Friday, May 19, 2017

नियतीचा खेलंगोल...

अंधारांच्या कातळांखाली 
चिरडले गेलेले
मातकट धुळीतून 
बाहेर येवू पाहणारे 
कोंदट हुंदके
शेवटी 
थकून रुजतात
त्याच 
दबलेल्या मढ्यांनी 
केलेल्या
कुबट मातीत
एक तरी सूर्य येईल
कधीतरी
या अपार आशेत!

सूर्य आकाशात अगणित
पण अंधार
मध्ये आडवा
चिरंजीवी अश्वत्थाम्यासारखा
वेदनाळलेला
आपल्याच कातळी
ओझ्यांखाली
दबलेल्या
हुंदक्यांच्या 
अंकुरांसाठी
काहीएक करू शकत नाही
म्हणून...!

नियतीचा खेलंगोल
काही केल्या थांबत नाही!!!

काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!

महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...