
स्पर्धा ऐन भरात आलीय
माणसांना मारायची
ठेचायची
गोळ्या घालायची
आणि भोसकण्याची
आणि सत्तर वर्षात अशा घटना घडतच नव्हत्या काय
हे उद्दामपणे विचारायची...
होय घडत होत्या की
गांधींना नाही का गोळ्या घातल्या गेल्या?
मग?
फाळणीत नाही का लाखो माणसं मारली गेली?
आमच्या विचारकाचा नाही का खून झाला?
केरळमधील हत्याकांडे दिसत नाहीत का तुम्हाला?
मग आता खात असतील मार
वयोवृद्ध संन्यासी
किंवा गोळ्या घातल्या गेल्या असतील
काही विद्रोही विचारींना
किंवा जमाव करत असेल
ठेचुन हत्या
कोणा अखलाखची
कोणा भटक्यांची...
तो काय प्रश्न तरी आहे काय?
दलितही मेलेच पाहिजेत
विद्रोहीही मेलेच पाहिजे...
आम्हाला गुलामाचे गुलामांसाठीचे राज्य पाहिजे....
इतरांना जगायचा अधिकारच काय?
बेमुर्वतखोरी झरते आहे आकाशातून
आणि स्वत्व गमावले जाते आहे थेंबा-थेंबातून...
माणुसकी एवढी कधीच नपुंसक झाली नव्हती!
No comments:
Post a Comment