Sunday, May 24, 2020

रामजन्मभुमीवर मंदिराचे अवशेष?


Ram Mandir | Ancient idols, pillars and Shiv Ling found in Ayodhya ...


Zafaryab Jilani | Zafaryab Jilani calls findings at Ram Mandir ...

रामजन्मभुमी सपाटीकरणातील शोध आणि माझे आत्ताचे निरिक्षण-
१. रामजन्मभुमीच्या ठिकाणी राम मंदिर निर्माण कार्य करण्यासाठी जमीनीचे समतलीकरण करतांना काही नक्षीयुक्त स्तंभ आणि शिवलिंगाकार पाच फुट उंचीचा नक्षीदार स्तंभ मिळाल्याची बातमी आहे. सपाटीकरणाच्या कामात हे अवशेष मिळालेत म्हणजे ते फार खोलवर गाडले गेलेले नसावेत.
२. अयोध्येला ब्रिटिशकाळापासुन पुरातत्वीय सर्वेक्षणे व उत्खनने सुरु झाली. त्यात अयोध्येला असंख्य हिंदू व जैन मंदिरे आणि बौद्ध विहार-स्तुपांचे अवशेष असल्याचे उजेडात येत गेले.
३. बी. बी. लाल यांनी बाबरी मशिदीच्या जवळ अकराव्या शतकातील स्तंभांचे पाये सापडले असल्याचा अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयाला सादर केला होता तो त्यांच्या १९७४-७५ च्या उत्खननांवरुन.
४. २००३ साली पुरातत्व विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन बाबरी मशीदीच्या ठिकाणी उत्खनन केले. त्यात बाबरी मशिदीच्या जागी पुर्वी एक विशाल बांधकाम होते असा निष्कर्ष काढण्यात आला होता. पण ते स्थान मंदिरच होते असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाही. विशेष म्हणजे या उत्खननात एक अरेबिकमध्ये कोरलेला एक लेखही सापडला होता तसेच कमळ, कौस्तुभ, मकराकृती कोरलेयाही सापडल्या होत्या. ख्रिस्तपुर्व १००० ते अकरावे-बारावे शतक या काळातील विविध वस्तु तेथे मिळाल्या. बारावे शतक ते सोळावेे शतक या कालात मात्र तेथे कसलेही बांधकाम असल्याचे आढळून आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभुमीबाबत निवाडा देतांना याचा विशेष उल्लेख केलेला आहे.
५. आता प्रश्न असा पडतो की, इतक्या पुरातन स्तरांपर्यंत जेथे उत्खनन झाले आहे त्या ठिकाणी हे जवळपास बारा स्तंभ आणि शिवलिंगसदृष्य पाच फुट उंचीचा स्तंभ व तोही वरच्या स्तरात कोठून आले? पुरातत्व खात्याला आणि तत्पुर्वीही ज्यांनीही उत्खनन केले त्यांच्या नजरेतुन हे कसे सुटले?
६. या स्तंभांवरील नक्षी, यक्ष-यक्षीणींच्या (वा रुपसुंदरींच्या) प्रतिमा आणि कमलाकृती व त्यांच्या घडणीतील व शैलीतील सफाई पाहता त्या चारेकशे वर्षांपेक्षा जुन्या वाटत नाहीत. त्या कोणी भग्न केल्या आहेत असे तर मुळीच वाटत नाही. एखादे पुरातन मंदिर/वास्तू निसर्गत: भग्न झाल्यावर जे स्वरुप येऊ शकेल तसे या स्तंभ/प्रतिमादिंचे स्वरुप उपलब्ध केलेल्या छायाचित्रांवरुन दिसते.
७. हे अवशेष सापडल्याचा दावा केला आहे तो श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी. हे अवशेष सापडलेत ते म्हणे टाळेबंदीच्या काळात सपाटीकरण करण्याचे काम करंणा-या कारागिरांना. जे पुरातत्व खात्याच्या सुसज्ज टीमला इतकी वर्ष सापडले नाही त्यांना हे अवशेष सापडलेे असा दावा करायला संघाला सवयीने सहज शक्य असले तरी जोवर पुरातत्व तज्ञ या दाव्याचे परिक्षण करत नाही तोवर काही अंदाज बांधु नये. कारण मुळात हे अवशेष सापडल्याच्या दाव्यावरच विश्वास ठेवावा की नाही ही शंका दावाकर्त्यांनीच निर्माण केली आहे.
-संजय सोनवणी

काफिर कोण होते?

१) पैगंबरंच्या दृष्टीने Non believer  काफिर  कोण होते? हा खरा प्रश्न आहे. सर्वप्रथम ते काफिर ज्यू होते आणि त्यात ख्रिस्चनांची भर पडली. ते का काफिर ठरले? कारण ज्यू हेच आपले प्रथम अनुयायी होतील असे पैगंबरांना वाटले होते. मुळात इस्लाम हा ब-यापैकी ज्यू धर्मतत्वांच्या निकटचा आहे. "अल्लाह" हा शब्द ज्यूंच्याच "एल - अल" या शब्दांतुन निर्माण झाला आहे. अल्लाह हा अरब जगताला इस्लामपुर्व काळापासुन माहित होता. पण ज्युंनी पैगंबरांचे प्रेषितत्व नाकारले आणि ज्यू शत्रू (काफर) झाले. ख्रिस्ती धर्मही ज्युंचीच पडछाया असल्याने तेही काफर. त्यात जेरुसलेमच्या धर्मस्थळावरून काही शतके क्रुसेडस झाली. त्यात हे वैर वाढत गेले. याचा हिंदू धर्माशी कधीही संबंध नव्हता.

२) अरब, ज्यु हे वाळवंटी प्रदेशातील रहिवासी. टोळ्यांत राहणारे. स्वाभाविकच त्यांच्यात पाणी, अन्न आणि स्त्री यावरुन आपापसात झगडे होत राहणे अपरिहार्य होते. तत्कालीन टोळीजीवनातील आवेश, हिंसकता याचे प्रतिबिंब धर्मतत्वांत पडणे स्वाभाविक आहे. उदा. वैदिक धर्मही टोळीजीवनातुनच निर्माण झाला. त्यातही परधर्मियांबद्दल पुरेपुर अनास्था, हिंसकता, लुटींचे समर्थन आहे. हवे तर वेद पुन्हा वाचुन घ्या. वैदिकांचा मुख्य देव इंद्रही युद्धायमान असाच आहे. धर्म हा परिस्थितीचे अपत्य असतो.

३) आपण आज मुस्लिम राष्ट्रे हा शब्द बिनदिक्कत वापरतो, पण अमेरिका ते युरोपातील राश्ट्रांना "ख्रिस्ती राष्ट्रे" हा शब्द वापरत नाही. बव्हंशींचा तो अधिकृत धर्म असुनही. आणि युरोपिय राष्ट्रांनी एखाद्या ख्रिस्ती राष्ट्रावर एकत्र येत हल्ला चढवल्यचे उदाहरण नाही. इराकबद्दल ते का हे लक्षात घ्यायला हवे.

४) ख्रिस्त्यांना ज्युंबद्दल प्रेम आहे म्हणून नव्हे तर मुस्लिम राष्ट्रांवर सातत्याने कुरघोडी करायची आहे म्हणून. पाकिस्तानला अमेरिकेने त्यासाठीच "पाळले" आहे. हिंदु राष्ट्रावर वचक रहावा म,हनून हे आम्ही कधीही लक्षात घेत नाही.

५) दहशतवादाबत्द्दल म्हणाल तर प्रत्येकाने बायबल (विशेषत: ’जुना करार") वाचायलाच हवे. हिंसेची मुलतत्वे त्यात, जेवढी कुराणमद्ध्ये आहेत, तेवढीच दिसून येतील.

६) आद्य आत्मघातकी दहशतवाद ज्युंनी शोधला, दुस-या शतकापासून निरलसपणे वापरला. फार कशाला अलीकडेच लिट्टॆला आत्मघातकी दहशतवादाचे धडे देणारे ज्यूचे मोसादच होते.

७) अरबी राष्ट्रे, (जी आज मुस्लिम आहेत), ख्रिस्ती (जे आज बव्हंशी युरोपियन नि अमेरिकन खंडीय आहेत) आणि अल्पसंख्य पण व्यापारी वृत्तीचे ज्यू हा तिढा अरबांच्याच भुमीवर निर्माण झाला आहे. मुस्लिम राष्ट्रे सरळ युद्धात ख्रिस्ती राष्ट्रांशी आणि ख्रिस्ती-सपोर्टेड ज्युंशी सरळ लढ्यात जिंकु शकलेले नाहीत आणि जिंकण्याचे सुतराम शक्यता नाही. जगतील सर्व महत्वाची माध्यमे ख्रिस्त्यांच्या हाती आहेत. अरबी माध्यमांची विश्वासार्हता एक तर प्रश्नांकित तरी आहे आणि त्यांचा रीचही जास्त नाही. त्यामुळे मुस्लिमांना दहशतवादाचा आश्रय (त्यंच्या दृशःतीने तो गनिमी कावा) घेतल्याखेरीज गत्यंतर काय? अमेरिका हे जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र आहे हे मी खुद्द अमेरिकेतच जाहीर मुलाखतीत म्हणून आलोय. केवळ आर्थिक कारणांसाठी जग त्यांचे पोलिसिंग सहन करत असेल तर जागतिक समुदायांनी विचार करायला हवा.

८) भारतातील मुस्लिम हे बव्हंशी याच भुमीचे, कृषी संस्कृतीचे नागरिक आहेत, टोळी संस्कृतीचे नाहित. अरबी-इराणी मुस्लिम समाज आणि भारतीय मुस्लिम समाजाला एकाच तागडीत तोलने योग्य नाही. सर्वात अधिक मुस्लिमच सुफी, वारकरी, वैष्णव संत भारतात झालेले आहेत हे वास्तव नजरेआड करुन चालणार नाही.

९) युरोपियनांना सेमेटिकांशी नाळ एकोणिसाव्या शतकापासुनच तोडायची होती. हिटलरचा थिंक ट्यंक रोझेनबर्ग म्हणतो, गो-या युरोपियनांचा आणि सावळ्या सेमेटिकांचा भाषिक/वांशिक आणि सांस्कृतिकही संबंध नाही. मुळात आर्य सिद्धांत आणि नंतर इंडो-युरोपियन सिद्धांत जन्माला घातला गेला कारण युरोपियनांना आपल्या संस्कृतेचा इतिहास पुर्वेकडे शोधायचा होता. आधी भारत नि चीन हे स्पर्धेत होते, पण नंतर त्यांनी  याही स्थानांना नाकारत नवी मुलस्थाने शोधायला सुरुवात केली. दुर्दैवाने (अस्तित्वातच नसल्याने) गेल्या दोनशे वर्षांतही असे कोणतेही मुलस्थान त्यांना सापडलेले नाही.

१०) पण याच सिद्धांतामुळे येथील वैदिकांना युरोपियन (पक्षी ख्रिस्ती) जवळचे वाटतात कारण त्यांच्या सिद्धांतामुळे जेवढे युरोपियनांचे वर्चस्वतावादी धोरण अंगिकारता येते तेवढेच स्वमाहात्म्यही गाजवता येते. ज्युंबद्दलचे वैदिकांचे प्रेम हे केवळ आणि केवळ मुस्लिमांवर दबाव बनवून आहेत म्हणून आहे, अन्य काही हेतु नाही.

११) थोडक्यात ख्रिस्ती विरुद्ध अरबी (सेमेटिक) इस्लाम या संघर्षात वैदिकजन अकारण मुर्खपणाच्या वर्चस्वतावादी भावनेतुन पडले आहेत.

१२) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, या संघर्षाचे आकलन नसलेले भारतीय मुस्लिम, केवळ धर्मभावनेने प्रेरीत होत अरबी मुस्लिम/ख्रिस्त्यांच्या संघर्षात "जणु आपलेच नाक कापले गेले" या भावनेतून पाहतात तेही मुर्खपणाचे आहे. प्रत्येक मातीचे संघर्ष वेगळे असतात, धर्म कोणतेही असोत. आज अरबस्तानात अगदी इस्लामहुन अधिक शांततामय धर्म असता तरी संघर्ष हाच राहिला असता.

१३) युरोपियन पक्षी आजचे ख्रिस्ती हे वंशवादी होते आणि आहेत. (अपवाद क्षमस्व) त्यांना जेरुसलेमच्या सेमेटिक येशु ख्रिस्तानेच ख्रिश्चन धर्म स्थापन केला याशी काही घेणेदेणे नाही. खरे तर सुळावर जाईपर्यंत येशू हा ज्यूच होता हे वास्तव लक्षात घेतले जात नाही. ख्रिस्ती राष्ट्रांनीच ज्यूंची जास्त हत्याकाडे केली, हकालपट्ट्या केल्या (भारत सोडून) अन्याय केले हे ज्यु विसरले असतील असे समजू नका. भविष्यात ज्यू विरुध ख्रिस्ती हा संघर्ष पेटला तर मला आश्चर्य वाटणार नाही., पण सध्या मुस्लिम हा दोघंचा शत्रू आहे आणि त्याचे परिणाम अरबांच्याही नृशंसपणातुन दिसत आहेत. किंबहुना अरब राष्ट्रांवर अंतिम चाल करण्याची पुर्वतयारी सुरु आहे. आज जाहीरपणे अरबांची (म्हणजेच अरबी मुस्लिमांची) बाजु घेण्याची हिम्मत कोणी दाखवण्याची शक्यता नाही कारण त्यांनाही या संघर्षाचे आकलन आहे काय हा खरा प्रश्न आहे.

१४) भारतीय मुस्लिमांनी आणि हिंदुंनीही (वैदिक सोडून, कारण आता वैदिक बांधव मला काय उपदेश करायला येणार आहेत याची मला पुरती जाणीव आहे.) कसल्याही स्थितीत, अरब मुस्लिम राष्ट्रे असोत कि ख्रिस्ती राष्ट्रे, यांच्या जागतीक, ऐतिहासिक संघर्षातून, हिंसाचारातुन वेगळे अर्थ काढत आपापसात तेढ् माजवु नये. भारतीय मुस्लिमांनी आयसिस अथवा तालिबान किंवा कोणीही, या संग्फ़्ह्रषात सामील कोणतेही ख्रिस्ती राष्ट्र व त्यांच्या कारवाया करणा-या अमानवी संघटनांना किंवा सैन्यांना (सैन्य अनेकदा दहशतवाद्यांसारखे वापरले जाते) यदाकदाचितही सहानुभुती दाखवत आपापसात तेढ माजवायचे प्रयत्न करु नयेत. 

Thursday, May 14, 2020

गांधी, नेहरू आणि आंबेडकर

गांधी, नेहरू आणि आंबेडकर हे विसाव्या शतकातील महान माणसे होती यात शंका असण्याचे कारण नाही. या तिघांना एकत्र करुन वैचारिक व्युहनीती बनवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात. ही माणसे महान असली तरी त्यांच्यात व्यक्तीसापेक्ष वैचारिक भेदांच्या भिंतीही होत्या. बरे, या तिघांकडून परिस्थितीसापेक्ष विसंगत वर्तने झालेली नाहीत असेही नाही. त्यांचा आजच्या परिप्रेक्षातून अर्थ लावणे हेही विसंगत आहे. आणि तिघांच्या एकत्रीकरणातून सर्वस्वी नवीन अशी विचारधारा जन्माला घालता येईल असा विचार कोणी करत असेल, तर त्याचे ते स्वातंत्र्य मान्य करुनही, ते निष्फळ ठरेल असे माझे मत आहे. वरील प्रत्येक महनीयासमोरील समस्या, आव्हाने आणि त्यांना तोंड देण्यासाठी त्यांची तयार झालेली मनोभुमिकांचा स्वतंत्रपणेच आज विचार करावा लागेल.

प्रसिद्ध पत्रकार संजय आवटे आणि प्रा. हरी नरके यांच्यात गांधी, नेहरू आणि आंबेडकरांबाबत चर्चा झाली ही चांगली बाब असली तरी या चर्चेतील संजय आवटे यांची भुमिका "आशय प्राधान्याची" असल्याचे दिसते तर प्रा. नरके यांची भुमिका "तथ्यात्मकतेची" दिसते. मुळात भुमिकांतच अंतर पडल्याने चर्चेत फारसे तार्किक काही बाहेर पडण्याची शक्यता नाही. अभ्यासक आणि भावनीक विचारवंतांचे दृष्टीकोण वेगळे असु शकतात आणि मतिआर्थही तसेच आगळेवेगळे असु शकतात. पण वास्तव हे आहे की या तीन व्यक्तीत्वांची एकत्र वैचारिक मोट बांधण्याचा प्रयत्न सामाजिक दृष्ट्या वरकरणी स्तुत्य वाटला तरी मुळच्या विसंगतींचा निर्वाह त्यातुन लागणे शक्य नाही एवतेव तसा प्रयत्नही अयशस्वी होईल असे मला वाटते.

प्रा. नरकेंनीच दाखवुन दिल्याप्रमाणे आंबेडकर आणि नेहरु-गांधींत समन्वयाचे मुद्दे कमी आणि विसंवादाचेच अधिक होते. कारणे काहीही असोत. खुद्द नेहरु आणि गांधींतही समन्वय किती आणि विसंवाद किती याचा भावनीक न होता शोध घेतला तर हाती लागते ते फार आल्हाददायक असते असे नाही.

ही महान माणसे होती व त्यांनी आपल्या मतभेद/स्वभावभेदासह भारत उभारण्यासाठी आपापल्या प्रतिभा पणाला लावल्या याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञच राहिले पाहिजे. त्यांचा विचार करतांना मात्र स्वतंत्रपनेच करत त्यांचे मुल्यमापण करणे न्याय्य असेल, मोट बांधून काही उपयोग नाही असे माझे मत आहे. आणि तसेच करायचे असेल तर मग संघप्रणित समरसता मान्य करायला काय हरकत आहे?


मला वाटते, वैचारिक किंवा सैद्धांतिक वाद घालत असतांना व्यक्तीगत मैत्रीचे संदर्भ देणे गैरलागू आहे. चर्चा मुद्द्यांवरच व तथ्यांवर आधारित असायला हवी. प्रा. नरके यांनी त्यांच्याकडील पुरावे दिलेले आहेत. प्रतिपक्षानेही आपले पुरावे भावनिक न होता देत विरोधी पुराव्यांना खोडून काढायला हवे किंवा वादातुन अंग काढून घ्यायला हवे. गांधी, आंबेडकर, नेहरु किंवा कोणीही महनीय संपुर्णपणे योग्य आहे किंवा अयोग्य आहे असा स्वत:चा समज पुराव्यांमधुन दिसणा-या वास्तवावर लादत आपली मते मांडली तर विभुतीपुजक/भंजक आणि अभ्यासकांत फरक राहणार नाही आणि मला वाटते विचारी महाराष्ट्राचे हे काही केल्या लक्षण म्हणता येणार नाही. प्रा. नरकेंनी मुद्देसुद वास्तवे मांडली आहेत. विचारवंत त्यातून कोणी हवा तो मतितार्थ काढू शकतील किंवा तथ्येही ठोकरुन लावत स्वानुकुल तथ्यांची निर्मिती करु शकतील. तो ज्याच्या त्याच्या सामाजिक दृष्टीकोणाचा प्रश्न आहे. 

संघवादी लोक तथ्यांचे शेवटी काय करतात हे आपण आजकाल पाहतच आहोत. पुरोगामी गोटाकडूनही वेगळ्या प्रकारे शेवटी तसेच घडणार असेल तर पुरोगामी या शब्दाची व्याख्या बदलावी लागेल. किंबहुना महाराष्ट्राच्या एकुणातीलच वैचारिकतेचा जो पराभव होतांना दिसतो आहे त्याच्या मुळ कारणांचा शोध घेणे आणि सामाजिक तत्वज्ञान आणि गतपिढ्यांनी आपल्यासाठी सोडलेला वारसा यांची नव्याने अभ्यास करुन नवी मांडणी करण्याची आवश्यकता वाटते. कोणा महनियांची एकत्र मोट बांधायचीच असेल तर काही अपरिहार्य विसंगतीही उत्पन्न होणारच. त्यांचा निर्वाह लावावा लागेल पण विसंगतीच नाहीत असा दावा कोणी केला तर तो काही केल्या वैचारिक पाया सुदृढ होऊ शकणार नाही हे आपल्याला गृहित धरावे लागेल. हे लेखन मी केवळ या वर्तमान वादामुळे करत नाहीय तर जे आपलेच समाज-विचारवास्तव सातत्याने समोर येते आहे त्यातून करत आहे.

* * *

मला वाटते, वैचारिक किंवा सैद्धांतिक वाद घालत असतांना व्यक्तीगत मैत्रीचे संदर्भ देणे गैरलागू आहे. चर्चा मुद्द्यांवरच व तथ्यांवर आधारित असायला हवी. प्रा. नरके यांनी त्यांच्याकडील पुरावे दिलेले आहेत. प्रतिपक्षानेही आपले पुरावे भावनिक न होता देत विरोधी पुराव्यांना खोडून काढायला हवे किंवा वादातुन अंग काढून घ्यायला हवे. गांधी, आंबेडकर, नेहरु किंवा कोणीही महनीय संपुर्णपणे योग्य आहे किंवा अयोग्य आहे असा स्वत:चा समज पुराव्यांमधुन दिसणा-या वास्तवावर लादत आपली मते मांडली तर विभुतीपुजक/भंजक आणि अभ्यासकांत फरक राहणार नाही आणि मला वाटते विचारी महाराष्ट्राचे हे काही केल्या लक्षण म्हणता येणार नाही. आपण मुद्देसुद वास्तवे मांडली आहेत. विचारवंत त्यातून हवा तो मतितार्थ काढू शकतील किंवा तथ्येही ठोकरुन लावत स्वानुकुल तथ्यांची निर्मिती करु शकतील. तो ज्याच्या त्याच्या सामाजिक दृष्टीकोणाचा प्रश्न आहे. संघवादी लोक तथ्यांचे शेवटी काय करतात हे आपण आजकाल पाहतच आहोत. पुरोगामी गोटाकडूनही वेगळ्या प्रकारे शेवटी तसेच घडणार असेल तर पुरोगामी या शब्दाची व्याख्या बदलावी लागेल. किंबहुना महाराष्ट्राच्या एकुणातीलच वैचारिकतेचा जो पराभव होतांना दिसतो आहे त्याच्या मुळ कारणांचा शोध घेणे आणि सामाजिक तत्वज्ञान आणि गतपिढ्यांनी आपल्यासाठी सोडलेला वारसा यांची नव्याने अभ्यास करुन नवी मांडणी करण्याची आवश्यकता वाटते. कोणा महनियांची एकत्र मोट बांधायचीच असेल तर काही अपरिहार्य विसंगतीही उत्पन्न होणारच. त्यांचा निर्वाह लावावा लागेल पण विसंगतीच नाहीत असा दावा कोणी केला तर तो काही केल्या वैचारिक पाया सुदृढ होऊ शकणार नाही हे आपल्याला गृहित धरावे लागेल. हे लेखन मी केवळ या वर्तमान वादामुळे करत नाहीय तर जे आपलेच समाज-विचारवास्तव सातत्याने समोर येते आहे त्यातून करत आहे.

Saturday, May 9, 2020

टाळेबंदीचे तात्काळ उच्चाटण करावे

जेंव्हाही सरकारचे मर्जी होईल तेंव्हा बंदी उठेल...पण भविष्यासाठी तातडीने काही धोरणात्मक बदल करावेत. हे अपेक्षित बदल असे-
१. व्यवसाय, उद्योगधंदे यांच्या स्थापनेपासुन चालवण्यापर्यंतचे जेही सरकारी नियम आहेत ते किमान करुन त्यात सुलभपणा आणणे.
२. विदेशी गुंतवणुक व भांडवल बाजाराबाबत प्रोत्साहक व वेगवान निर्णयप्रक्रिया असेल असे गुंतवणुक स्नेही धोरण अंमलात आणणे. सरकारची नको ती लुडबुड आणि कागदोपत्री अडथळे समुळ दुर करणे.
३. शिस्तबद्ध विकेंद्रीकरणाचे धोरण आखून कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात विशिष्ट मर्यादेनंतर कोणत्याही नव्या उद्योगास अनुमती न देणे.
४. शेती, पशुपालन आणि मत्स्योद्योगात उदारीकरण आणुन आयात-निर्यातील हस्तक्षेप पुर्ण बंद करुन देशांतर्गत बाजारपेठ बंधमुक्त करणे.
४. सरकारने सर्व अविकसित, अर्धविकसित भागांत मजबुत पायाभुत सुविधांची उभारणी करुन देणे.
५. आरोग्य व शिक्षणातील गुंतवणुकीचे प्रमाण किमान १०% पर्यंत वाढवणे.
६. भुमीहीन शेतमजुर, भटके-विमुक्त आणि असंघटित श्रमिक-मजुरांसाठी सर्वकश विकासभिमुख राष्ट्रीय धोरण असलेले केंद्रवर्ती महामंडळ स्थापन करुन शहरनिहाय स्वातंत्र्य असलेली उपमहामंडळे स्थापन करुन त्यांना तातडीने कार्यरत करणे. स्थानिक पातळीवर सर्वांची नोंद ते त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृतीशील कार्यक्रम असणे आणी त्यासाठी भक्कम आर्थिक तरतुद करणे.
सरकारने आपले लक्ष नको तेथे अधिक घालुन वेळ, पैसा आणि संभाव्य विकासात अडथळे आणण्यापेक्षा अत्यावश्यक कामातच दखल देणे आता अत्यावश्यक झाले आहे. थाळ्या-टाळ्या, जगातील (नसलेल्या) सन्मानाच्या वल्गना करत देशावर लायबिलिटी बनायचे प्रयत्न आता सत्ताधा-यांनी थांबवावे व मुर्खांच्या नंदनवनातुन बाहेर पडावे.
वरील गोष्टी केल्यास शेती ते उद्योगांची भरभराट होईल आणि नको तो सरकारी वाया जाणारा खर्च बंद होऊन पायाभुत सुविधा ते आरोग्य-शिक्षणावर खर्च करण्यासाठी तिजोरीत पैसा उपलब्ध राहील.
आणि शेवटचे, अजुनही थोडे भान असेल तर टाळेबंदीचे तात्काळ उच्चाटण करावे. लोकांचे जीव वाचवण्याच आव आणत लोकांना मृत्युच्या मुखात ढकलू नये!

Wednesday, May 6, 2020

Jain system and Moral Education

Ralph Waldo Emerson, a famous educationist of the 19th century had said, “The things taught in schools and colleges are not an education, but the means to an education.” From ancient times it has been considered that education without a solid base of morals is meaningless. Our present education system is marred by the mark system instead of the pupil's understanding of the subject. This system does not stress upon the amelioration of the curiosity so that the student will earn expertise in the field of his liking and will explore further to add to the branch of knowledge he is in. Indeed we can see that the curiosity of the student is suppressed forcing him to be bound to the curriculum. Freeing the students from the yoke of the orthodox education system is indeed needed in our country and let us hope that soon the necessary reforms will take place.
Moral education forms an important part of the education to make the student pro-society in which he lives in with positive and constructive mindset. The morals preached by the thinkers and philosophers differ or contradict many times and there always is debate among philosophers as to what is moral and what is not. The acts thought moral at some places can be treated as immoral elsewhere or the immoral of the past may prove to be moral on the ground of present standards. Some say that discussing morals is immoral for they are not permanent.
And still, we need morals for the better-civilized society. Morals that bring every individual together to form a homogenous cohesive society for a better future and prosperity in an economic and intellectual sense always are preferable. And this is what should be taught to the children when their mind is shaping. Jain philosophy believes in the principle of “live and let live. No harm should be caused to not only humans but any living being.” This is the highest principle, may not be practicable to its fullest extent but the feelings behind this principle are very novel and humanitarian of high degree. The education system, besides educating the pupils in a variety of branches of knowledge, the prime concern should be to make him a better member of society and that is not possible without moral education. Jain principles are very helpful in this effort.
Our education system hardly provides the moral education that can help him in being a responsible citizen. A citizen is not only a political living entity but an individual who inspires or get inspired for the betterment of the self and society. Though today's moral education is taking roots in the education system it seems that it is failing in creating a positive humanistic attitude and faith in the overall social goals in the students. This is happening because though we teach the necessary morals those educationalists feel necessary; they have failed in teaching the fundamental philosophy behind the morals those are being taught. This is why moral education just has become customary without reaching the hearts of the students.
This necessitates the definition of moral education and choosing proper philosophy to strengthen it. We find many values defined in Jain philosophy (Not religion) those can help the students in not becoming a better citizen but a person who is exploiting his all inner powers with immense curiosity and quest of raising and solving the questions to make the world even better so that the social values and the values of the life are aligned together.
Jain philosophy is secular. It does not believe in any creator or wish-fulfilling god. It believes every living soul is a god but because of the ignorance has fallen in the crevasse of the emotive world that engulfs him in the chaotic dark. With good deeds, he can raise himself and can help to rise up the ladder of human up-gradation. However, the present moral education is so far limited to teach civic rules without getting to the bottom of morals.
In moral education, the following points are important to teach-
  1. Why and how to learn?
  2. What values should determine the relationship between the student and the teacher?
  3. What is the utility of the subjects the student learns to himself and society?
  4. What is the ultimate eventuality of the subject’s student is taught?
  5. Should the education mean study for study or to quench the curiosity of the student making him able enough to add his own to the field of his interest?
The moral values have necessarily social aspect as well that may include-
a. Which moral values are preferred and why for the cohesive society?
b. On which fundamentals the relationship between a person and society can become healthy and stronger?
c. What are the pros and cons of individualism and totalitarianism and which is preferable?
d. How the principles like non-violence, truth, non-attachment should be used and to use the principle of many-sided reality to solve the socio-moral issues?
e. How to take a universal approach in the subjects taught in the schools?
f. How to cope-up with the multi-cultural environment?
Then we come to the values those are very personal those every student should know and understand and that is-
  1. Every individual has an innate ability to become enlightened in any field of his choice.
  2. The universal values like truth, non-violence and non-attachment have no barriers of caste, creed, nation or religion.
  3. Positive mindset through meditation, diet, and physical exercise.
  4. Learning to compete with self, not the world to attain associative behavior for social and individual happiness.
  5. Having a good memory is okay but the deep understanding of the subject is far better.
We will discuss in detail the essence of Jain moral system that can help modern educationalists to modify their approach towards moral education.

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...