Friday, September 17, 2021

धनगरांचा गौरवशाली इतिहास

 

No photo description available.

(१८. ९. २०१५)

भारी बातमी

संजय सोनवणींचा विजय असो
आमचे परममित्र प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत संजय सोनवनी यांचे आणखी एक पुस्तक धनगरांचा गौरवशाली इतिहास हे पुण्यात प्रसिद्ध् होत आहे याचा आम्हास खूप आनंद होत आहे
संजय सोनवणी यांना सलाम
काय जबर आणि जब्राट उरक आहे या माणसाचा ! किती पुस्तके याने लिहली आणि किती पद्धतीची ...जस्ट ग्रेट
धनगरांचा इतिहास लिवन्याचे फारच मोलाचे अती मोलाचे काम भाऊने केलेय त्या बद्दल त्यांचे अभिनंदन
हां धनगरांचा इतिहास आपन सर्वांनीच वाचला पाहिजे कारण तो संजय सोनवानी या फुले गांधी आंबेडकरी या सिंथेसिस विचारधारा मानणाऱ्या एका मोठ्या तरीही दुर्लक्षित माणसाने लिहला आहे
साने गुरुजींचे स्वप्न होते आंतर भारती टागोरांच्या प्रेरणेतून आलेले की आम्हा भारतीयाना एकमेंकांच्या भाषांची माहिती असली पाहिजे आम्हास त्या आल्या पाहिजेत त्यातून आमचे एकमेकांबद्दल जाणीव व प्रेम वाढेल आणि वाढेल बंधुभाव
तसेच आम्हास जातीचा इतिहास देखील माहीत हवा त्या त्या जातितिल प्रेरणा आणि दिपस्तंभ यांची जाणीव हवी .त्यातूनच वाढेल महात्मा फुलेंच्या स्वनातील सकल एकमयता आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला रीपब्लिकन भारत
धनगर समाजाचे फार मोठे योगदान भारत विकास आणि सन्मानात आहे त्याची माहिती या पुस्तकात निश्छित मिळेल
पशुपती शिव हां देखील धनगर होता हे भाऊंनी मांडलेय की नाही माहीत नाही ज्या शिवाने तमाम जगास सत्यं शिवं सुन्दरं ऎसे स्वप्न दिले
महान मल्हारराव ते महामाता महाराणी अहिल्याबाई यांनी केलेले थोर कार्य आणि त्यातील अनेक दुर्लक्षित मुद्दे निस्चीत वाचावयास मिळतील आणि आपल्या माहितीत आणि ज्ञानात भर पडेल यात शंका नाही
धनगर समाजाचे उभरते आणि ऊभारलेले जबरदस्त नेतृत्व महाराष्ट्राची नवी प्रेरणा म्हणजे महादेव जानकर माझे मोठे बंधू यांच्या सोबत काही काळ काम केलेय त्यांचे चरित्र लिहावे ही खूप इच्छा आहे ते ही या कार्यक्रमास उपस्थित आहेत त्याने कार्यक्रम अधिक अविस्मरणीय होईल
धनगर समाजाला खुप जवळून पाहिले आहे आमच्या अंधेरीत डोंगरावर प्राचीन काळापासून धनगर वस्ती आहे त्यांच्या सोबत माझे बालपण गेले धनगर समाजाबद्दल मला लहानपणापासून प्रीति आहे ,अहिल्याबाई आणि मल्हाररावांचे पराक्रम माझ्या आईने माझ्या मनावर रुजवले आणि ते लाहांपनापासून माझे हीरो राहिले ,धनगरांचे मेंढरू ओळखण्याचे कौशल्य याचे मला नेहमी अप्रूप आईमूळे वाटत राहिले तिच्या कड़े धनगरांच्या खुप गोष्टींचा साठा होता
पशुपालनाच्या जीवावर जगात लोक कोट्याधीश झाले ऑस्ट्रेलिया असो की इस्राईल येथील प्रोफेशनल पशुपालन इतर जातींच्या व्यवसाया प्रमाणे आमच्या लोकांपर्यन्त पोचलेच नाही आणि आधुनिकतेने आमच्या लोकांच्या जगण्यात आधुनिकता येन्या ऐवजी रा.र बोराडे यांच्या कादंबरी प्रमाणे पार पाचोळा झाला याचा मुख्य दोष जैसा आमच्या देशातील राज्यकर्त्यांचा आहे तसाच किंवा त्याहुन अधिक आमच्या बुद्धिवंतांचा आहे
जैनमारवाड़ी बोहरी खोजा आणि अर्थात चित्पावन आणि सारस्वत व तत्सम जातीं कडून आम्ही काहीच शिकलो नाही ना आम्हाला व्यवसायिक मोट बांधता आली
बंधुभाव तर आमच्यातून केन्हवाच सटक्ला ,आणि याचा फ़ायदा मग बरोबर लांडग्यांनी घेतला
त्या काळात दलित समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या कट्टर भारतीय द्रष्टा युगपुरुष ,जागतिक विचारवंत ,महामानव महापुरुष असलले बाबासाहेब स्वतः त्या काळी 100 मुले परदेशी आधुनिक शिक्षण (इंग्रजी शिक्षण न्हवे) घेण्यासाठी परदेशी पाठवत ,त्या विजनची नेतृत्व आज नाही ,फक्त सत्ता लोलुप अभिनिवेशी लांडगे उभे राहिले ज्यांना फक्त सत्ता राखायाची होती त्याचे परिणाम व्हायचे तेच झाले लांडगे माजोरडे झाले आणि त्यातूनच जात्यंताचे व गरीबी निर्मूलनाचे वाजले तिन तेरा आणि आता आम्ही वेगाने सरक्तोय यादवीकड़े .ज्याचा रिमोट अभिजनांकड़े आहे .
ना आम्हाला धर्माची धार्मिकता कळते ना जातीची व्यवसायिक निति .ज्यातुन घरात आणि दारात ममत्व गणत्व येते त्याचे आम्हास ना जाण ना भान .जिसकी जीतनी साजिदारी उसकी उतनी भागीदारीचे जीवनसूत्र ताकद बनते जे लिंगभेद पार करून डीकास्ट आणि डीक्लास बनते .
जातिनिहायमधुन जातिनिर्पेक्ष समाज आकारास येतो विकसित होतो हे आम्हाला अजून कळत नाही याचे सगळ्यात थोर उदाहरणे आपल्या देशातील संताच्या मांदियाळी कड़े पाहिले तर सहज दिसते .
अभिमान आणि गर्व मधला फरक आम्हास कळतच नाही .अभिमान स्वाभिमान देतो तर गर्व बेचिराख करतो
जातीच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून केलेल्या व्यवसायिक सक्षमते मध्येच भारत विकास आणि जात्यंताचे आणि भारतीयकरणाचे बिज आहे .ज्याची भाषा भोजन आणि भुवन ही त्रिसूत्री आहे ,यातूनच भारत भा-रत होईल आणि होईल बलशाली .महामाता महाराणी महिला सिंधुराणीचा हाच वारसा होता .सप्त सिंधुनी आणि त्यांच्या गावागावातील मातांनी यातूनच भारत सोन्याचा देश बनला जो चित्पावनि वैदिकांनी बिघडवला .अर्थात वंशवादी चित्पावनांमध्ये अपवाद होते , त्याच्यांतील अपवादात्मक महात्म्यांनी याचे नुसते भाँडेच फोडले नाही तर जात्यांत भारतासाठी आयुष्य पणाला लावले पण त्यात स्वतःला पणाला लावणारे सॉक्रेटीस न्हवते ना विचारवंत व्हालतेयर आणि हे ही खरे पण बहुतांशी चित्पावनि समाजाने समस्त ब्राम्हण जातिला केवळ हिंदू धर्मापासून तोड़ले नाही तर आपली अस्मिता आणि अस्तित्व अनिवासिनप्रमाने वेगळे राखण्याच्या नादात भारताशि प्रतारणा केलि आणि कहर म्हणजे जातीयतेल घेट्टोचे रूप देताना अमानुषतेचा कहर गाठला (सद्गति गिद्ध आणि दामुल या चित्रपटात त्याची क्रूर झलक दिसते ) ,बोहरी आणि खोजा जाती सारखे त्यानी स्वतःची वेगळे अस्तित्व राखले नाही आणि आज लोकहितवादींचा इशारा संघनितीतुन खरा होण्याची वेळ आली आहे .आणि आज जगात ट्रैप सांस्कृतिक युद्ध ...यादवी पद्धतशिरपणे पुढे आणली जात आहे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड यांना कमी करायची आहे न्यू वर्ल्ड आर्डरसाठी डिसेप्शन चित्रपटा प्रमाणे आधुनिक जातीयता आनत श्रेष्ठ वंशांचे वर्चस्व यांना प्रस्थापित करायचे आहे
हां सगळा गोंधळ ज्यांना नीट समजतो आहे त्या पैकी संजय भाऊ एक आहेत ,त्यामुळे भाऊंच्या या पुस्तकातुन मला खात्री आहे पिंडाच्या जानिवेतून ब्रह्मांडाचे भान येइल .आणि आपल्या धनगर मूल्यांकन निमित्ताने जातीय व्यवसायांना आधुनिक रूप येवून अनेक व्यवसायिक उभे राहतील त्यातून बेकारी निर्मूलनचे साइड प्रोडक्ट आपोआप मिळेल आणि आपल्या युवकांचा भयानक उपयोग कोणास करता येणार नाही आणि कौशल्य व कार्यकुशलतेस वाव मिळेल ,हो हे मुमकिन आहे कारण धनगरांचा गौरवशाली इतिहास फक्त धनगरांना प्रेरणा देणारा नाही तर तो महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे .भाऊंच्या लिखानात आपले पणाची जाणीव अधिक अधोरेखित होत असते .
ज्याची दृष्टी निर्मळ आणि जे प्रेमळ असतात त्यांचे बरेच ब्लॉक भाउंच्या लिखानामूळे तटातटा तूटतात आणि दबक्याना येते ओढ्याचे स्वरुप जो हळू हळू नदीत प्रवर्तित होतो .वाईट एवढेच वाटते की भाऊ नेमके काय करताहेत हे वैदिक हितसनबिधिताना कळलेय ,भाउं जे काय करताहेत त्याचा भविष्य परीनाम त्यांना नेमका कळला आहे त्यामुळे ते सुरवातीला त्यांना दुर्लक्षित करत होते आता नंतर टवाळी करू लागले आणि आता विखारी टिका करून गैरसमज निर्माण करत आहेत .त्यातून जातीय आणि पुरोगामी अभिनिवेशि मण्डली पूर्वग्रहातून त्यात माती कालवत आहेत
झायोनिझम आणि वांशिक वैदिक आर्यवाद महायुति आगामी भयान यादवीपूर्व काळात भयंकर आक्रमण करणार आहे ,ज्याची सुरुवात मुस्लिम यादवितुन मुस्लिम झेनोसाइड कड़े चालली आहे .त्या आक्रमनांची मीमांसा आणि भयानकता फिरोज मिठीबोरवाला आणि आम्ही सातत्याने करतो आहोत अजुन आम्ही पायापुरते पहात आहोत आणि आमच्या सगल्यांच्याच् जातीय धार्मिक भावना तालिबानी आणि आयसिसच्याच् वळनावर चाललेल्या आहेत अशावेळी आंबेडकरी जातवर्चस्व निर्मूलन फॉर्मूला हाच रामबाण उपाय आहे त्यास गांधी संजीवनीची गरज आहे हे आपल्या जितके लक्षात येइल तितके बरे अन्यथा विनाश अटळ आहे आमच्या रीएक्शन मध्ये सुद्धा साचलेपन आले आहे आणि आमचा नवा धोपट मार्ग तयार झाला आहे जो मोडण्याची गरज निर्माण झाली आहे
ते आधुनिकतेचा उपयोग वर्चस्वासाठी करतात आणि आम्ही फक्त रडत राहतोय आमच्याकड़े दैदीप्यमान वारसा असताना हे अत्यंत वाईट आहे आणि संजय सोनवनी नेमका हस्तक्षेप इथे जबरदस्त करताहेत की त्यांना रीएक्शन द्याविच लागते
त्यामुळे या पुस्तकाच्या निमित्ताने मी आगावू सांगू इच्छितो की आपल्या डोल्यावरील दूषित चश्मे बाजूला काढल्यास या माणसाची दूरदृष्टि जानवेल
ती जानवो ही तीव्र इच्छा
मला खुप बरे वाटते भाऊ आणि मी बऱ्यापैकी लाइक माइंडेड लोक आहोत .लिंगवंशभाषावजातवर्गवर्ण वर्चस्व विरोधी लोक आम्ही आहोत ,देशीय जाणीव आमच्यात तीव्र आहे ,प्राचीन सांस्कृतिक इतिहासाच्या योगदानाची जाणीव आमच्यातला सामान धागा आहे
प्रखर विचारवंत द्रष्टा लेखक नेमाडे यांच्या नंतर तोलामोलाचा संविधानवादि मराठी लेखक म्हणजे संजय सोनवनी
प्राच्य पण्डित शरद पाटिल ,आह साळुंखे आणि नेमाडे यांच्या मिक्सचर मधुन आलेले हे अभिनव रसायन आहे.छोटेखानी पुस्तकांमधून अनेक सूत्रे हां समजावत आहे आणि मांडत आहे ज्याने अनेक गनितांची उत्तरे मिळत आहेत ऎसे मला वाटते ऐसा माणूस मला खरा भारताचा महाराष्ट्राचा पोशिंदा वाटतो ज्यास जातीय अभिनिवेशामूळे आम्ही समजून घेत नाही
असो तर मला खुप घाई झाली आहे कधी हे पुस्तक वाचतो
आपणही जरूर वाचा
भाऊंचे खूप खूप अभिनन्दन आणि मनःपूर्वक सदिछा
हां माणूस इतिहासातून वर्तमानाचे जबाबदारी सांगताना भविष्याच्या आव्हानांची जाणीव निर्माण करतो आहे त्या कार्यास सलाम
किशोर जगताप

1 comment:

  1. Harrah's Ak-Chin Casino Resort, Ak-Chin - MapYRO
    Search for Harrah's 군산 출장마사지 Ak-Chin 남양주 출장마사지 Casino 출장샵 Resort, 과천 출장안마 Ak-Chin 전주 출장샵 with MapYRO users. Harrah's Ak-Chin Casino Resort.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...