Tuesday, March 6, 2018

स्वातंत्र्याचा उद्गार....

मी आनंदी आहे
माझ्यामागे कोणतीच
संघटना नाही
मी समाधानी आहे
माझा कोणताही कंपू नाही
मला वाट नसते कधी पहायची
कोण माझ्या बचावाला येईल
आणि कोण मला बचावाला बोलावेल
मीच माझा बचावक आहे
आणि वाटते तेंव्हा न बोलवताही
जातो बिनदिक्कत कोणाच्याही बचावासाठी
माणूसकी एकाकी पडू नये म्हणून...!

मी सर्वसुखी आहे
कारण मी कोणाला शत्रू मानत नाही
आणि मित्रांकडूनही कधी अपेक्षा ठेवत नाही
म्हणून!
मी निरंतर आक्रोशणा-या आकाशात
झेपावलेला
चिरंतन पक्षी आहे
सा-या जगाची वेदना इवल्या काळजात साठवत
स्वातंत्र्याचा उद्गार
मानवजातीच्या काळजात उमटावा
म्हणून!

No comments:

Post a Comment

आज वेळच तशी आली आहे म्हणुन....

आज वेळच तशी आली आहे म्हणुन बोलणे भाग आहे. मी मोहन भागवत अथवा आसारामबापुच्या विधानांवर प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न मला काही मित्रांनी...