत बरोबर वाटते. (Indian Sociology Through Ghurye, a Dictionary, By S. Devadas Pillai)

घुर्ये यांनी एपिग्राफिका इंडिका या ग्रंथात प्रकाशित दिडशे दानपत्रे (ताम्रपट व शिलालेक) यांचे विश्लेशन जे केलेय ते महत्वाचे आहे. या पटांत एकूण  ३१६१ ब्राह्मणांचा उल्लेख आहे ज्यांना जमीनी दान केल्या गेल्या. यात आसाम, राजस्थन व मध्यप्रदेश धरून उत्तर भारत, गुजराथ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू प्रांतांत दिल्या गेलेल्या दानपत्रांचा समावेश आहे. हे ताम्रपट/लेख इ.स. पाचव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंतचा कालातील आहेत.घुर्येंची निरिक्षणे अशी:

१) या दानलेखांत ज्यांना दान दिलेले अहे अशांची एकूण १२४ गोत्रे नोंदलेली आहेत. त्यातील ७७ गोत्रे ही अन्य प्रांतांत, अगदी निकटच्या प्रांतातीलही, लेखांतही पुनरोल्लिखित नाहीत.

२) फक्त १२ गोत्रे ही सर्व प्रांतात (वर उल्लेखलेल्या) सारखी मिळून येतात. त्या १२ पैकी भरद्वाज व कश्यप ही गोत्रे सर्वाधिक वेळा उल्लेखलेली आहेत. म्हणजे ही गोत्रे अधिक चलनात होती. ("Widest curency" त्यांचे शब्द)

३) या १२४ गोत्रांपैकी २१ गोत्रे ही गोत्र-प्रवरांची माहिती देणा-या समकालीन धर्मग्रंथात आढळून येत नाहीत.

४) छत्तीसगढ भागातील गोत्र-प्रवरे शंका प्रबळ करतात कि ही गोत्रे सर्वस्वी अनार्य (अवैदिक) परंपरेतून आलेली आहेत.

५) जुन्या काळातील ताम्रपटांत गोत्रे व प्रवरे यांची सांगड इतक्या चुकीच्या पद्धतीने घातलेली आहे कि जणू काही कोणी ब्राह्मण म्हणवण्याचा केवळ फायदा उचलण्यासाठी ती "बनवून" टाकलेली आहेत. (पहा, Gotra, डा. जी.एस. घुर्ये)

घुर्येंची निरिक्षणे खालील बाब अधोरेखित करतात.

१) भारतातील असंख्य ब्राह्मण उपजाती या मुळच्या वैदिक नाहीत.
२) अनेक मुळचे धर्मांतरीतही ब्राह्मण नसतांना बनावटगि-या करत ब्राह्मण बनले.
३) त्यामुळेच ब्राह्मण समुदायात विविध प्रांतांत आनुवांशिकी साम्य मिळत नाही.

(आर्य-अनार्य हे शब्द घुर्येंनी वापरले आहेत. या शब्दांना वांशिक रंग असल्याने वैदिक-अवैदिक या संज्ञा मी वापरल्या आहेत.)

वाचक सहजपणे माध्व ब्राह्मण, दीक्षितार, नंपुतीरी, ओडिया, चित्पावन, देशस्थ ब्राह्मणात शारिरिक तुलना करून पाहू शकतात. भारतीय संस्कृती कोशसुद्धा (खंड ६, पान ३२३) म्हणतो कि ब्राह्मण वर्णातील लोक एकवंशीय नव्हते. अनेक अनार्य तसेच द्रविडांनाही ब्राह्मणत्व दिले गेले. म्हणजेच त्यांचे धर्मांतर केले गेले. धर्म प्रचार करायचा तर हे स्वाभाविक होते.गुप्त राजांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिल्यामुळे वैदिक ब्राह्मण महत्ता वाढल्यावर त्या धर्मात जाण्याची प्रथा वाढली असू शकते.

येथे आपल्याला तीन प्रकारचे ब्राह्मण भेटतात. पहिले म्हणजे मुळचे वैदिक स्थलांतरितांपैकीचे, पण कालौघात येथील स्थानिकांत रक्तसंबंधाने मिसळून गेलेले ब्राह्मण. दुसरे म्हणजे धर्मांतरीत ब्राह्मण व तिसरे म्हणजे केवळ ब्राह्मण असण्याचे फायदे लाटण्यासाठी बनावटगि-या करत बनलेले ब्राह्मण. आरंभ काळातील ब्राह्मण हे आपल्याला कट्टर वैदिक दिसतात. त्यांच्या मुळच्या ग्रंथांत मुर्तीपुजेचा साधा उल्लेखही येत नाही. पण गुप्तकालोत्तर ग्रंथांत श्रौत-स्मार्त असे फरक दिसायला लागतात. कारण वैदिक धर्माला मुर्तीपुजा मान्य नसतांना, केवळ यज्ञ हे कर्मकांड निहित असतांनाही नंतर वैदिक झालेले काही प्रांतातील ब्राह्मण आपल्या मुळच्या पुजेलाही चिकटून बसले याचे कारण ते धर्मांतरित आहेत व मुळचे संस्कारही सोडू शकले नाहीत यात आहे. एका अर्थाने ते द्वैधर्मी ठरतात. म्हणजे एकीकडे ते  सर्व संस्कार वैदिक पद्धतीने करतात तर दुसरीकडे वेदांना निषिद्ध अशी मुर्तीपुजाही करतात. काही तर तेही न करता केवळ स्वार्थभावनेने जुन्या काळातच स्व्यंघोषित ब्राह्मण बनले आहेत. भुमिहार, सांचोरा, नंपुतीरी, चित्पावन वगैरे असे ब्राह्मण आहेत. घुर्येंनी जे ताम्रपट अभ्यासलेत ते  पाचव्या शतकानंतरचे, गुप्तकाळ व गुप्तकालोत्तर आहेत हेही उल्लेखनीय आहे. अर्थात  धर्मांतराची परंपरा उत्तरेत सर्वात आधी सुरु झाली. नंतर ती अन्य प्रांतात क्रमश: पसरत गेली असे एकंदरित प्रसाराचे जे टप्पे मिळतात त्यावरून दिसते.

वैदिक धर्म विरोधी बुद्ध-महावीर-चार्वाकादी गंगेच्याच खो-यात (बिहार) इसपू सहाव्या शतकात उदयाला आले कारण त्यांच्या काळात वैदिक धर्म तेथेच तेवढा प्रचलित होता. अन्यत्र नाही म्हणून त्याला विरोधाचे कारनही नव्हते. अन्यत्र हा धर्म जसजसा पसरत गेला तसतसे धर्म स्विकारणारे जसे मिळाले तसेच विरोध करणारे मुळ धर्माचे लोकही त्यांच्या विरोधात उभे ठाकले हे आपल्याला दुस-या तिस-या शतकानंतरच घडलेले दिसते.  कारण अन्यत्र प्रचार होण्याचा काळ याच्या एक-दोन शतके आधीचा.

गुप्त काळात वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला आणि त्यामुळे वैदिक धर्माचा तिसरा टप्पाही सुरु झाला. वैदिक धर्मात दक्षेण ते उत्तर भारतातील अनेक लोक दाखल होऊ लागल्याने स्मृत्यांतील बंधने सर्वांवर लादता येणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रौत व स्मार्त असे दोन गट वैदिक धर्मात पडले तसेच पंचद्रविड व पंचगौड असे प्रादेशिक दोन विभेदही पडले. श्रौत हे वैदिक धर्माच्या अधिक निकटचे तर  स्मार्त हे मुर्तीपुजक व अद्वैत सिद्धांतही मानणारे. आल्फ हिल्टेबिटल यांच्या मतेही वैदिक परंपरेत अवैदिक परंपरा मिसळुण स्मार्त शाखेचा उदय झाला. खरे तर अवैदिकांनी वैदिक धम स्विकारतांना आपल्याहे परंपरा तेवढ्याच ताकदीने कायम ठेवल्याने जी परिस्थिती निर्माण झाली त्यातुनच ही परंपरा निर्माण झाली. थोडक्यात स्मार्त ब्राह्मण हे सर्वात शेवटी धर्मांतरीत झालेले वैदिक होत. पण कर्मठ वैदिकांनी जी परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांन श्रौत ब्राह्मण असे म्हटले जावू लागले. हे ब्राह्मण वैदिकांची वेदपरंपरा व यज्ञविधान जपण्यात अग्रेसर राहिले. थोडक्यात मुळ वैदिक धर्म यांनी कायम ठेवला. अर्थातच श्रौत ब्राह्मण भारतात अत्यल्प असेच आहेत.

यावरुन एक बाब स्पष्ट होते व ती म्हणजे वैदिक धर्मात सर्वात आधी जे मुलभारतीय प्रवेशले त्यांनी हिरीरीने वैदिक धर्म परंपरा जपल्या. उत्तरकाळात जे वैदिक धर्मात आले त्यांनी वैदिक धर्म तर स्विकारला पण आपल्या अवैदिक परंपराही कायम ठेवल्या. त्यासाठी नवे तत्वज्ञान जन्माला घातले.

यामुळे एक बाब लक्षात घ्यावी लागते ती अशी कि भारतीय ब्राह्मण हे बाहेरचे आहेत या मान्यतेला काही अर्थ नाही. ब्राह्मण हे स्वत:च जवळपास साडेतिनशे जाती-पोटजातींत विखुरले असल्याने ते जातीसंस्थेचे निर्माते आहेत या मतातही तथ्य नाही. आज ब्राह्मणांत वर्णानुसार ते समान असले तरी वैदिक ब्राह्मण (म्हणजे जो यज्ञयाग करतो तो) श्रेष्ठ मानला जात मग दैवज्ञ कुटुंबांचे पौरोहित्य करणारे, ज्योतिषी, पंचाक्षरी व पुजारी अशी जातीय उतरंडही त्यांच्यात आहे. ब्राह्मणात देशभर जवळपास ३५० पोटजाती असून त्यांच्यातही उच्च-नीचतेचा दुराभिमान आहेच.

असे असले तरी वेदोक्त संस्कारांचे व वेदांवरचे अधिकार या सर्वच ब्राह्मणांनी मान्य केलेले असल्याने जरी अनेक हिंदू परंपरा ते त्यांचे वैदिकीकरण करत पाळत असले तरी त्यांचा धर्म मात्र हिंदू नसून वैदिकच ठरतो. 

15 comments:

  1. ब्राह्मण हा स्वत:च असा गोंधळयुक्त समाज आहे. परंतू वैदिक धर्माचा सर्वात मोठा प्रभाव त्यांच्यावर असल्याने श्रेष्ठत्वाच्या दुर्गुणाने त्यांना ग्रासले आहे असे स्पष्टपणे म्हणता येते. त्यांच्या हिंदू म्हणवण्यातील खोटही याच दुर्गुणामुळे त्यांच्यात घुसलेली आहे! ekdam true ahe sirji...brahmnan madhe pan ucch nichtecha ahamgand ahech...dusri kade anek brahman jati cha vikaratun baher padat ahet...manus mhnun swathachi olakh asavi asa pan tyancha praytna ahe...sadhya jari tyanche praman kami asle tari pudhil kalat te nakkich wadhel. vaidik dharm japnyasathi praytn karat aselea brahmanachi sankhya divsendivas kami hot janar ahe.

    ReplyDelete
  2. aapan kahi devachi lekre nahit...aplyala janmjat kontehi adhikar nahit...karmacha balawarch aaple astitva ahe...ase mananra motha warg brahmnat sadhya aahech.

    ReplyDelete
  3. सर मला अवैदिकांचा प्रश्न पडला आहे, बरेच ब्राम्हण आता समाजसुधारणेचा आव आणत असले तरी ते त्यांचे उपजीविकेचे जुने धंदे बंद पडले म्हणून समाजसुधारणेचा नावाखाली नवीन रोजगार शोधत आहेत असेच दिसते, ते काहीही म्हणोत. असो तो विषय वेगळा पण अवैदिकांत सुद्धा कुणाला ब्राम्हण बनायची, कोणाला जमीन लाटून शेतकरी बनायची इर्षा होती, तशी इतर मागास व मागास वर्गीय अवैदिकांत का दिसत नाही? का एकेकाळी ते खरे कट्टर अवैदिक धर्म जपणारे म्हणून गरीब आणि सेवा करणारे वर्ग बनले व वैदिक धर्म स्वीकारणारे ऐहिक सुख मिळवून सुखी बनत गेले? ह्यावर प्रकाश टाकला तर बरे होईल. आज मितीला आपल्या देशात काही ऐतिहासिक घटना घडल्या नसत्या (शिवजन्म?/ ब्रिटीश आगमन) तर मुस्लिम शासन असले असते. तेव्हा असे धर्मांतरित सुखवस्तू बनले असते व कट्टर हिंदूंना गुलामी झेलावी लागली असती असा दुसरा अन्वयार्थ निघतो. पुढचा आणखी एक प्रश्न असा कि वैदिक धर्मात असे काय खास आकर्षण होते कि मोठा वर्ग त्याकडे आकर्षित झाला, व जे अवैदिक धर्मात नव्हते? कि हे सगळे इस्लाम प्रमाणे तलवारीच्या जोरावर पसरवले गेले. एखाद्या राजाला हाताशी धरून त्याचा ब्रेनवाश करून त्याच्याकरवी सगळे घडवलेले असू शकते. मी आडनावाने ब्राम्हण दिसतो हा पूर्वग्रह काढून टाकला तर (कारण मी ब्राम्हण नाही, आणि नसल्याचे मला काही सोयरसुतक नाही) योग्य उत्तरे मिळू शकतील.

    ReplyDelete
  4. बाप्पा-माझे मित्र आप्पा यांना जाउन आज जेमतेम पंधरवडा झाला आणि आपण बहिष्कार घातलेले अविनाश पाटसकर सारखे लोक आपापल्या इच्छेनुसार इथे वावरायला लागले आहेत .
    संजय सर आपण त्याना ब्लोक केले होते ना ?त्यांची जुनी भाषा वाचली तरी किळस वाटते आजही !
    आज आप्पा हवे होते .

    ReplyDelete
  5. काही ब्राम्हण गोंधळलेले आहेत हे माझे पण निरीक्षण आहे कारण महाभारतात दिलेली ब्राम्हणांची व्याख्या आणि काही ब्राम्हणांचे सध्याचे वर्तन हे कुठेच मेळ खात नाही ,अर्थात बाकी जातींमध्ये पण हा दोष आढळून येतो. आणि त्यामुळे मला पण असेच वाटायचे कि काही ब्राम्हण हे बनावटगि-या करत बनलेले ब्राह्मण असावेत परंतु तसा कोणताही पुरावा मला आढळला नाही.

    परंतु बनावटगिरी हे जरी आपण तात्पुरते खरे मानले तरी काही प्रश्न अनुत्तरीत राहतातच कि
    १.जवळ जवळ प्रत्येक गावात ब्राम्हणांचे एखादेच घर असते , तर मग बनावटगिरी काय फक्त एखाद्यानेच केली काय आणि ते पण प्रत्येक गावात? आणि त्याचे अनुकरण इतरांनी का नाही केले?
    २.पूर्वीच्या काही ग्रंथात शैव ब्राम्हणाचा उल्लेख आढळतो मग त्यांचे काय झाले? का त्यांना बनावटगिरी करायचे नाही सुचले?
    ३.तुमच्या मताप्रमाणे पूर्वीचे शैव ब्राम्हण म्हणजे आताचे गुरव होत, मग त्यांना पण शैव धर्माचे काही कर्मकांड, मंत्रोच्चार पूर्वी येत असावेत कि , मग आताच्या पिढ्यांना ते का येत नाहीत?
    ते का विसरले?
    ४. आता जर शैव धर्मात कर्मकांड नव्हते असे मानले तर आदी शंकराचार्य शैव होते हे मत ग्राह्य धरत येत नाही.
    ५.ब्राम्हण हा शब्द,जात किंवा वर्ण हे मूळ कोणाचा ? शिवानी वैदिकांकडून उचलला? कि वैदिकांनी शैवांकडून?
    जोपर्यंत वरील प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत आपले सिद्धांत पण ग्राह्य धरता येणार नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला किती वेद येतात?म्हनुनदाखवा.यजुर्वेदातील एक प्रसिद्ध वेद लगेच लिहुन पाठ्वा.
      तुमच्या मताप्रमाणे पूर्वीचे शैव ब्राम्हण म्हणजे आताचे गुरव होत, मग त्यांना पण शैव धर्माचे काही कर्मकांड, मंत्रोच्चार पूर्वी येत असावेत कि , मग आताच्या पिढ्यांना ते का येत नाहीत?
      ते का विसरले?
      या प्रश्नाचे उत्तर आज माझ्या आस्पास एकाही ब्राह्म्णाला कुठ्ल्याही वेदातील एकही ऋचा येत नाही. मग ते ब्राह्मण कसे? ते का विसरले?

      Delete
  6. Enter your comment...ऋग्वेद काळात म्हणजे नेमका कोणता काळ? त्या काळात ब्राह्मण हा वर्ण नव्हता याचा काही ऐतिहासिक पुरावा आहे का ? ब्रह्म म्हणजे मंत्र असा संस्कृतात कुठे अर्थ असल्यास तसा पुरावा आहे का ? मग जर उपनिषदकाळात ब्रह्म जाणले तो ब्राह्मण तर या काळात ज्याने ब्रह्म जाणले तो कोण ? यज्ञाभोवती गुढतेचे वलय निर्माण करण्यात यश आल्याने वैदिक धर्मसंस्थेत ब्राह्मणांना अननयसाधारण महत्व मिळाले. त्यांच्या उपजीविकेची सोय लावण्याचे कार्य अर्थात राजे व धनाढ्यांवर आले.मग त्याअगोदर त्यांच्या उपजीविकेचे साधन काय होते ? ऐतिहासिक पुरावा असेल तर स्पष्ट कराल तर बरे होईल . आपण म्हणता की उपनिषदांमधील ब्रह्म व वेदामधील ब्रह्म या शब्दांचे अर्थ एकच नव्हेत. वेदांतील ब्रह्म या शब्दाचा अर्थ मंत्र असा होतो हे आपण पाहिले. उपनिषदांत मात्र "ब्रह्म" हा शब्द मंत्र म्हणून येत नसून आध्यात्मिक गुढार्थाने, चिद्शक्ती किंवा विश्वनिर्मितीमागील एक चैतन्य अशा अर्थाने येतो.तर मग येथे ऋग्वेदामध्ये देवी स्वयं ब्रह्मद्वेषीचा वध करण्यासाठी हातामध्ये रुद्राचे धनुष्य का घेत आहे ? “अहं रुद्राय धनुरा तनोमि। ब्रह्मद्विषे शरवे हन्तवा उ।।”(10|7)

    ReplyDelete
  7. नमस्कार .
    संदीप देशपांडे ,
    महत्वाची गोष्ट जेंव्हा कोणी मांडतो , विशेषतः कोणी ब्राह्मण मांडतो , त्यावेळेस सोनावणी गप्प बसतात , हे सत्य आपण अनुभवले नाही का ? माझ्या या लिखाणालाही ते प्रसिद्धी देणार नाहीत . कारण स्वतः सोनावणी जे मांडतील तेच खरे हाच या ब्लोगचा धर्म आहे, इथे चर्चा होत नाही , हीच इथली शोकांतिका आहे .
    आपण अगदी दोघानी मुद्देसूद मांडणी करून प्रतिसाद दिला आहे ,पण संजय सराना असे नकोच असते तुम्ही त्यांच्या हो ला हो म्हणत गेलात तरच तुम्ही त्यांचे अनुयायी , नाहीतर तुम्ही नुसतेच वल्गना करणारे ठरता .
    अहो विनोदमराठे ,
    कोकणस्थ ब्राह्मण हे तर घुसखोरी करतच ब्राह्मण बनले हा विचार किती अपमानकारक
    आहे नाही का ? मुळात संजय सोनवणी याना काय साधायचे असते तेच समजत नाही . खरा इतिहासकार किती मोजून मापून शब्द वापरत असतो . पण या साहेबांचे सगळेच विचित्र आहे , त्याना मांडणी करताना इतिहास मांडण्याचे ढोंग करत बहुजनाना खूष करायचे असते हेच त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे .
    असो माझ्या लिखाणाचा काहीही उपयोग होणार नाही , कारण ते तुमच्या पर्यंत पोचणारच नाही ही खात्री आहे . त्यांचा शेतकरी वर्गावरील लेखही असाच गमतीदार असतो - भारतात अनेक उद्योगपती कसे कष्टातून मोठे झाले ते आपण बघतो , अगदी दालमिया तट बिर्ला पासून थेट अडाणी पर्यंत ! पण शेतकरी काही आपला सुधारत नाही - ते का ?
    भाराभर व्कार्ज्माफी आणि सबसिडी याना गृहीत धरूनच त्याची सांसारिक बतावणी आणि उधळपट्टी चालू असते , मतांच्या राजकारणात पक्षाना वेठीस धरून शेतकरी खरेतर प्रजेला नागवत असतो . हेच सत्य आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. बेडेकरबाई तुमच्या विषयाला सोडून असलेल्या प्रश्नांची उत्तरे सोनावानींनी द्यावीत हा तुमचा हट्ट का आहे?
      एकतर शेतकऱ्यांच्या ह्या लेखाशी काडीमात्र संबंध नाही तरी तो तुमी उकरून काढत आहात.
      प्रत्येक खेड्यात एकच ब्राम्हण होता हा शोध कुठून काढला. बर तेही ठीक. राजा एकच असायचा तरी अख्खे राज्य हलवायचा ना? काड्या करायला एक पुरेसा आहे.
      गुरवाचे शैव ब्राम्हण झाले कि शैव ब्राम्हणांचे गुरव? कि गुरव हि वेगळीच जात आहे? काही माहित आहे का आपल्याला.. गुरावांनी कधीही ब्राम्हनान्सारखे स्वतःचे महत्व तयार केले नाही. किमान एक ऐतिहासिक गुरवाचे नाव ज्याने काहीतरी इतिहास घडवला त्याचे नाव सांगा.
      शंकराचार्य हे विनोदी पात्र आहे. त्याची समस्त वैदिकांनी समाजात घडवलेल्या विकृतींना शिवून काढता काढता त्रेधा तिरपीट उडाली. आत्ताचे शंकराचार्य जे काही वाचाळ पणा करतात तेव्हा त्यांना ते काय करत आहे हेही कळत नाही.
      वैदिक कर्मकांड, १६ संस्कार, शिवाजींचा राज्याभिषेक नाकारणे आणि तत्सम अनेक पुरावे ब्राम्हण शाहीचे शिल्लक आहेत. तेव्हा त्याचा कीस काढू नये.

      Delete
    2. आता मात्र कहर झाला ! बेडेकर बाइ मी शक्यतो वैयक्तिक बोलत नाही पण आता मात्र कहर झाला ....
      मला सांगा .... "कारण ते तुमच्या पर्यंत पोचणारच नाही ही खात्री आहे" हे कोमेंत्स मध्ये वाचल्यावर तोंडावर पडल्याची भावना येते का? मला खात्री आहे नाही येणार.... त्यासाठी पिंडच लागतो.

      "भाराभर व्कार्ज्माफी आणि सबसिडी याना गृहीत धरूनच त्याची सांसारिक बतावणी आणि उधळपट्टी चालू असते "
      ही मुक्ताफळे उधळायचे कारण कळेल? माझ्या माहिती प्रमाणे कॉंग्रेस सरकार ने एकूण ६० हजार कोटीची कर्ज माफी दिली होती. आपल्या गीदिपी च्या किती टक्के रक्कम आहे माहित आहे का? किंवा एकूण बँकिंग कर्जाच्या? एकट्या माल्ल्याला एकट्या एसबीआय चे ८ हजार कोटीचे बुडीत कर्जे आहे. आणि काय हो... कुठल्या शेतकरी आला होता कर्ज माफी मागायला? कसली संसारिक बतावणी? त्याला बिचार्याला कोण नागवातेय हेही काळात नाही, तो कधी बतावणी करणार?

      "मतांच्या राजकारणात पक्षाना वेठीस धरून शेतकरी खरेतर प्रजेला नागवत असतो . हेच सत्य आहे ."
      तुमच्या ह्या मुक्ताफालासाठी काही मुद्दे सांगू शकाल? कसा काय नागवला बाबा शेतकऱ्यांनी तुम्हाला?

      मिडल क्लास, व्हाईट कोलार कुठली... (हे शिवी सारखे लिहिले आहे, तसेच वाच). This is as diplomatic as I can get. You actually deserve a very hard reply.

      Niraj.

      Delete
  8. बाप्पा- नीरज ,छान लिहिले आहे
    स्नेहप्रभा असे का लिहिते ?
    मला एक माहित नाही ,कोणी सांगेल का ?वैदिक म्हणजे पारशी लोकांचीच एक शाखा असेल का ?
    कारण संजय सर म्हणतात की वैदीकांच्यात साकार मूर्तीपूजा नव्हती म्हणजे ते निराकार ईश्वरत्व मानणारे होते ,आणि म्हणजेच शैव साकार ईश्वरत्व मानणारे होते का ? कारण शंकराचीपण फक्त शाळून्काच असते मग मूर्तीपूजा हिंदू धर्मात आली कुठून ?
    आज आप्पा हवे होते . नीरज तू असाच लिहित जा !

    ReplyDelete
  9. नीरज बाळ तू उगाच रागवत आहेस का ?
    संजय सर कधी कधी १५ १५ दिवस काहीही लिहित नाहीत आणि कधी कधी एकदम भराभर लिहितात त्यामुळे कधीकधी लिहिण्यात एक विषय दुसऱ्यात मिसळतो
    मध्यंतरी लिहा वाचा आणि मी भारतीय हे असेच एकदम विषयाला सोडून एकदम बुद्ध आणि असेच अकाहीतरी रकानेच्या रकाने लिहित सुटायचे ,तू मात्र अतिशय मार्मिक लिहित असतोस तुझे अभिनंदन !
    मला निट समजून घ्यायचे आहे की बेडेकर बाईंचे म्हणणे बाजूला ठेवू , पण अनेकांनी हजारदा प्रश्न विचारला आहे की शैव पंथाच्या बद्दल नीट आणि पक्के काहीतरी कोणीतरी सविस्तर सांगा .
    संजय सोनावणी याना पण माझी अशी कळकळीची विनंती आहे की शैव पंथाची सुरवात कधी झाली ?त्याला वैदिकांनी पराभूत केले का ?वैदिकाना राजे आणि व्यापारी वर्गाने जवळ का केले ?इतका वेदांचा प्रभाव भारतीय समाजावर पडायचे कारणच काय ?कारण त्यापूर्वी इथे शैवांची घट्ट पकड असणारच आणि त्यांचे वेद्सादृश काहीतरी लिखाण असणारच ?
    वैदिक हे सैनिक बलाबलाच्या दृष्टीने आधीच्या शैवांवर विजय मिळवून त्याना वेठीस धरत होते का ?तसे नसेल तर वैदिक धर्म इथे रुजलाच कसा ,त्याला लोकाश्रय आणि राजाश्रय कसा मिळाला हेच समजत नाही आणि त्यामुळे माझ्या डोक्यातला हा शैव वैष्णव गुंता कधीच संपत नाही ,असे अनेकांचे होत असेल असे वाटते , म्हणून नीरज , कृपया तू आमच्या शंका दूर करशील का ? आम्ही तुझ्याकडून समजून घ्यायला अति उत्सुक आहोत , तुझे लिहिणे अतिशय सुसंबद्ध सुसह्य आणि सप्रमाण असते . मी तुझ्या लिखाणाची वाट बघत आहे .
    इतकेच समजून घेतले ना की एकदम वैदिक आले आणि त्यांनी त्यांचे धार्मिक बस्तान बसवले ,असे कसे होईल ?मुसलमानांनी १२०० वर्ष राज्य केले तरी त्याना तथाकथित हिंदुना संपवता आले नाही हे लक्षात घेतले तर वैदिकांनी इतके सुखासुखी आपले बस्तान कसे बसवले भारतात तेच समजत नाही .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! मी उगाच नाही रागावलो...तुम्हाला ते उगाच वाटत असेल तर आश्चर्य आहे. संजय सरांनी ब्लोग कधी अपडेट करावा हे तेच ठरवू शकतात... आपण कसे ठरवणार ते?
      कृपया गैरसमज करून घेवू नये... मला इतिहासाविषयी फार कमी माहिती आहे.
      बाकी शैव वैष्णव ब्राह्मण ह्याचा प्रश्न तुमच्याकडून सुटला नसेल तर मला काय जमणार? मला जमेल तेवढे समजून घेणे एवढेच मी करू शकतो.

      Cheers,
      Niraj.

      Delete
    2. जसेआज मोदी व शहा यांच्या वतीने आर.एस.एस.ने बसवले...

      Delete
  10. लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आहे, विषय अजून बर्याच अंगांनी चर्चिला जाऊ शकतो. उदा. बुद्ध-महाविराच्या वर्ण-विरहित व्यवस्थेनंतर ब्राह्मणी व्यवस्थेवर झालेले परिणाम. कारण असंख्य ब्राह्मणांनी बुद्ध-महावीराला स्वीकारले होते. त्यामुळे बुद्धाच्या मार्गावर चाललेल्या ह्या मंडळींचे पुढे काय झाले? वैदिक/ब्राह्मणी व्यवस्था सोडून बुद्धमार्गावर जाणारे गैर-ब्राह्मण पुढे शुद्र-अस्पृश्य कसे झाले हे बाबासाहेबांच्या अभ्यासात वाचण्यात येते, पण ब्राह्मण वर्णातील लोकांचेही तसेच झाले की त्यांनी पुढे वैदिक मार्गावर जाऊन आपले ब्राह्मण मूळ शाबूत ठेवले?

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...