Friday, September 14, 2012

१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज



इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात. १ फेब्रुवारी १६८९ ते ११ मार्च १६८९ या कालातील छ. संभाजी महाराजांबदल मराठी इतिहास असाच मौन पाळुन बसला आहे. ढोबळ व संक्षिप्त माहिती व्यतिरिक्त हातात काहीच लागत नाही. एका सार्वभौम राजाची अटक ते निघृण हत्या घडल्याची अति-अपवादात्मक घटना घडली असतांनाही असे घडावे याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. असो. तरीही आपल्याला कालक्रमानुसार ही संपुर्ण घटना नजरेखालुन घालायची आहे व उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. या उत्तरांतुन अजुन काही प्रश्न निर्माण होतील याची मला जाणीव आहे...पण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न एक अभ्यासक म्हणुन निकोपपणे करणे मला आवश्यक वाटते.

मराठी रियासत भाग दोनमद्धे येणारा कालक्रम असा...

१) २१–४-१६८०  रोजी राजारामास गादीवर बसवण्यात आले
(२) ६-५-१६८०   राजारामाचे मंचकारोहण
(३) १८-६-१६८०  संभाजी रायगडावर आला
(४) २०-७-१६८०  संभाजीने मंचकारोहण केले
(५) १६-१-१६८१    संभाजीचा राज्याभिषेक
(६) १-२-१६८९    संगमेश्वर मुक्कामी असताना छत्रपती संभाजी महाराज व कवि कलशास शेख निजाम यांनी ( जवळच्याच खटोले गावी ) पकडले.
(७)९-२-१६८९  राजारामाचे मंचकारोहण रायगडावर
(८) शेख निजाम याने संभाजी महाराज व कलुशास १५ फेब्रुवारी १६८९ रोजी बहादुरगड (पेडगांव, जि. अहमदनगर) येथे औरंगजेबासमोर उपस्थित केले.
(९) ११-३-१६८९  संभाजीचा वध कोरेगावच्या छावणीत
(१०) २५-३-१६८९  झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा
(११) ५-४-१६८९ रायगड सोडून राजारामाचे प्रतापगडास आगमन
(१२) ऑगस्ट १६८९ राजारामाचे प्रतापगड सोडून पन्हाळ्यास प्रयाण
(१३) ३-११-१६८९  रायगड किल्ला झुल्फिकारखानास हस्तगत  

संभाजीमहाराजांविषयी जेधे शकावली आणि करीनामध्ये आलेली माहिती खालीलप्रमाणे :-

१) जेधे शकावली 

(१) वैशाख शुध ३ त्रितीयेस राजारामास आनाजी पंत सुरणीस यांनी मंचकी बैसवीले
(२) आशाड शुध २ शुक्रवारी संभाजी राजे रायेगडास आले राज्य करू लागले राजाराम कैदेत ठेविले
(३) श्रावण शुध ५ पंचमी संभाजी राजे मंचकाराहोन जाले
(४) माघ सुध ७ रायेगडी संभाजी राजे सिव्हासनी बैसले
(५) माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजीराजे व कविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास आले असता सेक निजाम दौड करून येऊन उभयेतांस जिवंतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले
(६) फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किल्लेदार चांगोली काटकर व येसाजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काढून बाहेर आणून मंचकी बैसविले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कार्य भाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले
(७) फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कवि कलश यास जिवे मारून सिरच्छेद केले
(८) चैत्र शुध १५ अवरंगजेब जुलपुकारखानास पाठऊन रायगडास वेढा घातला चैत्र वद्य १० शुक्रवारी राजाराम पळोण प्रतापगडास गेले.

२) जेधे करीना 

(१) ..... शेख निजाम यास फौजेनसी राजश्री संभाजी राजे याजवरी रवाना केले त्याणे संगमेश्वरास येऊन राजश्री संभाजी राजे व कविकलश यास माघ वद्य ७ शुक्रवारी सेख निजामाने धरून तुलापुरास नेले तेथे पातशाहानी उभयतांस जिवे मारिले राजश्री राजाराम रायेगडी अटकेत होते ते बाहेर काढून मंचकावारी बैसऊन राज्याभिषेक केला शके १६११ शुक्ल संवछरी जुलपुकारास रवाना केले राजश्री राजाराम निघोन रायेगडीहून प्रतापगडास आले.
शकावली व रियासती तसेच मुस्लिम साधनांतील माहितीनुसार वर येणारा कालक्रम बरोबर आहे असे दिसते.
वरील घटनाक्रमावरुन पहिली ठळक नजरेत भरणारी बाब म्हणजे इकडे संभाजी महाराज अटकेत पडले असतांनाही मंत्री व अन्य सरदारांनी राजाराम महाराजांची तात्काळ सुटका करुन ९ फेब्रुवारी रोजी त्यांचे मंचकारोहन केले. म्हणजे ही सुटका संभाजी महाराजांच्या अटकेनंतर दोनेक दिवसांतच झाली असण्याची शक्यता आहे. मंचकारोहनचा सरळ अर्थ असा कि राजाराम महाराजांना नवा राजा म्हणुन घोषित करण्यात आले. या समारंभास अर्थातच सर्व मंत्री व महत्वाचे सरदार हजर असले पाहिजेत.
याचा अर्थ असा होतो कि संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा राजाराम महाराजांना नवा राजा म्हणुन घोषित करण्यात मंत्रीगण व सरदारांना अधिक रस होता. राजाराम महाराजांनी सिंहासनावर बसताच येसाजी व सिदोजी फर्जंद या संभाजी महाराजांच्या समर्थकांना कडेलोट करण्यात आले. सिदोजी फर्जंद हा संभाजी महाराजांचा विश्वासु अधिकारी होता. त्याने संभाजी महाराजांच्या वतीने पोर्तुगीजांना पाठवलेली दोन पत्रे (२४ डिसेंबर १६८४ व १० मार्च १६८५ )उपलब्ध आहेत. तत्पुर्वी संभाजी महाराजांनी अटकेत टाकलेल्या चांगोली काटकर व येसाजी कंक यांना मुक्त केले.
म्हनजेच राजा म्हणुन राजाराम महाराजांनी कार्यभार तर घेतलाच पण संभाजी महाराजांच्या विश्वासु अधिका-यांना ठार मारले व ज्यांना अटकेत टाकले होते त्यांना मुक्त केले व सवतंत्र कारभार सुरु केला.
बखरकार संभाजी महाराजांवर अन्याय करतात हे खरे मानले तर राजाराम महाराजांचे हे दिलेले दोन हुकुम (बखरकार राजाराम महाराजांचे पक्षपाती असल्याने) तत्कालीन वास्तवाकडे बोट दाखवतात.
हे सगळे संभाजी महाराज अटक झाल्यापासुन अवघ्या नऊ दिवसांत झाले आहे हे विशेष. राजाराम महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी सरदारांना कसलाही हुकूम दिलेला दिसत नाही.  झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा २५-३-१६८९ रोजी पडलेला आहे. संभाजी महाराजांची हत्या तत्पुर्वीच झालेली होती. त्यामुळे मोगलांच्या कोकणातील प्राबल्यामुळे मराठ्यांना हालचाल करायला अवधी मिळाला नाही या म्हनण्यात तथ्य नाही.
एवढेच नव्हे तर ९ तारखेला राजाराम महाराज स्वत:च सत्ताधीश बनल्यामुळे औरंगजेबाशी स्वराज्याच्या वतीने संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी तह करण्याचे अधिकार आता सरळ राजाराम महाराजांकडे आले होते. संभाजी महाराजांच्या हाती काही उरलेलेच नव्हते. त्यामुळे धर्मांतर, किल्ल्यांची व खजिन्याची औरंगजेबाची मागणी याबाबत फारसी सधनांनी जे लिहुन ठेवले आहे ते विश्वसनीय मानता येत नाही. औरंगजेबाचे हेरखाते प्रबळ होते. काही मराठा सरदारही त्याचे हेर म्हणुन काम करत होते. असदखानाला औरंगजेब लिहितो कि...."मुकर्रबखानास पन्हाळा घ्यायला पाठवले आहे. त्यास ताबडतोब कळवा कि  त्यांनी ताबडतोब तेथील जहागिरदारावर (संभाजीवर) चालुन जावे. तो जहागिरदार एकटाच रायरीवरुन खेळण्यास गेला आहे. त्याचे कारण म्हणजे शिर्क्याशी भांडण देणे हे आहे....." (रुकायत-ई-आलमगिरी)
म्हणजे औरंगजेब संभाजी महाराजंची प्रत्येक क्ल्हबर ठेवत होता. एवढी संवेदनशील माहिती त्याच्यापर्यंत पोहोचत होती याचाच अर्थ असा कि रायगडावरही घरभेदे होते. जेधे शकावलीनुसार खेम सावंत, शिर्के, नागोजी माने ई. मंडळी औरंगजेबाला सामील झाली होती व तेच संभाजी महाराजांची वित्तंबातमी औरंगजेबाला पुरवत होते.
दुसरी महत्वाची बाब अशी शंभुराजे संगमेश्वराला आले १ फेब्रुवारीला...किंवा तीन दिवस आधी. पण त्यांच्या सोबत फक्त ४०० ते ५०० भालाईत होते. मुकर्रबखान अवघ्या ६०-७० मैलांवर कोल्हापुरी आहे हे संभाजी महाराजांना माहित असावे. तरीही एवढ्या अल्प सैन्यासह ते कसे हा प्रश्न उद्भवतो. मोगल येथेवर येणार नाहीत एवढे गाफिल संभाजी महाराज राहतील असे वाटत नाही कारण शिवाजे महाराजंच्या निधनापासुन अनेक कटकारस्थानांचा त्यांना सामना करावा लागला होता. बरे ही तुकडी होती फक्त भालाइतांची. मोठ्या लढाइला अनुपयुक्त. त्यांच्या सोबत सरसेनापती म्हाळोजी व संताजी घोरपडॆ हे पितापुत्र व खंडोजी बल्लाळही होते. (यात जेधे शकावली फारशी विश्वसनीय धरता येत नसली तरी संताजी राजांसोबत होता हे स्पष्ट दिसते.) असे सेनानी बरोबर असतांना त्यांचे सैन्य मात्र बरोबर नव्हते. मुकर्रबखानाने दोन हजार घोडदळ व हजार पदाती यांच्या बळावर एक फेब्रुवारीला अचानक हल्ला चढवला. या अनपेक्षीत हल्ल्यामुळे राजांचे सैन्य फारसा प्रतिकार करु शकले नाही. ते पळुन गेले. अधिकारीही पळाले. अटक झाले ते संभाजी महाराज आणि कवि कलश व काही वरकड लोक. यात संताजीचे नांव दिसत नाही म्हणजे तेही पळुन जाण्यात यशस्वी झाले असे दिसते. ही पळालेली मंडळी सरळ आसपसच्या किल्ल्यांच्या आश्रयाला निघुन जाण्यात यशस्वी झाली.
आता संभाजी महाराज मद्याच्या वा कवि कलशाच्या अनुष्ठानच्या नादात पकडले गेले हे बखरकारांचे म्हणणे मान्य करताच येत नाही. कसल्याही परिस्थितीत ही अटक अपरिहर्यपणे अटळ बनली होती. संभाजी महाराजांना सापळ्यात तर अडकावले गेले नाही ना हाच प्रश्न उपस्थित होतो. य प्रश्नाकडॆ वरील घटनाक्रम पाहता निकोपपणे पहायला हवे.
खरे तर रायगडावर व सह्यद्रीच्या रांगांतील किल्यांच्या किल्लेदारांपर्यंत ही बातमी अवघ्य दोनेक दिवसात पोहोचली असनार. मुकर्रबखानाचे एकुण सैन्य होते फक्त तीन हजार. बादशहा त्यावेळी होता तीन-चारशे किलोमीटर दुर अकलुजला. संगमेश्वरपासुन  राजांना घेवून मुकर्रबखान बहादुरगड्ला (पेडगांव, जि. अहमदनगर) पोहोचला तो १५ फेब्रुवारीला. हे अंतर काटायला त्याला तब्बल पंधरा दिवस लागले. हा प्रवास त्याने चिपळुन, खेळना, पन्हाळा ते बहादुरगड असा पुर्ण केला. या मार्गावर मराठ्यांच्या ताब्यात अनेक किल्ले होते. सह्याद्री घाटात तर मराठ्यांना मुकर्रबखानावर हल्ला चढवण्याची संधी होतीच. पण असा एकही प्रयत्न झाला नाही. त्यांनी तसा काही प्रयत्न करु नये अशी काही आज्ञा तर नसेल?
आपल्य राजाचे सर्वतोपरी रक्षण करणे व त्याला योग्य ते संरक्षण पुरवणे ही जबादारी प्रधानमंडळाची असते. बखरी विश्वसनीय मानल्या तर सेनापती म्हाळोजी (मालोजीराजे) राजांसोबतच होते...आणि फक्त चार-पाचशे भालाइत? तेही ते शिर्क्यांचा तंटा सोडवायला गेले असतांना? छ. शिवाजी महाराजांचे स्वत:चेच अंगरक्षक दल हे दोन हजार कसलेल्या सैनिकांचे असायचे. यातुन दोनच तर्कनिष्ठ अर्थ निघू शकतात...एक म्हणजे संभाजी महाराजांना मुकर्रबखान चालुन येतो आहे ही बातमीच एरवी चाणाक्ष व तरबेज असलेल्या हेरखात्याने काही कारणास्तव दिली नाही. अरण्यातुन कितीही लपत प्रवास केला तरे हा प्रवास तीन हजार शत्रूसैन्याचा होता...तोही तीन दिवस चाललेला....त्यांचे अस्तित्व हालचाल कोणाच्याही लक्षात येणार नाही हे मला तरी संभवनीय वाटत नाही. दुसरा म्हणजे संभाजी महाराज पकडले जावेत हीच सरदार-मंत्रीगणाची इच्छा होती म्हणुन हा घटनाक्रम घडवण्यात आला असे समजायला बराच वाव आहे. अगदी समजा संभाजी महाराज नशेच्या अंमलामुळे बेसावध राहिले...पण त्यांचे हेरखाते वा सरदार वा अगदी भालाइतही अचानक हल्ला होईपर्यंत बेसावध होते असे मुळीच म्हणता येत नाही. राजाराम महाराजांनी तात्काळ सिंहासनावर बसणे, अधिकार वापरायला सुरुवात करणे पण संभाजी राजांच्या सुटकेसाठी एकही युद्धाची आज्ञा जारी न करणे, औरंगजेबाकडे एकही मुत्सद्दी व वकील तडजोड/तहासाठी न पाठवणे या गोष्टी काय सुचवतात? राजाराम महाराज ५ एप्रिल १६८९ रोजी झुल्हिकारखानच्या वेढ्यातुन निसटतात पण महाराणी येसुबाईं व संभाजीपुत्र बाल शिवाजी (शाहु महाराजांचे मुळ नांव) मात्र झुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यावर ३ नोव्हेंबर १६८९ पर्यंत रायगडावरच अडकुन पडतात व शेवटी मोगलांचे कैदी होतात....त्यांना मात्र आधीच किल्ल्याबाहेर काढले जात नाही वा तसा एकही प्रयत्न होत नाही याचाही अर्थ कसा लावायचा?
मला असे वाटते संभाजी महाराजांना आपल्याला सर्वांनी त्यागल्याचे अटकेच्या काही दिवसांतच समजुन चुकले असावे म्हणुन ते मृट्युला धीरोदात्तपणे सामोरे जायला सज्ज झाले.
असो...या काही प्रश्नांचे व तर्कांचे अजुनही काही पैलु आहेत...ते पुढील भागात...

71 comments:

  1. संभाजीचे शत्रू ब्राम्हण नसून मराठेच होते हे आपल्या लेखावरून पुराव्यानिशी सिद्ध होते. यावर संभाजी ब्रिगेडचे म्हणणे काय आहेत ते पहायला हवे.

    ReplyDelete
    Replies
    1. मराठे जर आपल्याच राज्याचे शत्रु असते तर लढलो असतो का आम्ही त्यांच्या नंतर एकुण २७ वर्ष झुंज दीली औरंग्याला आणि इथेच गाडला।
      राजकारण मंत्रीमंडळाच।
      पोर्तुगीज, इंग्रज, मुघल किंवा नीजाम यांच्या पैकी कोणीतरी मंत्रीमंडळ फोडलं होतं।
      कींवा सोयराबाई खुद्द कैकई झालीच होती, महाराज असताना।

      Delete
  2. संजय सर ... पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतो आहे. दुसर्‍या भागानंतर माझ्याकडे भाष्य करायला मुद्दे असतील याची खात्री आहे :) (त्रिशुळ कुशीत घेऊन झोपायला चाललो आहे. शुभ रात्री)

    ReplyDelete
  3. abhyasu lekh! pan sambhajee raje pakadle jaavet ashee ya sardaranchi ichcha ka hotee? rajaram ase ka waagle?

    ReplyDelete
  4. मुघलांमध्ये सत्ता मिळवण्या साठी भाऊ-भाऊ एकमेकाच्या जीवावर उठत. दुर्दैवाने हाच प्रकार राजाराम आणि संभाजी राजे यांच्यात झाला कि काय?संभाजी राजांनी राजाराम आणि सोयराबाई यांना कैदेत ठेवले होते. दरबारातील सरदार संभाजी आणि राजाराम यांच्यात विभागले होते. वेळ साधून त्यांनी संभाजी ला बाजूला करून राजारामला गाडीवर बसवले. संभाजी राजे शूर होते मात्र आगोदर ते एकदा दिलेर खानाला (मोगलांना) जावून मिळाले होते.नंतर उपरती झाल्यावर स्वराज्यात परतले मात्र यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झालीच.शिवाजी महाराज हे जाणून होते म्हणून ते स्वराज्याच्या दोन गाद्या करू पाहत होते १ संभाजी २ राजाराम(सोयरा बाई). मात्र ते होवू शकले नाही. साम्ब्जाजीला पूर्वायुष्यातील चुका शेवटी भोवल्या असेच म्हणावे लागेल.संजय जी, संभाजीच्या अटकेसाठी दरबारी, मराठे सरदार आणि खुद्द राजाराम जबाबदार असतील तर मग एका जातीच्या नावानेच का शिमगा केला जातो? लेख उत्तम आहे. अजून प्रकाश टाकावा.

    ReplyDelete
    Replies
    1. Maharajan chya yojna purn zalya shivay konalach kalalya nahit sambhaji maharaj moghlan javun milale mhntos..to pn ek rajkarnacha bhag hota .tevha shivaji maharaj dakshin mohime vrti hote,ani diler khan maharashtrat hota..ugach yudh karun wel ghalvu nye mhnun ha sagla khel yojla hota...adhi itihas eka ghtnechya eka bajune nhi sarv bajunni v4 karun lihatat ...adhi samjun ghya

      Delete
  5. Sambhajinaa pakadle temva Rajaramancha way kaay hota sangel ka kuni?
    :- Prajak Khake

    ReplyDelete
    Replies
    1. rajaram was about 19 yrs old when Samhajiraje was captured.

      Delete
    2. सर शंभूराजे मद्यपान प्राशन करत होते हे खर आहे का

      Delete
  6. संजय सर, वैचारिक लेख आहे. भाऊबंदकी्ने तर इतिहासापासुन मराठ्यां ची वाट लावली आ्हे.धर्मवीर ही ह्याला जर बळी पडले असतिल तर खरेच मराठेशाहीचे दुर्दैव.....

    ReplyDelete
  7. नमस्कार सर्! आपले म्हणणे एका विशिष्ट तर्कानुसार सुसंगत आहेच नेहमीप्रमाणे! पण मराठ्यांनी काही केले/ केले नाही ह्याला आपल्याकडे कागदोपत्री पुरावा मिळत नाहीय. उपलब्ध मते जर केवळ मुघल/मराठेतर साधनांवरून बनवली असतील (चू.भू.द्या.घ्या.) तर त्यावेळची अस्सल मराठ्यांच्या बाजूची कागदपत्रे आपल्याला दुर्दैवाने मिळत नाही हे लक्षात घेता असा तर्क लावणे घाईचे होईल असे मला वाटते! आणि असे तर्क लावायचे झाल्यास तर डॉ. जयसिंगराव पवारसरांच्या 'मराठेशाहीचे अंतरंग' ह्या पुस्तकातील त्यांनी दिलेले लोकप्रचलित कथांचे (ह्या कथांना अधिकृत कागदपत्रांची जोड उपलब्ध नसल्याचा निर्वाळा पवार सरांनी दिला आहेच)दाखले का नाकारावेत? दुर्दैवाने ह्या इतिहासाचे परिशीलन करायला तुटपुंजी साधने हा मोठा धोका/अडथळा आहे हे मान्य करून सध्या तरी तर्काधारे पक्का निष्कर्ष काढणे अवघड आहे, असे वाटते. बाकी आपली मांडणी व लेखन नेहमीप्रमाणेच आवडले!
    धन्यवाद सर्!

    ReplyDelete
    Replies
    1. हेमंतजी, सध्या तर्कधरीत मते आहेत...निष्कर्ष नहीत जे अपरिवर्तनीय असतात. मराठी साधनेच मी बव्हंशी विचारात घेतली आहेत...उदा जेधे शकावली, करीना, चिटनीसी बखर ई. राजाराम महाराजांचे मंचकारोझन, अनेकांची कैदेतुन मुक्तता आनि काहींना कडेलोटाच्या शिक्षा इ. बाबी नोंदवलेल्या आहेत...मग संभाजीराजांच्या अटक वगळता अन्य का नाही हा प्रश्न साहजिकच उद्भवतो. त्याचीच उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चालु आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

      Delete
    2. आपन छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे त्याबद्दल आपन जाहीर माफी मागावी जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे 🙏

      Delete
  8. HELLO SIR...KHUPCH GREATE ARTICLE AAHE..SATYA KI JAY HO... HAATI JAATICHE NISHAN AANI PAAYAT JAATICHYA BEDYA GHALUN ANDHARAKADE PRAVAS KARNARYA B GEADE BHURTYANNO VELICH JAAGE VHA...JAY BHIM...!!!

    ReplyDelete
  9. Dear sonawani sir,
    Sambhaji rajana pakdun denyat kavi kalusha yacha hat hota ase
    Sangitale jate te khare ahe ka?

    ReplyDelete
    Replies
    1. Asa dava kela jato he khare ahe...pan tyat tathy naahee karan kalushalahi thar marle gele. To samil asata tar tyala vachavale gele asate.

      Delete
  10. आपला लेख विचार करावयास लावील असाच आहे. मांडणीहि तर्कशुद्ध आहे. राजारामाचे अल्पवय व बंधनात असणे विचारात घेतले तर जरी ही कटामुळे घडलेली घटना मानली तरी व्यक्तिशः त्याचा पुढाकार असेल असे म्हणणे कठीण आहे.
    संभाजीला सोडवण्याचे प्रयत्न झाले की नाहीत याबद्दल कसलीच नोंद मिळत नसेल तरी झाले नाहीतच असे कसे ठरेल? अयशस्वी किंवा किरकोळ प्रतत्नांची दखल कागदोपत्री मिळाली नाही तर नवल नाही.
    संभाजीवरील यशस्वी छापा हा फितुरीवर आधारलेला असेल तर मुघल कागदपत्रात वा पोर्तुगेझ/इंग्रजी/फ्रेन्च कागदपत्रात त्याचे प्रतिसाद उमटले असतील. (शिवाजीचा मृत्यु विषप्रयोगाने झाल्याची शंका पोर्तुगीझ रेकॉर्ड्स मध्ये व्यक्त झाल्याचा उल्लेख पुरंदरे यांच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते.)
    मी एक सामान्य वाचक आहे संशोधक नाही. सत्याचा पाठपुरावा करण्याचे काम आपल्यासारख्या अभ्यासकाचे आहे व ते आपण करत आहात याबद्दल आपले अभिनंदन.

    ReplyDelete
    Replies
    1. Ek vinanti fkt ki kiman itihasatil vyaktin baddal aadar thevava as ekeri ulekh shobhat nahi...ani aplyala to hakk pn nahi...

      Delete
  11. कोणीही कितीही आणि कशीही आपटली तरी राष्ट्रवादी २०१४ मध्ये सत्तेत येणार हे नक्की.

    ReplyDelete
    Replies
    1. ata ithe Rastrawadicha kai sambandha... B-Gradee murkha pana ahe vatata.

      Delete

  12. रविंद्र तहकीक साहेबांनी दिलेली ही प्रतिक्रिया...काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना ती येथे प्रकाशित करता येत नव्हती म्हणुन त्यांनी मेसेजमद्धे पाठवली ती मी वाचकांसाठी येथे उपलब्ध करुन देत आहे...
    Ravindra Tahakik
    श्रीमान संजय सोनवणी
    स न वि वि
    आपण छत्रपती संभाजी महाराजांची जी दुर्दैवी अखेर झाली या बाबत
    जी ऐतिहासिक साधने आणि ज्या तर्कांच्या आधारावर जे काही निष्कर्ष काढत
    आहात ते गैरसमज निर्माण करणारे आहेत.
    आपण म्हणता त्या प्रमाणे संभाजी महाराजांबद्दल रायगडावरील मुस्तद्यात ताण-तणाव, रोष, बेबनाव ,अविश्वास आणि सुडाच्या भावना होत्या याबद्दल दुमत नाही. संभाजी महाराजांच्या परखड, शीघ्रकोपी, प्रसंगी अततायी स्वभावामुळे आणि खलबत खाण्यातील कुटनीती,किंवा दरबारी राजकारण या पेक्षा मैदानावरील लष्करी बाहुबळ महत्वाचे मानण्याच्या वृत्तीमुळे , शिवाजीमहाराजांच्या सोबत कामकरणार्या
    दरबार्याना शंभू अति धाडसाच्या कैफात राज्य बुडवील ( राज्य बुडाले तर आपले काय ? ) अशी भीती वाटत होती हें स्वराज्याच्या अस्तित्व आणि सुरक्षे पेक्षा स्वतःचे बुड टेकवायला सुरक्षित जागा शोधणारे दुसरे तिसरे कुणी नाही तर
    सह्याद्रीच्या कुशीतल्या मावळ पोरांनी रक्त सांडून उभारलेल्या रायगडावर कानात मोत्याच्या भिकबाळ्या आणि डोक्यावर रेशमी पगड्या घालून मिरवणारे अष्टप्रधान मंडळात मानाच्या जागा पटकावलेले तथाकथित मुस्तद्दीच होते.
    ( आणि हें सर्व ब्राम्हण होते/ वाटल्यास हा योगायोग किंवा अपवाद समजा )
    संभाजी महाराजांच्या अटके नंतर त्यांना सोडवण्याचा रायगडावरून काहीही प्रयत्न झाला नाही हें तर सत्यच आहे. त्यांना कट-कारस्थान करून मुकाबार्खानाच्या हवाली करण्यात आले हा देखील सत्य इतिहास आहे. (Continued...)

    ReplyDelete
  13. (Contd. Mr. Ravindra Tahakik)
    परंतु असे पहिल्यांदाच घडले होते असे नाही. खुद्द शिवाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने आग्र्यात नजरकैदेत टाकले तेव्हादेखील रायगडावरील मुस्तद्यानी लष्कराला दैवाचे फासे उलटे पडल्याचे सांगून हातावर हात धरून
    निष्क्रिय बसण्यास भाग पडले होते. जिजाऊ मा साहेबांसारख्या पुरोगामी आणि वास्तववादी विचार करणाऱ्या स्त्रीच्या शिवाजी महारा
    जांविषयी हळव्या असणाऱ्या भावनांचा फायदा घेवून शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी
    दबावतंत्र किंवा राजकारण करण्यापेक्षा या भटा-बामणांनी जप-आणि अनुष्ठाने घालून रायगडाची राया घालवली होती.
    केवळ आग्रा प्रसंगातच नव्हे तर पन्हाळा आणि नंतर पुरंदर प्रसंगात देखील राजा अडकला आता तो सहजा सहजी सुटण्याची शक्यता नाही हें दिसताच या भटा-बामणांनी लष्कराला गप्प बसण्यास भाग पाडले. मराठे शिपाई या भट-बामनावर श्रद्धा ठेवून असल्याने त्याचा सल्ला मनात असत. जिथे शिवबा आणि मा साहेब यांचा सल्ला मानतात मग आपण यांचे एकलेच पाहिजे ही मावळ्याची भोळी भाबडी भावना होती. त्याचाच फायदा या मंडळीनी घेतला.
    या मंडळीच्या जेव्हा असे लक्षात आले की शिवपुत्र संभाजी जर राजा झाला तर राज्य आपल्या सल्ल्याने चालणार नाही. लष्कराचा सेनापती ( त्यावेळी हंबीरराव मोहिते आणि नंतर संताजी घोरपडे ) आणि संभाजीचा वैयक्तिक सल्लागार / मित्र ( काविकलाश ) यांच्या मुळे आपले स्थान महत्व एशोआराम आणि कमाई कमी होयील तेंव्हा पासून या मंडळीनी संभाजी बद्दल अफवा /कंड्या/ गैरसमज पसरवण्याचे आणि बदनामीचे अभियान चालवले. त्या साठी त्यांनी सोयराबाईच्या मनात सावत्रपनाचे आणि राज्यलोभाचे बीज फुलवले. जिजाऊ मा साहेबांच्या
    निधनानंतर तर सोयराबाईंचा महाल कट कारस्थानाचा अड्डाच बनला. त्यांच्या कारवायांनी शिवाजी महाराज सुध्धा हतबल झाले. खचले, आजारी पडले ( की पाडले गेले ) . या मंडळीनी जिथे प्रत्यक्ष पतीच्या विरोधात पत्नीच्या मनात विष कालवले ( शिवाजी महाराज- सोयरा बाई ) , मदारी मेहतर आणि होरोजी फर्जद सारखे शिवाजी महाराजांचे विश्वासू कटात सामील करून घेतले तिथे संभाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थाने करण्या साठी काय काय केले नसेल आणि कुणा कुणाचा बुद्धिभेद केला नसेल ?

    ReplyDelete
  14. (Contd. Mr,. Virendra tahakik)

    संभाजी महाराजांना मार्गातून हटवण्याचा संगमेश्व्ह्रचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु त्या आधी असे अनेक प्रयत्न झाले. शिवाजी महाराजांची स्त्री विषयक आदर भावना आणि स्त्रीची विटंबना करणार्याला दिली जाणारी कठोर शिक्षा
    लक्षात घेऊन पहिला प्रयत्न त्याच बाबतीत झाला. त्या साठी आण्णाजी दत्तो याने खुद्द स्वतःच्या मुलीचा वापर केला. परंतु नंतर सत्य उघडकीस आले. त्यानंतरही पुन्हा एकदा याच आण्णाजी दत्तोने स्वतःच्या साडूच्या मुलीचाही वापर
    करून पहिला ( तो ही शिवाजी महाराजांच्या राज्यभिषाकाच्या गडबडीत ) हेतू हा की महाराजांनी एक तर कठोर शिक्षा करून संभाजीला कायमचे संपवावे. किंवा किमान त्याला युवराज म्हणून घोषित करु नये. परंतु हें कारस्थान
    देखील फळाला आले नाही. त्या नंतर या मंडळीनी थेट शिवाजी महाराज हेच पहिले टार्गेट ठरवले. आणि त्यांनी महाराजांच्या मनात संभाजी विषयी आणि संभाजीनाहाराजाच्या मनात महाराजांविषयी अविश्वास आणि गैरसमज
    पसरवण्यास सुरुवात केली. गैरसमज एवढे टोकाचे होते की एक वेळ अशी आली की शिवाजी महाराजांना असे वाटू लागले की संभाजी आपल्या विरुध्ध बंड करून आपल्याला मरून किंवा तुरुंगात टाकून राज्य बळकावण्याची
    तयारी करतोय आणि संभाजीला असे वाटत होते की आपला पिता कोणत्याही क्षणी आपल्याला अटक करून कायमचे नजरकैदेत किंवा काल कोठडीत टाकेल. या गैरसमजा पोटीच अखेरच्या काळात संभाजी-शिवाजी भेट होऊ
    शकली नाही. संभाजी महाराजांकडून मोगलांना जाऊन मिळण्याची चूक घडली. या घटनेने गैरसमजांची जखम आणखीनच चिघळली. अगदी अखेरच्या काळात तर खुद्द शिवाजी महाराजच नजर कैदेत होते. त्याचा मृत्यु
    कसा झाला. अंत्यविधी गुप्तपणे का उरकण्यात आला. राजाराम ला गादीवरबसविण्याची घाई कुणी केली ? हें सर्व संशयास्पद आहे.
    या घटनेनंतर संभाजी महाराजांनी पुन्हा रायगडावर ताबा मिळवल्यानंतर आणि हंबीरराव व मराठा लष्कर संभाजी महाराजांच्या पाठीशी आहे हें कळल्यावरही रायगडावरील भट-कारस्थाने थांबली नाहीत. संभाजी महाराजांना
    अकबराच्या ( औरंजेबाचा पोरगा ) हाती देण्याचा प्रयत्न झालाच. त्यात कट उघडकीस येऊन कटाचे सूत्रधार मारले गेले.

    ReplyDelete
  15. (Contd. Mr. Virendra Tahkik)

    परंतु अपप्रवूत्ती बाबत एक नियम आहे. त्याचा एकदा शिरकाव झाला की मग त्या चालवणारा एक मेला किंवा मारला तरी त्याची जागा दुसरा भरून काढतो.संभाजीराजा बद्दल असेच घडले. कट वाल्यांना हत्तीच्या पायी देऊन कारस्थाने थांबली नाहीत. त्यांची संधाने थेट औरंगजेबाच्या दरबारापर्यंत घाटली जात होती. गणोजी शिर्के काय किंवा नागोजी माने काय हें मोहरे होते. खुद्द राजाराम महाराजांना देखील याची कल्पना नसावी की हें जे काही काळ गप्प बसण्यास सांगितले जात आहे या मागे राजकारण नसून कटकारस्थान आहे. लष्कराचे हात बांधण्यामागे मुस्तद्दीपणा नसून संभाजीला मरू देण्याचा हेतू आहे. भटांच्या या कारस्थानं बद्दल राजाराम-, मराठा लष्कर , संताजी धनाजी , खुद्द
    संभाजी राजांच्या पत्नी येसूबाई देखील अनभिज्ञ होत्या. या सर्वाना असे वाटत होते की काहीतरी होयील परंतु काहीच होणार नाही हें फक्त भटाना माहित होते.
    संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृतू नंतर आणि राजाराम यांच्या अकाली निधना नंतर महाराणी ताराबाई यांच्या काळात धनाजी संताजी च्या काळात पुन्हा एकदा मराठा लष्करात चैतन्य आले. त्यात औरंगजेब जेरीस आला, हरला आणि मेला, ज्यांनी औरंगजेबाच्या राहुटीचे कळस कापून आणले त्यांना स्वतःचा राजा सोडवणे अवघड नव्हते .परंतु स्वार्थी मतलबी आणि संभाजी द्वेषाने पछाडलेल्या भटांनी आपली अक्कल-हुशारी लष्कराला हातावर हात धरून बसविण्यासाठी खर्ची घातली.
    भटांच्या या कारस्थानाचा अखेरचा आध्याय धनाजी-संताजीच्या बेबनावाने संपला. जो पर्यंत धनाजी-संताजी एक आहेत तो पर्यंत राज्यावर लष्कराचे वर्चस्व राहणार आणि आपला भाव कमी राहणार हें माहित असल्याने भटांनी
    या मराठा शिपाई गड्यात दुहीची बीजे पेरून एकमेकांच्या जीवावर उठवले. आणि अखेरीस भट त्यात यशस्वी झाले.
    त्याचा परिणाम ''''''' पेशवाई अवतरली ''''''''''
    अगदी गाढवाचा नांगर फिरलेल्या पुण्यात शिवबांनी सोन्याचा नांगर फिरवल्या पासून जी भट कारस्थानं सुरु झाली
    ती जेव्हा शनिवारवाडा उभा राहिला तेह्वाच या भटांचा पोटशूळ शांत झाला
    --------------------------------------------------------------------------------------
    श्री सोनवणी साहेब आपण आपल्या ब्लॉग वर माझ्या या मताला जागा दया अथवा
    देऊ नका ; तो आपला अधिकार आहे. मी माझे हें मत प्रतिक्रिया मध्ये टाकण्याचा
    प्रयत्न केला परंतु प्रतिक्रिया प्रदर्शित होऊ शकली नाही म्हणून इमेल करीत आहे .
    आपला
    प्रा. रवींद्र तहकिक
    ( संपादक; अनिता पाटील विचारमंच )

    ReplyDelete
  16. वैतागलेला भारतीयSeptember 18, 2012 at 3:25 AM

    गौतम बुद्धाने ज्याप्रमाणे वैदिक तत्वज्ञानाच्या मूळ पायावरच प्रहार करून वैदिकांचे वर्चस्व नष्ट केले तसे काहीही करण्याची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची इच्छा नव्हती हे आपण कधी कबूल करणार? मुळात सामाजिक सुधारणा हे शिवाजी महाराजांचे लक्ष्य नव्हते हे मान्य करण्यात अडचण काय आहे? तशी त्यांच्याकडून अपेक्षाही करता येत नाही. त्यांनी ज्या सुधारणा घडवून आणल्या त्या मूलत:राजकीय स्वरूपाच्या होत्या. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणे आणि मानवी गुलामी नष्ट करणे ह्या प्रकारच्या सुधारणा त्यांनी केल्या. याचा अर्थ असा नक्कीच नाही की शिवाजी आणि संभाजी हे आजच्या हिंदुत्ववाद्यांप्रमाणे पिसाट मनोवृत्तीचे विकृत लोक होते. पण ते ज्या प्रकारच्या वातावरणात वाढले होते त्यात अशा मूलभूत सुधारणा विषयक विचारांना अग्रक्रम नक्कीच नव्हता. कदाचित गौतम बुद्धाच्या वेळी जर इस्लामचे आक्रमण झाले असते तर बुद्धाचाही शिवाजी झाला असता. आणि जर शिवाजी महाराजांच्या वेळी इस्लामचे आक्रमण झाले नसते तर कदाचित शिवाजीचाही बुद्ध होऊ शकला असता.

    पण एक गोष्ट मात्र खरी आहे ती म्हणजे बुद्ध, शिवाजी आणि संभाजी यांच्यावर शिंतोडे उडवण्याचे काम हे सनातनी ब्राह्मणांनी केले आहे. तोच प्रकार फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या बाबतीत देखील दिसून येतो. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यातील घरासमोर तर मेलेले गाढव टाकण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.

    पण या हजारो वर्षांच्या इतिहासात बुद्ध, शिवाजी, फुले, शाहू, प्रबोधनकार, आंबेडकर अशी काही नावे सोडली तर बहुसंख्य समाज या वैचारिक क्रांतीपासून लांबच राहिलेला दिसतो. याचे मुख्य कारण हे आहे की चातुर्वर्ण्य हा संसर्गजन्य रोग आहे आणि त्याची लागण संपूर्ण भारतीय समाजाला झाली आहे. तेव्हा केवळ ब्राह्मणांवर खापर फोडून काही उपयोग नाही. ताप आला की तापाच्या विषाणूच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा स्वत: औषध घेऊन प्रतिकारशक्ती वाढवणे महत्वाचे असते. तसेच सर्वच जातींचे पूर्वज सनातनी मनोवृत्तीचे होते हे मान्य करून त्यावर उतारा म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला काय हरकत आहे?

    ReplyDelete
  17. RAVINDRA TAHAKIK

    1)Maharaj (Thorale) brahmanan cha karastanana bali padnya evde
    bholsat hote ka? Evadhi bholsat wyakti rajya stapan karu shakate
    ka?

    2)Marathyani jo parakram gajwala tyache sherya marathyanach
    pan tyanche je dosh hote tyanche karan brahman kase?

    3)Ajsuddha marthyanchya hatat satta asun jo ghanerda karbhar chalala ahe(bhrshtachar/shetakari atmahatya etc,etc,etc)
    tyache khapar brahmananwar phodun rajyakarte swatachi sutka karu
    pahat ahet

    4)kat/karstanat marathe kami ahet ka?bahujanan chya nawawar sambhaji briged sthapan karun Maratha arashan magane he kay
    ahe?

    5)ajsuddha maratha amdar(mla) apaplya matadarsanghat sangharsha
    kartana jya tharala jatat(athawa udayan rajeni keleli eka obc chi hatya),junya kali suddha hech chalat hote.

    6)aj bjp/congres/shiwasena kothalahi push aso surrwatra hech
    saranjamshahi lok kase disatat?

    7)As soyiche ahe mhanun ambedkaranche naw gheyache,pan ambedkaran cha niwdnukit yach saranjami lokani karasthane karun parabhaw kela
    hota.
    8)BHTANCHYA anyayacha punchnama aj 50 warshe chalu ahe,PATLANCHYA
    anyayacha punchnama kadhi karawayacha?ka ata janta shahani zali
    ahe mhanun aplyala surashit thewanya sathi brahmanan cha nawane
    kangawa chalu ahe?
    9)ITIHASATIL GHATANAN BABAT MATBHED ASU SHAKATAT ,PUN ABHYAS PURWAK LIKHANAT DWESH PURNA BHASHA NASATE.

    10)TAHKIK YANI ITIHAS SANSHO DHANA WARIL JAGTIK DARJACHI/TASECH
    WIDWAN BHARTIY LEKHAKANCHI(SHRIMANT KOKATE SARKHYA BRIGEDICHI
    NAVET)PUSTAKE WACHUN TYAT KASE SANYAMI LIKHAN ASTE TE WACHAWE
    WA MUG PRATI KRIYA DYAWI.

    11)SONAWANI SAHEB TAHAKIK YANCHYA SARKHYA PRACHA RAKI MANSACHYA
    PRAIKRIYA APLYA BLOG WAR KRUPAYA DAKHWU NAYET.

    ANIL REDIJ (MANDURE,TAL PATAN)

    ReplyDelete
  18. THAKIK SAHEB, ( HARI NARAKE,SANJAY SONAWANI, MAHAWIR SANGLIKAR,
    M D RAMTECHE ) YASARKHYA LEKHAKAN MULE AMHI AMBEDKARI/OBC/SC/ST
    LOKE ATA SURWA LOKANCHE SURWA KAWE OLAKHU LAGLO AHOT.
    1947 CHYA DASHKAT JASE BRAHMAN VIRODHAT WAHUN GELO TASE ATA
    JANAR NAHI .BRAHMANANI PURVI KAY KELE TE SANGUN AMCHE AJ KAY
    CHALALE AHE YAKADE LAKSH JAU NAYE HA PRAYATN AJ CHALU AHE.
    APLYA SARKHYANA JAR KHARO KHAR KAHI KARAWAYACHE ASEL TAR
    EKACH KARA .SURWA SATTA 60% OBC+20%DALI T YANJKADE SOPAWUN
    SARANJAMI LOKANI SAMAJ SEWELA WAHUN GHYAWE.
    (EK OBC TARUN)

    ReplyDelete
  19. मी अद्याप कसलेही अंतिम नि:ष्कर्ष नोंदवले नसतांनआ ब्राह्मण-मराठा वाद का काढला जात आहे हे समजत नाही. ब्राह्मण प्रत्येक कृत्याला जबाबदार होते हे मला मान्य नाही. तसेच मराठ्यांत कधीच भाऊबंदकी नव्हती या मतालाही काही अर्थ नाही. संभाजी महाराजअंबाबतच्या कटात राजाराम महाराजांचा काहीच सहभाग अथवा संमती नव्हती हे म्हणता येत नाही. सहा-सात मंत्री ब्राह्मण होते पण सर्वच सरदार मराठे (काही मुस्लिमसुद्धा) होते आणि त्यांनीही संभाजी महाराजांची कसलीही बाजु घेतल्याचे अद्याप तरी दिसलेले नाही. तहकीक साहेबांची मते अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणुन मी येथे वाचकांसाठी मुद्दाम टाकली आहेत, याचा अर्थ मी त्यांच्व्ह्या सर्वच मतांशी सहमत आहे असे नाही. मी एक सत्तासंघर्ष या अलिप्त दृष्टीकोनातुन य सर्वच घटनाक्रमाकडे पहात आहे ज्यामुळे संभाजी महाराजांना बलीदान द्यावे लागले. संभाजी महाराजांच्या चुका होत्या कि नाही हा वेगळा विषय असून मला फक्त १ फ़े. ते ११ मार्च या कालावधीविषयीच चर्चा करायची आहे. कृपया याकडे जातीयवादी भुमिकेतुन पाहु नये...

    ReplyDelete
    Replies
    1. सोनवणीजी तुमची स्वत:चीच भूमिका जातीयवादी आहे. इतरांना मात्र तुम्ही जातीयवादी भूमिकेतून पाहू नका, असा शहाजोगपणाचा सल्ला देता. आश्चर्य आहे.

      Delete
  20. संजयजी, हे प्रा.तहकीक आता अनिता पाटिलच्या ब्लॉगचे संपादक आहेत. अधि ह्यांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही वाचलात तर हे तर्काला धरुन वाद घालत असत पण नंतर ह्यांचे काय बिघडले कोणास ठाऊक एकाएकी हे जातीय वादात पडल्याचे दिसते.तुम्ही जर ह्यांचा ब्लॉग गुबु गुबु २०११ वाचलात तर त्यात ह्यांनी असे लिहिले आहे की अनिता पाटिल ही कोणी बाई नसुन एक पुरूष आहे असे ते जाहिर पणे सांगतात आणि तिच्याच ब्लॉगचे संपादक बनतात.त्यामु्ळे ह्यांच्या वरील विधानावर किती विश्वास ठेवावा हा एक यक्ष प्रश्नच आहे.
    http://dadahari.blogspot.in/2011/12/mi-ghabarat-nahi.html



    ReplyDelete
    Replies
    1. अनिता पाटील ब्लॉगची सूत्रे रविन्द्र तहकीक यांनी स्वीकारल्यानंतर या ब्लॉगच्या ध्येय धोरणांत थोडासा बदल झाल्याचे दिसून येते. उदा. "धनाजी जाधव यांना बाजीरावाचा पिता म्हणण्याचे पाप करू नका" ही पोस्ट. धनाजी जाधव हा पहिल्या बाजीरावाचा बाप होता, असा जो प्रचार काही हितसंबंधी लोकांनी चालविला आहे, त्याचा या लेखात समाचार घेण्यात आलेला दिसतो. ब्राह्मणांची बाजू घेणारी पोस्ट अनिता पाटील ब्लॉगवर पहिल्यांदाच दिसून आली. हे तहकीक यांच्यामुळे घडले असावे, असे वाटते. या लेखाची लिन्क - http://anita-patil.blogspot.in/2012/09/blog-post.html

      Delete
  21. sanjay saheb -mi brahman suddha nahi wa maratha suddha.parantu

    sambhaji briged che vicharwant(?)ji murkha panachi mandani kartat

    wa ji bhasha waprtat ti gair watate.

    (EK OBC TARUN)

    ReplyDelete
  22. Ravindra Tahakik (nav khotach vatat ahe, khare nav gheun lihayachi himmat nahi) hynache likhan atyant murkha sarakhe vatate. Karan evade sagale karasthana baddal lihun tyani tyat karasthan karanaryachi navech ghetali nahit. Ata jar hyana evade dnyan ahe karasthanache tar tyatale lok, tyanni kharach kai kele he sagale lihile pahije. mala vatale Tahakik saheb he manorugna ahet ani hindutva vadyanna jara Islamophobia asato tasa hyana Brahmanophobia zala ahe. Ani jithe tieh jani kashthi hyana brahmin disato. ani hyanchya bhav vishwa madhe to brahman kahi na kahi tar karasthan karat asto. Thakik sahebanni ekhadya marovikar tadnya akde jane garajeche ahe mhanje tyanchya madhe jara changala farak padel.

    ReplyDelete
  23. संजय सोनवणी,
    पहिली गोष्ट -शिवाजीपुर्वी यादव आणि विजयनगर अशी २ महासाम्राज्ये - हिंदूंची होऊन गेली होती.
    ते एक असो.
    शाहू महाराज गादीवर बसले.ते स्वतः कसे आहेत ते त्यांचे त्यांनाच माहीत होते आणि कदाचित तुम्हालाही माहीत असेल.
    त्यानी ९६ कुळी सरदाराला का पेशवेपद दिले नाही.
    त्यानी भट ब्राह्मणांना पेशवेपद का दिले ?
    कारण मी पूर्वी लिहिल्या प्रमाणे या सगळ्या छत्रपतींचा/राजांचा/बादशाहांचा स्वतःच्या
    जातीवरच विश्वास नव्हता.तो निसर्ग नियम आहे.जग रहाती आहे.मुसलमानांचे जसे बहुतांशी दिवाण,कारभारी, ब्राह्मण असत,
    त्याप्रमाणे यांचेपण होते.स्वजातीय आकांक्षांमुळे दगा फटका झाला तर ?हाच त्या काळातला चिंतेचा विषय होता.
    आणि पेशवेपद मिळाल्यावर बाजीरावाने त्याचे सोने केले.होळकर,शिंदे,गायकवाड,यांच्या सेवेचे संस्थानान्च्यात रुपांतर झाले.
    सातारचे आणि कोल्हापुताची गाडी पण इंग्रज आले तरी राहिली,शिंदेशाही राहिली,होळकर राहिले,पण पेशवे ?.त्यांची आज सुद्धा टीचभर जमीन नाही.
    म्हणून ब्राह्मण बरा.त्याला सिंहासन नको,नोकरीच प्यारी -एखादी अधून मधून मानाची शाल दिली कि तो खूष - हा हिशोब .
    शिवाजी महाराजांनी तरी एव्हढे ब्राह्मण कशाला पदरी ठेवले होते ?
    आग्र्याला शिवाजी निसटून आला त्यानंतर फटके कुणी खाल्ले .मिरचीची धुरी कुणी खाल्ली .तिथे न निंबाळकर होते न मोहिते.
    घोरपडे,मोरे,सुर्वे हे तर शिवाजीपुर्वी पासून स्वतःला खानदानी राजे समजत असत,ते काही त्याना ब्राह्मणानी शिकवले नव्हते.
    त्यांच्या मते तर शिवाजीने धर्माचा मराठी अस्मितेचा नारा देउन आपली पोळी भाजून घेतली.हे काही ब्राह्मणानी त्यांना पढवले नव्हते.
    आपण कुठल्या चष्म्यातून बघतो,त्याप्रमाणे जग आहे.असा भास होतो.

    ReplyDelete
    Replies
    1. changale analysis ahe... rakkaran jevha chalu hote tevha fayade tote baghitale jatat. Takat ani paisa hyacha khel asato sagala tithe mag jaticha vichar, sakkya-savtrancha vichar mage padato. Pan Ravindra Tahakik sarakhyanna hi akkal nasate. Karan analysis karane ha tyancha udyesh nahi tyanna fakta dwesh pasaravayacha ahe.

      Delete
    2. Maajhya mate he tahkik kuthlya tari dabawaakhaali aahet. anita paatil chya blog warchya tyanchya adhichya pratikriya waachlya tar tyaanni jaatiyawaadaacha wa brigadinni pasarawlelya kalpokalpit itihaasaacha purna wirodh kela aahe.......baaki dev karo aan tyanna sadbuddhi yewo......

      Delete
  24. प्रिय संजय ,
    तुम्ही नेहमी विविध विषयांवर लिहीत असता.
    सिंधू संस्कृती,शिवाजी,धनगर समाज,आंबेडकर,संभाजी,म.फुले,वंजारी समाज . . .
    सगळ्यांमध्ये साधारणपणे ब्राह्मणानी या (हिंदू) ? समाजाचे वाटोळे केले हाच संदेश.किंवा हाच सगळ्याचा गाभा.
    तुमचे लिखाण अती विविधतेने लिहिले जात आहे,त्यामुळे कधी अमृत किंवा नवनीत मासिकांची आठवण येते.
    तर कधी कधी दिवाळी अंकातल्या फ्रेम्स - रमेश सहस्त्रबुद्धे लिहितात तसं वाटते.नुसतेच चटपटीत ,
    नुसतीच दाढी आत ऋषीच नाही अशी अवस्था . ( ही एक ब्राह्मणी उपमा-सॉरी )
    तुम्ही एक विसरता ,
    ग्रामराज्ये स्वयंभू होती,मग ती ग्रीक असोत किंवा आपली श्रीकृष्ण काळातील असोत .
    कंसाचे राज्य हे पहिले हिंदू (?) साम्राज्य.आणि श्रीकृष्ण छोट्या छोट्या ग्राम राज्यांचा पुरस्कर्ता !वासुदेव ही काय संकल्पना होती ?.असो.
    तुम्ही वासुदेव या तथाकथित कल्पनेबद्दल लिहावे इरावती कर्वे यांनी छान लिहिले आहे.
    मध्य युगातला साधा सोपा नियम - - राजा आणि प्रजा - - यात दलाल म्हणून काम करणारा एक वर्ग लागतो.
    राजाला एखादा कायदा करायचा असेल - - तर मान हलवणारा एक वर्ग लागतो - -प्रजेला राजा लागतोच असे नाही पण
    राजाला प्रजा लागतेच .पण हे दलाल असे न सांगता बरोब्बर उलटे भासवतात . अमुक एक राजा गरीबांचा कैवारी तर दुसरा दुर्बलांचा तारणहार . तिसरा धर्म रक्षक !
    धर्म आणि त्याचे नियम बनवणार हे लुच्चे - त्यांना मान्यता देणार तो राजा - धर्म रक्षक,संस्कृती रक्षक -आणि - राजाच्या मुगुटावर शिक्का मारणार हेच लुच्चे.
    आणि हे प्रकार झाडून सगळ्या धर्मात ,देशात चालले होते.चालू आहेत .प्रजेचा फक्त पिळवणूक करण्यासाठी उपयोग -
    राजा - महाराजा मग सम्राट अश्या चढत्या क्रमाने सत्ता एकवटते तेंव्हा या दलालांना पण सत्तेत वाटा हवाहवासा वाटू लागतो.
    राजा आणि त्याला टिकवणारे हे सत्तेचे दलाल असा हा प्रकार ! नजरबंदीचा खेळ !.मग हे दलाल धर्म बनवतात - कायदे करतात .
    राजाच्या डोक्यावर पाणी शिंपडले की तो राजा झाला ,हे पार अगदी रोमन इजिप्त सुमेरियन,वैदिक ,रामायण ते अगदी
    आपला ( का तुमचा ?-हो हो बर -तुमचा ,झाले समाधान ? )शिवाजी - -.इथपर्यंत हेच ब्रोकर मुकुटावर पाणी शिंपडायला सगळ्यांना हवे असतात.
    अगदी शिवाजीलासुद्धा .त्या काळाचा तो माहीमच आहे . दोष कुणाला द्यायचा ? .आणि कुणी ?
    आज ब्रिटीश राणी कितीही मिरवत असली , पोप कितीही आव आणत असला तरी त्यांचा नामधारी पणा त्यांना पक्का माहीत असतो.
    आपल्याला "राजा नको " हे प्रजेला माहीत पडायला एक युग जावे लागले .धर्म ही एक प्रचंड अडगळ आहे हे समजायला एक युग जावे लागेल .
    देव ही एक एकेकाळी उपयोगी पण आत्ता पूर्ण निरुपयोगी कल्पना आहे हे समजून घेतले पाहिजे.
    जे भूतकाळ चिवडत बसतील ते हास्यास्पद ठरतील . जिथे देव हीच फालतू - करमणुकीची कल्पना ठरत आहे तिथे धर्म आणि जातपात यांना स्थानच असता कामा नये .
    पूर्वीच्या युग पुरुषांकडून काही शिकण्यापेक्षा त्यांचे पुतळे समाध्या ,ते क्षत्रीय कुलावतंस होते कि गो ब्राह्मण प्रतिपालक होते हा वादाचा मुद्दा कसा असू शकतो ?
    आत्ता जर महाराज असते तर म्हणाले असते सर्वांनाच कि तुमचा प्रोब्लेम काय आहे ? .कारण ते खऱ्या चांगल्या अर्थाने उच्चच प्रतीचे उद्योजक होते.ते म्हणाले असते चला आपण ४ जी -५ जी असा विचार करू ,धरणे बांधू, नवीन विमाने ,क्षेपणास्त्रे बनवू .वीज निर्माण करू.चीन बघा , तो जपान बघा .
    त्यानी लोकभावनेचा त्या काळाप्रमाणे सुंदर उपयोग करून घेतला.संपत्ती (wealth ) निर्माण करणे हा त्यांचा उद्योग होता.संपत्ती गिळणे हा सध्याच्या सत्ताधीशांचा
    उद्योग असतो.
    तात्पर्य,
    एकसारखे ब्राह्मणांना शिव्या घालणे बंद केले तर आपल्या लेखनाचा बाज वाढेल.
    कोणतीही सत्ता आणि पद नसताना ,ब्राह्मण आज कुठल्याकुठे पोचले आहेत याचा विचार झाला तर ते इतर जातींना मार्ग दर्शकच ठरेल ,
    त्यांची घरे जाळली , शेतीकूळकायद्यात गेली ,
    नोकऱ्यात रिझर्व्हेशन आले .
    अगदी गरीबातला गरीब ब्राह्मण एका पिढीत स्वतःला सावरतो आणि परत जगण्याचेसोने करतो - याचापण विचार झाला पाहिजे .
    तुमची सुबत्ता टिकवायला ब्राह्मण्याचे भूत तुमच्या किती दिवस उपयोगी पडणार ?
    ज्यांच्या अडाणीपणा मुळे तुमची सत्ता टिकून आहे ते ४ दिवस तुमच्या बरोबर ब्राह्मणाना शिव्या घालतील , एखादा दगडही मारतील , पण नंतर ?नंतर कुत्रेसुद्धा तुमचे हाल खाणार नाही .

    ReplyDelete
  25. AGASHE SAHEB, PARMESWARALA YA WADAT ODHANE BALISH PANACHE AHE.TUMACHE

    NASTIK WIACHAR DUSRYAN WAR LADU NAKA.WINYANA CHYA EKA PISANE MOR

    HOU NAKA .

    20/30 WARSHAT KHANIJ TEL SAMPE PARAYANT WAT PAHA,HE WINYAN KASE

    EKA DIWASAT KOSALATE TE BAGHA.

    LAKASHAT THEWA MANSACHI MANE DHARMACH GHADAWATO,JUGATIL SURWA

    LOKANI KALACHYA OGHAT DHARMAT ALELYA WAIT GOSHTI NASHTA KARUN DHARMA CHE PALAN KELE TAR JAG KITITARI SUNDAR HOIL.

    KADHI HI NA SAMPANYARYA WASANA WA ISCHA YANA KABUT THEWANYACHE

    KAM DHARMACH KARAT AHE WA KARIL.

    ReplyDelete
  26. आगाशे साहेब, तुम्ही संजय सरांचे लेख वाचलेच नाहित. संजय सर सत्य परिस्थिती वर लिखाण करतात.उगाच बसल्या बसल्या त्यांची भूमिका ब्राहमण विरोधी आहे असे जग जाहिर करू नका.तुमच्या सारख्या लोकां मुळे जे ब्राहमण द्वेषी नाहित ते सुद्धा ब्राहमणांचा द्वेष करू लागतिल.तसे ही वरील लेखात तुम्हाला कुठे ब्राहमण विरोधी भूमिका दिसली ते तरी दाखवा. नाहितर आम्हाला ही शंका येत आहे की तुम्ही त्या वर्मा सारखेच परत एक फ़ेक ब्रिगेडी प्रोफ़ाइल आहात.

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्याकडे संजय सोनवणी आणि ह.मो.मराठे यांच्या ब्राह्मण वादाबद्दलच्या सर्व पुस्तिका आहेत.
      ग्रंथ वेगळे ,पुस्तक वेगळे आणि या पुस्तिका वेगळ्या.

      डॉ.रा,चिं.ढेरे, नरहर कुरुंदकर, कै.सेतुमाधव पगडी,कै.न.र.फाटक,कै.प्रा.शेजवलकर,कै.इतिहासाचार्य राजवाडे यांची -पुस्तके आणि ग्रंथ-सर्व लिखाण मी वाचले आहे.
      त्यातले बरेचसे माझ्या संग्रही आहे.त्यांच्या प्रगल्भतेचा ,अभ्यासाचा आवाका पाहीला की मन थक्क होते.
      दुसरीकडे डॉ.इरावती कर्वे,दुर्गा भागवत या स्त्रियांची चिंतनाची भरारी आणि संशोधनाची जिद्द पाहिली की मन अचंबित होते.
      डॉ.ढेरे यांचे शिखर शिंगणापूर चा शंभू, विठ्ठल-एक महासमन्वय-तसेच दत्त संप्रदाय बद्दल चे त्यांचे परखड संशोधन मती गुंग करते.
      कै.नरहर कुरुंदकरांची "श्रीमान योगी "ची नुसती प्रस्तावना सुद्धा किती अभ्यासपूर्ण आहे.

      त्या मानाने संजय सोनवणी हे फारच उथळ वाटतात .सकस वाचन केलेल्यांना त्यात अभ्यासूपणापेक्षा काहीतरी वेगळेच जाणवते.
      त्यांच्या लेखनावरच्या इतरांच्या प्रतिक्रियापण विचित्र असतात. काही काही तर असभ्य म्हणता येईल अशा असतात.

      भय्या पाटील ,अनिता पाटील,गायकवाड,खेडकर यांचे लिखाण आणि संभाजी ब्रिगेड चे सर्व लेखन फारच प्रचारकी वाटते.
      पूर्वी ग्रीक आणि रोमन संस्कृतीत एकत्र येऊन चर्चा होत असे.अगदी विरुद्ध विचारांचे विद्वान हिरीरीने आपापली मते मांडत असत.
      आपल्याकडे भारत इतिहास संशोधन संस्था,भांडारकर संशोधन संस्था,वसंत व्याख्यानमाला (पूर्वीची),अशी अनेक ठिकाणे आहेत.
      पण त्यांची नावे बदनाम करण्याचाच हल्ली एक धडक कार्यक्रम झालेला दिसतो.
      युरोपप्रमाणे आपल्याकडे खरे रेनासंस झालेच नाही त्यामुळे सगळेच बेतलेले ,विचार,भौतिक संशोधन,काहीच मूलगामी नाही.

      Delete
    2. मी तुम्हाला विचारले होते त्या प्रश्नाचे उत्तर तर तुम्ही दिलेलेच नाही. वरील लेखात जातीयवाद तुम्हाला कुठे दिसत आहे?

      Delete
    3. आगाशे म्हणतात ते खरे आहे. संजय सोनावणीने आतापर्यंत 80 वगैरे पुस्तके लिहिली आहेत. कोणी लिहिते काय एवढी पुस्तके. नुसता प्रचारकी उथळपणा. ह्या सोनावणीच्या मागे कोण बोलविता धनी आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. 21व्या शतकातही शिवाजी हेच प्रकरण महाराष्ट्राला पुरून उरलेलं आहे. बाकी कोणतेच व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवू शकलेले नाही. ते होळकर फोलकर तर फक्त एका जातीपुरतेच "देव-देवी" बनवून ठेवलेले आहेत. सोनवणी सुद्धा शिवाजी-संभाजी ह्याच प्रकरणात अडकून पडले आहे.

      Delete
  27. Agashe Sahebanchi pratikriya wachli. aajchya ghadila challelya brahmandewshabaddal atishay sundar lihilay tyanni.

    Agashe Saheb,

    tumhi jar hi pratikriya wachat asal tar tumhala ek kalkalichi winanti karto. Ya Sonawnyachya blog war yeun aapli pratikriya denyat aapla wel fukat ghalwu naka aani tyala kuthlyahi prakarcha salla tar ajjibbat deu naka. karan aho zoplelyala uthawta yete zopeche song ghenaryala naahi. maza mudda aaplya lakshat aala asel. Sanawniche lekhan ek karamnuk mhanun wacha. Sonawni ha atyanta vinodi lekhak aahe asa me baryach lokanna sangto.

    ReplyDelete
  28. संजय सोनवणी,
    मी तुमचा ब्लॉग किमान वर्षभरापासून तरी वाचतो. तुमच्या लिखाणात एक सुसंगती होती. वाघ्याचा वाद निर्माण झाल्यापासून तुमची ही लय बिघडत चालली आहे, असे जाणवते. या लेखात तर तुम्ही संभाजी राजांनाच फितूर म्हणत आहात. राजांना थेट फितूर ठरविणा-या काही कॉमेंट आजही लेखाखाली आहेत. तुम्ही त्या मुद्दाम ठेवल्याचे दिसते. संभाजी ब्रिगेडवरचा राग तुम्ही संभाजी महाराजांवर काढू नये, असे सांगावेसे वाटते.

    इतिहासातील एक वादग्रस्त पात्र असलेल्या विठोजी होळकर यांच्या बद्दल तुम्ही गुणगौरव करणारे लिखाण केलेले आहे. याच ब्लॉगवर ते उपलब्ध आहे. मल्हाररावांमुळे पाणिपतावर काही लाख मराठे मारले गेले, तरी तुम्ही त्यांना महान मुत्सद्दी ठरवले आहे.

    का?

    इतिहासकाराने निरपेक्ष भूमिका घ्यायची असते. आपल्या जातीचा म्हणून कोणाला महान ठरवायचे नसते. तसेच आपल्या विरोधकांच्या जातीचा आहे, म्हणून कोणाला दुषणेही द्यायची नसतात. उलट आपल्या जातीच्या राजांची जास्त चिकित्सक पद्धतीने तपासणी करायची असते. तुम्ही याच्या अगदी उलट करीत आहात.

    तुमचा ब्लॉग वाचनीय होता, तो पुन्हा वाचनीय व्हावा, असे वाटते. म्हणून ही कॉमेंट लिहिली. कॉमेंटमधील भावना तुम्हाला पटली असेल, तरच ती कायम ठेवा. पटली नसेल, तर उडवून टाका.

    ReplyDelete
    Replies
    1. What you say is correct. Mr. Sonwani is a Dhangar fascist. He is no intellectual. He is guilty of all those things he accuses others of being like the Brahmins and Sambhaji Brigade.

      Delete
  29. आणखी एक मुद्दा राहिला म्हणुन लिहितो. राजाराम महाराजांनी संभाजी महाराजांना पकडून दिले, त्यांना इतर मराठे सरदारांची मुक संमती होती, असा संकेत तुमच्या दोन्ही लेखांमधून मिळतो. उद्या तुम्ही जेव्हा निष्कर्ष काढाल, तेव्हा ते यापेक्षा वेगळे असतील, असे मला वाटत नाही. ही महाराजांची बदनामी आहे, हे आपण लक्षात घ्याल, अशी आशा वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. राव, नीट लेख तरी वाचत जावा. संभाजी महाराज फितूर होते असे मी कोठे लिहिले आहे? बहुदा हे तुमचे व्यक्तिगत मत असावे.

      Delete
    2. इतिहासाकडे जातीय दृष्टीकोनातुन पाहु नये. संभाजी ब्रिगेडशीच्या वादाचा आणि या लेखाचा काडीइतकाही संबंध नाही. १ फेब्रुवारी १६८९ ते ११ मार्च १६८९ या कालात मराठी गोटात नेमके काय घडले याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे याबाबत अधिक माहिती असेल त्यांनी पुरवावी. माझे नि:ष्कर्ष लवकरच प्रकाशित करेलच, पण तत्पुर्वी सर्वांनीच छाननी केली तर त्यांना तथ्यपुर्ण बळकटी येईल.

      मी संभाजी महाराजांवर एवढा दुष्ट अन्याय कोणी केला याचा शोध घेत आहे. त्यात सहभागी जेही कोणी असतील त्यांचे माप त्यांच्या पदरात घालणे क्रमप्राप्त आहे.

      विठोजी होळकर वादग्रस्त व्यक्तिमत्व होते असे म्हणना-यांनी इतिहस नीट तपासुन पहावा. मी धनगर नाही त्यामुळे विठोजी स्वजातीय होते म्हणुन त्यांची बाजू घेतली अशे म्हणणे अज्ञानमुलक आहे.

      Delete
  30. संभाजी महाराज मोगलांना जावून मिळाले, राजाराम आणी त्यांच्यात दुरावा आला, सोयराबाईन्चे राजकारण, बाकी दरबारी - सरदार यांचे राजारामला समर्थन या सगळ्याला कारण फक्त एकाच जातीवर ढकलून देणे म्हणजे रडीचा डाव झाला. महाराणी सोयराबाईना अति महत्वाकांक्षा नडली. शिवराय पण शेवटी शेवटी राजाराम/ सोयराबाई कडे कळू लागले होते. संभाजी राजे दिलेरखानाला जावून मिळाले आणि उलट स्वराज्यावर चालून आले होते.याला फितुरी नाही तर काय म्हणायचे. संभाजी शूर होते, त्यांनी नंतर १६८० ते १६८९ स्वराज्य सांभाळले पण म्हणून पूर्वायुष्यात ते कधी चुकले असतील तर ते सांगायचे नाही का? सगळेच जर दरबारी मुत्सद्दी करत असतील तर याचा अर्थ संभाजी राजे किंवा खुद्द शिवाजी महाराज मुत्सद्देगिरित कमी पडले असे म्हणायचे आहे काय?
    काही उलट झाले कि एका जातीला नावे ठेवायची मग तुम्ही स्वताच निष्क्रिय आहात असा अर्थ होतो! आणि या न्यून गंडा मधूनच विद्वेषी प्रचार सुरु होतो. याला रडीचा डाव म्हणतात!

    ReplyDelete
    Replies
    1. hi brigedi loka maha murkha ahet.. tyanna analysis navacha prakar kalat nahi.. Fakata aag pakhad karane ani bramhananchya navane gale kadhane evadech kalate. Mhane itihasatun shikave.. itihasatun shikayache asel tar tya sathi vastunishtha drushtikon lagato, Brigadi kade to kuthun asanar. Shivaji maharajanche khare shikshan hya pidhila kai asel tar he ki itihasat adakun padu naka ani navyacha, changalyacha, samarthyacha shodh satat ghya. Pan Brigedi murkhana he samajane ashakya ahe.

      Delete
  31. मध्यावधी निवडणुका तोंडावर आल्या की सोनवणी बहुतेक त्यांचा अंतिम निष्कर्ष सादर करतील.

    ReplyDelete
  32. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेवर संभाजी राजना नेले नव्हते. संभाजी राजे आणि शिवराय यांच्या नात्यात दुरावा येण्याला प्रमुख कारण महाराणी सोयराबाई यांचे राजकारण.त्याला साथ दरबारी लोक, सरदार यांची मिळाली.संभाजी राजे मोगलांना जावून मिळालेच नाही तर दिलेर खान बरोबर स्वराज्यावर चालून आले होते. भूपालगड ताब्यात घेतल्यावर दिलेर खानाने गडावरील मराठ्यांचे हात छाटले तेव्हा संभाजी राजे काही करू शकले नाहीत . दिलेर खानाने स्वराज्यातील मुलुख लुटून उध्वस्त केला, प्रजेला लुटले, ठार केले तेव्हा पण संभाजी काही करू शकले नाहीत कारण ते मुघलांचे सात हजारी मनसबदार होते आणि दिलेर खानाचा दर्जा त्यांच्या पेक्षा जास्त होता. शेवटी पश्चात्ताप होवून संभाजी राजे स्वराज्यात परतले. मात्र त्यांच्या पूर्वीच्या चुकीने शिवाजी महाराज मनातून खिन्न झाले होते. सरदार पण सोयराबाई (राजाराम ) आणि संभाजी असे विभागले गेले. आयुष्यभर शिवराय मोगलांशी लढले मात्र उतारवयात त्यांचा मुलगाच मोगालना जावून मिळाला तर त्यांच्या मनाला काय यातना झाल्या असतील? शिवाजी महाराज निधन पावले तेव्हा संभाजी रायगडावर नव्हते. राजाराम यांनी अंतिम विधी केले आणि त्यांनाच गादीवर बसवण्यात आले. पुढे संभाजी गडावर आले त्यांनी स्वताला राज्याभिषेक करवला. सोयरा बाई, राजाराम यांना नजर कैदेत ठेवले. तरी सोयराबाईने पुढे संभाजी वर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. संभाजी राजांनी सोयराबाईला विष देवून संपवले. सोयराबाई समर्थक दरबारी लोक/ सरदार तसेच सोयराबाईचे नातलग (मोहिते) यांना हत्तीच्या पायी देवून / कडेलोट करून संपवले. यामुळे तर पुढे संभाजी राजांच्या सुटकेचा पुरेसा प्रयत्न झाला नाही ?केवळ जातीय भूमिका न घेता सगळ्या बाजू पाहाव्या लागतील. संभाजीला समर्थन करणारे / विरोध करणारे ब्राह्मण होते तसे मराठे पण होते. संभाजी ला पकडून देणारा गणोजी शिर्के हा त्यांचा साक्खा मेव्हणा होता.

    ReplyDelete
  33. स्वराज्य -
    माझे संजय सोनवणी यांना विचारणे आहे
    आपण नेहमी सरळ सरळ उत्तर देण्याचे टाळता .आपण आपली प्रतिमा जपत आहात असे वाटते. समजा छ.शिवाजीराजे यांना औरंगजेबाने विचारले असते
    कि मरणार का मुसलमान होणार तर त्यांचे त्याला उत्तर काय असते ?
    मला खात्री आहे आहे आपण उत्तर देणार नाही आणि कोणतरी अनोनीमास नावाने लिहील.काहीतरी.
    नेताजी पालकरांना राजांनी परत हिंदू करून घेतले त्याची या ठिकाणी आठवण ठेवावी.
    संपूर्ण भारत देश.त्यातले पुणे मुलुख. शहाजी राजे यांनी किती जणांकडे किती मुसलमान सत्तांकडे सेवा केली याची यादी पाहता ,असे वाटते कि हे शहाजी राजे - त्यांची जहागीर,त्यांना चिकटवण्यात आलेला मोठ्ठेपणा , हा एक अनावश्यक प्रकार आहे .शिवाजीला मोठ्ठेपणा देण्यासाठी - सुरवात वडिलांपासून करायची -ही काळजी घ्यायची इतकेच .ती काळजी बाबासाहेब पुरंधरे यांनी पण घेतली , पण ते ब्राह्मण ना ! शेवटी असे आहे कि शिवाजी तरी मोठ्ठा कसा काय ? रेकॉर्डवर तो मुघलांचा मांडलिक होता कि नाही ? का ती त्याच्या मुत्सद्देगिरीची चाल समजायची ?.मग असा प्रकार सगळीकडे होत राहील. इमान,खोट्या आणाभाका ,खोटा बेल भंडारा हे सगळे म्हणायचे स्वराज्य या नावाने -पण खरे तर ते शिवाजीचे वतन !
    त्याने यश मिळवले म्हणजे काय ?.शिवाजीने स्वराज्य उभारले म्हणजे काय ? लोकशाही होती का ?निवडणूक होती का - नाही - एकछत्री अंमल ! आई थोर असेल पण राज्य यंत्रणेत तिला इतका हक्क कसा काय ?.तर राजांची आई म्हणून.तिचा योग्य पणा कुणी तपासला?तो सरंजाम शाहीचा काल होता - राजेशी मिरवण्याचा काळ होता.
    आग्र्याहून शिवाजी पळाला,त्या नंतर ज्यांनी पाठीवर चाबकाचे फटके खाल्ले त्यांचे पुढे काय झाले .का कालांतराने त्याना पण गद्दार ठरवण्यात आले ? घराणेशाहीच्या गदारोळात ?
    शहाजींच्या काळात शौर्याच्या जोरावर , तलवारीच्या जोरावर आपले वतन उभे करायची प्रथा होती.बळी तो कान पिळी असे होते.
    एक संशोधन असे सांगते कि शहाजीराजे अस्सल या मातीतले होते. ( शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव श्री.रा.रा.रा.चिं.ढेरे )
    काही जण त्यांना राजपूत ठरवण्याच्या उद्योगात स्वतःला धन्य मानतात.हा निलाजरेपणा तर समजण्या पलीकडचा आहे.
    लोकांपुढे एक छान हृदयाला भिडणारे स्वप्न ठेवल्याशिवाय,त्यांचा पाठींबा मिळत नाही,आणि सामान्य लोकांच्या पाठींब्या शिवाय शिवाय राजेपण मिळत नाही.
    असा सगळा प्रकार आहे . अजूनही तेच चालले आहे .
    धरणे , कालवे आणि आपल्या शेत जमिनी यासाठी - जनतेचा पैसा - त्यांना स्वप्न रंगवायला लावून , हडप करायचा आणि जातीचे राजकारण करून , सगळ्याला ब्राह्मण जबाबदार असे ओरडत सुटायचे ,ह्या ब्राह्मण द्वेषात स्वार्थ असल्याशिवाय ही इतकी गरळ का ओकली जात असते.?
    आत्ता पर्यंत स्वतः सोनवणी पण त्यात मागे नव्हते सभ्य पणाचा अंगरखा पांघरून ते पण ९६ कुळींचे लांगुल चालन करताच होते. शब्दात अडकायचे नाही इतकी काळजी ते घेत राहिले.
    वेळ आली कि अनोनिमास नावाने ब्राह्मण प्रेमाने लिहिणाऱ्याला चपराक बसलीच म्हणून समजा.पण एक चमत्कार झाला .तो केला वाघ्याने ! एक साधा कुत्रा इतका बदल करू शकतो !
    जे काम बऱ्याच ब्राह्मण विद्वानांना जमले नाही ते एका कुत्र्याने केले.संजय सोनावाणींची मांडणीच सौम्य झाली ,ब्राह्मण द्वेष बोथट झाला .पूर्वीचे ह.मो यांच्याशी वाद घालणारे सोनवणी आठवले कि आताचे सोनवणी मुळमुळीत वाटतात .
    आपण जर शिवाजीला भवानी मातेने तलवार दिली वगैरे भाकड कथा समजत असाल ,तर मग तसे लिहित का नाही.
    श्री.अंतुले तिकडे गेले होते त्यांना वेड्यात का काढले नाही .
    मी तरी ती भाकड कथा आहे असे समजतो.आणि तलवार परत आणणे हा सवंग लोकप्रियतेचा लाभ घेण्याचा प्रकार आहे असे मानतो.१६३० आणि १६८० या काळात उरोपात काय चालले होते आणि आपण ज्याच्या नावाने मिरवणुका काढतो आणि २ - २ जयंत्या साजऱ्या करतो त्याची आंतर राष्ट्रीय राजकारणाची पोच किती होती ?
    १६२८ ला ब्रिटीश लोकशाहीत पेतिशन ऑफ राईट मान्य झाला.राजा पार्लमेंट ला ना विचारता कोणतेही नवीन टक्स लावू शकणार नव्हता.
    १६३८ ला गालीलिओ ने त्याचा सिद्धांत मांडला.केप्लर पण याच काळातला .

    ReplyDelete
  34. शिवपुत्र संभाजी राजे यांविषयी जनमानसात जाणीवपूर्वक पसरवलेले चुकीचे समज खोडण्याबद्दलचे आपले प्रयत्न स्तुत्य आहेत. " खरा संभाजी" या पुस्तकातून समोर आलेले आणि आधी कधीही न मांडले गेलेले मुद्दे यातून संभाजी महाराजांचे एक समग्र व्यक्तिमत्व उभे राहते. आपण जे मुद्दे मांडले आहेत ते दुर्ल्क्षित करण्याजोगे नाहीच आहेत. आनाजी दत्यों आणि मंडळींची कारस्थाने जाणीवपूर्वक दडविण्यात आली.
    मी आपणास विनंती करतो कि आपण या विषयावर एक पुस्तक लिहून संभाजी राजांस न्याय द्यावा.

    ReplyDelete
  35. Sonavani sir tumhi Sambhaji maharajanbabat 1/2/1689 te 11/3/1689 ha ek apratim vichar karayala lavanara lekha lihun mothe karya kele aahe.tyabaddalhardik abhar.Ata Sambhahi maharajache DAHAN KONI KOTHE KASE KELE? yababat jarur lihave.

    ReplyDelete
  36. tumcha lekh nakki ky sangtoy hech spast hot nahi...mazhya mahiti nusar
    1).sambhaji maharajyana swataychya mantriganatun virod hot hota.tyat pramukh anaji dato
    2) ganoji shirake he yesubayiche bahu ...swataychya bahinichya navryala satruchya hati dene he gost shyakh nahi...jari pan ganoji shirkyala vatanachi hav asti tarihi tyachi sakkhi bahini hi sambhaji maharajyanchi patni hoti ....mhanun tyala he apekshit navte
    3) sambhaji maharajyana tyanchya mantrimandalakadun vishabada zhali...pan tyat soyarabayiche nav ovle
    4) kavi kalash ha baramnin hota pan to ak mantrik barmin hota ...(tyachya potjatiche nav mala atta nahi athavat..athavlyas post karen) .... mhanunach maharastrin barmhinacha tyala virodh hota....ani tocjh sambahji maharajyancha khara mitra hota
    5) sambhaji maharaj hindutav vadhi navte karan tyani swata awragyachya mulala abhay naste dhile
    7) awaryangyane tyacha swatacha bhau DARA yachi hattya mudake kapun keli hoti...mhanunach sambhaji maharajyanchi hattya tyachi pramane mhanje shirched karun vyayala havi hoti....pan tase n hota tyanchi jhibh kapun ..dole kadun...hatachi bothe zhataun kele geli....ashya parykarachi hattaya kontyahi mogal rajyakrantit zhali nahi...
    8) tya kalata sambhaji maharjani baudhbushan ,nayikabhet ,satsatak...he granth tya kalat lihile hote ki jya kalat bramhin sodun yacha right konalach navata....ani yacha virodh sambhaji maharajyana veloveli zhala ....


    mala akach sangyach ahe ...nanyala don bhaju astat likhan karatana ..doghancha pan vichar hon garjech ahe

    ReplyDelete
  37. Sanjay Sonawani....Mala pahile akach sanga apli jaat konti ahe ???? asa qus mi tumhal vi4rla karan ...amhi marathyani ghadavalyala ethihas amhal dhad kunhi sangat nahi....ani ji loke amhala ethis sangatat tynni kadhi spastpane sangitlach nahi...jo to apaplya jatiche samarthan ani apli jaat dusryavar ladhali jate .......mul pryshan mi sambhaji mahrajan baddal khup vachle ahe ...tumcha lekh ky mhanto he tumche vyakatigat mat ahe ....pan sambhaji maharjancha ethihas neet pahila tar tyana sanglyat pahila dhoka hota to bramhin astapradhan mandalikadun ...he siddha zhalay ....sambhaji maharaj kase hote tyacha akach purava sglya gostina puresha ahe to mhaje sambhaji maharajanche savatra mama hambirav ..yani aplya sakhya bhachyachi baju n gheta samabhaji maharajyanchi baju ghetali.....samabhaji maharajan saglyat motha virod ha barmhin samajaykadun hota ...

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही माझी सरळ जातच विचारली म्हणजे जातीविरहितही काही असू शकते यावर तुमचा विश्वास नाही. दुस्रे म्हनजे ब्राह्मणांची काहीच शूक नाही असे ब्राह्मनही म्हनण्याचे धादस करणार नाहीत, पण जेही काही वाईट झाले ते ब्राह्मणांनीच केले म्हणजे आपले लोक तेवढे मुर्ख होते हे मान्य करण्यासारखे असते हे लक्षात घ्यायला हवे. मी वरील लेखात माझे व्यक्तिगत मत मांडले नसून मला उपलब्ध पुराव्यांनिशी जे वातले ते लिहिले आहे. ते सर्वस्वी कोनाला मान्य व्हावेच असा माझा अट्टाग्रहही नाही. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

      Delete
  38. कालच मी संताजी घोरपडे यांच्यावर पुस्तक वाचल ..संभाजी जबरदस्तीने राजा झाला होता .आणि सल्लागारांना जुमानत नव्हता .कट कारास्तान म्हणून त्याला मोगल सैन्य येतंय हि बातमी उशिरा दिली ..संताजीची हेर यंत्रणा आणि तडफ विचारात घेतली ..तर ३०००-४००० मोगल केवळ घाटातून कोकणात उतरतोय ..आणि याची संताजीसारख्या मराठ्यांना खबर लागत नाही?..संभाजी ला पकडून अकलूज ला नेई पर्यंत ...त्याच्यावर हल्ला झाल्याची लोक कथा पण नाही ...कदाचित तो मोगलांचा सरदार म्हणून राहिल्यान मराठे नाराज होते ..आणि प्रधान मंडळाजवळ एक नवा राजा होता ..त्यामुळे ते बेफिकीर होते .किवा बाय्कांबाबत च्या सैलपणा न मराठे दुखावले होते? कारण जो संताजी रायगड चा वेढा तोडायला तयार होतो ..त्याच्याजवळ ..मुघलांकडून संभाजीला सोडवायची ताकद नव्हती?त्यातच गणोजी शिर्के च खानदान राखरांगोळी केल ..म्हणजे बहुसंख्य लोकांना संभाजी नको होता ..आणि मराठ्यांच्यात मोगालान्प्र्माने इतिहास लिहित नव्हते..( एक सरदार जो रिपोर्ट देत तो आणि दुसरा हेर देत तो ,किवा तुटक लिहित होते )असाच प्रश्न संताजी आणि राजाराम एक मराठा राज्याचा सेनापती स्वतःचा नाश कसा घडवून आणू शकतो आणि कोणी सरदार त्याची शिस्ताई करत नाहीत?आणि किल्ला विकून ज्या कारकुनांनी लाच खाल्ली ..राजाराम ला अफूची नाश होती म्हणून ..प्रधान मंडळ त्याचा अनौरस मुलगा कर्ण याचा राज्याभिषेक च्या तयारीत होते ?या प्रधान मंडळाची विश्वासार्हता ..प्र्श्नाकीत होती असाच प्रश्न मला आहे नाना फडनिसाने सातार च्या गादिवर जो दत्तक नेमला त्याबद्दल ..त्याला यमाई देवीच्या दर्शनाला जायला पुण्यातून परवानगी मागावी लागायची?...अगदी शाहू महाराजांच्या दरबारात कारकुनांनी केलेलं बंड...महार लोकां बरोबर काम करणार नाही ...आणि कागदपत्रे व हिशोब देणार नाही इतक धाडस ?..या सगळ्याचा अर्थ काय समजायचा?

    ReplyDelete
  39. comment lihinaryni Shivaji Maharaj ani Sambhaji maharajancha ekeri ullekh talava.
    Brahman ani Marathe vad talava....itihas kahi pan aso vartmanat ithun puthe kashi vatchal asavi yabaddal lihave hi Sanjay sarana vinanti. Itihasacha uddesh hach ahe ki zalelya chuka talun, anubhavacha fayda gheun bhavishya ghadvayche. Jar itihasachya vadavarun apan parat futlela samaj zalo tar parat ekda gulamila tayar rha sagale!!!

    ReplyDelete
  40. आपण सर्व सुज्ञ आहात.
    मी जास्त लिहणार नाही, कारण शब्दाचा खेळ खेळण्यात, सर्व हिंदू निपुण आहोत.ओळीचा अर्थ आपल्या सोयीप्रमाणे लावणारे आपण आहात.
    विधान: मराठ्यांचा इतिहास मराठ्यांनी लिहिलेला नाही.
    एक किस्सा सांगतो:-
    एका विलायती जहाजेवर एक नोंदवही होती. त्या वहीवर रोज एक दिवस प्रत्येक व्यक्तीला दिवसातली एक विशेष नोंद जी सत्य आहे ज्याचा पुरावा इतर कामगार असतील लिहिण्याची परवानगी होती. ती वही त्या जहाजेचा प्रमुख अधिकारी रोज वाचायचा.
    त्या जहाजेवर चा एक कर्मचारी समजा ब्राम्हण होता.त्याचे दुसऱ्या कर्मचाऱ्याशी समजा मराठा याच्याशी वैर होते.किंवा याउलट नवे धरली तरी चालेल. ज्यादिवशी ब्राम्हण ची नोंदवहीत नोंद करण्याची पाळी होती त्यादिवशी मराठा प्रथमच खूप दारू पिला होता. इतर गोष्टी लिहता आल्या असत्या परतू ब्राम्हण नावाच्या कामगारने त्या नोंदवहीत लिहिले कि, आज आपल्या जहाजावरचा मराठा नावाचा कामगार खूप दारू पिला व त्याने खूप धिंगाणा घातला.मराठ्याच्या लाख विनंती करून सुद्धा ब्राम्हणाने आपले वाक्य बदलले नाही, कारण ते सत्य होते. परिणामी मराठ्याला त्यादिवशी जहाज अधिकाऱ्याने शिक्षा केली.
    मानवी नियम हे निसर्ग नियमापेक्षा वेगळे नसतात त्यामुळे नियमाप्रमाणे एक दिवस नोंदवहीत नोंद करण्याची मराठ्याची वेळ होती. त्याने एक सत्य नोंद विलक्षण पद्धतीने लिहिली ती अशी "कि आज संपूर्ण दिवसभरात ब्राम्हण एकदाही दारू पिला नाही, व त्याने कसलाही धिंगाणा केला नाही."
    सदर प्रकारे कोण धुतला तांदूळ तर नाही. परंतु आपण सर्व बासमती तांदूळ असून आपल्या सर्वांच्या आंतरिक वादामुळे हिंदू नावाचा भात शिजत नाहीये. अन यामुळेच या धर्मावर सारे जग जगत नाही.
    सत्य तर हे आहे कि आपल्या सर्वांचे पूर्वज हे त्यांच्या कामात निपुण होते. आणि त्याच कर्माच्या बाबतीत आपण त्याचे कर्मषंड वंशज आहेत.अर्थात "बोलाचाच भात अन बोलाचीच कडी जेऊनीया तृप्त कोण झाला".
    आणि आता
    सर्जा राजपुत्र संभाजीराजे:
    ज्या वयात तुम्हांला चड्डी चा नाडा बांधता येत नव्हता त्या वयात या राजाने राजनीती वर ग्रंथ लिहिला. कित्येक भाषांचा स्वामी होता तो राजा. त्याच्या ताकदीची जाणीव आज देखील करून देतात सुंदरबन चे वाघ. गद्दार हि था राजा, भोकनेवले प्रनणियो मुसलमान बंकर भी राज कर सक्ता था ओ. जर पीत असत तो दारू नसता जगला तासाच्या वर अंगावरती जखमा घेवून.
    आता
    ब्राम्हण:
    श्री. ज्ञानेश्वर ज्यांनी अल्पवयात ज्ञानेश्वरी लिहिली ते ब्राम्हण होते. महाभारत व रामायण सारखे काव्ये रचणारे ब्राम्हण होते. आर्य चाणक्य ज्याने भरताला चंद्रगुप्त मौर्य सारखा सम्राट घडवला तो ब्राम्हण होता. जय शंभू म्हणून दिल्लीवर चढला तो पहिला पेशवा बाजीराव होता.
    महत्वाचे:
    सत्य काय घडले होते अचूक हे तर घडत असताना सुद्धा कळत नाही. पण एक त्रिवार सत्य, "चर्चा जिवंत राहते एकाद्याची , कारण त्याची लायकी असते तेवढी."
    सूचना :
    छत्रपती शिवाजी महाराज, राजपुत्र साम्भ्जी महाराज, पेशवा बाजीराव , दर. बाबासाहेब ,गौतम बुद्ध , महावीर जैन , सुभाषचंद्र बोस कुणीही असो ज्यांना महापुरुषांच्या यादीत स्थान आहे त्यांच्यावर शिंतोडे उडवणारे हे "मा.ल.क." आहेत....
    संपर्क:
    ज्यांना हिंदुरत्न छत्रपती धर्मवीर सर्जा संभाजी महाराजाचा खरा इतिहास हवा आहे त्यांनी इ-मेल नोदवा ... पुराव्यासकट पाठवतो.
    - राजे International.

    ReplyDelete
  41. मी शंभू राजांचा संपूर्ण इतिहास सहावी इच्छितो मला योग्य मार्गदर्शन करा.

    ReplyDelete
  42. #dimeapp A wonderful caring gesture from the company which cares for its employees as a family...
    Thank you #dimeappWe at the dimeapp stadium care for all our players. And even in these trying times, we look out for each one of our superstar teammates, where we are needed the most.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.
    At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!
    Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeapp.in11IPL is a testimony of our positivity, and our confidence.
    So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!With this amazing recognition of our great culture, we look forward to the our biggest #dimeapp.in11IPL this year. And we welcome superstars across India to join us in our amazing journey forward.
    Try out with our #dimeapp.inTeam on apply.dimeapp.insports.co.in.What truly makes dimeapp.in Sports one of India’s #Top10 Mid-sized places to work? Our people & our culture.

    At dimeapp.in Sports, we believe in putting our CULTURE FIRST, a culture that our teammates believe in and demonstrate in what they do, everyday. More importantly, our culture has guided us through these changing times, when our #dimeapp.inTeam is #workfromhome. We always understood that keeping our people positive, and provided for, is the key to making our stadium a #GreatPlaceToWork for all. That’s how we have become one of India’s #Top10 Mid-sized places to work, for the third year in a row!

    Our culture has also helped us stay positive as a business. Live Sports never completely halted in the most challenging times of this pandemic, so neither did we. Our journey from the start of the nationwide lockdown has been an incredible one. And it was the confidence of our teammates that motivated us to dimeapp.in big. Being awarded the title sponsorship of the 2020 #dimeappIPL is a testimony of our positivity, and our confidence.

    So THANK YOU all of you dimeapp.in Sports ‘Sportans’ in making dimeapp.in Sports one of India’s #Top10 #GreatPlaceToWork, once again!!

    ReplyDelete
  43. तर्कशुद्ध लेख आहे पण संभाजी महाराज जर छत्रपतीच राहिले नव्हते तर औरंगजेबाने त्यांना मारण्याची गरजच नव्हती त्यामुळे संभाजी राजेंची होण्यापूर्वी राजाराम छत्रपती बनले आणि त्यांनी जाणूनबुजून त्याची सुटका करण्याचे प्रयत्न केले नाही ,ही गोष्ट समजा खरी मानली तर राज्यात फूट पडली असती आणि औरंगजेबास पुढे ज्या नेटाने विरोध झाला तो झाला नसता
    पण अजून एक गोष्ट आहे की सभासद जो राजाराम महाराजांचा सेवक होता त्याने संभाजी महाराजांना चुकीच ठरविण्याचा प्रयत्न केला आहे
    पण जेव्हा शाहू परत आले तेव्हा जनतेने आणि सैन्याने त्यांचा सिहसनावर अधिकार मान्य केला ,ह्या गडबडीत राजाराम महाराजांचा वंश मागे पडला हे ही खरे आहे.
    त्यामुळे संजय सोनवणी ह्याचे मत बाद होते आहे

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...