Monday, April 8, 2013

सामाजिक लोकशाहीचे बाबासाहेबप्रणित तत्व विस्मरणात कसे गेले?



पानिपतसारख्या शोकांतिका एकाएकी घडत नसतात. त्यामागे विशिष्ट प्रकारची प्रदीर्घ कारणपरंपरा असते. समाजाच्या, राजकारणाच्या आणि सांस्कृतीक अध:पतनाची ती एक अटळ परिणती असते. इतिहासाचा अभ्यास हा त्यातून शिकून पुढे जाण्यासाठी आवश्यक असतो. परंतु सध्या पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती ज्या गतीने अध:पतनाच्या दिशेने निघाली आहे ते पाहता आम्ही एका नव्या पानिपताला स्वहस्ते निमंत्रण देत आहोत असेच म्हणावे लागते व ती वेळ फार दुरची नाही हे अल्लीकडच्या घटनाक्रमातून दिसते.

शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटल्यानंतर महाराष्ट्राचे शिवकालीन राजकारण पुर्णतया बदलले. छत्रपती नामधारी झाले तर पेशवे शक्तीशाली बनले. उत्तरेतही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पातशहा नामधारी होत वजीरांहाती सत्ता गेली. प्रजेच्या वाताहती ख-या अर्थाने सुरु झाल्या त्या याच काळात. सर्व राजकारण सरंजामशहांच्या भोवती फिरू लागले. पुर्वी जनकल्याणासाठी जी व्यापक कामे होत ती थांबली. सर्वत्र लुटालुटीचा काळ सुरु झाला. प्रजा आणि सत्ता यातील संबंध दुरावत गेल्याने आपापल्या गांवांचे रक्षण करण्यासाठी कोट बांधले जाऊ लागले. याचाच फायदा धर्मांधांनी घेत पार अब्दालीला निमंत्रणे धाडली. त्याची आधी चार आक्रमणे होऊनही व देश पुरता धुवून नेवुनही त्याला पुन्हा पाचव्यांदा निमंत्रित करण्यात आले. पानिपत घडले. एक सर्वविनाशक युद्धाने देशाची अस्मिता होत्याची नव्हती करुन टाकली...आणि इंग्रजांना बस्तान बसवायला संधी मिळाली...त्यांचे राज्य आले. देश पारतंत्र्यात गेला तो गेलाच! हे सारे आपल्याच राजकीय आणि सामाजिक सांस्कृतीक -हासाचे अपरिहार्य फलित नव्हते काय?

आजची आपली अवस्था काय आहे? आज केंद्रीय सत्ताकेंद्र रिमोटाहाती गेले आहे. देशाच्या पंतप्रधानाहाती स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसेल तर आपण लोकशाहीतच आहोत काय हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आर्थिक खुलेपणा आणण्याचा आटोकाट प्रयत्न काही विशिष्ट धनदांडग्या समाजघटकांसाठी होत असतांना त्याचे दिर्घकालीन परिणाम अन्य समाजघटकांवर कसे पडत आहेत व पडणार आहेत याची जाणीव सत्ताधारी व भाडवलदार यांना थोडी तरी आहे काय? आर्थिक दरी सांधण्याऐवजी हे जागतिकीकरण पराकोटीची विषमता निर्माण करत असतांना त्याचे भान नसणे हे सामाजिक रोषाचे कारण बनणार नाही कि काय?

महाराष्ट्र हा पुर्वीपासून स्वत:ची ओळख मोठ्या अभिमानाने पुरोगामी म्हणुन देत आहे. याच महाराष्ट्राचे राजकारण पहावे तर ते दिवसेंदिवस प्रतिगामीच बनत चालले असल्याचे सहज लक्षात येते. लोकशाहीचा अर्थ असतो तो हा कि सर्व समाजघटकांना सत्तेत, म्हणजेच निर्णयप्रक्रियेत, योग्य तो वाटा मिळावा. आज महाराष्ट्राचे जवळपास ६५% राजकारण आणि ग्रामीण अर्थकारण  एकाच जातीघटकाच्या हाती असावे ही बाब नेमके काय सांगते? एवढेच नव्हे तर या जातीसमुहातील मोजक्या दोन-अडिचशे घराण्यांतच हे सत्ताकारण वाटप वंशपरंपरेने होत जावे ही बाब महाराष्ट्र आजही सरंजामशाही युगातच वावरत आहे हे सिद्ध करत नाही काय? वंशपरंपरेने सत्ता उपभोगण्यात कोणती लोकशाही बसते? लोक केवळ त्यांनाच मते देतात म्हणुन कि ती मते हरप्रकारे "मिळवली" जातात म्हणुन? या सर्वांत अन्य जातीय सोडा, स्वजातियांचेही कसलेही सामाजिक, आर्थिक वा सांस्कृतीक हित साधण्यात त्यांना घोर अपयश आले आहे. आजवर ९६ कुळी, पंचकुळी, ९२ कुळी म्हणुन मिरवणा-या मराठ्यांवर आरक्षणाच्या रांगेत उभे राहण्याची वेळ यावी ही लाजीरवानी स्थिती जर या नवसरंजामदारांनी निर्माण केली असेल तर त्यातून निर्माण होनारा असंतोष समाजाला एकुणातच कोणत्या दिशेने घेऊन जाईल याची पर्वा कोणाला आहे काय? मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा आणि ओबीसींत उभी फुट निर्माण करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न कोणाच्या अंगलट येणार आहे याचे भान या नवसरंजामदारांना आहे काय?

राजकारणाची आणि राजकारण्यांची घसरती पातळी इतक्या वेगाने खालावत आहे कि आता उपमुख्यमंत्री ते पक्षप्रमुखही अश्लाघ्य भाषेचा सरसकट वापर करू लागले आहेत. यात दुर्दैवाची बाब अशी कि श्रोतृवर्गही अशा विधानांना निर्लज्जपणे हसून आणि टाळ्या वाजवून दाद देतो आहे. मुळात महाराष्ट्रात वा अन्य राज्यांतही अशी असांस्कृतीक विधाने करण्याचे सोडा, तसा विचार करण्याचे धारिष्ट्यही राजकारण्यांत नव्हते. राजकीय नेत्यांचे सांस्कृतिक चारित्र्य नंतर माफ्या मागून "बुंद से गई" या न्यायाने परत येत नसली तरी मुळात त्यांच्या तोंडून अशी विधाने सर्रास बाहेर पडावीत ही बाब आपली कोनती राजकीय संस्कृती दर्शवते? विधानसभेत एका पोलिस अधिका-याला मारहाण झाली. न्यायव्यवस्थेची बूज आपले राजकारणी काय ठेवत आहेत? अशा असंख्य घटना उजेडात येत नसल्या तरी सर्रास घडतात असे पोलिस अधिका-यांचेच म्हणणे आहे. ही वेळ आणल्याबद्दल पोलिस अधिकारीही तेवढेच जबाबदार असतील तर न्यायव्यवस्थेचा बोजवारा उडायला कितिसा वेळ लागतो?

आज डा. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांच्या पुढील विधानाची प्रकर्षाने आठवण येणे क्रमप्राप्त आहे. बाबासाहेब म्हणाले होते..."मानवी अधिकार कायद्याने नव्हेत तर समाजाच्या सामाजिक आणि नैतिक अधिष्ठानामुळे संरक्षित होतात. समाजातील लोकशाही ही राजकीय लोकशाहीचा पाया असायला हवी...त्याउलट नव्हे." (२५ नोव्हेंबर १९४९, घटनासमिती समोर भाषण देतांना.)  बाबासाहेबांचे हे विधान आज ना राजकारण्यांना माहित आहे ना समाजाला. अन्यथा समाजही परस्पर संबंधातील लोकशाही पाळत मग राजकारण्यांकडुन अथवा भांडवलदारांकडुन लोकशाहीची अपेक्षा ठेवू शकला असता. सरंजामदारशाह्या जपणारी लोकशाही आणि त्यांचेच हित पाहणारी प्रशासकीय व राजकीय व्यवस्था मग कशी जन्माला आली असती?

आपण वर उल्लेखलेल्या घटना जेंव्हा अधिकाधिक प्रमानात वाढत जातात तेंव्हा सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांकडुनही कोणत्या नैतिकतेची अपेक्षा आपण बाळगू शकतो हे महाराष्ट्राने लक्ष्मण मानेंच्या प्रकरणात पाहिलेच आहे. मानेंसारख्या साहित्तिकावर व समाजसेवकावर बलात्कारासारखे तब्बल सहा गुन्हे दाखल व्हावेत, त्यांनी फरार व्हावे आणि नंतर पोलिसांहाती स्वाधीन होण्यापुर्वी स्वबचावार्थ अन्यांवरच आरोपांची राळ उडवून द्यायची अशी घटना घडावी हे कोणत्या पुरोगामित्वाचे लक्षण आहे? "समाजाचे सामाजिक आणि नैतिक अधिष्ठान" जेंव्हा अशा कथित महनियांकडून  उल्लंघले जाते तेंव्हा सामान्यांच्या नैतिकतेची अवस्था बिकट होत जाणार हे उघड नाही काय?

"समाज आधी...मग राजकारण!" असे बाबासाहेबांनी बजावून सांगितले होते. "सामाजिक लोकशाही मजबुत असल्याखेरीज राजकीय लोकशाहीच पाया भक्कम होत नाही!" असेही बाबासाहेब उपरोल्लिखित भाषणात स्पष्टपणे म्हनले होते. आपण त्याउलट दिशेने जात राजकारण व राजसत्ता आधी मग समाज या तत्वाकडॆ आलेलोच आहोत व यात आपण आपल्या सामाजिक पानिपताची बीजे रोवत आहोत याचे भान आपल्याला कधी येणार? आपण लोकशाहीकडॆ नव्हे तर मध्ययुगीन सरंजामदारशाही व्यवस्थेत आलेलो आहोत. सरंजामदारांत प्रजेबद्दल जी तुच्छता आणि माजोरडेपणा असे त्याची दु:श्चिन्हे आताच्या नवसरंजामदारांत हरघडीला दिसत आहेत. अशा स्थितीत परिस्थितीचा कडेलोट एक ना एक दिवस होनार हे भाकित वर्तवायला कोणा ज्योतिषची आवश्यकता नाही.

माझ्या "...आणि पानिपत" कादंबरीत मी म्हटले होते कि "जेंव्हा समाज असामाजिकतेच्या व्यामोहात अडकून बेताल बनत जातो तेंव्हा शहाणपनाचे बोल ऐकण्याच्या परिस्थितीत कोणीच नसते. त्यातुनच विनाश अटळ बनत जातो." आज आपण त्याच अवस्थेला पोहोचलो आहोत. आज कोणीही (असलाच तर) शहाणपणा सांगायच्या फंदातही पडत नाही कारण ते सांगणे ऐकायच्या मन:स्थितीत आहेच कोण? महात्मा गांधी  आणि बाबासाहेबांचे आज कोणी ऐकण्याच्या स्थितीत नाही तर मग इतरांची काय कथा?

आजचा समाज असामाजिक आहे. लोकशाहीची मुलतत्वे त्याने पायतळी तुडवली आहेत. एकमेकांचे हित पाहण्याऐवजी एकमेकांच्या ताटातील घास पळवण्यात वा तसे कट आखण्यात मग्न आहे. शोषितांचे अधिक शोषण केले जात आहे तर भांडवलदारांना अधिकाधिक सक्षम केले जात आहे. सत्तेचे व साधनसामग्रीचे सर्व समाजघटकांत न्याय्य वाटप होणे हा लोकशाहीचा गाभा विसरून सत्तेचे केंद्रीकरण केले गेले आहे. वर समाजाकडे तुच्छतेने पाहिले जात आहे. बाबासाहेबांच्या मुलभुत तत्वज्ञानातील "सामाजिक" लोकशाही पुरेपुर उध्वस्त करण्यात आली आहे...मग राजकीय लोकशाहीचे वास्तव काय असनार हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. बाबासाहेबांना जयंतीनिमित्त फक्त कोरडी अभिवादने करुन आता भागणार नाही तर त्यांचे तत्वज्ञान आचरणात उतरवले पाहिजे अन्यथा पानिपत अत्यंत निकट आहे हे समजून चालावे!    
 
-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

45 comments:

  1. पानिपतसारख्या शोकांतिका एकाएकी घडत नसतात. त्यामागे विशिष्ट प्रकारची प्रदीर्घ कारणपरंपरा असते. समाजाच्या, राजकारणाच्या आणि सांस्कृतीक अध:पतनाची ती एक अटळ परिणती असते

    the Panipat battle lost due to various reasons...your above statement is absolutely not acceptable.. MALHAR-NAJIB FREINDSHIP AND ALL KNOW WHO RAN AWAY FROM BATTLE FIELD UNSCRATCHED..ONE OF THE MAIN REASON.
    शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटल्यानंतर महाराष्ट्राचे शिवकालीन राजकारण पुर्णतया बदलले. छत्रपती नामधारी झाले तर पेशवे शक्तीशाली बनले. उत्तरेतही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पातशहा नामधारी होत वजीरांहाती सत्ता गेली. प्रजेच्या वाताहती ख-या अर्थाने सुरु झाल्या त्या याच काळात.
    now see the meaning of above statements.. --vazir's became stronger than king -- how it will happen? only when the king is weak, not able to perform his duties. in case of Shahu maharaj , he himself appointed balaji as his peshwa, no body forced him to do so.. and all peshwa's remain loyal to Satara throne .Shahu once removed Nanasaheb peshwaa for brief peiod. So Peshwa became strong and thereafter the people of maharashtra suffered is like Goebbels propaganda..

    ReplyDelete
    Replies
    1. Rahul you dont know history.You are just nourishing Brahmanical thoughts...though I dont know to which class you belong to...you are utmost stupid and ignorant in history...dont talk nonsense...study history from ABCD.

      Delete
    2. your are constantly writing historical foolish articles with some malicious motives.. it has became habit of self declared history writers like you when they are asked difficult questions, then to give simply answer like above... I am not asking your educational degree but I can say surely that your history knowledge is very much poor and height of stupidity, lot of times I asked you the references but always you gave ambiguous answers. you are using history as tool by taking selective references to prove your points.. What kind of thoughts you are nourishing I don't know, but they are divisive enough.

      Delete
  2. सतत फुले आणि आंबेडकरांचे नाव घेवून त्यांचे विचार अंगवळणी पडतीलच असे काही नाही. जोपर्यंत लोक फक्त आपापल्या जातीतल्या माणसाला निवडून देत आहेत आणि खरी हुशारी आणि कामसूपण नाकारत आहेत तोपर्यंत हे असेच चालू राहणार. अवघड आहे सगळे. मराठे राखीव जागांसाठी भांडता आहेत हे बघून गम्मतच वाटली. कधी कधी वाटते ह्या राखीव जागांमुळे म्हणजे त्याच्या नको इतक्या उदो उदो करण्याच्या प्रवृत्तीने समाज निवांत झाला आहे. एकदा आपल्याला आरक्षण मिळाले की आपले सगळे प्रश्न चुटकी सरशी सुटतील अशी काहीशी एकंदर सामाजिक समज झाला आहे. ह्यांच्याकडे गेली ६० वर्ष सत्ता आहे आणि ह्यांनी ह्यांच्या उरलेल्या कुलांसाठी काय केले? फक्त दादोजी कोंडदेव हटवले की झाले.

    ReplyDelete
    Replies
    1. Great Chaitanya. The last two statements hit the bull's eye. Unfortunately masses are not knowledgeable to understand this.

      Delete
    2. श्री. चैतन्य,

      खोट्या गोष्टी दडपून सांगू नका.

      मराठ्यांच्या ताब्यात गेली ६० वर्षे सत्ता आहे, हे खरे आहे. सत्ताधारी मराठ्यांनी उरलेल्या मराठ्यांसाठी सत्ता वापरली नाही, हेही खरे आहे. सत्ता स्वजातीसाठी न वापरता इतर जातींसाठी वापरणे हा मराठ्यांचा दोष नसून गुण आहे. या संदर्भात आदरणीय अनिता पाटील ताई यांनी उत्तम लेख लिहिलेला आहे. तो अवश्य वाचा. तुमच्या माहितीसाठी लेखाची link येथे देत आहे : http://anita-patil.blogspot.in/2011/09/blog-post_01.html

      आपल्या ताब्यातील लाभाच्या गोष्टींचा वापर स्वाजातीसाठी करणे, हा ब्राह्मणांचा स्वभाव आहे. मंदिरात येणा-या कोट्यवधींच्या संपत्तीतून ब्राह्मणांनी काही सामाजिक कार्ये केली आहेत काय? उलट ख्रिश्चनांकडे बघा. मिशन-यांच्या शाळा आणि रुग्णालयांची संख्या किती याचा एकदा हिशोब करा.

      मराठ्यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही, हा कांगावा खोटा आहे. महाराष्ट्र हे गेली ६० वर्षे भारतातील सर्वाधिक संपन्न राज्य आहे, याचे श्रेय राज्यकर्ते या नात्याने मराठ्यांनाच जाते. अलीकडे माध्यमे गुजरातचा उदोउदो करीत असली, तरी महाराष्ट्र हेच भारतातील अव्वल राज्य आहे. पोटापाण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक आजही महाराष्ट्रातच येतात. असे नसते, तर राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली नसती.

      आपला
      राजा मइंद,
      संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.

      Delete
    3. नमस्कार राजा साहेब,
      तुम्ही म्हणता आहात ते मला १००% मान्य आहे कि तुमच्या नेत्यांनी उरलेल्या समाजाला काहीही दिले नाही. अहो पण मला सांगा हे कोणत्या समाजात होत नाही? भारत सोडा मी इंग्लंडला ३ वर्षे होतो तिथे तोच प्रकार आहे. पूर्ण लंडनमध्ये काही भाग आणि कंपन्या असे आहेत कि जिथे एकही किंवा फार तुरळक मूळ इंग्रज काम करतात. अश्याही कंपन्या पहिल्या कि जिथे फक्त आणि फक्त इंग्रजच आहेत. बाकीच्या कोणालाही ते येवू देत नाही. ह्या इंग्रजाने जगावर राज्य केले. अनेक देश लुटले पण ह्यांच्या सामान्य जनतेचे प्रश्न आणि आपल्या इथल्या लोकांचे प्रश्न काहीही वेगळे नाहीयेत. हाच प्रकार मी हैद्राबादला पहिला. तिथे मी ५ वर्ष राहिलो आहे. ३ वर्ष बंगलोरला राहिलो आहे. बंगरुलमध्ये जास्त तामिळी आहेत आणि काद्दीगांना कमी आहेत. हे माहिती आहे का आपल्याला? तुमची प्रगती तुम्हीच केली पाहिजेल. कोणी दुसरा आपल्याला वर आणेल ह्या भ्रमात जोपर्यंत आपला समाज राहील तोपर्यंत हे असेच चालू राहणार. आपल्या नेत्या लोकांनी ह्याच गोष्टीचा उत्तम फायदा करून घेतला आहे. त्यांना प्रश्न विचार हो. तुम्ही फक्त ब्राहामन्नांवर गरळ ओकता आहात. उद्या राखीव जागा मिळूनही ९०% समाज तसाच राहील. मग पुढे काय तर ब्राह्मण लोकांना देशातून हाकला. मग काय बाकीच्या समजला. सध्या पाकिस्तान मध्ये असेच चालू आहे. आधी अहमदी लोकांना हाकलले. आता शिया लोकांनावर गडांतर आले आहे. अजून काही वर्षांनी सुन्नी मध्ये पण काहीतरी होइल. तुमची विचारसरणी त्याच मार्गने चालली आहे असे मला तरी वाटते. ह्या गोष्टींचा जरूर विचार करा.
      वर सोनवणी साहेबांनी काही वेगळे म्हटले नाहीये. पण ते समजून घ्यायची आणि उलाजून घ्यायची आत्ता इच्छा नाहीये. हे सगळे फार विचित्र मार्गाने जावून यादवी माजेल बाकी काहीही होणार नाही. त्यापेक्षा सध्या जे सत्तेवर आहेत त्यांना जाब विचार. एक संस्था शिल्लक नाहीये जिथे पैसे देवून काम होत नाही. एक संस्था नाही जिथे जातीपाती शिवाय काम होत नाही. एक संस्था नाही जी सगळ्या जगात आपले नाव काढेल. सतत फक्त इतिहास आणि ऐतिहास आणि आमच्यावर कसा अन्य्यान झाला. खरा अन्य्याय झाला तो आदिवासी आणि खालच्या जातींवर. त्यांच्यासाठी राखीव जागा आल्या आणि आता त्या तुमच्या सवर्णांसाठी पण हव्यात? ज्यांना सगळीकडे मान आहे. ब्राह्मण पेशवाई सोडली तर तुमच्या हाताखाली होते आणि तुम्ही लोक स्वतः मागास म्हणवता? ह्यात चूक कोणाची आहे? तुमच्या नेत्यांनी कितीतारो खोट्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तुम्ही त्यावर विश्वास ठेवता आणि मग काय वाटेल ते करता. खैरलांजी बद्दल एक शब्द नाही. तिथे ब्राह्मण नव्हते. सगळ्या गावांमध्ये हेच चालते मग तिथे कुठे जातो सर्वधर्म समविचार वगैरे? असो. हे न संपणारे आहे. कारण ह्यावर तुम्ही तुमच्यावर झालेल्या गोष्टी सांगणार पण माझे म्हणणे इतकेच आहे कि हे सगळे अराजकतेकडे नेणारे आहे आणि एकही राजकारण्याला काहीही होणार नाही. उद्या पुन्हा परचक्र आले तर तुमच्या आमच्या सारखे सामान्याच मारणार आहेत.

      Delete
    4. मस्त संजय सोनवणी आणि चैतन्य आज खरच अशाप्रकारे कान टोचनार्यांची खरच आवश्यकता आहे.जे लोक वरीलप्रमाणे आदळआपट करतात त्यांनी एक तर जग पाहिलेले नसते किंवा असे लोक सोयीच्या गोष्टी पाहतात,ऐकतात,बोलतात.ज्यात यांची सोय नसते ते सर्व यांना दिसत तरी नाही किंवा समजत तरी नाही.गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छ्या !!!

      Delete
    5. चैतन्य,

      मराठ्यांनी काहीच केले नाही, असे म्हणायचे. आपले म्हणणे खोटे आहे, असे सिद्ध झाले की, दुसरे विषय काढायचे. छान ब्राह्मणी कसब वापरीत आहात आपण. मूळ मुद्यावर कायम राहा. तुम्ही इंग्लंडला राहून आल्याने भारतातील परिस्थिती बदलत नाही.

      तुमची सगळी विधाने खोटी आणि दीशाभूल करणारी आहेत. उद्या राखीव जागा मिळूनही ९० टक्के समाज तसाच राहील, असे तुम्ही म्हणता. पण, उद्याचे सोडा, आज ३.५ टक्के ब्राह्मणांनी ओपन कोट्यातील ९० टक्के जागा वशिल्याने बळकावल्या आहेत, त्याचे काय? मुलाखती घ्यायला ब्राह्मण असतात, ते ब्राह्मणांना झुकते माप देऊन भरती करतात.

      खैरलांजीमध्ये ब्राह्मण नव्हते, म्हणजे ब्राह्मण सर्वच ठिकाणांहून निर्दोष सुटतात असे नाही. आणि मुळात खैरलांजीबद्दल कोणी ब्राह्मणांना दोष दिलेलाच नाही. उगी वड्याचे तेल वांग्यावर घालायचे म्हणजे काय?

      अराजकाची भीती घालून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नका. अराजक येणार असेल, तर येऊ द्या. ब्राह्मणी गुलामगिरीत राहण्यापेक्षा अराजकता परवडली. समाजाला कशा ना कशाची भीती घालून ब्राह्मण आजपर्यंत फुकटात जगत आले आहेत. पूर्वी पापाची भीती घालून सामान्यांकडून कर्मकांडांच्या नावावर पैसे उकळून ब्राह्मण जगत होते. स्वातंत्र्यानंतर मुसलमानांची भीती घालून यादेशात hindutvaच्या नावाखाली ब्राह्मणशाही माजविली गेली. आता हे उद्योग बंद करा. या देशाची काळजी वाहण्याची सुपारी तुम्हाला कोणी दिलेली नाही. अराजक येणार असेल, तर येऊ द्या.

      जाता जाता :
      ब्राह्मणांवर गरळ ओकण्याचा प्रश्न नाही. ब्राह्मणांची पापे दाखविणे हा गुन्हा असेल, तर तो आम्ही हजार वेळा करणार.

      आपला
      राजा मइंद,
      संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.

      Delete
    6. नमस्कार राजसाहेब,
      ब्राह्मणांची पापे दाखविणे हा गुन्हा असेल>> अहो ब्राह्मण लोकांनी मागे पापे केली हे आमच्या आई वडिलांनीच कबुल केले आहे. माझा मुद्दा इतकाच आहे कि पुन्हा तेच सांगून फार काही फरक पडणार नाहीये. बाकी मला ३ ठिकाणी जे दिसले ते मी मांडले. तुम्हाला ते मान्य न करता ब्राह्मणी कावा वाटत असेल तर मी अजून कितीही उदाहरणे दिली तरी तुम्हाला ते मान्य होणार नाही. मुळात तुम्ही ज्यांना निवडून दिले आहे त्यांनी फक्त स्वतःचे उखळ पांढरे केले आहे. सगळ्यात जास्त धंदे गुजराथी आणि मारवाडी समाजाचे आहेत. त्यांनी तुम्हाला कसेही वागवले तरी चालते कारण ते पैसे देत असतात. तुम्ही आणि आह्मी तिकडे नोकरी करतो. ब्राह्मण समाजाला आधी पासून एक पुढावा मिळाला हे खरेच आहे. पण हाच प्रकार ६०-७० च्या दशकात मुंबई मध्ये झाला होता. तेंव्हा हटावो लुंगी बाजावो पुंगी असा नारा दिला गेला होता. हाच प्रकार हैद्राबाद मध्ये होतो आणि काही प्रमाणात बंगरूळ मध्ये पण होतो. शक्य झाल्यास इंग्लंड मध्ये नुकतीच घडलेली एक घटना अभ्यास. मागील वर्षी फिल्पोट नावाच्या इसमाने स्वतःच्या घराला आग लावली आणि त्याची ६ मुले जाळून मेली. ह्या मानवाला सरकार नोकरी न करण्याचे पैसे देत असे. न्यायालात त्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि आता सगळीकडे सरकारी भत्त्यावर जोरदार चर्चा चालू आहे. राखीव जागांमध्ये सुरवातीला फायदा होतोच पण ज्यांचा झाला ते बाकीच्यांना मदत करतीलच असे काही नाही आणि अनेक लोक त्याचा प्रचंड गैरफायदा घेतात. असो महावीर सांगलीकरांच्या ब्लोग वरून अजून एका ब्लोग वर बहुदा जाधव त्यांचे नाव. ह्यांच्या ब्लोग उत्तम कारणमीमांसा आहे. आपण नक्की वाचली असेल. तेंव्हा मुल मुद्दा राखीव जागांचा होता तर ते योग्य नाही हेच माझे मत आहे. पण काय आहे समजले तरी उमजून घेतले जाईलाच असे नाही. असो. बाकी पुन्हा सांगतो तुमच्या ब्लोग वर आणि बाकी कसे ह्या पद्धतीत तुम्ही आपले मुद्दे मांडता ते सगळे सत्याचा भरपूर विर्पयास करणारे आणि स्वतःचा शुल्लक फायदा पाहणारे आहेत. ह्यातुन फक्त यादवी माजेल फारतर तुमच्याच म्हणण्या प्रमाणे ब्राह्मण लोकांना जीवे मारणे हे होइल. पण त्यातून प्रश्न सुटणारच नाहीत. मग बाकीचा समाज. मग हळूहळू बाकीच्या मराठ्यांवर गडांतर. हे त्याच वाटेने जाणार. म्हणून म्हटले पाकिस्तान काय चालले आहे ते नक्की अभ्यास. हेच चालू आहे.

      Delete
    7. चैतन्य,

      तुमच्या आई-वडिलांनी कोणत्या पापांची कबुली दिली, ते जरा सांगता का? एक तरी उदाहरण सांगा? त्या पापांसाठी कोणते प्रायश्चित्त घेतले तेही जरा जगाला कळू द्या.

      हजार वर्षांपूर्वी ब्राह्मणांची जी विकृत मानसिकता होती, तीच आजही आहे. पूर्वी ब्राह्मण खोट्या पोथ्या लिहायचे, आज खोटा इतिहास लिहितात. अफवा पसरवून बहुजनांच्या महापुरुषांची बदनामी करतात. खोट्या पोथ्यांच्या आधारावर आजही पोटे भरतात. काय बदलले आहे? कोणत्या पापांच्या कबुलीबद्दल तुम्ही बोलताय?

      आमच्या ब्लॉगबद्दल मोघम बोलू नका, मुद्देसूद बोला. कोणता मुद्दा चूक आहे, ते सांगा. का चूक आहे, ते सांगा. मोघम बोलून दिशाभूल करण्याचे ब्राह्मणी उद्योग बंद करा.

      आरक्षणाला विरोध असेल, तर आधी सरकारी नोक-यांतील ब्राह्मणांची अतिरिक्त संख्या कमी करा. ब्राह्मणांची लोकसंख्या ३.५ टक्के असेल, तर तेवढ्याच नोक-या त्यांना मिळायला हव्यात. अतिरिक्त नोक-या हे आरक्षणच नव्हे काय? देवळांमध्ये ब्राह्मणांना किमान ५ हजार वर्षांपासून अघोषित आरक्षण आहे. तेही बंद करा. ब्राह्मणांनी देवळे रिकामी करून बहुजन पुजा-यांच्या स्वाधीन करावीत. त्यानंतरच आरक्षणाला विरोध करावा. स्वत: आरक्षणे लाटायची आणि इतरांच्या आरक्षणांना विरोध करायचा, हा ब्राह्मणी कावा बंद करा.

      आपला
      राजा मइंद,
      संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.

      Delete
    8. राजा साहेब,
      आपण यदुनाथ थत्ते, एस एम जोशी, नानासाहेब गोरे वगैरे प्रभूती ह्यांची नावे आईकली नसावीत. मुळात बाबासाहेब आंबेडकरांबरोबर आणेल ब्राह्मण होते. प्रश्न असा आहे की तुमच्या नेते लोकांनी फक्त स्वतःचे उखळ पांढरे घेतले. असो. एकंदर फक्त ब्राह्मण लोकांना दोष देणे एवढा एककलमी कार्यक्रम करायचे तुम्ही ठरवले असल्याने मी काही बोलू शकत नाही.

      बाकी आमच्या वडिलांनी किमान १०० एक गरीब लोकांना फुकट शिकवले आहे. २००२ साली वारले तेंव्हा आणेल विध्यार्थी कोणीही न कळवता आले होते. ह्यातच त्यांच्या छोट्याश्या कार्याची काय ती ओळख असे आह्मी तरी समजतो. अजूनही १-२ ठिकाणी चुकून लोक भेटतात आणि ते आवर्जून ओळख काढतात. त्यांच्यात कुठलाही जाती पतीचा लवलेश नसतो. पण तुम्हाला ते मान्यच नसल्याने बोलणे खुंटते. असो. एकंदरीत बहुदा काही ब्राह्मण लोकांना कंठस्नान घातल्यावर तुम्हाला थोडी शांतता लाभेल अशी आशा करतो. चालू देत तुमचे.

      Delete
    9. राजसाहेब. अत्यंत खालच्या दर्जाचा रिप्लाय आहे आपला. मी जास्त बोलू शकत नाही. बाकी माझी टीम सोफ्टवेअरची आहे. बाकी उरलेल्या गोष्टींवर उत्तर देवून मी माझा वेळ घालवू इच्छित नाही. तुम्ही ज्या पद्धतीत विचार करता आहात त्यातून फक्त तुमचे नुकसान आहे. अतिशय कष्ट करून बाबासाहेब आंबेडकर शिकले. तुमच्यावर झालेल्या कपोलकल्पित अत्याचारांपेक्षा जास्त भोगले. पण त्या माणसाने कधीही हिंसाचाराची भाषा केली नाही अथवा आपल्या अनुनायांना तसे करायला सांगितले नाही. मुळात दलित लोकांवर अत्याचार करण्यात तुम्हा लोकांचा हात ब्राह्मण पण धरू शकत नाही. पण ते मान्य करणे अवघड जाते. ब्राह्मण लोकांनी पूर्वी अत्याचार केले हे सत्य आहे तसेच सत्य तुम्ही मराठ्यांनी मान्य केले तर आपण पुढे जाऊ शकू नाहीतर वर म्हटले तसे आत्ता ब्राह्मण जात्यात आहेत मग बाकीचे पण येतील. कारण सगळे राजकारण तुमच्याच हातात आहे. ९०% जमिनी तुमच्या नेत्यांच्या नावावर आहेत. कित्येक लोक गडगंज आहेत. पण असे आहे की ते बाकीच्यांना मदत करत नाही. मुळात हे सगळीकडेच आहे. पण तुम्हाला ब्राह्मण आत्ता एक सोफ्ट टार्गेट मिळाले आहेत. एकदा त्यांचा सफाया झाला की बाकीच्यांकडे तुमचा मोर्चा वळेल. तुमचे विचार तुम्ही मांडले माझे मी मांडले. ज्याला जे पटतील ते घेतील. माझ्याकडून पूर्णविराम कारण पातळी फार घसरत चालली आहे. खालील लिंक वर अनेक प्रोग्राम आहेत. ते अवश्य आईका. आपण ज्या पद्धतीची विचारसरणी अंगिकारली आहे तशीच पाकिस्तानात पंजाबी लोकांची आहे. त्याचे परिणाम आत्ता ते लोक भोगत आहेत. आपणही त्याच मार्गाने जाणार.

      https://www.facebook.com/BilaTakallufwithTahirGora

      Delete
    10. श्री. चैतन्य,

      <>

      गुजरातमध्ये ३ हजार मुसलमान जाळून मारणा-यांना आपल्या या सल्ल्याची अधिक गरज आहे. आरएसएस आणि त्यांच्या विहिप, बजरंग दल आदी विध्वंसक संघटनांच्या विघटनवादी कारवाया थांबविण्यासाठी आपण कार्य करावे, असे आपणास आम्ही सूचवू इच्छितो.

      आपला
      राजा मइंद,
      संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.

      Delete
    11. first GODHARA KILLING .. WHY YOU ARE NOT SAYING ANYTHING ABOUT THAT BASTARD MUSLIMS THOSE KILLED INNOCENT PERSONS IN TRAIN.
      WHY SO CALLED SECULARIST AND SOCIALIST PEOPLES ALWAYS HIGHLIGHT POST GODHRA ROTS, BUT SELECTIVELY FORGET THE ROOT CAUSE..
      MUSLIMS AS A COMMUNITY ARE INVADERS , AND THEY NOT ONLY INVADE INDIA BUT FORCEFULLY CONVERT LOT OF PEOPLE INTO ISLAM..
      AND SUCH A BATGA MUSLIM LIKE राजा मइंद IS CONSTANTLY TELLING FALSE THINGS. ACTUALLY HE SHOULD TELL HIS MUSLIM FRIENDS TO BEHAVE PROPERLY AND DON'T INDULGE IN ANT TERRORISM AND ANTI NATIONAL ACTIVITIES, HINDU'S HAVE RIGHT TO RETALIATE IN ANY MANNER, STILL MOST HINDU'S ARE RELIGIOUSLY TOLERANT, SO AFTER PARTITION OUR HINDU LEADERS ALLOWED MUSLIMS TO LIVE HERE( BIG MISTAKE), SE THE CONDITIONS OF HINDU'S IN PAKISTAN AND BANGLADESH...

      Delete
    12. Rahul..

      ....AFTER PARTITION OUR HINDU LEADERS ALLOWED MUSLIMS TO LIVE HERE( BIG MISTAKE)....

      Bahujan samaj allowed "Foregner Brahmins" to live here also a Big Mistake. It is high time now to rectify it.

      आपला
      राजा मइंद,
      संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच.

      Delete
    13. to
      so called raja of so called fake anita patil vichar manch
      aapan musalman aahat , te kabul kara, hundu navani post karu nka, aani koni gadhav kahi bahi lihito tar te khare naste, bahujan samaj allowed foregner brahmins is a false story , but muslims have only history of 1300 years is true story.. and they invaded india and converted people, its true story, show me a single brahmin or any hindu who forcefully convert any person, lastlt give your true identity...

      Delete
  3. उत्तम लेख. शब्दन्‌ शब्द पटला.

    ReplyDelete
  4. राहुल -

    अतिशय थोड्या शब्दात सोनावणी चे वाभाडे काढले या बद्दल कौतुक करावेसे वाटते .

    खरेतर ते काही शास्त्रोक्त इतिहासकार नाहीत - स्वघोषित म्हणता येईल फार तर -

    पण गुरुशिवाय कसा कोण एकदम एखाद्या विषयातला तद्न्य होईल ?

    यांना कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण नाही किंवा दृष्टीकोन नाही - यांचा एक कलमी कार्यक्रम असतो - तो म्हणजे ब्राह्मण द्वेष - आत्तापर्यंत मराठा समाजाला चिकटून यांचे फुकटात बरे भागत होते - पण -

    घात झाला आणि यांना कुणी वाली राहिला नाही - दादोजी आणि कुत्रे यामुळे यांना कुणीही जवळ करत नाही -

    ब्राह्मण याना कधीच आपले मानणार नाहीत आणि या गद्दारांना मराठा समाज कधी जवळ करणार नाही - परवाच्या लाइव्ह शोवर सगळेजण यांच्याकडे ज्या हिणकस वृत्तीने पहात होते ते पाहून यांची कीव येते - पण ही यांच्याच पापाची फळे आहेत !

    त्यांच्या अभ्यासाच्या कक्षा विस्तारीत नसल्यामुळे त्यांचे विचार ठराविक रिंगणात फिरत असतात - त्यांना एकसारखे कुठलाही विषय एकदम दोन चार हजार वर्षे मागे नेण्यात अतोनात मजा वाटते असे दिसते -

    हे त्यांच्या कुत्र्याचे प्रकरण झाले नसते तर ह्याच राजमान्य ?सोनावणीनी कुत्र्यासारखे ब्राह्मणांवर तुटून पडण्यात कृतार्थता मानली असती .

    यांची जातपात आणि इतर भाषाविषयावरची मते , तसेच शैव आणि आर्य -मोहनजो दारो याबद्दलची मते विदुषकी वाटतात आणि बुद्धी भाडोत्री वाटते !

    एक विरंगुळा म्हणून जर ते हा ब्लोग चालवत असतील तर ठीक पण अभ्यासुपणा चा आव आणून असले पोरकट लिहिणे खरोखरच विदुषकी ठरते .

    राहुल तू कोण मला माहित नाही , एकवेळ असे सांगावेसे वाटते संजयला कि बाबारे -

    अजून १ ० - २ ० वर्षे अक्षरशः तप केल्या प्रमाणे इतिहास या विषयावर अभ्यास कर - ते सुद्धा सर्व पूर्वग्रह खुंट्याला टांगल्या नंतर - मग कुठे कदाचित प्रगती होईल -

    तो पर्यंत फेसबुक आणि हा ब्लोग बंद कर -



    पद्मा

    ReplyDelete
    Replies
    1. पद्मा...मला कोण मानते आणि कोण नाही याची मी पर्वा करत नाही. तुम्हालाही त्याची पंचाईत असण्याचे कारण नाही. राहुलचे प्रश्न मुळात पुर्वग्रहदुषित असतात हे मी होळकर प्रकरणापासून पाहतोय. त्यांनी काय मते बनवावीत हा त्यांचा प्रश्न आहे. माझे मत खोडायचे तर त्याची नीट मांडणी करायला हवी. पुरावे विचारतांना पुरावे द्यायलाही हवेत. त्यांचा हा सारा बाष्कळपणा आहे. भाषा उद्धट आहे. स्वत: अभ्यास करा आणि काय मांडायचे ते मांडा...कोणी अडवलेले नाही. तुमचीही भाषा तेवढीच उद्धट आणि बेमुर्वतखोर आहे. न मागता सल्ला देना-यांना मुर्ख म्हणतात हे तुम्हाला माहित नसावे.

      Delete
  5. ते अनामिक आणि राहूल वा अर्वाच्य भाषा वापरुन लिहिणारे तुम्ही कोणी का असेना. प्रत्यक्ष पुरावे न देता फक्त संजय सोनवणींना व्यक्तीगत आकसातून लक्ष्य करत आहात असे उघड उघड दिसते आहे. तुमच्यात स्वतःच्या खर्‍या नावाने लिहायची हिम्मत नाही. वर लेखकाच्या ब्लॉगवर येऊन बाता मारता की त्यांच्या लेखनामागे काही अभ्यास नाही?... तुमच्यासारख्या विग्नसंतोषी लोकांमध्ये खरा दम असेल तर पुराव्यानिशी लेखन करा. तुमचे पुरावे चूक आहेत हे सिद्ध करण्यात ब्लॉगचे लेखक अपयशी ठरले तर मग खुशाल आरोप करा. तुम्हाला फुटकळ लिहायला काय जाते? तुमच्यासारख्यांना फुकटच्या बाता मारणे एवढेच फक्त माहिती असते. पुराव्यानिशी एखादी गोष्ट सिद्ध करुन दाखवण्यामध्ये तुमचे शेपूट पायात जाते. तेव्हा तुम्हीच अभ्यास करुन या आणि ब्लॉगलेखकाची मते खोडून काढायचा प्रयत्न करा. तेवढी बुद्धीमत्ता तुमच्यात असेल असे मला वाटत नाही म्हणूनच प्रयत्न करा असे म्हणतोय. कारण तेवढी बुद्धी असती तर तुम्ही आधीच अभ्यास करुन आला असता व ब्लॉग लेखकाने दिलेले दाखले कसे खरे आहेत याची तुम्ही स्वतःच स्तुती केली असती. तुमची भाषा पाहूनच ती वाचणार्‍या कोणाही सुज्ञ ब्लॉगवचकाच्या लक्षात तुमचा पोरखेळ आणि तुमच्यामागचे सूत्रधार लक्षात येतील. तेव्हा तुमचा सूर-पारंब्यांचा खेळ चालू ठेवायचा की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा. द्वाडपणाला काही मर्यादा तरी असते पण वेळीच तुम्ही स्वतःला सावरले नाही तर मनोरुग्ण होण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Sagar, whatever your views may be but I never wrote anything Anonymously. I CRITICIZE Sanjayji, however it's not my any personal enmity . I respect freedom of speech and to write. So I use my RIGHT to criticize Sanjayji. YOU HAVE NOT READ ALL MY COMMENTS IN DETAILS, OTHERWISE SHOULD REFRAIN FROM WRITING FOLLOWING SENTENCE.-- कारण तेवढी बुद्धी असती तर तुम्ही आधीच अभ्यास करुन आला असता व ब्लॉग लेखकाने दिलेले दाखले कसे खरे आहेत याची तुम्ही स्वतःच स्तुती केली असती. MY POINT OF OBJECTION IS THE PROOFS GIVEN BY SANJAYJI ARE INCOMPLETE AND NOT SUFFICIENT TO PROVE HIS POINTS, SECONDLY SANJAYJI USES SELECTIVE REFERENCES AND PROOFS. I HAVE LOT TIMES SHOWN HIM HIS CONTRADICTIONS AND SELECTIVE USE OF PROOF'S. NOW ITS UPTO HIM TO LISTEN OR ACCEPT IT. LASTLY , NOBODY IS BEHIND ME AS I AM NOT ASSOCIATED WITH ANY POLITICAL OR SOCIAL ORGANIZATIONS .SO WHEN YOU WRITE SOMETHING WITHOUT KNOWING ANYTHING ABOUT THE BACKGROUND OF A PERSON, SHOWS WHO'S BEHIND YOU AND YOU ARE USED AS PUPPET.

      Delete
    2. Dear Rahul,

      Mr. Sanjay Sonawani is always giving proofs for what he said whereas I have read all your comments and found that you are trying to target Mr. Sonawani rather to target their thoughts. Your language is really unacceptable. As you said everyone has right to say anything, which is fine. But it is everyone's responsibility to keep your language decent when we are writing socially. Even I also opposed some of thoughts of Mr. Sonawani and gave correct proofs. After that he corrected his references. Like wise what I know Mr. Sonawani is very open person for debate. if you proved him wrong with solid proofs, I am sure he is ready to accept what you proved. But when we use slangs and bad language value of thoughts are affected. I would request you please refine your language and have a healthy point to point debate. Mr. Sonawani will surely respond in correct manner if your proofs are correct. if Mr. Sonawani proved your proofs are wrong, then you also should be open to accept the truth which is proved on facts.

      you used word for me as PUPPET. Sorry to say but, this is foolish statement. On what basis you said this? I accept anybody's thought only after study and not blindly. Be specific if you want to prove this. give example.

      Delete
    3. Even I also opposed some of thoughts of Mr. Sonawani and gave correct proofs. After that he corrected his references.
      its your experience..still I appreciate it.. However my experience is different than you..
      तुमची भाषा पाहूनच ती वाचणार्‍या कोणाही सुज्ञ ब्लॉगवचकाच्या लक्षात तुमचा पोरखेळ आणि तुमच्यामागचे सूत्रधार लक्षात येतील. तेव्हा तुमचा सूर-पारंब्यांचा खेळ चालू ठेवायचा की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा. द्वाडपणाला काही मर्यादा तरी असते पण वेळीच तुम्ही स्वतःला सावरले नाही तर मनोरुग्ण होण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही
      the puppet----- is the reply for your above sentence.. as I already said that nobody is behind me but with out knowing anybody you should not criticize like this. I am expressing my own views and thoughts, you can criticize that . however you are criticizing me without not knowing anything , so its natural reply. we are here to discuss or share thoughts, not for any personal comments, for that you can have to join lot of bhukkad blogs available on internet.
      I never used slangs and bad language against Sanjayji, ON THE CONTRARY HE USED THAT AND I RETALIATE. SEE THE FOLLOWING COMMENT OS SANJAYJI ( 9 APRIL 2013)
      Rahul you dont know history.You are just nourishing Brahmanical thoughts...though I dont know to which class you belong to...you are utmost stupid and ignorant in history...dont talk nonsense...study history from ABCD.
      SO ITS QUITE NATURAL TO RETALIATE WITH SAME LANGUAGE.
      I REPEAT YOU HAVE NOT TAKEN ENOUGH CARE TO READ MY ALL COMMENTS, I ALWAYS GIVE SUFFICIENT PROOFS ( WITH NAME OF AUTHOR AND NAME OF BOOKS) . READ THE ARTICLES ON SHATVAHANA, CHANAKYA, MALHAR HOLKAR ETC. AND MY COMMENTS. THANKS FOR YOUR GOOD REPLY.

      Delete
  6. राहुल,

    अभिनंदन !

    अगदी स्पष्ट विचार मांडल्याबद्दल !

    फार थोडे लोक असे धाडस दाखवतात -

    अरे आता माझाच बघ ना - तू असे स्पष्ट लिहिल्यामुळे मला धाडस करावेसे वाटत आहे -

    संजय सोनवणी हे अतिशय बालिश आहेत - त्यांचे विचार पोरकट आहेत .-मते अप्रगल्भ आहेत

    अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले इतिहासकार हल्ली फारच प्रचारकी लिहित असतात-त्यातलेच हे !



    त्यांची खरच कीव येते - त्यांचे सिद्धांत तर फारच हास्यास्पद असतात,

    त्यात वैचारिक परिपक्वता शून्य असते - याचे कारण संजय सोनवणी यांचे लेखनच भरकटत जाणारे - ( नेणारे नव्हे ) - असते - थोडेसे आत्म मग्न असे वाटते !



    . या सोनावणी चे रेकार्ड पाहिले तर काय दिसते ?

    यांनी प्रथम ह मो मराठे यांच्या बरोबर वाद घातला त्यानंतर त्यांना वाटले तसे मराठा समाजाने यांना जवळ केले नाही - परवा टी व्ही वर सुद्धा त्यांच्या बद्दलची इतरांची बॉडी लांग्व्हेज कशी होती ?



    सर्वजण त्यांना एकप्रकारे दाराशी बांधलेल्या कुत्र्याच्या प्रमाणे वागवत होते .



    सोनावणी चा मुख्य दोष म्हणजे त्यांना आपण खूप अभ्यास झालेले इतिहासकार आहोत असा भ्रम झालेला आहे . खरेतर थोर लोक कधीही आपण फक्त बरोबर आहोत असे मानत नाहीत - पण राहुल - तुला उत्तर देताना सोनवणी आत्मभान विसरले हेच खरे !- ते घसरले - आणि फसले !- त्यांना असे वाटते की आपण समाज घडवू शकतो - त्याला दिशा देवू शकतो - पण तसे काहीच होणार नाही - त्यांची लेखणी पवित्र नाहीये - अगोदरच ती भ्रष्ट आहे

    जगात किती महान माणसे होऊन गेली आहेत !

    त्यांच्या विचारात एक प्रकारचे कुभांड वाटते ! सर्व शास्त्रांचा उपयोग हा काहीतरी वेगळेच घडवून आणण्यासाठी यांचा अट्टाहास असतो !

    स्वरदा

    ReplyDelete
    Replies
    1. Two or three things I know for sure, and one of them is the way you can both hate and love something you are not sure you understand.

      Dorothy Allison

      Delete
  7. संजय जी, उपरोक्त संपूर्ण कॉमेंटऱ्यांचं उत्तर आपण आपल्या लेखात दिलेलं आहेच. "जेंव्हा समाज असामाजिकतेच्या व्यामोहात अडकून बेताल बनत जातो तेंव्हा शहाणपणाचे बोल ऐकण्याच्या परिस्थितीत कोणीच नसते. त्यातुनच विनाश अटळ बनत जातो." हे आपलं विधान दोनशे टक्के खरं वाटावं, अशा प्रतिक्रिया येताहेत. आपण मांडलेल्या मूळ मुद्याला बगल देऊन कॉमेंट- चर्चा भरकटली आहे. (हे या सोशल मिडियाचं वैशिष्ट्यच (?) आहे.) आपण विषयाची मुद्देसूद मांडणी केली आहे. बाबासाहेबांच्या कित्येक विधानांची प्रचिती पुढची कित्येक वर्षे टप्प्याटप्प्याने येतच राहणार आहे. काही चर्चा नको, काही रिप्लाय नको. वाचा, समजून घ्या आणि पुढं चला. आणखी चांगलं लिहा. आम्ही किमान ३३३ जण तरी वाचतो आहोत. अभिनंदन!

    ReplyDelete
    Replies
    1. आपण मांडलेल्या मूळ मुद्याला बगल देऊन कॉमेंट- चर्चा भरकटली आहे.
      karan likhan bharkatlele aahe..
      kuthe lokshahi kuthe rajeshahi, aapan 21 shatakat aahot, 16/17 vya navhe.. kuthlya hi palasachi char pane todun aanavit aani pimpal mhanave tar charcha bharkatnarch..
      "जेंव्हा समाज असामाजिकतेच्या व्यामोहात अडकून बेताल बनत जातो तेंव्हा शहाणपणाचे बोल ऐकण्याच्या परिस्थितीत कोणीच नसते. त्यातुनच विनाश अटळ बनत जातो.
      its true and applies to all. here the author himself is not listening to any good words, then why to blame others.

      Delete
    2. राहुलचे प्रश्न मुळात पुर्वग्रहदुषित असतात हे मी होळकर प्रकरणापासून पाहतोय. त्यांनी काय मते बनवावीत हा त्यांचा प्रश्न आहे. माझे मत खोडायचे तर त्याची नीट मांडणी करायला हवी. पुरावे विचारतांना पुरावे द्यायलाही हवेत. त्यांचा हा सारा बाष्कळपणा आहे. भाषा उद्धट आहे. स्वत: अभ्यास करा आणि काय मांडायचे ते मांडा...कोणी अडवलेले नाही
      from chanakya viaa shaiv dharm-harappa-dadoji-holkar all others articles especially related to history.... one thing is sure ,Sambhaji brigrade is openly propagate hatred against brahmins and Saanjayji by his misleading articles. from chanakya to till date I always cross him on various his historical comments, everytime I found ambigious reply. lastly if no suitable answer found , then follows like this--You are just nourishing Brahmanical thoughts. the best way to shield..
      kay brahman aasne gunha aahe ka? ki brahmanani ya so called lokshahi madhe aaple mat mandache nahi ka/ declare once for all. I never support any brahmaan for sake of support, nor I am biased against any body.Sanjayji can continue their so called new history research. If indeed he proves his points beyond doubt, then majority will accept it, but for unhistorical waghya dog, he fought like trojans and 300 spartans. I am agree with him that dadoji kondadev was never the teacher of bal shivaji raje.. but when to prove his points, he simply defame the dead dadoji( khuni-murderer) ( corrupt person) etc. Here I realised the malicious motives and which proves who is biased ?
      पुरावे विचारतांना पुरावे द्यायलाही हवेत. the article is written by the writer, then he first clear any ambiguity and produce the proofs( not selective).
      otherwise we have ample bloggers and 10/20 pages historians . ALWAYS REMEMBER THAT WHEN YOU RAISE A FINGER AGAINST ANYBODY, OUR OWN FOUR FINGERS-----

      Delete
    3. Rahul, this will be my last reply to you. Your intentions are malacious. You have some vague background of the history. Your language, I repeat, has always been accusive. You don't know what is selective and what is not. You also fail to understand here I am giving reference of Panipat in which context. before peshavai and vajirshahi things were different, whether good or bad, is open to debate, but conditions deteriorated and there cannot be any doubt on it as far socio-political conditions are concerned. Peshava was not sole ruler of marathashahi as state was divided amongst maratha Raj mandal. Shinde-Holkar thus became equal partners of Peshava's. But this history was not at all point of the article, but similarities those we find in today's socio-political context.

      And I know very well what troubles you. You have your own right to have your views, but while expressing them, you need to mind your language. Never ever I felt your intentions were clear. If I am writing new history because falsities already have been committed by biased historians. If I am incorrect future generations will correct me. None is final authority over history. Not anybody. They were correct at some places and incorrect at many. I have to refer what the best correct was provided that can be proved by third party statements/proofs. There is no single historian existing (or existed) on the earth who didn't picked up supportive material to his/her hypothesis. Dont ever try to tell me how history is written in the past and in present...by the people who have their own ulterior motives. See Shejvalkar's Panipat:1761...the fellow didnt bother to give a single reference while writing the book and acting as if final authority on Panipat. Goodbye.

      Delete
    4. lot of comments are deleted... I also know what troubles you...i will write on that but not here...

      Delete
    5. my last reply is vanished like a ghost... atleast you should have shown that much decency to express my views and to reply your last reply. thanks for the discussion so far ...

      Delete
  8. संजय सर ,

    आपणास गुढीपाडव्याच्या शुभेच्छा .

    येणाऱ्या नवीन वर्षात न थकता आपण आपली गुढी घेऊन पुढे लाट राहाल अशी खात्री वाटते ,

    ReplyDelete
  9. सोनवणी सरांचे सर्वच लेखन पटले नाही तरी त्यांचा स्वताच एक दृष्टीकोन आहे तो ते मांडत अस्तात. मात्र वर राहुल यांना त्यांनी काय कारणाने असे लिहिले ते काळात नाहि. राहुल यांचा मुद्दा पटला / न पटला तरी सोनवणीनी असा त्रागा करायला नको होता. वर ते लिहितात तसे पेशवे/ वजीर आल्या पासून अधोगती सरू झाली याचा अर्थ त्या आधी सर्व आलबेल होते काय? औरंगजेब आणि आधीचे बादशाह काय जनतेचे हित करत होते का? त्या उलट वजीर परवडले असे म्हणावे लागेल. छत्रपती / बादशाह कमजोर झाले म्हणून पेश्स्वे / वजीर प्रबळ झाले नंतर मराठेशाहीत सरदार प्रबळ झाले.

    ReplyDelete
  10. प्रिय संजय ,

    संजय सरांचे हे सर्व लेखन - वाचून आणि त्यावरील उत्तरे वाद प्रतिवाद वाचून असे वाटते की आपण एकविसाव्या शतकात आहोत का ?- का पार शिवकाल किंवा १ ० व्या १ १ व्या शतकात ?


    आपला देश हा पुरातन असला तरी त्याची राज्य घटना लिहिली गेली त्यापासून एक नवे युग सुरु झाले असे मानले तर ? तसेच खरे तर आहे ! कारण आपण कायदे पाळतो ते डॉ बाबासाहेबांच्या विचारातून आलेले आहेत - निधर्मी राष्ट्र हे आपले स्वप्न - ध्येय आहे -

    भले आपल्यात अनेक सरमिसळ झाली असेल - पण आपण एक मार्ग आता स्वीकारला आहे असे असताना जुनी मढी किती दिवस उकरत बसायचे ?

    एकसारखे जुन्या काळात मनाने भरकटत जाण्यात काय शहाणपणा आहे ?

    रेल्वे किंवा बस मध्ये आपल्या शेजारी बसणारा शैव आहे का वैष्णव याने काय फरक पडतो ?

    एकसारखे तेच तेच उगाळण्यात काय अर्थ आहे ?


    खरेतर आपण रोजच्या आयुष्यात किती जातपात पाळतो ?- माझ्यामते अजिबात नाही -

    कुणाची हार्ट ची बायपास करणारा शैव आहे का वैष्णव - हिंदू का मुसलमान - असा विचार तरी आपल्या डोक्यात येतो का ?तो कधी लिंगायत असतो किंवा पारशी - तर कधी अगदी कोकणस्थ !- पण तिथे आपण हा वाद घालत बसलो तर किती अप्रासंगिक ठरेल नाही का ?

    पाण्याची बाटली विकत घेताना , औषधे ,दूध , ग्यास,घेताना आपण त्याला जात विचारतो का ?रेल्वे रिझर्वेशन करताना आपण असे म्हणतो का की स्लीपर कोच मध्ये माझ्यावर झोपणारा हिंदूच पाहिजे - तो उच्च जातीचाच पाहिजे ?


    अनेकजण म्हणतात की जातपात नष्ट झाली पाहिजे - परंतु त्याच वेळेस जातीवर आधारित आरक्षण आहे - ह्या विरोधाभासामुळे जातीचे राजकारण आपोआप पोसले जात आहे .

    वारकरी संप्रदाय असो किंवा आधुनिक संत महंत असोत - ते बोलताना ते जातिमुक्त समाज असे चित्र रंगवतात पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे !

    आता तर तुकाराम आणि इतर संत आणि ज्ञानेश्वर असा प्रकार चालला आहे . होऊ घातला आहे - याची - या भेदाभेदाची आखणी कुठेतरी होत असली पाहिजे हे मात्र नक्की !- अगदी विचारपूर्वक !

    मूलतः घोळ आहे तो ओ बी सी बद्दल आणि त्यातच मराठा समाजाला आरक्षण हा मुद्दा !

    एक लक्षात घेणे आवश्यक आहे की ,

    ब्राह्मण समाजाला आपल्या प्रगतीच्या वाटा ह्या आरक्षणाच्या मार्गाने जात नाहीत हे कळून चुकले आहे - कोणत्याही कृतीशील,समाजाला हे लगेच लक्षात येईल की आपली प्रगती कशात आहे - तर भारतातून काढता पाय घेण्यात आपले कल्याण आहे हे कुणीही सांगू शकेल -

    आज जग जवळ येत आहे आणि त्याचा फायदा घेत आपण जर या संकुचित वातावरणातून बाहेर गेलो नाही तर आपणच आपले अपराधी ठरू हे निश्चित -

    ReplyDelete
  11. एकेकाळी युरोपात अशीच लाट आली होती -गो इस्ट - तशीच लाट निर्माण करून आपण सर्व जण जर जगभर पांगलो आणि एक संकुचित विचार बाजूला फेकत आपल्या प्रचंड मनुष्य संपत्तीचा वापर करून घेऊ शकलो तर चित्र नक्की बदलेल - आपल्या कडे इंग्रजी जाणणारी तरुण लोकसंख्येची प्रचंड नोंद आहे - आपल्याकडे आय टी मधील मनुष्यबळ आहे - आपण सगळ्यांनी जर त्याचा भरपूर फायदा घेतला तर आपण खूप पुढे जाऊ शकतो - पण आपण तिथल्यातिथे जर स्वतः भोवती गिरक्या घेत बसलो तर ? काळ आपल्याला कधीही क्षमा करणार नाही . खरेतर चीन सारखे देश आपल्यापुढे गेले आहेत आणि इंग्रजी भाषेसाठी ते खास प्रयत्न करत आहेत .

    आपण अजूनही पानिपत कुणामुळे हरले याचाच विचार करत बसलो तर काळ आणि येणाऱ्या पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत .


    बदलाचे वारे कसे कुठून वाहात आहेत हे ओळखून ( धूर्त पणे ) आपल्या रोजच्या वागणुकीत बदल करणारे पहिले कोण असतात तर - सी के पी आणि कोकणस्थ ब्राह्मण - हे मान्यच केले पाहिजे - आणि शेवटी तेच प्रगतीची गुढी घेऊन सर्वांच्या पुढे निघून जातात आणि उरलेले उकिरडा फुंकत बसतात - हा इतिहास आहे - त्यातून इतर जातींनी बरेच शिकण्यासारखे आहे !

    आपल्याला पुढे जायचे असेल तर आपण बदलाचा झंझावात झेललाच पाहिजे - सदासर्वदा आरक्षित राहून आपणच दुर्बल होत जात असतो !

    आज सी के पी आणि कोब्रा लोक सर्व प्रकारच्या बिन सरकारी नोकऱ्यात उच्च पदे भूषवित आहेत - जी खरेतर जात विभागणी नुसार परंपरागत भंडारी कोळी आगरी , यांच्या साठी असली पाहिजेत -मरीन नेव्ही , आणि तत्सम अनेक शाखांमधून ,सीकेपी आणि कोब्रा पसरले आहेत - त्यांना दोष देण्यात अर्थ नाही - आपणच आरक्षण आरक्षण करत एकच भाकरी हजार हातांनी तोडत आहोत - कुणाचेच नीट पोट भरणार नाही -


    आपला दृष्टीकोन आपण बदलला तर आपण या स्पर्धेत टिकून राहू शकतो - नाहीतर आपली मुळात परंपरागत असलेली कौशल्ये आपण काळाच्या ओघात विसरून जात फक्त बोरुबहाद्दर हीच आपली ओळख उरेल !- आणि सीकेपी आणि कोब्रा उच्च पदे भूषवत आपल्याला आपल्याच क्षेत्रात चतुर्थ श्रेणीवर काम करायला लावतील - म्हणजे परत तिथे नव्या स्वरूपात चातुर्वर्ण्य आलाच - पण या वेळेस ते त्याला जबाबदार असणार नाहीत - तर - आपणच त्याला जबाबदार असू हे मात्र निश्चित !

    आपण माझे विचार आपल्याकडे सगळ्यांना दाखवावे ही नम्र विनंती

    धन्यवाद .

    ReplyDelete
    Replies
    1. उत्तम विश्लेषण केले आहे. माझे अनेक मराठा मित्र आहेत आणि काही सुतार वगैरे आणि ते सगळे आता इंगलंड आणि अमेरिकेत स्थाईक झाले आहेत. संधी असून मी तिकडे गेलो नाही. पण वर काही लोकांचे विचार वाचले कि वाटते कि उगाचच आपला देश आणि आपली मातु करत बसलो कि काय. असो. पण मी वर म्हटल्या प्रमाणे सध्या आपल्याकडे ज्या पद्धतीचे शिक्षण दिले जाते तेच चुकीचे आहे. त्यावर हे लोक काही करत नाहीत. कारण पुन्हा ह्यांच्याच लोकांच्या संस्था आहेत. पुण्यात भारती आणि दि. वाय पाटील वगैरे अजूनही बदनामाचा आहेत. पैसे घेतात म्हणून. तीच अवस्था म आय टी ची आहे. पण मुळातच चांगली कॉलेजेस कमी आहेत. शिक्षक कुठे नोकरी मिळाली नाही म्हणून शिक्षक झाले आहेत. त्यांना धड पगार नाहीत. धड सुविधा नाहीत. ह्यातले बरेच लोक बाहेर शिकवण्या घेवून बक्कल पैसे मिळवतात. पण ह्याची चिंता करावी असे कोणाला वाटत नाही. त्यावर काही आंदोलन वगैरे होत नाही. ह्याचे परिणाम अजून २० वर्षांनी होतील. आरक्षण मिळाले तरी चांगले शिकून बाहेर येवून नोकरी मिळेल का ह्याचा काही विचार नाही. सध्या मुलाखती घेताना लक्षात येते कि इतका गाळ आहे आणि त्यात ब्राह्मण पण येतात. विचार करून डोके सुन्न होते पण ना आपल्या आपल्या राज्यकर्त्यांना ह्याचे काही घेणे आहे ना आपल्या समाज सुधारकांना. नुसतेच फक्त ब्राह्मण लोकांना शिव्या देणे हाच काय तो प्रकार चालू दिसतीय. पण आपणच स्वतःला सुधारले पाहिजेल हे काही कोणी म्हणत नाहीये. अवघड परिस्थिती आहे.

      Delete
  12. संजयराव सोनावणी सर

    चैतन्य आणि इतरांनी लिहिलेले वाचनीय आहे

    आपले लिखाण समाजाच्या उपयोगी पडते असे समजून घेतले तर सर्व गोष्टी समजायला सोपे जाते . पण काही लोक आपल्या हेतुविषयीच शंका घेत असतील तर ते चूक आहे असे सांगावेसे वाटते आपण नेहमीच समाजाच्या उद्धारा विषयी जागृत असता

    त्याचे कौतुक करावेसे वाटते मांडणीत चार शब्द इकडे तिकडे होत असतील पण हेतूविषयी शंका घेण्याचे काहीच कारण नाही .

    आपणास पाडव्याच्या शुभेच्छा

    वन्दन. आणि प्रणाम

    ReplyDelete
  13. आप्पा - थांब रे - आलोच - बरेच दिवस शोधतोय तुला

    बाप्पा - शोधायचं काय त्यात - मी आहे तिथेच आहे -

    आप्पा - अगदी आध्यात्मिक बोलायला लागलास - कोणाची सावली बिवली पडली कि काय ?

    बाप्पा - आपल्याला जमत नाही रे तसलं -मी तुझ्या पाठीशी आहे किंवा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार किंवा सबका मालिक एक - असलच म्हणायचंय ना -

    खर सांगू का - असं सावलीतलं झाड होण्यापेक्षा उन्हा पावसातले दिवस चांगले !

    या चार गोष्टी ऐकायला ठीक आहेत - पण जीवनाच्या शेवटी आपण सारखेच कुणाचे तरी बोट धरून चाललो असं चुकून जरी वाटलं - तर मग आपण शून्य जगलो असं वाटून वेड लागायची वेळ येईल नाही का ? अरे आप्पा - हल्ली हे मठ आणि आरत्या यांनी उच्छाद मांडलाय नुसता !

    आप्पा - आपल्या बरोबरचे सगळे लोक बघ न आता कसे चेहऱ्यावर कृतार्थ भाव घेऊन हिंडत असतात - परवा अण्णासाहेब भेटले होते - अगदी लीन भाव चेहऱ्यावर - मी म्हणालो - काय अण्णासाहेब - मजेत दिसताय - तर म्हणाले - अप्पा - या एक तारखेला रिटायर झालो - आता काहीही पाश नाहीत - सगळी त्या - - - महाराजांची कृपा बघा !दोन्ही मुलींची लग्ने झाली - आता मी मोकळा !कसले व्याप नाहीत - "

    किती छोट जग असतं - बॉसने बेल मारली की धावण्यात आणि होयबा करण्यात आयुष्य गेलं पण त्यात थ्रिल काय ?- आणि त्यात त्या महाराजांची तरी काय कसोटी ?


    बाप्पा - पण हे असे दबून जाण्यातच आयुष्य गेलं - कधी मोकळा श्वास घेतला नाही. आपल्या चहुबाजूला असाच प्रकार ! यालाच मध्यम वर्ग म्हणतात .

    या मध्यम वर्गाची खास वैशिष्ठ्ये आहेत -

    सगळ जग आपल्यामुळे चाललंय आणि आपल्याशिवाय ते ठप्प होते असा एक वेडगळ समज , दुसर म्हणजे ते कधीही तृप्त नसतात त्यांच्यावर कायम अन्याय होतो असे त्यांचे मत असते - तिसरी खासियत म्हणजे आपण कुठलेतरी महान वंशज आहोत असे त्यांचे मत असते -त्यांना इतिहास फारच प्यारा असतो - त्यांना भविष्याची काळजी असते पण त्यांचा आपल्या कर्तृत्वापेक्षा कुठल्यातरी महाराजांच्या कृपेवर विश्वास असतो !आणि त्यामुळे त्यांचे वर्तमानकाळ नासवणारे हे तत्व् ज्ञान त्यांना कायम अतृप्त आणि न्यूनगंड निर्माण करणारे ठरते - पण त्याच वेळी इतिहासाच्या चुकीच्या परीक्षणामुळे एक विचित्र अहंगंड सुद्धा असतो - असे एकाच वेळी न्यूनगंड आणि अहंगंड एकाच व्यक्तिमत्वात नांदत असतात .



    आप्पा - बाप्पा बाप्पा ,लेका - तू कुठे शिकलास इतके ?तुझे पाय धरले पाहिजेत !

    बाप्पा - अरे माझ्या बॉस चे पाय धरताना मला जे जाणवलं ते हेच - तुला कधीतरी सांगायचं म्हणून राखून ठेवलं होत - आता आपण सगळेच रिटायर झाल्यावर जरा धाडस दाखवावस

    वाटल इतकच काय ते - अरे खर सांगायचं तर बॉस आणि बायको या दोन ब - कारात आपल्या आयुष्याचा बट्या बोळ होतो हेच माझे मूळ अभंगातले वाक्य - त्याचेच हे पूर्वरंग आणि उत्तररंग सांगत होतो -

    आप्पा - पण काहीही म्हण -हे संजयदादा उगीचच वाद घालत बसतात - - लोक तरी किती तऱ्हेने त्यांच्या मागे लागतात - लोकांनी त्यांना थोडं थोडं समजून घेतले पाहिजे .त्यांचा फ्ल्याश ब्याक २ ते ३ हजार वर्षांचा असतो !हे आता आपण आपल्या हातावर गोंदवून घेऊ या !



    बाप्पा -माझी लोकाना विनंती आहे की लोकांनी काही समजुती पक्क्या करून टाकाव्यात - म्हणजे आमच्या संजय दादा ला त्रास होणार नाही -

    आप्पा - सांग सांग - काय ते !

    बाप्पा - कोण कुठून आले नि कुठे वळले नि थांबले ते आज पासून सगळे रद्द -आर्य आणि द्रविड हे मंगळावरून आले असे मानू म्हणजे मग संपले सगळे !त्यात द्रविड हे आधीच्या गाडीने आले आणि आर्य नंतरच्या असे मानू फार तर !- त्यातच आर्य विना तिकीट आले असेपण समजू !

    ReplyDelete
  14. आप्पा - आणि पानिपतचे तिसरे युद्ध ?

    बाप्पा - पानिपतची खरेतर लागोपाठ ३ युद्धे झाली - प्रत्येकाने एकेक जिंकले -पेशवे आणि अबदाली यांनी एकेक आणि शिंदे होळकरांनी एक अशी तीन युद्धे झाली

    आप्पा - अहो काहीतरी काय ? असे कसे होईल ?- लोक वेड्यात काढतील न आपल्याला

    बाप्पा - नो नेव्हर - सत्य हे सत्यच राहत असते - संजय सांगेल तेच सत्य ! जर शिवाजी ची जन्मतिथी दोनदा असू शकते तर पानिपताने काय घोडे मारले आहे ?

    आप्पा - खरे आहे रे तुझे लॉजिक - तू तर संजय पेक्षाही भारी निघालास - ते नाही का एका क्षणात कोणताही विषय चार पाच हजार वर्षे मागे नेत !

    बाप्पा - परवा मी त्यांना सहज म्हणालो , संजयदादा , बायका नौवारी चे पाच वारी कधी नेसू लागल्या ?तर त्यांनी एकदम सुरु केले - एकदम फ़ुल्ल जोशात - आर्य पूर्व काळात स्त्रिया ९ ० वार साडी नेसत असत आणि मोहनजो दारो काळात १ ० ० वार -त्या काळात वार हे मोजमाप नव्हते - पवार असे मोजमाप होते -

    आप्पा - आपल्याला तो काळ परत आणायचा आहे म्हणजे सोपे आहे- पवार आहेतच - फक्त थोडेसे पंचांग बदलावे लागेल -

    बाप्पा - मग जरा मोहोन्जोदारोत रिकामी मैदाने दिसतात ती आय पी एल सारखी त्या काळातली एम एच पी एल ची मैदाने होती असे पण संजय सराना म्हणावे जमवून टाकाना !

    आप्पा - मी बोलतो - बघतो - आपल्याला सर्वाना घेऊनच पुढे जायचे आहे - कुणाला काय हवाय तर कुणाला काय - जनावरांना चार हवाय - खर म्हणजे जनावरांनी पैसा खायला शिकल तर सगळ सोपे होईल - सरकार हवा तितका पैसा देईल !-

    बाप्पा -निम्मा अधिकाऱ्या ना आणि निम्मा जनावराना !-

    आप्पा - मी बघतो - मी बोलतो - आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन - - - - -

    ReplyDelete
  15. चैतन्य कुमार ,

    आपले विश्लेषण वाचले आपण कुणाच्या विश्लेषणाची तारीफ केली आहे ते मात्र समजत नाही ,

    म्हणजे काय की ,

    आपण राजा नावाच्या कुणाला जे सणसणीत चपराकीच्या रुपात उत्तर दिले आहे तेपण छान झणझणीत आहे ,अर्थपूर्ण आहे . त्याबाबत आपले पहिल्यांदा अभिनंदन करते !


    त्यामुळे असे सुचवावेसे वाटते की प्रतिसाद देताना कृपया आपले विश्लेषण चांगले असे म्हणण्या ऐवजी अलख निरंजन , असे किंवा ज्याला संबोधायचे असेल त्याचे नाव घालून प्रतिसाद दिला असता तर जास्त बरे वाटले असते .

    आपण म्हणता त्याच अनुषंगाने असे अजून म्हणावेसे वाटते -


    टि व्ही वरील प्रासंगिक बातम्या ऑन साईट कव्हर करणाऱ्या बातमीदारांचे मराठी फारच हलक्या दर्जाचे आणि अशुद्ध असते उच्चार अशुद्ध असतात

    ते ऐकताना मातृभाषेची झालेली तोडफोड सहन होत नाही . आपण सर्व जगासमोर आपली भाषा मांडतो त्या वेळेस ती शुद्ध असावी असे मला वाटते

    त्या बाबत मी अनेक वेळा आणि इतरांनी सुद्धा संजयजी यांना शुद्धतेचा आग्रह धरला होता

    पण

    संजय सर बहुजनांचा मुद्दा घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात

    हे थोडेसे हानिकारक वाटते भाषेच्या आरोग्याच्या दृष्टीने !


    तरी आपणा सारख्या उमद्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांनी हाही मुद्दा उचलून धरला तर बरे होईल असे वाटते

    म्हणून संजय सर आणि आपल्या सारख्या लोकांना नम्र विनंती की आपण जाहीर मत प्रदर्शन करून भाषा शुद्धी बाबत चर्चा करावी

    आपली आभारी आहे

    ReplyDelete
  16. SUNIL PAWAR

    1)SANJAY SIR EK SUCHANA KRUPAYA APALYA LIKHANAT AGADICH JARUR ASEL

    TAR FUKT,JATICHA ULLEKH KARAWA.KRUPAYA BRAHMANICAL THOUGHTS WAGAIRE

    JATIYA RUP DENARE SHABDA PRAYOG TALAWET.

    2)KRUPAYA SURWANI LAKSHAT GHYA KI KUTHALAHI MAHAPURUSH/KINWA KUTHLIHI

    JAT CHANGALI/ WAIT NASATE.HE JUG MHANAJE SWARTHACHA BAJAR AHE

    FUKT APLA SWARTH SADHATANA DUSARYANA TRAS HONAR NAHI HE BUGHANE

    MAHATWACHE AHE.

    3)MAHATMA FULE YANCHYA PUSTAKATIL KAHI BHAG VIKRUT MHANAWA EVADA

    WAIT AHE. PUN MHANUN TYANCHI THORAWI KAHI KAMI HOT NAHI.

    4BRAHMANANI KAHI GOSHTI WAIT KELYA ASALYA TARI KITITARI CHANGALYA

    GOSHTI PUN KELYA AHET.

    5)PRATYE KATALE CHANGALE GUN UCHALA ANI PUDHE CHALA.

    ReplyDelete
  17. DEAR SIR -MARATHA ARASHANA MULE MARATHA ANI OBC MADHYE NAVHE,.

    TAR OBC MADHYE UBHI FUT PADANAR AHE.JI OBC SHAKTI

    JAGRUT HOT AHE TILA APALYA PUNKHA KHALI GHENYA-SATHI

    HE MARATHA ARASHANACHE PRAKARAN KADHANYAT ALE AHE.

    (EK OBC TARUN)

    ReplyDelete
  18. हा राजा माईन्द कुठला ओसाड गावाचा राजा ?

    असे राजे गल्लोगल्ली झाले तर आम्ही मांसाहेबाना तोंड कसे दाखवणार ?

    आणि हा ब्राह्मणांच्या मागे का लागला आहे ?



    स्वराज्यात सर्वांचाच सहभाग होता असे आम्ही खुद्द सांगतो त्या वेळेस मासाहेबाही आनंदाने आमची अजूनही पाठ थोपटतात

    त्या म्हणतात , शिवबा आगऱ्याहून इकडे आलास पण तुझ्यासाठी किती ब्राह्मण आणि कायस्थानी औरंगजेबाचे आसूड झेलले - त्याचा कधीही विसर पडू देऊ नकोस -



    रायगडावरून आमच्या देखत ज्या वेळेस आमच्या लाडक्या वाघ्याची समाधी या नराधमांनी विस्कटली त्या वेळेस तर आम्ही हतबल झालो -



    या राजा माइन्द सारख्यांना तर आमच्या हाताने आम्ही चिरडून टाकू इच्छितो

    असले भाडोत्री - फेकलेल्या तुकड्यावर नाचणारे शिवभक्त असूच शकत नाहीत

    आमचे भक्त असूच शकत नाहीत

    आजच्या कायस्थ ,धनगर साळी माळी ब्राह्मण ,सुतार -कुंभार शिंपी ,गवळी अशा लोकांकडूनच परत आमचे स्वराज्य उभे राहील याची आम्हाला खात्री आहे -माझ्याच लोकांनी मला माझ्या अठरा पगड लोकांपासून दूर केलं आणि जणू नजर कैदेत टाकलं -

    माझ्या अठरापगड शिबंद्यानो सोडवा मला -

    अहो काय हो संजय काका

    हे छापायची लाज वाटते का ?

    का अनिता पाटलीणी च्या लोकांनी तुम्हाला विकत घेतला आहे ?





    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...