Saturday, February 16, 2019

साहित्य संस्कृतीचे मूलभूत तत्वज्ञान

Image result for बोधी कला गज्वी

बोधी म्हणजे सम्यक ज्ञान. सर्व कलांच्या एकत्र‌ित रुपालाही बोधीम्हणतात कारण कलांचा अंतिम उद्देशही ज्ञानाकडे जाण्याचा असतो. जगण्याच्या कसोटीला जे उतरते ते ज्ञान. 

जाणीवसमजूतबुद्धीग्रह,सर्वज्ञतास्पष्टीकरणउपदेशसूचनाजाणीवप्रज्ञा व करुणा या सम्यक घटकांचे प्रकटीकरण म्हणजे कला. कलेसाठी कला की जीवनासाठी कला या वादांपासून बोधी’ दूर राहू इच्छिते... हा प्रेमानंद गज्वींच्या बोधी: कला-संस्कृती’ या अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथातील विचारांचा गाभा आहे व कलेकडे पाहण्याचा नवीन दृष्ट‌िकोन देणारा आहे. भारतीय संस्कृतीत बोधी कलाज्ञानशाखा म्हणून नव्याने विकसीत करायला मौलिक तत्वज्ञान पुरवणारा हा ग्रंथ आहे. 

कोणत्याही संस्कृतीचा प्रवास एकाच दिशेने नसतो. भारतात सिंधू काळवैदिक काळबौद्ध काळ व त्याला समांतर जाणारा काहीसा क्षीण असला तरी जैन काळमुस्लिम काळख्रिश्चन काळ व स्वातंत्र्योत्तर काळ अशी सरधोपट विभागणी केली जाते. परंतु कोणत्याही संस्कृतीच्या प्रवाहात एकाच वेळी अनेक सांस्कृत‌िक प्रवाहही असतात व ते एकमेकांवर प्रभाव टाकत संस्कृती पुढे नेण्याचं कार्य करत असतात. गज्वींनी प्रस्तुत ग्रंथात भारताचा सिंधु काळापासून नवीन दृष्ट‌िकोनातून आढावा घेत आपलं आकलन आणि चिंतन मांडत बोधी’ कला-ज्ञानाचं तत्वज्ञान पुराव्यांनिशी मांडलंय. 

संस्कृती ही माणसाच्या एकूण भौतिक आविष्करणाचं रूप असते. त्यात सर्व अभिव्यक्ति आल्या. या अभिव्यक्ती म्हणजेच कला. प्रेमानंद गज्वी भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठकाळ म्हणजे बौद्धकाळ होय अशी मांडणी करतात. या काळात सर्व कला या ज्ञानाच्या म्हणजेच बोधीच्या पातळीवर पोहोचल्या असल्याने हा श्रेष्ठ संस्कृतीचा काळ होय,असं ते म्हणतात. आणि ते खरंही आहे. कारण याच काळात बौद्ध संस्कृती देशाच्या सीमा ओलांडून आशियाभरात पोहोचली. शैवप्रधान सिंधू संस्कृतीच्या श्रेष्ठत्वानंतर आकाराला आलेली ही महासंस्कृती हा प्रवास थक्क करणाराच आहे. वैदिक काळ हा त्या दृष्टीने अर्थपूर्ण नाही. कारण या संस्कृतीचे (व संस्कृतचेही) भौतिक पुरावे दुस‍ऱ्या शतकापर्यंत आढळत नाहीत. संस्कृत भाषेचं विकसन केलं ते बौद्ध धर्मियांनी. त्याचे पुरावे नव्या संशोधनात पुढे आलेेत. वैदिक धर्माने उचल खाल्ली ती गुप्तकाळात. त्यामुळे गज्वींचं बौद्ध संस्कृती श्रेष्ठत्वाचे संकेत अधिक अर्थाने सिद्ध होतात. 

बोधी कला-संस्कृती : तत्वविचार’ या प्रकरणात गज्वींच्या तत्वज्ञ-लेखक या क्षमतेचा परिचय होतो. इतिहासाची मांडणी करुन झाल्यानंतर ते मूलभूत तत्त्वज्ञानाकडे वळत कला संस्कृतीचे बोधी’ रुप विषद करतात. आजचं (साठोत्तरीही) मराठी साहित्य म्हणजे माणसं एकत्र आणण्याऐवजी विभक्त करत जात आहेअसं प्रखर विधान करत गज्वी याला वैदिक ब्राह्मणी परंपरेचा सांस्कृतिक वारसा’ असं संबोधतात. मराठी साहित्य आणि समीक्षा आजही ज्या पद्धतीने जातीय’ जाणिवा जोपासत असतेत्यावरून गज्वींच्या म्हणण्याची सत्यता लक्षात येते. 

कोणत्याही कलाकृतीच्या गर्भजाण‌िवा गज्वींनी मांडल्या आहेत. वेदनेशिवाय कला नाहीजाणिवेखेरीज वेदनेला अर्थ प्राप्त होत नाहीवेदनेच्या जाणिवेशिवाय वेदनादायक गोष्टींना नकार देता येत नाहीकेवळ नकार देऊन भागत नाही तर विद्रोह (बंड/क्रांती) करावा लागेल आणि विद्रोहानंतर जो विध्वंस होईलत्यानंतर जे काही उरेल त्यावर करुणेची फुंकर घालावी लागेल. या गज्वींना उमगलेल्या गर्भजाणिवा विवादास्पद वाटू शकतात. मुळात विद्रोह हा विध्वंसासाठी असतो की मुळातच तो विध्वंस न करता नव्या पुनर्रचनेसाठी असतो असा तात्त्विक विवाद या निमित्ताने उद्भवू शकतो. गज्वींना अभिप्रेत विध्वंस प्रवृत्तींचा असेलतर त्यांचे हे मत स्वागतार्हच ठरेल. थोडक्यात मराठीत ज्ञानाची स्वतंत्र प्रज्ञेने शाखा उघडण्यासाठी व सम्यक तत्वज्ञानाच्या मुलाधारावर संस्कृतीची नवरचना करायला प्रेरक अशी ही मांडणी प्रत्येकाने वाचली पाहिजे. 

बोधी : कला-संस्कृती 

लेखक : प्रेमानंद गज्वी 

प्रकाशक : सहितकिंमत : १८० रु.

(Published in Maharashtra Times, Samvad, 29th December, 2013)

No comments:

Post a Comment

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...