Tuesday, November 15, 2022

आत्महत्येची स्वगते!

 कवी कविता लिहितो

तेंव्हा तो आपल्या आत्महत्येची

स्वगते लिहित असतो....

ती आत्महत्येची स्वगते

त्याला जिवंत ठेवतात

ती स्वगते अमर होतील...

या मृतप्राय आशेमुळे!

बाकी कवी तसा कोणीच नसतो

आणि म्हणून कविताही नसते!

असतात ती

क्षणोक्षणीच्या

विश्वात जगू पाहणा-यांच्या

आत्महत्येची स्वगते!

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...