Thursday, June 20, 2024

 Jaina Origin of the Yoga

Sanjay Sonawani

Yoga is thought to be first elaborated in the Upanishads. They are considered to be the last parts of the Vedas. There has been a debate about whether Upanishads can be a logical extension of Vedic thought. In a close examination, the spiritual realms the Upanishads delve into are poles apart from the philosophy and rituals that have been propounded by the Vedas, thus connecting them both could be a grave mistake of the students.

The indelible influence of the Samana philosophy can be seen on the ancient Upanishads. Before the word "Brahma" appeared in the Upanishads, the word "Yaksha" (यक्ष which means mysterious radiance.) was used as a synonym for Brahma. Moreover, the word Brahman (ब्रह्मन) in the Upanishads is neither related to the word Brahman (ब्राह्मण) nor to the Vedic word "Brahma" (ब्रह्म). The Vedic word Brahma comes in the sense of mantra (chant), while in the Upanishads it comes in the sense of the cause of creation. Different philosophies use different terminological meanings for the same word. Hence, finding similar terms applied in different streams with different connotations doesn’t help us to lead us to a single source. Upanishad philosophies too, thus, cannot be connected with the Vedas since both stand opposite to each other though the big claim has been made that the Upanishads are end part of the Vedas and thus called Vedanta cannot be true, though this impression has hyped us.

The term “Yoga” also has different connotations to explain physical or spiritual activities and their aims. In textual form, the term ‘yuj” appears in the Vedas as a process of yoking horses to a chariot. This simply describes an action, essential to ready a chariot for travel. It has nothing to do with the usual meaning we take for the term Yoga. Yoga has over forty different meanings about a hundred synonyms as given in the dictionaries.

The spiritual usage of this word first appears in a late Taittiriya Upanishad, which especially elaborates on the necessity of meditation and Brahmvidya, to remove the cause which leads to recourse to Karmas. The Yoga term is used here as uniting self with blissful self. This is an expansion of the meaning of the original term “Yoga” in the form of the metaphor associated with karma and rebirth. The time of Taittiriya Upanishad is estimated by different scholars to be the first half of the first million BC. According to Patrick Olivelle, the Taittiriya Upanishad was composed in a pre-Buddhistic period, possibly 6th to 5th BCE. We find further expansion of the term in Shvetashvatar and Maitri Upanishads which are dated by the scholars to be about fifth to second century BCE.

If we take a dip in the philosophical views of the Vedic Aryans in the Vedas, a very contradictory picture appears. Unlike the Upanishads, the Vedic world is centered on sacrificial fire rituals offering oblations to a pantheon of the major to minor gods to receive their blessings to get victories in the wars or the material wealth. Though at some places the Rigveda, such as in verses 5.82.7, 6.44.8, 9.113.4, 10.133.6, and 10.190.1, and hymn Hymn 10.117 mentions core ethical values but there is an absence of spiritual ideology. The word Yoga appearing in the Rigveda just means yoking horses to the chariots. There is no spiritual connotation associated with this word. The term Atma is used to address the self and not as an eternal entity governing the self.

Vedics couldn’t have been authors of the Yoga in the absence of the term Atma and clear understanding that the Atma is cause of the life and that the soul is immortal. This is the basic doctrine of Yoga (originally Vratas), which is absent from the Vedas.

For example, term Atma appears in the Rigveda in 10.168.4. “ आत्मा देवानां भुवनस्य गर्भो यथाव॒शं चरति देवा एषः  घोषा॒ इदस्य शृण्विरे॒  रूपं तस्मै॒ वात॑य ह॒विषा॑ विधेम “ To which Wilson translates as “The soul of the gods, the germ of the world, this divinity moves according to his plural asure; his voices are heard, his form is not (seen); let us worship that Vata with oblations. Nutritious life-sustaining (waters); Rudra, have compassion upon the food which has four feet.” Here vayu is treated as the soul of the gods which should be worshipped with oblations to get the food. The term is not used in the same sense as being used or considered in the Yoga philosophy schools and Yoga’s progenitor The Samana tradition. Vata (wind), though couldn't be seen, it can be heard and sensed as said in this verse implying that the Vedic Aryans had a very vague idea of the Atma concept.

Rigveda is supposed to have been composed around 1500 BC. Most of the part of Rigveda was composed in ancient Iran and the remaining part was composed when the Vedic Aryans arrived in the Indian subcontinent. The new deities and the community like Shudra first appear in the tenth mandala of Rigveda because of the geographical movement of the Vedic Aryans. They seem to have got introduced to the ritualistic and spiritual practices of the local ascetics during their initial phase of stay and gradually learned more from them as they advanced towards the Kuru-Panchal region to which they named as Aryavarta. Till then Vedic Aryans held hostile views towards the Vratyas belonging to Samana tradition. But as some groups moved further in the Magadha region, which was avoided by them in the early phase, this group had intimate contacts with the Vratyas which changed their worldviews and limitations of the philosophy they possessed earlier. The impact of this newly acquired previously unknown knowledge is reflected in the Atharv Veda and Upanishads.

The early stage of the Vrata alias Yoga

In the absence of written records, from archeological proof and logical guesswork, we can infer the earliest stage of the Vrata (Yoga). Though today, Yoga has been branched in many schools with different connotations, originally, in a primordial state, it must have been used to unite physical and spiritual activity that could provide mental bliss. Indians have been idolatrous since time immemorial. The term Puja does not appear in the bulk of the Vedas as it was not their ritualistic practice ever. The external journey was thought to be insufficient to eliminate miseries or moral problems, the necessity of the inner journey must have been felt by the early thinkers who started practicing Vrata’s as a new ritual in a crude form. Yoga was known to the Samana (equanimity) thinkers as Vrata (vow) which was used to purify the soul. This was the beginning of modern yoga.

In Indus civilization, we find some seals that depict the males seated in Yogic positions. Though there are multiple speculations, we cannot get an idea from the seating position what was the purpose of the depictions. We have no idea in the absence of the written record, whether the seating person in certain Asana poses was to gain supernatural powers or had spiritual ambition. Yet, we can get a clear idea that the specific seating or standing positions which are basic requirements of Yoga had emerged long before the time of the Vedas came into existence. The early yoga and the philosophy behind it must have formalized over a million years before the composition of the Vedas had begun.

When Vedic Aryans arrived in India, indigenous folk religion was thriving. Vedic Aryans borrowed freely many local deities adorning Vedic characteristics. At the same time, the Samana culture of thinkers and ascetics was flourishing almost everywhere. The ultimate aim of these thinkers was to win over the bad qualities of the mind, thus, the movement was also named Jina, victors over inner disorders and to see the world with equanimity, thus called Samana. The ultimate aim of yoga, though divided into many sects, remains the same as was determined by the ancestors. The spiritual quests of ascetics had invented means to attain ultimate bliss; Vrata (Yoga) was one, though they might have decided on spiritual destinations differently. The thinkers who thought of the equanimity of all living beings caused a cultural movement that is known to us as Samana culture. The Samana thinkers of the past, as we can guess from their fundamental philosophy, were not interested in mundane pleasures, instead, they strived to get answers to the questions, such as what is the meaning of life, whether there is a creator or not, what are the sorrow and how to get rid of them and how to solve ethical problems faced by the world thus acquiring true knowledge by defeating the inner foes to become Jina. (Bhagavati Sutra, 4.160)

Occult practices (Tantrashastra) of folk religion could have helped emerge this practice which primarily was meant to gain supernatural powers to command the netherworld by chanting mysterious verses. In all probability the syllable Om could have been invented by them for the sound created an aura of mysticism. We should not forget that the Om syllable is absent from Vedic literature. In a later course, the sound of Om might have gotten the attention of all those who followed the spiritual path by giving it fantastic meaning, which originally may not have been intended. New goals must have been set by the early thinkers to use vratas for a wider application, such as to attain salvation that is Moksha or Nirvana, which was never part of Vedic doctrine, neither Puja nor Yoga in the modern sense.

It is clear from Rigveda that the Vedics came across new identities like the Yatis, the Vratyas, the Munis, and the Keshis. (10.136.1-2) when they arrived in the Indian sub-continent around 1200 and 1000 BC. Vratyakanda of Atharvaveda clearly shows how the mystic Vratyas had impressed the Vedic Aryans who settled in the region of Magadha, which Vedic Aryans delving in the Aryavarta region despised in the early phase and had expressed conflicting views about them. But the Vedic Aryans who later on moved towards Magadha, had closer acquaintance with the Vratyas (who followed different vratas) they learned many aspects of their philosophy forcing them to abandon the previously held by them. It changed their perspective to look at the world.

The fifteenth chapter (kanda) of the Atharvaveda is the 'Vratyakanda', in which the Vratyas are glorified. In the ninth and tenth verses of this Kanda, it is said that a Vratya who is favorable to the assembly, committee, army, and Sura, goes as a guest to the king, that the king should respect a Vratya as superior to himself. The Vratyas of the Atharvaveda are self-conscious vratins (yogis) and a different type of sacrifice performer in which Soma was not involved. Sacrifice here seems to have been used as a simile for spiritual and mystic activity. Vratya is also called 'Mahadev' in Atharvaveda. Vratya and Yogi are synonymous for both required to renounce the world and hence were respected the most. Likewise, the yati and keshis could be the individuals following different types of vratas or vows to attain spiritual powers. The meaning of the term Vrata cannot be taken in a modern sense though it still needs some observance but does not cover all the aspects that originally were meant.

However, an association of the Vrata (Yoga) and Tapa with the above-mentioned identities is undeniable. The term Rishi was used for only those who composed or recited Vedic Richa’s (verses). Muni is a person who observes silence. Both terms are not the same as assumed.

Initially the Vedics couldn’t grasp the spirituality associated with their (yati, vratya, keshi etc.) seemingly strange practices, still they were awestruck. Though they have expressed their respect towards them by fitting them in Vedic phrasings still they used the word Vata (invisible wind) for Atma.

केश्यग्निं केशी विषं केशी बिभर्ति रोदसी  केशी विश्वं स्वर्दृशे केशीदं ज्योतिरुच्यते ॥१॥
मुनयो वातरशनाः पिशङ्गा वसते मला  वातस्यानु ध्राजिं यन्ति यद्देवासो अविक्षत ॥२॥

(ऋ. १०.१३६.१-२) 

1. HE with the long loose locks supports Agni, and moisture, heaven, and earth:
He is all sky to look upon: he with long hair is called this light.
2 The Munis, girdled with the wind, wear garments soiled of yellow hue. They, following the wind's swift course, go where the Gods have gone before.
 (Trans. by Griffith)

To the Vedic, at their initial stage of understanding the meaning of the Atma, they associated the soul with the wind, invisible but that could be sensed, quite contrary to what the term actually meant to Indian Samanic thinkers. The idea Vedics took was obviously fantastic grafting it in the Vedic sense in the absence of alternative terminology. It normally happens that while borrowing ideas or concepts, people often tend to use their own terminologies while attempting to fit new concepts in their environment. Vedic Aryans settled in Magadha and applied their word “Yuj” as “yoga” to explain the phenomena of attaching the individual soul to the universal self. However, the understanding of the Samanik thinkers was that the cosmic soul and individual soul were one and the same.  

The provenance of any concept thus gets blurred by applying a new term for the original which has a different meaning. This often creates confusion in the minds of the students of the later generations, making them unsure of what really transpired in the past. Yoga term became obviously the victim of this tendency.

Vrata was a synonym for equanimity to Indian Samanic thinkers, as they never thought to connect something with something in duality as they thought of oneness between the cosmic soul and the self to which they gave the term Moksha, i.e. emancipation from the perpetual cycle of birth and death. To achieve this one needed to perform Vratas i.e. spiritual practices. Though physical postures were thought to be essential for beginners, they were never thought to be an essential part of spirituality.

When Upanishada says “Aham Brahmasmi” (Brihadaranyaka Upanishad 1.4. 10), it clearly echoes Samanik thought. When inner foes are defeated, the person's soul dissolves in the supreme cosmic entity, thus, such a person is called Jina.  Brahma here is the cosmic soul. Here yoking (yoga) does not carry the proper meaning that is intended by the original term “Vrata”.  

Vedics too, as always in the quest for mundane pleasures, praying to their abstract deities through the Fire Sacrificial rituals, began to understand that outer efforts were not sufficient to attain supreme fulfillment and eternal bliss; they started following age-old Samanic principles, adding self-innovated elements, and advocating it in a new garb under the title of the Yoga, avoiding the original term “Vrata” because they might be comfortable with this term. Yoga, as a spiritual means to attain emancipation, entered the Vedic stream in such a manner. Controlling the mind and yoking the mind with the divine has a fundamental contrast.

Patanjali of Yogsutra stresses upon restraints on chitta, vrutti, i.e. “Yoga is the control (nirodhah, regulation, channeling, mastery, integration, coordination, stilling, quieting, setting aside) of the modifications (gross and subtle thought patterns) of the mind field.” (Patanjali Yogsutra 1.2) This nothing has to do with yoking. In fact, Patanjali is repeating Jain philosophy which principally asks for restraints on the thoughts and actions (Karma) that bring disorder. Originally, Jaina's thoughts go far ahead, which asks for not just restraints but winning over the disorder. Vedic people, what we can understand from their philosophy as appears in the Vedas, were hedonists; their prayers to their abstract gods were for the victories in the wars and for the wealth. They strived to live as long as a hundred years. The term “Atma” does not appear in the Vedas in the same sense that is fundamentally considered in the Samana terminology. In the absence of this term, the term Yoga is left with no meaning. This only means that Yoga in the modern sense is a later development in the Vedic stream of philosophy.

We are aware of the fact that to reach a certain destination, there is a beginning, which always is uncertain and filled with difficulties, and crude understandings as one proceeds the vision clears gradually, and when one reaches the ultimate goal the vision is clear. The Samana tradition began with a feeling of equanimity between all the souls which gradually reached towards the oneness which meant salvation from the karmic cycle. Yoga could put this goal before the seekers because there was a solid background built by the Samanic tradition.

The Yoga in Jaina tradition

As the meaning of Jaina is ‘The victor over inner disorders”, it can explain the provenance of the Yoga. The Jaina tradition credits the first Tirthankara as an inventor of Yoga. Rishabhnatha has proven to be a historical figure and his time is estimated between 3000 and 2700 BC. In the absence of other comparative sources, it can be safely stated that the Samana movement began with Rishabhnatha which branched later in many philosophical schools giving different philosophical dimensions resulting in several sects.

I have explained that the Yoga term was accepted by overall philosophical sects, the original term was “vrata” (vows), and the people who strictly followed the Vrata practice were used to be called Vratyas.  From the descriptions, we understand that the Vratyas were mendicants who had renounced the world owing to their vows. Jaina ideology fundamentally stands on the concept of Vratas (Vows), such as Ahimsa, Satya, Asteya (non-stealing), celibacy, and non-possessions at the very initial stage. Vrata was the foundation of the alternative term Yoga since it too essentially needed restraints on human tendencies. Patanjali also adds these five mahavratas of Jainism as yamas in his Yogsutra.  In the later course of the time the term, Vratya for yogi was defamed owing to the supremacist tendency of the Vedics, who tried hard to take credit for the novel concepts that didn’t belong to them. Thus, by the third century BC, the alternate term Yoga acquired fame though the basics of yoga remained the same, i.e., Vratas.

In fact, Yama those are Vratas or vows is the first limb of the Yoga as described by Patanjali. Niyama is the second limb that involves supporting vows (vratas) and then only comes asanas (bodily postures).

The fifth Jain Agama “Bhagavati Sutra” Lord Mahavira’s teachings have been recorded and were committed to writing in 466 AD during the last Jaina council held at Vallabhi. Till then the text was preserved by oral tradition. In this sutra, Lord Mahavira explains to Somila that his lifestyle is of six types, 1. Tapas, 2. Niyama, 3. Sanyama, 4.svadhyaya, 5. Dhyana, and 6. Avashyaka (observance of essential duties (vratas) with self-awareness.).  (Sudharma Swami’s Bhagavati Sutra, Vol.1, Translated by K.C. Lalwani, pub. Jain Bhavan, Calcutta, 1999).

Patanjali has co-related these essentials in Yogsutra under different names under title Niyamas. Saucha (शौच) means mental purity to Jainas but Patanjali stresses on bodily purity. Though Jainas had accepted Asana (bodily posture) as one of the limbs of Yoga, under the title Kayaklesh-tapa, and the sixth kind of external tapas, Patanjali treats asanas as sadhana. Thus various limbs of Yoga as discussed in Yogasutra have been elaborated under different titles and with different perspectives. Yogsutra can be said a further expansion of the Jaina or Samana way of meditation as a means to get salvation.

The Provenance of the Yoga system belonging to Samanas or Jains is obvious for the gradual progressiveness that can be tracked in Jaina canons. The Jain yoga was centered on a fourfold path of emancipation, 1. Right faith, 2. Right knowledge, 3. Right conduct, and 4. Right austerity.  Although the paths under different heads have been applied by other schools also in later times, the fundamentals never changed. Yoga originally meant Vrata to the Jainas or the masters of the samana movement. Vrata obviously was the earliest term for yoga since Vrata needed certain observances that became key foundations of the Yoga philosophy as described later by Patanjali. Vratyas, described by early Vedic Aryans, were the Yogis of those times whose practice was new to them. Vrata was always an individual effort to attain enlightenment for emancipation; it had nothing to with yoking self with the outer supreme force. In the earliest part of Jain philosophy yoga meant a process through which the impulses of karma adhered to and hence occluded the luminosity of the soul. However, according to Christopher Key Chapple  “Responding to a shift in cultural usage of this term that probably arose during the later Upanisads, Jaina thinkers began to describe their religious practice in light of new definitions of Yoga as referring to techniques employed to achieve a state of mental quiescence.” (Yoga in Jainism, Edited by Christopher Key Chapple, pub.-Routledge, 2016, page 10)

This only means that though the terminologies changed over time original essence remained the same even in Upanishads.  This is why the samanic impact over the Upanishads is quite obvious though the Upanishads have used alternate terminologies under Vedic influence. 

Equanimity was and is the foundation of the Vrata or Yoga, the soul of the Saman (समण) tradition. The word Saman in the Prakrit language means “One who looks at everything with equanimity”. The Bhagavati Aradhana (Gatha 70, Vijayodaya Tika) defines the word Saman as “Samano” “Samano” samanasya bhavo samanan,  quchipadpynugata ragadweshata samata samanna sabdenochyate.” This means that the spirit of the Saman is equality. Samanna is equanimity which does not hold grudges against anything. Hargobind Seth’s Prakrit Dictionary also gives the meaning of Saman as "one who sees all beings with equal vision". It was obvious that the Saman tradition though first felt equality in all beings later developed the thought towards equanimity with the cosmic soul. It was the progressive nature of the thought which is not traceable in the Vedic stream.

Who was Patanjali?

Patanjali is credited with the codification of Yoga. He is a legendary person whose origins are shrouded in various mythical stories of his origin and time. He is often called the father of modern yoga. Also, there are heavily fought debates about whether Patanjali of the Yogsutras and Patanjali of Mahabhashya are one and the same or they are different personalities of different times. The time estimated for Patanjali by different scholars ranges from the second century BC to the fourth century AD. In my opinion, the Sutra style was invented after the third century AD and since Yogsutra is written in the Sutra style it only could have been written during the third to the fifth century. Umaswati of the Jain stream codified the Jaina Yoga under the title “Tattvarth Sutra” during this time. Though we have very little to go we safely can say that Umaswati’s Samana thought must have influenced Patanjali. Umaswati begins his text with a statement "Right faith, right knowledge, and right conduct constitute the path to liberation", the key philosophy of Samanism.

Patanjali, despite all the legends associated with him, is in unison related to the Naga cult and Shaivait tradition. This only means that he was not from the Vedic tradition. The Yoga he expounds is the accumulation and proposition of the Samanik Vrata or Yoga. He gives importance to the Vratas, calling the mahavratas or supreme vows. In Shaivait tradition also the Vratas find a significant place.

Sagarmal Jain states in his article published in the book “Yoga in Jainism” edited by Christopher Chappel that the ‘Samatva’ yoga is the principal concept underlining Jainism. To Jains, it is the first and foremost duty of both the monks and householders. Yoga to Jaina is the observance of equanimity, viewing all living beings as one. And to me, this is the objective of Vrata or yoga. Vedic system, on the contrary, is based on inequality by classifying human society in diminishing order, thus denying the very principle of equality.

Philosophically, the meanings of yoga can be taken individually differently, and goals also can be set individually, asanas, dhyana, or dharana can be practiced differently, but the goal remains the same, equanimity with the cosmic self. To achieve this one needs to follow vratas which were explained by the Jaina, the founders of the Samana movement…a movement of equanimity. The Vedic groups that settled in the Magadha region borrowed the concept, but as can be seen, the Vedic Aryans who were settled in Aryavarta never applied the principle of equanimity in social life. The Atharv Veda and Upanishads emerged in the Magadha region, and not in Aryavarta can be seen through the annals of history. However, the Vedic Aryans settled in Magadha too could never touch the fundamental philosophy propounded by the ancient Jains.  

To conclude the above article, the following points must be stressed-

1.       Vrata was the original name of the Yoga and those who followed the path of Vrata were called Vratya’s.

2.       Samana, an ancient Indian tradition of equanimity was the founder of the Vrata alias Yoga system.

3.       Jaina, being progenitors of the samana (Equanimity) tradition can be credited with the foundation of Yoga.

4.       The Vedic stream adapted the Vrata tradition from the Vratyas in the form of yoga and propagated it, though they couldn’t erase its origin.

5.       Patanjali belonged to the non-Vedic Shaivait stream and he used all the previous streams to codify Yoga in his treaty ‘Yogsutra’ between the third to fifth century AD., just around the time when Umaswati composed his treaty “Tatvarth Sutra” on Jain Philosophy in sutra style.

6.       The Vedic community has nothing to do with the foundation of yoga as fundamental tenets of the term yoga go contrary to Vedic philosophy. It cannot have been evolved from the Vedic tenets.         

 

-Sanjay Sonawani 

जगज्जेता म्हणवणा-या अलेक्झांडरचा करूण अंत!


 


मल्ल जमातीच्या लोकांनी अलेक्झांडरचा चिवट प्रतिकार करून त्यालाच प्राणांतिक जखमी केल्यामुळे मल्ली व अन्य जमातींचे मानसिक धैर्य वाढणे स्वाभाविक होते. त्याच्यासोबत आलेले ग्रीक सैन्यही आता बंड करण्याच्या मन:स्थितीत आलेले होते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे धैर्य गळू लागले होते. नंद साम्राज्याच्या बलाढ्य सेनेची कीर्ती ऐकल्यामुळे ग्रीक सैन्याने पुढे जायचे नाकारले ही ग्रीक इतिहासकारांनी केलेली सारवासारव आहे, कारण नंद साम्राज्यापेक्षा विस्तीर्ण आणि शक्तीशाली अकेमेनिड साम्राज्याचा ग्रीक सैन्याने पराजय केलेला होता आणि आता तर अंभी आणि पोरससारखे भारतीय युद्धपद्धतीशी परिचित राजेही ग्रीकांसोबत होते. त्यामुळे नंद सैन्यशक्तीला घाबरून ते मागे फिरले या मतात तथ्य दिसून येत नाही. खरे कारण होते चंद्रगुप्त मौर्याच्या प्रेरणेने आणि नेतृत्वाखाली जे उठाव होत होते त्यांनीच ग्रीक सैन्य हादरून गेलेले होते. इतके कि आल्या मार्गाने परत जाणेही आता शक्य होणार नाही याची अलेक्झांडरला जाणीव झाली, कारण चंद्रगुप्ताने त्या भागातील जमातींना एकत्र करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे त्याने सिंधू नदीतुन अरबी समुद्रात प्रवेश करून मायदेशापर्यंत प्रवास करण्याचे आधी ठरवले खरे पण सिंधू काठच्या लोकांनाही सहज जिंकणे त्याला शक्य होईनासे झाले. त्यात सिंधू नदीच्या त्रिभुज प्रदेशातून समुद्रात प्रवेश केला तरी पर्शियन आखातातून ब्यबीलॉन पर्यंत कसा प्रवास करता येईल हेही त्याला माहित नसल्याने त्याने समुद्रमार्गे प्रवास रद्द केला. त्याने आपले सैन्य दोन भागात विभागले. निआर्कुस या दर्यावर्द्याच्या नेतृत्वाखाली त्याने अर्धी सेना सूसा या बंदराच्या दिशेने पाठवली. या निमित्ताने पर्शियन खाडी मार्गाचेही अन्वेषण होईल अशी त्याची कल्पना होती.

 

निआर्कुसने पट्टाला (आजचे ब्राह्मणाबाद) येथून झेलम नदीकाठीच तयार केलेल्या जहाजांतून अर्धे ऐन्य सोबत घेऊन जलप्रवास सुरु केला. पण प्रतिकूल हवामानामुळे त्याला त्रिभुज प्रदेशातील एका नदीप्रवाहावर अडकून पडावे लागले. पण त्याचे दुर्दैव असे कि तेथील मच्छिमार जमातींनी अजिंक्य ग्रीक सैन्याला भयंकर त्रस्त केले. शेवटी निआर्कुसला आपल्यासोबत आलेल्या सैन्याचा बचाव करण्यासाठी तटबंद्या बांधून जीव वाचवावे लागले. तेथे महिनाभर घालवल्यानंतर निआर्कुस कसाबसा आजच्या कराची बंदरापर्यंत पोहोचला. पण सैन्याला आता अन्नाची ददात पडू लागली होती. शेवटी त्याच्या एका सेनाधिका-याने लुटपाट करून अन्न गोळा केले आणि पुढील प्रवास किना-या-किना-याने सुरु केला. तरीही त्यांना आपण पर्शियन आखातापर्यंत पोहोचू शकू याचा विश्वास वाटेना. शेवटी मकरान किना-यावरील एका दर्यावर्द्याने त्याला मार्गदर्शन केले त्यामुळे ग्वादार बंदरापर्यंत त्यांना पोचता आले. निआर्कुसने अरेबिया जिंकावा अशी अलेक्झांडरची इच्छा असली तरी ती मात्र पूर्ण होऊ शकली नाही. त्याचा जलप्रवास सूसा (दक्षिण इराण) येथे संपला. पण त्याच्यासोबतच्या सैन्याचे पुष्कळ हानी झालेली होती.

 

अलेक्झांडर उर्वरीत सैन्य घेऊन मकरान वाळवंटातून (सध्याचे बलोचीस्थान) निघाला. हा मार्ग त्याने का निवडला असावा याबाबत अनेक तर्क-वितर्क झालेले आहेत. येताना तो खैबर खिंडीतून आला होता तर परत जातांना बोलन खिंडीचा मार्ग त्याने निवडला यामागे कारण हेच होते कि वाळवंटी प्रदेशातून जाताना तेथील विरळ लोकसंख्येमुळे आपल्याला विशेष प्रतिकार होणार नाही अशी त्याची कल्पना होती. ते थोडे खरे असले तरी निसर्ग हाच त्याचा शत्रू बनू शकेल अशी कल्पनाही त्याने केली नाही. बलोची लोक आणि मकरान किना-यावरील मच्छीमार लोकांनी ग्रीक सैन्याला पराकोटीचे त्रस्त केले. त्यात ग्रीक सैन्याची अपार हानी झाली. या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष हा ग्रीकांचा मोठा शत्रू बनला. पाणी जपून वापरावे लागत असल्याने स्वत: अलेक्झांडरही सैनिकांना मिळते तेवढेच पाणी पिऊ लागला. सैन्याचे मनोधैर्य टिकवणे महत्वाचे होते पण त्यात यश मिळवणेही शक्य नव्हते. अन्नाचेही दुर्भिक्ष जाणवू लागल्याने हजारो सैनिक भुकेने मेले. कशीबशी बोलन खिंड त्याने उरल्या-सुरल्या सैन्यासह पार केली खरी पण त्यानंतर सुरु झाले इराणमधील गेड्रोशियन वाळवंट. त्याने अलेक्झांडर आणि त्याचे सैन्य अक्षरश: मेटाकुटीला आले. आपण परत मायदेशी पोहोचू शकणार कि नाही या भयाने अनेक सैनिकांना पीडले. काही आत्महत्याही झाल्या. स्वत: अलेक्झांडर या प्रवासात आजारी पडला.

 

या प्रवासात त्याने कल्याण नामक दिगंबर जैन साधूला सोबत घेतले होते. या प्रवासादरम्यान कल्याणने अलेक्झांडरला त्याच्या हताश मन:स्थितीबाबत जन्म-मृत्यूचे रहस्य सांगत विजय-पराजय हे कसे मानवी जीवनातील व्यर्थ भावना होत हे सांगत असे. एकदा त्यांचा तात्विक वाद झाल्यानंतर कल्याणने आपल्यासाठी चिता रचण्यास सांगितले. अलेक्झांडर हे ऐकून हादरून गेला. कल्याण त्याला म्हणाला कि मृत्यूचे स्वागत कसे करायचे हे मी तुला दाखवून देतो. अलेक्झांडरने त्याला परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण कल्याण बधला नाही. सूसा  येथे असताना अलेक्झांडरचा सेनानी टोलेमीने कल्याणच्या आग्रहास्तव चिता रचली. भडकत्या अग्नीज्वाळात कल्याणने उडी घेतली अलेक्झांडरला म्हणाला कि “आपण ब्याबिलोनला भेटू!” आणि कसलाही आक्रोश न करता भस्मसात झाला. ही घटना इसपू. ३२३ मध्ये घडली. सर्व ग्रीक इतिहासकारांनी या घटनेचे वर्णन केले आहे. या घटनेमुळे तो तरुण वयातच मृत्यूबद्दल तो उदासीन झाला असावा असा अंदाज आपण बांधू शकतो.

 

यानंतर अलेक्झांडरचे आजारपण बळावत गेले आणि त्याचा ब्यबिलोन येथे पोचल्यानंतर इसपू ११ जून ३२३ रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यावेळेस तो अवघ्या बत्तीस वर्षाचा होता. जगज्जेता म्हणवला गेलेला अलेक्झांडर भारतातून पराजित होऊन अशी दुर्दशा होऊन मृत्यू पावला. आज त्याच्याबद्दल ज्या गौरवशाली कथा प्रचलित आहेत त्या बव्हंशी वदंता आणि त्याने सोबत नेलेल्या इतिहासकारांनी अर्थातच त्याच्या बाजूने लिहिलेल्या इतिहासामुळे. तो महान नव्हता हे खरे असले तरी तो एक योद्धा होता आणि त्याने अकेमेनिड साम्राज्य नष्ट केले हे त्याचे कर्तुत्व आहेच हे निर्विवाद आहे. भारताने मात्र त्याच्या नाकी नउ आणले आणि त्याचा प्रणेता होता चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्ताची ही बाजू दुर्दैवाने लोकांना माहित नाही कारण भारतीय पुराणांनी त्याचा आणि ग्रीक आक्रमणाबद्दल अवाक्षरही काढलेले नाही.

 

अलेक्झांडरला भारताबाहेर हाकलल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य नंद साम्राज्याकडे वळाला. परकीय आक्रमण होऊनही नंद सम्राट पुढे आला नाही हे शल्य अर्थात होते. भारताला एका अशा साम्राज्याची गरज होती जे परकीय आक्रमण परतवून लावेल. नंद सम्राटाला पराजित केल्याखेरीज ते शक्य नाही हे ओळखून गणराज्यांतील लढाऊ लोकांची मदत घेऊन त्याने अजून नवा संघर्ष सुरु केला! त्याबाबत पुढील लेखात.

 

-संजय सोनवणी

 

Wednesday, June 19, 2024

जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा

 

प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा

- डॉ. महावीर अक्कोळे

इतिहास, संस्कृती, धर्म आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक श्री. संजय सोनवणी यांचे ‌‘जैनांचे मराठी भाषेतील योगदान' हे नवे पुस्तक चिनार पब्लिशर्स पुणे व ‌‘सरहद इंटरनॅशनल स्कूल ऑफ जैनिझम' यांनी प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठापासूनच हे पुस्तक लक्षवेधी आहे. श्रवणबेळगोळ येथील शुध्द मराठीतला प्राचीन शिलालेख आणि अक्षी इथला महाराष्ट्री प्राकृतातला त्याही आधीचा शिलालेख आणि मध्ये भगवान गोमटेश्वराच्या भव्य मूर्तीचा सुंदर चेहरा असे हे मुखपृष्ठ लक्ष वेधून घेण्याबरोबर कुतुहलही जागृत करते.

मूलत: सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या व बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या संजय सोनवणी यांच्या प्रत्येक पुस्तकात ज्ञानाचा प्रचंड साठा खजिनाच वाचकाला मिळत असतो तसा तो याही पुस्तकात आहेच!

अतिशय सुबोध आणि रसाळ शैलीत सोनवणी यांनी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या जैनांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा व ती लिहिणाऱ्या लेखकांचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या लेखनातून मानवी संस्कृतीची एकात्मता कुठलाही अभिनिवेष न बाळगता प्रकट होताना दिसते. त्यांना असणारे प्राचीन संस्कृती आणि त्यामधली चकित करणारी जीवनरहस्ये यासंबंधीचे अपार कुतुहल आणि त्यातून सुरू झालेली संशोधनयात्रा यातून हे पुस्तक आकाराला आलेले आहे. वाचकाच्या मनातसुद्धा हे छोटेखानी पुस्तक तेवढेच कुतुहल-जिज्ञासा निर्माण करते हे त्यांच्या लेखनाचे सामर्थ्य आहे.

भाषा, लिपी व ग्रंथनिर्मिती याबाबतीत प्रस्थापितांकडून आजवर नकळत वा मुद्दाम रूजविल्या गेलेल्या व आपणसुद्धा लहानपणापासून शिकलेल्या अनेक (गैर) समजांना दूर करीत संजय सोनवणी यांनी काही धक्कादायक वास्तवे पुराव्यासह या पुस्तकात नोंदवली आहेत.

वर्तमान परिस्थितीत मराठीला ‌‘अभिजात भाषे' चा दर्जा मिळावा यासाठी मराठी साहित्य जगताचा, मराठी भाषातज्ञांचा आणि मराठी राज्यकर्त्यांचा आटापिटा चाललेला आपण गेली अनेक वर्षे बघतो आहोत. सोनवणी असे ठामपणे सुचवितात की ‌‘प्राचीन काळी जैनांनी लिहिलेल्या श्रेष्ठ दर्जाच्या साहित्य कृती पाहिल्या तर मराठी अभिजात आहे याची खात्री कोणालाही पटेल.' पुढे ते अशी तक्रार करतात की, ‌‘तथापि आजच्या मराठी अभ्यासकांनी या साहित्याकडे दुर्लक्षच केले आहे.' माझ्या मते तर जैन मराठी अभ्यासकांनीही या प्रांताकडे दुर्लक्षच केले आहे. डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, डॉ. विद्याधर जोहरापूरकर, माधव रणदिवे अशा काही मोजक्या जैन संशोधकानंतर प्रा.डॉ.गोमटेश्वर पाटील यांच्याशिवाय या विषयात फारसे स्वारस्य कुणी घेतलेले आढळत नाही. नव्या जैन अभ्यासक संशोधकांनी पुढे यायला हवे.

संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा असून तीच सर्व भाषांची जननी आहे असे आपण सर्वजणच लहानपणापासून ऐकत-शिकत आलेलो आहोत. पण भाषेच्या संशोधनातून पुढे आलेले निखळ सत्य असे आहे की संस्कृत भाषा ही प्राचीन मराठीच्या उगमानंतर कितीतरी उशीरा निर्माण झालेली भाषा असून तिच्यापासून मराठीच काय जगातील कोणतीही भाषा निर्माण झाली नाही हे आता जगातले जवळपास सगळे भाषातज्ञ मान्य करतात हे सोनवणी यांनी पुराव्यासह दाखवून दिलेले आहे. उलट प्राचीन प्राकृतातूनच संस्कृत भाषेची निर्मिती केली गेली असावी असे मानण्यास जागा आहे असे ते म्हणतात.

आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सोनवणी अगदी ठामपणे मांडतात ती ही की भारतातले तमाम सनातनी हिंदू आग्रहाने प्रतिपादन करीत असतात व आपणही लहानपणापासून शिकत आलो की वाल्मिकी रामायण हे पहिले (आद्य) रामायण आहे व बाकीची त्यानंतरची आहेत'- असे नसून प्राचीन ‌‘महाराष्ट्री प्राकृता' त लिहिले गेलेले जैन महाकवी विमलसुरी यांचे ‌‘पउमचरिय' हे महाकाव्यच आद्य राममहाकाव्य आहे. वाल्मिकी रामायण इसवीसन तिसरे ते पाचवे शतक या दरम्यान लिहिले गेले आहे तर विमल सुरींचे ‌‘पउमचरिय' हे रामहाकाव्य त्या आधी तीनशे ते पाचशे वर्षे म्हणजे इसवीसनाच्या चार साली लिहिलेले आहे. हे आश्चर्यकारक तथ्य सोनवणी संशोधकांच्या व भाषातज्ञांच्या संशोधनातून आलेल्या पुराव्यांच्या आधारे ठामपणे मांडतात. ‌‘अयोध्या' नगरीचे मुळ नाव ‌‘विनिय' वा ‌‘विनिता' हे होते व या नगरीची स्थापना प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ यानीच केली. पुढे हे नाव ‌‘इक्ख्खागु' झाले व नंतर इसपू. सहाव्या शतकापूर्वी आयोध्येचे नाव ‌‘साकेत' (सागेय-साएय) हे कायम झाले. पुढे गुप्तकाळात साकेत हे नाव व्यवहारातून पूर्णपणे बाद होऊन ‌‘योध्या' हे नाव रूढ झाले ही माहिती आपल्याला आश्चर्यचकित करते.

या छोटेखानी ग्रंथात संजय सोनवणी आपल्याला आद्य राममहाकाव्य ‌‘पउमचरिय' बरोबरच पादलिप्ताचार्यकृत ‌‘तरंगवई', अज्ञात जैन लेखकाने लिहिलेल्या ‌‘अंगविज्जा', संघदासविरचित ‌‘वासुदेवहिंडी', आचार्य हरिभद्र विरचित ‌‘समरादित्यकथा' ‌‘धुर्ताख्यान', उद्योतनसुरि विरचित ‌‘कुवलयमाला' आणि कौतुहल विरचित ‌‘लीलावई' अशा प्राचीन मराठीत लिहिलेल्या एकाहून एक सरस साहित्यकृतींचा कथासूत्रासहित, वैशिष्ट्यांसहित अत्यंत रंजक परिचय करून दिला आहे.

खरे तर सोनवणी संस्कृतच्या प्रभावाखाली तयार झालेल्या प्राचीन मराठीच्या ‌‘महाराष्ट्री प्राकृत' या संज्ञेलाही मान्यता देत नाहीत. प्राचीन मराठीचे खरे आद्य नाव ‌‘मरहठ्ठी पाइय' वा ‌‘महारठी पाअड' असेच आहे असे ते दाखवून देतात.

एकंदरीत भाषेच्या अभ्यासकांसाठी, रामायणाच्या संशोधकांसाठी, खरा इतिहास जाणण्याची आस असणाऱ्यांसाठी आणि प्राचीन मराठी जैन वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी संजय सोनवणींचे हे पुस्तक खूप महत्वाचे आहे. शेवटी एका अजैन इतिहास संशोधकाने प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा साधार पुराव्यासहित घेतलेला हा वाचनीय धांडोळा निदान वाचनाची आवड असणाऱ्या सर्व जैनांनी तरी आवर्जून वाचावा असाच आहे.

 

जैनांचे मराठी भाषेतील योगदान

लेखक : श्री. संजय सोनवणी

प्रकाशक : चिनार पल्बिशर्स, पुणे व

सरहद इंटरनॅशनल स्कूल ऑफ जैनिझम

पृष्ठे- 104, एप्रिल 2024

किंमत : 200/-

संपर्क : 8805530259

योगाचे निर्माते- प्राचीन जैन तत्वज्ञ


योगाचे प्राचीन नाव ‘व्रत’

 

योग हा प्रथम उपनिषदांमध्ये विशद केला आहे असे मानले जाते. उपनिषदे वेदांचे शेवटचे भाग मानले जातात म्हणून त्यांना वेदांत असे म्हणण्याचीही प्रथा आहे. प्रत्यक्षात उपनिषदात येणारे तत्वज्ञान हा ऋग्वेदात येणा-या भौतिकवादी विचारांचा तार्किक विस्तार असू शकतो की नाही यावर वाद झाला आहे व पुढेही होत राहील प्रत्यक्षात मात्र उपनिषदे ज्या अध्यात्मिक क्षेत्रांचा शोध घेतात त्यामागील अध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी केल्या जाणा-या विधीविधानांत दोन धृवाचे अंतर आहे असे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे दोन्ही तत्वद्न्याने एकमेकांना जोडणे ही अभ्यासकांची गंभीर चूक असू शकते.

उपनिषदात वापरलेल्या संज्ञा या वैदिक सद्न्यांशी मुळात मेळ खात नाहीत हे याचे पहिले कारण. उदा. उपनिषदांमध्ये "ब्रह्म" हा शब्द येण्यापूर्वी, "यक्ष" (ज्याचा अर्थ अद्भुत प्रकाश) हा वेदांना तसा अज्ञात असलेला शब्द ब्रह्मसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला गेलेला आहे. येथे लक्षात घेण्याची बाब ही आहे कि उपनिषदाची निर्मिती सध्याच्या बिहार व सभोवतीच्या प्रदेशात झालेली आहे जेथे यक्ष संस्कृतीची पूर्वापार भरभराट होत होती. वैदिक आर्यांनी या प्रांताला कीकट असे संबोधले असून या प्रांताचा अगदी ब्राह्मणकाळापर्यंत तिरस्कार केला जात असे. या प्रदेशात असुरांची संस्कृती असून तेथील भाषा आणि धर्म हे त्यांना सुरुवातीला अनाकलनीय होते. यक्ष शब्दाचा  रूपकात्मक वापर “ब्रह्म” या शब्दाच्या समानार्थी केला गेला कारण तोवर काही वैदिक आर्य मगध प्रांतात प्रवेशले व स्थिरावले होते. त्यांनी लोक संस्कृती आणि तेथही प्रबळ असलेल्या समण संस्कृतीतून अनेक संकल्पना उधार घेतल्या हे उघड आहे. शिवाय, त्यांनी वैदिक सद्न्याना नवे अर्थही दिले. उपनिषदातील ब्रह्म व ब्रह्मन हा शब्द ब्राह्मण या शब्दाशी दुरान्वयानेही संबंधित नाही. वेदात  "ब्रह्म" हा शब्द मंत्र या अर्थाने आला आहे, तर उपनिषदांमध्ये तो विश्वनिर्मितीचे अद्भुत कारण या अर्थाने आला आहे. याचाच अर्थ मूळ संज्ञा वापरताना त्यांचे अर्थ मात्र व्यापक केले गेले तसेच काही संज्ञा स्थानिक संस्कृतीतून घेतल्या असे आपल्याला म्हणावे लागते. उपनिषद तत्त्वज्ञान देखील वेदांशी जोडले जाऊ शकत नाही कारण दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, तरी उपनिषद हे वेदांचे शेवटचे भाग आहेत असा मोठा दावा केला गेला आहे आणि त्यांना वेदांत अशीही संज्ञा दिली त्यामुळे आपण उपनिषदांना वैदिक परंपरेत टाकतो, पण ते वास्तव नाही.

शारीरिक किंवा मानसिक-अध्यात्मिक क्रियाकलाप आणि त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट करण्यासाठी "योग" या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. शाब्दिक स्वरूपात, ‘युज (Yuj) हा शब्द वेदांमध्ये घोड्यांना रथाशी जोडण्याची प्रक्रिया म्हणून आढळतो. हे फक्त एका क्रियेचे वर्णन करते जे प्रवासासाठी रथ तयार करण्यासाठी आवश्यक आहे. योग या शब्दासाठी आपण घेतलेल्या नेहमीच्या अर्थाशी त्याचा काहीही संबंध नाही. शब्दकोषांमध्ये दिलेले सुमारे शंभर समानार्थी शब्द योगाचे चाळीस पेक्षा जास्त भिन्न अर्थ देतात. या शब्दाचा अध्यात्मिक वापर प्रथम तैत्तिरीय उपनिषदाच्या उत्तरार्धात दिसून येतो, जे विशेषत: ध्यान आणि ब्रह्मविद्येची आवश्यकता विशद करते, ज्यामुळे कर्मचक्रापासून सुटका होते. योग शब्दाचा वापर येथे वैश्विक आत्म्यात “स्व” ला विलिन करण्याच्या शारीरिक आणि मानसिक क्रीयांशी संबंधित आहे.. कर्म आणि पुनर्जन्म यांच्याशी संबंधित रूपकाच्या रूपात हा मूळ शब्द "योग" चा विस्तार आहे. तैत्तिरीय उपनिषदाचा काळ हा ख्रिस्तपूर्व पहिल्या सहस्रकाचा पूर्वार्ध असावा असा वेगवेगळ्या विद्वानांचा अंदाज आहे. पॅट्रिक ऑलिव्हेलच्या मते, तैत्तिरीय उपनिषद हे महावीरपूर्व काळात, शक्यतो इसपूच्या सहाव्या ते   इ.स.पू.च्या पाचव्या शतकाच्या दरम्यान लिहिले गेले असावे.  आम्हाला श्वेताश्वतर आणि मैत्री उपनिषदांमध्ये योग या शब्दाचा आणखी अर्थविस्तार झालेला आढळतो. या उपनिषदांचा काळ विद्वानांनी इ.स.पू. पाचव्या ते दुस-या शतकाच्या दरम्यान असावा असे निश्चित केले आहे. ब्रह्मविद्या किंवा आत्मविद्या विषद करणे हा उपनिषदांचा प्रधान हेतू आहे असे मानले जाते. पण प्रत्यक्षात तीनही वेदांत योग, ब्रह्म किंवा आत्मा हा शब्द अत्यंत वेगळ्या अर्थाने वापरला गेला आहे. मग हा अर्थबदल नेमक्या कोणत्या प्रभावाखाली झाला हे शोधणेही महत्वाचे ठरून जाते.

वेदांमधील वैदिक आर्यांच्या तात्विक विचारांचा जरा विचार केला तर अतिशय विरोधाभासी चित्र दिसते. उपनिषदांच्या विपरीत, वैदिक जग यज्ञाच्या विधींवर केंद्रित आहे ज्यामध्ये प्रमुख ते गौण देवतांना यज्ञात हवी देवून प्रसन्न करणे आणि भौतिक ऐश्वर्य ते शत्रूंवर विजय मिळावेत या कामना सामाविष्ट आहेत. काही ठिकाणी ऋग्वेदात ऋचा  ५.८२.७, ६.४४.८, ९.११३.४, १०.१३३.६ आणि १०.१९०.१ आणि सुक्त १०.११७ मध्ये मूलभूत नैतिक मूल्यांचा उल्लेख आहे, परंतु आध्यात्मिक विचारतत्वांचा सर्वस्वी अभाव आहे. ऋग्वेदात योग या शब्दाचा अर्थ फक्त रथांना घोडे जोडणे असा आहे. या शब्दाशी कोणताही आध्यात्मिक अर्थ नाही. आत्मा हा शब्द स्वतःला संबोधित करण्यासाठी वापरला गेला आहे,  स्वतःला व्यापणारे शाश्वत तत्व म्हणून नाही. शिवाय “ईश्वर” या शब्दाचा किंवा अशा सर्वव्यापी तत्वाचा वेदांमध्ये पूर्ण अभाव आहे हेही विशेष.

आत्मा हा शब्द नसताना आणि आत्मा जीवनाचे कारण आहे आणि आत्मा अमर आहे ही समजही अस्तित्वात नसताना वैदिक आर्य हे योगाचे निर्माते होऊ शकत नाहीत हे उघड आहे कारण विकास अस्तित्वात असलेल्या तत्वांचा होतो...अनुपस्थित तत्वांचा नाही.  अर्थविस्तार होऊ शकतो पण तो सांस्कृतिक देवानघेवाणीतून...पण एखादे तत्व असे अचानक जन्माला घातले जाऊ शकत नाही कारण त्यासाठी मानसिकतेची भूमी तयार व्हावी लागते तेव्हाच स्वतंत्र कल्पना सुचू शकतात, पण वैदिक आर्यांच्या प्रवासात, अगदी वेदोत्तर ब्राह्मण साहित्यातही अशा विकासाचे चिन्ह दिसून येत नाही.

उदाहरणार्थ, आत्मा हा शब्द ऋग्वेदात १०.१६८.४ मध्ये आढळतो. ऋग्वेदाचा हा भाग वैदिक आर्य भारतात आल्यानंतर लिहिला गेला. तोवर स्थानिकांच्या संपर्कात आल्याने वैदिक आर्य आत्मा या संकल्पनेशी परिचित झाले असले तरी ती संकल्पना त्यांना पुरेशी समजली नव्हती त्यामुळे त्यांनी आत्म्याची तुलना वायूशी व अन्नप्राप्तीच्या प्रार्थनेत केली.  "आत्मा देवां भुवनस्य गर्भोस्थिविशं चरति देवा एषः । घोषाऽ इदस्य शृण्विरे॒ न रूपं तस्मै॒ वात॑य हविषा॑ विधेम ॥ज्याचे विल्सनने केलेल्या भाषांतराचे भाषांतर असे कि,  देवांचा आत्मा वायुसारखा असून तो फिरत असताना दिसला नाही तरी त्याचे आवाज ऐकू येतात, त्याला आपण हवी अर्पण करूयात. हे देवांनो, या ह्वीसाठी आणलेल्या चार पायाच्या अन्नावर द्या कर.”  येथे वायू हा देवांचा आत्मा मानला गेला आहे. यात मुलभारतीय समण परंपरेतील आत्मा या शब्दाच्या मुलार्थाशी काहीही संबंध नाही हे उघड आहे. वायु, जरी दिसत नसला तरी, या ऋचेत म्हटल्याप्रमाणे तो ऐकू येतो. याचाच अर्थ असा कि मूळ सज्ञेस ते सुरुवातीला अस्पष्टपणे समजले आणि त्यांच्या कर्मकांडाच्या रूढ पद्धतीत त्याचा रूपकात्मक वापर केला.  

ऋग्वेदाची रचना सुमारे इसपू १५०० मध्ये झाली असावी असे साधारणत: मानले जाते. ऋग्वेदाचा बहुतेक भाग प्राचीन इराणमध्ये रचला गेला आणि 20% भाग वैदिक आर्य भारतीय उपखंडात आल्यावर रचला गेला. वर उल्लेखलेली ऋचा या भारतात वैदिक आर्य आल्यानंतरच्या काळात येथील समाजस्थिती आणि वेगवेगळ्या साधना पद्धती वापरणा-या लोकांशी परिचय झाल्यानंतर ही ऋचा अवतरते हेही येथे लक्षणीय आहे. एवढेच नव्हे तर दहाव्या मंडलात स्थानिकांकडून स्वीकारलेल्या अनेक नवीन देवता व संकल्पना अवतरतात व शूद्र (सुद्द) जमातीसारखी स्थानिक जमातही अवतरते जी वेदाच्या अन्य मंडलात कोठेही अवतरत नाही आणि आधी अवतरणा-या जमाती मात्र क्रमश: अदृश्य होत जातात.

त्यांच्या मुक्कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना स्थानिक लोकांच्या कर्मकांड आणि अध्यात्मिक पद्धतींचा परिचय झाला असे दिसते. जसे वैदिक आर्य कुरु-पांचाल प्रदेशाकडे सरकत गेले तसतसे ते नव्या जमाती आणि अध्यात्मिक गटांशी परिचित झाले. कुरु-पांचाल प्रदेशाला त्यांनी आर्यावर्त असे नाव दिले. येथवर वैदिक साहित्यात ते ज्यांच्याशी परिचित होत गेले त्यांच्याकडे पाहण्याचा आरम्भीचा दुषित दृष्टीकोन आढळून येतो. अथर्ववेदाच्या रचनाकारांनी असा दृष्टीकोन बाळगला नसल्याने त्यांनी उदार मनाने स्थानिक तत्वज्ञान आत्मसात करण्यात पुढाकार घेतला. उदा. एकीकडे व्रात्यकांड लिहून व्रात्यांचा (आद्य योगीचा) सन्मान करणारी सूक्ते अथर्वन ऋषी लिहित असताना त्यांना समकालीन आर्यावर्तात लिहिल्या गेलेल्या ब्राह्मण साहित्यात मात्र व्रात्यांची निंदाच केली गेली असल्याचे आपल्याला दिसते. उदा. लाट्यायन श्रौतसूत्रानुसार (८/५/२) व्रतीन म्हणजे लुटमार करून जगतात ते आयुधजीवी म्हणजे व्रात्य. व्रत करणारे व्रती व त्यांचा समुदाय म्हणजे व्रात्य अशी व्याख्या पाणिनीने केली असली तरी तत्पूर्वीच्या अन्य ब्राह्मण साहित्यात व्रात्यांची निंदाच केली गेलेली आपल्याला दिसते. पुढे मनुस्मृतीने तर १०, २१-२३ मध्ये ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य संस्कारलोप झाल्याने समाजच्युत झालेले ते व्रात्य असून त्यांची संतती हीन जातीय मानली आहे. सावित्रीपतितझाल्यामुळे-म्हणजे उपनयनाच्या संस्काराचा लोप झाल्यामुळे जातिभ्रष्ट झालेले असतात, ते व्रात्यहोत, अशा आशयाचा निर्देश मनुस्मृतीत आलेला आहे (२·३९). अधम, पतित, पाखंडी, भटक्या अशा लोकांची गणनाही व्रात्यांमध्ये केली जात असे. याचे कारण असे असणार कि व्रात्यांची जीवनपद्धती व अध्यात्मिक उद्देश न समजल्याने आर्यावार्तातच स्थयिक झालेल्या वैदिकांचा व्रात्यांविषयीचा दृष्टीकोन दुषित झाला असे म्हणणे भाग आहे कारण अथर्ववेदात मात्र “व्रात्यकांड” मध्ये व्रात्यांचा पराकोटीचा गौरव केला गेल्याचे आपल्याला दिसते. हा विरोधाभास का याचे कारण अथर्ववेद लिहिणा-याची वैदिक आर्यांची मानसिकता आणि ऋक ते सामवेद लिहिणा-या वैदिक आर्यांची मानसिकता यातील विभेद आहे. अथर्ववेद लिहिला गेला तो प्राचीन मगध प्रांतात आणि गंगेच्या खो-यात. तेथे व्रत  करणा-या व्रात्यांशी निकटचा संपर्क झाल्यानंतरच तेथे गेलेल्या वैदिक आर्यांच्या दृष्टीकोनात फरक पडला हे उघड आहे.

व्रत करणारे ते व्रात्य हा सरळ अर्थ आपण आजच्याच अर्थाने घेऊ शकत नाही. व्रत म्हणजे नंतर नवे नामकरण झालेला योग आणि व्रत करणारे व्रात्य म्हणजे आद्य योगी. योगासने, प्राणायाम इ. शारीरिक कायाक्लेशाची (शारीरिक स्थितीचे संतुलन) ही आरंभिक स्थिती असते आणि ती व्रतासारखेच पार पाडावी लागते त्यामुळे व्रती हा मुळचा शब्दच योगक्रिया योग्य प्रकारे विषद करतो, योगी हा शब्द नव्हे हे लक्षात घ्यावे लागते. पण आता पारिभाषिक शब्द तोच प्रचलित असल्याने त्या शब्दाचा वापर करावा लागत आहे, अन्यथा योग शब्दाचे किमान शंभर अर्थ आहेत आणि ते परस्पराला छेद देणारे आहेत हे आपण पाहिलेच आहे.

व्रतांचा (योगाचा) प्रारंभिक टप्पा

लिखित नोंदी नसताना, पुरातत्त्वीय पुरावे आणि तार्किक अंदाज यावरून, आपण योगाच्या (व्रतांच्या) सुरुवातीच्या टप्प्याचा अंदाज लावू शकतो. जरी आज, योग अनेक तत्वज्ञान-शाखांत वेगवेगळ्या अर्थांनी घेतला जात असला तरी, मूलतः, प्राथमिक अवस्थेत, त्याचा उपयोग शारीरिक आणि आध्यात्मिक क्रियाकलापांना एकत्र करण्यासाठी केला गेला असावा ज्यामुळे किमान मानसिक आनंद मिळू शकेल. तसे भारतीय प्राचीन काळापासून प्रतिमा किंवा मूर्तिपूजक आहेत. तंत्रशास्त्रांचा आरंभच मुळात लिंग पूजेतून झाला व त्याचे असंख्य पुरातत्वीय पुरावेही उपलब्ध आहेत. स्त्र्री-पुरुषातील समत्व भावना ही शिव व उमा यांच्या सायुज्ज्यतेतून स्पष्ट करण्यात आलेलीच होती. तंत्रशास्त्रांच्या आरंभिक विकासातूनच पूजा व आत्मतत्वाचा विकासही झाला होता. समण विचारकानी ही कल्पना विकसित करत व्यावहारिक जीवनाचा त्याग हे आद्य व्रत मानले. त्यातूनच व्रतांचा झपाट्याने विस्तार इसपू ३००० च्या आसपास होत गेला.

पूजा हा शब्द वेदांमध्ये आढळत नाही कारण ती त्यांची कर्मकांड प्रथा नव्हती. देवतांना संतुष्ट करण्यासाठी वैदिकांनी यज्ञाचे माध्यम वापरले तर भारतीय लोकधर्माने (ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो) पूजेचे माध्यम वापरले. त्याभोवती अनेक कर्मकांडे उभी केली. गूढ आकृत्या या आद्य मानवाच्या अनाहूत आकर्षणाचे केंद्रबिंदू बनल्या. पण पूजा ही प्रक्रिया बाह्य होती, आंतरिक नव्हती. मानवी  दुःख किंवा नैतिक समस्या दूर करण्यासाठी त्यांचा तेवढा उपयोग होत नाही हे आद्य विचारवंतांच्या लवकरच लक्षात आले. त्यापेक्षा आंतरिक मार्ग वापरून पहावा या प्रेरणेतून आद्य व्रतांचा उदय झाला. ही व्रते जशी बाह्य मुर्तीरुपी देवतांसाठी होती तशीच अंतर्मनात डोकावून पाहण्यासाठीही होती. ही अत्यंत प्रारंभिक अवस्था होती. पण या अवस्थेनेच अध्यात्माचा पाया घातला. कारण यामागे मानवाची शोधक प्रवृत्ती होती. जीवनातील दु:ख, विषमता आणि जन्म-मरणाच्या फे-यापासून मुक्तता या आरंभिक ध्येयांनी कालौघात याला तत्वद्न्यानाचा पाया द्यायला सुरुवात केली. वेगळे उद्देश्य, वेगळे मार्ग यामुळे अनेक शाखोपाशाखाही उत्तर काळात पडत गेल्या तरी अंतिम उद्दिष्ट निश्चित झाले आणि ते म्हणजे मोक्ष. या वैचारिक क्रांतीतून भारतात निर्माण झालेली पहिली चळवळ म्हणजे समण चळवळ. ही सर्व जीवांत समत्व पाहणारी चळवळ होती. या चळवळीनेच जीव आणि विश्वनिर्मिती तत्व यात समता पाहण्याची दृशी शोधली. ती दृष्टी मिळून त्या तत्वात विलीन होणे म्हणजे मोक्ष अथवा निर्वाण अशीही तात्विक झेप घेतली. आणि हे व्रत घेतल्याखेरीज शक्य नाही म्हणून व्रतालाच त्यांनी या साध्यासाठी साधन बनवले.

समण विचारवंतांत सुरुवातीपासून व्रत संकल्पनेला महत्व होते ज्याची जागा वैदिक भार्त्तात आल्यानंतर योग शब्दाने घेतली. व्रताचा उपयोग आत्मा शुद्ध करण्यासाठी केला जात असे. व्रताला संयमांची व नियमांची आवश्यकता होती जी नंतर योग या शीर्षकाखाली विशद केलेली आढळते. योग, आजही, आंतरिक शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी संयमांच्या व्रताच्या पालनाबाबत चर्चा करत असतो. आंतरिक विकारांच्या शत्रूवर विजय मिळवणे, म्हणजे जिन होणे हे तत्व प्रस्थापित झाले म्हणून समण विचारधारेचा जिन (म्हणजे जैन) हा पर्यायी शब्द बनला. हा आद्य अर्थाने धर्म नव्हता तर वैचारिक चळवळ होती आणि त्यात लोकधर्मातील विचारक वेगवेगळ्या कल्पना घेऊन एकाच उद्देशाने वैचारिक प्रगती करत होते. समत्व म्हणजे आंतरिक आत्मतत्वाची  विश्वाच्या निर्मितीतत्वाशी एकत्व साधण्याची प्रक्रिया व्रतातूनच घडू शकते याचा त्यांना विश्वास होता. त्यासाठी त्याग, अहिंसा, सत्य, अचौर्य आणि अपरीग्रहाचे व्रत पाळणे तर महत्वाचे होतेच पण त्याच वेळेस शरिर आणि मन यांची संतुलित अवस्था गाठण्यासाठी शरीराला विशिष्ट स्थितीत ठेवण्याचीही आवश्यकता होती आणि त्याचे पुरावे सुदैवाने आपल्याला सिंधू संस्कृतीतील मुद्रांवर मिळतात. ते पुरावे आजच्या यौगिक आसनांची पुर्वावस्था दाखवतात. हे पुरावे किमान इसपू २६०० वर्ष एवढे पुरातन आहेत जेंव्हा वेदांची रचनाही सुरु झालेली नव्हती.

इसवी सन पूर्व १२०० ते इसपू १०००च्या दरम्यान वैदिक आर्य भारतात आले असे मानले जाते. भारतात तेव्हा प्रतिमा/मूर्तीपूजा प्रधान धर्म सुस्थापित होता. ते भारतात शरणार्थी म्हणून आले असले तरी त्यांनी लोकधर्मातील काही देवतांचा समावेश वैदिक देवतामंडळात केला. (वैदिक संस्कृतीचा विकास, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राज्ञ पाठशाला, वाई.) त्याच वेळीस त्यांचा परिचय समण संस्कृतीतील (आता अनेक शाखात विभाजित झालेल्या) आगळी-वेगळी जीबनपद्धती  असलेल्या मानवी गटांशी झाला. त्यात केशी, मुनी आणि यती हे महत्वाचे घटक होत. ही संस्कृती देशभर वेगवेगळ्या नावांनी अस्तित्वात असली तरी त्यांच्याबाबत वैदिक आर्यांना सुरुवातीला माहित असण्याचे कारण तर नव्हतेच पण त्यांच्या जीवनपद्धतीमागील तत्वज्ञानही माहित असण्याचे कारण नव्हते कारण ते येथे तेव्हा नवागत होते.

पण त्यांनी या नवीन गटांचा उल्लेख ऋग्वेदात केला पण तो अर्थात आपल्या परिभाषेत बसवून.  केशी मुनीनाही त्यांनी यज्ञाग्नीशी रूपकात्मक पद्धतीने जोडले. उदा.

केश्यग्निं केशी विषं केशी बिभर्ति रोदसी  केशी विश्वं स्वर्दृशे केशीदं ज्योतिरुच्यते ॥१॥
मुनयो वातरशनाः पिशङ्गा वसते मला  वातस्यानु ध्राजिं यन्ति यद्देवासो अविक्षत ॥२॥

(. १०.१३६.-) 

“1. केसांच्या लांब सैल जटा असलेला तो अग्नी, आर्द्रता, स्वर्ग आणि पृथ्वीला आधार देतो:

तो पाहण्यासाठी सर्व आकाश आहे: लांब केस असलेल्या त्याला (केशीला) दिव्य प्रकाश म्हणतात.

2 हे मुनी, वायूच ज्याचे वस्त्र आहे आणि  पिवळ्या रंगाच्या मातीने शरीर माखलेले आहे ते वाऱ्याच्या योगाने ते देव जिथे गेले होते तिथे जातात.

येथे केशी म्हणजे जटाधारी मुनी ऋचाकर्त्याला अभिप्रेत आहे. आपण आज ऋषी-मुनी हा शब्द समानार्थाने वापरतो. पण जो वेदातील ऋचा लिहितो अथवा वेदमंत्र मुखोद्गत ठेवून पठण करतो तो ऋषी तर ज्याने मौन व्रत धरण केले आहे तो मुनी. या दोन्ही सद्न्या वेगळ्या समुदायांच्या आहेत. पण येथे वैदिक आर्यांनी मुनीबाबत गुढात्मक आदर दाखवल्याचे आपल्याला दिसून येईल पण याचा अर्थ त्यांना त्यांच्या आध्यात्मिक जीवनाबाबत काही माहित होते असा नाही. हे केशी मुनी स्वत:तील विकारांवर विजय मिळवण्यासाठी वैदिक आर्यांना अनाकलनीय असणारे साधनामार्ग वापरत. त्यांचा हेतू हा संसारिक सुख प्राप्त करण्याचा नव्हता, त्याऐवजी, जीवनाचा अर्थ काय आहे, सृष्टीचा कोणी निर्माता आहे की नाही, अशा प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ते प्रयत्नरत होते.  दु:ख काय आहे आणि त्यापासून मुक्ती कशी मिळवायची आणि जगाला भेडसावणाऱ्या नैतिक समस्या कशा सोडवायच्या या प्रश्नांना भिडून ते आंतरिक विकारांवर विजय मिळवून,  खरे ज्ञान मिळवून जिन बनण्याचा प्रयत्न करत. (भगवती सूत्र, ४.१६०) त्या अर्थाने समण अथवा जैन विचारकांचा दृष्टीकोन व्यापक होता असे म्हणावे लागेल. आणि त्यासाठी त्यांनी जो मार्ग वापरला तो म्हणजे व्रत. वेदांमध्ये जसा योग, पूजा हे शब्द अवतरत नाहीत तसाच व्रत हा शब्दही अवतरत नाही हे येथे लक्षणीय आहे. याचे कारण म्हणजे वैदिक आर्य हे अद्यापही यज्ञ कर्मकांडात्मक मार्गावर अधिक विश्वास ठेवून होते. पण वैदिकांचा व्रत करणा-या व्रात्यांशी संबंध आला जेव्हा ते मगधापर्यंत विस्थापित झाले तेव्हा!

लोक धर्मातील आत्मिक शक्ती वाढवून बाह्य जगावर सत्ता गाजवणारी गूढ पद्धती (तंत्रशास्त्र) कदाचित व्रत पद्धतीस जन्म देणारी ठरलेली असू शकते. किंबहुना प्राथमिक पाया त्यांनीच घातलेला असू शकतो. ओम या स्वराची निर्मितीही याच गुढात्मकतेतून झाली. ‘ओम’ हा शब्दही वैदिक साहित्यात येत नाही हेही येथे लक्षणीय आहे. या प्रथेला व्यापक तात्विक आशय देत या प्रथेला नियोजनबद्ध स्वरूप देण्याचे कार्य मात्र नि:संशय रीत्या समण म्हणजे समत्व मानना-या चळवळीने दिले यात शंका नाही. मोक्ष किंवा निर्वाण या संकल्पनाही कधीच वैदिक तत्वसिद्धांताचा भाग नव्हत्या जशा  पूजा किंवा योगही शब्दार्थानेही नव्हता.

व्रात्य कोण होते?

जरी व्रात्यांचा उल्लेख ऋग्वेदात कोठेही नसला तरी सुरुवातीच्या काळात ते ज्या व्यक्तींना भेटले त्यांचा उल्लेख यती, मुनी आणि केशी असा केला गेलेला आहे हे आपण पाहिले. हे लोक संसारत्याग केलेले तापसी होते असे मत सर्वच विद्वानांनी व्यक्त केलेले आहे. व्रात्य संकल्पनेशी  वैदिक आर्यांचा परिचय जरा नंतर म्हणजे काही वैदिक आर्य जेव्हा मगध प्रदेशातही स्थिर झाले तेव्हा झाला.  या गूढवादी व्रात्यांकडे मगधात स्थिर झालेल्या वैदिकांनी मोठ्या आदराने पाहिले. परंतु आर्यावर्तात स्थिर झालेल्या मोठ्या वैदिक समाजाने मात्र उपहास व तिरस्काराने पाहिले असल्याचे आपल्या लक्षात येईल.

व्रात्य हे विशिष्ट व्रतांचे (शारीरिक व मानसिक) पालन करणारे लोक होते. त्यांना व्रतीन असेही संबोधले गेलेले आहे. व्रतांमुळे या लोकांत गूढ शक्ती वास करत असतात असा दृढ समज मगधात स्थायिक झालेल्या वैदिक आर्यांचा होता. अथर्ववेदाची निर्मितीही याच भागात झाली. अथर्ववेद हा अन्य तीन वेदांपेक्षा आशयाने सर्वस्वी वेगळा आहे याचे कारण तेथील वैदिक आर्य स्थानिक लोकधर्म आणि समण परंपरेशी अधिक परिचित व प्रभावित झाले. आर्यावर्तातील वैदिक मात्र लोकसंस्कृतीपासून सर्वस्वी फटकून राहिलेले आपल्याला दिसतात. अथर्ववेदात मंत्र-तंत्र, जारण-मारण इत्यादी तांत्रिक प्रथांचा सर्वस्वी स्वीकार दिसून येतो. एवढेच नव्हे तर आर्यावर्तात राहणारे वैदिक जरी व्रात्यांकडे तिरस्काराने पाहत असले तरी अथर्ववेदाचे कर्ते मात्र तसे करत नाहीत. हे व्रात्य म्हणजेच आपल्याला भारतात आल्यावर सुरुवातीला भेटलेले भेटलेले केशी, यती किंवा वेगळे व्रत पाळणारे मुनी आहेत हे आर्यावर्तातील वैदिकांच्या लक्षात येणे शक्य नव्हते कारण व्रतामध्ये सुद्धा आधीच विभाग पडलेले होते किंवा पंथ निर्माण झालेले होते. पश्चिमेकडील व्रात्यांच्या आणि पूर्वेकडील व्रात्यांच्या जीवन व साधनाशैलीत फरक असू शकतो हे त्यांच्या लक्षात आले नाही, तसेच हे लोक म्हणजे एखादी विशिष्ट जमात अथवा वर्ण नव्हे तर एक विचारधारा आहे हेही त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे आर्यावर्तातील वैदिक आणि मगधातील वैदिक यांच्या अनुमानात जमीन अस्मानाचा फरक पडल्याचेही आपल्याला दिसून येते.

मुळात वैदिक आर्यांना आधी मगध प्रांत (किंवा पुर्व भारत) त्याज्ज्य वाटत होता असे वैदिक साहित्यावरूनच दिसते. तेथील लोक स्वागतशील नाहीत व वैदिक कर्मकांडाचा ते विरोध करतात अशा तक्रारी आपल्याला ऐतरेय आणि शतपथ ब्राह्मणावरून दिसून येतात. धार्मिक विभेद हे तर कारण होतेच कारण त्यांनी वैदिकेतर धर्मियांना शुद्र व असुर गटात वाटून टाकलेलेच होते. खरे तर असुर ही संज्ञा मुळची वैदिक आर्यांचे शत्रू झरुस्त्रीय  (अहुर माझ्दा) धर्माची. पण ती संज्ञा त्यांनी भारतात आल्यावरही जेही लोक त्यांना शत्रू वाटले त्यांनाही उद्देशून वापरली. कदाचीत हे स्थानिक संज्ञा समजून घेण्यातील अज्ञान असेल. पण यामुळे जो सांस्कृतिक गोंधळ निर्माण झाला ज्याचे निराकरण अद्यापही झालेले नाही. तसेच स्थानिक धर्माबद्दलही त्यांच्या लेखनातून स्पष्ट निर्देशन होत नाही. ते असो, पण वैदिकांचे व्रात्य सम्प्रदायाबाबतचे ज्ञान आणि अज्ञान काय होते हे आपण थोडक्यात पाहूयात.

व्रात्य नेमके कोण होते याबाबत वैदिक साहित्यातच अनेक मत-मतांतरे आहेत. व्रात्य हा शब्द वैदिक साहित्यात इतक्या परस्परविरोधी अर्थाने वापरला गेला आहे कि गोंधळ होणे स्वाभाविक आहे. वर्णसंस्कारलोप झालेले वैदिक म्हणजे व्रात्य या अर्थापासून ते व्रत करणारे व्रती म्हणजे व्रात्य, समूहातून च्युत झालेले ते व्रात्य (पाणिनी अष्टाध्यायी ४/३/५४). लाट्यायन श्रौतसूत्रानुसार (८/५/२) व्रतीन म्हणजे लुटमार करून जगतात ते आयुधजीवी म्हणजे व्रात्य, तांड्य ब्राह्मणानुसार लाकडी तख्त असलेल्या गाडीतून, हाती बिनादोर किंवा बाण नसलेले धनुष्य घेऊन हवे तिथे फिरणारे आणि नृत्य, संगीत इ. विद्या समूहाला शिकवणारे ते व्रात्य अशा अनेक व्याख्या आपल्याला पहायला मिळतात. मनुस्मृतीत (१०, २१-२३) मध्ये ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य संस्कारलोप झाल्याने समाजच्युत झालेले ते व्रात्य असून त्यांची संतती हीनजातीय मानली आहे. सावित्रीपतितझाल्यामुळे-म्हणजे उपनयनाच्या संस्काराचा लोप झाल्यामुळे जातिभ्रष्ट झालेले असतात, ते व्रात्यहोत, अशा आशयाचा निर्देश मनुस्मृतीत आलेला आहे (२·३९). अधम, पतित, पाखंडी, भटक्या अशा लोकांची गणनाही व्रात्यांमध्ये केली जात असे. थोडक्यात आर्यावर्तात निवास करणा-या वैदिकामध्ये व्रात्यांबाबत अज्ञान होते.  

पण मगधात निर्माण झालेला अथर्ववेद मात्र या सर्व मतांना छेद देतो. दोन्ही दृष्टीकोनात कमालीची भिन्नता आहे. एक प्रकारे ही वैदिक आर्यातली वैचारिक फुट होती. आणि हेच कारण आहे कि अथर्ववेदाला चवथा वेद मानायला वैदिक आर्य खूप काळ तयार नव्हते कारण हा वेद मुळात अभिचार कर्माला प्राधान्य देणारा वेद आहे अशी त्यांची समजूत झाली होती, परंतु औपनिषदिक विचारांच्या जन्माला हाच वेद कारण झाला हे त्यांनी लक्षात घेतले नाही. ऋग्वेदासाहित अन्य वेद हे औपनिषदिक विचार जन्माला घालूच शकत नव्हते कारण त्या तत्वज्ञानाचा आत्माच मुळी ऐहिक सौख्य हा होता. अथर्ववेदाचे तत्वज्ञान हे मुळात मगधातील तंत्र आणि समण विचारांतून जन्माला आले हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

अथर्ववेदातील पंधरावे कांड हे व्रात्यकांडअसून, त्यात व्रात्यांचा गौरव केला आहे. ह्या कांडाच्या नवव्या व दहाव्या सूक्तांत म्हटले आहे की, सभा, समिती, सेना आणि सुरा ज्याला अनुकूल आहे, असा व्रात्य ज्या राजाकडे अतिथी म्हणून जातो, त्या राजाने त्या व्रात्याला स्वत:पेक्षा श्रेष्ठ समजून त्याचा सन्मान करावा. अथर्ववेदातील व्रात्य आत्मध्यानी योगी असून वेगळ्या प्रकारचे यज्ञ, म्हणजे आत्मयज्ञ, करणारे आहेत. या व्रात्यांना ‘महादेव’ असेही म्हटले गेले आहे. व्रत ही संज्ञा मगधातील वैदिकांनी योग शीर्षकाखाली स्वीकारली व त्याचाच पुरस्कार पुढे उपनिषदात केला गेला, पण मुलतत्व मात्र जसेच्या तसे राहिले,

म्हणजे पूर्वेकडील, तशा वैदिकांना त्याज्ज्य अशा  मगध प्रांतात निर्माण झालेल्या अथर्ववेदिक आणि औपनिषदिक साहित्यात मात्र व्रात्यांचीच मते सर्वस्वी प्रधान झालेली दिसतात. एकही उपनिषद आर्यावर्तात लिहीले गेलेले दिसुन येत नाही ते त्यामुळेच. वैदिक विचारांतील ही मध्य भारत आणि पूर्व भारत यातील तफावत लक्षणीय आहे. आणि आज जर जीवित असेल तर पुर्वेकडील उधार घेतलेल्या संकल्पना.

समण संस्कृतीची परंपरा ऋषभनाथ यांच्यापासून सुरु झाली असे परंपरेने मानले जाते. ते एक ऐतिहासिक व्यक्तित्व असून ते सरासरी इसपू ३००० ते इसपू २७०० या काळादरम्यान गंगेच्या खो-यात होऊन गेले व विनिता (आजची अयोध्या) नगरीची स्थापना केली असेही जम्बुद्दीवपन्नती सुत्तवरून समजते. शिव आणि ऋषभनाथ या दोघांच्या व्यक्तीविशेशात कल्पनातीत साधर्म्य आहे. या ग्रंथानुसार ऋषभनाथ हे भ्रमणशील व तापस जीवन स्वीकारणारे व एक मुष्टी जटा ठेवणारे पहिले पुरुष होते. अपरिग्रह या व्रताची सुरुवातही त्यांच्यापासून सुरु झाली असेही मानले जाते. ही प्रथा विकसित होत नंतरच्या काळातील इतर तपस्वींनी पाळली असावी. वैदिक आर्य ज्या केशी किंवा मुनींच्या संपर्कात आले ते या परंपरेतील लोक असणार हे स्पष्ट आहे.

 

मुळात तपस्वी हे ध्येयहीन भटके नव्हते किंवा भिकारीही नव्हते. गृहस्थजीवनातील लोकांपेक्षा त्यांच्या जीवनाची ध्येये वेगळी होती पण ऋग्वेदातील ऋषी नेहमीच गृहस्थजीवनाचा पुरस्कार करणारे होते. निपुत्रिक त्यांच्यासाठी बहिष्कृत होते. ऋग्वेदातील अगत्स्य-लोपामुद्रा संवादातून स्पष्ट होते कि ब्रह्मचर्य व्रत ही त्यांची जीवनपद्धती नव्हती.  व्रत (योग) आणि तप यांचा व्रात्य, केशी आणि मुनी यांच्याशी असलेला संबंध निर्विवाद आहे. पण व्रत या मूळ शब्दाला योग हे नाव देऊन एक तात्विक गोंधळ होतो आहे याकडे मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. योग हा शब्द काहीतरी कशाशीतरी जोडण्याची क्रिया अभिव्यक्त करतो, तर व्रत हे जीवात्मा वैश्विक आत्म्यात विलीन करण्याची प्रक्रिया दर्शवते. यात एकत्वाची भावना आहे, समदृष्टीची भावना आहे. येथे जोडण्याचे द्वैत नाही तर विलीन होणे या एकदृष्टीचा अभिप्राय आहे.

समण विचार्कांनी वैश्विक आत्मा आणि जीवात्मा यांच्यातील एकतेचा विचार केला. ही क्रिया पूर्ण होते त्या क्षणाला त्यांनी मोक्ष ही संज्ञा दिली, म्हणजेच जन्माच्या शाश्वत चक्रातून मुक्ती. कर्मबंधमुक्ती हा या तत्वद्न्यानाचा आधार होता आणि कर्माचा नाश करण्यासाठी व्रत अर्थात आध्यात्मिक आणि शारीरिक क्रिया (आसनपद्धती) आवश्यक होत्या. जरी शारीरिक मुद्रा नवशिक्यांसाठी अत्यावश्यक आहेत असे मानले जात असले तरी ते अध्यात्माचा अत्यावश्यक भाग असल्याचे कधीही मानले जात नव्हते, पण नंतर त्यांनाच अपरंपार महत्व मिळाल्याचे दिसते.

जेव्हा उपनिषद अहम ब्रह्मास्मि” (बृहदारण्यक उपनिषद १.४. १०) म्हणते, तेव्हा ते स्पष्टपणे समण विचार प्रतिध्वनीत करते. जी व्यक्ती आंतरिक विकारांचा पराभव करून परम वैश्विक अस्तित्वात विलीन होते, अशा व्यक्तीला केवली व जिन म्हणतात. येथे योग हा शब्द मूळ "व्रत" द्वारे अभिप्रेत असलेला अर्थ घेत नाही हे स्पष्ट आहे.

पतंजलीने योगपद्धतींचे एकत्रीकरण करत सुसूत्रीकरण केले असे मानले जाते. योगसूत्रातील पतंजली चित्त, वृत्ती निरोधावर भर देतो. योग म्हणजे मनातील बदलांचे (स्थूल आणि सूक्ष्म विचार पद्धती) नियंत्रण (निरोध, नियमन, मार्गीकरण, प्रभुत्व, एकीकरण, समन्वय, स्थिरता, शांतता, बाजूला ठेवणे)" (पतंजली योगसूत्र 1.2) पतंजली योगाभ्यासाची वाटणी अष्टांग मार्गांत करतो ज्यायोगे समाधी आणि आत्मज्ञान प्राप्त होईल. पतंजली अंशतः जैन तत्त्वज्ञानाची पुनरावृत्ती करत आहे. चित्त-वृत्तींवर नियंत्रणच ठेवणे नव्हे तर विजय प्राप्त करणे हे जैन विचारांचे ध्येय आहे.  

समण (जैन) विचारधारा मूलभूतपणे अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य आणि अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच अपरिग्रह या व्रतांच्या संकल्पनेवर उभी आहे. व्रत हा योग या पर्यायी शब्दाचा पाया होता कारण त्यालाही मानवी प्रवृत्तींवर बंधने आवश्यक होती. पतंजलीनेही जैन धर्मातील या पाच महाव्रतांचा योगसूत्रात “यम” म्हणून समावेश केला आहे तर “नियम” या संज्ञेत दुय्यम व्रते येतात. अशा प्रकारे, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापर्यंत, योग या पर्यायी शब्दाने प्रसिद्धी मिळवली असली तरी मूलतत्त्व समान राहिले ते म्हणजे व्रत.

खरे तर, यम हे व्रत आहेत जे पतंजलीने वर्णन केल्याप्रमाणे योगाचे पहिले अंग आहे. नियम हे दुसरे अंग आहे ज्यामध्ये सहाय्यक व्रते येतात. आणि नंतर आसन (शारीरिक मुद्रा) येतात.

पाचवे जैन आगम "भगवती सूत्र"मध्ये इसपू सहाव्या शतकातील भगवान महावीरांच्या शिकवणीची नोंद करण्यात आली. या सूत्रात भगवान महावीर सोमिलाला समजावून सांगतात की त्यांची जीवनशैली सहा प्रकारची आहे, 1. तप, 2. नियम, 3. संयम, 4. स्वाध्याय, 5. ध्यान आणि 6. आवश्यक (आत्म-जागरूकतेने आवश्यक कर्तव्ये पाळणे. (सुधर्मा स्वामीचे भगवती सूत्र, खंड 1, के.सी. लालवाणी, पब. जैन भवन, कलकत्ता, 1999 द्वारा अनुवादित).

पतंजलीने योगसूत्रातील शौच म्हणजे जैनांसाठी मानसिक शुद्धता परंतु पतंजली केवळ शारीरिक शुद्धतेवर भर देतो. जैनांनी प्राचीन काळीच आसन (शारीरिक आसन) हे कायाक्लेश-तप आणि सहाव्या प्रकारचे बाह्य तप या शीर्षकाखाली व्रताच्या (योगाच्या) अंगांपैकी एक म्हणून स्वीकारले असले तरी, पतंजली आसनांना साधना मानतो. अशा प्रकारे योगसूत्रात चर्चा केल्याप्रमाणे योगाचे विविध अंग वेगवेगळ्या शीर्षकांतून आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनातून विशद केले आहेत. योगसूत्राने मिळवण्याचे साधन म्हणून जैन किंवा समण ध्यान पद्धतीचा पुरेपूर अंगीकार केला असल्याचे दिसते.

समण किंवा जैन यांच्याशी संबंधित योगपद्धतीची उत्पत्ती जैन धर्मशास्त्रांमध्ये क्रमिक प्रगतीशीलतेने जाते. जैन व्रत (योग)-  1. योग्य श्रद्धा, 2. योग्य ज्ञान, 3. योग्य आचरण आणि 4. योग्य तपस्या यावर केंद्रित होता. नंतरच्या काळात जरी इतर शाखांनी हीच तत्वे वेगवेगळ्या शीर्षकाखाली मार्ग लागू केले असली तरी, मूलभूत गोष्टी कधीही बदलल्या नाहीत. योगाचा मूळ अर्थ व्रत असाच होता. आणि हिच व्रते पतंजलीने आपल्या योग तत्वद्न्यानाचा पाया बनवली. व्रत ही संज्ञा मागे पडून योग शब्द तोवर समानार्थी म्हणून प्रचलित झाला होता. ख्रिस्तोफर की चॅपलच्या मते, “योग या शब्दाच्या सांस्कृतिक वापरातील बदलाला उत्तर देताना, जे कदाचित नंतरच्या उपनिषदांच्या काळात उद्भवले, जैन विचारवंतांनी त्यांच्या धार्मिक प्रथेचे वर्णन योगाच्या नवीन व्याख्येच्या प्रकाशात करण्यास सुरुवात केली आणि मानसिक शांती साध्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांचा परिपूर्ण उपयोग केला." (Yoga in Jainism, Edited by Christopher Key Chapple, pub.-Routledge, 2016, page 10) याचा अर्थ एवढाच की कालांतराने संज्ञा बदलल्या गेल्या तरीही उपनिषदांमध्ये योग या शब्दातून व्रत हे मूळ सार तसेच राहिले. उपनिषदांनी वैदिक प्रभावाखाली पर्यायी संज्ञा वापरल्या असल्या तरी उपनिषदांतील तत्वद्न्यानावर समण प्रभाव अगदी स्पष्ट आहे.

समानता हा व्रत किंवा योगाचा पाया होता आणि आहे, जो समण परंपरेचा आत्मा आहे. प्राकृत भाषेतील समण या शब्दाचा अर्थ "जो सर्व गोष्टींकडे समभावाने पाहतो" असा आहे. भगवती आराधना (गाथा ७०, विजयोदय टिका) समण शब्दाची व्याख्या सामणो” समानस्य भावो समानन, क्वचिपादप्यनुगता रागद्वेषता समता समन्ना सब्देनोच्यतेअशी करते. याचा अर्थ ‘सम’चा आत्मा समता आहे. सामन्न म्हणजे समभाव जो कोणत्याही गोष्टीबद्दल द्वेष करत नाही. हरगोबिंद सेठ यांच्या प्राकृत शब्दकोशातही समनचा अर्थ "सर्व प्राण्यांना समान दृष्टीने पाहणारा" असा दिला आहे. हे स्पष्ट आहे की समन परंपरेने प्रथम सर्व प्राण्यांमध्ये समानता जाणली असली तरी नंतर वैश्विक आत्म्याशी समानता करण्याचा विचार विकसित केला. वैदिक प्रवाहात सापडत नाही अशा विचारांचे ते प्रगतीशील स्वरूप होते.

वैदिक आर्यांनी जरी स्थानिक परंपरांतून उधारी केली असली तरी ती त्यांनी कधीही मान्य केली नाही. उदा. जोहान्नस ब्रोन्खोर्स्त हे जागतीइक कीर्तीचे भारतविद्या अभ्यासक म्हणतात-

, "आपल्या पतन काळात भोवतालच्या धार्मिक आणि राजकीय वातावरणात तगुन राहण्यासाठी वैदिक धर्मियांनी कर्म आणि पुनर्जन्म अशा अनेक तात्विक सिद्धांताची स्थानिक धर्मातुन उसनवारी केली आणि वैदिक धर्माची पुनर्मांडणी करायला सुरुवात केली. आधीच्या सामुहिक यज्ञांची जागा व्यक्तीगत यज्ञांनी घेतली. याच काळात (इसपू दुसरे शतक ते इसवी सनाचे पहिले शतक) स्थानिक तंत्रांतुनच उसनवारी करुन अथर्ववेदाची रचना करुन अथर्वन ब्राह्मणांना प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचा आणि तेच मुळचे, अतिप्राचीन आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने वैदिक धर्माने केलेली ही तडजोड होती आणि त्यातून वैदिक धर्माचेही रुप बदलले. पण आपण उसणवारी केली आहे हे वदिक धर्मियांनी कधीही मान्य केले नाही. उलट बौद्ध व जैन धर्म हे वेदांमधुनच कसे निर्माण झाले आणि वेदानुकुल आहेत हे दर्शवण्यात त्यांनी धन्यता मानली. उपनिषदांवर योग, तंत्र आणि श्रमण संस्कृतीचा पगडा स्पष्ट दिसत असतांनाही उपनिषदांची मालकी "वेदांगे" म्हणत स्वत:कडे घेतली. हे होण्याला कारणीहूत झाले त्यांनी वैदिक कर्मकांड (उदा. अश्वमेध, राजसुय) यज्ञांबद्दल राजेलोकांत निर्माण केलेले अनावर आकर्षण आणि त्यांना राजव्यवहारात प्राप्त झालेल्या अधिकाराच्या संधी. धर्मांतरीत वैदिकांचीही त्यांना यात मोठी मदत झाली. चवथ्या शतकापासून भारतात वैदिक धर्माने अन्य धर्मांना दुय्यम बनवण्यात तर कोठे त्या धर्मांत शिरुन त्या धर्मांचा पाया खिळखिळा करण्यात यश मिळवले". (Brahmanism: Its place in ancient Indian society, Johannes Bronkhorst, Contributions to Indian Sociology 51, 3 (2017))

 

पतंजली कोण होता?

योगाच्या संहितीकरणाचे श्रेय पतंजलीला जाते. पतंजलीचे जीवन चरित्र असंख्य मिथकांच्या जाळ्यात हरवलेले आहे. तसेच, योगसूत्रांतील पतंजली आणि महाभाष्यांतील पतंजली एकच आहेत की वेगवेगळ्या काळातील भिन्न व्यक्तिमत्त्वे आहेत याबद्दल जोरदार वादविवाद आहेत. वेगवेगळ्या विद्वानांनी योगसूत्राच्या पतंजलीचा काळ ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून ते ख्रिस्तोत्तर चौथ्या शतकापर्यंतचा अनुमानित केलेला आहे. सूत्र शैली इसवी सनाच्या तिसऱ्या शतकानंतर उदयास आली आणि योगसूत्र हे सूत्र शैलीत लिहिलेले असल्याने ते तिसऱ्या ते पाचव्या शतकातच लिहिले गेले असावे अशी शक्यता आहे. याच काळात जैन परंपरेतील उमास्वाती "तत्त्वार्थ सूत्र" या शीर्षकाखाली जैन तत्वज्ञान संहिताबद्ध केले. पातंजलीच्या योगसूत्रवरील उमास्वातीचा प्रभाव जाणवण्याइतपत स्पष्ट आहे. उमास्वाती  "योग्य श्रद्धा, योग्य ज्ञान आणि योग्य आचरण हा मुक्तीचा मार्ग आहे" या विधानाने आपल्या ग्रंथाची सुरुवात करतो, समणवादाचे मुख्य तत्वज्ञान पातंजल योगाचा पाया बनले असे दिसते.

पतंजली, त्याच्याशी संबंधित सर्व दंतकथा गृहीत धरूनही तो नाग आणि शैव परंपरेशी संबंधित आहे हे स्पष्टपणे दिसते. याचा अर्थ एवढाच की तो वैदिक परंपरेतील नव्हता,  हे उघड आहे. पण जरी त्यालाही वैदिकांनी मान्यता दिली असली तरी तो शैव-समण परंपरेचा अनुयायी असू शकतो. कारण शैव तत्त्वज्ञान अनेक बाबतीत समण विचारांच्या निकट आहे. तो यम-नियम (व्रतास) सर्वोच्च व्रत म्हणून महत्त्व देतो. शैव परंपरेतही व्रतांना महत्त्वाचे स्थान आहे. थोडक्यात पातंजलीने योग हा शब्द लोकप्रिय असल्याने स्वीकारला असला तरी मुळचा व्रत हा शब्द व त्याचा आशय त्याने लक्षात ठेवलेला दिसतो.

सागरमल जैन यांनी ख्रिस्तोफर चॅपल यांनी संपादित केलेल्या “Yoga in Jainism या पुस्तकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखात समत्वव्रत ही जैन धर्माला अधोरेखित करणारी प्रमुख संकल्पना असल्याचे नमूद केले आहे. जैनांसाठी, मग ते साधू असोत कि गृहस्थ, ते दोघांचे प्रथम आणि प्रमुख कर्तव्य आहे.

तात्विकदृष्ट्या, योगाचे अर्थ वैयक्तिकरित्या वेगळे घेतले जाऊ शकतात, आणि लक्ष्य देखील वैयक्तिकरित्या ठरवले  जाऊ शकते.  आसन, ध्यान किंवा धारणा वेगळ्या पद्धतीने अंगीकारता येऊ शकतात. परंतु लक्ष्य एकच राहते ते म्हणजे वैश्विक आत्म्याशी साम्यत्व स्थापित करणे. हे साध्य करण्यासाठी व्रतांचे पालन करणे आवश्यक आहे जे सागरमल जैन यांनी स्पष्ट केले आहे. समानतेचे हे तत्व वैदिकांनी तात्विक पातळीवर स्वीकारले असले तरी सामाजिक व्यवस्थेत मात्र ते अमलात आणणे नेहमीच टाळले हा इतिहास आहे.  

थोडक्यात-

. “व्रत” हे योगाचे मूळचे नाव होते आणि जे व्रताचा मार्ग अवलंबतात त्यांना “व्रात्य” अथवा “व्रतीन” म्हटले जात होते. व्रतांचा (योगाचा) उदय किमान सनपूर्व २६०० मध्ये झाला जेव्हा वेदांचे लेखनही सुरु झालेले नव्हते.

. समानता हा व्रतांचा मुख्य हेतू असल्याने त्यातूनच समण या प्राचीन वैचारिक व तपस्वी चळवळीचा उदय झाला. विकारांवर विजय प्राप्त करणे हा आरंभिक हेतू असल्याने या चळवळीला जैन असेही नाव पडले. ही प्राचीन भारतीय परंपरा व्रत उर्फ ​​योग प्रणालीचे संस्थापक होती.

. वैदिक प्रवाहाने व्रत परंपरेचे योगाच्या स्वरूपात स्वीकार केला आणि योग हा शब्द रूढ केला असला तरी ते व्रतांचे मूळ स्वरूप पुसू शकले नाहीत.

. वैदिक समुदायाचा यौगिक अथवा व्रात्य तत्वज्ञानाशी काहीही संबंध नाही कारण योग या संज्ञेचे मूलभूत सिद्धांत वैदिक तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध आहेत.

 

-संजय सोनवणी

 

  Jaina Origin of the Yoga Sanjay Sonawani Yoga is thought to be first elaborated in the Upanishads. They are considered to be the last ...