Sunday, August 21, 2022

असे होते यशवंतराव!

 ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य बरखास्त होइस्तोवर सर्व भारतीय सत्तांना (अगदी कंपनी सरकारलाही) आपल्या नाण्यांवर एका बाजुने पातशहाचा उल्लेख फारसीत करावाच लागत असे. परंतू भारतात एकमेव वीर जन्मला तो म्हणजे यशवंतराव होळकर ज्यांनी पातशाही सार्वभौमतेलाही धुत्कारत दोन्ही बाजुला आपलाच छाप असलेली नाणी १८०८ साली पाडली. यामुळे पातशहा तर अस्वस्थ झालाच पण इंग्रजही अस्वस्थ झाले. शेवटी इंग्रजांनीच मध्यस्थी करुन यशवंतरावांना नव्याने पातशाही आज्ञेप्रमाणे नाणी जारी करायला राजी केले. (संदर्भ: हिंगणे दफ्तर, तिसरा खंड, संपादक सदाशिव आठवले.)

No comments:

Post a Comment

पोरस म्हणजे पुरू?

  मायकेल वित्झेल (Michael Witzel) आणि हेमचंद्र रायचौधुरी (Hemchandra Raychaudhuri) यांसारख्या विद्वानांनी 'पोरस'ची ओळख ऋग्वेदात उल्ल...