Wednesday, February 19, 2014

राजीवजींचे मारेकरी!

राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेचे अत्यंत दुर्दैवी असे राजकारण सुरू झाले आहे. द्रवीड वंशवादाची राजीवजींची हत्या ते त्यांच्या हत्याकटात सहभागी आरोपींची सुटका ही अपरिहार्य परिणती असली तरी याला खरे जबाबदार आर्यवंशवाद सुरु करणारे होत. बोप्प ते म्यक्समुल्लरने या वादाची सुरुवात केली. खरे तर म्यक्समुल्लरला आर्य हा वंश म्हनून अभिप्रेत नसून एक भाषागट म्हणून अभिप्रेत होता व त्याने ते स्पष्टही केले. पण लो. टिळकांसारख्या तत्कालीन राष्ट्रीय मान्यता असलेले नेते व विद्वान यांनी "आर्क्टिक होम इन वेदाज" सारखा ग्रंथ लिहून आर्य सिद्धांतावर व ते आद्य आक्रमक असल्याबद्दल सिद्धांतन करून वांशिक अअर्य विरिद्ध द्रविड आणि आर्य विरुद्ध मुलनिवासी या भयंकर संघर्षाची बीजे रोवली. आक्रमक आर्यांनी सिंधू खो-यातून द्रविडांना हाकलले व दक्षीणेत आश्रय घ्यायला भाग पाडले या समजाने पुर्वी कधीच अस्तित्वात नसलेली द्रविड अस्मिता खळबळून जागी झाली. स्वतंत्र द्राविडीस्तान मागेपर्यंत मजल गेली. त्यांनी उत्तरेतील कथित आर्य भाषाही नाकारल्या. पारपोलासारख्या सिंधू लिपीचे कथित वाचन करणा-या विदेशी संशोधकालाही जवळ केले कारण त्याने सिंधू लिपीचे वाचन पुरातन द्राविड भाषांच्या अनुषंगाने केले. त्या वाचनाला अर्थात जागतिक विद्वानांची मान्यता नाही. असे असले तरी आर्य विरुद्ध द्रविड ही मांडणी आज बहुतेक चळवळी आणि विचारवंत गृहित धरतात.

याचाच विस्फोट म्हणजे दक्षीणेत आर्यवाद्यांबद्दलचा असलेला पराकोटीचा वांशिक द्वेष. यातून कै. नरसिंह रावही सुटलेले नव्हते. रामायणांच्या दाक्षिणात्य आवृत्त्यांना ते प्राधान्य देत. आणि या वादाला भारतात तात्विक/संशोधकीय अधिष्ठान मिळवून देणारे लो. टिळक! राजीव गांधींची हत्या ही त्याच वांशिक द्वेषाची अपरिहार्य परिणती होती. आज तमिळ सरकार सर्व आरोपींना सोडण्यासाठी एका पावलावर उभे आहे त्याचाही अर्थ हाच आहे. म्हनजेच आजच्या द्राविड वंशवादाला प्रोत्साहन/समर्थन देणारे नेते/विद्वान म्हनून टिळकच जबाबदार ठरतात हे विसरून चालणार नाही.

वंशवाद निरर्थक व अशास्त्रीय असून तो भारतीय समाजातून जोवर नष्ट केला जात नाही तोवर हा संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत! 

2 comments:

  1. तमीळ आतंकवाद्यांत मी जीवाची बाजी लावून मिसळलो आहे. मी एका मासेमारांच्या ट्रालरमधून जीवघेना असा तमिळनाडु ते जाफना असा प्रवास करून अनेक एल्टीटीईच्या अतिरेक्यांना भेटून चर्चा केली आहे. त्यावर मराठी आणि नंतर इंग्रजीत कादंबरीही लिहिली आहे. तमिळनाडुतील एका मोठ्या दैनिकाच्या प्रतिनिधींनी मला ही मदत पुरवली होती. अतिरेक्यांचा कट्टर आर्यद्वेष मी अत्यंत जवळून पाहिला आहे. मी आर्यवादाचा कधीच समर्थक नव्हतो व नाही. अशा स्थितीत मी वाद घालत श्रीलंकेतून परत भारतात अशाच अनिश्चित वातावरणातून आलो. मरण कोणत्याही क्षणी...तमिळांच्या वा भारतीय गस्तीनौकांच्या हातून मिळू शकते ही जीवंत स्थिती मी पाहिलेली आहे. त्या गोळाबारीतून मी गेलो आहे.

    द्रविड वंशवाद फोफावायला आर्य वंशवाद कारण झाला याबद्दल मी ठाम आहे. एवढेच नव्हे तर सेमेटिक विरुद्ध इंडो-आय्र्यन सिद्धांत आजच्या जागतिक दहशतवादाला जबाबदार आहे हे माझे सिद्ध झालेले मत आहे.

    ReplyDelete
  2. चक्क थापा आहेत राव ,कायबी आपल बोलत सुटायचं जरातरी इचार करावा
    आयला भारतात पार वर पासून खालपर्यत एकाच चीज पक्की आहे त्यात भेसळ नाय ,दगाफटका नाय
    एकदम प्युअर आणि ते म्हंजी भरश्ताचार एकदम पक्का वादा अजिबात दिरंगाई नाई बगा आणि तुमी कसलं सांगून ऱ्हायला मी असा गोळ्यांचा मुकाबला केला नि दगड नि धोंडे !
    अवो पाच पन्नास रुपये दिले कि चक्क बोर्डर आरामात पास करता येत्ये बगा ,अगदी सिगारेटचे झुरके मारत जायचं असेल तर थोडे जास्त
    असं कसं , अवो त्यानाबी पोट आहेतच की आपण नाव देतो येगळी येगळी हा बांगला देशी हा तमिळी आणि हा काश्मिरी काहीतरी खुळ्यासारख बोलत बसायचं टाईम पास म्हणून आणि लोकाना एड करत बसायचं त्याना काय खर वाटणार व्हय की हा बाबा जाफ़नाला जाउन आला म्हणून ?
    गप शांत झोपावं तर ते न्हाई सारखी पिरपिर चालूच , घरी काय करत असेल देवाला माहिती
    संजय पाटील आणि
    अनुज बारामती

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...