Tuesday, May 26, 2015

आमच्याकडे काय कार्यक्रम आहे?

सर्वांचे आर्थिक उत्थान व्हावे यासाठी आमच्याकडे काय कार्यक्रम आहे?

आपली प्रगती साधन्यासाठी स्वाभिमानाने स्वबलावर उभे राहण्यासाठी जी मानसिकता बनवावी लागते ती क्षमता आमच्या समाजव्यवस्थेत व धुरिणांत मुळातच नसेल तर आपल्याला मुळात संस्कृतीच नाही असे म्हणावे लागते. आर्थिक सक्षम समाजच संस्कृती घडवू शकतात. यासाठी समाज-विजिगिशुता लागते. प्रगतीची भीक नव्हे तर प्रगतीत सर्जनात्मक सहभाग लागतो. मागचे गुणगौरव सोडा...आज भारतात कोणत्वी नेमकी संस्कृती आहे याचा शोध घेऊन पहा. आम्ही उभारणारे नव्हे तर उध्वस्त करणारे बनलो आहोत. खुनशी जातियवादाने आमचाच नाश आरंभला आहे तरी त्याचे भान नाही. उलट जोतो कोणत्या ना कोणत्या झुंडीत जाऊ पाहतो आहे. झुंडीशिवाय जगता येणे ज्या समाजात अशक्य बनून जाते त्या समाजाची काय संस्कृती असणार? जेथे साहित्यरचनाही जातीयच भावनेतून लिहिल्या अथवा वाचल्या जातात ते काय संस्कृतीचे निर्माण करणार? 

साधे पाण्याचे घ्या. आपल्याकडे दुष्काळ पडला तरी इस्त्राएलच्या शंभरपट पाऊस पडलेला असतोच. तरी पावसाने ओढ दिली कि पाण्याची बोंबाबोंब सुरुच. आमचा शेतकरी शक्य असुनही, हजारो वर्ष शेतीत असुनही पाण्याचे नियोजन त्याला करता येत नाही. परत वर स्वत:ला तो सिंधु संस्कृतीचा वारसदार म्हणवतो. पाच हजार वर्षांपुर्वी ज्या कौशल्याने त्यांनी पाण्याचे नियोजन केले त्यामुळे सिंधू लोक तत्कालीन ज्ञान जगाशी व्यापार करत सुबत्तेला पोचले. आम्ही आजचे? ते जुने जाऊद्या, ७२च्या दु:ष्काळात बनवलेली जवळपास ९५% गांवतळी आज गाळ भरुन क्रिकेटची मैदाने झाली आहेत. जलसंधारणाचा कार्यक्रम आपल्याच स्वार्थासाठी का होईना स्वत: राबवावा हे आजही आम्हाला समजत नसेल तर आम्ही दरिद्रीच राहणार. नेत्यांना तेच हवे. अब्जावधी रुपये कागदोपत्री खर्च झाल्याचे दाखवत आमचे जलसंधारनातील महनिये जर तालुकेच्या तालुके खरेदी करण्याच्याच मोहिमेवर असतील तर दुसरे काय होणार? जेथे पाणी मुबलक असते तेथे एवढी उधळपट्टी कि पाहुन वाटते...हे लोक दुष्काळातच सडायच्याच लायकीचे आहेत.

जर प्रजेलाच अक्कल नसेल तर नेत्यांकडुन कोणत्या प्रामाणिकपणाची अपेक्षा करणार? शेतकरी दुर्बल झाला आहे तो यामुळे आणि दु:ष्काळ वा अतिवृष्टी झाली तर प्यकेजेस येणार-कर्जमाफ्या होणार-वीज्बिले माफ होनार....खात्रीच असतेना हो! मग कशाला कष्ट करा? पारावर चकाट्या पिटायला आणि नेत्यांच्या मागेपुढे हिंडण्यात ज्यांना कार्यशीलता वाटते असा कोणताही समाज कधीही प्रगती करुन स्वत:च्या पायावर उभा राहु शकत नाही.

आणि ही बेईमानी वृत्ती कोणत्या क्षेत्रात नाही? भारतातील बहुसंख्य कंपन्यांचे ताळेबंद हे लबाड्यांनी भरलेले असतात. ब्यंकांचे ताळेबंदही याला अपवाद नाहीत.

मग जर आमची संस्कृतीच अशी बेईमानीची असेल तर आमच्या संस्कृतीला कोण घेणार?

एकीकडे आमच्या भागात प्रकल्प नाहीत म्हणून बोंब मारायची आणि एखादा प्रकल्प येवू घातला रे घातला कि आमच्याच स्वयंसेवी संस्था ते राजकारणी त्या विरोधात बोंब मारु लागतात. एन्रोन ग्यसवरचा प्रकल्प होता...तेंव्हाही तेच आणि जैतापूर प्रकल्प आण्विक आहे तेंव्हाही तेच. मुदे बदलतात...पण विरोध राहतातच...त्यासाठी खोट्यांचा आश्रय घ्यायला आम्ही कमी करत नाही.

अशा बेईमानीच्या पायावर सामाजिक व सर्वसमावेशक अर्थ-क्रांती कशी घडणार?
.
 आणि काही लोक चालले भ्रष्टाचार निर्मुलन म्हणजेच क्रांती असा नारा द्यायला.

 आपल्या प्रजेची मानसिक भ्रष्टता व त्यामुळेच आलेली नवनिर्मानातील पंगुता यावर आपण कधी चर्चा करनार आहोत?
 भारताने असा काय मौलिक शोध गेल्या हजार वर्षांत लावुन दाखवलाय कि ज्याचा जागतीक अर्थव्यवस्थेवर व जीवनव्यवस्थेवर प्रभाव पडलाय?

 आमच्या शिक्षणव्यवस्थेने आमची सृजनात्मकता मारुन टाकलीय. आमचे आईबाप आम्हाला धाडसी बनण्याचे स्वातंत्र्य नाकारतात...जेथे कल आहे तेच शिकण्याचा व तेच करीअर म्हणुन करु देण्याचा मुलभुत अधिकार नाकारतात. आम्हीही आमच्या पोरांना असेच गुलाम बनवणार यात शंका नाही.

 मग गुलाम कधी मानसिक तुरुंगाच्या भिंती तोडुन पळतोय होय?

आणी मग हेच स्वत:हुनच गुलाम बनलेले पुरातन संस्कृतीच्या गौरवगाथांत रमत आपल्या भ्रष्ट मानसिकतेचे उदात्तीकरण करु पाहतात. लोकांनाही त्यात रमायला आवडते. निर्माणाचे सोस संपतात. चीन हे शत्रुराष्ट्र म्हणायचे, सीमावाद खेळत बसायचे आणि चीनलाच भारतात अब्जावधी डालर्सच्या गुंतवणुकींचे साकडे घालायचे...हा अजब धंदा भारतीयच करु शकतात!

ही मानसिकता आम्ही कशी आणि का बनवून घेतली?

भवितव्यातील धोके

सध्या ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवास करते आहे तो वेग असाच भूमिती श्रेणीने वाढत राहीला तर ज्ञानाच्या क्षेत्रात मक्तेदारीची स्थि...