Tuesday, November 15, 2022

आत्महत्येची स्वगते!

 कवी कविता लिहितो

तेंव्हा तो आपल्या आत्महत्येची

स्वगते लिहित असतो....

ती आत्महत्येची स्वगते

त्याला जिवंत ठेवतात

ती स्वगते अमर होतील...

या मृतप्राय आशेमुळे!

बाकी कवी तसा कोणीच नसतो

आणि म्हणून कविताही नसते!

असतात ती

क्षणोक्षणीच्या

विश्वात जगू पाहणा-यांच्या

आत्महत्येची स्वगते!

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...