Monday, June 4, 2018

आर्थिक शर्यत जिंकण्यासाठी रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड




सर्व दिवस सारखे नसतात हे आपण दैनंदिन व्यवहारांतुनही अनुभवत असतो. अर्थव्यवहारात तर ही बाब प्रकर्षाने पहायला मिळते. भांडवल बाजारात कोणत्या ना कोणत्या कारणाने अचानक चढ-उतार सुरु होतात हे आपण सेन्सेक्सच्या मागच्या इतिहासाकडे पाहिले तरी सहज लक्षात येते. भांडवलबाजारात व्य्कतीगत पातळीवर गुंतवणूक करणारे नेमके बाजार जेंव्हा वाढता (खरे तर महागडा) होत जात असतो तेंव्हा गुंतवणुक करायला पुढे सरसावतात आणि अनेकदा पस्तावतात. खरे तर सामान्य गुंतवणुकदार अशा वेळीस भांबाऊन जातो. आपल्या मुळच्या गुंतवणुक वाढीच्या ध्येयाचे काय हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. आर्थिक गुंतवणुकीतुन अधिकाधिक पण सुरक्षित परतावा मिळवणे ही एक अडथळ्यांची ट्रायथेलान शर्यत ठरते आणि ती जिंकण्यासाठीही म्युचुअल फंड असतात. रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड हा या शर्यतीत जिंकण्यासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा प्राधान्याने विचात करण्यास हरकत नाही.

म्युच्युअल फंड हे अशा सामान्य गुंतवणुकदारांसाठीच असतात जे गुंतवणुकदाराच्या उद्दिष्टांचे भान ठेवतात. बॅलंस्ड (संतुलित) म्युच्युअल फंड हे अशा आकस्मिक चढ-उतारांना तोंड देत गुंतवणुकदाराची उद्दिष्ट पूर्ती करण्याच्या उद्देशानेच आरेखित केलेले असतात. रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड (Reliance Balanced Advantage Fund) हा भांडवलबाजारातील अस्थिरतेचा विपरित परिणाम गुंतवणुकदाराच्या गुंतवणूकीवर होणार नाही अशा पद्धतीने गुंतवणूक संतुलित प्रमाणात विभागते. त्यामुळे भांडवलबाजारातील "रिस्क" हा घटक न्युनतम व्हायला मदत होते.

त्यामुळे बॅलंस्ड फंडांकडे गुंतवणुकदारांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढु लागला आहे. २०१६ मध्ये या प्रकारातील एकुण गुंतवणूक ५७,००० कोटी रुपये होती ती २०१७ मध्ये १, ३५,००० कोटी एवढी झाली. आणि त्यात उत्तरोत्तर वाढच होत आहे, यचे कारण या म्युचुअल फंड प्रकारात धोक्याचे प्रमाण किमान असुन परताव्याची शक्यता अधिकाधिक असते.

रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड शेयर बाजारातील अनिश्चितता लक्षात घेऊन आपली शेयर बाजार आणि अन्य साधने यांतील गुंतवणूक निर्धारित करतो. त्यासाठी महत्वाची अशी तीन पथ्ये पाळली जातात. पहिली बाब म्हणजे भावनिक पुर्वग्रह टाळत शेयर प्रकारात किती आणि कधी गुंतवणूक करायची अथवा काढून घ्यायची याचा माहितीपुर्ण आणि तथ्यांवर आधारित निर्णय या प्रकारात घेतला जातो. म्हणजे शेयरबाजार जेंव्हा चढा असतो तेंव्हा गुंतवणूक काढून घेतली जाते कारण चढानंतर उतार हा अर्थव्यवस्थेचा स्थायीभाव असतो. चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक विखुरक्ली जाते व धोक्याचे पातली किमान केली जाते. म्हणजेच ज्या मोठ्या पहिल्या शंभरात आहेत त्या कंपन्यांतच गुंतवणुक केली जाते जेथे अस्थैर्याची लागण किमान असते. गुंतवणूकीतील २५ ते ३५ हिस्सा हा कर्ज ((Debt) प्रकारात गुंतवला जातो. त्यामुळे एक खात्रीशिर स्थिर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो व गुंतवणूकीचे प्रमाण हे संतुलित ठेवले जाते. म्हणजेच रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड हा हायब्रीड (मिश्र) प्रकारातील म्युच्युअल फंड आहे आणि या गुंतवणुकीत संतुलन साधले गेले असल्याने गुंतवणुकदाराला भांडवल बाजारातील अस्थैर्याची विशेष काळजी करण्याची गरज भासत नाही.

मागील पाच वर्षातील या फंडाच्या कामगिरीवरुन या फंडाचा तीन वर्षांचा सरासरी परतावा हा सेन्सेक्सच्या १०% परताव्याच्या तुलनेत १३% एवढा राहिलेला आहे. तीन वर्षाच्या कोणत्याही सरासरीत, जेंव्हा सेन्सेक्सने अनेक वेळा खालच्या पातळ्या गाठल्या तेंव्हाही या फंडाने परताव्याची उणे पातळी कधीही गाठलेली नाही हेही विशेष आहे. धोरणात्मक गुंतवणुकीमुळे भांडवलबाजारात सध्या मोठी अस्थिरता असली तरी या फंडाच्या कामगिरीत स्थैर्य आणि सातत्य राहिले आहे.

ट्रायथेलानमध्ये ज्या प्रमाणे सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करीत शर्यत जिंकायची असते तशीच आर्थिक शर्यत जिंकायचा मार्ग रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड उपलब्ध करुन देतो. ज्या गुंतवणुकदारांना पारंपारिक गुंतवणुकीतून, उदाहणार्थ मुदत ठेवींवर मिळणा-या परताव्यापेक्षा अधिक परतावा आहे पण त्याच वेळेस धोकाही पत्करायचा नाही अशा गुंतवणुकदारांसाठी रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंड हा उत्तम पर्याय असू शकतो. रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांटेज फंडाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.

https://www.reliancemutual.com/FundsAndPerformance/Pages/Reliance-Balanced-Advantage-Fund.aspx

संदर्भ: १. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/advantages-of-investing-in-balanced-funds/articleshow/61234211.cms




No comments:

Post a Comment

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...