Monday, October 19, 2020

कविता केल्या जात नाहीत

 कविता केल्या जात नाहीत

कविता रचल्या जात नाहीत.

कविता लिहिल्या जात नाहीत....

कोणाचे दु:ख बघून नकळत
डोळ्यातून ओघळणारे अश्रुबिंदू
किंवा कोणाचा आनंद पाहुन
फुलणारे निरागस हास्य...
जगातील याच काय त्या
श्रेष्ठ कविता होत!
शब्द कवितांचे शत्रू आहेत!
शब्दात पकडली जातात ती कलेवरे.
कविता निशब्दच असते...!

काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!

महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...