Sunday, March 27, 2011

संभाजी ब्रिगेड व भारत मुक्ती मोर्चा म्हणजे बहुजनीय चळवळ नव्हे!

मला काल (२६ मार्च) औरंगाबाद येथील प्रियदर्शी अशोक अकादमीसह विविध जिल्ह्यांतील १७ फुले-शाहु-आंबेडकरवादी संघटनांनी आयोजित केलेल्या "फुले-आंबेडकरांचा जातीअंताचा विचार आणि वर्तमान चळवळीचे वास्तव" या विषयावरील परिसंवादास उपस्थित रहाण्याचे भाग्य मिळाले. मी "भाग्य" हा शब्द अशासाठी वापरत आहे कि चळवळीचे परिसंवाद म्हनजे शिविगाळीचे, ब्राह्मणांवरील न संपणा-या आरोपांचे पाढे वाचत बसण्याचे अड्डॆ असतात असाच माझा अनूभव आहे. परंतू असे काहीएक न घडता (कोणीएका बहुजनीय चळवळीतील कार्यकर्त्याने प्रा. हरी नरके यांच्या भाषणाच्या वेळीस १-२ मिनीट केलेला गोंधळ वगळता) ही चर्चा अत्यंत मुलगामी, आत्मचिंतनात्मक, सैद्धांतिक मांडणी करत, भूत, वर्तमान आणि भविष्याची वाटचाल यावर अत्यंत प्रगल्भ, विद्वेषरहित चिंतन करणारी झाली. यामुळे बहुजनीय विचारवंत फुले-आंबेडकरांनंतर जी वैचारिक/सैद्धांतिक पोकळी निर्माण झाली आहे असा जो भ्रम निर्माण करण्याचा ज्या "शिव्यावादी" मंडळीने चंग बांधून चळवळच बदनाम कशी होईल आणि सर्वच सामाजिक स्तर तिचा द्वेष कसा करतील यासाठी वैद्वेशिक वातावरण निर्माण करत ती संपवण्याचा प्रयत्न करणा-या सरंजामशाही मनोव्रुत्तीच्या संघटनांच्या विरोधात मतैक्य करत ती द्वैषिक पोकळी भरून काढण्यास केवढे समर्थ आहेत याची प्रचिती आली, आणि त्यांना तेवढेच सामर्थ्य देणे ही सा-याच समाजाची जबाबदारी आहे याची जाणीवही झाली. खालील मजकुर हा माझे या परिसंवादाचे समग्र आकलन आहे, हे क्रुपया लक्षात घ्यावे.

बहुजनीय चळवळ बदनाम झाली आहे आणि तिचे पडसाद सर्वच सामाजिक स्तरांतुन येत आहेत हे एक वास्तव आहे. संभाजी ब्रिगेड आणि वामन मेश्राम प्रणीत बामसेफ़ वा भारत मुक्ती मोर्चा हेच काय ते एकमेव बहुजन-उद्धारक आहेत असा आव आनत ब्राह्मणांना शिव्या देणे म्हणजे बहुजनीय चळवळ असा नव-सिद्धांत बनवत समाजाला एका नव्या वांशिक आणि जातीय तणावाला सामोरे जाण्यास भाग पाडत नव-हिटलरशाही आणण्यअचा प्रयत्न कसोशीने करणा-या मंडळीनेही खरे बहुजनीय मतप्रवाह समजावून घेतलेले नाहीत हे एक दुर्दैवी वास्तव आहे.

या मंडळीचा नव-इतिहास फक्त जातीय द्रुष्टीकोनातुन लिहिला जातो आहे...जणु काही इतेरेजणांचा काहीच इतिहास नाही. असला तरी जणु तो काही सरंजामदारांच्याच वर्चस्वाखालील होता...ही जी नवी ऐतिहासिक मांडणी हे नव-सरंजामदार करत आहेत त्यावर प्रश्नचिन्ह उठणे स्वाभाविक आहे. ब्राह्मणांचा द्वेष शिकवत हीच मंडळी इतिहासातील आपली पापे लपवण्याचे अश्लाघ्य प्रयत्न तर करत नाहित ना असा प्रस्य्ह्न उद्भवला आहे. म्हणजे ब्राह्मणवाद जेवढा घातक होता तेवढाच हा त्यांच्याच वाटीने पाणी पिणारा राज्यसत्ता आणि अर्थसत्ता गाजवणारा समाज होता. प्रा. हरी नरके यांनी मनुस्म्रुतीतील श्लोक उद्ध्रुत करत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना विविध जन्मजात आरक्षणे उतरंडीनुसार दिली असली तरी शुद्रांना दिलेले एकमेव आरक्षण म्हणजे सर्वच उच्च-वर्णीयांची कोणतीही कुरकुर न करता, विना-मोबदला सेवा करणे हे होय. आरक्षण व्यवस्थेचे प्रवर्तक शाहु -आंबेडकर नसुन मनू होता असे मत त्यांनी त्यांच्या अध्यक्षिय भाषणात मांडले.

मग जाती-व्यवस्था निर्मितीची नेमकी कारणे कोणती?

हा प्रश्न भारतीय परिप्रेक्षात एकमेवद्वितीय आणि आजही आस्तित्वात असलेल्या जाती-व्यवस्थेसंदर्भात उठणे स्वाभाविक होते आणि त्यावर या परिसंवादात अत्यंत मुलगामी अशी चर्चा झाली. जाती व्यवस्थेचे निर्मिक-कारण ब्राह्मणी व्यवस्था होती कि ती विशिष्ठ सामाजिक रचनेमुळे निर्माण झालेली एक अपरिहार्य स्थिती होती यावर समाजशास्त्रीय चर्चा जगभर होत राहिलेली आहे. मा. प्रा. डा. प्रतिभा अहिरे यांनी या विषयाला हात घालत एक वेगळीच स्त्रीवादी उंची दिली आणि त्यांचे विश्लेशन हे जातीव्यवस्थेकडे पहाण्याचे एक वेगळे परिमाण देते.

हिंदू समाजव्यवस्था ही मुळात पुरुषप्रधान आहे आणि जाती असल्या तर त्या फक्त पुरुषांच्या आहेत. हिंदु स्त्रीयांना मुळात जातच नाही मग ती कोणत्याही वर्ण वा जातीतील असो. पुरुषाच्या (पित्याच्या) जातीवरुन मुलांची जात ठरते त्यामुळे स्त्रीयांना पुरुषसत्त्तक पद्धतीत
असले तर फक्त गुलामाचे स्थान असते. आणि ते खरेही आहे. प्रा. प्रतिभा अहिरे यांनी स्त्रीवादी भुमिकेतुन जातीव्यवस्थेचे जे विवेचन केले ते सर्वच हिंदु म्हनवणा-या स्त्रीयांचे आक्रंदन आहे. मग त्या ब्राह्मण असोत कि अन्य कोणी. स्त्रीयांना ख-या अर्थाने समता प्रदान करणे हेच जाती-अंत घडवून आणन्यातील महत्वाचे साधन ठरेल. . पुरुषसत्ताक पद्धतीतुन स्त्रीयांची मालकी ही परिवार, नातेवाईक यांचीच रहावी या भावनेतुन जाती बनत गेल्या आणि त्या कायम राहिल्या यामागे "स्त्रीयांची मालकी" हीच भावना केंद्रस्थानी होती असेही त्या म्हणाल्या

भारतात जातीयतेचे चटके बसले नाहीत असा एकही माणुस सापडणे अशक्य आहे. जातीच्या आधारावर चांगला-वाईट ठरवता येत नाही. जातींचे स्वर्थ हे सार्वत्रिक आहेत. फुले-आंबेडकर चळवळीतही स्वार्थी लोक घुसले आहेत. ही चळवळ तात्विक पातळीवर नेण्यात अशांना कसलाही रस नसतो. त्यांना सत्यशोधन म्हणजे नेमके काय हे समजत नाही. दांभिक आंबेडकरवाद्यांची गर्दी वाढत आहे. कोण प्रतिगामी आणि कोण पुरोगामी हे जातीवर ठरत नसून मानसिकतेवर ठरते. "जय भीम" म्हटल्याने कोणी आंबेडकरवादी ठरत नसुन अशांची मानसिकता तपासूनच त्यांच्या सचोटीबद्दल निर्णय घ्यायला हवा असेही विविध वक्त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक जातीतही जागतिकिकरणामुळे एक वर्गव्यवस्था निर्माण झाली आहे. पुरातन काळापासुन होणारे आर्थिक विषम वाटप (संपत्तीची निर्मिती अणि त्याबदल्यात मिळना-या बलुत्याच्या मोबदल्यातील अंतर.) हे सामाजिक -हासाचे कारण बनले आहे. आता ही स्थिती बदलली असली तरी जी नवीन वर्गव्यवस्था इर्माण होत आहे त्यातुन नवे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत, पण तरीही त्यातुन जाती-उन्मुलन होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. आत्मकथने, कथा कवितादी साहित्य जातीय साच्यांत अदकले आहे.

फूले-आंबेडकरवाद आता पुन्हा तपासायला हवा. त्यावर आधुनिक परिप्रेक्षात चिंतन करायला हवे कारण फूले-आंबेडकरांनी तत्कालीन स्थितीत आपली सैद्धाईतिक मांडणी केली होती, आता स्थिती पराकोटीची बदलली आहे असेही वक्त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. नरके यांनी आपल्या भाषणात अधिक स्पष्ट भुमिका घेत चलवलीत घुसलेल्या सांस्क्रुतिक दहशतवादी प्रव्रुत्तींचा थेट नावे घेत प्रहार केले. जे मुळात सत्ताधारी वर्गाचे आहेत, होते अशांनी फुले-आंबेदकर चळवळीचे अपहरण करत ते ठरवतील तेच फुले-आंबेडकरवादी आणि जे विरोधात जातात ते फुले-आंबेडकरांचे शत्रू असा प्रचार सुरु केला आहे. श्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तिकांतील अर्पणपत्रिका आणि अनेक उतारे त्यांनी वाचुन दाखवले. त्यातील समाजात भयंकर जातीद्वेष पसरवण्याचा, आणि मराठा समाजानेच नेत्रुत्त्व करत बहुजनांना हाती धरुन ब्राह्मणांनांविरुद्ध दंगली घडवण्याचा पुरस्कार करनारा उताराही त्यांनी वाचुन दाखवला. जेम्स लेनला आणि मनोहर जोशींना पुस्तिका अर्पण करणारे कसे शिवभक्त होतात आणि इतरांना ब्राह्मण द्वेष शिकवतात असा प्रश्न विचारुय्न ते म्हणाले कि अशा मंडळीमुळे चळवळ मुख्य उद्दिष्टाकदुन भरकटवण्याचा प्रयत्न होत असुन खरे तर यामागे राजकिय उद्दिष्टे आहेत. फुले-आंबेदकरांनी असा जातीद्वेष शिकवला नसुन त्यांनी समविचारी ब्राह्मणांना बरोबर घेतले होते. त्यांचा विरोध हा ब्राह्मणी व्यवस्थेला होता...सरसकट सर्वच ब्राह्मणांना नव्हे हे सांगीतले जात नाही, त्यामुळे फुले-आंबेदकरी चळवळ बदनाम होते आहे. वामन मेश्राम यांच्या भारत मुक्ती मोर्चाचे मुखपत्र "मुलनिवासी नायक" हे गेली ६ महिने प्रा. नरके यांची अत्यंत अश्लाघ्य पातळीवरून बदनामी करत असून त्याचा समाचार घेतांना प्रा. नरके म्हणाले अशी व्रुत्तपत्त्रे कोणत्या फुले-आंबेडकरवादाचा टेंभा मिरवतात? धादांत खोटे छापत त्या व्रुत्तपत्राने केलेल्या बदनामीबद्द्ल मी त्यांच्या विरुद्ध फौजदारी कार्यवाही करणार आहे.

खेडेकर आणि मेश्राम हे जातीय दहशतवादी असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले कि जाती-अंताच्या लढाईत अशीच काही मंडळी अदथळे आणत आहेत. मराठा आरक्षनाला विरोध का हे स्पष्ट करतांना ते म्हनाले कि घटनात्मक तरतुदी न पहाता ही मागणी केली जात आहे. शोषित-वंचितांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आरक्षण असुन त्यातीलही वाटा हडप करण्यासाठी ही चाल आहे. थोडक्यात ख-या बहुजनांना पुन्हा गुलाम बनवण्याचा हा प्रयत्न आहे. ब्राह्मणी सत्ता आणि मराठ्यांची राजकीय सत्ता यातील ही युती असून बहुजनीय लढा आता या दोन्ही प्रव्रुत्तींविरुद्ध असायला हवा तरच चळवळ प्रगती करेल असेही ते म्हणाले. चिकित्सा नाकारणे चुकीचे असून नव्या स्थितीत नवे आकलन करुन घेणे गरजेचे आहे. वामन मेश्राम आणि खेडेकरांनी सातत्याने शिवीगाळ, विद्वेष म्हनजेच फुले-आंबेदकरवादी चळवळ असे समीकरण रुढ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे...फूले-आंबेदकरांचे तत्वद्न्यान संपले आहे अशी भावना त्यामुळे निर्माण केली जात असून चळवळीकडे पहाण्याचा द्रुष्टीकोन दुषित होत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

या परिसंवादाचे मी स्वागत करतो कारण प्रथमच मला खरे फुले-आंबेदकरवादी भेटले, आणि त्यांची संख्या अफाट असल्याचेही जाणवले. अत्यंत ठाम-स्पष्ट सैद्धांतिक मांडणी करणारे, वर्तमानाचे परखड विश्लेशन आणि भविष्याचा, कसल्याही प्रचारकी भूमिका न घेता, वेध घेणारा हा परिसंवाद होता. ज्यांचा कसलाही अभ्यास नाही, नवे संशोधन नाही, चळवळीसाठी आवश्यक अशी सैद्धांतिक मांडणी नाही, विद्वेष ओकणे म्हणजे चळवळ असा समज करून घेनारे हे खरे फुले आंबेदकरवादी नसून खरी चळवळ त्याहीपार फार मोठी आहे या वास्तवाचे मला भान आले. फक्त या मंडळीने गरळी ओकण्याचा धंदा केला नसल्याने मुख्य प्रवाहाला त्यांचे भान नाही वा जानीवही नाही ही खेदाची बाब आहे. या परिसंवादात भाग घेणारे डा. प्रा. उत्तम अंभोरे, प्रा, डा. उमेश बगाडे, प्रा. डा. प्रतिभा अहिरे, प्रा. डा. श्रावण देवरे आणि प्रा. डा. संजय मुन यांचे मी मन:पुर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या आणि त्यांच्याच स्वतंत्र विचार करणा-या आणि अंतिम उद्दिष्टाचे भान बाळगणा-या सर्वच समद्धेयी मंडळीला शुभेछ्छा देतो. सर्वच समाजाने त्यांचे स्वागत करायला हवे. केवळ एखादी वैचारिक भुमिका आहे म्हणुन त्याला संपवण्याची भाषा करणा-या प्रव्रुत्तींचा मी निषेध करतो. ही नवी सरंजामशाही असुन ती समाजाच्या हिताची नाही. खरी चळवळ ही नेहमीच सत्य आणि समतेच्या वैश्विक सिद्धांतावर आधारीत असते, तीला राजकिय पैलु असणे हे विघातक ठरते. ज्यांना हिटलर हाच एकमेव आदर्श वाटतो (मग त्या ब्राह्मनी संघटना असोत वा काही बहुजनीय,) त्यांचा धि:कार सर्वांनीच केला पाहिजे.

Sunday, March 20, 2011

जैतापुर...त्सुनामी...आणि ही कविता...असली तर...

ही शक्ति नको तशी शक्ती नको
एन्रोन नको कि जैतापूर नको
कोळश्याची वीज नको
कि वायूची नको...
प्रदुषण नको कि
जीवाचा धोका नको...
किमान येथे
मी राहतो त्या परिसरात तर नक्किच नको...!

बघा कि दुसरी जागा...

पण वीज हवी...
लोड शेडींग नको...
शेतकर्यांवर अन्याय नको,
शहरवाल्यांवर तर आजिबात नको...
वीज गेली तर वीज मंडळापासुन सर्वांना
शिव्या द्यायची वेळ नको...
वीज नाही...
तर महासत्ता कधी होणार बाळांनो?
चला, वीज हवी...हवीच...

पण अशीही नको नि
तशीही नको!

प्रदुषण होणार...
रोज जो-तो गाड्या घेतोय तो काय
हवेत
सोडतोय सुगंध
वातावरण पवित्र करायला?
म्हणे जमीनी नापिक होतील..
नालायकांनो...
भरमसाठ पाणी आणि रासायनिक खते वापरून लाखो हेक्टर जमीन
नापीक करताय ते कोणत्या अडानचोट पर्यावरणवाद्यांना विचारून?
बघा स्वतालाच विचारून!

म्हणे समुद्र नासेल...मासे मरतील...
तसेही भरमसाठ मासेमा-या करून
ठेवलेच आहे काय त्या रत्नाकराच्या उदरात?
होताहेत तशाही लाखो समुद्र-प्रजाती नष्ट...
आहे काही करुणा त्यांच्याबदल तुमच्या ह्रुदयात?

जलविद्युत उर्जाप्रकल्प करावेत...
पण म्हणे धरणे नकोत...
धरण करा पण विस्थापने नकोत...
आदिवासी बिचारे दुर्लक्षित...
येतात यांच्यामुळे उजेडात...
क्षणभर नियतीशी तडजोड करत...
जगावेच लागते त्यांना
मिळेल ते घेत...
आणि हे
गळ्यापर्यंत पाणी येईपर्यंत
जलसमाधीची आंदोलने करणार
आणि तरीही शेतीला पाणी हवे आणि
वीज हवी ही बोंब हेच मारणार...
म्हननार "नाहीतर महासत्ता तुम्ही कसे बनणार?"
खराय...
पण मग वीज काय आभाळात जावून बनवणार?

खाटल्यावर जवळपास मरतात सारे
म्हणुन खाट कोणी सोडत नाही...
रस्त्यावर मरतात काही
म्हणुन रस्ता कोणी त्यागत नाही...
पण मरणाची काल्पनिक दाखवून भीती
हे दल्ले
आपला धंदा सोडत नाही!

सत्याशी यांचे मन करत नाही ग्वाही
असते मिरवायाचे
जन-हित-समाजप्रेमी लवलाही
पण जरा विचारा त्यांना
विकत तुम्हा कोण घेई?

हे खरेच आहे निसर्ग
करणार तयाची मनमानी
लाखो वाहुन जाती प्रतिवर्षी
महापुर...ढगफूटींतुनी
भुकंप-दुष्काळांतुनी...
कधी मरतो आपण क्रुत्रिम रोगरायांनी...(जसे स्वाईन फ़्ल्यु मधुनी...)
मरनाची मानवी यंत्रे असता एवढी कार्यरत अविरत...
भय निसर्गाचे का मग?
तक्रार कशाची अन कोणाची
निसर्गाची कि
मानवी स्वार्थांची?

म्हणे नको अणुवीज प्रकल्प
जपान उदाहरण किती उपयुक्त
अरे भाट अन मुर्खांनो
येतो काळ कधी का सांगत?
तुम्ही भाट स्व-स्वार्थाचे...
काळ तुम्हा कधी कळे काय?

नपुंसक आधीच झाले हे सगळे
दाखवती भीती नपुंसकत्वाची
प्रगती हवी म्हणे हेच
हे वांझ प्रगतीवादी...

एन्रोन हवेही होते
एन्रोन नकोही होते
मार्क रीबेकाच्या
गळमीठीत अडकले होते...
एन्रोन नकोही होते
एन्रोन हवेही होते
कोकणाच्या प्रगतीची
हे स्वप्ने दाखवत होते
उरलेल्या वीज ग्राहकांना हे
स्वप्ने दाखवत होते.

कोकणी नेहमीप्रमाणे
आळशी अनुद्योगी
कधी याच्या तर कधी त्याच्या
पाठीशी लागत होते
न करता काही ज्याना
हवी असते प्रगती
त्यांची वाट लागते ऐशी
आहे जगताची नियती...

आता जैतापूर नको जे म्हनती
पण जमीनीचे भाव वाढवून बसती
गुंड, पुंड, दल्ले अन
राजकिय हिजडे बोकांडी बसती
जो तो उठतो अन बनतो
अणु-तंत्रद्न्य
पाजळतो आपुली अक्कल
आता तर आहे जपानी
त्सुनामीचे भयकारी उदाहरण!

पण एक बाब ध्यानी ती घ्यावी
निसर्गाची त्सुनामी परवडली
या वेड्यांची त्सुनामी नाही
अपघात घडती नित्य...
कधी निसर्ग नियमांनी
तर कधी मनुष्यनिर्मित चुकांनी
हा धर्म मानवाचा
कि चुका दुरुस्त करुनी
वेग वढवा प्रगतीचा.

पण म्हनाल हेही नको...
करा...
पण आमच्याकडे नको..
पण हवे आम्म्हाला हेही...
आणि नको आम्हाला हेही
मग
तुम्हीच शोधा काही
उर्जेवीण जगायची रीत...

जगत होता मानव
या क्रुत्रीम जीवनाव्यतिरिक्त
कशा हवी तुज वीज
कशास हवी तुज कार?
का जगत नव्हता सुखपुर्ण
भूतकाळी आपला पुर्वज?
का हवे तुला मग अवघे
जगण्याचे अविरत वैभव...
हे नको...ते नको...
असेही नको
नि तसेही नको
म्हनण्याचे स्वातंत्य्र?

अरे दांभिका...
तसाही तू मरणारच आहेस...
असाही तू मरतच आहे कणाकणाने...
तूला सारे काही हवे आहे..
आणि हव्याच्या हव्यासात
तू स्वता: कोठे आहेस?


तुला नेमके काय हवे हे ठरवशील....प्लीज?

Wednesday, March 16, 2011

जगण्यावर नि मरणावर प्रेम करावे असे म्हणतात ....

जगण्यावर नि मरणावर प्रेम करावे असे म्हणतात
ते ठीकच आहेत
कारण तसाही मी
जगण्याच्या गटाराकडुन
ती घाण अतीव स्नेहाने
(जगणा-यांच्या गर्दीत तेवढेच शक्य असते म्हणून....)
हुंगत...हुंगत
दूर...दूर जात
त्या क्षितीजापारच्या
स्नेहल म्रुत्युला
अनिवार
शोधत आहे.
माझे जगण्यावर आणि मरणावर अनिवार प्रेम आहे!

पण शोध अविरत पुन्हा आणि पुन्हा एकच...
जगण्याच्या आणि मरणाच्या
पार नेमके काय आहे?

माझ्यावर आहे केवढे त्या
ओढाळ म्रुत्युचे
नि त्या स्नेहल जीवनाचे
अनिवार प्रेम...
एक मला जगू देत नाही
नि दुसरा मला मरू देत नाही...
आणि या दोहोंपार
आहे तरी काय
हे ते मला जाणू देतच नाहीत!

कधी देतो मी जीवनाला हुलकावनी...
तर कधी म्रुत्यूला
सापडेल म्हणतो कोठे तरी सांदड
निसटुन जायला
पण
अभद्र असा मी कि
कधी जीवनाच्या
तर कधी
म्रुत्युच्या
दामटीत सापडलेला...

मग कसा होणार तो शोध मपल्याला?

काहीतरी आहे एवढेच काय ते कळते
धुसर असले तरी सत्य ते गमते
कि नसे जीवन हे सत्य, परि आभास
कि वस्तू नसे येथे...फक्त निरामय अवकाश...
(एकमेकांत विरजल्या गोष्टी...
ही व्यष्टी नसे समष्टी...)

मी सांगत बसलो गोष्टी म्रुत विश्वात
म्रुतांच्या म्रुत लोकांना
मी गात राहिलो गाणी
श्रवणा-या मूकबधीरांना
मी गिळत आहे जगणे
म्रुत्युला धीर देण्याला...

हे भयभीत तू जो म्रुत्यू
ये पी हा अधर-प्याला
येईल तुला मग धीर तो
मजला अविरत प्यायाला...
धुंदी अशी तुज बघ कशी मिळते
मजला प्याल्यानंतर...
म्हणशील वेड्या तू
जीवनाची मिळली हाला...

म्रुत्यू...
बस एक जरा मला सांग
तुझ्यापार आहे ते काय़?
एक अनावर जिद्न्यासा
सांग उपाय तिजवर काय?

चल भेटु स्थळी अशा कि
जेथे तु नि जीवन
हातात घालता हात
देत अम्हावर मात
त्यापार असे काही
जे मला असे अद्न्यात...

मरणात म्रुत्यु तू जगतो...
जीवनात म्रुत्यु तू जगतो
जीवनात जीवन मी जगतो...
तरी म्रुत्यु...अमर तू असतो...

मग जीवन असते जेही...
पर्वा मी कशाची करतो?

Tuesday, March 15, 2011

दिवस असेही...दिवस तसेही...!

दिवस असेही...दिवस तसेही...!
-संजय सोनवणी
प्रकरण-८
त्या भीषण अपघाताने माझ्या शरीराच्या उजव्या बाजुची पार वाट लागली होती. उजवा पाय पुरा प्लास्टरमद्धे, ४ बरगड्या फ़्राक्त्चर, तर डोक्याला ३२ टाके अशी अवस्था मी दोन दिवसांनी शुद्धीवर आलो तेंव्हा होती. जवळपास एक महिन्याची स्म्रुती नष्ट झाली होती. मी कारखान्याचे उद्घाटन करुन गडचिरोलीवरुन परत येत असताना हा अपघात झाला असेच मला वाटत होते. प्र्त्यक्षात अपघात नंतर झाला होता. सनसवाडीजवळ...म्हनजे पुण्याला मी जवळपास पोहोचलोच होतो...तेंव्हा...टायर फुटल्यामुळे. दोन दिवस मी बेशुद्धच होतो. ज्यांनी नंतर माझी अपघातग्रस्त कार पाहिली त्यांचा मी जीवंत असण्यावर विश्वासच बसत नव्हता. शुद्धीवर आल्यानंतर दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. घरी कसे-बसे दोन दिवस काढले. तिस-या दिवशी राणीचे न ऐकताच मी प्लास्टरमधील पाय खुरडत चक्क कार्यालयात पोहोचलो. मी अपघातातुन नुकताच गेलो आहे, जखमी आहे यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. पण कामांचे डोंगर उभे होते. कंपनी नवी होती...मार्केट उभे करायचे होते, उत्पादन सुरळीत करायचे होते...वेळ होताच कोठे आराम करायला? त्याच अवस्थेत काही दिवसांत मी ट्रेनने चेन्नैला जावुन आलो. जातांनाच्या या प्रवासात एक गंम्मतच झाली.
सोलापुरच्या पुढे कसलातरी अपघात झाल्याने ट्रेन जी सोलापुर स्टेशनवर थांबली ती थांबलीच. मी कंटाळुन पेपर घ्यायला खाली उतरलो. काही वेळात संतप्त प्रवाशांची ट्रेनवर जोरदार दगडफेक सुरु झाली. ही पळापळ माजली. माझा पाय पुरा प्लास्टरमद्धे. मला पळताही येइना. एक-दोनदा हेल्पाटलोही. कसाबसा माझ्या डब्यात घुसलो. ट्रेन निघाली ती दुसर्या दिवशी. तोवर हालच हाल. चेन्नई येथील डीलरची नियुक्ती करुन येतांना मग मात्र मी विमानानेच परत आलो.
------२ इ.एम-------------
अपघात होवुन अता १५-१६ दिवस झाले होते. प्लास्टरचे ओझे मला पुरते बेचैन करत होते. हालचालींवर खुप मर्यादा येत होत्या. मी रुबी हालमधील डाक्टरांना प्लास्टर काढण्याबाबत विचारले. त्यांनी मला वेड्यात काढले. किमान १ महिना तरी प्लास्टर काढता येणार नाही असे त्यांनी सांगीतले. मी सरळ हर्डीकर होस्पिटलमद्धे गेलो. त्यांनी एक्स-रे काढला आणि त्यांनीही प्लास्टर काढता येणार नाही असे सांगीतले. पण निराश होइल तो मी कसला? सरळ घरी आलो, राणीला कात्री मागितली. ती मला वेड्यात काढत होती. पण मी हट्टाला पेटलो होतो. प्लास्टर काढणे सोपे जात नव्हते. एक-एक पदर कसाबसा सोडवत तासा-दिडतासात उजवा पाय मोकळा केला. प्लास्टरमद्धे दडपुन ठेवल्याने डाव्या पायापेक्षा पार बारीक वाटत होता. थोडे चालुन पाहिले. जमले. दुस-या दिवशी दुसरी कार चालवत मी कार्यालयात पोहोचलो.
------------------२ इ,एम.--------------
दिपक शिंदेंनी मला घाल घाल शिव्या घातल्या. म्हातारपणी या एडचाप साहसवादाची फळे भोगावी लागतील अशी खरी ठरणारी भविष्यवाणीही केली. मी निर्लज्जाप्रमणे हसत होतो. त्याला माझ्या समोरील समस्यांची कदाचित त्यावेळीस जाणीव नव्हती. म्हातारपणी काय होइल यापेक्षा मला त्या काळातील समस्या मोठ्या वाटत होत्या. सुरेश पद्मशाली आणि इतर मंडळीने नवे उपद्व्याप सुरु केले होते. पुण्यातील अन्य संचालकांना त्याशी काही विशेष देणेघेणे नव्हते. तेथील पाचही संचालक कारखाना म्हनजे आपली खाजगी मालमत्ता आहे अशाप्रमाणे वागत होते. सुरेश पद्मशाली तर कामगारांचे साप्ताहिक वेतन आपल्यच हस्ते दिले जावे यासाठी भांडत असे. त्याला राजकिय महत्त्वाकांक्षा आहेत आणि पब्लिक लिमिटेड कंपनी आणि सहकारी संस्था यातील फरक त्याच्या समजाबाहेरचा आहे हे लक्षात येत होते. तेथील सर्व संचालक व इतरांचे भाग-भांडवल पाच लाखाच्या आतच होते...म्हनजे एकुन भांडवलाच्या २.५%. पन आपण बरोबरीचे हिस्सेदार आहोत या समजात ते होते. याचा परिणाम होत होता तो दैनंदिन उत्पादनावर आणि वितरनावर. अय्यर नावाचा प्लांट म्यानेजर होता...त्याला हे लोक नाचवायला लागले होते. जणु तो खाजगी नोकर होता. मी वारंवार तेथे जावुन तेथील व्यवस्था नीट लावायचा प्रयत्न करत होतो. कधी कधी भडकतही होतो. विजय वडेट्टीवारांना उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रेक्षकांत बसवले याचा अजुनही राग होता. मी परोपरीने सांगायचो...अरे मी कंपनीचा अध्यक्ष असुन मी प्रेक्षकांत बसलो त्याचे मला काही वाटत नाही तर तुम्ही अशा क्षुद्र गोष्टी कशाला मनाला लावुन घेता? आदिवासी भागात कारखान्याचे स्वप्न साकार झाले हे महत्वाचे नाही का? पण त्यांच्या मनोव्रुत्त्याच वेगळ्या होत्या आणि त्यांच्याशी जमणे अशक्य आहे हे लवकरच लक्षात आले.
दरम्यान उत्पादन सुरळीत होवु लागले असले तरी अपेक्षित उत्पादन मर्यादा गाठता येत नव्हती. कारण तेथील भयंकर पावसाळा. इलेक्ट्रोलिटिक पद्धतीत तांब्याचे बसबार वापरले जातात. तेथील पराकोटीच्या बाष्पमय हवेमुळे त्यांच्या प्रुष्ठभागावर ओक्सोईड्सचा थर येइ आणि जेवढा करंट आणि वोल्टेज क्यथोड आणि अनोडमद्धे जायला हवा तेवढा जात नसे. वारंवार साफ करणे एवढेच आम्ही करु शकत होतो. पल्वराईझरमद्धे आयर्न चिप्सची पावडर बनवत असता त्यावरही लवकर गंज येई आणि ती अनीलींग केली तरी पावडरमधील ओक्साईड्सचे प्रमाण हव्या त्या मर्यादेपर्यंत खाली येत नसे. त्यामुळे भरपुर चाचण्या घ्याव्या लागल्या...शेवटी हवे तसे उत्पादन घेण्यात यशस्वी झालो. इतके कि अमेरिकेतील डोन हार्वे या मेटल पावडरच्या मोठ्या वितरकाने आमचे उत्पादन अमेरिकेत वितरीत करण्याबद्दल रस दाखवला. आमचे सारे नमुने त्यांच्या कसोट्यांवर पुरेपुर उतरले होते. ही आनंदाची बाब होती.
कारखान्यात असणे ही फार आनंददायक बाब असायची. सुरुवातीची आमची शेड ५००० स्क्वे. फ़ुटांची होती तर कार्यालय ४५० स्क्वे. फुटांचे. एक खानसामा होता. तांत्रिक कर्मचारी व माझे जेवण तेथेच व्हायचे. एलेक्ट्रोलिटिक प्लांट विभाग ते अनीलिंग विभाग यात सारखे फिरत कणाकणाने क्यथोड्सवर जमा होणार्या शुद्ध लोह-भुकटीचा चंदेरी थर पहाणे ही वेगळीच अनुभुती होती. त्या वेळीस ७०-७२ कामगार होते आणि २४ तास चार शिफ़्टमद्धे कारखाना चालु असायचा.
असे असले तरी मी संतुष्ट नव्हतो. पद्मशाली तेथील लोहखनीज खानीचे हक्क मिळवुन देण्यात अपयशी ठरल्याने आमची उत्पादन पद्धती बदलावी लागली होती आणि कच्चा माल पार गुजराथेतुन आणावा लागत असल्याने आम्हाला स्थानिक फायदे शुन्य उरले होते. कामगार स्वस्त असले तरी ते तेवढेच कमी उत्पादक होते...त्यामुळे तोही फायदा होत नव्हता. उत्पादन खर्चात वाढ झाली होती ती वेगळीच. यामुळे मी टीकेचे लक्ष होत चाललो होतो. ज्या ध्येयाने कारखाना सुरू केला ते ध्येय, स्थानिकांना रोजगार मिळवुन देण्यापलीकडे यशस्वी झाले नव्हते. सरकारी यंत्रणेचा पराकोटीचा संताप येत होता. पण याही स्थितीवर मात करण्याची जिद्द होती. काय वाट्टेल ते झाले तरी मी येथील कारखाना यशस्वी करणार होतो. एवढेच नव्हे तर सिंटर्ड उत्पादनांचा कारखानाही येथेच उभारणार होतो. जो आतबट्ट्याचा व्यवहार ठरेल अशी भिती जी वाटु लागली होती, तीवर मात करनार होतो. थोडक्यात अति-उच्च शुद्धतेची लोहभुकटी बनवण्यासोबतच अन्य स्वस्त कच्चा माल वापरुन व्यापारी दर्जाची कमी शुद्धतेची लोह भुकटीही उत्पादित करणे आवश्यक होते. ती भुकटी सिंटर्ड आणि वेल्डिंग रॊड निर्मितीसाठी लागत होती. पण त्यासाठी भांडवल कसे उभे करायचे हा एक प्रश्नच होता.
----------२ इ.एम.--------------
गडचिरोलीवरुन परतत असतांना सहज विचार आला...आपण कंपनीचा पब्लिक इस्श्यु आनला तर?
कल्पना आकर्षक होती.
पण ती प्रत्यक्षात कशी आनायची हा प्रश्न होताच. लिस्टींग एवढे सोपे नव्हते. मला वा आमच्या कोनत्याही संचालकाजवळ तेवढा अनुभवही नव्हता. माहितीही नव्हती. लोकांनी आपल्या कंपनीत का पैसे गुंतवायचे? आम्हाला कोणी गाडफादरही नव्हता. आणि नवे तंत्रद्न्यान कोनते वापरायचे हाही प्रश्न होता. प्रवासात काही कल्पना ठळक होत गेल्या. त्यातील अडचणी कोणत्या यावरही विचार केला.
पुण्यात आल्यावर दुसर्या दिवशी मी अभय साहेबांसमोर पब्लिक इश्युची कल्पना मांडली. त्यांनी स्वभावता:च प्रतिक्रिया व्यक्त न करता त्यांचा एक नातेवाइक तरुण मर्चंट ब्यांकेत कामाला आहे असे सांगुन त्याला फोन करुन यायलाही सांगीतले. मी खुष झालो. पुण्यातील इतर संचालकांनी मला वेड्यात काढले. पब्लिक इश्यु म्हनजे काही जोक नव्हता. मला तो जोक वाटत नव्हता. इश्यु वास्तवात येणारच होता.
खरी अडचण झाली होती ती गडचिरोलीच्या संचालकांची. पद्मशाली संख्येच्या बळावर कारखाना ताब्यात घेण्याच्या वल्गना करु लागला होता. त्याला अजुनही ही सहकारी संस्थाच वाटत होती. मी त्याला शह देण्यासाठी थोडे राजकारणही खेळलो आणि त्याचे काही खंदे लोक त्यांचे शेअर्स विकत घेवुन त्यांना दुर सारले, राजीनामे घेतले. यामुळे पद्मशाली चिडले. त्यांनी नीनावी पत्रे सर्वत्र पाठवण्याचा सपाटा सुरु केला. अगदी महाराष्ट्र ब्यंकेलाही त्याने पत्रे पाठवली. हे कळताच कधी न संतापणारे अभयसाहेबही चिडले आणि पद्मशालीची संचालक मंडळावरुन हकालपट्टी करण्यात आली.
मागे वळुन पहाता आता असे वाटते कि ती जरा घाईत केली गेलेली चुक होती. पद्मशालीला ओळखण्यात मी सपशेल चुकलो होतो. त्याला काढुन टाकल्यावर तो अजुनच चिडला. पत्रकार परिषद घेतली आणि आमच्यावर आरोप करायला सुरुवात केली. या कारखान्याचे खरे मालक गडचिरोलीचे भुमीपुत्र असुन पुणेकरांनी त्यावर बेकायदेशीर कब्जा केला आहे असे हास्यास्पद आरोप सुरु केले. ते तिकडील व्रुत्तपत्रांत छापुनही आले. हे माझे पित्त भडकवायला पुरेसे होते. मी त्यावर पद्मशालीची भेट घेवुन त्याला शांत करायला हवे होते...आणि कारखान्याच्या कामात जास्त लक्ष घालायला हवे होते, पण उलट मी संतापुन त्याचे आरोप खोडत बसलो. माझा संताप रास्तही होता कारण अक्षरश: काहीएक न करता त्याला हुकुमशाही गाजवायची होती. प्रत्यक्षात प्रत्येक बाबतीत...अगदी वाहतुकीसाठी ट्रुक मिलवायलाही आमचे काय हाल होत होते हे तो डोळ्यांनी पहातच होता. किंबहुना त्यामुळेच आम्ही निराश होवुन पळुन जावू असा त्याचा होरा असावा. पण तसे घडनार नव्हते. आणि समजावुन सांगुन उपयोग होत नाही असा जुना अनुभवही होताच. पण मी किमान जाहीर प्रत्त्युत्तरे तरी टाळु शकलो असतो. या स्थितीचा फायदा तेथील चिंधीचोर पत्रकारांनी घ्यायला सुरुवात केली. शेवटी पद्मशालीची मजल पाच लाख रुपये द्या नाहीतर कारखाना बंद पादणार या धमकीपर्यंत येवुन पोहोचली. हे अतीच होते. मी ब्ल्याकमेलींगला बळी पडणारा नव्हे हे त्याला कळालेच नाही. मी त्याला एक रुपयाही दिला नाही. उलट त्याच्यावर पुण्यात बदनामी व अन्य अनेक फौजदारी खटले दाखल केले. प्रतिक्रिया म्हणुन त्यानेही गदचिरोलीत असेच बदनामीचे खटले दाखल केले. त्याला पैसे द्यायचे नाही या नादात आम्ही कोर्टात भरपुर पैसे बरबाद केले. नैतिक द्रुष्टीने मी बरोबर होतो...पण व्यावसायिक द्रुष्टीने ती घोडचुक होती.
कारण यामुळे कंपनीची...आमची बदनामी तर होतच होती...पण महत्वाचा वेळही वाया जात होता.
याचा अर्थ कामे थांबली होती असा नाही. इंग्लंडमधील आटोमाशन सिस्टेम या कंपनीबरोबर माझी तांत्रिक सहकार्याची चर्चा सुरु होती. ती कंपनी आटोमाशन पद्धतीने लोहपावडर बनवण्याचे तंत्रद्न्यान पुरवत असे. त्या कंपनीचा मालक भारतात आमच्याकडे येवुन गेला...तांत्रिक सहकार्याचा करारही त्याच्याबरोबर केला. तोवर काही प्रमानात अमेरिकेत निर्यातही सुरु झाली होती. पब्लिक इश्युसाठी मुंबईतील एका कंपनीची मर्चंट ब्यांकर म्हणुन नियुक्तीही झाली होती. अर्थव्यवस्था महत्वाकांक्षांना मोकळे रान देत होती. डोक्यात असंख्य प्रकल्प घॊळत होते. एकच स्वप्न होते ते १००० कोटीचे मराठी मानसांचे साम्राज्य उभे करण्याचे. प्रत्येक क्षेत्रात मला उतरायचे होते. अवाढव्य प्रकल्प उभारायचे होते. मी मुळचा स्वप्नाळु...स्वप्नांना कष्टांची आणि धाडसाची जोड होतीच. दैनंदिन व्यवस्थापन हे माझे कधीच क्षेत्र नव्हते. त्यासाठी अद्याप आप्मच्याकडे कोणी धुरन्धर नव्हता. पण शोध सुरु होता...ट्रायल-एरर चालुच होते. सर्वांमद्धे एक धेय असावे यासाठे प्रयत्न होते. अशोक चांदगुडे यांची मला चांगली साथ मिळत होती. गडचिरोलीला असो वा अन्य कोनत्याही संकल्पनेतील प्रकल्प...ते माझ्या सोबतच असत. बाकी मंडळीकडुन मी आता अपेक्षा बालगण्याचे सोडुन दिले होते. यामुळे माझ्यावरील कामांचा लोड वाढला होता. घराकडे माझे विशेष लक्षही नव्हते. येणारा प्रत्येक पैसा, मग तो कमाइचा असो कि कर्जाचा, व्यवसायात वा इतर संचालकांच्या गरजांसाठीच जात होता...मी अजुनही भाड्याच्याच घरात रहात होतो.
---------------२ इ.एम-----------
पब्लिक इश्यु आणने ही काही चेष्टेची बाब नव्हती हे खरेच आहे. कसलीही व्यावसायिक पार्श्वभुमी नसतांना वयाच्या तिसाव्या वर्षी मी दोन लिस्टेड कंपन्यांचा संस्थापक अध्यक्ष झालो ही महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक घटना आहे यातही शंका नाही. गडचिरोलीसारख्या नुसत्या आदिवासीच नव्हे तर नक्षलवादी भागात अगणित अडचणी सोसत तब्बल पाच वर्ष कारखाना चालवला हेही खरे. असे धाडस आजही करण्याची हिम्मत कोणात असेल असे मला वाटत नाही.
गडचिरोलीला कारखाना काढुन कारखानदार म्हणुन मिरवणे हा माझा उद्देश कधीच नव्हता. त्याबाबत माझा द्रुष्टीकोन स्वच्छ होता. नक्षलवाद उफाळुन यायला कारण होते तेथील पराकोटीचे दारिद्र्य आणि अद्न्यान. सरकारने या भागाकडे पुरेपूर दुर्लक्ष केले होते. कोणी वाली नव्हता. एकिकडुन नक्षलवादी आणि दुसरीकडुन पोलिस या कात्रीत आदिवासी सापडलेले होते. त्यांची अवस्था पाहिली तर अश्रुच डोळ्यात उभे रहात. आम्हालाही नक्षलवाद्यांच्या धमक्यांची पत्रे यायला सुरुवात झाली होती. पोलिस काय करनार? तेही छापे मारत...गवगवा करुन घेत...माहिती मिळवण्यासाठी आदिवासींचा पराकोटीचा छळ करत. पोलिस गेले कि नक्षलवादी उगवत आणि ते अवघ्या आदिवासी वस्तीवर अत्याचार करत. हे चित्र भयावह होते. अस्वस्थ करणारे होते. या विभागात पुरेपुर औद्योगिक क्रांती झाल्याखेरीज हे चित्र बदलु शकणार नाही हे समज्त होते. मी अडखळत का होईना येथे सुरुवात केली होती. स्थानिक अधिकारी/सुशिक्षित नागरिकांना त्याचे अप्रुप नसले तरी जनसामान्य मला देवासारखेच मानत असत. गडचिरोली हीच माझी नकळत कर्मभुमी बनुन गेली होती. माझ्या यशामुळे अनेक उद्योग येथे येतील ही आशाही होतीच. तशा आशयाचे अनेख लेख मी लिहितही होतो.
एके दिवशी मी गडचिरोलीत असतांनाच एक बातमी वाचण्यात आली. एका अत्राम नावाच्या गरीब आदिवासीला नक्षलवादी समजुन गडचिरोली पोलिसांनी छळ करुन त्याची हत्या केली होती. ही घटना संतापजनक होती. सामान्यांनी जायचे तरी कोठे? पोलिस त्या भागात अक्षरश: हुकुमशहा बनले होते. येणारे सारे पोलिस अधिकारी बव्हंशी शिक्षेवर असत वा प्रशिक्षनार्थी असत. त्यांना स्थानिक प्रश्नांशी काहीएक घेणेदेणे नव्हते. ते असत लगोलग बदल्या करवुन घेण्याच्या प्रयत्नांत. अनेकजण तर रुजुही होत नसत वा दीर्घ सुट्ट्यांवर निघुन जात. अत्त्रामच्या हत्येचे पराकोटीचे दु:ख झाले...पण करनार काय? नुसत्या निषेधांनी काय होणार? आम्ही मयत अत्रामच्या परिवाराला आर्थिक मदत दिली. यामुळे गडचिरोली पोलिस माझ्यावर खूप संतापले. पोलिस मरतात तेंव्हा कोण मदत देतो काय असा प्रश्न मला एका डी. वाय. एस. पी. ने विचारला. मी म्हनालो...तुम्हाला सरकार पैसा देते...हुतात्मा ठरवते...परिवाराची काळजी घेते...या आदिवासींना कोणी काही दिलेय काय? या प्रसंगाने पोलिस आणि माझ्यात एक दरी निर्माण झाली हे खरे.
काहीही झाले तरी येथे यशस्वी व्हायलाच हवे होते. नवा कच्चा माल शोधुन स्वस्त उत्पादनपद्धती राबवायलाच हवी होती. स्पोंज आयर्न बनवणार्या काही कंपन्या विदर्भात होत्या. तो कच्चा माल म्हणुन वापरता येईल काय या द्रुष्टीने माझा अभ्यास चाललाच होता. आणि भांडवलासाठी पब्लिक इश्युची कल्पना सुचली होतीच!

पण हे होत असतांना अननुभवाचे फटके कसे बसतात हे सांगणे आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी त्यावेळी खुपजण स्पर्धेत उतरले होते. विदेशी तंत्रद्न्यान....भागिदा-या...तांत्रिक सहकार्य हे परवलीचे शब्द बनले होते. ग्रीन हाऊस प्रकल्पांची लाट आली होती. ग्रीन हाऊस प्रकल्प म्हणजे अक्षरशा: कागदावरील प्रकल्प. ते प्रत्यक्षात आनण्यासाठी चक्क पब्लिक इश्यु आणले जात. मर्चंट ब्यांकर्सची तर एवढी भाउगर्दी उसळली होती कि त्याला सीमाच नाही. किंबहुना तेच अनेकांना घोड्यावर बसवुन इश्यु आनायला प्रोत्साहित करत. सारेच इश्यु यशस्वी होत नसत हेही खरे पण हे ब्यांकर्स त्यासाठीही आयडिया घेवुन येत...आणि या कल्पना प्रवर्तकांना शेवटी खड्ड्यात लोटनार-या असत.
मर्चंट ब्यंकर म्हणजे काय हे आधी समजावुन घ्या. पब्लिक इश्यु आणायच्झा असेल तर अशा कंपनेला प्रथम लीड म्यानेजर नियुक्त करावा लागतो. ही जबाबदारी शासनमान्य मर्चंट ब्यांकर कंपन्या घेत. पब्लिक इश्युसाठी ज्या कंपनीचे काम स्वीकारले आहे तिचा सढ्याचा प्रकल्प/त्याचे आर्थिक अहवाल आणि प्रत्यक्ष कामकाज तपासणे, तसे अहवाल बनवणे, तसेच पुढील नियोजित प्रकल्पाची सर्वांगीण छानणी करणे, रसा अहवाल बनवणे व सेबीकडुन पब्लिक इश्युची अधिक्रुत अनुमती घेणे हे त्यांचे महत्वाचे काम असते. आजही अशीच परिस्थीती आहे, पण कायदे खुप बदलले आहेत...हर्षद मेहता आणि केतन पारेखची मेहेरबानी.
या कालात जो इश्युवरील खर्च अभिप्रेत असे तो कोनत्या-ना-कोनत्या कारणाने वाढवत नेण्यात हे सारेच मर्चंट ब्यांकर वस्ताद होते. मग ते खर्चासाठी अतिरिक्त पैसे नसले तर शेअर्स पुनर्खरेदीच्या तत्वावर विकुन ६० ते ७०% प्रतिवर्षी अशा भयंकर व्याजदराने उभे करुन देत....शेअरचे लिस्टींग झाले कि ते शेअर बाजारात विकुन त्यांचे पैसे काढुन घेतील असे सांगीतले जायचे आणि त्यासाठी असंख्य कंपन्यांचे भाव लिस्टींग होताच भराभर चढले अशी उदाहरणे दिली जात. त्यामुळे ६०% काय आणि १००% काय...व्याजदर कागदावरच राहील, शेअरचे भाव वाढल्यामुळे ते बाजारात शेअर विकुन वसुली करुन घेतील अशा दाखवल्ल्या गेलेल्या व्यर्थ आशेपोटी त्या पधतीने प्रवर्तक मंडळी पैसे उभे करत...आणि गंमत म्हनजे हे पैसे देणारे अशाच कंपन्यांचे अधिकारी वा त्यांचे नातेवाईक असत.
या कंपनीचे अधिकारी होते रानडे आणि दास नावाचा उडिया माणुस. आम्हालाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मीही या पद्धतीने पैसे उभे केले. त्यातील काही चक्क माझ्या व्यक्तिगत नावावरही घेतले. (आणि मी आजही ते फेडतोच आहे.) जवळपास वर्षभर सेबीची परवानगी आणि इतर पुर्तता करण्यात गेले. तोवर मी विदेशी तंत्रद्न्यान आयात करायचे नाही हा निर्णय घेतला होता...कारण मीच तोवर अत्यंत स्वस्तात लोहभुकटी उत्पादित करण्याचे सोपे आणि स्वस्त तंत्रद्न्यान गडच्रोली येथील कारखान्यातच भरपूर चाचण्या घेवुन शोधुन काढले होते. आणि ते होत स्पोन्ज आयर्न पासुन प्राथमिक भुकटी तयार करुन ती म्यग्नेटिक सेपरेशन आणि अनीलींगद्वारे शुद्ध बनवणे. यात वीजेची बचत होती तसेच कच्चा माल स्वस्त आणि निकट उपलब्ध असल्याने उत्पादन खर्च अत्यंत कमी होत होता. त्या उत्पादनाच्या यशस्वी ट्रायल्स घेतल्या आणि एक वेगळेच तंत्रद्न्यान जन्माला आले...पुढे कावासाकी स्टीलच्या पावडर मेटालर्जी विभागाला मी जपानमद्धे त्या प्रक्रियेचा डेमो दिला तेंव्हा जपानी तंत्रद्न्यही अवाक झाले होते.
असो. पण इकडे तेंव्हा मला मी नव्या आर्थिक पेचात जात आहे हे लक्षात आले नाही हेही खरे. उलट लोहभुकटीपासुन जी सिंटर्ड उत्पादने होतात ती स्वता:च गडचिरोलीत उत्पादित करण्याची स्वप्ने मला पडत होती. सिंटर्ड गियर्स ते बुशींग/कपलिन्ग तेथे उत्पादित करण्याची योजना होती. त्यासाठी मशिनरीचाही शोध सुरु केला...भारतात त्या मिळत नाहीत हे लक्षात येताच अमेरिकेकडे मोहोरा वळवला.
तेंव्हा इंटरनेट नव्हते. मोबाइल फोनही यायचेच होते. त्यामुळे फ्यक्स आणि फोन हीच काय ती संपर्काची साधने होती...अर्थात पारंपारिक पत्रे/कुरियर इ. वगळता.
मी "सुर्योदय सिंटर्ड प्रोडक्तस लि. या कंपनीची स्थापना केलेली होतीच...तिचा प्रकल्प अहवालही तयार होता आणि ब्यांकेतुन कर्ज घेवुन तो कारखाना उभारायचा मानस होता...पण हा सुगावा लागताच रानडे यांनी कर्ज कशाला घेता...त्यापेक्षा त्यासाठी पब्लिक इश्यु आणुन भांडवल उभे करता येइल असे सांगितले...तसे आश्वासनही दिले. मी साशंक होतो खरा पण हा माणुस चमत्कार घडवुन आणेल अशी आशाही होती...आणि याही कंपनीचा पब्लिक इश्यु आणायचा निर्णय घेतला.
-----------२ इ.एम-------------
दर्म्यान लेखन सुरुच होते. एव्हाना क्लीओपात्रा, ओडीसी, म्रुत्युरेखा इ. ४-५ कादंब-या प्रसिद्ध झाल्या होत्या. पुष्प प्रकाशनाचे कामही वेगात सुरु होते. कर्वे रोडवर आम्ही हजार चौरस फुटाचे कार्यालयही विकत घेतले होते. त्यामुळे पुष्पला नारायणपेठेतील कार्यालय स्वतंत्रपणे वापरता येवु लागले. विनोद सर्व कारभार पहाण्यात निष्णात झाला होता. माझा प्रत्यक्ष सहभाग हळु-हळु संपत आला होता...एवढा कि माझ्या पुस्तकांच्या नव्या आव्रुत्त्या आल्यात हे मला त्या प्रसिद्ध झाल्यावर कळे. विनोदला तसा प्रकाशन व्यवसाय आवडत नसे, पण आता हळुहळु तो रुळला होता.
मी १९९४ मद्धेच नीतिशास्त्र नावाचा नीतितत्वांचा आधुनिक परिप्रेक्षात वेध घेत, वैद्न्यनिक पायावर नैतीक मुल्यांची नव्याने व्याख्या करत त्याची आधुनिक काळाला सुसंगत अशी मांडनी करनारे पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. जागतिक पातळीवर जी. ई. मूर नंतर नीतिशास्त्रांवर नवी मांडणी कोणी केलीच नव्हती. मला ते एक आव्हान वाटले. या पुस्तकातील "विश्वनिर्मिती-उभारणी आणि संहार" हे प्रकरण लिहित असताना मी आधुनिक संशोधनांचाही सखोल आढावा घेत असता बिग ब्यंग सिद्धांतातील त्रुटी लक्षात येवु लागल्या. मग मी झपाटुन भौतिकशास्त्र आणि विश्वनिर्मिती शास्त्राच्या मागे लागलो. या सिद्धांतात अवकाशाला अगदीच ग्रुहित धरण्यात आले असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणजे अवकाशावर वस्तुमानाचा प्रभाव पडतो हे जसे गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात मान्य केले आहे तसेच क्वंटम मेक्यनिक्स मद्धेही वस्तुमान हे सभोवतालच्या अवकाशास प्रभावित करते हे मान्य केले आहे...पण विश्वाचा महाविस्तार पचवण्यासाठी ते अमर्याद उपलब्ध आहे असे चुकिचे ग्रुहितक घेतले गेल्याचे माझ्या लक्षात आले. स्थिर विश्व सिद्धांतात विश्व-विस्तार मान्य केला आहेच पण निरंतर विस्तारामुळे रिक्त होणा-या अवकाशात १ चौ. मीटर= १ हायड्रोजनचा अणु या प्रमाणात नवनिर्मिती होते असे मानुन स्थैर्य आणि विस्ताराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
हे सारे अमान्य करुन मी नवीन सिद्धांत मांडायला सुरुवात केली. त्यात मी अवकाश हेच मुलभुत एकमेकद्वितीय मुलदभूत आस्तित्व विश्वारंभी होते हे ग्रुहितक घेत "अवकाशताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती" या सिद्धांताची रचना केली. हा सर्वच सिद्धांत येथे सांगत नाही, पण या सिद्धांतानुसार वस्तुमान म्हणजे modified space असुन गुरुत्वाकर्षण हे क्रुत्रीम बल आहे व ते वस्तुमानातील अतिरिक्त धन उर्जांच्या समतोलासाठी निर्माण होते...तसेच प्रकाशवेग हा विविध गुरुत्वत्रिकोणांतुन प्रवास करत असतांना वारंवार वेग बदलत (कमी-जास्त) असल्याने प्रकाशवेगच्या आधारावर दोन तारे वा दिर्घिकांमधील काढलेले अंतर चुकीचे येईल आणि एकून विश्वाचा विस्तार वा आयुष्य त्या आधारावर मोजता येणार नाही हे स्पष्ट केले. (अलीकडेच २० अब्ज प्रकाशवर्षे दुर असलेली दीर्घिका सापडल्यामुळे महास्फोट सिद्धांतावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहीले आहेच. तूवर विश्वाचे वय १६ अब्ज वर्ष मानले जात होते.) या सिद्धांतात मी जी प्रमेये सिद्ध केली आहेत त्यामुळे विश्वनिर्मितीतील अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडवण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला आहे...अर्थात कोणताही सिद्धांत परिपुर्ण असु शकत नाही हे मला माहित आहेच. हा सिद्धांत मराठीत पुस्तकरुपाने २००६ साली प्रसिद्ध झाला असला तरी त्यातील काही प्रकरणे तत्पुर्वी इंग्रजीतुन प्रसिद्ध झाली होती आणि त्याला जगभरच्या वैद्न्यानिक विश्वातुन चांगला प्रतिसाद मिळाला. अपवाद अर्थातच मराठीचा...आणि वर मराठीतुन मुलभूत विद्न्यानावर लिहिले जात नाही ही बोंब आहेच.
असो. पण या सिद्धांतामागे मी जवळपास ७-८ वर्ष पडल्याने नीतिशास्त्र मागे पडले...ते मी शेवटी पुर्ण केले येरवडा तुरुंगात जामीनाची वाट पहात असतांना. तोही टिळक यार्डमद्धे...जेथे ते राजद्रोहाची शिक्षा भोगत होते...हा एक दैवदुर्विलासच म्हनायला हवा. कारण टिळकांनी राजद्रोहाच्या आरोपात शिक्षा भोगत असतांना गीतारहस्य लिहिले...आणि मी ...?
असो त्याबद्दल पुढे.
नीतिशास्त्र या ग्रंथाचीही मराठीने वाट लावली असल्याने तो आता ईंग्रजीत अनुवादित करुन प्रसिद्ध करण्याच्या मागे आहे. आधुनिक परिप्रेक्षात वैद्न्यानिक आणि अभावनायुक्त उत्स्फुर्ततावादी नीतितत्वे मांडनारा हा एकमेव ग्रंथ आहे हे मी कसलेही औद्धत्य न करता सांगु इच्छितो.

असो. हे सारे सुरू असताना पद्मशालीचे उपद्व्याप सुरुच होते. मी त्याला पाच लाख द्यायला नकार दिल्यावर त्याने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करने सुरु केले...जणु ही सहकारी संस्था होती जेथे संचालक भ्रष्टाचार करु शकतील. पण तिकडील पत्रकारही बिनडोक...ते बिन्धास्त तो म्हणेल तसे छापत होते. मी त्याच्यावर एकामागोमाग एक बदनामीचे दावे दाखल करत चाललो होतो. एकुण ५८ दावे केले मी. एकदा त्याला न्यायालयात हजर रहात नाही म्हणुन पोलिसांनी पकडुन आणले...आणि पट्ठ्या खवळला. त्याने कंपनीत गैरव्यवहार असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
येथे एक नवे वादळ सुरु झाले. इश्युची तारीख घोषित झाली होती. तो यशस्वी करणे हे एकमात्र ध्येय होते. त्यासाठी पळापळ होत होती. मुम्बैच्या वा-या पराकोटीच्या वाढल्या होत्या. एकदा मुंबईतुन परततांना रात्री अपघातही झाला. एक बंद पडलेला रस्त्यावर तिरपा पसरलेला ट्रक समोरुन येणा-या ट्रकच्या हेडलाइट मुळे दिसलाच नाही...त्या ट्रकच्या मागच्या कोप-याला कार धडकली आणि उजव्या बाजुला रस्त्यावर काही कळण्याच्या आतच गर्रकन वळाली. कारची डावी बाजु पार फाटली. नशीब तिकडे कोणी बसलेला नव्हता...आणि समोरुन दुसरा ट्रक येत नव्हता...नाहीतर...असो...मी पुन्हा एकदा वाचलो.
त्यावेळीस श्री लक्ष्मीनारायण नावाचे एस. पी. गडचिरोलीला होते. अत्यंट कडक-कर्तव्यदक्ष माणुस म्हणुन त्यांची ख्याती होती. इंतरपोलसाठी त्यांचीए निवड झाली आहे अशा वदंता होत्या. त्यांनी एकदा गडचिरोलीच्या कलेक्टरला अटक करण्याचा पराक्रमही केला होता. (गडचिरोलीत कलेक्टरपेक्षा पोलिस अधिक्षकाला जास्त अधिकार आहेत.) त्यांनी मला समंस पाठवले. मी खवळलो. मी तत्काळ "असल्या खोट्या आरोपांसाठी मला समंस पाठवण्याचा तुम्हाला कसलाही अधिकार नाही" असा उलट फ्यक्स पाठवला. मला त्यावेळीस माझ्या न्याय्य बाजुचा सार्थ अहंकार होता. कोणी एक ब्लाकमेलर खोट्या तक्रारी करतो आणि परस्पर शहानिशा न करता पोलिस मलाच जबाबासाठी बोलवतात म्हनजे काय़? त्यांना आस्म्ही एवढ्या लांबून हा कारखाना कसा चालवतो हे माहित नाही काय? ते स्वत: कारखान्याला भेट देवुन प्रत्यक्ष कामकाज पाहून शहानिशा करुन घेवू शकत नाहित काय?
त्यात अत्रामच्या कुटुंबियांना आम्ही केलेली मदत त्यांच्या डोळ्यात सलत असावी. नाहीतर एका फालतु (सरकारी वकीलही नंतर पोलिसांना हेच म्हणाले) ज्यात फक्त आरोप आहेत अशा तक्रारीच्या आधारावर त्यांनी गुन्हा नोंदवलाच नसता. मी रागावलो होतो. या कारखान्याला शासनाने एक रुपयाची मदत केली नव्हती. आम्ही होते नव्हते ते सारे गहान ठेवून हा कारखाना एक स्वप्न साकारन्यासाठी चालवत होतो. वारंवार जीव धोक्यात घालत होतो. एकाही व्रुत्तपत्राने वा सामाजिक संघटनांनी त्या प्रयत्नांची दखल घेतली नव्हती...घ्यावी ही अपेक्षाही नव्हती...पण आरोप? गुन्हा दाखल?
माझ्या संतप्त फ्याक्सची परिणती अशी झाली कि श्री. लक्ष्मीनारायण यांनी त्या तक्रारीच्या आधारावर खरोखरच गुन्हा दाखल केला. झाले. चौकशीचे सत्र मागे लागले. अटकपुर्व जामीण घ्यावा लागला. दर्म्यान इश्यु यशस्वीरित्या भरला गेला. लिस्टींगची प्रक्रिया सुरु झाली. आणि त्याच्वेळीस नागपुरवरील जवळपास सर्वच व्रुत्तपत्त्रांनी आमच्याविरुद्ध...विशेश्ता: माझ्या, आघाडी उघडली. पद्मशाली हीरो बनला. मी सर्व व्रुत्तपत्त्रांना निवेदने पाठवली...काहींनी छापली...काहींनी नाही. मी ग्रुहमंत्री ते मुखमंत्र्यांना निवेदने पाठवली. पण उपयोग शुन्य. तसाही विदर्भाकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे असतो?
पण खरा कळस चढवला तो पुण्यातील नव्यानेच सुरु झालेल्या एका व्रुत्तसमुहाच्या पुणे आव्रुत्तीने. त्यांचा एक प्रतिनिधी मला भेटायला आला...अत्यंत मित्रत्वाच्या नात्याने माझ्याशी बोलला...माझ्याविरुद्ध त्याच्या व्रुत्तपत्त्रात बातमी येण्याची शक्यता सांगितली...मी लगोलग त्यांच्या संपदकांना जावुन भेटलो...सारी बाजु सांगण्याचा प्रयत्न केला...पण उपयोग शुन्य. त्यांनी काही ऐकुनच घेतले नाही.
दुस-या दिवशी भाग एक प्रसिद्ध. क्रमश: मालिका प्रसिद्ध करण्याचा निर्धार. जेही काही लिहिलेले ते अत्यंत चुकीचे आणि ज्यातील काहीच कळत नाही त्यावरुनचे निश्कर्ष. उदा. ३.२५ लाखाला घेतलेली अमोनिया क्र्यकर फर्नेस ताळेबंदात दुस-या वर्षी २.७५ लाखाची कशी झाली? म्हणजे भ्रश्ताचार...यांना घसारा नावाची काय गोष्ट असते हेही माहित नाही? मी संतापलो. सरळ श्री. श्याम अगरवालांकडे गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले...लिही...त्यावेळीस त्यांचे सायंदैनिक "संध्यानंद" नुकतेच सुरु झाले असले तरी लोकप्रिय होते. मी पराकोटीचा प्रति-आघात केला. सायंकाळी ४ वाजता तो पेपर येताच अक्षरश: धुमाकुळ उडाला. खुद्द त्या पेपरमधील वातावरण तंग झाले. तेथील अनेक मित्रांनी मला फोन केले आणि मी योग्य तेच केले असा निर्वाळा दिला. दुस-याही दिवशी पुढचा भाग...माझे सायंकाळी उत्तर...शेवटी त्या व्रुत्तपत्त्रवर खुलासा छापायची वेळ आली. सात दिवस ते ती मालिका चालवणार होते ती तीन दिवसांत गुंडाळली. मला एशिअन एज आणि अजुन काही राष्ट्रस्तरीय व्रुत्तपत्त्रांनी पुरेपुर पाठिंबा दिला. पण त्यामुळे पुण्यातील बव्हंशी श्रमिक पत्रकार खवळले. त्यांना हा माझा व्रुत्तपत्रिय लेखन स्वतंत्र्यावरचा आघात वाटला. दरम्यान मला ज्येष्ठ पत्रकार आदरणीय श्री. गोपाळराव पटवर्धन यांनी घरी बोलावुन घेतले आणि माझी बाजु विचारली. मी त्यांना अथ-पासुन इतिपर्यंत सारे काही सांगितले. माझे स्पष्टीकरण त्यांना पटले. काही दिवसांत पुणे श्रमिक पत्रकार संघाने माझ्या निषेधाचा ठराव मांडायचा निर्णय घेतला. पण गोपाळरावांच्या विरोधामुळे जरी ठराव पास झाला असला तरी तो झाला माझे नाव वगळुन. खरोखर अशी निरपेक्ष भुमिका घेणारे गोपाळरावांसारखे पत्रकार झाले नाहित याचा खेद वाटतो.
दर्म्यान मी श्री लक्ष्मीनारायण यांच्याही विरुद्ध आघाडी उघडली होती. अक्षरश: हजारो निवेदने मी सारे आमदार/मंत्री/पोलिस महासंचालक यांना पाठवली. मी पोलिसांच्या आतताईपनामुळे प्रक्षुब्ध झालो होतो. हा सरळ सरळ अन्याय होता. तपासात मी सहकार्य करत होतो पण मी त्यासाठी म्हणुन एकदाही गदचिरोलीला गेलो नाही आणि गेलो तरी श्री लक्ष्मीनारायण यांना भेटलो नाही. माझ्या असंख्य निवेदनांचा त्यांनाही फटका बसला...त्यांची पुढे बदली झाली ती एका पोलिस ट्रेनिग केंद्रावर.
पण आता वाटते मी त्यांना आधीच भेटलो असतो तर कदाचित हा एवढा संघर्ष करण्याची मुळात वेळच आली नसती. मी कायद्याचे पालन करत समंसचा आदर ठेवायला हवा होता. पण सत्य माझ्या बाजुला आहे याचा पराकोटीचा विश्वास त्यावेळीस माझ्यावर हावी होता एवढेच काय ते खरे. आणि यामुळे मला जगाची नवी रुपे दिसली, विलक्षण अनुभव आले हेही खरे. पत्रकारिता ही कोणत्या थराला गेली आहे हे बघुन आजही मन विषण्ण होते. पुण्यातील पत्रकारांनी तर माझे नाव प्रदिर्घ काळ वाळीत टाकले ते टाकलेच. काही वाईट बातमी माझ्याबाबत असली तरच ती प्रसिइद्ध होई...एवढेच. (आजही अपवाद वगळता हीच स्थिती आहे.) पण फायदा हा झाला कि नंतर प्रदिर्घ काळ त्या विशिष्ट व्रुत्तपत्त्रानेच काय अन्य व्रुत्तपत्त्रांनीही कोणाही विरुद्ध व्यक्तिगत बदनाम्या करनारी भडक व्रुत्ते "शोध-पत्रकारितेच्या" गोंडस नावाखाली छापणे बंद केले.
तत्पुर्वी अनेकांना आयुष्यातुन अक्षरशा: उठवण्यात आले होते. पुणे विद्यापीठातील एका संशोधकाला तर शेवटी देशत्याग करावा लागला होता तर एक बिल्डर जवळपास वेडा झाला होता...कशामुळे तर त्यांच्याविरुद्ध अशा बिनबुडाच्या सवंग बातम्या छापल्या गेल्याने. आजही प्रत्येक घटनेची दुसरी बाजु असते याचे भान मराठी पत्रकारितेला कमीच आहे. पण त्यामुळे एखादा आयुष्यातुन उठु शकतो याची जाणीव असावी ही अपेक्षा आहे. पण एकंदरीत हे सारेच प्रकरण त्यावेळी खुप गाजले, असंख्य लोकांनी माझ्या धाडसाला दाद दिली हेही खरे. पण हाच धाडसी आणि त्याच वेळीस परिणामांबद्दल बेपर्वा असनारा माझा स्वभाव मला अनेकदा अडचणीत आणनार आहे याची मला तेंव्हा जाणीव नव्हती. समोरच्या लोकांना त्यांच्या फेस व्यल्युवर घेणे आणि तसे वर्तन करणे हा माझा मोठाच दोष आहे.
-----------२ इ.एम-------------------
गडचिरोली पोलिसांचा तपास कधी संपला हेही कळाले नाही. जवळपास दोन वर्षांनी एके दिवशी पोलिसांचे पत्र आले...
"तुमच्याविरुद्ध कसलेही पुरावे मिळाले नसल्याने केस ’सी" समरी करुन तपास बंद करण्यात आला आहे."
अर्थात ही बातमी छापतील ती व्रुत्तपत्त्रे कसली?
---------२ इ.एम.---------
अमेरिकेतुन आमच्या लोह भुकटीला चांगला प्रतिसाद येत होता. डोन हार्वे हा आमचा तेथील वितरक. शिवाय याच काळात तेथील एका आयर्न पावडर बनवणार्या कंपनीतील भारतीय मेटालर्जी इन्जिनीयर संजय कुलकर्णीशी ओळख झाली होती. त्याला आमच्या आयर्न पावडरची शुद्धता खुप आवडली होती. तो ज्या कंपनीत काम करत होता त्यांनीही एवढी शुद्धता गाठली नव्हती. अमेरिकेत आपण खुप मोठे मार्केट उभे करु शकतो असा त्याला विश्वास होता. पण त्यासाठी मला अमेरिकेला जाणे आवश्यक होते. याच वेळीस निर्जलीक्रुत फळभाज्यांच्या उत्पादनातही पडण्याची माझी तयारी सुरु होती. त्यासाठीही कंपनी स्थापन करुन ठेवली होती. होलंड व इन्ग्लंड येथील काही उत्पादक व वितरकांशीही दर्म्यान बोलणी सुरु होती. त्यांनीही चर्चेसाठीचे निमंत्रण दिले होते. सिंटर्ड उत्पादनासाठीच्या मशिनरीज सप्लायर्सनाही भेटायचे होते.
निर्जलीक्रुत फळभाज्यांचे ते मांस-मासे यांचे उत्पादन का तर मला या व्यवसायात अवाढव्य भवितव्य दिसत होते. प्रत्येक क्षेत्रात आमच्या "सुर्योदय" ग्रुपचे स्थान असावे असे माझे स्वप्न होते आणि वेगाने शिकता येइल एवढी प्रतिभा देवाने मला देवुन ठेवली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या देशातील शेतीची स्थिती अशीच हलाखीची राहील जोवर क्रुषिमालावर प्रक्रिया करणारे अवाढव्य उद्योग उभे राहणार नाहीत. ही जाणीव मला तेंव्हाच झाली होती. त्या उत्पादनांना जागतीक बाजारपेठ उपलब्ध तर होतीच पण देशांतर्गतही होती व आहे...पण अजुनही या क्षेत्रात काही घडले नाही. आणि तशी इछाशक्ती भारतीय उद्योजक वा सरकारमद्धे नाही. आजही भारतात प्रक्रिया उद्योगांअभावी लाखो टन शेतमालाचे वाटोळे होत आहे. त्याचा ना खरेदीदारास फायदा, ना शेतकर-याला...अब्जावधी रुपयांचे राष्ट्रीय उत्पादन वाया जात आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे तर कधी अनुपलब्धतेने भाव गगनाला भीडतात म्हणुन खरेदीदार रस्त्यावर येत आहेत अशी विनोदी स्थिती भारतात आहे.
मी संगतवार माझा दौरा ठरवला. अर्थात त्याचे नियोजन केले ते माझे मित्र आणि काही काळ संचालक असलेले श्री. प्रशांत वाणी यांनी. प्रथम होलंड मग इंग्लंड आणि मग अमेरिकेतील डेट्रोइट येथे जायचे होते. सर्व भेटी ठरवण्यात आल्या होत्या. विसा तयार होते. निघायचा दिवस आला. रात्रीची फ़्लाईट होती. मी त्या दिवशी फारच गंभीर होतो. मनात नाना कल्लोळ उठले होते. विदेशगमनाचा कसलाही आनंद नव्हता...होती ती जबाबदारीची वाढलेली जाणीव. मी येथवर कंपनीचा गाडा अक्षरशा: खेचत आनला होता...बाहेरचे विरोधी ठीक होते...बाह्य संघर्ष मला आव्हानदायी वाटत...त्याशी तोंड देणे आव्हानदायी असे. पण अंतर्गत विरोधाचे अनेक सुप्त प्रवाह होते...त्याची मला चांगलीच जाण होती. माझा वेग नको तेवढा जास्त आहे हे कळत होते...पण जर मराठी मानसांचे एक नवे साम्राज्ज्य उभे करायचे असेल तर त्याला इलाज नव्हता. माझ्यात नुसती कल्पकता नव्हती तर कल्पनांना साकार करण्याची अदम्य इछ्छा होती...आणि मी काही गोष्टी अल्पावधीत केल्याही होत्या...
आणि हाच माझा वेग अनेकांना पसंत नव्हता...
आणि जे करुन ठेवले होते त्याकडेही बघायची इछ्छा नव्हती...
मला मार्ग काढावे लागणार होते...पण कसे हे मला कळत नव्हते. दैनंदिन व्यवस्थापन आणि अचुक वित्त व्यवस्थापन यासाठी मला अशाही स्थितीत अवलंबुन रहावे लागत होते कारण मी त्यात पुर्ण अडाणी होतो...
के.एल.एम. च्या अवाढव्य जंबो-जेटमद्धे बसलो तेंव्हा मला नकळत खुप एकाकी वाटु लागले.
अश्रु झरु लागले.
----------------------------------------------------------------------------------------(

Monday, March 14, 2011

खलिस्तानी दहशतवाद


आजच्या पिढीला खलिस्तानी शिख दहशतदाच्या झळा लागल्या नसल्याने व आता जवळपास तो सुप्तावस्थेत गेला असल्याने विशेष माहिती नाही. त्याला सुप्तावस्थेत म्हटले आहे याचाच दुसरा अर्थ असा कि तो पुन्हा कधीच उफाळुन येणार नाही असे नाही. या दहशतवादाने ८०-९० च्या दशकांत सारा भारतीय उपखंड हिंसेच्या तांडवाखाली आणला होता. या दहशत्वादाने भारताच्या आजवरच्या सर्वात समर्थ प्रधानमंत्री इंदिराजींचा जसा बळी घेतला तसाच निव्रुत्त जनरल वैद्यांचाही बळी घेतला. हजारो निष्पाप नागरिक मारले गेले ते वेगळेच. या दहशतवादाचा सखोल अभ्यास होणे जरुरीचे आहे.
सारे काही खलिस्तानसाठी...
आपले स्वतंत्र राष्ट्र असावे यासाठी जी खलिस्तानी चळवळ सुरू झाली तिची पाळे-मुळे स्वातंत्रपुर्व काळात जातात. १९०९ मद्धेच मोर्ले-मिंटो सुधारकार्यक्रमाच्या वेळीस मुस्लिमांनी जसे स्वतंत्र प्रतिनिधित्व मागितले तसेच शिखांनीही मागितले. पुढे जेंव्हा स्वातंत्र्य द्रुष्टीपथात येवु लागले तसे मुस्लिमांचा पकिस्तान तसाच शिख धर्मियांचा खलिस्तान असावा अशी मागणी जोर धरू लागली होती. यचे कारण म्हणजे शिख हा स्वतंत्र धर्म असुन जर धर्माधारित पाकिस्तानची निर्मिती होवू शकते तर शिखांच्या खलिस्तानची का नाही? शिख हा धर्म हिंदु धर्मांतर्गत आहे अशी बव्हंशी हिंदुंची समजुत आहे. पण ती शिखांनाच मान्य नाही. मुस्लिमांशी त्यांचे हाडवैर जगजाहीर आहे. १८५७ च्या उठावात शिखांनी इंग्रजांची बाजु घेवून उटाव दडपुन टाकण्यात जी मोलाची कामगिरी बाजावली याला कारण हेच होते कि उठाव यशस्वी झाला तर दिल्लीचे इस्लामी तख्त त्यांच्यावर राज्य करनार होते. आणि मुस्लिमांकडुन त्यांनी अपरंपार छ्ळ सोसला असल्याने ते तसे घडू देने अशक्यच होते.
१९४० मद्धे सत्ताप्राप्तीसाठी आतुर अशा हिंदु, मुस्लिम आणि शिखांशी ईग्रजांनी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. महात्मा गांधींनी शिखांना चुचकारुन शांत केले. एवढेच नव्हे तर पं. नेहरुंनी १९४६ च्या कलकत्ता येथे भरलेल्या अखिल भारतीय कोन्ग्रेसच्या अधिवेशनात ठराव पास करवून शिखांसाठी पुरेशी स्वायत्तता दिली जाईल असे महात्मा गांधींच्या मतानुसार घोषित केले व तशा आशयाचा ठरावही ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीत पास करुन घेतला.
यामुळे शिखांचे तात्पुरते समाधान झाले. असे घडले नसते तर कदाचित पाकिस्तानबरोबरच खलिस्तानचीही मागणी इंग्रजांनी मान्य केली असती हे गांधीद्वेष्टे विसरतात. पुढे नेहरुंनी आपली भुमिका बदलली आणि मुंबईत १० जुलै १९४7 रोजी संघराज्याचे नेमके स्वरुप स्वातंत्र्यानंतर वेगळे असु शकते असे घोषित केले...यामुळे बहुतेक शिखांना आपण फसवलो जात आहोत याची जाणीव झाली. पण फालणीपुर्व पंजाबमद्धे तेंव्हा शिख हे अल्पसंख्यच होते. फालणीने सारीच समीकरणे बदलून टाकली. फालणीनंतर बव्हंशी शिखांना भारतात यावे लागल्याने पकिस्तानातील पंजाबमधील शिखांची संख्या १९%वरुन ०.१%वर आली तर भारतातील पंजाबमद्धे ती भरघोस वाढली. त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न उग्र स्वरुपाचे होते. त्यात घटनासमितीने शिखांसाठी कसलाही स्वयतत्तेचा प्रबंध न केल्याने घटना समितीवरील शिख प्रतिनिधी श्री हुकूमसिन्घ यांनी घोषित केले कि शिखांना घटना मान्य आहे या गैरसमजात राहू नका...आमची घोर फसवणुक झालेली असून आमच्याशी दुजाभाव केला जातो आहे. यात अजून तेल ओतले गेले आणि शिखांना रानटी, गुन्हेगार जमात ठरवण्याचा हिंदु शासन प्रयत्न करत आहे आणि शिखांचा संपुर्ण विनाश केला जाणार आहे अशी निवेदने प्रितमसिंग गिलसारख्या शिक्षण्तद्न्याने प्रसिद्ध केली. अर्थात त्यात तथ्य नव्हते. पण विद्वेषाची पाळेमुळे रोवली जात होती ज्याचा फार मोठा झटका भविष्यात भारतीय उपखंडाला बसणार होता.
शिख धर्म: अल्प इतिहास
खरे तर याला स्वतन्त्र धर्म मानावे कि पन्थ असा वाद जुनाच आहे. परंतु स्वतंत्र धर्मग्रंथ, उपासना पद्धती आणि तत्वद्न्यानाच्या आधारावर हा स्वतंत्र धर्म आहे असे म्हनता येते. या धर्माला जातीभेद मान्य नाहित...(पण ते प्रत्यक्षात आस्तित्त्वात आहेत.) गुरू नानक ते गुरु गोविंदसिन्घ या १० गुरुंच्या शिकवणुकीचा पुर्ण पगडा या धर्मावर आहे. निराकार, अलख आणि अकाल अशा एकेश्वरी तत्वावर या धर्मियांची श्रद्धा आहे व त्याला ते "वाहेगुरु" असे संबोधतात. आदिग्रंथ गुरु ग्रंथसाहिब, दशमग्रंथ हे त्यांचे महत्वाचे धर्मग्रंथ आहेत. स्वर्गनरकादि कल्पनांवर त्यात विश्वास नसून संपुर्ण मुक्ती हेच एकमात्र धेय आहे. 

या धर्माची स्थापना १५व्या शतकात झाली. त्या अर्थाने हा फारच तरुण धर्म आहे. कोणीही हिंदु नाही कि कोणी मुस्लिम या तत्वावर गुरु नानकांनी या धर्माची सुरुवात केली. शिखांमद्धे पराकोटीची स्वातंत्र्य भावना असल्याने त्यांनी त्या काळात आपली राजकिय अस्मिता जपण्यासही सुरुवात केली. गुरु तेघ बहाद्दुर आणि गोविन्द सिन्घांनी त्यासाठी शिखांचे एका लढवैय्या समाजात रुपांतर केले. गोविंदसिंघांनी १६९९ मद्धे शिखंच्या पहिल्या सतंत्र राज्याची निर्मिती केली. औरंगजेबाशी झालेल्या अपरिहार्य संघर्षात शिखांची अपरिमित हानी झाली खरी पण शिख त्यामुळे अधिकच आक्रमक झाले. गुरु बंदासिंग बहाद्दराच्या नेत्रुत्वाखाली त्यांनी मोगलांशी पराकोटीचा संघर्श केला...शेवटी मोगल सम्राट जहांदरशहाने बंदासिंगाची अमानुष हत्त्या केली. शिख ही बाब कधीच विसरु शकले नाहीत. ते आपली सैनिकी शक्ति वाढवतच राहिले आणि पुढे महाराजा रणजित सिन्घांनी शिखांचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. शिखांची स्वतंत्र अस्मिता अशा रितीने सिद्ध झाली.
हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हा पंथ स्थापन झाला अशी समजुत आहे पण ती खरी नाही. हिंदुंचे शत्रु मुस्लिम हेच त्यांचेही शत्रु असल्याने असा समज होतो खरा, पण त्या जागी अन्य कोणत्याही धर्मियांचे राज्य असते तर शिखांनी त्यांचाही तेवढाच कडवा विरोध केला असता. त्यात मुस्लिमांनी त्यांच्या गुरुच्या अमानुष हत्या केल्याने द्वेषात अधिकच भर पडली. पण त्याचा फायदा हिंदु राज्यकर्त्यांनी कधी करुन घेतला असल्याचे इतिहासात...अगदी पानिपत प्रकरणीही दिसत नाही.
आज जगात जवळपास २.७५ कोटी शिख असुन त्यापैकी जवळपास व्यापार-उद्योगाच्या निमित्तने २५% शिख जगभर पसरले आहेत. अत्यंत कडवी धार्मिकता आणि लढवय्येपणा यासाठी ते प्रसिद्ध आहेत. स्वतंत्र धर्म आणि स्वता:ची अशी विशिष्ट संस्क्रुती त्यांनी गेल्या ५०० वर्षांत विकसित केली असल्याने स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न त्यांना पडणे हे काही मानवी स्वभाव पहाता अस्वाभाविक नव्हते. आणि प्रत्येक धर्मात कडवे/धर्मांध असतातच. ते अशा सुप्त भावना भदकावण्यात नेहमीच अग्रेसर राहत असतात हा जगाचा इतिहास आहे. ही जागा लोंगोवाल आणि भिंद्रानवाले यांनी भरुन काढली.
हा दहशतवाद कसा भडकत गेला हे आपण येथे थोडक्यात पाहू.
लोकशाही मार्गाकडुन दहशतवादाकडे...
सन १९५०-६० च्या दरम्यान पंजाबची राजधानी सिमला ही होती. पण भाषावार प्रांतरचनेसाठी हिमाचल प्रदेश व हरियाना ही राज्ये वगळुन स्वतंत्र पंजाब राज्याची मागणी जोर धरु लागली. यामुळे पंजाब राज्यात शिख हे अल्पसंख्य न ठरता बहुसंख्य होणार होते. अकाली दलाने पंजाबी सुभ्ह्याची मागणी नेटाने पुढे रेटली. यासाठी खुप शांततामय आंदोलने केली गेली...हजारोंना अटक करण्यात आली. या आंदोलनाला अकाल तख्ताने सक्रिय पाठिंबा दिला. शेवटी सरकार नमले आणि १९६६ साली भाषावार विभाजन होवून आताचा पंजाब आस्तित्वात आला. त्यातुनच पंजाबने पाणीवाटपात पंजाबवर अन्याय होतो आहे अशी हाकाटी सुरु केली. पंजाबी लोक शेतीवरच अवलंबुन असल्याने या तक्रारीला अर्थातच व्यापक जनसमर्थन मिळाले.
त्यामुळेच कि काय अकाली दलाने आधी शांततामय मार्गाने अनेक मागण्या पुढे करायला सुरुवात केली. अर्थात त्यातच विभाजनवादाची मुळे दडलेली होती. या मागण्या अशा होत्या:
१. केंद्रशासित चंदिगढ शहराला पंजाबमद्धे सामील करणे.
२. पंजाबी भाषा बोलणार्या आसपासच्या सर्वच भागांचे पंजाबमद्धे विलिनीकरण. (येथे बेळगावची आठवन येते.)
३. केंद्र सरकारने स्वता:चे नियंत्रण कमी करुन राज्यांना स्वयतत्ता देणे.
४. शिखांची सैन्यात भरती वाढवणे.
५. अखिल भारतिय गुरुद्वारा कायद्याला मंजुरी देणे.
या मागण्या मान्य होणे शक्यच नव्हते. तेही इंदिराजींसारख्या कर्तव्यकठोर पंतप्रधान सर्वेसर्वा असतांना. पण याच काळात खलिस्तानवादी दहशतवादी संघटनांची स्थापना होवू लागली होती. त्यांचे धेय स्पष्ट होते. त्यांचे तत्वद्न्यानही सुस्पष्ट होते. "आमचा संघर्ष कोणत्याही जाती-जमातीच्या धर्माच्या विरुद्ध किंवा ब्राह्मण-बनियांनी आपले तत्वद्न्यान लादलेल्या गोरगरीबांशी नाही." असे खालसा राजने घोषित केले होते. "आम्हाला जेथे वेदना आणि हाल होणार नाहीत असे आदर्ष राष्ट्र निर्माण करायचे आहे." असेही घोषित केले गेले.
ब्राह्मण आणि बनिया हे खालसा नष्ट करण्याच्या प्रयत्नांत असल्याने त्यांच्याशी संघर्ष करु अशीही घोषणा होती. ब्राह्मण आणि बनिया हेच आपले शत्रु मानुन शिखांनी आपली सामाजिक रननीति आखल्याचे यावरुन दिसते. खलिस्तान कमांडो फ़ोर्सचा नेता वासनसिन्ग जफरवाल यानेही असेच वक्तव्य पुढे केले आणि ब्राहमनांशी आम्ही कसलीही तडजोड करनार नाही असे घोषित केले.
थोडक्यात शिख दहशतवादाला ब्राह्मण-बनिया द्वेषाचीही धार होती हे स्पष्ट दिसते. बहुदा हा वर्ग त्यांना स्वतंत्र धर्म म्हणुन मान्यता देत नसल्याने अशी तीव्र प्रतिक्रिया उमटली असावी. यामुळेच कि काय बौध, जैन आणि शिख हे हिंदु कायद्यांतर्गत आनल्याचाही तीव्र निषेध शिख नेत्रुत्त्वाने केला होता. शिख हा सर्वस्वी स्वतंत्र धर्म आहे अशी त्यांची मान्यता आहे आणि त्यात तथ्यही आहे हेही खरे. आपले नकळत हिंदुत्वीकरण केले जात आहे असा त्यांचा समज होण्यामागे हेही एक कारण होते. सिंघ खालसानेही असाच द्रुष्टीकोन ठेवला होता हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. "आम्ही ब्राह्मण-बनियांकडुन (खलिस्तान झाल्यावर) जबरी कर वसुल करु कारण ब्राह्मण आणि बनिया हेच गरीबांचे राजकिय आणि आर्थिक शोषण करत आहेत." असे पाच सदस्स्यिय पंथिक समितीने म्हटले आहे. यावरुन खलिस्तानसाठी ब्राह्मण-बनिया द्वेषाचा उपयोग करुन घेण्याची दहशतवादी व राजकिय संघटनांची पुरेपुर तयारी झाली होती हे उघड आहे. या द्वेषाचे कारण म्हणजे पंजाबमद्धे शिख तुलनेने अल्पसंख्यच होते (फाळणीपुर्व). फाळणीनंतर असंख्य शिख जे विस्थापित झाले त्यांची आर्थिक स्थिती पुर्णपणे तळाला पोहोचली होती. त्यांचे सर्वस्व हरपले होते. या स्थितीचा पंजाबमधील फायदा बनिया व धनाढ्य ब्राहमण वर्गाने घेतला. त्याशिवाय ब्राहमण वर्गाने वारंवार शिख समुदायाचे हिंदुत्वीकरण करण्याचा चंग बांधल्यानेही ही प्रतिक्रिया उमटत होती. ( (संदर्भ: Rise of Sikh Militancy &Militant Discourses: An appraisal of the economic factor- Birender pal Sing , panjabi University, patiyala. )
१९७१ साली सर्वप्रथम अकाली दलाचे महासचीव जगजितसिन्ग चौहान यांनी स्वतंत्र खलिस्तानची जाहीर मागणी केली. यामुले त्यांना पक्षातुन हकलले असले तरी त्यांनी परदेशात जावून शिखांवर होत असलेल्या अन्यायाचे पाढे वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला जरी ते स्वतंत्र खलिस्तान हा शांततामय आंदोलनांतुन प्राप्त व्हावा असे म्हनत असले तरी त्यांची क्रुती तशी नव्हती असे दिसते.
लाला जगतनारायण यांची हत्या: शिख दहशतवादाची सुरुवात
पंजाबमधील हिंद समाचार समुहाचे संस्थापक, पंजाबमधील सर्वाधिक खपाचे व्रुत्तपत्र "पंजाब केसरी" चे संपादक-संपादक आणि स्वातंत्र सेनानी असलेले कोन्ग्रेस पक्षाचे सदस्य श्री लाला जगतनारायन हे भिंद्रानवालेचे कट्टर टीकाकार होते. संत जर्नेलसिन्ग भिंद्रानवाले हा अत्यंत कट्टरपंथी होता. भिंद्रानवालेने १९८० च्या निवडनुकांत चक्क कोन्ग्रेस्स्चा प्रचार केला होता. (बहुदा त्यामुळे भिंद्रानवाले हे इंदिराजींनीच निर्माण केलेले विनाशक तांदव होते असे म्हतले जाते.)
शिखांच्या अनेक उपपंथांतही वाद होतेच. बब्बर खलसा, शिरोमनि गुरुद्वारा प्रबंध समिती, अखंड किर्तनी जत्था, निरंकारी असे अनेक घटक होते. निरंकारींचा नेता गुरुबचन सिंग याने १९७८ मद्धे अखंड किर्तनी जथ्याच्या १३ निदर्शकांना ठार मारवले...त्याला अटक झाली...पण त्याला पुढे दुस-याच वर्षी सोडून दिले गेले. यामुळे विभाजनवादी अजुनच आक्रमक व्हायला लागले. गुरुबचन सिंगला १९८० साली गोळ्या घालुन ठार मारण्यात आले.....भिंद्रानवालेने त्याचा जाहीर जल्लोश केला...जे संशयित अतक झाले ते भिंद्रानवालेचे निकटतम होते. त्यामुळे भिंद्रानवाले संशयाच्या भोव-यात सापडला. लाला जगतराम यांनी भिंद्रानवालेवर जाहीर टीका सुरु केली. त्याची परिनती १९८१ मद्धे लाला जगतराम यांची त्यांच्याच कार्यालयात अतिरेक्यांनी गोळ्या घालुन हत्या करण्यात झाली. येथे हे नमुद करणे आवश्यक आहे कि पंजाब केसरीने व त्यांच्या पत्रकारांनी खलिस्तानवादी दहशतवादाच्या भीषण रक्तरंजित काळात जी अलौकिक साहसी आणि निर्भीड पत्रकारितेचे दर्शन दिले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
भिंद्रानवालेला अटक झाली खरे...पण त्यामुळे जो क्षोभ उठला व हिंसा होवू लागली त्यामुळे तत्कालीन ग्रुहमंत्री ग्यानी झैलसिंग यांना भिंद्रानवालेची जामीनावर मुक्तता करावी लागली. भिंद्रानवाले रातोरात हिरो बनला. शिख तरुणांनी सशस्त्र बनावे अशी उघड आवहने तो करु लागला. संत लोंगोवालने त्याला त्याच्या कडव्या सशस्त्र अनुयायांसह सुवर्ण मंदिरात रहाण्यास अनुमती दिली. सुवर्ण मंदिर हा एक अभेद्य किल्लाच बनुन गेला. बहुसंख्य शिख अतिरेक्यांना सीमेलगत पाकिस्तानी आय.एस. आय. कडुन प्रशिक्षन दिले जात होतेच. धनाची गरज पुरवण्यासाठी ब्यंका लुटन्याच्या योजना तयार होत्याच.
त्यातच पुन्हा धार्मिक वाद उपःआळुन आला. घटनेतील शिखांना हिंदु कायद्यात खेचण्याची तरतुद अमान्य करत शिख हा स्वतंत्र धर्म असल्याने त्यांच्या जन्म/विवाहाच्या नोंदी शिख म्हणुनच केल्या जाव्यात अशी मागणी अकाली दलाने केली. तोवर पंजाबमधील वातावरण पुर्ण तापले होते व स्वतंत्र खलिस्तान हिच काय ती मागणी उरली होती. निष्पाप हिंदुंच्या हत्त्या बेसुमार वाढल्या होत्या. लुटालुट, बलात्कार, खंडण्या वसुलींना ऊत आला होता. राष्ट्रवादी शिखही या हिंसेच्या तांदवातुन सुटले नाहीत.
एकदा भिंद्रानवालेने आपली मानसे आनण्यासाठी एक बस पाठवली होती. ती पोलिसांनी अडवली हे कळताच त्याने, "पाच वाजेपर्यंत बस सोडली नाही तर मी एका तासात ५००० हिंदुंना ठार मारेल" अशी धमकी त्याने दिली होती. आणि तसे करण्यास तो खरोखर समर्थ होता...तेवढा क्रूरही होता. या हिंसाचारात एकुण २०,००० पेक्षा जास्त लोक ठार मारले गेले यावरून या दहशतवादाच्या भीषणतेची कल्पना यावी.
शिख धर्माची मुलतत्वेच मुळात लढवय्ये अनुयायी बनवण्यासाठी असल्याने दहशतवाद हा या धर्माचा एक पाया आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. धर्मांनी दहशतवादाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थनच केले असल्याने राजकिय वा आर्थिक उद्दिष्त्ये साध्य करण्यासाठी धर्माचा कसा वापर केला जातो हे आपण अन्य धर्मांच्या बाबतीत पाहिलेच आहे. शिख धर्म त्याला अपवाद राहिला नाही. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हा पंथ निर्माण झाला असे म्हणणार्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे.
ओपरेशन ब्ल्यु स्टार
सुवर्ण मंदिर हा दहशतवाद्यांचा मोठा अड्डा आणि मुख्य केंद्र बनल्याने केंद्र सरकारचा तो मोठा चिंतेचा विषय बनला होता. विभाजनवाद कोणत्या पातळीवर जावुन ठेपेल याचा नेम नव्हता. राज्य सरकारची यंत्रणा खुद्द दहशतवाद्यांच्या आहारी गेली होती. कोणत्याही क्षणी स्वतंत्र खलिस्तान होईल असे दिसू लागले होते. पण सुवर्ण मंदिर हे सर्वच शिखांच्या द्रुष्टीने सर्वात पवित्र धर्मस्थान असल्याने त्यावर हल्ला करुन अतिरेक्यांचा खात्मा करण्याचा विचारही कोणाच्या मनात आला नसता. किंबहूना भिंद्रानवालेचीही हीच अटकळ असावी.
पण इंदिराजींनी ते धाडस केले. ३ जुन १९८४ला जनरल अरुण वैद्यांच्या देखरेखीखाली ले. जनरल कुलदिपसिंग ब्रार यांनी या कारवाईचे नेत्रुत्व केले. मंदिराला वेढा घातला गेला. वाटाघाटी करण्याचाही प्रयत्न झाला. दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले गेले. मंदिरात असलेल्या शेकडो निष्पाप भाविकांना बाहेर पाठवण्याच्या विनंत्या केल्या गेल्या. शे-सव्वशे व्रुद्ध/आजारी भाविकांचीच तेवढी सुटका झाली. नंतर जवळपास २४ तास युद्ध झाले. दहशतवादी आत्याधुनिक शस्त्रसामग्रीसह जोरदार प्रतिकार करत होते. शेकडो जवान आणि दहशतवादी यात मारले गेले. या गोळीबारात मंदिरातील निष्पाप भाविकही ठार झाले. महत्वाचे म्हनजे भिंद्रानवालेही यात ठार झाला. सुवर्ण मंदिर दहशतवाद्यांच्या तावडीतुन मुक्त झाले. पण येथेच नव्या विनाशकारी हिंसाचाराची नांदी झाली. ती पुढे अनेक वर्ष हजारोंचा बळी घेवूनच तात्पुरती थांबली.
यामुळे शिख पराकोटीचे संतप्त झाले होते. हा त्यांच्या धर्मश्रद्धेवर मोठा आघात होता. भिंद्रानवाले हा शिखांच्या (अपवाद वगळता) नवीन श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला.
इंदिराजींनी सर्व धोक्यांची पुर्वकल्पना असुनही आपले शिख शरीररक्षक होते तसेच ठेवले. हा निर्णय त्यांच्या बलिदानास कारणीभुत ठरला. ३१ ओक्टोबर १९८४ च्या सकाळी सतवंत सिंग आणि बेअंतसिंग यांनी गोळ्या घालुन इंदिराजीची हत्या केली. सारा देश सुन्न झाला...बधीर झाला...
मग उठली संतापाची लाट.
शिखांच्या वेचून हत्या
शिखविरोधी हिंसक दंगली कोंग्रेसने जाणीवपुर्वक घडवल्या कि ती लोकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती? खरे तर यात दोन्ही बाबींचा समावेश होता. शेकडो निष्पाप शिखांचे शिर्कान केले गेले आणि ही नक्कीच मानवतेला काळीमा फासणारी बाब होती. द्वेषाचे उत्तर प्रति-द्वेषाने द्यायचे ही मानवी आदिम भावना आजही नष्ट झालेली नाही हेच खरे.
भारतात हिंदु-मुस्लिम दंगे होत-होतात हे आपल्याला माहित आहे, पण दहशतवादी म्हणता येतील अशा कारवाया बाबरी मशिद उध्वस्त करेपर्यंत मुस्लिम दहशतवाद आपल्याला माहितही नव्हता. दहशतवाद म्हणजे काय असतो हे भारतियांना शिकवले ते शिख दहशतवाद्यांनी...खलिस्तानवाद्यांनी.
स्वतंत्र देश हवा ही शिखांची भावना चुकीची आहे असे मानता येत नाही. धार्मिक आधारावर एक फालणी झालीच होती त्यामुळे शिखांनाही तशी स्वप्ने पडणे वावगे नव्हते. कदाचित त्यांनी आपल्या मागण्या रेटण्यासाठी घतनात्मक पद्धतीने आंदोलने केली असती. पण त्याच वेळीस चुकीचे राजकारण आणि प्रस्नांवर तात्पुरते उत्तर शोधणे या भारतीय राजनैतीक व्रुत्तींमुळे शिखांना भदकावले गेले आणि दहशतवादाचा आश्रय घेणे भाग पडले असे आता स्पष्टपणे म्हनता येवू शकते. म्हणजे एका राजकीय दहशतवादाला शिखांनी हिंसक दहशतवादाने उत्तर दिले. एका परीने विचार केला तर दोन्ही बाजु अन्याय्य आणि मानवताविरोधी होत्या असे आपल्या लक्षात येईल.
अति-हिंसक प्रतिक्रिया आणि एन्कौंटर्स.
खलिस्तानवादी दहशतवादी फक्त भारतातच नव्हे तर युरोप -अमेरिका आणि क्यनडातही होते. २३ जुन १९८५ रोजी एयर इंडियाचे एक विमान आयर्लंडच्या किनार्यालगत आकाशातच उडवले गेले. यात ३२९ प्रवासी ठार झाले. त्यात क्यनेडीयन नागरीकच जास्त होते. शिख दहशतवादाचे पडसाद यामुळे जगभर उमटले. भारतात तर सर्वत्रच हिंसेचे थैमान उठले. कोनतेही शहर त्याला अपवाद राहिले नाही. खुद्द पुण्यात शिख दहशत्वाद्यानी अनेक काळ ठाण मांडुन ब्यंका लुटने, सर्रास गोळीबार करत दहशत माजवणे असे प्रकार तर केलेच पण रिटयर्ड जनरल अरुणकुमार वैद्य यांचीही हत्या केली. पंजाबमद्धे तर हिंसेचे तांडव उठले होते. २९ एप्रिल १९८६ रोजी स्वतंत्र खलिस्तानची घॊषणाही करण्यात आली. खलिस्तानचे भूत भारताच्या मानगुटीवरुन उतरायला तयारच नव्हते.
आणि शेवटी पोलिसांना एन्कौंटरचाच आश्रय घ्यावा लागला. शेकडो दहशतवादी (यात काही निष्पापही आले) पोलिसांनी ख-या-खोट्या एन्कौंतरमद्धे ठार मारले. पोलिसांचा हा पवित्रा दहशतवाद्यांना अपेक्षित नव्हता, त्यामुळे ते अक्षरश: हबकुन गेले. खलिस्तानी चळवळ १९९४-९५ पर्यंत संपत गेली ती केवळ या एन्कौंटर्समुळे असे आता सारेच मान्य करतात. अर्थात स्व. राजीव गांधी यांनीही शांततामय मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. राजीव-लोंगोवाल यांच्यात तसा करारही झाला...पण काही महिन्यांत लोंगोवालांचीच हत्त्या झाल्याने पुन्हा अदसर निर्माण झाला.
येथे मराठी माणसांना अभिमान वाटण्यासारखी बाब म्हणजे माझे मित्र व वंदे मातरम संघटनेचे संस्थापक, श्री. संजय नहार यांनी मराठी तरुणांना सोबत घेत पंजाबमद्धे जीवाचा धोका पत्करत अनेक पदयात्रा केल्या...तेथील लोकांचे अश्रु पुसले आणि ऐक्याची-स्नेहाची ग्वाही दिली. एक मराठी तरुण तेथेच एका अभियानात शहिदही झाला. पंजाब केसरी दैनिकाने तर जे कार्य बजावले त्याला तोडच नाही.
हळु हळु खलिस्तानी दहशतवाद मवाळ होत संपला हे खरे...पण तो तात्पुरत्या स्वरुपाच्या आहे...
कारण सध्या विखुरलेल्या खलिस्तानवादी संघटना पुन्हा बळ धरण्याचा, एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरचे शिख अजुनही भिंद्रानवालेला विसरले नाहित...त्यांच्या द्रुष्टीने ते शहीद हुतात्मा आहेत. "पिण्याच्या पाण्यापेक्षा खलिस्तान आस्तित्वात येणे आवश्यक आहे." असा प्रचार हे घटक जगभर करत असतात. मुस्लिम-शिखांत भांडण लावण्यासाठी रिसर्च & अनालिसिस ही गुप्तचर संघटना कार्यरत आहे अशा अफवाही ते पसरवत आहेत.
आज पकिस्तान स्वत:च दहशतवादाच्या भिषण छायेत आहे म्हणुन नाहीतर कदाचित खलिस्तानी दहशतवादाचे पुनरुज्जीवन कधीच झाले असते असे म्हनता येईल अशी स्थिती आहे.
म्हणजेच सध्या ही चलवळ/दहशतवाद सुप्तावस्थेत आहे असे वाटत असले तरी ते वास्तव नाही.
शेवटी धर्मच!
धर्मच शेवटी जागतीक दहशतवादाला कसे जबाबदार आहेत हे आपण सर्व धर्मियांच्या दहशतवादांवरुन पाहिलेच आहे. शिख हा स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचाच एक भाग आहे असा प्रचार करत, कायदे-प्रणालीही वापरत शिखांचे स्वतंत्र अस्तित्व पुसण्याचा हिंदुंनी जो अविरत प्रयत्न केला त्यातुन हिंदु धर्मियांबद्दल...विशेषता: ब्राह्मणांबद्दल त्यांच्या मनात राग भरायला सुरुवात झाली हे स्पष्ट दिसते. बनियांमुळे त्यांचे आर्थिक शोषण होत होते ते वेगळेच. धर्म वाढवण्याच्या सुरुवातीच्या काळात जरी आधीच्या गुरुंनी हिंदुशी जुळवून घेतले असले तरे पुढे तशी स्थिती उरली नाही. आधी घिंदु घरातील एक तरी मुलगा शिख होण्यासाठी द्यावा असा आग्रह असे...पण तेही पुढे थांबले. राजकिय व सांस्क्रुतीक द्रुष्ट्या ते आपले वेगळेपण ठळक करत गेले. हिंदुंमद्धे एरवी क्वचित असणारी कट्टरता ते जोपासत गेले.
खरे तर स्वतंत्र धर्मीय म्हणुन त्यांनी स्वत:ची अस्मिता जोपासली होतीच. त्यामुळेच इंग्रजांनी हिंदु-मुस्लिमांबरोबरच शिखांनाही स्वातंत्र्याआधी चर्चेस बोलावले होतेच. म. गांधी व नेहरुंनी त्यांना काही प्रमाणातील स्वयत्ततेची आश्वासने दिली नसती तर कदाचित पाकिस्तानबरोबरच खलिस्तानही अस्तित्वात आले असते. आणि ते अन्याय्य म्हनता आले नसते कारण जो नियम मुस्लिमांना तोच शिखांना लागला असता. पण स्वतंत्र भारताने आपले आश्वासन पाळले नाही त्यामुळे "हिंदु" सरकारने शिखांना फसवले असाच त्यांचा समज झाला. त्यात तत्कालीन अनेक अन्यायांचीही भर पडली. त्यातुन शिख दुखावत जात धर्माच्या नावाखाली एक होवू लागला...
आणि एक रक्तरंजित इतिहास लिहिला गेला.

Sunday, March 13, 2011

दहशतवाद आणि मानवी आस्तित्त्वाचा प्रश्न!

सर्वच प्रकारच्या, सर्वच धर्मियांच्या दहशतवादाने आजचे मानवी जीवन कस्पटासमान करुन टाकण्याचा कसा चंग बांधला आहे हे मागील प्रकरणातील विवेचनातून आपल्या लक्षात आले असेलच. त्यामुळे निर्माण होणार्या समस्या ह्या केवळ सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरुपाच्या नसून त्यातून मानवी जीवनाच्या आस्तित्त्वाचा अति-गंभीर प्रश्न उभा ठाकलेला आहे. केवळ जिवंत असने वा जिवंत राहण्याची धडपड करत राहणे म्हणजे मानवी आस्तित्त्व टिकते आहे वा टिकेल अशी आशा बाळगणे अयोग्य असुन त्यातून मानवी जीवनाचे एकुणातीलच सार निघून जात मानवी समाज हा हळुहळु मुल्यविरहित होत जात तो न्रुशंस अशा आदिम काळात परतण्याची भिती त्यातून निर्माण झाली आहे.
मानवी आस्तित्त्व हे एक समाज म्हणुन, एक परिवार म्हणुन आणि एक व्यक्ती म्हणुन आकारत असते. राष्ट्र, धर्म, पंथ जात या परिघात मानवी आस्तित्त्व वावरत असतांनाच बहुसांस्क्रुतिकतेचा शिरकावही आजच्या जागतिक खेड्यात अपरिहार्यपणे होत असतो आणि तो अयोग्य आहे असे म्हनता येत नाही. एका परीने ही जागतीक मानवी समुदायाची एक-राष्ट्रवादाकडे/एक सांस्क्रुतिकतेकडे होत जाणारी अपरिहार्य वाटचाल आहे आणि ती अनेक संदर्भात खरीही ठरत आहे. भविष्यात कदाचित एक जग-एक राष्ट्र-एक संस्क्रुती ही संकल्पना खरीही होवु शकेल...पण त्याचेवेळीस एकीकडे उर्धगामी वाटचाल आणि त्याच वेळीस होत असणारी अधोगामी घसरण यातून मानवी मुल्यांचे वर्धन होण्याऐवजी घसरणच होत आहे असेही आपल्या लक्षात येईल.
सर्वच स्तरांतुन अविरत कोसळत असणारा दहशतवाद हा मानवी आस्तित्वाचा सार्थकतेच्या ध्येयमार्गातील महत्त्वाचा अडथळा आहे. दहशतवादी संख्येने अल्प असले तरी ते जी परिणामकारक साधने वापरत असतात त्यातुन सारखे जे तांडव निर्माण होते ते सर्वच समुदायांना पुन्हा कोणत्या ना कोनत्या प्रति-दहशतवादाचा आश्रय घेण्यास भाग पाडत आहे असेही चित्र आपल्याला दिसते. यातुन जी काही एक स्थिती निर्माण होवु पहात आहे त्यातुन निकोप मानवी आस्तित्त्वाचा लोप होत जात आहे आणि ही अत्यंत काळजी करण्याची बाब आहे.
दहशतवाद हा काही आधुनिक जगाची उपज नव्हे हे मी विविध प्रकरणांत स्पष्ट केले आहेच. पुरातन कालापासून, अगदी मानव हा टोळीमानव असल्यापासुन दहशतवादाचा एक-केन-प्रकारेन उपयोग करत आला आहे. त्याने भौतिक प्रगति केली असली तरी त्याची ही आदिमता अवशिष्ट रहात मानवी वर्तन दुभंगमय करत राहिले आहे. सहिश्णु म्हनवनारे तथाकथित समाज/धर्मही प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष रित्त्या दहशतवादी मुल्ल्यांना जपत असतात. त्यासाठी वापरले जानारे मार्ग आणि त्या-त्या दहशतवादाच्या साधनांच्या तिव्रता कमी-जास्त असतात एवढेच. परंतु परिणाम मात्र एकच असतो आणि तो म्हनजे दुस-यांना भयभित करणे, ठार मारणे वा त्यांचे सांस्क्रुतिक अपहरण करणे. एन-केन प्रकारेन वर्चस्वतावाद गाजवणे. अशा दहशतवादांना प्रति-दहशतवादही सामोरा येतो आणि तोही मुल्यांचे नाव घेत वा गतकालातील अन्यायाचे पाढे वाचत प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी कंबर कसत असतो. असे करत असतांना सत्त्याची चाड एकाही पक्षाला उरत नाही. "आम्ही आणि इतरेजन" अशी समाजाची/जगाची सोयिस्कर वाटणी केली जाते. भारतातील ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद असेल वा हिंदुत्ववादी विरुद्ध अन्य धर्मिय असा वाद असतील, त्यामागे Theory of Others" पराकोटीच्या प्रमानात उपयोजिली जात आहे हेही आपल्य ल;अक्षात येईल. हे "इतरपन" जे आहे ते स्वता:चा समाज आणि अन्यांचा समाज यात संघर्ष निर्माण करत परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी सज्ज असतात. त्यासाठी सोयिस्कर तत्वद्न्यानांची निर्मिती केली जाते. सोयीची संशोधने स्वीकारली जातात...वा त्यांना हवी तशी वाकवली जातात...त्यांचाच उदो-उदो केला जातो. सोयिचेच आयडाल्स हव्या त्या सोयिच्या पद्धतीने वाकवुन वापरले जातात. भारतातील सावरकरवादी, टिळकवादी, गांधीवादी, शिवाजीवादी, ते पेशवाईवादी यांचा या परिप्रेक्षात विचार केला जावु शकतो. साम्यवादी जगाने कार्ल मार्क्सचा वापर केवढ्या सोयीने केला हा इतिहासही येथे विचारात घ्यायला हवा. यातुन मुलभुत तत्वद्न्यान दूर रहात असुन मानवी आस्तित्त्वाचाच संकोच केला जात असल्याचे विदारक चित्र आपल्याला पहायला मिळते.
परंतू अभिनिवेशाच्या आहारी जात तत्कालिन परिस्थिती व प्रचार यातून आपले स्वतंत्र विचार आणि व्यक्तित्व यांस हरपुन बसणारे शेवटी कशाची प्राप्ति करतात हा एक प्रश्नच आहे. समाजाच्या व्यापक भवितव्यासाठीचे ते बलिदान आहे वा त्याग आहे ही विधाने खुपच अपवादात्मक परिस्थितीत करता येतात. खरे तर दहशतवादाचे कोणतेही हत्यार न वापरतासुद्धा हीच साध्ये साद्ध्य करता येवू शकतात. परंतू तसे घडने हेच मुळात नेत्यांना/राष्ट्रप्रमुखांना आणि अनेकदा पिसाट उन्मादवादी अनुयायांनाही नको असते. उदा. इराकचा प्रश्न हा अश्लाघ्य पद्धतीचा दहशतवाद करुनच सुटु शकत होता का...? आणि दहशतवादामुळे तो पुरेपूर साध्य झाला असे म्हनता येईल का? अमेरिकेने वा रशियाने जेथेही आपली समर्थक पांगळी नेत्रुत्त्वे लादुन ठेवली ते पाकिस्तान, इजिप्त ते आता लिबियात काय सुरु आहे? इस्राएलचे अरबांच्या बोकांडी बसवलेले राष्ट्र किती गरजेचे होते...? मग लदाखच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मात्र जगात कोणाचीही प्राथमिकता का नाही?...मग स्वातंत्र्याच्या गप्पा हाकणारे हे कोण आहेत? जागतीक राजकारणात अनुपयुक्त असणार्यांचे आस्तित्व कसे बेदखल केले जाते हे आपण यातुन पाहु शकतो. हा दहशतवाद नव्हे काय? मानवी आस्तित्वाची किंमत सोयीस्कर ठरवण्याचाच हा अश्लाघ्य प्रयत्न नव्हे काय?
आणि त्याविरोधात किती नागरीक जागरुकतेने उभे राहतात यावरून आजच्या जगाची नैतीक पातळी ठरवायला गेलो तर ती वजाबाकीत जाणारी आहे असेच स्पष्ट दिसेल. किंबहुना प्रत्येकालाच कोणत्या ना कोनत्या प्रकारचा दहशतवाद मान्य आहे, समर्थन आहे वा सहभाग आहे असेच चित्र दिसते. सनातन प्रभात असो कि बजरंग दल, शिवसेना असो कि म.न.से., त्यांचेही दहशतवाद स्वजातीयांना/धर्मियांना/प्रांतियांना प्रिय होत जातात आणि हीच आधुनिक मानवी समाजाची शोकांतिका आहे. ही उदाहरणे दिली कारण आपण सहिष्णू असण्याचा दावा करणार्या धर्मातीलच हे लोक आहेत.

मुळात आज सारेच जग माध्यमांच्या वेढ्यात आवळले गेले आहे आणि ही माध्यमे अत्यंत सोयीने वापरण्यात सारेच सत्तापिपासू तरबेज झाले आहेत. लोकांची मते ही बनवली जातात...स्वतंत्र विचार करण्याची त्याची शक्तीच हिरावून घेतली जात आहे आणि आजच्या मानवी समुदायाला त्याचे कितपत भान आहे? खोट्या वा अर्धसत्य माहितीचा मारा करत वा भावनिक आवाहने करत प्रजेची स्वतंत्र विचार करण्याची शक्ति हरपवणे हा मानवी आस्तित्वावरील न्रुशंस हल्ला आहे आणि त्याचा आताच विरोध केला जायला हवा याची जाणीव आजच्या आधुनिक समाजाला कितपत आहे?
हिंसक असो, आर्थिक असो, सांस्क्रुतिक असो, दबावगटांतर्फेचा असो, राजकिय असो, सामाजिक असो...कोनत्याही प्रकारचा असो...दहशतवाद हा आजच्या समाजाच्या मानगुटीवर बसलेला आहे. एवढा कि अनेकांना आपण स्वता:च दहशतावादी आहोत हेही समजत नाही एवढा तो सर्वव्यापी झाला आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोनत्या प्रकारच्या दहशतवादाची साधने दैनंदिन जीवनात वापरु लागला आहे...विचार आणि क्रुती त्यातुनच प्रकटु लागल्या आहेत...
यात मानवी जीवनाचे सौन्दर्य पुरेपूर विक्रुत केले जात आहे. मानवी आत्मा हरवला जात आहे. समस्त मानवी जीवनच आस्तित्वहीन होत मानवी जगण्याचे संदर्भच बदलले जात आहेत. ही काही चांगली बाब नाही. जगण्याचा शोध घ्यायचा तर आता कलावंतांनाही घाणीतच बरबटुन घावे लागत आहे. कारण मुलात मानवी जीवनच तेवढे गढुळले गेले आहे.
दहशतवादी म्हणुन एखाद्या जातीसमुहालाच वा धर्मालाच तेवढे जबाबदार धरता येत नाही हे मागील प्रकरणांवरुन लक्षात आले असेलच. सारेच धर्म/पंथ या ना त्या प्रकारे दहशतवादी क्रुत्यांत इतिहासकाळापासुन सहभागी राहिलेले आहेत. मग ते ख्रिस्ती असोत कि हिंदू, मुस्लीम असोत कि ज्यू, बौद्ध असोत कि जैन. प्रत्येक काळात कोनत्या ना कोणत्या धर्माचा दहशतवाद उफाळुन आलेला आहे. आज मुस्लिमांचा वाटतो. पण तो तेवढाच, किंबहुना त्याहीपेक्षा अवाढव्य पातळीवर अन्य धर्मियांकडुनही राबवला जात आहे, हे लक्षात कोणी घ्यायचे? ख्रिस्ती दहशतवाद हा आज राष्ट्रप्रणित दहशतवाद आहे. प्रत्येक युरोपियन राष्ट्राचा (साम्यवादी वगळता) अधिक्रुत धर्म ख्रिस्ती हाच आहे. त्यांना मुस्लिमांना नावे ठेवण्याचा अधिकार नाही. उच्चवर्णेय हिंदू कितीही नाकाने कांदे सोलत असले तरी "वैदिक भगवा दहशतवाद" आहे आणि त्याला लाखो समर्थक आहेत हे ते नाकारु शकत नाहित. तो त्यांच्या असंख्य क्रुतींतुन समोर नित्यही येत आहे. गतकाळातही तो होताच आणि पुरातन काळीही होता. त्याला प्रतिक्रिया म्हणुन काही बहुजनवादी संघटनाही प्रतिदहशतवादाचे हत्यार वापरत आहेत. हे सारे आपल्याच भावी पीढ्यांचे भविष्य नासाडुन टाकत आहेत हे कधी लक्षात येणार?
एकीकडे तंत्रद्न्यानाच्या प्रगतीमुळे राष्ट्र ही संकल्पनाच सैल होत चालली असतांना आणि मुळात ही संकल्पनाच क्रुत्रीम असतांना तिचा उदो-उदो आणि अतिरेकी अभिमान भविष्यातील पिढ्यांना कितपत आकर्षित करनार आहे? त्यात जगात आज ज्या गतीने मानवी समुदाय एका राष्ट्रातून दुस-या राष्ट्रांत विस्थापित होत आहेत, त्यांच्या पुढील पिढ्यांना हेच लोक कोणता राष्ट्रवाद वा सांस्क्रुतिकता शिकवणार आहेत?
कि अजून कोणतातरी नवीन दहशतवाद शोधला जाणार आहे?

आणि त्यातून कोणत्या मुल्यांची जपणूक होणार आहे?

दहशतवादाचे हे अविरत भयावह साहचर्य मुलभूत मानवी प्रेरणांना मारक ठरत आहे. जीवनातील सहजपणा हरपत चालला आहे. मानवी परस्पर संबंध निकोप आणि मानवी पातळीवर न राहता न्रुशंस होत चालले आहेत. प्रत्येक जातीय/धर्मीय आपापले कंपु बनवत त्यातच आपल्या जीवनाचा अर्थ शोधत आहे, ध्येये व प्रेये शोधत आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवरही आपण आजच्या आधुनिक जगाचे हे कंपुवादी चित्र पाहू शकतो. प्रत्यक्ष जीवनात अनेक मित्र मुस्लिम असुनही हिंदुंचे फ़ेसबुकवर किती मित्र असतात? ब्राह्मण-ब्राह्मनणेतर कंपू, त्यांचे जातीनिहाय ऊप-कंपु या आधुनिक तंत्रद्न्यानाचेही एक प्रकारचे विडंबण करत नाहिहेत तर काय आहे? सन्माननीय अपवाद वगळले तर त्यांच्या पोस्ट्स हा त्यांच्या जातींचा/धर्मश्रद्धांचा/तत्वद्न्यानाचा/नायकांचा प्रचार करण्यासाठीच असतात...ईतरांच्या बाजू/श्रद्धेये समजावून घेण्याची क्वचितच परंपरा दिसते. उलट एकमेकांची श्रद्धेये हीनभावनेतुन बघत त्यांची कधी कधी अत्यंत अश्लाघ्य भाषेत नालस्ती करण्याची/अश्लाघ्य प्रतिहल्ले करण्याची परंपरा जोशात सुरू आहे. हे कदाचित पुरेसे उदाहरण वाटणार नाही...पण एक वास्तव हे आहेच कि पुरातन काळात मानवी समुदायांत जो टोळीवाद होता तो आजही पुरेपूर जिवंत आहे आणि तो भयावह आहे...कारण या स्वत:च निर्माण केलेल्या भिंती/कुंपने एकुणातीलच समग्र मानवी जीवनासाठी विघातक आहेत याचे कसलेही भान न बाळगता आपण वैश्विक नागरिक होण्याची वाटचाल बंद करुन नकळत स्व-बंदिस्त होत आत्मविकासाचा अंत घडवतो आहोत ही जाणीवच संपुष्टात येत आहे. ही नक्कीच काळजी करण्याची बाब आहे.
प्रश्न असा आहे कि या सा-याच दहशतवादांतून मानवी आस्तित्त्वाचे अखेर काय होणार आहे?
मुळात मानवी आस्तित्व म्हणजे काय आणि ते आपण गमावत आहोत म्हणजे नेमके काय होते आहे हे तरी लक्षात येत आहे काय हा एक प्रश्नच आहे.
"स्व" विषयक जाणीवा, नेणीवा, स्वीकारणीय जीवनमुल्ये, बाह्य घटकांना प्रतिसाद देण्यासाठी होणा-या सकारात्मक क्रुती ई.च्या एकुणातील समुच्चयातून मानवी आस्तित्व आकार घेत असते. हे आस्तित्व प्रगतिशील असते. म्हणजे गतकाळातील चुकांतुन शिकत त्या चुका टाळत उदात्त मानवी ध्येये गाठण्यासाठी होणा-या वाटचालीतुन मानवी आस्तित्व प्रगल्भ होत असते. हा धेयवाद नव्हे वा आशावाद नव्हे. हे असे घडने हेच मानवी अस्तित्वाचे नैसर्गिक निदर्शक आहे.
परंतू मानवी समाज जेंव्हा पुरातन काळापासुन अनैसर्गिकच वागण्याचा हेका धरून बसला आहे तेंव्हा काय करायचे? आधुनिक द्न्यान-विद्न्यानाच्या अवाढव्य परिघातही तो आपल्या आदिम प्रव्रुत्तींतून बाहेर पडु शकत नसेल, संकुचितच होत जात असेल तर काय करायचे?

आपण कोठेतरी गंभीर चूक करत आहोत हे नक्की!

या पार्श्वभुमीवर भविष्यातील जग हे अधिक सौहार्दमय असेल अशी आशा बाळगता येत नाही. जग जवळ येत जाईल हे खरे परंतू भिंतींची/कुंपनांची संख्या अपरंपार वाढलेली असेल. व्यक्ति-व्यक्तिंमधील संबंध तणावपुर्ण होत जात (तसेही आज ते होतच आहेत) त्याची परिणती ही नुसती व्यक्तिला एकाकी करून थांबनार नाही तर त्याला पुरेपुर हिंसक बनवून टाकेल. जी भाषा विकसीत करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी मानवाच्या पुर्वजांनी अपार कष्ट केले ती भाषाच अडखळेल...तिची गरज कमी होत जाईल कारण संवादच थांबला असेल...जो काही उरेल तो गरजेपुरता...आदिम भावनांच्या शमनापुरता संवाद. मानवी जीवनातील काव्य हरपलेले असेल. सौन्दर्य हरवलेले असेल. मानवी संबंध निव्वळ गरजाधारित होत जात द्वेष हाच जीवनाचा मुलाधार बनलेला असेल. हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुस्लिम विरुद्ध ख्रिस्ती, ख्रिस्ती विरुद्ध ज्यू...ते...कंपनी विरुद्ध कंपनी, व्यक्ती विरुद्ध व्यक्ती, संघटना विरुद्ध संघटना, पिता विरुद्ध पुत्र...स्त्री विरुद्ध पुरुष अशा असंख्य परिमाणांत संघर्ष वाढत जाईल. शहरे विरुद्ध खेडी, शेतकरी विरुद्ध कारखानदार, भांडवलदार विरुद्ध साम्यवादी अशी बंडे घडु लागतील. असे घडण्याची बीजे आजच्या वर्तमानात आम्ही रोवलेली आहेतच! द्वेषाची लागण झालेली नाही अशी व्यक्ती आज सापडने अवघड होत चाललेच आहे...त्याची परिणती या भयावह वाटणा-या भविष्यात होनारच नाही याची खात्री कोणीएक देउ शकत नाही. आम्ही सारे नंग-चोट पिसाट होत चाललो आहोत. कदाचित असेच घडावे अशीच आमची लायकी असेल!
पण असे काही घडायचे नसेल, मानवी आस्तित्व ख-या अर्थाने बहरुन यावे असे वातत असेल तर आम्ही आजही बदलू शकतो...अजुनही वेळ गेलेली नाही. दहशतवादाच्या सर्वच रुपांना आम्ही तिलांजली द्यायला हवी...बस्स...एवढेच!

Friday, March 11, 2011

दहशतवादाची रुपे: आर्थिक दहशतवाद

(माझे "दहशतवादाची रुपे" हे दहशतवादाचा पुरातन काळापासुन वेध घेत त्याची वर्तमानकाळातील दाहकता दर्शवणारे पुस्तक लवकरच येत आहे. यात वैदिकांचा दहशतवाद, ज्यु, ख्रिस्ती, इस्लाम, जैन, बुद्धिस्ट, माओवादी/भांडवलवादी दहशतवाद ते सांस्क्रुतीक/आर्थिकादि दहशतवादांची चर्चा केली आहे. याच पुस्तकातील हे एक प्रकरण...)

बलाढ्य संस्क्रुत्या, समाज, धर्म, राष्ट्र यांनी पुरातन काळपासुन आर्थिक दहशतवादाचा वापर केला आहे असे आपण इतिहासाचे परिशीलन करतांना स्पष्टपणे पाहु शकतो. अलीकडे तुलनेने निर्बल असनारे घटकही याच दहशतवादाचा वापर करत आहेत. एकुणात आर्थिक दहशतवाद फोफावत आहे.
वरकरणी हा दहशतवाद फार सौम्य वाटतो. यात जीवितहानी नसते. कसल्याही प्रकारची हिंसा अनुस्युत नसते. यात विशिष्ट समाज, धर्मीय, राष्ट्रे वा समाजघटकांवर आर्थिक बंधने लादुन वा आर्थिक संकटे क्रुत्रिम रित्या कोसळवुन त्यांची आर्थिक नाकेबंदी करत त्यांचे जीवनमान/एकुणातील अर्थव्यवस्था पराकोटीच्या खालच्या पातळीवर नेणे व जोवर ते स्वानुकुल धोरणे राबवत नाहीत वा अपेक्षित क्रुत्ये करत नाहित तोवर त्यांना नाडत राहणे हा प्रमुख उद्देश असतो. त्यामागील मुख्य हेतु प्रसंगपरत्वे व काळानुरुप बदलत आले आहेत. या दहशतवादामागे काही वेळा नैतिक द्रुष्टीकोन असल्याचा कांगावा केला जातो, पण ते तसेच असेल याची खात्री अशी बंधने लादणारे देवु शकतीलच असे नाही. किंबहुना कोनत्याही दहशतवादामागे कोनतीही नैतिकता असु शकत नाही हे उघड आहे.
मानवी जीवनात आर्थिक घटक फार महत्वाची भुमिका पार पाडतात. मानवी जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक राज्य/राष्ट्र एकुणातील समाजाची आर्थिक प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्नरत असते. त्यासाठी उत्पादन व्रुद्धी, व्यापारव्रुद्धी तसेच बौद्धिक संपदांची निर्मिती करत एकुनातील नागरिकांचे जीवन किमान सुसह्य तरी व्हावे यासाठी सत्ता प्रयत्न करत असतात. हा साराच अर्थव्यवहार परस्परावलंबी असल्याने निर्यात अधिक व्हावी आणि आयात कमी व्हावी असा प्रयत्न सर्वच अर्थव्यवस्था करत असतात. परंतु प्रत्यक्षात त्यात समतोल होतोच असे नाही. काही राष्ट्रे (भुप्रदेश) विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक उत्पादने करत असतील आणि तशी नैसर्गिक साधनसंपदा अन्यत्र उपलब्ध नसेल तर एक वेगळाच तीढा निर्माण होतो हे आपण तेल-उत्पादक राष्ट्रांबद्दलच्या अन्य राष्ट्रांसहितच्या अमेरिकेच्या कुटील कारवायांतुन, लादल्या जाणार्या आर्थिक निर्बंधांतुन तसेच प्रसंगी झालेल्या युद्धांतुन पाहु शकतो. किंबहूना इस्राएलची निर्मिती हीच मुळात तेलुत्पादक अरब राष्ट्रांवर दहशत बसवण्यासाठी झाली आहे असे स्पष्ट म्हणावे वाटते. एवढेच नव्हे तर ही बलाअढ्य राष्ट्रेही अनेकदा दहशतवादी कारवायांतुन त्या-त्या शत्रु राष्ट्रे/राज्यांची आर्थिक व्यवस्था खिळखिळी करुन त्यांना जेरीस आणण्याचेही प्रयत्न करत असते हेही आपल्या लक्षात येईल. इराकविरुद्धचे युद्ध हे अन्य काही नसुन दहशतवादी हल्लाच होता.
इतिहास
आर्थिक दहशतवादासही पुरातन इतिहास आहे. जिंकलेल्या राज्यांवर जबर आर्थिक खंडण्या लादण्याची प्रथा जगभर होती. त्यात युद्ध खर्च भरुन घेणे तसेच आपल्या तिजो-या भरणे हे हेतु होतेच पण त्याच वेळीस शत्रु राज्याने पुन्हा आक्रमणाच्या स्थितीत येवुच नये यासाठी त्याला आर्थिक द्रुश्टीने विकलांग करुन सोडणे हा मुख्य हेतु असे. रोमन साम्राज्य जवळपास सर्वत्र पसरले यामागे फक्त सैनिकी कारवाया होत्या असे नव्हे तर आर्थिक दहशतवादही होता. इजिप्त पासुन ते जर्मेनियापर्यंत रोमनांनी आर्थिक दहशतवादाचा निरलसपणे उपयोग केला. तत्पुर्वी इजिप्तने कोनान प्रांतातील ज्युंवरही पराकोटीचे आर्थिक न्रिबंध घालुन त्यांना जवळपास गुलामीचे जीवन जगायला भाग पाडल्याचे आपल्याला दिसते. भारतात ऋग्वेदातील काही ऋचांतुन वैदिक मंडळी सिंधु जनीयांच्या शेतीतील पाट तसेच नद्यांवरील बांध फोडुन उभी पीके नष्ट करुन सिंधु जनीयांना आर्थिक संकटांत आणित असत असे दिसते.
अति-अत्यल्प मोबदल्यात (बव्हंशी फुकट) काम करुन घेण्यासाठी जी गुलाम प्रथा आली त्यामागे आर्थिक दहशतवादाचाही भाग होता. भारतात ही गुलामी शुद्रातिशुद्रांवर लादण्यात आली. त्यामागे धार्मिक कारणे दिली गेली तसेच कर्मविपाक सिद्धांताचा वापर केला गेला. या दहशतवादामुळे हजारो वर्ष या मानवी समाजाला अधोगतीचे जीवन जगणे भाग पडले. पण यामुळे अत्यंत स्वस्तात वेठीवर मोठी अवढव्य कामे करुन घेता आल्याने वरिष्ठ समाजाला एरवी जेवढे मुल्य चुकवावे लागणार होते तेवढे वाचत असल्याने त्यांची आर्थिक व्रुद्धी झाली तर या शोषित वर्गाची स्थिती खालावत गेली. हा आर्थिक दहशतवादाचा द्रुष्य परिणाम होय. या दहशतवादाचा वरिष्ठ वर्गाला फायदा असा झाला कि हा शोषित वर्ग बंड करु शकण्याच्याही स्थितीत राहिला नाही. पुण्यातील शनिवारवादा ते अनेक अन्य वाडे अशाच पद्धतीने वेठीवर बांधुन घेतले गेले आहेत. परंतु त्याच्या एकुण मुल्यांकनात या वर्गाला कसलाही वाटा दिला गेलेला नाही.
आफ़्रिकन गुलामांबद्दल वेगळ्या अर्थाने असेच घडले. लक्षावधी आफ्रिकन लोकांना गुलाम केले गेले, त्यांच्याच भुमीतील नैसर्गिक साधनसामग्री ओरबाडुन लुटण्यात आली, त्यासाठी याच ख-या भुमिपुत्रांचा उपयोग करुन घेतला गेला, तोही वेतन वा कसलाही मोबदला न देता, यात अमानवीय प्रकारचा आर्थिक दहशतवादाचाही भाग आहे आणि तो समाजेतिहासात महत्वाचा आहे.
या आर्थिक दहशतवादामुळे युरोपियन/अमेरिकनांची आर्थिक भरभराट झाली तर त्याचा उलट परिणाम म्हणजे ल्क्षावधी लोक पिढ्यानुपिढ्या नुसते गुलाम बनले नाहित तर त्यांची विचारशक्तीही कुंठीत करुन टाकण्यात आली. या गुलामांमुळे गो-या लोकांची पराकोटीची आर्थिक भरभराट झाली. हा विषम व्यवहार होता म्हणुन तो आर्थिक दहशतवादच होता. एवढेच नव्हे तर या लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा यासाठी जी आमिषे दिली गेली तीही आर्थिक दहशतवादाचेच एक अंग होते, भारतात धर्मप्रचारक याच दहशतवादाचा वापर करत असतात. दहशतवाद फक्त भिती दाखवण्यासाठी नसतो तर आर्थिक आधारावर दुस-यास आपले इप्सित साद्ध्य करण्यासाठी वापरणे यातही अप्रत्यक्ष दहशतवादच असतो.
इस्लामिक आक्रमकांनी आर्थिक दहशतवादाचा पुरेपुर वापर करुन घेतला आहे. जे मुस्लीम नाहित त्यांच्यावर "जिझिया" कर बसवणे हा आर्थिक दहशतवादाचाच एक भाग होता. हा कर पराकोटीचा अन्याय्य असे. जगण्यासाठी कश्ट करायचे राहिले बाजुला....हा कर चुकवण्यासाठीच राबावे लागे. मग नाविलाजाने अनेक काफिर मुस्लिम धर्म स्वीकारुन मोकळे होत. भारतातील असंख्य धर्मांतरे ही जबरदस्तीने करण्याची गरजच पदली नाही...जिझिया कर तसे घडवुन आणायला समर्थ होता. आजही इस्लामी कट्तरपंथीय राजवटी जेथे आहेत अशा तालीबान्यांनीही या कराची वसुली सुरु करुन अन्य धर्मियांचे जीवन नकोसे करण्याचे पराक्रम केले आहेत.
आर्थिक दहशतवाद हा हिंसक दहशतवादापेक्षाही एखाद्या मानवी समुदायाचे जीवन कसे हीणकस बनवत प्रलयकारी ठरतो याची अगणित उदाहरणे इतिहासात भरलेली आहेत. दुस-या महायुद्धात बहुतेक हल्ले हे सैनिकांना मारण्यासाठी नव्हे तर शत्रु राष्ट्रांचे कारखाने, शेती ई. नष्ट करुन त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी केले गेले आहेत. आर्थिक द्रुष्ट्या विकलांग झालेले राष्ट्र लवकर शरण येते हा एक अनुभव आहेच.

खनीज तेलावर नियंत्रण म्हनजे इतर देशांवर नियंत्रण
अन्नावर नियत्रण म्हणजे जगातील जनतेवर नियंत्रण!- हेन्री किसिंजर
आणि अक्षरश: याच तत्वद्न्यानावर जागतीक सत्ताकारण सुरु आहे. त्यात अनेक बाबींची भर पडली आहेच. मध्यपुर्वेतील आजही पेटत्या ठेवलेल्या संघर्षामागे केवळ तेलावरील नियंत्रण हाच कळीचा मुद्दा आहे आणि सर्वच युरोपियन जग अमेरिकेच्या मागे, प्रसंगी पराकोटीचा खोटारडेपणा करत कसे उभे होते हे आपण इराक युद्धाच्या प्रकरणात अनुभवले आहेच. तेलावर नियंत्रण म्हणजे राष्ट्रांवर नियंत्रण हे खरेच आहे कारण तेलाशिवाय कोणत्याही राष्ट्राचा कारभार कणभरही पुढे सरकु शकत नाही. किंबहुना आजच्या जागतीक राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदु म्हणजे तेलाचे राजकारण ठरला आहे आणि त्याला सर्वस्वी आर्थिक बाजु आहेत हे उघड आहे. त्यासाठी कोनत्याही स्तरावर जाण्याची या प्रगत राष्ट्रांची तयारी आहे. आणि प्रति-दहशतवाद म्हणुन ओपेक या तेल निर्मात्या राष्ट्रांच्या संघटनेनेही अवघ्या जगाला कसे वेठीस धरुन धुळ चारण्याचा प्रयत्न केला आहे हे या संघटनेचा इतिहास पाहिला तर लक्षात येते.
तेलाचे भाव वाढले तर समर्थ अर्थव्यवस्थांचेही अर्थकारण गडगडते हे सर्वांनाच माहित आहे. सर्वच वस्तु महागाईचे उच्चांक गाठु लागतात...आणि जीवनमान असह्य होवु लागते आणि नेमके असेच घडवणे आर्थिक दहशतवादाचा हेतु असतो.
हीच बाब अन्नालाही लागु पडते. आजही जगातील सर्वच राष्ट्रे अन्नधान्य निर्मितीत स्वयंपुर्ण नाहीत. त्याउलट रशिया ते अमेरिका यासारखी राष्ट्रे अन्नाचा अतिरिक्त साठा असणारी आहेत. भारतही आता या यादीत आला असला तरी आजही ३०-४०% नागरिक अर्धपोटी राहतात हेही एक कटु वास्तव आहे. १९७५ च्या भीषण दुष्काळात भारताला अक्षरश: अमेरिकेत जनावरांना खायला दिले जाणारे अन्न आपल्याला अमेरिकेने पुरवले होते...(त्यातुन येथील जमिनी नापीक होण्यासाठी गाजरगवताचे बीज सोडुन दिले होते...) आणि त्या बदल्यात भारताच्या अनेक आंतरराश्ट्रीय धोरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.
पण हा दहशतवाद एवढ्या पुरताच सिमीत नाही. बी.टी. बियाणी बनवणार्या अमेरिकन कंपन्या जगभर वेगाने घुसत आहेत. यामुळे भविष्यात असंख्य देशी वाण नष्ट होण्याचा धोका तर आहेच पण अन्न-धान्यावरील हे अप्रत्यक्ष परावलंबित्व असणार आहे. या बियांण्यांचा पुनर्वापर होत नाही...दर वेळीस ती विकतच घ्यावी लागतात....एवढेच नव्हे तर या बियाण्यांत जनुकिय बदल घडवले जात असल्याने त्यातुन निर्माण होणारा संभाव्य धोका अद्याप आकलनाबाहेरचा असला तरी ही जगातील अनेक राष्ट्रांची नव्या पारतंत्र्याकडे वाटचाल असणार आहे. सध्या बी.टी . कापुस तसेच वांग्यांपर्यंत मर्यादित असनारी ही घुसखोरी सर्वच पीकांत घुसणार आहे अशी चिन्हे आहेत. मोन्सटोसारखी जागतीक कंपनी आज या क्षेत्रात जागतीक मक्तेदारी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे येणारे पारतंत्र्य हे विनाशक असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. शिवाय यातुन अनेक पीक-नाशक जीवाणु सोडुन नवीन रोगराया निर्माण करुन त्या दुर करण्यासाठी नवी कीटनाशके इतरांच्या बोकांडी थोपली जातील ते वेगळेच. यातुन विशिष्ट राष्ट्रे/कंपन्या धनाढ्य होत जातील आणि जगभरचे शेतकरी मात्र कंगाल होतील हे वेगळेच...पण महत्वाचे म्हणजे स्थानिक खाद्य संस्क्रुत्या नष्ट होतील...ही सुरुवात तर झालीच आहे. पारंपारिक पण सकस आहाराकडुन सारेच निक्रुष्ट पद्धतीचा आहाराकडे जात आहेत...आणि यातुन जे नागरिकांचे नुकसान होणार आहे ते पहाता या दहशतवादाच्या भीषणतेची कल्पना यावी.
त्यामुळे भारतातील अनेक शेतकरी बी.टी. च्या विरुद्ध का आहेत हे समजावुन घेवुन त्यांना क्रुतीशील पाठिंबा देण्याची गरज आहे हे मी येथे आवर्जुन नमुद करतो. अशा विरोधकांत अमरावती जिल्ह्यातील शाश्वत शेती करणारे आणि देशभर तिचा प्रसार करणारे श्री. वसंतराव फुटाणे आणि त्यांच्या पत्नी सौ. करुणाताई फुटाणे यांचा येथे क्रुतद्न्यतापुर्वक आवर्जुन उल्लेख करण्याची गरज आहे.
याशिवाय या दहशतवादामद्धे मुद्दम क्रुत्रीम रोगरायांचे विषाणु/जीवाणु सोडुन कोट्यावधी टन अन्नधान्य नष्ट करण्याचा उद्योगही सामील आहे. असे प्रयोग युक्रेन या गव्हाचे कोठार असणार-या प्रदेशात जसे केले गेले आहेत तसेच चीनमद्धेही केले गेले आहेत. याचा उद्देश अनेक स्तरीय फायदे मिळवण्यासाठी केला जातो. असे प्रयत्न राष्ट्रप्रणितच असतात असे नसुन खुद्द बी-बियाणे उत्पादक कंपन्या ते कीटनाशक कंपन्यांचाही स्वर्थी सहभाग असतो. या दहशतवादामुळे आपण नैसर्गिक समतोल ढासळवत भविष्याचीच नासाडी करत आहोत याचे भान अशा सरकारांना/कंपन्यांना असतेच असे नाही. सामान्य जनतेला तर या दहशतवादाची भीषणता अद्याप समजलेलीच नाही. कारण हा दहशतवादच मुळात स्लो पोयझनींगसारखा असतो. त्याचे परिणाम लक्षात येईपर्यंत खुप उशीर झालेला असतो. यासाठी व्यापक जाग्रुतीची मोहीम असने आवश्यक आहे.
या आर्थिक दहशतवादात आजकाल औषध कंपन्यांनीही भाग घेतला आहे. दरवर्षी कोणत्या-ना-कोणत्या जीवाणु-विषाणुला सोडले जाते...प्रसिद्धी माध्यमांचा वापर करुन पराकोटीचे भय पसरवले जाते...आणि त्या रोगांना नष्ट करण्यासाठी याच कंपन्या अत्यंत महागडी प्रतिबंधके विकायला आनतात. अलीकडेच भारतात स्वाईन फ़्लुने काय दहशत माजवली होती हे सर्वांच्या लक्षात असेलच. हा कंपन्यांचा वेगळा दहशतवाद आहे आणि त्यामागे आर्थिक कारणे आहेत हे उघड आहे. या फ़्ल्यु मुळे भारत सरकारवर अब्जावधी रुपयांचा बोजा पडला. इंटरन्यशनल मोनेटरी फंडाच्या अहवालानुसार २००८ साली स्वाइन फ़्ल्यु मुळे जगाच्या एकुण जी. डी. पी. पैकी ५% (म्हनजे ३ ट्रिलियन डालर्स.) एवढी घट नोंदली गेली. त्या विशिष्ट काळात भितीमुळे लोकच बाहेर पडायला तयार नसल्याने एकुण उत्पादकता घटत व्यवसायांवर जो परिणाम झाला त्यामुळे झालेले नुकसान वेगळेच...आणि सगळ्यात वाईट आनि निषेधार्ह बाब अशी कि निरपराधांचे प्राण गेले.
अमेरिकन साम्राज्य जगाच्या कानाकोप-यात पोहोचले आहे...त्यातुन जगाची अनावश्यक लोकसंख्या कमी करण्याचा अमेरिकेच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग आहे हे सत्य ज्युलियन असांजच्या लक्षात आल्यानेच त्याने विकीलीक्सच्या माध्यमातुन अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड करण्याचा निर्णय घेतला हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक दहशतवाद हा अनेक माध्यमांतुन वापरण्यामागे फक्त स्वत:चा आर्थिक फायदा लाटणे असे नव्हे तर जगाची लोकसंख्याही अशा विक्रुत मार्गाने कमी करण्याचा हा डाव आहे.

आर्थिक निर्बंध:

कोणतेही राष्ट्र आपनास कोणत्याहीप्रकारे आव्हान देण्याच्या स्थितीत येवु नये, मग ते राजकिय द्रुष्तीकोनातुन असो वा तंत्रद्न्यानाच्या बाबतीत असो. भारतावर इंदिराजींनी पहिले अणुस्फोट घडवुन आणल्यानंतर अमेरिकेने व त्याचा भाट राष्ट्रांनी भारतावर आर्थिक निर्बंध घातले होते व त्याची पुनराव्रुत्ती वाजपेयी सरकारच्या काळातही झाली होती हे सर्वांच्या स्मरणात असेलच. या आर्थिक निर्बंधांत अशा राष्ट्रांना आर्ह्तिक सहकार्य, विशिष्ट उच्च-तंत्रद्न्याने/धातु याची निर्यात न करणे व त्यांच्या कडील आयातीवरही बंदी घालणे याचा समावेश होतो. असे आर्थिक निर्बंध तिस-या जगातील अनेक राष्ट्रांवर वेळोवेळी घातलेले आहेत. पाकिस्तान असो कि अफगाणिस्तान, आता ईराण असो कि पुर्वी इराक, लिबिया असो कि युगोस्लाविया.
१९४५ ते १९९० पर्यंत सुरक्षा समितीने फक्त दोनदा असे निर्बंध घातले होते पण १९९० नंतर ११ राष्ट्रांवर असे निर्बंध वारंवार घातले गेलेले दिसतात. इराकवरील आर्थिक निर्बंधांमूळे इराकमधील २३७००० मुले व व्रुद्धांचा कुपोषण आणि जलजन्य रोगांमुळे म्रुत्यु झाला. प्रत्यक्ष आखाती युद्धातील ४०,००० म्रुत्युंपेक्षा हे म्रुत्युचे प्रमाण भयंकरच म्हटले पाहिजे. (संदर्भ-ECONOMIC SANCTIONS, JUST WAR DOCTRINE, AND THE "FEARFUL SPECTACLE OF THE CIVILIAN DEAD" by Joy Gordon) अन्यत्त्रचीही स्थिती वेगळी नाही. आर्थिक निर्बंध हे युद्धांपेक्षा किती गंभीर परिणाम घडवुन आणु शकतात याचे हे एक उदाहरण आहे. मानवी मुल्यांची सरसकट पायमल्ली म्हणजे आर्थिक निर्बंध म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. पण आर्थिक निर्बंधांमुळे दक्षीण आफ्रिकेतील वांशिक भेदभावाचे पर्व संपले असा युक्तिवाद आर्थिक निर्बंधांच्या बाजुचे लोक करतात. परंतू प्रत्यक्षात असे "उपयुक्त" निर्बंध अपवादात्मकच असुन ते अन्य राष्ट्रांना दडपण्यासाठीच वापरले गेले आहेत, जात आहेत.
आर्थिक निर्बंधांचा वापर स्वत:ची स्वयंघोषित महासत्ता हीच जगाची नियंत्रक आहे हे सिद्ध करण्यासाठी केला जातो. आपल्या जागतिक ध्येयधोरणांना कसलाही छेद जावु नये हीच महत्वाकांक्षा यामागे असते. परंतु या निर्बंधांच्या दहशतवादामुळे त्या-त्या संबंधित देशातील आर्थिक वाढ खुंटते आणि त्याचवेळीस तंत्रद्न्यानाचीही गळचेपी होते. यामुळे एकुण विकासदर खालावत जातो आणि त्याची परिणती संबंधीत देश विकलांग होण्याची वेळ येते. या बंद्या तेंव्हाच ऊठवल्या जातात जेंव्हा संबंधित राष्ट्रे वर्चस्ववाद्यांना शरण जातात...त्याच्या शरणागतीच्या अटी-शर्ती काय असतात हे सामान्य नागरिकांपर्यंत कधीच पोहोचत नाही. नागरिकांनाही ख्याली-खुशालीचीच अधिक पर्वा असल्याने त्याची कोण तमा बाळगतो?

दहशतवाद्यांचा आर्थिक दहशतवाद!

आर्थिक दहशतवादातील प्रगत राष्ट्रांचा सहभाग आहे तसाच तो जागतिक दहशतवादी संघटनांचाही आहे. अल-कायदा, लष्कर-ए-तोयबाचा तर हा उघड उघड अजेंडा आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला हा हिंसक माजवण्यासाठी जेवढा होता तेवढाच तो आर्थिक खच्चीकरण करण्यासाठीही होता. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे तात्काळ झालेले आर्थिक नुकसान जेवढे झाले त्यापेक्षा अवाढव्य नुकसान "दहशतवादाविरोधातील लढ्यात" झाले. या लढ्यातुन आद्यापही अमेरिकेच्या हाती काही लागलेले नाही. वर नाक कापले गेले ते गेलेच. शिवाय त्यांची जागतिक धोरणेही प्रभावित झाली. पाकिस्तानबाबत कसलीही उघड भुमिका घेणे या महासत्तेलाही अवघड झाले.
दहशतवादी आपल्या कारवायांसाठी पैसा कसा उभा करतात हे माहित असणे आवश्यक आहे. कट्टर-पंथीय धनाढ्यांकडुन येणा-या देणग्या हा एक स्त्रोत आहेच. पण इस्लामी दहशतवाद्यांनी त्यासाठी एक नवीच समांतर अर्थव्यवस्था गेली ४०-५० वर्षांत विकसित करुन ठेवली आहे...आणि ती आहे अफु-कोकेन आधारित अर्थव्यवस्था. ही नशीली द्रव्ये अफगान-पाकिस्तानातच बनतात व जावुन पोहोचतात ती या श्रीमंत राष्ट्रांतच. त्यातुन येणारे उत्पन्न अवाढव्य आहे हे तर खरेच आणि ते येते त्यांच्या शत्रु राष्ट्रांकडुनच! तेही तेथील तरुण पिढ्यांना बरबाद करतच. म्हणजे हे उत्पन्न तर झालेच अप्रत्यक्ष नागरी आरोग्य धोक्यात आणत जे एकुणातील परिणाम साधले जातात ते वेगळेच. हा नशील्य चीजांचा वार्षिक व्यापार जवळपास ३२२ बिलियन डालर्सचा आहे असे इंटरपोलचा अहवाल सांगतो. यावरुन या व्यापाराची भयावहता लक्षात यावी आणि यातील बहुतेक पैसा हा दहशतवादी संघतनांकडेच शेवटी येत असल्याने अवाढव्य भांडवल त्यांच्याजवळ जमा होत असते. या बरोबरच दहशतवादी संघटना आजकाल बनावट मालाच्या निर्याती करण्यातही उतरल्या आहेत. यात डी.व्ही.डी ते ओप्टिकल उत्पादनांचा समावेश आहे. यामुळे दहशतवाद्यांना मोठा प्रमाणावर फ़ंडींग तर होतेच पण त्या-त्या अर्थव्यवस्था पोखरल्या जावु लागतात.
म्हनजेच "अर्थकारण" हे मानवी जीवन सुख-सम्म्रुद्धीकारक बनवण्यासाठीच असते हे सिद्धांत आता रद्दबातल झाले असुन त्याचाच दहशतवादाचे एक हत्यार म्हणुन वापरत एकुणातील मानवी जीवन विकलांग करण्यासाठी त्याचा कसा वापर केला जातो हे यामुळे लक्षात यावे. याखेरीज बनावट नोटा शत्रू राष्ट्रांत चलनात घुसवून त्या राष्ट्राच्या आर्थिक पायाला आव्हान देण्याचाही उद्योग दहशतवादी करत असतातच.
जेही व्यापक प्रमाणात होते ते तसेच लघुत्तम पातळ्यांवरही घडु लागते. नको असलेले कर्मचारी सरळ काढुन न टाकता त्यांच्या वेतनात कपात करणे, कामाचे तास वाढवणे वा गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या करणे हे तंत्र आज अनेक कंपन्या/संस्था वापरत आहेत...अत्यंत नाईलाज आहे त्यांना सोडले तर कंपन्यांना अपेक्षित परिणाम साधता येतो. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
आर्थिक दहशतवाद आता सर्वांनाच विळखा घालुन बसला आहे. एकुणातच आपण दहशतवादाच्या असंख्य रुपांनी झाकोळुन गेलो आहोत. अशा स्थितीत मानवी स्वातंत्र्य आणि समता या बाबी लुतभ-या कुत्र्यासारख्या बेदखल झाल्या आहेत आणि तरीही आपण त्याची केवळ अद्न्यानाधारित भलावन करत असतो ही आपली...सामान्यांची आत्मवंचना असते. कटु वास्तवाकडे पहाण्याची क्षमताच आपण हरवुन बसलो असतो आणि नकळत कोणत्या ना कोणत्या दहशतवादाचे समर्थन तरी करतो वा त्याचे वाहक बनत असतो.
ही काही एकुणातील मानवी समुदायासाठीची चांगली घटना नाही.



संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

  संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्...