Sunday, June 5, 2011

हिंदु धर्मासमोरील समस्या

मी या लेखमालेत हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु धर्म म्हणजे नेमके काय आहे याचा उहापोह करणार असून हा धर्म आज जागतिक परिप्रेक्षात ५व्या क्रमांकावर काफेकला गेला आहे आणि भविष्यात कसलीही सुधारण केली गेली नाही तर तो नष्ट कसा होणार आहे याची चर्चा करणार आहे. तसे पहिले तर "हिंदु" हा शब्दही कसा भ्रामक आहे हे तपासत या धर्माची निर्मिती दोन विरुद्ध धर्मांच्या सरमिसळीतुन कसा निर्माण झाला याचेही दिग्दर्शन करणार आहे. तसे पहिल्यास इस्लाम धर्म हा ज्यु धर्मतत्वांशी आणि प्रतिमापुजक अरबी पारंपारिक धर्माची सरमिसळ आहे तसेच ख्रिस्ती धर्म हा सुद्धा ज्यु आणि येशुच्या तत्वांची सरमिसळ आहे. असे असल्याने या सरमिसळीत वर्चस्व कोणत्या तत्वधारेचे राहते आणि का आणि त्यातून नवधर्मात नेमके कोणते गोंधळ माजतात ज्यांचे निराकरण होणे अशक्यप्राय होवून जाते याचेही दिग्दर्शन असेल आणि धर्मावनीतिची बीजे या सरभेसळीत असल्याने धर्माची कालौघात वारंवार शुद्धी का करणे आवश्यक असते याबद्दलही चर्चा केली जाणार आहे. यातून धर्माकडे पाहण्याची द्रुष्टी बदलावी ही भावना तर आहेच पण शुद्धीकरण का आवश्यक आहे हेही लक्षात यावे असा प्रयत्न केला जाणार आहे.

येथे मी येथे हिंदू धर्मातील त्रुटींवर प्रथम लक्ष वेधु इच्छितो. त्याची कारणे आणि संभाव्य उपाय यावर स्वतंत्र लेखात चर्चा करुयात.

१. हिंदु धर्माची धर्म म्हणुन एकही सर्वमान्य व्याख्या नाही.
२. जन्माधारित वर्ण व जातीनिहाय व्यवस्था हे हिंदू धर्माचे अविभाज्य अंग आहे.
३. कायद्याने नष्ट केली असली तरी धार्मिक पातळीवर अस्प्रुश्यता आजही विद्यमान आहे.
४. धर्म व धर्मतत्वांची सार्वभौम एकाधिकारशाही फक्त ब्राह्मण जातीच्या हाती एकवटलेली आहे.
५. हिंदु धर्माला एकमेव असा सर्वमान्य धर्मनेता नाही. या धर्मात सध्या १५ शंकराचार्य आहेत पण धर्मव्यवस्थेकडे वर्तमान परिप्रेक्षात जी परिवर्तनवादी भुमिका असायला हवी तिचा त्यांच्यात पुरेपुर अभाव आहे.
६. असंख्य धर्मबांधवांनाच हिंदु धर्म मंदिरांत आजही प्रवेश नाही.
७. स्त्रीया, मग त्या कोणत्याही जाती-वर्णाच्या असोत, त्यांना या धर्मात धार्मिक-सामाजिक पातळीवर समानता नाही.
८. वेद हे पुरातन धार्मिक वाड्मय आहे अशी मान्यता आहे परंतु आजही ब्राह्मण वगळता अन्य कोणासही वेदाध्ययनाचा/पठनाचा/धर्मक्रुत्यांचा धार्मिक अधिकार नाही.
९. हिंदु धर्मात अन्य धर्मियास प्रवेश करायचा असला तरी तशी धर्मव्यवस्था नाही. अन्य धर्मियांत प्रचार-प्रसार करणारी यंत्रना (मिशनरी) असते तशी हिंदु धर्मात नाही.
१०. जे मुस्लिम, ख्रिस्ती वा अन्य कोणत्याही धर्मात नाहीत ते (उदा. आदिवासी) हिंदुच समजले जातात जे अनैतिहासिक आणि स्वार्थप्रणित आहे.
११. बौद्ध, जैन, आणि शिख यांना हिंदु धर्मांतर्गत नेमके कोणत्या आधारे मांनले जाते याचे स्पष्ट उत्तर नाही. त्यामुळे एक सांस्क्रुति गोंधळ उडवून दिला आहे आणि त्याची कुफळे हिंदु म्हनवणा-या समाजास खावी लागत आहेत.
१२. सर्व दैवते वैदिक आहेत हे सांगितले जाते परंतू ते वास्तव नाही आणि त्यामुळे वैदिक विरुद्ध अवैदिक हा संघर्ष पेटवण्याचे पाप या धर्माने केले आहे. वास्तव स्वीकारण्याचे साहस या धर्मात नाही.
१३. जातीनिष्ठ भुमिकांमुळे या धर्माचा जोही इतिहास आहे तो जातीनिहाय बनला आहे, बनत आहे आणि तो फोफावणार याचे भान या धर्माला नाही.
१४. आधुनिक विद्न्यानयुगाचा या धर्माला अद्याप स्पर्श नाही. तो आजही पुराणपंथी आणि भुतकालीन गौरवगाथांत (ख-या कमी खोट्या अधिक) अडकलेला आहे.
१५. धर्माला कालसुसंगत बनवत सर्वसमावेशक करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी त्याला अधिकाधिक संकुचित करण्याचे प्रयत्न अधिक होत आहेत. त्यातुन धर्म हीच संकल्पना संपवण्याचे प्रयत्न होत आहेत.
१६. या धर्मात तत्वद्न्यानाच्या पातळीवर अद्वैत सिद्धांत मान्य आहे, परंतु व्यवहारात ते अमान्य आहे. हा एक दुटप्पीपणा आहे.
१७. भगवद्गीता हा हिंदुंचा एक महत्वाचा धर्मग्रंथ मानला जातो. यात गुण आणि कर्म यावरच आधारित वर्ण आणि जात असते हे स्पष्ट नोंदवले असुनही त्याच धर्मग्रंथाचा अनादर करत गुण-कर्म नव्हे तर जन्माधारित वर्ण-जात ठरवण्याची प्रथा आहे. हा खरे तर गीतेचा, पर्यायाने धर्मग्रंथाचा अवमान आहे. आणि तो धर्ममार्तंडांनीच केला आहे.
१८. ऋग्वेदानेही जन्माधारित वर्णव्यवस्थेला विरोध केला आहे परंतू हे द्न्यान स्वधर्मियांपासुन लपवले गेले आहे...म्हणुनच वेद शिकण्यास अन्य वर्णीय-जातीयांवर बंदी असावी.
१९. पुरातन काळापासुन फक्त ब्राह्मण वर्चस्व असणारा धर्म म्हणजेच हिंदू धर्म अशी व्यवस्था बनली आहे. त्यामुळे हा धर्म static झाला असून नवे शिकण्याची परंपरा गमावून बसला आहे. त्यामुळेच बौद्ध, जैनादि धर्म याच धर्मातुन फुटुन जन्माला आले आणि आज बौद्ध धर्म हा जगभर पसरला आहे. यातुन हिंदु धर्माची अवनतीच होत गेलेली दिसते.
२०. हिंदु धर्म तत्वद्न्यानाच्या पातळीवर अद्वैतवादी आहे तर प्रत्यक्ष व्यवहारात बहुदैवतवादी आहे. नवनव्या दैवतांना जन्माला घालायचे, त्यांना पुरता उरणार नाहित अशा भाकड धार्मिक पुराकथा निर्माण करून स्थानमाहात्म्य वाढवायचे व पोटभरू धंदा करायचा या नादात एकच देवता-द्वयाला विखंडित करत जायचे यातुन एक धार्मिक अनाचार उत्पन्न केला गेला आहे. त्यामुळे "एक: सत...विप्र बहुदा वदंति..." या मुलभुत सत्याचा विपर्यास केला गेला आहे.
२१. वैदिकाश्रमी अभिमान बाळगत, त्याचाच प्रचार-प्रसार करत प्रत्यक्षात अवैदिक दैवतांचे अपहरण करत एक सांस्क्रुतिक व्यभिचार या धर्मात पुराणकाळापासुन केला जात आहे. त्यामुळे दैवतांचे मुळ स्वरूप धुसर होत गेले आहे आणि आता मुळ स्वरुप शोधण्याच्या मोहिमेवर संशोधकांना पाठवले जात आहे.
२२. धार्मिक म्हणुन काही समांतर राजकीय ते राजकीय संघटना या देशात आहेत परंतु त्यांना धर्मातीलच मुलभुत समस्या सोडवण्यात रस नाही. त्यामुळे त्या आजतागायत व्यापक सामाजिक/धार्मिक मुलाधार प्राप्त करु शकलेल्या नाहीत.
२३. अहिंसेचे स्पष्ट तत्वद्न्यान इसपु. १८०० मधील उपनिषदांत आलेले असतांनाही तेंव्हाचेही आणि आताचेही हिंदुत्ववादी हिंसात्मक तत्वद्न्यानाची केवळ अद्न्यानापोटी भलावन करत आहेत. हे मुळात धर्मविपर्यस्त आहे याचे भान कोनालाही नाही. उलट आक्रमक/हिंसक धर्मतत्वद्न्यान पाजळणारे वा तशी अल्प-स्वल्प क्रुती करणारे लोकांना आदर्श वाटावेत यासाठीच हिंदुत्ववाद्यांचा अधिक आटापिटा आहे. हे मुळात धर्मतत्वद्न्यानात बसते काय याबाबत कोणीही विचार करतांना दिसत नाही.
२४. वैदिक नेमके कोण होते आणि अवैदिक नेमके कोण याबद्दल विद्वानांनी स्वतंत्रपणे संशोधने केली असली तरी नेमके संशोधन कोणते स्वीकारायचे याबाबत कोणताही निर्णय घ्यायचे साहस अद्याप एकाही धर्मगुरुने केलेले नाही. यामुळे ब्राह्मण ते अन्य जातीय आपले मुळ नेमके काय याबाबत संभ्रमित असून त्याचा स्वार्थी शक्ति गैरफायदा घेत आहेत.
२५. हिंदु म्हनजे नेमका कोण...याचाही निर्णय लागलेला नाही...म्हनजेच हा हिंदु नामक धर्म अस्तित्वात तरी आहे कि नाही आणि असला तर त्याची नेमकी धारणा काय हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो.

या वरील त्रुटी मी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. पुढील चर्चेत कदाचित अजुनही अनेक बाबी समोर येतील. पण यावर चर्चा आवश्यक वातते कारण जे स्वत:ला हिंदु समजतात आणि आंधळेपनाने भ्रमात राहतात त्यांचे डोळे उघडावे आणि हिंदू असने म्हनजे काय हे समजावून घेत धर्मातील कळकटे काढण्याचा प्रयत्न करत शुद्धीकरन होत धर्म हा सर्वसमावेशक आणि समतेच्या पायावर कसा जाईल यासाठी सर्वच प्रयत्न करतील अशी या चर्चेच्या निमित्ताने अपेक्षा आहे.

5 comments:

  1. संजय साहेब.
    एकदम माहिती पुर्ण लेख....
    हि जर लेखमालिक असेल तर मग वर भाग-१ , २ ..... अशी हेडींग दया.

    ReplyDelete
  2. सर,
    माझा अभ्यास आपल्या अभ्यासा पेक्षा खूपच कमी आहे. तरी हि मी तुमच्या विवेचनावर माझी कमेंट्स देत आहे.
    माझा विश्वास आहे कि ज्या झाडाला जास्त फळे लागली असतात ते दगड मारल्यावर पण रसाळ फळच देते.
    माझा हा दगड पण नक्कीच तुमच्या कडून हे वाचणार्यांना नक्कीच रसाळ फळ देईलच.

    हिंदू धर्म हा विविध मनोवृत्ती आणि विविध उपासना पद्धतीचा सर्वसमावेशक धर्म असल्याकारणाने त्याला व्याखेत बसवणे अवघड आहे.
    हिंदू धर्माचे तुमचे विवेचन हे पारशी आणि यहुदी या पुरानातन धर्मांना पण लागू होते.
    प्रत्येक धर्माचे ३ भाग असतात
    १. तत्वज्ञान
    २. पुराण - जेथे तत्वज्ञान हे अधिक सोप्या पद्धतीने सानागण्याचा प्रयास केला जातो.
    ३. कर्मकांड - पूजा विधी, यज्ञ, विविध क्रिया, अनुष्टान ज्या योगे धर्माचे तत्व लोकांना समाजाने अजूनही सोपे जावे.

    जर आपण बघितले तर हिंदू धर्मावर अनेक संकटे आली. (देशावरील अक्रमन पासून ते इतर धर्मांचा उदय)
    आणि त्या पासून वाचण्यासाठी तसेच नवीन गोष्टी सामावून घेण्यामुळे त्या मध्ये अनेक विकार आले.
    त्या पैकीच हा लपून छपून राज्य करण्याचा (ब्राम्हण आणि क्षत्रिय) आणि हटवादी बंधनांचा (ब्राम्हण) अतिरेक त्या मध्ये आला.

    महाभारत काळात कर्णाला त्याचा जाती मुळे - जन्मामुळे परीक्षेत सामावून घेतले नाहि.
    पण राजा म्हणून घोषित करताच त्याला तिथे उतरू दिले.

    तसेच हा धर्म जगभर पसरवावा असा कधीच या धर्माच्या लोकांचा कल न्हवता. हा धर्म कधीच आक्रमकांना जन्माला घालू शकला नाहि ते त्याच्या उच्च मानवी तत्वज्ञानामुळेच.
    त्यांनी अनेक कर्मकांड तयार केले मग धर्म शुद्धी आणि धर्म स्वीकारण्याचे कर्म कांड का नाहि बनवले.
    जे चांगले आहे ते सामावून घेण्याचा आणि अति मानवता वादी(स्पृश्य - अस्पृश्य हे नंतर आलेले विकार आहेत असे समजून) असा धर्म त्यात आलेल्या विकारांमुळे असा जर्जर झाला असेल.
    बौद्ध, जैन किव्हा सिख धर्म हे वेगळे झाले ते त्यांना हा धर्म आवडत न्हवता म्हणून नाहि तर या हिंदू धर्माला समकालीन लोकांनी चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला त्या चौकटीतून निघण्यासाठी.

    सर्वात मोठी वाईट गोष्ट जर कोणती असेल तर तर ते दुर्दैव.
    या धर्माला असा कोणी नेताच मिळाला नाहि जो हा धर्म सोप्या सरळ भाषे मध्ये समजावून सांगेल.
    सर्वसमावेशक गुणा मुळे जे वाईट आहे ते सुद्धा यात सरळ सरळ येत गेले. ते अडवणारी अशी एकमेव सत्ता किव्हा न्यायनिवाडा करू शकणारा असा नेता मिळाला नाहि.

    या धर्माची व्याप्ती खूप मोठी असल्या कारणाने सर्वमान्य असा नेता याला मिळू शकला नाहि असे वाटते.

    सामान्य लोक जे याच्या उच्च किव्हा समजण्यास अवघड अशा तत्वज्ञाना पासून लांब राहिले.
    जर त्यांना नेता मिळाला असता तर किव्हा त्यांनी इतिहास लेखन हे सुलभ रित्या केले असते तर
    सामान्य लोकांना नेता नसताना सुद्धा हा धर्म आणि त्याचे तत्वज्ञान कळायला सोपे झाले असते.

    सोपा, एकच भाषेत, एका विशिष्ठ पद्दतीने लिहिलेला इतिहास आणि सर्वमान्य नेता यांच्या अभावानेच आज हिंदू धर्म जर्जर झाला आहे.

    ReplyDelete
  3. हिंदू धर्माची व्याख्या करता येत नाही हा आपला समज बरोबर नाही. बृहदारण्यकोपनिषदात सांगितल्याप्रमाणेदुःखाची या धर्माचा एकमेव उद्देश सुखाचे वर्धन आणि दुःखाचा निरास हा आहे. प्रत्येक व्यक्तीगणिक सुख-दुःखाची कल्पना वेगळी असल्याने या धर्मात अनेक संप्रदाय निर्माण झाले आहेत. आपले आक्षेप धर्म हा मानवी इतिहासातला एक अनावश्यक अविष्कार हे गृहीत धरल्याने निर्माण झाले आहेत

    ReplyDelete
  4. अगदी योग्य विश्लेषण!
    थोडक्यात,
    हिंदु धर्माचे
    १.ब्रम्ह
    २.ब्राह्मण्य
    ३.वेद
    हे तीन अविभाज्य भाग आहेत तथापि धर्माचे मुळ स्वरूप आणि बाह्य स्वरूप पुर्णत: अलग आहे किंबहुना विरोधाभासाचे आहे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...