Monday, October 19, 2020

कविता केल्या जात नाहीत

 कविता केल्या जात नाहीत

कविता रचल्या जात नाहीत.

कविता लिहिल्या जात नाहीत....

कोणाचे दु:ख बघून नकळत
डोळ्यातून ओघळणारे अश्रुबिंदू
किंवा कोणाचा आनंद पाहुन
फुलणारे निरागस हास्य...
जगातील याच काय त्या
श्रेष्ठ कविता होत!
शब्द कवितांचे शत्रू आहेत!
शब्दात पकडली जातात ती कलेवरे.
कविता निशब्दच असते...!

No comments:

Post a Comment

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...