Sunday, April 3, 2022

विद्रोह म्हणजे तिरस्कार?

 विद्रोह चुकीचा नसून विद्रोह म्हणजे तिरस्कार आणि हिंसा असे समजात ते चूक आहे. पण आता अशा काही संघटना फोफावत आहेत की ज्यांचा अंतिम हेतू समजावून घेण्यात येणारे अपयश ही खरी समस्या आहे.

दुर्दैवाने काही संघटनांनी संघाप्रमाणेच मुर्ख आणि आततायी वक्त्यांची फौज उभारण्याचा गेल्या काही काळापासून सपाटा लावला आहे. बहुजनवादाच्या नांवाखाली हे वक्ते प्रयत्नपुर्वक अनेक विचारमंचांवर येतात आणि मग विषय कोणताही असो, आपल्याच अजेंड्याकडे नेतात.
अनेकांच्या ते लक्षात आले तरी पर्यायी समतोल विचारी मांडणी करणारे वक्तेच तयार केले गेलेले नसल्याने ते केवळ ’कार्यक्रम तर पार पाडला’ या भावनेत कृतकृत्य राहतात किंवा मिळाले ते ज्ञान दिव्य आहे या समजुतीत राहतात.
बरे, त्यालाही हरकत नाही...पण परिणामस्वरुप बहुजनांची नुसती दिशाभूल केली जात नाही तर आपल्याच वादाच्या अंमलाखाली त्यांना आणायचा प्रयत्न होतो. काही भले-भलेही त्या अंमलापासुन मुक्त नाहीत.
बहुजनवाद्यांनी वैदिकांच्या एका अंमलातून बाहेर पडण्यासाठी दुस-या विकृतीकडे नेऊ शकणा-या अथवा नेणा-या अंमलाखाली जावे हे केवळ त्यांचे मस्तक त्यांच्या धडावर नसल्याचे लक्षण आहे.
विद्रोहाचा पाया सर्जनाचा असतो हे ज्यांना समजत नाही, पाठ केलेली भाषणे पोपटपंचीसारखी एकपात्री नाट्यप्रयोगाप्रमाणे करीत वीष पेरत जातात, ते समाजात कसलाही बदल घडवून आणु शकत नाहीत कारण त्यांची ती पात्रताच नाही.
बहुजनवाद्यांनी अशा सर्व संघटनांपासून सावध रहायला हवे. ते तुमच्या नव्हे तर त्यांच्या वैचारिक सत्तेसाठी झटत आहेत, मग भले त्यात विचार असोत अथवा नसोत!

1 comment:

  1. Atishay uttam vichar mandal ahe. They are just playing to the gallery.

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...