Monday, April 18, 2016

साम्यवाद....

इस्लाम, ज्यू, ख्रिस्ती हे सारे धर्म मुळत सेमेटिक मुळाचे/ तत्वज्ञानाचे आहेत. कम्युनिज़मही याच तत्वज्ञानाचे वर वर विरोधी वाटणारे पण अंतर्यामी समान सूत्र असणारे रूप आहे. हे सारेच तत्वज्ञान मुळात हिंसेच्या पायावर उभे आहे. युरोपियनांनी (ख्रिस्ती धर्म असुनही) सेमेटिकांशी सांस्कृतिक नाळ तोडण्याचा जो प्रबोधनकाळात अचाट उद्योग केला, ज्यासाठी आर्यवादही जन्माला घातला, त्याची विकासवादी फळे युरोपियनांना मिळाली. या आर्यवादातून युरोपात मोठे, हिटलरसारखे, अपघातही झाले. पण सेमेटिक मानसिकतेतून बाहेर पडण्याचा त्यांना फायदाही झाला.

साम्यवाद हाच मुळात अनैसर्गिक आहे. किंबहुना सेमेटिक आनुवांशिकीय मानसशास्त्राचा तो मोठा दुर्गुण आहे. साम्यवादी किती ढोंगी असतात (अपवाद क्षमस्व) हे जगभर पहायला मिळते. ज्युंचे शिर्कान जेवढे हिटलरने केले नाही तेवढे साम्यवादी रशियाने केले. विचारवंत-चळवळ्यांच्या किती हत्या केल्या ते आजही जगाला फारसे माहीत नाही. सैबेरियात तर अगणित सडले.

इस्लाम ज्या परिस्थितीत निर्माण झाला ती परिस्थिती वेगळी होती हे मान्य केले तरी इस्लामवर ज्यू तत्वज्ञानाचा प्रभाव स्पष्ट आहे. कम्युनिझमवरही ज्यू तत्वज्ञानाचा प्रभाव स्पष्ट आहे, पण ज्युंनी साम्यवादाला कधी विशेष जवळ केले नाही. नैसर्गिक अशा भांडवलशाहीचा हात धरत त्यांनी प्रगती साधली. साम्यवाद हा भुलावा आहे. शेतकरी-कष्टक-यांना त्यांच्या अंगभूत भांडवलाला अर्थव्यवस्थेचा सक्षम वाटेकरी बनवण्याऐवजी, त्यांना दुस-याचा वाटा कसा हडपता येईल हे भ्रामक सांगणारी ही व्यवस्था आहे. गरीबाला गरीबच ठेवणारी ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था कोणाला कसलीही उत्थानाची आशा देत नाही. बाबासाहेबांचा बौद्ध धर्मावरही असाच (वेगळ्या परिप्रेक्षात आक्षेप होता.)

इस्लामही मध्ययुगीन मानसिकतेला चिकटून राहणे पसंत करतो. टो्ळी जीवनातील हिंसक व विषमतामुलक मुलतत्वे आज कुचकामी आहेत हे त्यांना समजत नाही. ते पाश्चात्य प्रगत जगाला आव्हान शस्त्रांनी नव्हे तर मुळ अरबांच्या ज्ञानपिपासू वृत्तीतुनच देवू शकतात हे त्यांना समजत नाही. अरबस्तान एके काळी भारत व पश्चिम यातील ज्ञानाचा मध्यबिंदू होता. आज तो हिंसेचा केंद्रबिंदू बनला आहे. याची खरे तर इस्लामियांना शरम वाटायला हवी. पण भारताला धोका जेवढा साम्यवाद्यांचा व माओवाद्यांचा आहे तेवढा पाकिस्तान-बांगला किंवा ओवेसीचाही नाही हे मी स्पष्ट नमूद करतो. आणि हे वैदिकवादी किंवा सावरकरवादी या वास्तवाचा गैरवापर करत स्वत:च्या हिंसक मनोवृत्तीचे क्षोभ निर्माण करत असतील तर त्यालाही विरोध आहे. या सर्व विचारधारांच्या पार जावून जागतिक आणि सामाजिक स्थितीचे अवलोकन करावे लागेल. धोका एकाचा अथवा फक्त दुस-याचा असा नाही. धोके चारी बाजुंनी आहेत.

हे म्हणतात, इस्लामची चिकित्स का करत नाही...मी म्हणतो...अमेरिकेची का करत नाही? जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र तर ते आहे. नरसिंह रावांबाबत मला आदर वाटतो कारण अमेरिकन संसदेत त्यांनी अमेरिकनांना भारत-पाक प्रश्नाबाबत बोलतांना सुनावले होते कि मुळ अमेरिकन (रेड इंडियन) यांचा समुळ विनाश करुन त्यांची भूमी बळकावणा-या उपटसुंभ अमेरिकनांना इतर राष्ट्रांच्या न्याय्य अधिकारांबाबत बोलायचा अधिकार काय? मीही २००२ मद्ध्ये अमेरिकन रेडियोवरून दोन मुलाखतीत अमेरिका हेच जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र आहे असे म्हटले होते. खरे तर मुलाखतकर्त्याला मी पाकिस्तानचे नांव घेईल असे वाटले होते.

मला वाटते आपण सारे दांभिक झालो आहोत व सोयीचे शत्रु शोधतो आहोत. साम्यवाद हा जगाला लागलेला काळा भावनिक धब्बा आहे हे मान्य करत असतांनाच इतरही ढोंगी, दांभिक आणि हिंसक मनोवृत्तींच्या सर्वच विचारधारांचा कठोर विरोध केला पाहिजे. हा मार्ग लोकप्रियतेचा नाही. स्वत:च स्वत:चे वाचक राहिलो तरी चालेल...पण हा विरोध होत राहिलाच पाहिजे.

4 comments:

  1. utrkrushta lekh... Tumhi mhanta tase sarvat jasta dhoka Samyawadi kivha Naxalwadyankadun aahe.. Pan Savarkarwadi kivhan vaidikvadi Pakistanla (Islam cha) dhoka sarvat jasta mantaat, tyat agdi kahi chuk nahi.. Aajwar Islami atirekyanchya haatat anu bomb padlela nahi mhanun tey Samyvadyanpeksha soumya vatat astil.. Pan jya divashi to tyanchya haati padel, tya devshi, vinash atal aahe...

    - Milind

    ReplyDelete
  2. America dashatwadi rastra aahe hey 100% khare aahe, pan America ni sakaratmak kivhan vidhayak kaame kelyache khup udaharane deta yetil.. Heech goshta Islami rashtranbabat kivha Islamic rajyakartyanbabat mhanta yenar nahi.

    - Milind

    ReplyDelete
  3. साम्यवाद वाईट कसा हे अधिक स्पष्ट करायला हवे, नुसते वाईट म्हणून वाईट होत नसते

    ReplyDelete
  4. आपण Ian Rand वादी आहात का ? स्टालिन बद्दल आपले काय मत आहे ?

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...