Tuesday, November 15, 2022

आत्महत्येची स्वगते!

 कवी कविता लिहितो

तेंव्हा तो आपल्या आत्महत्येची

स्वगते लिहित असतो....

ती आत्महत्येची स्वगते

त्याला जिवंत ठेवतात

ती स्वगते अमर होतील...

या मृतप्राय आशेमुळे!

बाकी कवी तसा कोणीच नसतो

आणि म्हणून कविताही नसते!

असतात ती

क्षणोक्षणीच्या

विश्वात जगू पाहणा-यांच्या

आत्महत्येची स्वगते!

No comments:

Post a Comment

काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!

महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...