Sunday, May 5, 2013

संकट आलंय म्हणून....


संकट आलंय म्हणून
घाबरुन जावू नकोस
बावरून जावू नकोस
जीवनात संकटे येतच असतात
नव्हे, 
त्यांना यावंच लागतं
नियमीत येणा-या
जीव जाळणा-या
ग्रीष्माप्रमाणे
त्यांशिवाय 
थोडीच कळणार आहे
जीवनाची किंमत?

संकटांच्या राशी 
कोसळुन गेल्यानंतर
लाभणारे एक साधे 
 ओलावेदार
स्नेहमय 
पर्जन्य-स्मितही
जगण्याचे नवे निमित्त देते
पुन्हा जगण्याची 
अपार उर्मी देते
म्हणून गड्या
जरा धीर धर...
जरा धीर धर.........

ग्रीष्मानंतर
 पावसाळा नियतच आहे!

3 comments:

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...