Monday, October 19, 2020

कविता केल्या जात नाहीत

 कविता केल्या जात नाहीत

कविता रचल्या जात नाहीत.

कविता लिहिल्या जात नाहीत....

कोणाचे दु:ख बघून नकळत
डोळ्यातून ओघळणारे अश्रुबिंदू
किंवा कोणाचा आनंद पाहुन
फुलणारे निरागस हास्य...
जगातील याच काय त्या
श्रेष्ठ कविता होत!
शब्द कवितांचे शत्रू आहेत!
शब्दात पकडली जातात ती कलेवरे.
कविता निशब्दच असते...!

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...