पाकिस्तानात जे अमानवी भिषण क्रौर्याचे दर्शन घडले त्याने कोणीही थिजून जाईल, हबकून जाईल आणि आम्ही कोणत्या जगात राहतो आहोत या प्रश्नानेच कासाविस होईल. तालिबानला ज्यांनी जन्म घातला, एका भस्मासुराला कामाचे असेपर्यंत पाठबळ देत राहिले ते जागतिक सत्तास्थान असल्याने त्याकडे बोट दाखवले जाणार नाही हे तर आहेच! १९९५ पासून पाकिस्ताननेही तालिबानला नुसते समर्थनच नव्हे तर सक्रीय मदतही केली. जागतिक महासत्तांच्या संघर्षातून निर्माण केली गेलेली ही संघटना...तिच्या शाखाही अनेक. हातात शस्त्र आलेले, हिंसेची सवय लागलेले कोठे शांतता आली कि सैरभैर होतात. मग शत्रू बदलतात. आधीच्या समर्थकांवरच काय स्वकियांवर, स्वधर्मियांवरही उलटतात. अमेरिकेने ते भोगले आहे. परंतू शिकणार कोण?
पाकिस्तान आता गेली काही वर्ष भोगतो आहे. काल त्याचा कळस झाला. मुलांना
ठार मारले याचे कारण त्यांच्या पालकांनी (पाक सैनिकांनी वझिरीस्तानवर हल्ले
करून) अमेरिकेला मदत केली आणि पाकिस्तान हे अमेरिकेचे बाव्हले राष्ट्र
(पपेट स्टेट) आहे म्हणुन त्याला टार्गेट केले असा दावा टीटीपी च्या
कमांडरने केला आहे. या द्वेषाची सुरुवात करून दिली ते नामानिराळे राहतात
यावर जागतिक समुदायाने चिंता केली पाहिजे आणि एकत्र येवून कोठेतरी हे
थांबण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. हे येथेच थांबेल असे चित्र दिसत नाही.
सुडबुद्धीने पेटलेल्या दहशतवाद्यांकडून यापेक्षाही कृर मार्ग वापरले जाणार
नाहीत असे नाही.
पाकिस्तान सरकारने यापासून गंभीर धडा घ्यायला हवा. अमेरिकेचे बाव्हले बनण्यात पाकिस्तानी सत्ताधा-यांचे/लष्कराचे हित असले तरी ते जनतेच्या हिताचे नाही. जागतिक सत्ता तमाशे पाहतील, नव्या रणनित्या आखतील...संघर्ष पेटता ठेवतील. ज्या काही भारतियांनी नि:ष्पाप मुलांच्या हत्यांबद्दल आनंद साजरा केला हेही गंभीर आहे. "तालिबानी" वृत्तीचे असायला मुस्लिमच असणे आवश्यक नसते हेही या निमित्ताने दिसते. अमेरिकेत ख्रिस्ती तालिबान आहे आणि त्याचे नेते काय म्हणतात हे पहा..."We should invade their countries, kill their leaders and convert them to Christianity. We weren't punctilious about locating and punishing only Hitler and his top officers. We carpet-bombed German cities; we killed civilians. That's war. And this is war." -- Ann Coulter.
हा लढा दिसतो तसा सोपा नाही. एक दिवस खेद व्यक्त करत पुन्हा गहाळ होण्यासारखा नाही. असल्क्या हिंसक, धर्मांध भावना जेथेही कोठे, अगदी अल्प-स्वल्प का असेनात उफाळतांना दिसतात तेथे तेथे सुजाण नागरिकांनी आवाज उठवलाच पाहिजे. जग जर वाचवू शकते तर ते लष्कर नाही, अणुबोंब नाही...धर्म नाही , तर धर्मांपार जात शांततेवर अपार प्रेम करत विराट भवितव्याकडे नजर लावून बसलेले जगभरचे "जगप्रेमी" नागरिक!
पाकिस्तान सरकारने यापासून गंभीर धडा घ्यायला हवा. अमेरिकेचे बाव्हले बनण्यात पाकिस्तानी सत्ताधा-यांचे/लष्कराचे हित असले तरी ते जनतेच्या हिताचे नाही. जागतिक सत्ता तमाशे पाहतील, नव्या रणनित्या आखतील...संघर्ष पेटता ठेवतील. ज्या काही भारतियांनी नि:ष्पाप मुलांच्या हत्यांबद्दल आनंद साजरा केला हेही गंभीर आहे. "तालिबानी" वृत्तीचे असायला मुस्लिमच असणे आवश्यक नसते हेही या निमित्ताने दिसते. अमेरिकेत ख्रिस्ती तालिबान आहे आणि त्याचे नेते काय म्हणतात हे पहा..."We should invade their countries, kill their leaders and convert them to Christianity. We weren't punctilious about locating and punishing only Hitler and his top officers. We carpet-bombed German cities; we killed civilians. That's war. And this is war." -- Ann Coulter.
हा लढा दिसतो तसा सोपा नाही. एक दिवस खेद व्यक्त करत पुन्हा गहाळ होण्यासारखा नाही. असल्क्या हिंसक, धर्मांध भावना जेथेही कोठे, अगदी अल्प-स्वल्प का असेनात उफाळतांना दिसतात तेथे तेथे सुजाण नागरिकांनी आवाज उठवलाच पाहिजे. जग जर वाचवू शकते तर ते लष्कर नाही, अणुबोंब नाही...धर्म नाही , तर धर्मांपार जात शांततेवर अपार प्रेम करत विराट भवितव्याकडे नजर लावून बसलेले जगभरचे "जगप्रेमी" नागरिक!