Monday, October 19, 2020

कविता केल्या जात नाहीत

 कविता केल्या जात नाहीत

कविता रचल्या जात नाहीत.

कविता लिहिल्या जात नाहीत....

कोणाचे दु:ख बघून नकळत
डोळ्यातून ओघळणारे अश्रुबिंदू
किंवा कोणाचा आनंद पाहुन
फुलणारे निरागस हास्य...
जगातील याच काय त्या
श्रेष्ठ कविता होत!
शब्द कवितांचे शत्रू आहेत!
शब्दात पकडली जातात ती कलेवरे.
कविता निशब्दच असते...!

No comments:

Post a Comment

होय...हा फुकट्यांचा देश झाला आहे!

ज्या देशात आजही ८० कोटी नागरिक मोफत धान्यावर गुजराण करतात, ज्या देशात लाडकी बहीण, लेक लाडकीसारख्या सरकारी तिजोरीवर भार टाकणार्या योजना आखून ...