हिंसकता, असहिष्णुता आणि असामाजिकता हा प्रत्येक समाजाला लागलेला रोग आहे. एखादी घटना घडली कि त्या धर्म-जातीशी निगडीत सर्वच समाजाला धारेवर धरण्याची जागतिक परंपरा आहे. आपण तरी या परंपरेचा त्याग करायला हवा. भारतात भारतीयच असुरक्षीत असतील तर आपल्या स्वातंत्र्याला तिळमात्र अर्थ नाही. याला आपणही जबाबदार आहोत. पुर्वोत्तर भारतियांना चिंकी म्हणुन हीनवनारे कोण आहेत? त्यांना पोलीस रस्त्यांवर अडवत हरघडीला पासपोर्ट का मागतात? लदाखला जायला पासपोर्ट लागतो का असे मला १९९७ सालापर्यंत विचारले जायचे...म्हणजे लडाख हा भारताचाच भुप्रदेश आहे हे आपल्या बापड्यांना माहितच नव्हते...तरीही आम्ही अखंड भारताचा उद्घोष करतो...हा आमचा वेडेपणाच नाही काय?
बांगलादेशी घुसखोर असोत कि पाकिस्तानच आपली मायभुमी मानत येथीलच सोयी उपभोगणा-यांना घरचा रस्ता दाखवायची हिम्मत आपल्या कोणत्याही सरकारमद्धे नव्हती व नाही. ती कशी आणायची याचा विचार कोणताही सर्वच समाज टार्गेट न करता आपल्यालाच करावा लागनार आहे.
पुर्वोत्तर भारतातील बांगलादेशींना हाकललेच पाहिजे याबाबत शंका असण्याचे कारण नाही. जो देश आपल्याच प्रजेला पोसु शकत नसेल, प्रजेला शरणार्थी म्हणुन अन्य देशाचा आश्रय घ्यावा लागत असेल तर अशा देशाचे अस्तित्वच मुळात असण्याचे कारण नाही. भारतीय प्रजातंत्राचे गैरफायदे घेत पार येथील निवडनुका लढवत लोकनियुक्त प्रतिनिधी बनु शकण्याइतपत जर त्यांची मजल जावू शकत असेल तर भारतीय कायदा आणि एकुणातील व्यवस्था ढिसाळ झाली आहे हे मान्य करत त्यावर कठोर हल्ले व्हायलाच हवेत. घुसखोरांना परत हाकलणे हा एकमेव पर्याय आहे. आमच्या नागरिकांचे हक्क हिरावण्यात घुसखोर आघाडीवर येत येथील शांतता व सुव्यवस्थेवरच आक्रमण करत असतील तर त्यांचे निर्दालन करण्याचे कार्य आमच्या सरकारला करावेच लागेल.
येथील राष्ट्रप्रेमी मुस्लिमांची जबाबदारी अधिक आहे. ते जर इस्लामी मुलतत्ववादाला बळी पडत या घुसखोरांना केवळ धर्मबंधु म्हणुन आश्रय देत असतील, त्यांचे संरक्षण करत असतील वा त्यांना पाठिंबा देत असतील, तर मग त्यांची राष्ट्रप्रियता प्रश्नांकित होणारच. यातुन हिंदु दहशतवाद उफाळुन आला तर मग त्याची जबाबदारी कोणावर?
पुर्वोत्तर राज्यांत घुसखोरी करत, तेथे वा ब्रह्मदेशात मुस्लिमांवर हल्ले होताहेत असा कांगावा करत, खोटे फोटो प्रसृत करत सा-या देशात आग भडकावण्याचे काम जिहादी करत आहेत. आमचेच देशवासी या देशात भयभीत होत आपापल्या घराचा मार्ग पकडु लागले आहेत. पण जे घुसखोर आहेत त्यांनी मात्र आमच्याच देशबांधवांच्या मुलभुत हक्कांवर गदा आणली असुनही ते मात्र शिरजोर होत येथीलच कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत. अशा घुसखोरांना लषकराची मदत घेत प्रथम त्यांच्या भुमीत रेटुन हाकलले पाहिजे. अन्यथा हा प्रश्न एवढा उग्र होईल कि कदाचित एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बांगलादेशी घुसखोर असेल.
ज्या देशाला आपल्याच नागरिकांना सुरक्षीत वातावरण देता येत नाही त्याला देश म्हणता येत नाही. आपल्या, देशाचे असोत कि राज्यांचे, गृहमंत्री मुळात एवढे लुळे आहेत कि त्यांनी त्या महत्वाच्या पदावर का असावे हाच प्रश्न आहे. लोक घाबरुन जात आहेत तर त्यांना सुरक्षा देत, धीर देत, थांबवण्याऐवजी जादाच्या रेल्वे सोडणारे कोणती देशभक्ती दाखवत आहेत?
घुसखोर मुस्लिम हा या देशाला फार मोठा धोका आहे. इथल्या मुस्लिमांना जर हे समजत नसेल तर ते एक दिवस गुजरातेपेक्षा महाभयंकर घोटाळा स्वहस्ते निर्माण करतील आणि अकारण या देशात विध्वंसाचे वादळ निर्माण होईल. आम्हाला मोदी आजिबात नकोय. आम्हाला कोणताही कडवा आंधळा धर्मवादी नकोय. पण तुम्ही त्या दिशेला आम्हाला नेवू नका.
घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवा. आपल्याच देशबांधव नागरिकांना भयभित करत, त्यांना असुरक्षित वाटेल अशा कृत्यांपासुन दुर रहा...
मुस्लिम धर्म तसाही जगभर पराकोटीचा बदनाम करण्यात कडव्या इस्लामियांनी हातभार लावला आहे. आम्हे अजुनही इस्लामी बांधवांवर प्रेम करतो...
त्याला द्वेषात बदलवायला हातभार लावु नका हीच काय ती विनंती.