Sunday, September 14, 2014

मानवी इतिहासात.....

मानवी इतिहासात असे अनेकदा घडले आहे कि विशिष्ट विचारधारा लादण्यासाठी शासन यंत्रणा
राबल्या आहेत. मानवी समग्र हितापेक्षा त्यांनी आपापल्या विचारधारांना महत्व देत सर्व साधने वापरत, कधी छुपे तर कधी उघड प्रयोग करत नागरिकांना गुलाम करायचा प्रयत्न केला आहे. जे होत नाहीत त्यांना ठार मारणे, तुरुंगांत टाकणे, सैबेरियात सडवणे ते सरसकट कत्तली करणे असे उपाय राबवले आहेत. फ्रांसने "स्वातंत्र्य-समता-बंधुता" या महनीय मुल्यांचा उद्घोष केला. लोकशाहीची परम-मुल्ये विकसीत झाली. असे असले तरी हुकूमशाह्यांचे आकर्षण असलेले समाज पुर्वीही होते आणि आजही सर्वत्र आहेत. किंबहुना रानटी मानवी लांडग्यांनी माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा वारंवार चंग बांधला आहे. कधी ते यशस्वी होतात तर कधी अयशस्वी. पण म्हणून प्रवृत्ती संपत नाहीत आणि अखिल जगताच्या मानव-कल्याणातील ते अडसर मात्र बनून जातात.
मानवतेच्या, मानवी समाजाच्या हितांच्या चौकटीत जेंव्हा कोणाचे स्वातंत्र्य नाकारले जात असेल वा तसे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव आणले जात असतील, येत असतील तर मग स्वातंत्र्य कोठे राहिले?
वैचारिक. धार्मिक, सांस्कृतीक, राजकीय, आर्थिक...कोणत्याही प्रकारचे का होईना...जेही घटक गुलामी लादण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचा मुक्त कंठाने निषेध करता यायला पाहिजे. तोच समाज प्रबळ...सबळ आणि करुणामय होतो.
रविंद्रनाथ टागोर म्हणतात...
Where the mind is without fear
and head is held high
आम्हाला असा समाज निर्माण करायचा आहे!

4 comments:

  1. बस ऐसी आजादी वेदप्रताप वैदिक को नहीं हो. आपकी आजाद दुनिया में उन्हें सिर्फ इस बात की सजा दी जायेगी कि वे एक दुश्मन देश के आतंकवादी से क्यों मिले लिए.
    अभिव्यक्ति की आजादी सभीको हो पर आपको पूछ कर.
    वाह साहब वाह! ऐसी आजादी की सशर्त दुनिया आपको मुबारक..
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
    Replies
    1. Every one has "right to criticize" as well...you are conveniently forgetting this!

      Delete
  2. इथे लक्षात घेण्यासारखे मोठे निरीक्षण आहे कि परकीय आक्रमणे झाल्यावरच देशात विषमता वाढू लागली आहे. कारण प्रत्येक परकीय आक्रमणात मोठी लुट, कत्तली होत गेल्या. शिवाय परकीय आक्रमक देशावर लादले गेले. येणाऱ्या प्रत्येक अपयशात न लढणाऱ्या गटाचे महत्व कमी होत गेले. कारण प्रत्येक समाज हा एक संघ (टीम) सारखा असतो प्रत्येकाचे योगदान यश अपयशात गरजेचे असते. त्याउलट आक्रमण करणारे समाजाने एकसंध होते. हेच खरे विषमतेचे कारण आहे.

    ReplyDelete
  3. tumacha ISIS la pathimba ahe ka? kadhi tya viruddha ihitana aadhalala nahit mhanun vicharale.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...