Friday, May 19, 2017

नियतीचा खेलंगोल...

अंधारांच्या कातळांखाली 
चिरडले गेलेले
मातकट धुळीतून 
बाहेर येवू पाहणारे 
कोंदट हुंदके
शेवटी 
थकून रुजतात
त्याच 
दबलेल्या मढ्यांनी 
केलेल्या
कुबट मातीत
एक तरी सूर्य येईल
कधीतरी
या अपार आशेत!

सूर्य आकाशात अगणित
पण अंधार
मध्ये आडवा
चिरंजीवी अश्वत्थाम्यासारखा
वेदनाळलेला
आपल्याच कातळी
ओझ्यांखाली
दबलेल्या
हुंदक्यांच्या 
अंकुरांसाठी
काहीएक करू शकत नाही
म्हणून...!

नियतीचा खेलंगोल
काही केल्या थांबत नाही!!!

No comments:

Post a Comment

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...