Tuesday, September 1, 2015

खंडोबा




खंडोबा हे महाराष्ट्रातील बहुसंख्य जातींचे कुलदैवत असले तरी त्याचा धनगरांशी आदिम संबंध आहे. तो कुरूब-धनगरांचा प्रिय देव आहे. खंडोबाचा मूळ इतिहास पांडुरंगाइतकाच पुरातन असुनही खंडोबाभोवती बाराव्या-तेराव्या शतकानंतर ज्या पौराणिक कथा बनवल्या गेल्या त्यामुळे त्याचे ऐतिहासिक स्वरुप पार बदलले आहे. भक्त व काही स्वार्थी धर्मपंडित म्हणवणा-यांनी या कथा कधी प्रेमाने तर कधी स्वार्थाने बनवल्या असे दिसून येईल. या कथांच्या जंजाळात फारसे न अडकता आपल्याला मल्हारी मार्तंड खंडोबाचे मुळ स्वरुप येथे शोधयचे आहे.

मल्लारी-माहात्म्य या ग्रंथाने खरे तर अनेक भाकडकथांना जन्म दिला. खंडोबाचे कधी शिव, कधी विष्णू तर कधी इंद्राशी साधर्म्य साधण्याचा प्रयत्न केला गेला. मार्तंड-विजय, जयद्रिमाहात्म्यसारखे ग्रंथही पुरानकथांच्या पद्धतीनेच ढोबळपणे लिहिले गेले. हे ग्रंथ बाराव्या-तेराव्या शतकानंतरचे असल्याने खंडोबा या लोकदैवताला "प्रतिष्ठा" यापुर्वी नव्हती असा समज होणे स्वाभाविक आहे. महानुभाव साहित्यात खंडोबा (मैराळ) ह क्षेत्रपाळ देव असल्याचे म्हटले आहे. सन ११६० मध्ये बसवेश्वरांनीही मलैय्या, बेंतर, बिरैय्या केटय्या या देवतांची बळी मागणारे म्हणून्ज निर्भत्सना केलेली दिसते. पण पुढे जंगमही खंडोबाचे उपासक बनले हेही ऐतिहासिक वास्तव आहे. असे असले तरी संशोधकांनी सर्व कथांचा अभ्यास करुन जी मते मांडली आहेत त्यांचा थोडक्यात आढावा घेऊयात.

१) डा. माणिकराव धनपलवार यांच्या मते मैलार (मल्हार) हा शिकारी मेंढपाळ असावा. मैलाराच्या उपासनेत घोडा व कुत्र्याला महत्व आहे. हे मत डा. रा. चिं. ढेरे यांनाही मान्य आहे. हा मेंढपाळ-श्रेष्ठ मैलार एखाद्या प्रतिस्पर्धी टोळीशी झलेल्या संघर्षात क्षतविक्षत होऊन पडला असावा. खंडोबाच्या पूजाविधीत भंडा-याला (हळदीला) जे महत्व मिळाले ते मूळ जखमी झालेल्या नायकाला केलेल्या हळदीच्या उपचारांत असावे.

२) खंडेराय हा शिवजीप्रमाणेच इतिहासात होऊन गेलेला एखादा महान वीरपुरुष असावा असे मत त्र्यं. ग. धनेश्वर यांनी व्यक्त केले आहे. हा मुळात वीरदेव असावा व तो सन ६२० मद्ध्ये होऊन गेला असावा.

३) खंड म्हणजे वस्त्राचा तुकडा. मैलारास वस्त्रांच्य तुकड्याचा मुखवटा असतो म्हणून खंडोबा हे नांव पडले असावे असेही डा. रा. चिं. ढेरे म्हणतात. पण वस्त्रांच्या तुकड्याचे मुखवटे महालक्ष्मी व अनेक मुर्त्यांना असतात, पण त्यंना वस्त्रवाचक नांव नाही यावरुन ढेरेंचे मत बाद होते.

४) खंड-खांडा हे खंडोबाचे आयुध असल्याने त्यास खंडोबा म्हणतात हे मत बहुतेकांना मान्य असून जनप्रियही आहे.

५)खंडोबा हा शेळ्या-मेंढ्या व गायी-गुरांचा रक्षणकर्ता होता. त्यामुळेव पशुपालन हा ज्यांचा प्रमुख व्यवसाय होता त्यांचे तो दैवत होता. महाराष्ट्रात पैठण येथे खंडक नांवाचा यक्ष वास करत होता. खंडक यक्ष म्हणजेच खंडोबा असे मत म. के. ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे.

६) खंडोबाला बाणाई ही धनगरकन्या पत्नी आहे तशीच म्हाळसा ही लिंगायत वाण्याची मुलगी आहे. पशुपालक व नागर सम्स्कृती, या दोन्ही समाजातील बायका करणे देवाला आवश्यक होते असे गुंथर सोंथायमर यांनी मत व्यक्त केले आहे.

७) मल्लारी, हे नांव मलय/मैलार या पर्वत-अरण्यवाचक शब्दांतुन आले असावे असेही काही विद्वान मानतात. मार्तंड या शब्दातून प्राचीन सुर्यपुजेचे अंशही खंडोबाला चिकटवले गेले असतील असेही एक मत आहे.

मुख्य मुद्दा येथे लक्षात घ्यायला हवा तो हा कि खंडोबा ही देवता जर मुळात अकराव्या-बाराव्या शतकानंतर उदयाला आली असती तर त्याच्या मुळाबद्दल एवढी मते असायचे कारण नव्हते. जी देवता पुरातन असते, तिचे मुळ स्वरुप कालौघात विस्मरणात जाते व समकालीन संदर्भ कवी/भक्त आपापल्या प्रतिभेने चिकटवत जातात. धर्ममार्तंड त्यात स्वार्थी भर घालत राहतात. त्यामुळे पुराणकथांची व वेगवेगळ्या स्प्ष्टीकरणांची एवढी रेलचेल उडते कि सत्य काय हे शोधणे दुरापास्त व्हावे.

तरीही खंडोबाशी निगडित मुख्य कथा म्हणजे मणी-मल्ल दैत्यांची. या दोन्ही दैत्यांचा संहार केला व मल्ल दैत्याला मारणारा व मरण्याआधी दैत्याची इच्छा म्हणून नांवात मल्ल-हारि=मल्हारी (मल्लाचा विनाश करणारा-ठार मारणारा) आहे हे पुराणकथा सांगतात व मणी दैत्य त्याचा भाऊ होता असेही म्हणतात. जेंव्हा मुळ इतिहास विसरला जातो तेंव्हा त्याचे पौराणिकीकरण चालु होते. तरीही खंडोबाच्या नांवात मल्हारी असल्याने यावर जरा विशेष लक्ष द्यायची गरज आहे.

मल्ल हा प्रत्यक्षत व्यक्ती अथवा दैत्य नसून ते महाराष्ट्रातील एका प्राचीन विभागाचे नांव होते. या प्रांताला महाराष्ट्र नांव का पडले याचे विवेचन करतांना चि. वि. वैद्य म्हणतात, इ. स. पू. ६०० च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले आणि गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र इ. वसाहती करून स्थायिक झाले. अशोकाच्या शिलालेखात जो ‘रास्टिक’ लोकांचा उल्लेख आढळतो, ते हेच लोक होत. आंध्रभृत्य म्हणजेच सातवाहन यांच्या साम्राज्यात ते एका सत्तेखाली येऊन त्यांचे एक मोठे राष्ट्र निर्माण झाले व या मोठ्या राष्ट्रालाच महाराष्ट्र असे नाव पडले.

मराठी विश्वकोशात म्हटले आहे कि या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडण्यापूर्वी याचे विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरांत, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र असे घटक विभाग असून त्यांचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आलेले आढळतात. बृहदारण्यकोपनिषद, रामायण व महाभारत यांतून विदर्भाचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे. गोदावरी नदीच्या तीरावरील प्रदेश तो अश्मक (राजधानी प्रतिष्ठान किंवा पैठण), कृष्णेच्या उगमाजवळचा अथवा त्याच्या पश्चिमेचा तो अपरांत म्हणजे कोकण, गोपराष्ट्र म्हणजे नासिकभोवतालचा प्रदेश व त्याच्या दक्षिणेचा प्रदेश तो मल्लराष्ट्र असे मानले जाते. या सर्व प्रदेशांत प्राकृत भाषा प्रचलित होऊन त्या सर्वांचा मिळून एक मोठा प्रदेश निर्माण झाला व त्यालाच महाराष्ट्र असे संबोधले जाऊ लागले, अशीही व्युत्पत्ती दिली जाते.

पांडुराष्ट्र म्हणजे आजच्या पंढरपुरचा परिसर हे आपण पाहिले. मल्ल राष्ट्र नाशिकच्या दक्षीणेचा होता हे उघड आहे. हे राष्ट्रिक (राष्टिक) आर्य होते हे मत चि. वि. जोशींच्या तत्कालीन आर्य-आक्रमण सिद्धांताला धरुन आहे व ते कसे अनैतिहासिक आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिले आहे.

कुसुमावती देशपांडेंच्या म्हणण्यानुसार पांडुराष्ट्र व मल्लराष्ट्र ही अनार्यांची होती.

सर्व कथांचे अवलोकन केल्यावर आणि विद्वानांची मते लक्षात घेतल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे ते असे:
मल्ल हा दैत्य नसून ते प्रदेशाचे अथवा राज्याचे नांव होते हे ऐतिहासिक सत्य आहे. हे राज्य आजचा पुणे जिल्हा ते त्याहुनही दक्षीणेचा भाग यात पसरले असावे. ही शक्यता आहे कि जेजुरी ही मल्लराष्ट्राची राजधानी असावी. कर्हेपठार येथील गिरिदुर्ग या राजधानीचे केंद्र असावा. येथुन तत्कालीन राजा कारभार हाकत असावा व त्याचे नांव मणी असावे.

मणी-मल्ल या दैत्यद्वयाच्या नांवांची सांगड अशी लागते. मल्ल हे राज्याचे नांव तर मणी हे खंडोबाकालीन राजाचे नांव.

मल्ल राष्ट्र हे सातवाहनकाळ सुरु होईपर्यंत अस्तित्वात होते याचे पुरावे उपलब्ध आहेतच. म्हणजेच इसवी सनपुर्व पाचवे ते सनपुर्व तिसरे शतक या काळात खंडोबा नांवाचा एखादा मेंढपाळ वीरपुरुष होऊन गेला असावा. मणीही पशुपालकच समाजातील असावा पण तो अन्यायी असल्याने खंडोबाने बंड करून त्याच्या उच्छेद केला असावा. त्यामुळे मल्ल राष्ट्र हरवणारा म्हनून मल्हारी ही नावाचे व्युत्पत्ती अधिक संयुक्तिक आणि सत्याच्या जवळ जाणारी आहे. मल्लारि...मल्हारी अशी उकल करता येते. शकारि म्हणजे ज्याने शकांवर जय मिळवला अशी जी उपाधी तशीच ही मल्ल राष्ट्रावर विजय मिळवला म्हणून मल्हारी.

पराक्रमी पुर्वजांची पूजा करणे हा धनगर संस्कृतीतील एक महत्वाचा भाग आहे. खंडोबाने मणी राजाच्या संहारानंतर स्वत: राज्यकारभार केला असणे संयुक्तिक आहे. त्याच्या निधनानंतर त्याची शिवावतार समजून लिंगस्वरुपात पूजा करणे स्वाभाविक होते. खंडोबा नांवाचा उगम अन्यत्र शोधण्याची आवश्यकता नाही. हेच नांव मुळचे असणे अधिक सत्याच्या जवळ जाणारे आहे. तसेच खंडोबाच्या आधी मुर्त्या असणे शक्य नाही. खंडोबाची पुजा आधीपासून लिंगरुपातच होत आली असली पाहिजे. मार्तंड ही उपाधी सुर्यपुजेशी निगडित नसून त्याचा अर्थ "मार्तंडाप्रमाणे ज्याचे तेज फाकले आहे असा मल्हारी." असा घ्यावा लागेल.

तसेच बाणाई ही धनगरकन्या असणे स्वाभाविक असले तरी म्हाळसा ही लिंगायत वाण्याची मुलगी होती ही कथा नंतर कोणीतरी (लिंगायतांनीच) बनवलेली आहे हे उघड आहे. याचे कारण असे कि लिंगायत हा शैव पंथ असला तरी त्याची स्थापना बाराव्या शतकातील आहे. बसवेश्वरांनी खंडोबाचा आधी निषेधच केलेला होता हे आपण पाहिलेलेच आहे.

राजाला दोन किंवा अधिक पत्न्या असने हे त्या काळात गैर नव्हते. म्हाळसा हीसुद्धा धनगरच असण्याची शक्यता आहे. नंतर सामाजिक संदेश देण्यासाठी दोन समाजांतील पत्न्या  दाखवल्या जाणे शक्य आहे. खंडोबाचा घोडा व श्वान (वाघ्या) हे त्याचे मुळ रुप धनगर असण्याचेच द्योतक आहे.

नंतर जवळपास दीड हजार वर्षांच्या कालौघात खंडोबा ह क्षेत्रपाळ, पशुंचा संरक्षक देवता म्हनून मानला जात त्याचे आजचे स्वरुप बनले आहे. मुळ इतिहास नीटसा लक्षात न ठेवला गेल्याने दंतकथांतुन अद्भुतरम्य कथा खंडोबाभोवती गुंफल्या गेल्या. कर्मकांडांचा त्यात समावेश झाला. वाघ्या-मुरळीसारख्या अनिष्ट प्रथाही निर्माण केल्या गेल्या. आज त्या कायद्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. होळकर घराण्याने जेजुरीच्या विकासात अनमोल योगदान दिलेले असून ते सर्वांस माहितच आहे!

* * *

54 comments:

  1. इतिहासाची इतकी ओढाताण करून हा लेख लिहायची काहीच आवश्यकता नव्हती, कारण आधीच इतिहास पूर्ण विकृत झालेला आहे, म. फुले म्हणतात कि महसुलाचा अधिपती म्हसोबा आणि खंडोबाचा अधिपती खंडोबा, त्यांनीही उगाच संजय सोनवणी सारखे ओढाताण करायचे काम केले कि काय? विचारांची बैठक चुकीची आणि पर चष्म्यातून बघायची असेल तर चालू तुमचे आख्यान, अब्बा-बाब्बा, आणि अस्थ्प्रधान मंडळ होयबा करायला हिरहिरीने हुजरे करयाला तयाराचे असतात.. फक्त खंडोबाचा हिडीस खेळखंडोबा करू नका. इतकेच.

    ReplyDelete
  2. वरील कॉमेंट लिहिण्याचे कारण,
    आत्तापर्यंत मी कुठलाच धनगर घोड्यावर फिरताना पाहिलेला नाही. इतक्या मेंढ्या पाळतो तर त्याला एक घोडा पाळणे अशक्य नाही. पण तो घोडा पाळत नाही ह्याची महत्वाचे कारण असे कि त्यांना मेंढ्यांना चारायचे असते, त्यांना पळवायचे नसते. घोडा हा लढाईच्या कमी योग्य वाटतो, ह्यात मला धनगर बांधवांना दुखवायचा अजिबात हेतू नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. Dhangar lok ajub suddha ghode vapartat.

      Delete
    2. Avinash Pataskar Mumbai-Punyat basun kasa disel dhangar ghodyavar, to pahaycha aasel tar sahyadrichya kushit aani dongarrangat dhangaransarkhe bhatkave lagate

      Delete
  3. संजय सर ,
    आपण खूप उपयोगी माहिती दिली आहे , ती वाचून आपल्या देवाबद्दल नवीन शास्त्रोक्त माहिती मिळाली , आणि असे वाटू लागले की आत्ताच जेजुरीला जाउन खंडोबाच्या पायावर लोटांगण घालावे . हा देव म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका .
    मालिका झीवर दाखवत आहेत , त्यामुळे आपली माहिती जास्त उपयोगी पडली .
    आपण म्हणता तसेच वाटते , कि खंडोबा हा फार पूर्वीपासून घोडा आणि कुत्रे यांच्या साथीने या उभ्या महाराष्ट्रात निर्भयतेचे प्रतिक बनला आहे . खंडेराय हे ६२० मध्ये होऊन गेलेले जिवंत लोकनायक असणार हे नक्की . त्यांचे देवत्व त्याना कधी मिळत गेले हे नक्की सांगता येत नाही . शिवाजी महाराजांना सुद्धा देवत्व देण्याचा प्रयत्न संजय सोनवणी सरांनी हाणून पाडला , असे ते स्वतः कौतुकाने सांगतात , या खंडेरायाच्या बाबतीत ते अशी मोहीम राबवणार का ?कारण ऐतिहासिक लोकोत्तर पुरुषांची मंदिरे झाली तर चालणार नाही असे संजय सरांचे धोरण आहे , म्हणून संजय सर चला आपण खंडेरायाला त्याच्या मूळ स्वरूपात जाणते समोर आणू आणि त्याची देवघरातून सुटका करुया !

    ReplyDelete
  4. सर , आपण दगडालाही देव मानतो आणि आपल्या पूर्वजांचे स्मरणही त्याना देव्हार्यात ठेवून करत असतो . आपण अतिशय महत्वाची माहिती खंडेराया बद्दल देवून आम्हाला खंडेरायांच्या स्वरूपाचे नव्याने दर्शन दिले आहे , आपले फार थोर उपकार आहेत !आपल्या महाराष्ट्राचे विशेषतः पुण्याच्या प्रदेशाचे नेतृत्व श्री ख्स्न्देराय करत होते हे पाहून डोळ्यात आनंदाश्रू येतात .
    मल्हारी मार्तंड आणि त्याचे रूप समोर दिसू लागते . आपण हळद आणि मल्हारी यांचे नाते सांगून एक नवीन माहिती उजेडात आणली आहे . आपण यावर अजून लिहावे . मी भारतीय आणि लिहा वाचा हे या बाबतीत अजून माहिती देणार हि अपेक्षा आहे . तसेच आप्पा बाप्पा हेही काही सांगतील , आदरणीय पाटसकर सरांनी आधीच मार्गदर्शन केले आहे . संजय सर , सलाम !
    आपण सध्या फेसबुक वर नसता म्हणून आपल्या लोकांची इथली उपस्थिती वाढेल असे वाटले होते . पण कदाचित त्याना इथे लिहिण्याची सवय नसावी .

    ReplyDelete
  5. great , please write something more about our malhari martand !

    ReplyDelete
  6. खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे. खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात. खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही. मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदी मैलार स्थान आहे, असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी > नळदुर्ग > पाली किंवा पाल (ता. कराड, जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला. मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा.

    ReplyDelete
  7. मल्हारी महात्म्य.

    संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्त्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुदा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० - १७४० च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे. खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आहेत.
    एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.
    खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. तिसऱ्या पत्नीचे नाव रमाबाई आहे. चौथी पत्नी फुलाई जातीने तेलीण आहे तर पाचवी चांदाई मुस्लिम आहे. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
    दुसरी पत्नी बाणाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संपप्त झाली. तेव्हा बायकांचा झगडा थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.

    ReplyDelete
  8. अहो लिहा वाचा तुम्ही ते नेटवरील अद्यावत ज्ञान टाकून मला मोठे अडचणीत टाकले, वरील लेख वाचून मला इकडे मोठा शोध लगला होता… युरेका, युरेका , म्हणजे असे बघा कि
    आदिमानव (आद्य मानव) + घोडा + कुत्रा = खंडोबा+घोडा +कुत्रा = शिवाजी + घोडा +कुत्रा = धनगर +घोडा + कुत्रा
    म्हणजेच
    आदिमानव (आद्य मानव) = खंडोबा = शिवाजी = धनगर,
    तात्पर्य:
    १) म्हणजेच नार्मदेच्या खालचे सगळे लोक पूर्वी धनगरच होते.
    २) मानवाचे, कुत्र्याचे आणि घोड्याचे त्रिकुट जमल्याचा इतिहास किमान ६० ते ७० हजार वर्षे जुना आहे, म्हणजेच खंडोबाचा इतिहास तितकाच जुना असायला हवा.
    ३) म्हणजे ब्राम्हणेतर सर्व नार्मदेखालील लोक हे मुळात धनगर आहेत.
    ४) राम इत्यादी तुरळक वैदिक लोक इथे पूर्वी आले होते पण त्यांना हे धनगर दिसले नाहीत कारण धनगर सतत फिरत होते.
    ५) पांडुराष्ट्र, त्यातील पान्ड्रूपूर, औंद्र, जेजुरी इत्यादी हि मोठ्या यात्रा आणि एकत्र येण्याचा जागा होत्या. इथे धनगर लोक एकत्र येत, बहुतेक मेंढ्या एकत्र येत नसाव्यात. त्या कुठेतरी दूर असाव्यात.
    ६) अश्मक, कुंतल, अपरांत, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र, मार्तंड, माल्लारी ह्या शब्दांवरून धनगर लोक संस्कृत किवा तत्सम भाषा उत्तम जनत होते असे दिसते.
    मग
    चि. वि. वैद्य = चि. वि. जोशीं
    हे एकच का? आर्य आक्रमण सांगणारे? म्हणजे वेद्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून धनगर आहेत.
    विच्छेद:
    १) धनगर पायात चपला घालत होते कि नव्हते? घालत असतील तर ते कोण बनवीत असे?
    २) ते लोखंडी हत्यारे ( खंडा) वापरत होते कि नव्हते? असतील तर ते कोण बनवीत असे?
    ३) धनगर फक्त मांसाहारी होते का? जर ते शाकाहारी होते तर शेते कोण पिकवित होते?
    ४) धनगर खांद्यावर घोंगडे घेतात, पूर्वी ते कमरेला आणि डोक्याला सुद्धा गुंडळात होते कि, वस्त्रे त्यावेळी होती? मग ती कोण बनवत असे?
    ५) हळद कोण पिकवित असे?
    ६) दगड फोडून मंदिरे कोण बांधत असे? असे अनेक प्रश्न् येतात.
    शिवाजी + घोडा - वाघ्या = मराठा, असे गणित मांडले तर
    खंडोबा + वाघ्या - घोडा = धनगर असे विचित्र उत्तर मिळते.
    म्हणजे घोडा = कुत्रा = आदिम मानवाचा जवळचा मित्र हा सिद्धांत पुढे येतो.
    गावांची पूर्वीची संस्कृत नावे जावून त्या ठिकाणी आत्ता आपण किती विचित्र अपभ्रंश झालेली नावें वापरतो ते बघा ना, पुणे, सातारा, यवत, चौफुला, वाडी, कुर्डू, फाटा…
    उत्तरे:
    १) म्हणजे हि कामे करणारे सगळे लोक ह्या धनगरांच्या उपजाती होत्या आणि त्या उपजाती पंढरपूर, जेजुरी ह्याठिकाणी राहत होत्या. सदैव फिरणारे धनगर ह्या ठिकाणी जाऊन वरील वस्तूंच्या गरजा पूर्ण करून घेत असावेत.
    २) आता पुढे धनगर त्या विशाल दंडक अरण्यात रस्ते नसताना कसे फिरत असत, आत्ता महामार्ग आणि मोठमोठे बोर्ड लावले असताना आपण रस्ते चुकतो, मग त्यांनी वेगवेगळ्या खाणाखुणा मार्गावर करून ठेवल्या होत्या. त्यांनाच ते हि मोठी देवस्थाने ते समजत असावेत. ते शिवाय त्या निबिड अरण्यात हिंस्त्र श्वापदे आणि जंगली मानव तर असणारच, म्हणून घोडा, भाला, खंडा आणि कुत्रे आले आहे.
    हे पहा ना सगळे कोडे एकदम मस्त उलगडले ना,
    शिवाय ते मातृ पितृ पूजा = लिंग पूजा हेही एकदम चपलख जुळतात. लिंग पूजेतूनमुर्तीपुजेकडे जाताना, बहुतेक घोडा कुत्रा घुसवले गेले असावे, आता हे कोणी करून ठेवले? ते काही का असेना. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे वरील सिद्धांताने आपोआपच मिळतात. सध्या आरक्षणाचा प्रश्न ह्याच प्रकारे किती चटकन सुटतो ते बघा, शिवाय जातव्यवस्था हा प्रश्न अगदीच निरर्थक ठरतो.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. आप्पा - मन अस्वस्थ करणारी माहिती श्री पाटसकरांनी दिली आहे
    बाप्पा - एका सत्य्काठेतून त्यांनी खंडोबाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातूनच त्यांचीही खरी ओळख झाली , अविनाश पाटसकर आपली आज्जी अमर आहे , तिला विनम्र अभिवादन ! अशी माणसे घराणी जिद्दीवर जिवंत ठेवतात आणि देवरूप होऊन जातात .
    आप्पा - आपली आज्जी देवपणास पोचली होती आणि तितकीच आधुनिकही होती . आपल्या घरच्यांनी बरेच काही सोसले आहे . आपणास टीकात्मक लिहिणारे बुद्धीचे दिवाळखोरच असणार !आपल्यावर या विषयात - विशेषतः आपल्या आज्जीच्या बाबतीत आपल्या शत्रुचीही टीका करण्याची अथवा अपशब्द लिहिण्याची शामत नाही ! आपल्या आज्जीस नम्र सलाम !बाकी सर्व आपण जाणताच ! म्हणजे आम्ही ब्राह्मण आणि वैदिक इत्यादी आपले शोध आपण लावलेलेच आहेत !

    ReplyDelete
  13. अविनाश पाटसकर , आपल्या आज्जीस आदरपूर्वक नमस्कार !
    प्रत्येकाचे बालपण असेच भारावलेले असायचे पूर्वी ! म्हणूनच ते मंतरलेले दिवस आणि आजचे चंगळवादी दिवस यांचा संवाद होऊ शकत नाही , संवाद किंवा वाद झालाच तर तो आपल्या जुन्या लोकातच होतो . आणि त्यातूनच वितंडवाद न होता सुसंवाद साधत नवे मैत्र गवसते . आपण मन मोठ्ठे करून कसे जगावे हे या जुन्या आज्जी आजोबांनी आपणास शिकवले म्हणून तर आपण आज इथवर आलो आहोत . आपण कसे तग धरून शिकलो आणि मोठ्ठे झालो हे आजच्या पिढीला माहीतही नसते . त्याना सांगायला गेले तर ते म्हणतात - मग त्यात काय - ते तुमचे प्राक्तन होते आणि आपण निरुत्तर होतो - आपण जे जीवन जगलो आणि त्यातून शिकलो - तो हा घेतला वसा न टाकता आपण पुढच्या पिढीस दिला पाहिजे . त्यांच्या जीवनात सुद्धा एक प्रचंड पोकळी येऊ घातली आहे , ती आपण भरून नाही काढायची तर कोणी ?
    आपल्या आज्जीच्या जीवनास विनम्र अभिवादन !

    ReplyDelete
  14. अविनाश सर , आपले मन मोकळे केले त्यामुळे आपले दुःख नक्कीच हलके झाले असेल .
    जुन्या पिढीतील लोकांनी आपले कुटुंब अतर्क्य बलिदान करून नव्या जमान्यात आणले आहे . अशा लोकाना विसरणे म्हणजे स्वतःशी प्रतारणाच ठरेल . आपण हाच वसा पुढे अशाच कारणासाठी घेतला वसा टाकणार नाही या व्रतस्थ भावनेने जपला पाहिजे .
    आज्जीस विनम्र अभिवादन !

    ReplyDelete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. श्री पाटसकर सर ,
    आपल्या आज्जीस मानाचा सलाम
    अशा हजारो आज्जीनी वेगवेगळ्या जातीत आपली कुटुंबे अडी अडचणीवर मात करत वर आणली आहेत , अशा लोकांचे आजच्या पिढीवर अनंत उपकार आहेत . ह्या कोणी थोर लेखिका नव्हत्या किंवा महान विचारवंत नव्हत्या , पण त्याना दुर्दम्य इच्छाशाक्तिनी अशक्य ते शक्य करून दाखवण्याचे सामर्थ्य दिले म्हणूनच आपला समाज जरी जातीवर आधारित असला तरी , स्त्रीत्वाची ही लढाऊ वृत्ती सर्व जातीत दिसून येते . , नुसते लेखन करून आणि मोर्चे काढून समाज घडत नाही हेच खरे , त्यासाठी अशी जीवनाशी झुंज देणाऱ्यां घरातील माणसांची गरज असते , आज घराचे घरपण जपण्याचे अवघड काम यांच्या समोर आहे . प्रलोभने खुणावत आहेत , संसार मोडत आहेत , आपण आपल्याच हाताने आपला सर्वनाश करून घेत आहोत , आज अशी आज्जी प्रत्येकाला मिळाली तर ? तो सोन्याचा दिन येवो ,

    ReplyDelete
  17. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. Nice info

    खंडोबाचा घोडा व श्वान (वाघ्या) हे त्याचे मुळ रुप धनगर असण्याचेच द्योतक आहे.>>>>याbबद्दल स्पष्टीकरण मिळेल काय ? शंका उपस्थित करत नाहीये सहजच विचारतोय माहीतीsसाठी

    ReplyDelete
  20. संजय सोनवणी सर ,
    आपण खंडोबा बद्दल माहिती लिहून अतिशय समयसुचकतेने अनेक मुद्दे मांडले आहेत . आणि त्यामुळे नवीन शंका येत जातात , हेच आपल्या लिखाणाचे वैशिष्ठ्य असेल कदाचित , त्यामुळेच लेख आणि प्रतिप्रश्न असे चालू राहते ,
    सध्या दाखवत असलेल्या मालिकेत नारद आणि गणपतीचा सहभाग अत्यंत महत्वाच्या क्षणी कथेला नवीन दिशा देताना दाखवला आहे . माननीय महेश पाठारे हेही कष्ट घेऊन कथानक लिहित असतील असे जर मानले तर मग , नारद हा वैदिक मानायचा का ? आणि तो या कथेत इतका महत्वाचा कसा ठरतो ? गणपती हि देवता शैव कुटुंबातील आहे परंतु ती वेदात सुद्धा आहे का ?
    गणेश चतुर्थी जवळ आली आहे त्यामुळे आपण खंडोबा प्रमाणे श्री गणेशावर संशोधनपूर्ण लेख लिहिला तर आनंद वाटेल . कारण असे दिसते की वैदिक आणि वैदिकपूर्व दैवते कुणी कधीकाळी अशीकाही बेमालूम पाने एकमेकात गुंफून टाकली आहेत की त्यामुळे वैदिकच बाटून शैव धर्माचे पुरस्कर्ते असल्याचा बनाव करत शैव धर्म विस्कळीत करून त्याचे मक्तेदार बनले आहेत हे कोणाच्याच लक्षात येत नाही . शिव आणि शक्ती ही रूपे आपलीशी करत त्यांनी इंद्र आणि इतर देवताना बाजूला आजच्या तथाकथित हिंदू धर्माची मक्तेदारी स्वतःकडे घेतली आहे .
    मुळात आद्य शंकराचार्य यांना काय अभिप्रेत होते तेच स्पष्ट होत नाही !त्यांचा काल आपण म्हणता त्याप्रमाणे इ स १००० धरला तर , मुस्लिम येण्याच्या सुमारास त्यांचे सर्व वाग्मय आणि चार आश्रम निर्मिती झाली असे समजावे लागेल . त्याकाळात बुद्ध आणि जैन मते मोडत आपला सिद्धांत स्थापन करत असतानाच मुसलमान आक्रमणाची त्याना चाहूल लागली असेल का ?
    नवनाथ हे सुफी पंथाला दिलेले शैव धर्माचे उत्तर आहे का ? असे अनेक विचार डोक्यात येत राहतात ! आपण यावरही काही लिहावे हि विनंती आहे

    ReplyDelete
    Replies
    1. महेश पाठारे ki महेश कोठारे? त्यांनी मागे सांगितले होते कि जय मल्हार हा कमी बजेटचा कार्यक्रम असल्याने त्यात खंडोबाचे अचाट पराक्रम आम्ही अनिमेशनच्या आणि तंत्रज्ञान विषयक कमी बजेट मुळे दाखवू शकत नाही, शक्य तितक्या सामान्य पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही पुढे रेटू! शिवाय त्यांनी "होणार सून मी ह्या घराची, जुळून येती रेशीम गाठी" ह्या धर्तीवरच जय मल्हार पुढे चालवू असे सांगितले होते. महाराष्ट्र तईम्स ह्याची बातमी आली होती. आता बघा कोण कशासाठी आपला इतिहास बदलतो ते! कोणी वैदिक धर्मासाठी तर कोणी बजेट साठी. जय मल्हार!!

      Delete
    2. http://www.esakal.com/esakal/20150222/4732670231338481978.htm he wacha

      Delete
  21. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  22. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. manniy saheb, tumchya mhannyanusar इथे राहणारे ऋषी he jar ka इथलेच asatil tar. ???..................... aani pudh jo kay dongar ubha kelay tyachi tumhalach dhanyta vatate

      Delete
    2. kon jane he lok kashamule etihasachi aai-may kartat je aahe te aamchya sarkhya bholya bhabdya lokana many aahe tyat kashala dhavala dhaval karaychi. aani punha mhanu naka he maz nahi mi nahi tyatali, kadi lav aatali) mala vatat aashach kahi goshtimule Orad sutatey(dabholkarana maral....pansarele maral.......) mhanu

      Delete
  23. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  24. चर्चा खंडेराया वरून सुरु होऊन वहावत कुठे गेली ? कोण मुरली आहे आणि कोण वाघ्या आहे , कोणाची आज्जी कशी आहे आणि कोणी काय सोसले आहे याच्याशी या चर्चेचा किंवा लिखाणाचा काहीही संबंध नाही . आणि आत्ता संजय सोनावणी याना सर म्हणून उद्हृत करायचे आणि यापूर्वी त्याना क्षुद्र जंतू म्हणून हिणवायचे , हा कोणत्या मुरलीने शिकवलेला संस्कार आहे . या लोकाना स्वतः विषयी कणव निर्माण करून सर्वांची सहानुभूती मिळवण्यात काय आनंद वाटतो ? हा कसला आनंद ?अशा जीवनाचा काय अर्थ ?
    असले आचरट उद्योग या ब्लोगवर चालू ठेवणे योग्य आहे काय ? अशा कितीतरी जाती आणि व्यक्तिमत्वे आहेत ज्यांनी अनेक असह्य प्रकार भोगले आहेत . पण कधी त्याच्या कथा केल्या नाहीत !आपलीच दुःखे उगाळत जनतेची सहानुभूती मिळवायची ही न्यारीच रीत म्हणायची ,
    अरेरे अशा जातीत जन्म घेणे आणि आपली दुःखे मिरवणे यात काय पुरुषार्थ (?)

    ReplyDelete
  25. थांबव रे बाबा ,
    एकदा खडी फोडायला लावायची भाषा करतोस आणि एकदम घरातली कथा वेशीवर टांगतोस , अरेरे , हि काही आपली पद्धत नाही . अरे काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी ठेव , तुम्हाला कसली म्हणा मनाची लाज ? लाज कोळून प्यायलेले तुम्ही लोक !
    आपल्याच घरातल्या थोराना दूषण देतो आहेस , कमाल आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. गोरे आणि भूपाल हि माझी कथा नाही हजारो ठिकाणी लिहिलेली आहे. आणि तोंडाने पाठ असलेली आहे. मी कुनाला क्षुद्र जंतू म्हणत नाहीत तेच स्वतःच्या हाताने बनतात. गोरे तुझी लायकी खाडी फोडायची आहेच ती तर तुला कराव्हीच लागणार

      Delete
    2. gore tu jara he vaach tula thodi tari akkal yeil http://www.jejuri.net/kadepathar/

      Delete
  26. पाटसकर बुवा ,
    मी कौतुक केले ते आज्जीचे , तुम्ही काहीतरी बोध घ्या आणि असे अद्वातद्वा गोरे आणि भूपाल याना बोलणे सोडून द्या , कारण आपण खाडी फोडायला लावणार हि भाषा वापरता त्याचा मी तीव्र निषेध करते आणि आपण कौतुक करायच्या लायकीचे नाही हेपण ठासून सांगते .

    ReplyDelete
  27. तुम्ही इतके असभ्य कसे , सार्वजन आपल्या आज्जीचा सन्मान करत आहेत तेंव्हा ठीक पण जरा कोणी विरुद्ध लिहिले तर ते पचनी पाडायची मानसिक ताकद आपल्यात नाही . लगेच अत्यंत असभ्य भाषेत बोलू लागता , तुम्ही मूळ रूप दाखवता हेच खरे , तीच तुमची लायकी आहे !, तुमचा निषेध करावा तितका थोडाच , आणि म्हणूनच आज्जीने तुम्हास असे वागवले .
    अत्यंत हिडीस विचाराचा हा माणूस आहे !

    ReplyDelete
  28. तुमचा निषेध करावा तितका थोडाच आहे . लाज नाही मना आणि कुणी काही म्हणा अशी तुमची गत आहे . अहो काका , इतके कसे तुम्ही मागासलेले ? मागासलेला माणूसही सुसंस्कृत वागतो , पण आपण तसेही नाही , खाडी फोडायला लावणार हि भाषा ? कशाबद्दल ? आणि तुम्ही कोण ? टिनपाट ?
    काय आहे काय जगाच्या उपयोगाचे ? आणि जगासाठी काय केले आपण वेगळे ? तुमचा समाजाला उपयोग काय ? असे वागले तर आज्जीही असेच वागणार तुमच्याशी !अगदी बरोबर वागली आजी !
    एकतर तू घमेंडखोर आहेस आणि समाजा साठी निरुपयोगी आहेस !
    तुझा मी निषेध करते . आदरार्थ बहुवचन वापरण्याच्या लायकीचा तू नक्कीच नाहीस ,
    खाडी फोडायला जाशील असे शब्द वापरणे हा तुम्ही शब्द वापरता , इतके तुम्ही खालच्या विचारांचे आहात ? तुम्ही कसे काय पाटसकर ? अहो पाटसकर थोर माणसेपण होती ,
    पाटसकर ह गो हे आपल्या घटनातद्न्य होते , पद्मविभूषण होते . आपण त्यांचा आदर्श जरी समोर ठेवला असतात तरी थोडीफार अक्कल आली असती , पण तुम्ही दळभद्री !ह गो पाटसकर भारताच्या कोंस्टीटयूशनल असेम्ब्लीचे मेंबर होते , जरा सभ्य बना ! आपल्याच आडनावाचे आदर्श ठेवा .
    तुमचा धिक्कार असो !

    ReplyDelete
  29. अरे अविनाश पाटसकर , इतरांच्या लिखाणाचा दर्जा बघ , तू आपला उठसुठ लोकांवर अतिशय गलिच्छ लिहित असतोस . लोकांकडून शाबासकी नको असेल , अगदी सडेतोड लिहिणारा असशील असे म्हणावे तर तेही नाही , नुसतीच बडबड ,
    किती कचरा लिहित असतो ?त्यापेक्षा लिहा वाचा यांचा अभ्यास बघ , ते तुझ्यासारखे खाजगी लिहून सहानुभूती वर जगात नाहीत . . स्वतः संजय सरांचे उदाहरण बघ , किती कष्टांनी त्यांनी आपले करियर केले !
    अतिशय अभ्यासपूर्ण त्यांचे लिहिणे असते आणि त्यांचे वाचनही दांडगे आहे ! तू असा इतका निरर्थक कसा रे बाबा ? आणि दुसर्याना अडचण का होतोस ?

    ReplyDelete
    Replies
    1. Bhupal- charcha sarva vyavsthit chalu hoti tumhich vada la survat keli.

      Delete
  30. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  31. अहो पाटसकर दादा ,
    तुम्ही मात्र संजय सोनावनी या ब्लोग लेखकाला भिकारचोट असल्या अश्लाघ्य शब्दात बोलता ? लाज नाही वाटत , ज्याच्या घरी जावे त्यालाच बदनाम करायचे आणि वर तुम्हाला कोणी बोलले तर त्याला खाडी फोडायची भाषा सुनावायाची ? वारे वा , कुठे शिकलात हे असले चाले ? नक्कीच तुमच्या घरच्यांनी असे शिकवले नसणार , कारण आम्ही तुमच्या आज्जीला सलाम करतो , अशी माउली असे संस्कार करणार नाही ! , आम्हाला खाडी फोडायची भाषा शिकवता आणि संजय सोनवणी याना काहीही बोलता , आणि पाल्पुतेपणे त्या टिपण रद्द करता ? काय हा पाल्पुतेपाना ! , अरेरे , संजय सर तुम्हाला क्षमा करोत हि सदिच्छा !
    आम्हाला तुमच्या आज्जीबद्दल परम आदर आहे पण तुमच्या बद्दल किळस आहे .
    आम्ही पेपर गल्लीतले लोक असेच म्हणणार
    तुमचे आडनाव भगिनी , इतर विदुषी , आणि वयस्कर लोक , आपणास सुधारण्याची संधी देत आहेत , असे कुणासही छोट शब्द वापरून अपमानित करू नका , बदल्यात मग असेच ऐकत बसावे लागेल ,
    आमच्या पेपर गल्लीचा हाच न्याय आहे

    ReplyDelete
    Replies
    1. Gore saheb tumchya kal lavya swabhava mule nehmi ya blog chya charche madhe vyatay yeto. tumchya dokyatle galicha vichar fakt susanskrutpane lihale mhanje te susanskrut hot nahit ulat tumcha kaptipana ughad hoto.

      Delete
  32. हा पाटसकर अस्सल चिकट माणूस आहे हे नक्की . कुणी काय बोलले हेच चिवडत बसायचे अहो तुम्ही संजय सोनवणी याना भिकारचोट म्हणता ते बरोबर आणि सभ्य आणि तुम्हाला कुणीतरी उदाहरण देत म्हटले की त्यांच्या गल्लीत अशा लोकाना काय म्हणतात , तर तो तुमचा अपमान ? तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? अहो हरी गोविंद पाटसकर हे पद्म विभूषण होते , महान होते आणि तुम्ही ? पाटसकर या आडनावाचे बदनामिकरण करत आहात !
    या सर्वांनी तुमच्या आज्जीला सन्मान दिला , सर्व संकेत पाळले , आपल्या लिखाणाचे कौतुक केले आणि तुम्ही एकाच पालुपद चालू ठेवले आहे . यातून कोनाचे हसे होत आहे ? लिहा वाचा , मी भारतीय , आणि आप्पा बाप्पा , आगाशे , आणि स्वतः सोनवणी सर आपापल्या बुद्धीने आणि तर्काने या ब्लोगाची महती वाढवत असतात . इथे पूर्वी कितीतरी अश्लील लिहिले गेले आहे , अनोनिमस लिखाण संजय सरांनी बंद करवले त्यावेळे पासून लिखाणाची पातळी खूप सुधारली आहे , आपण कितीही कांगावा केलात तरी असभ्य लिखाण करायची आपली सवय दिसते हे स्पष्ट आहे , उगाच दुसऱ्यावर त्याचे खापर फोडू नका ! आता नवनवीन लोक लिहू लागले आहेत , निशांत ,स्नेहप्रभा , हिर्डोशिकर ,संजय क्षीरसागर ,झेन ,मोहन पाटील असे लोक आता आवडीने बोलते होत आहेत , अशावेळी आपण असले तमाशे करू नका , त्यासाठी वेगळी जागा असते , हे तुम्हास मी सांगायची गरज नाही , सुज्ञास अधिक सांगणे नलगे
    जयजय रघुवीर समर्थ

    ReplyDelete
  33. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  34. नक्की नक्की कायमची रजा घेता ? अतिउत्तम !
    आम्हाला तुमच्या पुराण कथांचे कौतुक नाही आणि तुमचेही नाही !
    आता कधी मांजरा सारखे आडवे येऊ नका ! उपकार होतील आमच्यावर इतके केले तरी !

    ReplyDelete
    Replies
    1. Mansi Tai- tumhi blog chya malkin nahi ahat.... Avinash bhadak tat te hyach mule aani tumhi tyanchi majja baghat tyanchi tarr udavta..

      Delete
    2. अमितदादा अमितदादा ,
      भागलास का - लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का
      लिंबोणी च झाड करवंदी
      अमितचा वाडा चिरेबंदी ,
      अमित्दादा , सर्वांच्या शंका स्वतः संजय दादाने उत्तर दिल्याने संपल्या आहेत , ना मी या ब्लॉगची कुणी आहे , ना तू ना अजून कुणी ! ओ के ?

      Delete
    3. संजय हि डबल ढोलकी आहे हे मीच त्याला स्पष्ट सांगितले आहे, तो ब्लॉगर वर तुमच्या लोकांच्या जाळ्यात फसला आणि फेसबुक वर मस्त गम्मत फिरतो, त्याने काय खरे खोटे ठरवावे? ब्लोगाची कमी झालेली किंमत ह्यामुळे तो अजिबात इकडे लक्ष देत नाही, आणि ज्या कोणी ह्या चांदोबावाल्या बाई आहेत त्यांनी आपल्या छकुल्यांना चांदोबाच्या गोष्टी सांगून झोपवावे. इथे सूर्याच्या उजेडात येउन थून्केगिरी करायची गरज नाही, ते आपोआप आपल्याच थोबाडावर पडते हे तिने आपल्या छकुल्यांना सांगावे, म्हणजे ते पुढे थोडे सुधारतील. संजयला हा ब्लोग खाजगी करायचा असेल आणि तुमच्यासारख्या डबक्यातल्या लोकांचा उदोउदो करायचा असेल तर त्यांनी तो आधीच करून ठेवावा. बाकी संजय सांगत फिरतो कि खंडोबा पशुपालक धनगरी लोकांचा, पण हेच मुळात चूक आहे. कारण मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात महाराष्ट्र व दक्षिण प्रदेशात पशुपालक लोक हे शेती करणाऱ्या लोकांच्या फारच पूर्वी अस्तित्वात होते. संजय हे सिंधु ह्या शेतकरी संस्कृतीवरून अचानक विना पुराव्या हजारो वर्षे मागे जाऊन पशुपालक धनगर इतिहास मांडतात हेच मोठे मिथक आहे. त्यांना मानवी उत्क्रांतीचे टप्पे कळलेच नाहीत. किवा ते फेकाफ्की करून आत्ता धनगर सहानुभूती गोळा करायचा प्रयत्न करताहेत. हे चुकीचे आहे. मला अगदी मान्य आहे कि उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यात विशेषतः महाराष्ट्र व दक्षिणेत मानव शेती आणि पशुपालन असे इकडे तिकडे उद्या मारत असणार. स्वतःची अवस्था वाईट झाली कि पाळलेली बकरी कापून खात असणार. पण तुमच्या हे सगळे विचार करणे आकालेबाहेराचे आहे. तुम्ही तुमी आपले तेच तेच शेत शोधात खात बसा. बाकी मी आणि संजय ह्या जन मंचावर आलोय त्याचे मी माझे बघतो तुमच्या फुकट सल्ल्याची इथे गरज नाही.

      Delete
  35. खरच ग मानसी , अगदी माझ्या मनातले बोललीस !
    आपली कायमची यांच्या भाकड कथा पासून सुटका झाली
    एकीकडे फाफट पसारा मांडत पुराणातलेच दाखले देत वैदिकाना बदनाम करत जगणारे हे काही एकटेच नाहीत .
    बरे झाले कटकट गेली , सुंठीवाचून खोकला गेला ! आता ही अवदसा परत यायला नको इकडे !
    खाडी फोडायला लावणारे ! आमच्या संजयला भिकारचोट म्हणता ना ?
    परत भेटू नका !

    ReplyDelete
  36. आप्पा- असे कसे झाले ?
    बाप्पा - काय झाले ?
    आप्पा - आपल्या संजयला " भिकारचोट " कोण म्हणाले ?
    बाप्पा - कुणीतरी म्हणाले , त्यात काय एव्हढे ?
    आप्पा - प्रश्न तो नाही , संजयने असे अनेक लढे लढले आहेत , त्या शब्दांचे त्याला काहीच नाही , कारण शब्दांपेक्षा ते बोलतो कोण याला महत्व असते .

    म्यानातुनि उसळे तरवारीची पातवेडात मराठे वीर दौडले सात !

    ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
    सरदार सहा सरसावुनि उठले शेले
    रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
    उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
    वेडात मराठे वीर दौडले सात !

    आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
    अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
    छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
    कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
    वेडात मराठे वीर दौडले सात !

    खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
    समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
    गर्दीत लोपले सात जीव ते मानी
    खग सात जळाले अभिमानी वणव्यात
    वेडात मराठे वीर दौडले सात !

    दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
    ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
    क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
    अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात
    वेडात मराठे वीर दौडले सात !
    जेंव्हा महाराज जिव्हारी लागणारे बोलले त्यावेळेस काय घडले ,
    म्हणूनच कोण बोलले याला महत्व आहे , काय बोलले ते नंतर .
    संजय सर खंबीर आहेत आणि त्यांचे भक्तही भक्कम आहेत !

    ReplyDelete
  37. हा ब्लोग संजय सरांचा आहे .
    हा ब्लोग माणसे जोडण्यासाठी आणि मत मतांतराची नोंद घेण्यासाठी आहे
    भांडणे करण्यासाठी नाही . तत्वाची भांडणे ही स्वागतार्थ आहेत , पण अशी भांडणे हास्यास्पद ठरतात आणि पोरकट पणाला अंत नसतो !
    आमचे संजय सर त्याना कोणी अपशब्द बोलले तरीही गांभीर्याने त्याचा प्रतिवाद करतील , पण त्यात दम हवा ! तात्विक चर्चेपासून ते कधी दूर पळणार नाहीत , पण आचरत पणाला संजय सर कधीही खतपाणी घालणार नाहीत .

    ReplyDelete
  38. काय आहे आगाशे सर आणि आप्पा-बाप्पा आणि इतर सर्व, मला कोणी काहीही म्हटले तरी मला फरक पडत नाही. माझ्या अंगाला भोके पडत नाहीत. उलट जो काही विकृत शब्द वापरतो त्याची लायकी दिसते. मला माझ्या समोर बरेच काम आहे. ते परिपुर्ण नाही हेही मला माहित आहे पण मी नवीन संभावनांचा भोक्ता आहे. त्या बाद झाल्या तरी त्या बाद करायला नवीन प्रतिभावंत यावे लागतील हेही मला माहित आहे. इतिहासात नवीन संभावनांना स्थान मिळाले तरच ते जळमटे चढलेले पौराणिक सिद्धांत बाद करता येतील. येथे गंभीर चर्चा होत नाही त्यामुळे मी प्रतिक्रिया वाचून हसून पुढे जातो. हे लोक मला काय नाउमेद करणार? असो. धन्यवाद.

    ReplyDelete
  39. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  40. Khandoba was Dhangar worrier but our ancestors never documented any history....documents are lacking and some people made him god. We are living in India. Ha ha ha ha ha ha ha...they don't know value of documentations

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...