Wednesday, December 17, 2014

ZARATHUSTRA



Various attempts have been made, at least superficially, to locate the name of the prophet in Rig Veda. Although the name ‘Jarutha’ appears thrice in the bulk of the Rig Veda, the scholars seem inclined to reject the identification. Let us not forget here that Zarathustra is spelled differently in other languages, such as Zarathustra is spelled as Zoroaster in Greek. The other Iranian versions spell the same as Zarathrost, Zaradust or Zaradrust etc. In Sanskrit, Zarathushtra is spelled as Jarathuśtra (in Neriyosangh’s translation of the Avesta). The etymology of the name given is Zarath (old)+Ustra (camel) or Zarath (driving or moving)+ Ustra (Camel). Similarly, the word Zarat denotes the priest or singer.  (http://www.iranicaonline.org/articles/zoroaster-i-the-name)
Let us not forget here that the phoneme Z finds loss in Vedic language, turns to J, Zarath will thus come to be spelled as Jarath. With phonetic changes, while shortening the name Zarathustra, the name can come, too, be spelled as Jarutha in Vedic dialect. Another supportive information we get as, “The name Jarutha is derived by Sayana from Vgr, to 'sing, saying ; it means one who makes loud sound. ... form in its own way simply copied it from Vedic, for the Avestan Gen. form of hartr would, on the analogy of datr, be zarthro or *zarithro.” (The Indian Historical Quarterly, Volume 5, Issues 1-2, page 269-70, 1985)

Let us have a look at the Rig Vedic verses where Jarutha is mentioned and in what context.

“Burn up all malice with those flames, O Agni, wherewith of old thou burntest up Jarutha,And drive away in silence pain and sickness.” (RV 7.1.7 Trans. By Griffith)

“Vasiṣṭha, when enkindling thee, O Agni, hath slain Jarutha. Give us wealth in plenty. Sing praise in choral song, O Jātavedas. Ye Gods, preserve us evermore with blessings.” (RV 7.9.6 Trans. By Griffith)

“Agni rejoiced the car of him who praised him, and from the waters, burnt away Jarutha. Agni saved Atri in the fiery cave and made Nrmedha rich with troops of children.” (RV 10.80.3, Trans. By Griffith.)

However, Macdonell defines Jarutha to denote a demon that was slain by Agni. He also referees to the Griffith and Ludwig those see in him (Jarutha), a foe slain in the battle in which Vasishtha was the priest. (Vedic Index of Names and Subjects, Volume 1; Volume 5, By Arthur Anthony Macdonell, Arthur Berriedale Keith, page 279, reprint 1995). Hodivala after examining all the three verses states, “From the third passage, it is clear that Jarutha must have been some demon who lived in waters.” (Hodivala, Zharathushtra and his contemporaries in the Rigveda, 1913, page 1.) However, Hodivala examines further to conclude that Zarathustra is mentioned in the Rig Veda as ‘Dasyu’ because he was frequently called as ‘Dakhyuma’ (equivalent to Rig Vedic Dasyu) and wherever, the word is used in plural form, i.e. Dasyus, it is addressed to his followers.
Let us examine the verses mentioned above to find what they mean. All the three verses laud the deed of Agni for killing ‘Jarutha’ in fire. There is no mention anywhere in Rig Veda that Jarutha denotes a demon or foe. Rather, it seems odd to find mention of Jarutha’s thrice to describing only event of his killing in the fire.  

Some scholars have associated Jarutha of Rig Veda with Zarathushtra of Avesta. Indian scholar P. R. Deshmukh states, “…From the above Richa we learn that Jarutha was killed by Vashishthas by crossing water…..The word Jarutha means a priest…..Jarutha may be a short form of Zartustra.” (Indus civilisation, Rigveda, and Hindu culture, by P. R. Deshmukh, page 288-89, 1982)

Apart from above two references, Jackson has given detailed accounts of Zarathushtra’s death gathered from various sources, some are listed briefly as below:

1.       Early Greek tradition says that Zoroaster was perished by lightning or a flame from heaven. Latin tradition states that an angry star emitted a stream of fire in vengeance for his conjuring up the stars and burnt him to ashes.
2.       Gregory of Tours (A.D. 538-593) records etymology of Zoroaster as ‘living star’ stating that the Persians worshipped him as a God because he was consumed by fire from heaven.
3.       Chronicon Alexandrinum (A.D.629) states that while praying to the Orion, he was slain by a heavenly shaft and that his ashes were carefully kept by the Persians.
4.       Suidas of Tenth century A.D. briefly records the prophet’s death by fire from heaven.
5.       Orosius A.D. 5th Century) informs that Ninus conquered Zoroaster and killed him in the battle.
6.       Iranian traditions inform that the prophet died at the age of 77 years and 40 days and ascribes the death it to a Turanian named BrAtrOkrEsh. The name of the murderer occurs several times in the Avestan scriptures.
7.       Datistan – I Dinik, 72.8, states that among the most heinous sinners “one was Tur – e- Bratarvaksh, the Karap and heterodox wizard, by whom best of the man (i.e. Jharatusht) was put to death.” The similar account is given by Bundahishn naming the above cited assassin.
8.       Dk. III, chap. 343 lists the best and worst of men, naming Yam as the best of kings, and Zardušt as the best of priests, and Tūr ī Brātrōkrēš, the karb “who made the body of Zardušt perish,” as the worst of heretics. (Karb stands for Old Avestan Karapan, despised priests of the enemy. The assassin in question in all probabilities was a priest-warrior.)

Apart from Greek and Latin, Pahlavi-Parsi tradition is unanimous that the Zoroaster perished at the hands of Tur-i- BrAtrOkrEsh. Shahname, too, confirms the account of assassination of the Prophet by Turanian raiders at the fire-temple.  (See for detailed information “Zoroaster: The Prophet of Ancient Iran” by A. V. Williams Jackson, page 124-132, 1899) 

(During the ritual service, Hyaona insurgents stabbed the 77-year-old Zarathushtra, slew his priests and burned the Avesta.” Thus states Snodgrass in Encyclopedia of the Literature of Empire. (By Mary Ellen Snodgrass, page 20) Hyaona was the tribe which was led by Zarathushtra’s staunch enemy Arjaspa. 

What we learn from above is Zarathustra’s death was not natural. Most of the accounts agree that he was killed in the fire or he along with his priests was killed and later burnt in a fire temple, while he was praying. The assassin was a Turanian named BrAtrOkrEsh, may be a General, leading Turanian raiding party to Balkh. The news of the killing of the prophet must have spread across the regions adding imaginary details to it for want of accurate details of the incident, some traditions, such as Greek, attributed the death to the ‘fire’ from heaven. Let us not forget here that the Greeks knew Zarathushtra as magician and astrologer or even a sorcerer. 

However, Zoroastrians did not commemorate martyrdom of their prophet because in all probability, the old tradition was more interested in his life and teachings than his physical death. 

Now, if we reread the Rig Vedic verses, we easily can correlate them with the other legends associated with the Zarathushtra’s death in fire, in all probability, an outcome of a war with Turanians to whom we have identified with Turvasas of Rig Veda, who were sometimes friendly with Rig Vedic tribe. It just cannot be a coincidence that all accounts in relation with Zarathushtra’s death approximately match with the Rig Vedic verses. 

Turanians, too, were friendly with  Zarathushtra in the beginning which is evidenced by Zarathushtra himself in the Gathas as under:

“Since through righteousness, the powerful children and grandchildren of the Turanian Fryana have risen to promote their world through serenity with zeal, Wise God has united them with good mind, in order to teach them what concerns their help.” (Gathas: 11-12)

It just shows that the inter-tribal and inter-faith relationship bonds were not permanent. Turvasas had fought against Sudasa in Battle of Ten Kings though many a times, they have shown intimate friendly relations. 

However, we cannot of course, attribute the death to Vasishtha, as no Rig Vedic verse suggests that the assassination of Zarathushtra was committed by Vasishtha. In the verses composed by him, he attributes the death to ‘Agni’, fire. In fact, in the verse RV 7.9.6, he seems to be rejoicing the death of enemy Jarutha. Looking at the rivalry between Rig Vedic and Avestan people, becoming Vasishtha overjoyous and reflecting it in the verses composed by him (or his family members) can be understood. Vasishtha seems to have recorded the incident in the peculiar Vedic style. The verse 10.80.3 seems to be of far later times which have added confusing element of Atri in it. 

As Hodivala’s inference that Zarathushtra is mentioned in Rig Veda as Dasyu is thus undoubtedly correct as during Zarathustra’s life time, for sake of the rivalry, Vedic seers must have called him not by his personal name but contemptuous form of his epithet, Dasyu (Dakhyuma). There are many other proofs, too, to confirm beyond doubt that Zarathushtra was contemporaneous to the Rig Vedic seers which we will see in the present chapter. To sum up conclusively, in all, Jarutha of Rig Veda can be none other than Zarathushtra of Avesta. 

(From my forthcoming book)

45 comments:

  1. अहो विकास महाराज !
    काय एक्सलंट आहे यात ते तरी सांगा !कारण संजयची दातखीळ बसलेली असते काहीही कुणीही विचारलं तरी - हे बरे नाही !
    कुणाची तरी शेंडी कुणालातरी चीकातावायाची हा संजयचा धंदा आहे - यात एक्सलंट काय असणार ? विकासाची गम्मत म्हणजे - फारफार तर mind your tongue असे माफक धाक दाखवणार - इतकेच -
    मला सांग विकास जो माणूस उगीचच एक लोणकढी थाप ठेवून देतो की - महाभारत हे रामायणाच्या आधी घडले आहे ! त्याला काय म्हणावे -?
    आता संजयचा उपद्व्याप काय चालला असणार - तर अवेस्ताचा उल्लेख रूग वेडात आहे म्हणजे ऋग्वेद अलीकडचा आहे - इतकेच त्याचे ध्येय !
    असे करत करत बहुतेक संजय असे दाखवेल की वास्को दी गामा भारतात आला त्याच वेळेस महाभारत घडले !
    शिव तरी कधी समजायचा ?

    ReplyDelete
    Replies
    1. विकास यांनी "Exellent " लिहिले म्हणून या बामणाच्या पोटात गोळा उठण्याचे कारणच काय?
      समीर घाटगे ????????????????????????????????????????????????
      हि व्यक्ती मराठ्याची अवलाद असूच शकत नाही. हा मूर्ख नक्कीच बामन असला पाहिजे. बेशरम माणसा, मराठ्यांचे आडनाव वापरून लिहित आहे. यावरूनच याची लायकी काय आहे ते समजते!

      Delete
    2. बामनाची औलाद असले जातीयवाचक शब्द वापरून परत तुम्ही हेच सांगत असता की लेखन वाचनात ब्राह्मण उच्च आहेत
      मला सांगा - का नाही एखादा घाटगे - घोरपडे - पवार - त्यांच्या सारखे शुद्ध आणि अस्सल मराठी लिहू शकत ? अगदी शक्य आहे - पण त्याला तुम्ही " बामणी " असा शिक्का मारत जाऊ नये ही नम्र विनंती
      आपण कदाचित माझ्यापेक्षा वयाने मोठे असाल - नक्कीच असणार ,आपली भगवत गीतेबद्दलची टिपण्णी स्वागत करावी अशी आहे , आपली बौद्धिक प्रखरता अति वंदनीय आहे , पण मग आपण इतके ताळतंत्र सोडून माथेफिरुसारखे का लिहिता ?
      आपला अभ्यासूपणा कौतुकास्पद आहे ! धन्यवाद !

      Delete
    3. लिहा वाचा काकांची प्रतिक्रिया वाचून वाईट वाटले
      समजा एकच फोटो समान आला तर काय करणार ?
      आपला लेख आपणास वाकून नमस्कार करण्याच्या योग्यतेचा आहे हे नक्की
      आपण जरी आमचा अवमान केला तरी आम्ही आपणास साष्टाग नमस्कारच करणार इतकी आपली योग्यता आहेच !
      आपण जे गीतेबद्दल लिहिले आहे ते दररोज वाचावे इतके सूक्ष्म आणि स्पष्ट आहे अगदी सोपे करून आपण एक थोर सामाजिक कार्यच केले आहे
      आजच्या आमच्या पिढीला असे सहज सोपे सांगणारे कुणी भेटत नाही - सरर्व जीवनाचेच कप्पे झाल्यामुळे अवघड होते आहे करमणूक अध्यात्म अभ्यास अर्थार्जन नातीगोती कर्तव्ये सामाजिक देणे आणि अशासारखी अनेक बंधने - त्यामुळे खरे चिंतन आणि आत्मसंवाद फार म्हणजे फारच कमी होत चालला आहे - त्यात आपण अत्यंत दुर्मिळ आणि जिव्हाळ्याच्या विषयाला उत्तम मांडणीने जिवंत केले आहे
      आपल्याला आपले प्रतिक्रियात्मक निरुपण वाचून भेटावेसे वाटते पण आपण जी ही टोचणी लावून आम्हास बहिष्कृत केले त्यामुळे एक सदासर्वदा वाहात राहणारी वेदना आपण जागवली आहे !
      कुणा दुसऱ्याला आपण अशा वेदना देऊ नका हीच आपल्या पायाशी मागणी आहे

      Delete
    4. समीर घाटगे,

      "बामनाची औलाद" असे कोठे लिहिले आहे?
      "ब्राह्मण उच्च आहेत" हा तुमचा अतिशय खोटा तसेच गोड गैरसमज झालेला दिसतो!
      "ताळतंत्र सोडून माथेफिरुसारखे का लिहिता?" असे भंकस / तिरकस पणे बरळणे तुम्हाला शोभते काय? अब्राह्मनांचा तुम्हाला इतका तिटकारा का?
      घाटगे आडनाव वापरून लिहिता आणि प्रत्येक वेळी मराठ्यांचा तसेच इतर बहुजनांचा अपमान करता, हे बरे नव्हे? असे मराठा समाजातील आडनाव वापरून लोकांना का बरे फसविता? शुद्ध लेखन आणि ब्राह्मण यांचा काडीचाही संबंध नाही आणि ही कोणत्याही एका समाजाची मक्तेदारी नाही, हे तुम्ही जाणून-बुजून का विसरता? बघा डोक्यात काही प्रकाश पडला तर!

      Delete
  2. जयद्रथ हा झरतृष्ट या इराणीयनचा भाऊ असेही म्हणतात
    झ चा ज झाला -
    Pourušaspa Spitāma, Dughdova हे झरतृष्ट चे आई वडील होते दुग्धोवा म्हणजे गाईशी संबंधित -
    कदाचित गवळी किंवा धनगर असू शकतात -
    जुन्या गाथांचा काळ इसपू ६००० चा सुद्धा धरला जातो किंवा थेट त्याला सिकंदराच्या अलीकडे २५० वर्षे आणतात - थोडक्यात इतिहासकार इतिहासाला आपल्या हुकामाप्रमाने वाकवत चेपवत असतात
    संजय तर विदुषक आहे !- त्यामुळे त्याच्या मनात एक असते आणि त्यासाठी तो हे खेळ करत असतो -
    बिचारा -
    त्याला कुणी विचारात नाही ! हेच त्याचे दुखणे आहे !

    ReplyDelete
  3. झरतृष्ट्र हा पुराणिक घराण्यात जन्माला आला
    झरतृष्ट्र याने प्रथम आपली पत्नी आणि ३ पुत्र आणि ३ कन्या यांना आपल्या धर्माची दीक्षा दिली
    त्याची पत्नी होवी ही त्या देशाच्या राजाची - विस्तास्पाच्या- भावाची - फ्रासओस्त्राची -बहिण होती
    आणि झरस्त्रुष्टाने आपली मुलगी पौरासीस्ता हि राजाच्या दुसऱ्या भावाला - जमास्पाला दिली होती
    या सर्व प्रकारात हुतौसा या राणीचा सहभाग मुख्य होता
    असा ( सत्य )आणि द्रुज (असत्य )यातील द्वंद्वावर जास्त भर पारशी धर्माचा असतो
    म्हणजेच धर्म स्थापना करताना झरतृष्ट याला राजकीय समर्थन महत्वाचे वाटले असेल का ?
    महम्मद पैगाम्बाराला नवीन धर्म स्थापन करताना मुर्तिपुजेचा झालेला अतिरेक सहन झाला नाही आणि त्याने मुस्लिम धर्म स्थापन केला तसे झरतृष्टाला नवीन धर्माची निकड का वाटावी ते समजत नाही -
    त्यांच्या धार्मिक लेखनाला गाथा म्हणतात आणि तुकाराम महाराजांच्या ग्रंथाला गाथाच म्हणतात पारशी धर्माच्या अवेस्ता बद्दल लिहिताना संजयाने सर्व माहिती द्यायला पाहिजे होती म्हणजे पुस्तकाची वाचनीयता वाढली असती
    आम्ही उत्कंठेने आपल्या पुस्तकाची वात बघत आहोत
    नेहमीच्या सवयी प्रमाणे लिहा वाचा आणि विकास काहीतरी अश्लाघ्य टिपण्णी करतीलच

    ReplyDelete
    Replies
    1. फोटो बदललात, फारच छान, आता विचार सुद्धा बदला म्हणजे कमावले!
      .
      .
      .
      .
      ..........अरे बापरे अजून एक account open केलेत, तोच फोटो वापरून आणि नाव ठेवले "suvarna shakuntala" फारच छान हं!

      Delete
    2. अकौंट कोणाचे आहे याला महत्व आहे का ? जोपर्यंत अश्लील लिहिले जात नाही आणि कोणाचाही वृथ उपमर्द केला जात नाही तोपर्यंत कंटेंट काय आहे आणि किती आत्मियतेने लिहिले जात आहे यालाच महत्व असावे असे सुचवावेसे वाटते
      अनेक वेळा आपण बघतो की अमित सारखे काहीजण विषयाचा पिच्छा पुरवत असतात पण संजय सर त्याला टाळत असतात - हे पण विचार करण्या सारखे आहे !

      Delete
    3. iha vacha sir ,
      i have not changed my profile picture or anything
      why should i ?

      Delete
    4. कोणी कोणाची काय बदलली ? आणि कशाला ?
      हि काय हुकुमशाही आहे काय का मोदी राज ?

      Delete
    5. Pratibha pratima and suvarna shakuntala both are mendacious person! A huge fibber! Accounts are also fake!

      Delete
  4. आप्पा - उपयुक्त माहिती !
    बाप्पा - आपल्याला तर नवीन माहिती मिळाली संजय कडून !
    आप्पा - प्रतिभा प्रतिमा ताइनि विचारलेला प्रश्न सुद्धा अंतर्मुख करतो
    बाप्पा - कसे ते तरी सांग
    बाप्पा - म्हणजे असे बघ , बरेच दिवसात नवीन धर्म कुणी काढला नाही बघ !
    पूर्वी बरेच धर्म कशाचा तरी तिटकारा निषेध म्हणून जन्माला आले !पशुहत्या बळी किंवा मूर्तीपूजा , पुरोहितांची दादागिरी असे बरेच मुद्दे होते
    मुस्लिम बौद्ध जैन असे सर्वच कशालातरी कंटाळून आपली वेगळी चूल मांडू लागले !
    आप्पा - पण पारशी धर्म कशाचा परिपाक आहे ?पूर्वीचा धर्म इराण मध्ये काय होता ?
    या बाबत उत्कंठा वाढते !
    बाप्पा - हिंदू जैन बौद्ध यांना जशी एक परंपरा आहे एकाचा काही तात्विक गुंता पटत नाही म्हणून दुसऱ्याची निर्मिती असा प्रवास आहे तसे पारशी बाबत काय आहे ?

    ReplyDelete
  5. Can you answer when Panini lived? You are avoiding questions. Again proving that you are liar. You are Not at all responsible for your statements. Running away from taking responsibility.

    ReplyDelete
    Replies
    1. संजय सरांकडे वेळ नाही असे गृहीत धरून पाणिनी संदर्भात उपलब्ध असलेली थोडक्यात माहिती अशी :

      पाणीनि : (इ. स. पू. सु. पचावे वा चवथे शतक). संस्कृतातील पहिल्या सर्वांगपूर्ण अशा व्याकरणाचा कर्ता. पाणिनीच्या काळासंबंधी विद्वानांत मतभेद आहेत. अष्टाध्यायी, अष्टक किंवा शब्दानुशासन ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या, पाणिनीच्या व्याकरणग्रंथातील पुराव्यांवरून; त्याचप्रमाणे अन्य ग्रंथांत आलेले पाणिनीविषयक उल्लेख लक्षात घेऊन पाणिनीचा काळ वर दिल्याप्रमाणे इ. स. पू. पाचवे वा चवथे शतक असा सामान्यतः मानला जात असला, तरी काही संशोधकांनी पाणिनीचा काळ इ. स. पू. आठव्या शतकापर्यंत मागे नेलेला आहे. पाणिनीच्या एका सूत्रात शलातुर देशाचा उल्लेख आहे. ह्याच देशाचा तो रहिवासी असावा, असा विद्वानांचा तर्क आहे. शलातुर ह्या शब्दाचे प्राकृत रूप सलाउर असे होते. अनेक प्रांतांत ‘स’ च्या ऐवजी ‘ह’ उच्चारला जात असल्यामुळे सलाउरचे रूप हलाउर होऊन आणि ‘ह’ व ‘ल’ ह्यांच्यात वर्णव्यत्यत होऊन सलाउरचे ‘लहाउर’ असे रूप होऊ शकते. ह्या ‘लहाउर’ चेच पुढे ‘लहोर’ झाले असावे. असे अनुमान करून शलातुर म्हणजेच आजचे लाहोर असण्याची शक्यता नमूद केली जाते. पाणिनीच्या सूत्रांतून येणारे सिंधु, तक्षशिला, कच्छ इ. उल्लेखही बोलके आहेत. पाणिनीचे शिक्षण तक्षशिलेस झाले असावे, असा तर्क आहे. पाणिनीचा ‘दाक्षीपुत्र’ असाही उल्लेख केला जातो, हे पाहता त्याच्या आईचे नाव ‘दाक्षी’ असावे, असा तर्क केला जातो.

      पाणिनीने वैदिक भाषेबरोबर तत्कालीन बोलीभाषेचा अभ्यास करून दोहोंसाठी वर्णनात्मक व्याकरण लिहिले. सु. ४,००० सूत्रे असलेल्या ह्या व्याकरणग्रंथाचे आठ अध्याय असल्यामुळे त्याला अष्टाध्यायी किंवा अष्टक असे नाव रूढ झाले. अष्टाध्यायीमधील सूत्रे बीजगणितातील सूत्रांप्रमाणेच तांत्रिक परिभाषेत लिहिली गेली असून योजिलेल्या तंत्राचा नीट उलगडा व्हावा, म्हणून त्याने संज्ञासूत्रे आणि परिभाषासूत्रे दिलेली आहेत.

      वाक्यांतील पदांचा परस्परसंबंध, सामासिक पदांचा प्रकृतिप्रत्ययात्मक विभाग, संधी ह्यांचा विचार केला असून त्यासाठी अनुबंध, प्रत्याहार, स्थानिन्, आदेश, आगम इ. तांत्रिक साधनांचा उपयोग केला आहे. ग्रंथातील तपशील व बारकावे ह्यांवरून अष्टाध्यायी हा ग्रंथ म्हणजे शतकानुशतके चालू असलेल्या व्याकरणविषयक विचारांचे (व कदाचित ग्रंथांचेही) शेवटचे संस्करण असावे, असे दिसते. पाणिंनीने आपल्यापूर्वींच्या दहा वैयाकरणांचा उल्लेख केलेला आहे. ‘गणपाठ’ व ‘धातुपाठ’ अशी परिशिष्टे त्याने अष्टाध्यायीला जोडलेली आहेत. गणपाठात शब्दांचे गट केलेले असून त्यासाठी समान प्रत्यय अथवा स्वर इ. कसोट्या लावल्या आहेत. तो तो गट त्या त्या गटातील पहिल्या शब्दापुठे ‘आदी’ हा (किंवा या अर्थाचा) शब्द लावून ओळखला जातो. उदा., ‘स्वरादि’. पाणिनीच्या सुत्रांवर ⇨ कात्यायनाने (इ. स. पू. सु. तिसरे शतक) चिकित्सक दृष्टिकोणातून वार्त्तिके लिहिली आहेत. ह्या वार्त्तिकांवर ⇨ पतंजलीने ⇨ महाभाष्य नावाची प्रसिद्ध टीका लिहिली (इ. स. पू. सु. १५०). सातव्या शतकात जयादित्य आणि वामन ह्यांनी अष्टाध्यायीवर काशिका नावाची टीका लिहिली. इंग्रजी, जर्मन व फ्रेंच भाषांत अष्टाध्यायीचे अनुवाद झालेले आहेत.

      Delete
    2. But sanjay said panini formalised sanskrit grammar in 250 AD. Why he gave false information? And why he avoid answering this question? He has time to write new blogs. But no time to answer questions.

      Delete
    3. But sanjay said panini formalised sanskrit grammar in 250 AD. Why he gave false information? And why he avoid answering this question? He has time to write new blogs. But no time to answer questions.

      Delete
  6. झरस्तुष्ट्र हा पारशी धर्माचा संस्थापक मानला जातो पारशी धर्मही तसे पाहिले तर इराण मधला आहे पण त्यात अवास्तव हिंसा नाही
    पारशी लोकही अत्यंत सहिष्णू आहेत - कारस्थानी नाहीत
    या धर्म संस्थापकाने कोणत्या कारणामुळे नवीन धर्म स्थापन केला असेल ?कोणते क्लेश त्याला त्रास देत असतील ?आधीचा पागान मूर्तिपूजक धर्म जो महंमद पैगंबराच्या काळात होता तोच तेंव्हाही होता का ?
    योगायोगाची गोष्ट म्हणजे झरस्तृष्ट आणि पैगंबर या दोघांची घराणी हि पुराणिक- पुजारी होती !
    यावर चिंतन व्हावे !

    ReplyDelete
  7. अगदी नवी माहिती मिळाली
    आपल्या देशाला सोडून चीन मध्येही अनेक धर्म प्रवाह आहेत त्याबद्दलही आपल्याला काही सांगता येईल का ?आम्हाला तशा प्रकारचे मराठीत काही वाचता येत नाही
    आपला हूब वरील श्रीकृष्णाचा लेख आवडला
    गीता हि एका बैठकीत सांगितली गेली नाही हेही पटले
    पण आपण म्हणता त्याप्रमाणे संस्कृतच्या आधी मागधी प्राकृत होते तर गीता लेखन मुलाचे प्राकृतात होते का ?

    ReplyDelete
  8. भगवद्‌गीता :

    म्हणजे गीता, हा हिंदुधर्माचा सर्वमान्य स्वतःप्रमाणे ग्रंथ. गीता हा भगवद्‌गीता शब्दाचाच संक्षेप आहे. संस्कृतमध्ये गीता हे उपपद असलेल्या सु. दोनशे गीता सापडतात. उदा. शिवगीता, गुरुगीता, हंसगीता, रामगीता इत्यादी. महाभारतात 'अनुगीता' आहे. भगवद्‌गीतेची महती स्थापन झाल्यामुळे इतरांनी गीता हा शब्द उचलला; अनेक 'गीता' रचल्या.'गै' म्हणजे गाणे या मूळच्या संस्कृत धातूपासून 'गीता' ह्या स्त्रीलिंगी शब्द बनला आहे. साधारणपणे जातम्, भूतम्, गतम् या शब्दांप्रमाणे गीतम् असा नपुसकलिंगी शब्द बनतो. गीता असा स्त्रीलिंगी शब्द बनण्याचे कारण गीतेच्या अभ्यायसमाप्तिसूचक वाक्यात सापडते. उपनिषत् या स्त्रीलिंगी संस्कृत शब्दांचे बहुवचनी रुप 'उपनषतत्सु' या विशेष्याचे 'श्रीमतभगवद्‌गीता' हे विशेषण म्हणून त्या वाक्यात वापरले आहे. गीत म्हणजे गाइलेले. "श्रीमतभगवंताने गाईलेल्या उपनिषदातील" असा अर्थ. 'इति श्रीमदभगवद्‌गीतासु उपनिषत्सु ब्रह्यविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ........अध्यायः' असे ते समाप्तीसूचक वाक्य प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आले आहे. त्याचा अर्थ: श्रीमद् भगवद्‌गीता हे उपनिषद म्हणजेच ब्रह्यविद्या असून योगशास्त्रही आहे; तोच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातला संवाद होय. ब्रह्म हे अंतिम सत्य; त्याच्या साक्षात्काराने मोक्ष मिळतो. योग म्हणजे मनासह सर्व इंद्रियांचा संयम; आणि असा संयम करुन एकाग्र मनाने परब्रह्माशी एकरुप होणे. योग हे ब्रह्मप्रप्तीचे साधन म्हणून भगवद्‌गीतेत वर्णिले आहे ⇨ महाभारतातील भीष्मपर्वाचा भगवद्‌गीता हा भाग. भगवद्‌गीतेचे १८ अध्याय, ७॰॰ श्लोक आहेत.

    वेदान्ताची उपनिषदे, भगवद्‌गीता आणि ⇨ ब्रह्मसूत्रे ही ⇨ प्रस्थानत्रयी मानली आहे. म्हणून केवलाव्दैतवादी शंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी, विशिष्टाव्दैतवादी ⇨ रामानुजाचार्य, त्यांचे गुरु यामुनाचार्य आणि त्यांचे अनुयायी , द्वैतवादी ⇨ मध्वाचार्यं आणि त्यांचे अनुयायी यांची आणि इतर ⇨ वल्लभाचार्यं इ. आचार्यांची गीतेवर भाष्ये आणि टिका आहेत. भारताच्या मराठी इ. प्रचलित सर्व साहित्यिक भाषांमध्येही गीतेची भांषातरे, भाष्य वा टिका वा अनुवाद, त्या भाषांच्या गेल्या हजार-बाराशेच्या वर्षाच्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत. गीतेच्या अगणित पोथ्या छापखाना येण्यापूर्वी लिहिल्या जात होत्या भगवद्‌गीतेची आज उपलब्ध असलेली सर्वात प्राचीन व अधिकृत प्रत म्हणजे ⇨ शंकराचार्यांचे गीताभाष्य ही होय. या भाष्यात गीतेचा पहिला अध्याय वगळून दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून अठराव्या अध्यायातील अखेरच्या श्लोकापर्यंत जवळजवळ शब्दश स्पष्टीकरण आलेले आहे.

    भागवत धर्माचा भगवद्‌गीता हा मुख्य आधारभूत प्रमाणग्रंथ आहे केवळ ⇨ भागवत धर्माचाच नव्हे तर हिंदू धर्मातील सगळ्या धार्मिक संप्रदायाचा मान्य असलेला हा ग्रंथ आहे. ख्रिश्चनाचे बायबल व मुसलमांनाचे कुराण त्यांच्याप्रमाणे गीता हा हिंदूचा अत्यंत पवित्र धर्मग्रंथ म्हणून समजला जातो.

    ReplyDelete
  9. भारताच्या बाहेरही शेकडो वर्ष या ग्रंथांचे भक्त झाले आहेत. अरबी मुसाफिर ⇨ अल बीरूनी (९७३-१०४८) याला हा ग्रंथ फार पसंत पडला, लंङन येथे १७८५ साली विल्‌कीन्सन याने गीतेचे इंग्लिश भांषातर प्रसिद्ध केले. त्यामुळे युरोपमध्ये याची चांगली प्रसिद्धी होऊ लागली. ई. आर्नल्डने केलेले गीतेचे द सॉग सिलेस्टिअल हे भांषातररही प्रसिद्ध आहे. १८२३ साली ⇨ आउगुस्ट हिल्हेल्म फोन स्लेगेल (१७६७-१८४५) याने गीतेची परिशुद्ध आवृती लॅटिन भाषांतरासह १८२३ मध्ये प्रसिद्ध केली. हे भाषांतर जर्मन पंडित व्हिल्हेल्म फोन हंबोल्ट(१७६७-१८३५) याने वाचले आणि तो हर्षित झाला. तो म्हणाला महाभारतील भगवद्‌गीता हि घटना फार सुंदर आहे. आपणास माहीत असलेल्या साहित्यांच्या जगात बहुधा सर्वश्रेष्ठ अशी ही तत्त्वज्ञानात्मक कविता आहे, असे म्हणावे लागते. बर्लिन ॲकॅडेमीमध्ये त्याने या विषयावर विस्तृत असा शोधप्रबंध लिहिला व श्लेगेलच्या गीतांभाषातरावर विस्तृत समालोचना लिहिली. त्यानंतर आतापर्यत युरोपियन भाषामध्ये गितेचे पुनःपुन्हा भांषातरे होत राहिली.
    [कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्ण व विषादग्रस्त अर्जुन : एक चित्र].[कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्ण व विषादग्रस्त अर्जुन : एक चित्र].

    कौरवपांडवांच्या ऐन युध्दांच्या प्रसंगी भगवंतानी अर्जुनाला रणागणामध्ये दोन सैन्यांच्या मध्ये रथ उभा केला असताना दोंन्ही बाजूंची रणवाद्य गर्जू लागली तेव्हा हा उपदेश केला आहे. पिते-पिता-मह, गुरू, काका, मामा, भाऊ, पुत्र, पौत्र, सासरे आणि मित्र हे दोंन्ही पक्षात संग्रामार्थ सज्ज झालेले पाहून त्या भयंकर भावी संहाराचे चित्र त्यांच्या मनासमोर उभे राहिले आणि तो त्या दारूण विनाशाच्या भयाने गागंरला. त्यांच्या हृदयात करूणा उत्पन्न झाली. तो संहार डोळयाने पाहण्यापेक्षा युद्धातून निवृत्त होऊन संन्यास घेतलेला बरा, असा विचार त्यांच्या अंतकरणात प्रवळ झाला. त्यांला असे दिसू लागले, की विजय मिळाला काय किंवा पराभव झाला काय, युद्ध संपल्यावर जगण्याची इच्छाच राहणार नाही. ज्याच्यांकरता जगायचे तेच नाशाला जाणार. एवढेच नव्हे, तर अगणित तरुण शूत्रांचा निपात झाल्यामुळे त्यांच्या स्त्रिया विधवा होवून अधर्म माजेल व त्या भ्रष्ट होतील, त्यामुळे वर्णसंकर होईल आणि सनातन कुलधर्म नष्ट होतील, त्याचा परिणाम पितरांना व विरांना नरकवास भोगावा लागेल, म्हणुन अर्जुन श्रीकृष्णाला या व्दिधा मनःस्थितीत म्हणाला की मी युद्ध करण्यास तयार नाही. या अर्जुनाच्या अवस्थेचे आणि त्या रणांगणाचे अत्यंत वेधक चित्र पहिल्या 'अर्जुनविषादयोग' या अध्यायात रेखाटले आहे. अशा संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला आध्यात्मिक तत्व ज्ञानाच्या आधाराने भगवंतानी अखेरीस युद्धास प्रवृत्त केले आहे. या उपदेशाच्या प्रसंगीच अर्जुनाच्या प्रथम दृष्टोत्पत्तीस आले की श्रीकृष्ण हा साक्षात परमेश्वर आहे.

    गीतेतील विस्तृत उपदेश साक्षात समरप्रसंगी करण्यात अवधी नसतो, म्हणून आधुनिक विचारवंतापैकी काहीच्या मते भगवद्‌गीता ही भारतामध्ये मुळात सद्यःस्वरुपात नसावी युद्ध हा तुझ्यासारख्या जन्मसिद्ध क्षत्रियाचा-विशेषत शूर व तेजस्वी क्षत्रियाचा-स्वधर्म आहे. म्हणून स्वधर्म हा भावी परिणामांचा विचार न करताच आचरला पाहिजे एवढेच तात्पर्य असलेला विचार अर्जुनाला भगवंतानी सागिंतला असावा.
    इ.स.पू. पाचव्या-चौथ्या शतकाच्या सुमारास प्रचलित झालेल्या भागवत धर्माचे मुळात सेश्वर ⇨ सांख्य दर्शनावर आधारलेले हे वैष्णव उपनिषद असावे आणि त्यातच विस्तार सध्याची भगवद्‌गीता असावी, असे अनेक पश्चिमी संशोधकाचे मत आहे. इ.स.पू. दुसऱ्या शतकातील काही कोरीव लेख सापडले आहेत. त्यावरून असे दिसते की गांधार देशातील (अफगाणिस्तानातील) ग्रीक रहिवांशानी भागवत धर्माचा स्वीकार केला होता. भगवद्‌गीता मुळात छोटीच असली पाहिजे हे गृहित धरून जर्मन पंडित आ.र. गार्वे.(१८५७-१९२७) याने मूळची भगवद्‌गीता आणि त्यात नंतर भर पडलेली म्हणजे प्रक्षिप्त भगवद्‌गीता केवढी हे स्वतः प्रकाशित केलेल्या गीतेच्या पुस्तकात दाखवुन दिले, त्याच्या मते हा प्रक्षिप्त भाग म्हणजे वेन्दांत तत्वज्ञान आणि ब्राह्मणी वैदिकधर्म यासंबंधी वचने होत. प्रत्यक्ष ब्रह्मतत्वाचे व यज्ञसंस्थेचे जेथे आदराने विवरण केलेले आहे तो प्रक्षिप्त भाग होय, असे त्याचे आणि भारतीय साहित्याचा जर्मन इतिहासकार एम्‌. विंटरनिट्‌स (१८६३-१९३७) याचे मत आहे. अलीकडे पुणे येथील शिक्षणशास्त्रज्ञ ग.श्री खैर यांना मूळ गीतेचा शोध १९६७ हे पुस्तक लिहून गीतेचे तीन लेखक निरनिराळया वेळी झाले असावेत, असा अंदाज केला आहे. त्यातील पहिल्याने ब्राह्मप्राप्तीचे, दुसऱ्याने अव्यक्त अशा परम पुरूषाच्या प्राप्तीचे आणि तिसऱ्याने वासुदेव देवताच्या सगुण भक्तिचे ध्येय वाचकांपुढे मांडले, असे खैर म्हणतात.

    ReplyDelete
  10. परंतू आज जे गीतेचे समग्र स्वरूप आहे ते सर्व विचारात घेता, त्यातील विचारांचा ऐतिहासिक क्रम कोणता,मूळचा भाग कोणता व नंतरचा भाग कोणता या गोष्टी निसंशय असा निर्णय करणे दुरापास्त आहे. त्याचप्रमाणे गीतेचा उपक्रम आणि उपसंहार लक्षात घेता. गीतेत ज्ञानमूलक भक्तिप्रधान ⇨ कर्मयोगाचाच आदेश हा मुख्य आहे. हे गीतारहस्यकार ⇨ लो.टिळक (१८५६-१९२०) यांचे मत सरळ मान्य करावे लागते, हे जरी खरे असले, तरी काही ठिकाणी सांख्य योग किंवा ज्ञानयोगाचा, काही ठिकाणी विशेषत अखेरच्या अठराव्या अध्यायात भक्तियोगाचा अंतिम संदेश भगवंतानी दिला आहे. असे स्पष्ट दिसते. ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोग यापैकी कोणताही योग हा प्रधान उद्दिष्ट मानले, तरी ज्ञानयोगाला किंवा स्थितप्रज्ञ दर्शनाला कर्मयोगाची आणि भक्तियोगाची जोड द्यावीच लागते. ज्ञानापासून आणि भक्तिपासून या तीन योगांपैकी कोणताही योग वेगळा करता येत नाही. अचल समाधी हा त्यांचा गाभा आहे. सुख दुःखाची द्वंद्वांच्या पलीकडची अनासक्त अवस्था हे या सर्व योगांचे शुद्ध अधिष्ठान आहे. या अधिष्ठानाचे परमशांती किंवा ब्रह्मनिर्वाण हे अंतिम स्वरुप आहे. प्राचीन काळापासून आतापर्यंत अनेक भाष्यकार झाले आहेत. शंकराचार्यपूर्व भाष्यकारांच्या मते ज्ञानकर्म समुच्चय, शंकराचार्यमते निष्काम कर्मजन्य चित्तशुद्धीने निष्पन्न होणारी संन्याससहित ज्ञाननिष्ठा, रामानुज, मध्व, ⇨ निंवार्क ⇨ ज्ञानेश्वर इ.आचार्यांच्या मते ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करीत साक्षात्काररुप झालेली भक्ति किंवा योगी ⇨ अरविंदाच्या मते कर्म, पातंजलयोग, ज्ञान व भक्ति याचा समुच्चय म्हणजे पुर्णयोग. यापैकी कोणते तरी एक गीतातात्पर्य आहे.

    ReplyDelete
  11. अर्जुनाच्या संमोहाचा किंवा संग्रमाचा निरास करण्याकरता आत्मतत्त्वाच्या विवारणापासून भगवंतानी प्रारंभ केला. भगवान म्हणतात 'या युद्धात हत्या होणार आहे; त्यात नाशवंत शरीरेच नष्ट होणार आहेत, आत्मा नव्हे. या शरीरातील आत्मा सनातन नित्य अविनाशी असाच आहे. म्हणून त्यांसबंध शोक करण्याची जरूर नाही, युद्ध हा क्षत्रियाचा स्वधर्म आहे. या युद्धात क्षत्रियानां मृत्यू आला, तर स्वर्गाचे द्वार त्यांच्याकरता उघडले असते. विजय झाला तर पृथ्वीचे राज्य प्राप्त होते' या दुसऱ्या अध्यायातील उपदेशामध्ये कृष्ण हा ऋषीसारखा उपदेश करतो, त्यानंतर तो स्वतःच परमेश्वर असून तो परमेश्वरच उपदेश करीत आहे, असे दिसते. फलाची अपेक्षा न धरता निष्काम बुद्धीने स्वधर्माने आचरण करावे या सिध्दांताचा धागा अथपासून इतिपर्यंत दिसतो, परंतू त्याबरोबरच वैराग्यमूलक नैष्कर्म्याचा उपदेशही वारंवार केलेला आढळतो. स्थिर बुद्धीचा अनिकेत म्हणजे गृहत्याग केलेला संन्यासीही आदर्श पूरुष म्हणून वर्णिलेला आहे. हा ⇨ ज्ञान मार्गी योगी होय. हा एकांतस्थळी बसतो, नासाग्र दृष्टी करुन सर्व इंद्रियांचा व मनाचा संयम करुन सुखदूखादी द्वंद्वाच्यापासून अलिप्त राहून ध्यानमग्न होतो. मातीचे ढेकूळ, धोंडा आणि सुवर्ण हे सगळे इंद्रियगोचर पदार्थ त्याला सारखेच ! त्याची समाधिस्थितीच त्याला ⇨ साक्षात्कारद्वारा निर्वाणपदाला नेऊन पोचवते. त्यांची सर्व पातके भस्म होतात. सर्व पापपुण्यांच्या पलीकडे तो जातो. परंतू या स्थितीत न पोहचलेले जे ध्यानयोगमार्गाचे अनुष्ठान करत असतात, आणि त्या उच्चतम स्थितीला पोहचण्याच्या आगोदरच मृत्यू पावतात, त्यांचे त्यानंतर काय होते ? त्यांची ही सगळी साधना वाया जाते काय ? असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला केला. त्यावर भगवंतानी उत्तर दिले. स्वतःचे जसे पूर्वकर्म असेल त्याचप्रमाणे म्हणजे कर्मानुरूप पुढील जन्म मनुष्यास प्राप्त होत असतो. [⟶ कर्मवाद]. या नियमानुसार योग साधना अर्धवट सोडून या जगातून गेलेला मनुष्य, पवित्र श्रीमंत कुलात अथवा योग्यांच्याच कुलात जन्मतो आणि मागील जन्माचा योगाभ्यास त्याला योगसाधनेकडे ओढतो, प्रवृत्त करतो व तो सिद्धावस्थेस पोहोचतो. [⟶ योग; योग दर्शन].

    अत्यंत पापी, दुराचारी मनुष्याचासुद्धा उद्धार होऊ शकतो, असे भगवंतानी आश्वासन दिले, त्याचा मार्ग ⇨ भक्तिमार्ग होय. परमेश्वराची अनन्य भक्ती केल्याचा योगाने पुण्यशील ब्राह्मण आणि भक्त राजर्षीच परमपदाला पोहचतात असे नाही, तर स्त्रिया, वैश्य व शुद्रसुद्धा भगवद्‌भक्ती करत असताना प्राणिमात्राबद्ल निर्वेर बुद्धी प्रेम व करूणा आणि ईश्वरशरणता म्हणजे ईश्वरार्पण बुद्धी स्थिरावली की परमेश्वर त्याचा उद्धार निश्चयाने करतो.

    कर्म भक्तीशी जुळते, परंतू कर्माची पुर्ण वैराग्यनिष्ठ ज्ञानमार्गाशी तशी सुसंगती निश्चीत करणे कठीण आहे. भगवद्‌गीतेमध्ये अंतर्विरोधी विधाने पुष्कळ आहेत. भाष्यकार व टीकाकार त्यांच्यात सुसंगती स्थापन्याचा प्रयत्न करतात. एक अत्यंत स्पष्ट अंतर्विरोधी विधान असे ज्याला कर्मात अकर्म दिसते आणि अकर्मात कर्म दिसते तो माणसामधला (खरा) बुध्दिमान होय. तो योगी आणि सर्व कर्तव्ये पार पाडणारा होय (गीता ४-१८). याचा अर्थ शंकराचार्यानी उलगडून दाखवला आहे. ब्रह्मसाक्षात्कार ज्याला झाला आहे, त्याच्यां दृष्टीने कर्म हे केवळ भास,म्हणून ते अकर्म होय आणि ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला नाही अशा स्वस्थ बसलेल्या मनुष्याच्या ठिकाणी कर्म दिसतेच कारण कर्माची अहंकारादी बीजे त्या मनुष्याच्या ठिकाणी असतातच.

    सर्व भाष्यकारांच्या मते संपूर्ण गीताशास्त्राचा निःश्रेयस पर्यवसायी सारभूत अर्थ सांगणारा आदेश असा.
    "मत्कर्मकृन्मत्परमो मदभक्तः संगवर्जितः ll
    सर्वभूतेषु यःस मामेति पांडव ll (गीता ११.५५)

    अर्थ : " माझ्याकरता कर्मे करणारा, मीच ज्याचे अंतिम उदिष्ट आहे, माझा भक्त, आसत्किरहित, प्राणिमात्राबद्ल निर्वेर वृत्तीचा असा जो तो, हे पांडवा, माझ्यापाशी येतो".

    ReplyDelete
  12. लिहा वाचा याना ,
    आपल्याला नम्र अभिवादन !
    आपण भगवतगीता एक राष्ट्रीय ग्रंथ याबद्दल च्या प्रतिक्रियेत अति सुंदर लिहिले आहे
    अत्यंत वाचनीय आणि माननीय लेखन आपण दैनिक सकाळ अथवा दुसऱ्या वर्तमान पत्रात दिले पाहिजे
    असे काहीसे जर सर्व सामान्यांच्या वाचनात येत गेले तर सामान्य माणसाला जी झापडे लागली आहेत ती कदाचित दूर होतील
    पुनश्च अभिनंदन !

    ReplyDelete
  13. लिहा वाचा , सर आपण निदान आपला ई मेल अड्रेस दिला पाहिजे
    कारण अनेकांना आपल्याशी थेट संवाद साधने शक्य होईल
    आपल्याबाबत जाणून घ्यावेसे वाटते म्हणून लिहिले आहे

    ReplyDelete
  14. लिहा वाचा
    अभिवादन आणि मनापासून अभिनंदन !
    आपल्याला तर वाकून आदराने वंदन करावे इतका सुंदर लेख आपण झरतृष्ट या अवतरणाखाली दिला आहे आपले कौतुक करावे तितके कमीच !
    खरेतर आपण यावर एक पुस्तिका काढली पाहिजे
    आपण अत्यंत खालच्या जातीत जन्माला येऊनही आपली भाषा अत्यंत पुणेरी आहे ब्राह्मणी आहे आणि विचार सुसंस्कृत आहेत हे विशेष !
    आपण आरक्षणाचा फायदा उचलत स्वतःस लेखन आणि उच्चार याबाबत ब्राह्मणास लाजवेल अशा थाटात प्रतिक्रिया देत आहात - आपल्या महार मांग आणि इतर जातीना आणि आपली नवबौद्ध नातेवाइकना आपण हि आपली प्रगती जवळून पाहण्याची संधी देत आहात हे विशेष
    आ[पण आरक्षण सार्थ ठरवत त्याची उपयुक्तता पटवून देत आहात - नाही का ?
    अनेक जणांनी जी शंका उपस्थित केली आहे की बहुतेक नवीन धर्म हा जुन्या धर्मातील विसंगती दूर करत जन्माला येत असतो - मुस्लिम , जैन बौद्ध ख्रिश्चन शीख - पण पारशी धर्म कशामुळे स्थापन झाला ?त्यावर आपण प्रकाश टाकाल का ?
    पुन्हा आपले अभिनंदन !

    अजून एक सांगावेसे वाटते - अकौंट कोणतेही असो , मग ते शकुंतला असो नाहीतर प्रतिभा असो !
    इतके पर्सनल होऊ नका त्यात आपली बुद्धी का वृथ खर्च करता ? असेल कुणी वेडी बाई किंवा आजारी असेल ! समजून घ्या ! आपण इतके थोर लिहू शकता पण तितकेच थोर जगुनही दाखवा - नाही का ?

    ReplyDelete
    Replies
    1. मोहिनी परकर,

      तुझे डोके ठिकाणावर आहे काय?
      तुला थोडीतरी अक्कल आहे की नाही?
      तू काय लिहित आहेस याचे तुला अजिबात भान नाही काय?
      "आपण अत्यंत खालच्या जातीत जन्माला येऊनही आपली भाषा अत्यंत पुणेरी आहे ब्राह्मणी आहे !" असे चक्क खोटे लिहिण्याची तुझी हिम्मतच कशी झाली! दारू पिऊन लिहितेस काय? ब्राह्मणी अहंगंडाने पछाडले जाणे योग्य नव्हे!
      तुझ्या डोक्यात बटाटे भरले आहेत काय? तुझा जेवढा तिरस्कार करावा तेवढा थोडाच आहे!
      इथून पुढे मोहिनी परकर प्रतिक्रिया लिहिताना थोडे तारतम्य बाळगेल अशी आशा करू या?

      Delete
  15. लिहा वाचा काकांची प्रतिक्रिया वाचून वाईट वाटले
    समजा एकच फोटो समान आला तर काय करणार ?
    आपला लेख आपणास वाकून नमस्कार करण्याच्या योग्यतेचा आहे हे नक्की
    आपण जरी आमचा अवमान केला तरी आम्ही आपणास साष्टाग नमस्कारच करणार इतकी आपली योग्यता आहेच !
    आपण जे गीतेबद्दल लिहिले आहे ते दररोज वाचावे इतके सूक्ष्म आणि स्पष्ट आहे अगदी सोपे करून आपण एक थोर सामाजिक कार्यच केले आहे
    आजच्या आमच्या पिढीला असे सहज सोपे सांगणारे कुणी भेटत नाही - सरर्व जीवनाचेच कप्पे झाल्यामुळे अवघड होते आहे करमणूक अध्यात्म अभ्यास अर्थार्जन नातीगोती कर्तव्ये सामाजिक देणे आणि अशासारखी अनेक बंधने - त्यामुळे खरे चिंतन आणि आत्मसंवाद फार म्हणजे फारच कमी होत चालला आहे - त्यात आपण अत्यंत दुर्मिळ आणि जिव्हाळ्याच्या विषयाला उत्तम मांडणीने जिवंत केले आहे
    आपल्याला आपले प्रतिक्रियात्मक निरुपण वाचून भेटावेसे वाटते पण आपण जी ही टोचणी लावून आम्हास बहिष्कृत केले त्यामुळे एक सदासर्वदा वाहात राहणारी वेदना आपण जागवली आहे !
    कुणा दुसऱ्याला आपण अशा वेदना देऊ नका हीच आपल्या पायाशी मागणी आहे

    ReplyDelete
  16. iha vacha sir ,
    i have not changed my profile picture or anything
    why should i ?

    ReplyDelete
  17. पारशीधर्म :
    (जरथुश्त्री धर्म) . जगातील प्राचीन आणि महत्त्वाच्या धर्मांत पारशी धर्माची गणना होते. आज पारशी धर्माचे अनुयायी संख्येने थोडे (सु. एक लाख) असले, तरी त्यामुळे त्या धर्माचे महत्त्व कमी होत नाही. ह्या धर्माच्या संस्थापकाचे नाव ⇨ जरथुश्त्र. ज्या अभ्यासकांनी ह्या नावाचे समीकरण संस्कृत ‘जरदुष्ट्र’शी मानले त्यांनी त्याचा अर्थ ‘ज्याचे उंट म्हातारे आहेत’ असा केला. ह्या नावाचे ‘उत्तम स्तुती करणारा’, ‘उत्तम हृदय असलेला’, ‘ज्याचे तेज सोनेरी आहे असा’ किंवा ‘(कुशलतेने) उंट हाकणारा’ असेही अर्थ करण्यात आले आहेत. प्रस्तुत लेखकाने ‘जरथुश्त्र’ चा अर्थ ‘गायी-बैलांचा वृद्ध त्राता’ असा केला आहे. ग्रीक भाषेत ह्या धर्मसंस्थापकाचे नाव झोरोऑस्टर (झोरोआस्ट्रस) ह्या रूपात रूढ झाले आणि त्यावरून इंग्रजी भाषेत हा धर्म झोरोअँस्ट्रीयन रिलिजन ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. ह्या धर्माचा उदय इराणमध्ये इ.स.पू. सातव्या शतकात होऊन त्याची भरभराट ससान घराण्याच्या अंतापर्यंत म्हणजे सु. बाराशे-तेराशे वर्षे झाली. ससान राजवटीत (२२६–६५२) हा इराणचा राष्ट्रधर्म होता.

    ह्या धर्माचा उदय होण्यापूर्वी इराणमध्ये अनेक देवदेवतांवर विश्वास असणारा धर्म प्रचलित होता. ह्यांपैकी काही देवदेवता मानवी जीवनास स्पर्श करणाऱ्या निसर्गशक्ती होत्या. तसेच तत्कालीन लोकांचा मंत्र-तंत्र व जादूटोण्यावरही विश्वास होता. देवदेवतांना आणि इतर अतिमानवी शक्तींना संतोषविण्यासाठी पशुयाग करून इच्छित साध्य करून घ्यावे, अशा प्रकारचे धर्माचे स्वरूप होते. ह्या यज्ञयागात हओमाला (संस्कृत-सोम) विशेष महत्त्व होते. पशुयागामुळे प्राण्यांना होणाऱ्या पीडेला अवेस्तातील यस्न २९ मध्ये बैलाच्या आत्म्याने केलेल्या आक्रंदनाच्या रूपात जरथुश्त्राने वाचा फोडली आहे. ह्या यस्नात गायी-बैलांचा त्राता म्हणून जरथुश्त्राचे नाव ऐकू येते.

    जरथुश्त्राचा जन्म इ. स. पू. ६३० ते ६१८ च्या दरम्यान झाला होता, असे परंपरागत मत आहे आणि ते बहुतेक विद्वानांना मान्य आहे. तो बहुधा पुरोहितकुलात जन्माला आला असावा. जरथुश्त्राचे कुलनाम स्पितम, वडिलांचे नाव पोउरुषस्प (संस्कृत-परुषाश्व) आणि आईचे नाव दोग्धोवा किंवा दुग्धोवा (सं.- दुग्धवा ?). वयाच्या तिसाव्या वर्षी जरथुश्त्राला ज्ञानप्राप्ती झाली व तो आपल्याला मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना शिकवू लागला. प्रथम त्याला तत्कालीन धर्मगुरू व शासनकर्ते यांचा खूप विरोध झाला. त्याने अगदी निराशेचे क्षण अनुभवले असावे असे ‘ मी आता कोणत्या देशी जाऊ, कुणीकडे माझे पाय वळवू ? मला माझ्या गावात समाधान नाही, द्रोहात रमणाऱ्या, राज्यकर्त्यांपासूनही नाही’ (यस्न ४६.१), अशा त्याने काढलेल्या उद्गारांवरून वाटते. अखेर तो आपले गाव सोडून इराणच्या उत्तरपूर्व विभागात गेला. तिथे अर्यनम् वएजो (ख्वारेझम्. हल्ली इराण, अफगाणिस्तान व सोव्हिएट तुर्कस्तान यांच्या हद्दी जिथे मिळतात तो भाग) येथील विश्तास्प (हखामनी सम्राट डरायस ह्याचा पिता विश्तास्प ही वेगळी व्यक्ती आहे) नावाच्या कविकुलातील राजाने त्याला आश्रय दिला. तिथपासून जरथुश्त्राला अनुयायी मिळत गेले व त्याच्या शिकवणीचा प्रसार होऊ लागला. जरथुश्त्र हा पाश्चात्त्य राष्ट्रांना ज्ञात झालेला पहिला पौर्वात्य तत्त्ववेत्ता होय.

    ReplyDelete
  18. जरथुश्त्री धर्माची माहिती मुख्यत्वे अवेस्ता भाषेत लिहिलेल्या पारशी लोकांच्या ⇨ अवैस्तानामक धर्मग्रंथात व ससान राजवटीत लिहिल्या गेलेल्या पेहलवी भाषेतील वाङ्मयात आढळते. ह्याखेरीज ग्रीक इतिहासकार व प्रवासी यांनीही ह्या धर्माविषयी त्यांच्या लेखनात माहिती दिली आहे. उपलब्ध अवेस्ताग्रंथ मूळ अवेस्ताच्या सु. एक तृतीयांश इतकाच आहे. जरथुश्त्री धर्माची संपूर्ण माहिती मिळवण्याच्या दृष्टीने ही फार मोठी हानी झालेली आहे. अवेस्ताधर्मग्रंथात जो भाग ‘गाथा’ ह्या नावाने ओळखला जातो तो त्यातील सर्वांत प्राचीन भाग असून जरथुश्त्राची शिकवण समजून घेण्याच्या दृष्टीने तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गाथा ह्या खुद्द जरथुश्त्रीच्या तोंडच्या असून त्या मूळ रूपात परंपरेने टिकवून ठेवल्या असल्याचे मानले जाते. त्यामुळे गाथांना पारशी धार्मिक वाङ्मयात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अवेस्ताचा गाथांखेरीज इतर जो भाग आहे, तो जरथुश्त्राच्या नंतर इ. स. पू. पाचवे–तिसरे शतक ह्या काळात जरथुश्त्राच्या अनुयायांनी लिहिला आहे. जरथुश्त्राच्या जीवनात त्याने कुठलेही चमत्कार घडवून आणले असल्याचे अगर त्याच्या जन्माच्या वेळी चमत्कार घडल्याचे उल्लेख गाथांत नाहीत. तसे उल्लेख पेहलवी वाङ्मयात मात्र आहेत.

    जरथुश्त्राची शिकवण एकेश्वरवादी आहे. त्याच्या काळी प्रचलित असलेल्या धर्मात अनेक देवदेवता मानल्या जात. त्या साऱ्यांना खोटे देव ठरवून जरथुश्त्राने एकच देव असल्याचे मानले आणि त्याला त्याने ⇨ अहुर मज्द असे नाव दिले. ऋग्वेदाच्या प्राचीन भागात ‘असुर’ व ‘देव’ हे दोन शब्द चांगल्या अर्थाने येतात. ऋग्वेदाच्या अखेरीपासून संस्कृत भाषेत ‘असुर’ ह्या शब्दाला देवविरोधी दुष्ट शक्ती असा अर्थ प्राप्त झाला. ‘देव’ हा शब्द चांगल्या अर्थाने रूढ राहिला. अवेस्तात नेमके उलटे घडले. साऱ्या अवेस्तात अहुर हा शब्द चांगल्या म्हणजे आपण ज्याला देव म्हणू त्या अर्थी वापरलेला आढळतो आणि ‘दएव’ हा अहुराला विरोध करणारा असा त्याचा अर्थ होतो. प्रस्तुत नोंद जरथुश्त्र धर्माविषयी असली, तरी मराठी भाषेतील संकेतानुसार देव हा शब्द चांगल्या अर्थी येथे वापरला आहे. अहुर मज्द हा सर्वज्ञ व सर्वशक्तिमान असल्याचे जरथुश्त्राने मानले. अहुर मज्द ह्या नावाच्या अर्थाविषयी अभ्यासकांत मतभेद आहेत. एका मताप्रमाणे ज्या एका मूळ अमूर्त कल्पनेने ऋग्वेदात ‘असुर वरुण’ ह्या नावाने देवताकार घेतला तिने अवेस्तात अहुर मज्द ह्या नावाने देवताकार घेतला. अहुर मज्द ह्याचा अर्थ ‘देव प्रज्ञा’ किंवा ‘मेधा’ (लॉर्ड विजडम). ह्या मताचे पुरस्कर्ते सारासार विवेकबुद्धी ह्या अमूर्त कल्पनेला जरथुश्त्राने देवपण दिले, असे मानतात. दुसऱ्या मताच्या पुरस्कर्त्यांच्या मते गाथांत अहुरो मज्दाऑ अशा शब्दप्रयोगाऐवजी मज्दाऑ अहुरो असा प्रयोग जास्त वेळा आढळत असल्यामुळे, जरथुश्त्र देवाल संबोधण्यासाठी मज्दा आणि अहुर ह्या दोन शब्दांचा स्वतंत्रपणे उपयोग करीत असे, असे म्हणणे यथार्थ होईल. जरथुश्त्राच्या देवाचे नाव ‘अहुर’. त्याला तो मज्दा ह्या नावानेही संबोधी. ही दोन नावे केव्हा एकत्र, पण बहुशः निरनिराळी वापरलेली आढळतात. ‘मज्दाऑ अहुरो’ ह्याचा अर्थ ‘मेधावी अहुर’ (वाइझ लॉर्ड) असा होतो.

    ReplyDelete
  19. अहुर मज्दाच्या वर्णनातील काही भाग ऋग्वेदातील देवतांच्या वर्णनाची आठवण करून देतो. उदा., जसे सूर्य हा अहुर मज्दाचा डोळा आहे असे अवेस्तात म्हटले आहे तसे सूर्याला मित्र व वरुण यांचा डोळा असल्याचे ऋग्वेदात म्हटले आहे (७.६३.१). अहुर मज्दाने विश्वाची उत्पत्ती केली आणि तिथपासूनच ह्या जगात एक सत् व असत् यांचे दीर्घकाळ टिकणारे द्वंद्व सुरू झाले. हे द्वंद्व अहुर मज्द किंवा त्याचा मुख्य मदतनीस स्पँता मइन्यू आणि त्यांचा विरोधक ⇨ अंग्रो-मइन्यू (पेहलवी अहरिमन) यांच्यात होते. ह्या दोन तत्त्वांना ‘यम’ असे म्हटले असल्याने ती एकाच वेळी उत्पन्न झाली आहेत. विश्वात जे काही सात्त्विक, श्रीमत् व पुण्यशील आहे, त्यांचे प्रतिनिधित्व स्पँता मइन्यू हे तत्त्व करते, तर जे काही तामसी, अश्रीर व पापमय आहे त्यांचे प्रतिनिधित्व अंग्रो-मइन्यू हे तत्त्व करते. अंग्रो-मइन्यूची सारी खटपट अहुर मज्दाच्या सृष्टीचा व जे जे प्रकाशमय आहे त्याचा नाश करण्याची असते. स्पँता मइन्यू व अंग्रो-मइन्यू यांच्या संघर्षात जरथुश्त्राने मानवावर एक मोठी कामगिरी सोपविली आहे. ह्या दोन तत्त्वांच्या झगड्यात मानवाची भूमिका त्रयस्थाची वा बघ्याची नसून तो आपल्या कृतींनी त्यांत प्रत्यक्ष भाग घेत असतो. यस्न ३० मध्ये ह्याचे सुरेख उद्बोधन जरथुश्त्राने केले आहे. तो म्हणतो, की मानवाने सदैव जागरूक राहून ह्या दोन तत्त्वांपैकी कोणाचा पक्ष स्वीकारायचा ह्याची निवड केली पाहिजे. ही निवड करावयाची जबाबदारी व स्वातंत्र्य जरथुश्त्राने सर्वस्वी मानवावर सोपविले आहे आणि जरथुश्त्राच्या शिकवणीतला हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शहाणे आहेत ते चांगल्या मार्गाची म्हणजे स्पँता मइन्यूच्या पक्षाची निवड करतात व मूर्ख असतात ते वाईट मार्गाची म्हणजेच अंग्रो-मइन्यूच्या पक्षाची निवड करतात. पूर्वीच्या खोट्या देवांनी निवड करण्यात चूक केली आणि ते अंग्रो-मइन्यूच्या पक्षाला जाऊन मिळाले. अशा प्रकारे हे सारे देव अहुर मज्दाचे विरोधक बनले. मानवाच्या प्रत्येक विचारात, उक्तीत व कृतीत त्याने कोणता पक्ष स्वीकारला आहे, हे प्रत्ययास येते. अंग्रो-मइन्यूने साऱ्या जगाचा नाश करण्याचा घाट घातला होता; पण स्पँता मइन्यूने त्याचे मदतनीस व सत्प्रवृत्त मानवांच्या साहाय्याने त्याला सामना दिला. त्यामुळे अहुर मज्दाला संतोष वाटला. परंतु ह्या दोन तत्त्वांतील युद्ध अजून संपलेले नाही. म्हणून मानवाला गाफील राहून चालणार नाही. हे युद्ध अजून चालूच आहे आणि पुढेही चालू राहणार आहे. त्यासाठी स्पँता मइन्यूची बाजू बळकट व्हायला हवी. हे काम मानव त्याच्या सद्वर्तनाने करीत असतो. जेव्हा जेव्हा तो चांगले विचार, उच्चार व आचार करतो, तेव्हा तेव्हा प्रत्येक खेपेस तो स्पँता मइन्यूचे राज्य वाढवीत असतो; पण त्याने त्याउलट आचरण केल्यास तो अंग्रो-मइन्यूचे राज्य वाढवतो.

    ReplyDelete
  20. सत् व असत् शक्तींचा हा झगडा जरथुश्त्री संप्रदायाप्रमाणे एकंदर १२००० वर्षे चालणार असून ह्या कालखंडाचे एकंदर चार समभाग कल्पिण्यात आले आहेत. पैकी शेवटचा भाग जरथुश्त्राच्या जन्मापासून सुरू झाला असल्याचे मानण्यात येते. जरथुश्त्राच्या जन्मापासून तीन हजार वर्षे पूर्ण होतील (पैकी सु. २,६०० वर्षे पूर्ण झाली आहेत) तेव्हा अंग्रो-मइन्यू त्याची शेवटची लढाई स्पँता मइन्यूशी देईल आणि तीत तो निश्चयपूर्वक हरेल, असा जरथुश्त्राचा विश्वास आहे. त्या क्षणानंतर मात्र विश्वात झगडा उरणार नाही आणि सतचे साम्राज्य चिरकाल टिकून राहील.

    स्पँता मइन्यू आणि अंग्रो-मइन्यू यांच्या लढ्यात अखेरचा विजय स्पँता मइन्यूचाच व्हावयाचा, हा जरथुश्त्राचा सिद्धांत आहे. हे जरी खरे असले, तरी ह्या सिद्धांताच्या प्रतिपादनातील धोका जरथुश्त्राने ओळखला आहे. ह्या सिद्धांतावर विसंबलेला आणि आचारविचारांचे स्वातंत्र्य मिळालेला माणूस ‘अंती जय सतचा होणार हे ठरलेलेच आहे, मग मला आता वाटेल तसे वागण्यास हरकत नाही’, अशी बेजबाबदारीची भाषा बोलू लागेल. म्हणून ह्या सिद्धांतताला क्वचित दृढ विश्वासाचे रूप देऊन मानवाने नेहमी चांगल्या मार्गाची निवड करावी, असतप्रवृत्त होऊ नये, अशी जरथुश्त्राने मानवाकडे मागणी केली आहे. अखेर सतचा विजय नक्की असला, तरी तो एका प्रकारे मानवाच्या विशुद्धाचरणावर अवलंबून आहे, असा जरथुश्त्राचा आग्रह आहे. एका बाजूने विजयाची खात्री आणि तरीही त्यासाठी मानवाच्या सद्ववर्तनाची आवश्यकता, ह्यांत समतोल ठेवण्याचे अवघड काम जरथुश्त्राने केले आहे.

    अहुर मज्द व स्पँता मइन्यू ह्या दोघांना त्यांनी चालविलेल्या लढ्यात दैवी अंश ज्यांच्यात आहे असे अतिमानवी साहाय्यकर्ते आहेत. अहुर मज्दाच्या साहाय्यकर्त्यांना अमेश स्पँत म्हणजे ‘अमर पुण्यात्मे’ (होली इंमॉर्टल्स) असे नाव आहे. ह्या अमेश स्पँतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : वोहु मनह् (वसु मनः) ‘चांगले मन’, अश वहिश्त (ऋत् वसिष्ठ) ‘उत्कृष्ट सत्य’, ख्शथ्र वइर्य (क्षत्र वरणीय) ‘निवड करण्यास योग्य असे राज्य’, आर्मईति (अरमति) ‘भक्ति’, हउर्वतात् (सर्वतात्) ‘पूर्णता’, ‘अमेरेतात्’ (अमृत) ‘अमृतत्त्व’. अहुर मज्द व स्पँता मइन्यू हे केव्हा एकत्र तर केव्हा निराळे असे आढळतात. अमेश स्पँतांपैकी पहिले दोघे वोहु मनह् व अश वहिश्त यांना अहुर मज्दाचे पुत्र कल्पिले आहे. अमेश स्पँतांची संख्या सहा असल्याने काही विद्वानांनी त्यांचे वरुण, मित्र, अर्यमा, भग, अंश आणि दक्ष ह्या सहा वैदिक आदित्यांशी साम्य कल्पिले आहे; पण ही चुकीची समजूत आहे. ह्या अमेश स्पँतांशी सामना देताना अंग्रो-मइन्यूदेखील अक मनह ‘वाईट मन’, इंद्र ह्यांसारख्या सहा तुल्यबल साहाय्यकांना मदतीस घेतो.

    ReplyDelete
  21. जरथुश्त्री धर्माची स्थापना होऊन त्याचा प्रसार होऊ लागल्यावर त्याला दोन मोठ्या तडाख्यांना तोंड द्यावे लागले. पहिला तडाखा शिकंदर बादशाहने इराणवर स्वारी केली (इ. स. पू. ३३०) तेव्हा बसला. त्यावेळी चामड्यावर लिहून ठेवलेल्या समग्र अवेस्ताच्या दोन प्रती नष्ट झाल्या. त्यानंतरच्या पार्थिअन राजवटीत ह्या धर्माने पुन्हा आपला जम बसवण्यास सुरुवात केली; परंतु त्याची खरी भरभराट ससान राजवटीत झाली. त्यावेळी जरथुश्त्राचा धर्म हा इराणचा खरा राष्ट्रीय धर्म झाला. हखामनी राजवटीतील डरायसच्या प्राचीन पर्शियन भाषेत लिहिल्या गेलेल्या शिलालेखात अहुर मज्दाचा उल्लेख आढळतो; पण जरथुश्त्राचा आढळत नाही. त्यामुळे ते घराणे नेमके जरथुश्त्राचे अनुयायी होते की नाही, ह्याविषयी संशय व्यक्त करण्यात आला आहे. ससान राजवटीत मात्र हा केवळ इराणचाच राष्ट्रधर्म होऊन राहिला नाही, तर त्याचा इराणबाहेरही प्रसार झाला. मिथ्रर देवतेच्या पूजेचा प्रसार साऱ्या रोमन साम्राज्यात विशेषतः सैनिकांत झाला होता.

    जरथुश्त्री धर्माला दुसरा तडाखा इराणवर झालेल्या इस्लामी आक्रमणामुळे इ. स. ६५२ मध्ये बसला. हा तडाखा पहिल्यापेक्षा फार जोराचा होता. ह्या आक्रमणानंतर इराणमधील जरथुश्त्री लोकांचे धर्मांतर झपाट्याने होऊ लागले आणि थोड्याच काळात हा धर्म इराणमधून जवळजवळ नामशेष झाला. काही तुरळक जरथुश्त्री लोक पूर्वीपासून इराणात आजही आहेत. त्यांना ‘गबार’ (अरेबिक-काफीर) असे म्हणतात. सुदैवाने इ.स.च्या सातव्या शतकात काही जरथुश्त्री लोकांनी आपला धर्म टिकवण्यासाठी देशांतर केले आणि ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरातेत येऊन पोहोचले. तिथून ते काहीसे उत्तरेकडे, काहीसे दक्षिणेकडे पसरले आणि आज त्यांची वस्ती मुख्यत्वे गुजरात-महाराष्ट्रात आहे. त्यांना येथे पारशी नावाने ओळखतात.

    ह्या धर्मात जोपासण्यासारखी काही चिरंतन तत्त्वे असल्यामुळे व त्याचे अनुयायी सत्प्रवृत्त राहिल्यामुळे हा धर्म देशांतर करावे लागले, तरी आपली उज्ज्वल परंपरा टिकवून आजही जिवंत राहिला आहे.

    ReplyDelete
  22. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. एखाद्याने एखादा विचार या तथाकथित उच्चवर्णीय लोकांना पोषक असा मांडला तर ते त्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचतात, अभिनन्दनाचा वर्षावच करतात. त्यांना आनंदाच्या उखळ्याच फुटतात? मात्र त्यांच्या विरोधात एखाद्याने लिहिले की यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि उगीचच डोक्यात राख कालवून घेतात. अगदी वेडेपिसे होतात! हे लक्षण ठीक नाही! मग काय वेगवेगळ्या नावाने लिहून स्वतः चेच खोटे समाधान केले जाते! हे मानसिक रोगाचे लक्षण नाही तर काय आहे?

      Delete
  23. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. विकास भाऊ, अगदी खरे आहे तुमचे म्हणणे!

      Delete
  24. All thoughts of the Bhagavad Geeta are not acceptable at all. Do not forget that the thoughts of Geeta came from Kshatriy Krushna and not from any Brahmin but during Geeta writing the meaning of thoughts were changed intentionally to keep Brahmin privilege unaffected. Krishna was a first person who opposed Vaidik God of God Indra and Vaidik sacrifices (Yadnya). No doubt, this is a complete truth!

    ReplyDelete
    Replies
    1. Vikas Sir,
      Sir ,
      To this date i was thinking shrikrushna as gopal , a yadav .
      but you are calling him a kshtriya which is very important
      Please explain how he can be kshtriya
      though it is very true that brahmins have always tried to keep their interests intact by changing the stories now what are the changes made in Geeta Sir ?

      thought and meaning of thought ?
      what you want to say
      how one can change meaning of thought ,give me an example please
      great going anyway

      if you try you can improve your english from gramin to nagari or from native to global standards
      best wishes

      Delete
    2. Krushna was a son of Kshatriy Vasudev and Devaki. Vasudev was a brother of Kshatriy King Nand Baba. Devaki was a sister of Kshatriy King Kansa. Hence, Krusha was kshatriy not Gopal, he was grown with Gopala's, no doubt. His surname was Yadav. I think present Geeta is not real words of Krushna, this is a modus operandi of Brahmin's.For example "Do work, and do not think about fruit" this message was not related to Krushna! but it came from decayed Brahman's brain.

      You improve your English language first and no need to teach others!

      Delete
    3. please donot fight
      think positive

      Delete
  25. samir ghatge
    suvarna shakuntala
    AMRUTA VISHVARUP
    pratibha pratima
    aappa bappa
    Dattatreya Agashe
    mohini parkar
    pratibha pratima pratima

    या विविध नावांनी लिहिणारी व्यक्ती कोठेही पूर्ण विरामाचा (.) कधीच वापर करीत नाही, या मागचे सहस्य काय? ते रहस्य समजू शकेल काय? पूर्ण विरामाचे बटन तुटले आहे काय? (- -) चा वापर मुबलक प्रमाणात होतोय, नाही काय?

    ReplyDelete
  26. PARSI PROPHET IS TERMED AS RISHI ATHARWA IN VEDAS.BECAUSE IN MAZDAYASNI ZORASTRIAN RELIGION.ATHRAWAN IS FIRST GROUP OF PARSIS.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...