Monday, March 26, 2012

ग्रेस येथेच आहेत....!

कवी मरत नसतात. ग्रेस येथेच आहेत. फक्त नव्या अनुभुतींची नव्हाळी पहायला मिळनार नाही एवढेच.

"कवि गेला तेंव्हा ग्रीष्माचा आक्रोश उमदळत होता...
चौकटीत अडकला तेंव्हा हताश सुर्य एक होता...
तो कवि होता म्हणुनी रडल्या कितीक अभागी जमीनी
त्या पायी झिजला होता तो एक महाकवी होता...
कवि गेला तेंव्हा...

तो गेला अन उगाचच अगोचर भावना अनावर झाल्या
तो म्हटला होता...मी आलो अन भावना भावोत्कट झाल्या
या भावांनी जगलो आणिक मेलो जसे माणिक प्रुथेसम
तो म्हटला होता मी धरल्या नाही गोष्टी आल्या-गेल्या"

ग्रेस गेले. ते गेले नाहीत. त्यांची मला आवडती कविता येथे थरथरत्या हातांनी टंकित करतो आहे...

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई
कवी : ग्रेस

6 comments:

  1. ग्रेसांबद्दल आदर दाखवण्याचा हक्क तुम्ही कधीच गमावलाय . आता जो दिसतोय तो केवळ दंभ आहे .

    जेंव्हा तुमच्या खास मित्राने ग्रेसांसारख्या अदभुत अलविया कवीला जातीवरुन घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या तेंव्हा तुम्ही मूग गिळून गप्प होता .


    आता हे चाळे करुन काहीही फ़ायदा नाही .

    ReplyDelete
    Replies
    1. उदयजी, मरणांतानि न वैराणि हे तुम्हास कदाचित महित नसावे असे दिसते.

      Delete
  2. मला हेच माहीत आहे की कवी व विद्वान हे राजापेक्षा महान असतात कारण राजाची फ़क्त आपल्याच देशात पूजा होते विद्वानांची व कवींची पूजा ही सगळीकडॆ होते .

    अशा वेळेस केवळ तुमचा धर्म स्विकारला नाही म्हणून जातीवरुन शिव्यांचे समर्थन करणे किती योग्य होते त्यावेळेस?

    ReplyDelete
    Replies
    1. Udayji, you are grossly mistaken. I am Shaivait and will be Shaivait forever. I never have abused nor supported abusing to anyone. Everyone has freedom of speech and expression. If one of my friend has abused Grace, it doesnt mean I am supporter to his/her thoughts. You too are my friend, it doesnt mean I am supporter of your every thought.

      And every person is open for critisism as soon he enters public life. On death, one only should think of good things those have been left by the person.

      Delete
  3. Sanjayji , I am a Hindu and will be hindu forever and being hindu i respected your religion not yours but everyone's .

    I understand and respect the necessity of freedom of expression beyond that i believe being a human being we should celebrate the differences .

    I believe everyone should be open for criticism but at the same time we should honor the people whom we criticize .

    Abusing someone because of his caste is not at all acceptable in any situation . i reject everyone who does it and will reject them forever . Your friend has done that and we all should condemn it .

    Thanks for honoring me by calling as friend .

    Take care pal .

    ReplyDelete
  4. mala shalet astana yanchya kavita khup awadat asat

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...